Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘आरोग्य’चे विभाजन नव्हे, विस्तारीकरण!

$
0
0

वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करण्याचा विचार तूर्तास नाही, तर या विद्यापीठाचे विस्तारीकरण करण्याचे महत्वाकांक्षी नियोजन आहे, असा खुलासा वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कुलपती विनोद तावडे यांनी दिली.

आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तावडे म्हणाले, की केंद्रीय मंत्रालय आणि आयुष यांच्यामध्ये नव्या उपक्रमांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चेचा अन्वयार्थ आरोग्य विद्यापीठाच्या विभाजनाशी लावून या विद्यापीठाचे विभाजन होणार असल्याचे चित्र उभे केले जाते आहे. मात्र, कॅबिनेटसमोर या प्रकारचा कुठलाही विषय अद्याप आलेला नाही. या उलट नाशिक महापालिकेच्या सहकार्याने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपच्या माध्यमातून विद्यापीठाचे एक्सपान्शन करण्यात येईल. याअंतर्गत नाशिकला नवे रुग्णालय, वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर व पदवीचे अभ्यसक्रमही सुरू करण्यात येतील. आयुषचा विद्यापीठाचा मुद्दा त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक संवेदनशील बनवला गेला, तितका तो नव्हता असाही युक्तीवाद तावडे यांनी केला.

नाशिकमध्ये विद्यापीठाचे स्वतंत्र मेडिकल कॉलेज करण्यासाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवे विद्यापीठ शक्य

काळासोबत नवे अभ्यासक्रम, नव्या गरजा निर्माण होत आहेत. त्यांना पुरेसे ठरण्यासाठी राज्यात नव्या विद्यापीठाचा विचार शक्य आहे. मात्र या विचाराला सद्यस्थितीत विभाजनाशी लावला जाणारा संदर्भ योग्य नाही, असे तावडेंनी सांगितले.

सांस्कृतिक केंद्रासाठी प्रस्ताव

नाशिकमध्ये विभागीय सांस्कृतिक केंद्र निर्माण होण्याच्या दृष्टीने पदनिर्मितीसाठी एमपीएससी आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहितीही तावडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्काय ग्लायडरचे देवळालीत सुरक्षित लँडिंग

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प देशातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करीत जागतिक विक्रम नोंदविण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या पॅरामोटर स्काय ग्लायडर समूहाने विशेष मो‌हीम आखली आहे. हा समूह देवळाली कॅम्पच्या ब्रिटीशकालीन विमानतळावर सुरक्षितपणे उतरला आहे. या समूहाला मानवंदना देण्यासाठी ५० हून अधिक भारतीय हवाई दलाचे ठराविक अधिकारी उपस्थित होते.

दिल्ली येथे २८ जानेवारी २०१६ रोजी या मोहिमेची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. मोहिमेला १ फेब्रुवारी २०१६ रोजी पश्चिम बंगाल येथील कलाईकुंड हवाई दलाच्या स्थळावरून सुरुवात झाली. देवळाली कॅम्पनंतर आता कन्याकुमारीमार्गे उत्तरेकडे हा स्काय ग्लायडर समूह निघाला आहे. यानंतर गुजरात राज्यातील बडोद्याकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती या मोहिमेतील समुहाचे नेतृत्व करणारे विंग कमांडर एमपीएस सोळंकी यांनी दिली. या महिन्याच्या २० तारखेपर्यंत पुन्हा पश्चिम बंगालच्या कलाईकुंड येथे पोहचण्याचा त्यांचा मानस आहे. या मोहिमेत जीपी कॅप्टन आर के सिंघ, विंग कमांडर रमाकांत, स्कॉडन लीडर अंकूर यादव यांच्यासह ११ जण सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बार्नस् स्कूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प येथील बार्नस् स्कूलच्या सर्व कामगारांनी वेतन वाढीसाठी अचानक बेमुदत संपाची घोषणा केल्याने शाळेचे व्यवस्थापन कोलमडले आहे. दहावीच्या परीक्षा सुरू असताना कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा संप चुकीचा असल्याचे शाळेचे म्हणणे आहे. बार्नस् स्कूलच्या चतुर्थ श्रेणी कामगारांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सेनेने या बंदसाठी आवाज उठविला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचा वेतन करार ३१ मार्च २०१५ पर्यंत करण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षापासून हा वेतन करार नव्याने न करण्यात आल्यामुळे कार्मचाऱ्यांमध्ये आधीपासूनच असंतोष पसरला होता. परिणामी हा बंद पुकारल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनामध्ये वेटर, ड्रायव्हर, सुरक्षा कर्मचारी, हमाल असे एकूण ७९ कर्मचारी सहभागी झाले आहेत. या बंदमुळे शाळेतून ने आण करण्यासाठी बस असताना देखील पालकांना आपल्या पाल्यांना चकरा माराव्या लागत आहेत. तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या कामाचा बोजा देखील व्यवस्थापनावर पडला आहे. वेतन कराराबाबत शाळा व्यवस्थापनाने योग्य निर्णय घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. या आंदोलनात शिक्षकसेनेचे अध्यक्ष संजय चाव्हाण, कलीन अन्सारी, योगेश्वर मोजाड, राम धोंगडे तसेच पादाधिकाऱ्यांसह यांच्यासह शाळेतील कर्मचारी उपोषणात सहभागी झाले आहे.

'आम्ही आधीच पगारवाढ दिली असताना कर्मचाऱ्यांनी अशा रीतीने संपावर जाणेच चुकीचे आहे. शाळेमध्ये दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थी व पालकांना वेठीस धरणे गैर आहे.' जुलिअन लुक, प्राचार्य बार्नस् स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखाने नांदते इथे मराठी..

$
0
0

प्रा. डॉ. विवेक खरे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी, २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच खाजगी संस्था, साहित्य-सांस्कृतिक मंडळे यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन मराठी भाषेची थोरवी जपण्याचा प्रयत्न अनेक पातळ्यांवर आपापल्या परीने केला. नाशिक ही तर दस्तुरखुद्द कुसुमाग्रजांची

कर्मभूमी. या त्यांच्या भूमीत सांस्कृतिक तसेच साहित्यिक कार्यक्रमांची यथेच्छ मेजवानी रसिक-वाचकांना या गौरव दिनाच्या निमित्ताने मिळाली. कवी संमेलने, संगीत महोत्सव, नैमित्तिक व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्र प्रदर्शने, मराठी स्वाक्षरी मोहीम, पोस्टर कविता प्रदर्शन अशा वेगवेगळ्या माध्यमातून मराठीचा गौरव साजरा केला गेला. अजूनही हा भाषेचा उत्सव सुरुच आहे. शासकीय पातळीवरून लोकांची भाषिक अस्मिता प्रबळ करण्याचा जोरकस प्रयत्न यावर्षी केला गेला. त्याचाच भाग म्हणून यावर्षी मोठ्या प्रमाणात अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मराठी ही आज जगात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक महत्त्वाची भाषा आहे. या भाषेला गौरव प्राप्त करून देण्यासाठी तसेच तिला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी जागतिक स्तरावर तिचा उत्सव साजरा करणे ही मराठी भाषिकांच्या दृष्टीने नक्कीच आनंददायी बाब आहे.

मराठी ही संपूर्ण महाराष्ट्राची मातृभाषा असली तरी या भाषेची सेवा आणि संवर्धन करण्यात नाशिककरांचा वाटा सिंहाचा आहे. फार पूर्वी जनस्थान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आजच्या नाशिक शहराला साहित्य आणि संस्कृतीची जशी परंपरा आहे तसाच नृत्य, नाटक, चित्र, शिल्प, संगीत आदी कलांचाही प्रदीर्घ वारसा लाभला आहे. मुंबई, पुणे या सांस्कृतिकदृष्ट्या विकसित शहरांच्या नंतर आज महाराष्ट्रात नाशिकचे नाव सर्वच क्षेत्रात आदराने घेतले जाते. मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास केलेल्या या शहराने आणि त्यातील लोकांनी मराठी भाषेचा नेहमीच गौरव केला आहे. पुण्या-मुंबईत जितकी गर्दी आज कुठल्याही कार्यक्रमांना होत नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक गर्दी आज इथे होणाऱ्या कार्यक्रमांना होते. नाटक, चित्रपट याबाबतीतही असेच काहीसे चित्र बघायला मिळते. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ करणारे दादासाहेब फाळके हे नाशिककर होते, हे सांगतांना इथल्या लोकांची छाती अभिमानाने मोठी होते. मराठी नाटक आणि चित्रपट यांच्या निर्मितीचे केंद्र आज हे शहर झाले आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या राजेश पाटील यांच्यासारखा कलावंत, दिग्दर्शकही याच शहरात निर्माण झाला. मराठी चित्रपटसृष्टीला वेगळे वळण देण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा ठरला. लक्ष्मीबाई टिळक, रे. टिळक, कवी सोपान चौधरी कुसुमाग्रज, बाबुराव बागुल, वसंत कानेटकर, अरुण काळे यांसारख्या नाशिकच्या लेखक कवींनी मराठी भाषेची निरंतर सेवाच केली. नाशिककरांच्या साहित्यिक जाणिवा प्रगल्भ करण्यात या सर्वांचा वाटा महत्त्वाचा आहे. भारतातल्या विविध प्रांतातून रोजीरोटी आणि व्यापारउदिमासाठी नाशिकमध्ये स्थायिक झालेल्या परभाषिकांनाही मराठीच्या प्रेमाने इथे बांधून ठेवले आहे. शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात आज नाशिककर मराठी माणूस पुढे आहे. पुणे, मुंबई या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषेचे पूर्वी दाखले दिले जायचे. आज मात्र या शहरांमध्येच मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथल्या कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीने मराठी भाषेचा जीव गुदमरू लागला आहे. अशावेळी नाशिकसारखी नव्याने विकसित होणारी शहरे आजही मराठी भाषेची अस्मिता जपून ठेवत आहेत.

नाशिककरांची भाषिक आवड आणि तिच्या संवर्धनासाठी इथल्या मराठी शाळांचेही योगदान महत्त्वपूर्ण आहे. शहरातील नाशिक सार्वजनिक वाचनालय, कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, सुभाष वाचनालय, यांसारख्या वाचनालयांनीही वाचन चळवळीत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सर्वसामान्यांना मराठी भाषेची गोडी लावण्यात या सर्व वाचनालयांचे योगदान खचितच महत्त्वपूर्ण आहे. नाशिकमधून प्रकाशित होणारी मराठी वृत्तपत्र आणि मासिकांनीही मराठी वाचकांच्या ज्ञानात मोलाची भर घातली आहे. कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या साहित्यिकांच्या नावाने उद्याने असणारे नाशिक हे महाराष्ट्रातील एकमेव शहर असेल. या उद्यानांमधील शिळांवर कोरलेल्या मराठीतील काव्यपंक्ती नक्कीच मराठीचा सन्मान वाढविणाऱ्या आहेत. जगातील वेगवेगळ्या प्रदेशात आज नाशिकचा मराठी माणूस स्थायिक झालेला आहे. आपले मराठीपण अबाधित ठेवून मराठीचे जतन करण्यातही तो अग्रेसर आहे. हा भाषिक अभिमान जागतिकीकरणाच्या रेट्यातही टिकवून ठेवण्यात मराठी माणूस यशस्वी होतो आहे ही समाधानकारक बाब आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या अनेक कार्यक्रमांमधून ही गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळो अथवा ना मिळो पण तिच्या संवर्धनासाठी प्रत्येक मराठी माणसाने जीवापाड काम केले पाहिजे हेही महत्त्वाचे आहे. सुरेश भटांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे...

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी

येथल्या नगानगात गर्जते मराठी

लाभले आम्हासभाग्य बोलतो मराठी.

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.

(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्जेदार पुस्तकांची भेट

$
0
0

ज्येष्ठ विधिज्ञ दौलतराव घुमरे यांनी लिहिलेल्या 'अर्ली ज्युरिस्प्रुडन्स अॅण्ड हिंटस् ऑन क्रॉस एक्झामिनेशन' 'अॅप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स' आणि 'अंडरकरंटस् ऑफ मार्क्सिझम' या तीन पुस्तकांचे आज (५ मार्च) रोजी प्रकाशन होत आहे. यानिमित्ताने या पुस्तकांचा घेतलेला आढावा.



अॅड. शशिकांत पवार

अॅड. घुमरे यांचे 'लॉयर' हे आत्मचरित्रात्मक पुस्तक पूर्वी गाजले आहे. नव्याने प्रकाशित होणारी त्यांची दोन पुस्तके न्यायतत्वशास्त्राशी संबंधित आहेत. तिसरे पुस्तक कार्लमार्क्स यांच्या सिद्धांतावर भाष्य करणारे आहे. इंग्रजी भाषेतून लिहिलेली ही तिन्ही पुस्तके वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी छोटी छोटी वाक्ये, सुबोध वचने आणि म्हणी यांनी ही तिन्ही पुस्तके सजली आहेत. त्यामुळे हे लिखाण वाचकांना भावेल आणि त्यांचे प्रबोधनही करेल. कायद्याच्या क्षेत्राशी संबंधित नसलेल्यांना कायद्याच्या पुस्तकातील भाषा किचकट वाटते. अॅड. घुमरेंनी मात्र सुंदर, अर्थगर्भ आणि सोप्या शब्दात न्यायतत्वशास्त्राची वाचकांना ओळख करून दिली आहे. स्वत: चांगले वाचक असल्याशिवाय चांगले लिहिता येत नाही असे म्हणतात. अॅड. घुमरेंचा विविध विषयांचा व्यासंग दांडगा आहे. त्यांचे वाचन किती चौफेर आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या लिखाणावरून येतो. विविध विषयांचे सखोल वाचन, प्रचंड आत्मविश्वास, कल्पनाचातूर्य, उपजत प्रतिभा, चिकाटी आणि व्यवसायातील सर्वोच्च नीतिमूल्यांचे पालन या गुण वैशिष्ट्यांमुळे अॅड. घुमरे यांच्या व्यक्तिमत्वाभोवती अद्भुततेचे वलय निर्माण झाले आहे. त्याच ऊर्जेमुळे आजही ते व्यवसायात रमलेले असतात आणि नुकतेच प्रसिद्ध झालेले एखादे पुस्तक वाचण्यात गढून गेलेले दिसतात. या पुस्तकांच्या माध्यमातून लेखक म्हणूनही त्यांचे नाव जिल्ह्याच्या साहित्यिक वर्तुळात प्रसिद्ध झाले आहे.

या पुस्तकांतील काही विचारमौक्तिके वाचकांपुढे ठेवूनच ओळख करुन देत आहे.

अर्ली ज्युरिस्प्रुडन्समध्ये न्यायतत्वशास्त्राची सुरुवात कशी झाली आहे. त्याचे नेमके वर्णन आले आहे. उलटतपासणीच्या संबंधात या पुस्तकात काही मुलभूत मुद्द्यांची अतिशय सुंदर मांडणी झाली आहे. चांगल्या वकिलाला कोणते गुण आवश्यक असतात. कागदपत्रांची क्रमवारी कशी असावी, खोटे सांगणारा साक्षीदार, एफआयआर फुटलेला साक्षीदार, ओळख परेड, युक्तीवाद आणि मुख्यत्वेकरुन उलटतपासणीचे आत्मसात करण्यासाठी वकिलांनी कसा अभ्यास करायला पाहिजे त्याचे मार्गदर्शन अॅड. घुमरेंनी अधिकारवाणीने केले आहे.

अॅप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स हे पुस्तक म्हणजे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील निवाड्यांची एकत्रित जंत्री आहे. या न्यायालयांचे निर्णय नंतरच्या काळात कायद्याचे स्वरूप घेतात आणि न्यायाधीश, दोन्ही बाजूचे वकील यांना मार्गदर्शक तत्वाप्रमाणे उपयोगी पडतात. न्यायालयीन निवाडे सांगणारी पुस्तके त्या संबंधित केसचा नंबर, ज्या न्यायालयाने निवाडा दिला असेल त्या न्यायालयाचे व न्यायमूर्तींचे नाव इत्यादी माहिती देऊन नंतर निवाड्याचे विवेचन करतात. अॅड. घुमरेंनी मात्र ते संदर्भ पूर्णपणे गाळले आहेत. त्यामुळे सदर पुस्तकातील निवाडे वाचताना सहजपणे यत्किंचितही कृत्रिमपणा धारण करीत नाही.

मार्क्सवादावरचे पुस्तकही वाचकांना मार्क्सच्या विचारांनी ओळख करुन देते. इंग्लंड, रशिया, चीन अशा अनेक राष्ट्रातील घटनांचा मागोवा घेणारे हे छोटेखाणी पुस्तक सर्व थरातील वाचकांना आवडेल असे आहे. भांडवलशाही ही अंतर्गत विसंगतीमुळे अयशस्वी होईल आणि कामगारवर्ग सशस्त्र क्रांती करून उत्पन्नाची आणि वितरणाची साधने ताब्यात घेईल अशी मार्क्सची कल्पना होती. पैशाच्या भांडवलामुळे कारखानदारी वाढली. कामगारवर्ग चांगल्या पद्धतीचे आयुष्य जगू लागला आणि मार्क्सच्या कल्पनेतील क्रांती हे त्याचे स्वप्नच राहिले. तथापी लोकशाही राज्यव्यवस्थेत कारखानदारीच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने क्रांती होऊ शकेल अशी शक्यता स्वत: मार्क्सनेही गृहित धरली होती.

केवळ होतकरू वकिलांसाठीच नाही तर सर्व क्षेत्रातील सर्व वयोगटातील रसिक वाचकांना लेखकाने या पुस्तकांच्या रुपाने ही अनोखी भेट दिली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेमुळे पाणीपुरवठा विस्कळीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर डॅम सबस्टेशनचा वीज पुरवठा खंडित झाल्याने सुमारे चार तास पंपिंग बंद असल्याने नाशिक शहराचा शुक्रवारी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलकुंभात पाणीच पोहचले नसल्याने सिडको, सातपूर, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व पंचवटी या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, विभागवार पाणीकपातीमुळे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडे आता नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून पाण्याअभावी नागरिक व महिलांचे शिष्टमंडळ महापालिकेत धडकायला लागले आहेत.

शहर परिसरात गुरुवारी मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तब्बल चार तास वीज पुरवठा खंडीत झाला. त्याचा सिडको, सातपूर, नाशिक पूर्व, पश्चिम व पंचवटीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. पंपिंग स्टेशनमधून पाणी उचलले न गेल्याने जलकुंभ पूर्णक्षमतेने भरले गेले नाहीत. परिणामी अनेक भागात विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. महिलांची पाण्यासाठी वणवण झाली. अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागवावे लागले. शनिवारी सुद्धा काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहेे.

प्रशासन वैतागले

विभागवार पाणी नियोजनानंतर शहरातील पाणापुरवठा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. नागरिक थेट महापालिकेत येवू लागल्याने पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काही महिलांनी उपमहापौर गुरूमीत बग्गा यांची शुक्रवारी भेट घेऊन पाण्यासंदर्भात तक्रारी केल्या. नगरसेवक व नागरिकांना समजावितांना प्रशासन वैतागले आहे.

आठवड्यातला

एक दिवस 'ड्राय'

पाणीपुरवठा विभागाने १५ दिवसापासून सुरू असलेल्या विभागवार पाणीपुरवठ्याचा अभ्यास सुरू केला आहे. पाणी नियोजनात बदल करीत आठवड्यातून एक दिवस सरसकट पाणीपुरवठा बंदचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अधीक्षक अभियंत्यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांचीही रोजच्या त्रासातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. बहुतेक नागरिक व नगरसेवकांचा कल हा आठवड्यातून एक दिवस पाणीबंद ठेवण्याचा असून त्याबाबतचा निर्णय एक दोन दिवसात अपेक्षित आहे.

मनसेतर्फे आजपासून टँकरसेवा

नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडल्यानंतर भाजपला कोंडीत पकडण्याची संधी राजकीय पक्षांना मिळाली आहे. शहरात निर्माण झालेल्या पाणीबाणीचा फायदा घेण्यासाठी मनसे पुढे सरसावली आहे. पक्षातर्फे शहरात नागरिकांना पाणी देण्यासाठी मोफत टँकर सेवा सुरू करण्यात येणार आहे. मनसे शहर कार्यालय राजगड येथे शनिवारी (दि. ५) शहरासाठी ६ टँकर सुरू केले जाणार आहेत. महापालिकेच्या बोअरवेल्समधून मोफत पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. नागरिकांनी फोन केल्यानंतर हे टँकर्स नागरिकांना घरपोच पाण्याची सुविधा देणार आहे. या टँकर्समुळे मनसेचेही ब्रॅण्डिंग केले जाणार असून भाजपला सुद्धा कोंडीत पकडता येणार आहे. त्यामुळे मनसेच्या या टँकर मोहिमेची आता चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ, पवार यांना पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाचे वि‌. वा. शिरवाडकर व वसंत कानेटकर पुरस्कार जाहीर झाले आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स'चे सहसंपादक व ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना वि. वा. शिरवाडकर लेखन, तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे लेखन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना वि. वा. शिरवाडकर लेखन, तर नाट्यक्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांना वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कारांनी गौरविण्यात येते. शुक्रवार, २७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी व अभिनेते दीपक करंजीकर यांची उपस्थिती राहील.

पुरस्कारमूर्ती जयंत पवार हे एक मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत 'काय डेंजर वारा सुटलाय' या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना

कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या 'महाराष्ट्र रंगभूमी' तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.

सन २०१४ मध्ये महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. जयंत पवार यांना 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहाला २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन, दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून

उठला मोर (कथासंग्रह), माझे घर, होड्या (एकांकिका) हे साहित्य लिहिले आहे.

दुसरे पूरस्कारमूर्ती अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून, दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घराघरात पोहोचला आहे. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे. प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.

पुरस्कारमूर्ती सुषमा अभ्यंकर यांनी ५२ वर्षे शिक्षिका म्हणून सेवा दिली आहे. अरगडे प्रकाशनातर्फे तीन पुस्तके, अक्षरमुद्रा प्रकाशनातर्फे आठ पुस्तके, तर आपलं प्रकाशनतर्फे २२ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच, १७ बालनाटकांचे लेखन केलेले आहे.

या समितीने केली निवड

निवड समिती प्रमुख म्हणून प्रा.रविंद्र कदम, सुनील ढगे, विवेक गरूड, डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी व रवींद्र ढवळे यांनी काम पाहिले.

अभ्यंकर यांना जीवनगौरव

नाट्यरिषदेतर्फे नटवर्य बाबुराव सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार बालनाट्य चळवळीच्या सुषमा अभ्यंकर यांना जाहीर झाला. पाच हजार रुपये रोख, शाल श्रीफळ, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यापूर्वीचे पुरस्कार विजेते

याआधी नाट्यलेखन पुरस्कार पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, महेश एलकुंचवार, शं. ना. नवरे, सतीश आळेकर, मधुकर तोरडमल यांना तर रंगकर्मी पुरस्कार डॉ. श्रीराम लागू, मोहन वाघ, विजया मेहता, पुरूषोत्तम बेर्डे, सुलभा देशपांडे, चित्तरंजन कोल्हटकर, रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले यांना देण्यात आला आहे. यापूर्वीचा नटवर्य बाबुराव सावंत पुरस्कार नेताजी भोईर यांना देण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑटो कॉपचे आंदोलन चिघळले

$
0
0

अंबड एमआयडीसीतील ऑटो कॉप कंपनीतील कामगारांनी २५ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. कंपनी व्यवस्थापना विरोधात कामगारांनी गेटवरच टेन्ट उभारत शांततामय मार्गाने आंदोलन सुरू आहे. मात्र, व्यवस्थापनाने पोलिस बंदोबस्तात कंपनीतील मालाची शुक्रवारी पाठवणी करण्यास सुरूवात केल्याने कामगार संतापले. त्यांनी कंपनीतील मटेरियल बाहेर घेऊन जाण्यास मज्जाव केला. मात्र, कंपनीने अगोदरच बोलावलेल्या पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांची धरपकड केली आणि त्यांना अंबड पोलिस ठाण्यात आणले. यात कंपनी व्यवस्थापन पोलिसांच्या मदतीने कामगारांवर अन्याय करत असल्याचा आरोप सीटू कामगार संघटनेने केला. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाने वेतनवाढीची बोलणी करावी अशी मागणीही संघटनेने केली आहे.

आटो कॉप कंपनीचा वेतनवाढीचा करार १४ महिन्यांपासून प्रलंबित आहे. यात अनेकदा कंपनी व्यवस्थापन व सीटू युनियन यांच्यात वेतनवाढ कराराबाबत बोलणी झाली. मात्र, काही अटींवर तडजोड झाली नाही. यात कंपनी व्यवस्थापन कामगारांना तीन हजार रुपयांची वेतनवाढ देण्यास तयार असल्याचे कंपनीचे जनरल मॅनेजर सोमनाथ सोमाशे व किरण रेडगावकर यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले. परंतु, कामगारांनी जुन्या वेतनवाढीनुसार ३,७०० पेक्षा अधिक वेतनवाढ करण्याची मागणी केली आहे. यात कंपनी व्यवस्थापन व कामगारांमध्ये वेतनवाढीच्या कराराहून एकमत न झाल्याने कामगारांनी २५ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. कंपनीच्या प्रवेशद्वारावरच कामगार आपल्या कुटुंबासह आंदोलनाला बसले आहेत.

अन् कामगारांचा झाला संताप आंदोलन सुरू असतांना कंपनी व्यवस्थापनाने काही मटेरीयल बाहेर घेऊन जाण्याबाबत औद्योगिक न्यायालयात परवानगी मागितली. कोर्टाने त्यास मंजुरी दिली. मात्र, कंपनीतील रॉ मटेरियल वाहून नेण्यास कामगारांनी विरोध केला. कंपनीत येणाऱ्या गाड्या कामगार गेटवरूनच परत पाठवित असल्याचा आरोप कंपनी व्यवस्थापनाने केला. यानंतर कंपनी व्यवस्थापनाने मटेरियल बाहेर घेऊन जाण्यासाठी पोलिस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली. दरम्यान, कंपनीतील मटेरियल पोलिस बंदोबस्तात गाड्यांमध्ये लोड करून नेण्यात आल्या. यावेळी कामगारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कामगारांना अंबड पोलिस ठाण्यात नेले.

कामगारांना मारहाण का? पोलिसांनी कंपनी व्यवस्थानाची बाजू घेत कामगारांवर अन्याय केला असल्याचा आरोप 'सीटू'चे सिताराम ठोंबरे यांनी केला. व्यवस्थापनाने वेतनवाढीसंदर्भात कामगारांशी प्रत्यक्ष चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कंपनी पोलिसी बळाचा वापर करून कामगारांना बळजबरीने गाड्यांमध्ये बसून पोलिस ठाण्यात का नेण्यात आले? शांततेत आंदोलन करणाऱ्या कामगारांना मारहाण का करण्यात आली? असे मुद्दे ठोंबर यांनी उपस्थित केले आहेत.



कामगार सिव्हिलमध्ये पोलिसांच्या मारहाणीत गोविंद भोर या कामगाराला जबर मार लागला आहे. त्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यात समझोता घडवून आणण्यासाठी कामगार उपायुक्तांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी कामगार वर्गांतून केली जात आहे.

कामगारांनी जुन्या वेतनावाढीच्या करारानुसार ३,७०० पेक्षा अधिक वेतनवाढ मागितली आहे. मात्र, कंपनीला सध्या ते परवडणारे नाही. जागतिक मंदीमुळे कंपनीत देखील कामाचा तुटवडा आहे. परंतु, कामगार हितासाठी ३ हजारांची वेतनवाढ देण्यास कंपनी व्यवस्थापन तयार आहे. - सोमनाथ सोमाशे, जनरल मॅनेजर ऑटो कॉप प्रा. लिमिटेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोसळलं आभाळ!

$
0
0

२८ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मारा सुरू आहे. शुक्रवारी

मध्यरात्री साडेबारापासून शहरासह जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये अवकाळी आणि गारपिटीने थैमान घातले. नाशिक तालुक्यात सर्वाधिक ६० मिलीमीटर पाऊस झाला. त्याखालोखाल इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले. काळवंडून आलेल्या ढगांचा गडगडाट आणि कडाडणाऱ्या गगनभेदी विजांमुळे केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे तर शहरवासीयांची

झोप उडाली. रात्री एकपासून कोसळू लागलेल्या पावसाने सकाळपर्यंत असा काही धिंगाणा घातला की, नाशिक तालुक्यातील गिरणारे, दुगाव, सातपूर, बेळगाव ढगा, विल्होळी, देवळाली कॅम्प, सामनगाव, शिंदे-पळसे, आडगाव यांसह अनेक गावांच्या शिवारांतील पिके अक्षरश: आडवी झाली. सकाळ उजाडताच शेतांमधे पोहोचलेले शेतकरी पिकांची अवस्था पाहून गर्भगळीत झाले. द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचे तसेच द्राक्षमणी फुटल्याचे हृदयद्रावक दृष्य त्यांना पहावे लागले.

गेल्या चार दिवसांत दहा तालुक्यांमध्ये २०० मिलीमीटरपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी साडआठपर्यंत १११.९ मीलीमीटर पाऊस झाला. शहरात ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात ६ हजार ५०० हेक्टवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांनी पिकांचे पंचनामे करावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अजूनही पंचनाम्यांचे काम सुरूच असून नुकसानीचा नेमका अंदाज येण्यास वेळ लागेल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दिंडोरीत २१ घरांचे नुकसान दिंडोरी तालुक्यातील २१ घरांचे नुकसान झाले. दुगाव येथे एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाला. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच हंगामी पिकांसाठी हेक्टरी ६ ते ८ रुपये तर बारमाही पिकांसाठी १३ हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकणार आहे.

...तालुकानिहाय पाऊस... नाशिक ६० त्र्यंबकेश्वर १६ इगतपुरी १३ दिंडोरी ११ निफाड ३.८ चांदवड ३.६ सिन्नर २.० पेठ १.३ येवला १ कळवण ०.२ (आकडेवारी मिलीमीटरमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा इमारत पाडल्याने नगरसेवकांना कारावास

$
0
0

सन २००७ मध्ये शाळेची इमारत पाडण्यात आली होती. विद्यमान उपनगराध्यक्ष संजय नवसे, स्वीकृत नगरसेवक प्रमोद चोथवे, माजी नगरसेवक हरिश्चंद्र लोंढे, अॅड. इलियास खतीब, तत्कालीन उपनगराध्यक्ष चंदन देशमुख, मुख्याधिकारी रंजना गगे, सुनील पाटील, जितेंद्र केदारे, रमेश राठोड, विजय वाजे यांना महाराष्ट्र माल विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम कलम ३ व ४ अन्वये न्यायालयाने या सर्वांना शिक्षा सुनावली.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव उदय वामनराव शेवतेकर यांनी इमारत पाडणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. नगरपालिका इमारतीच्या जागी पूर्वी संजीवनी प्राथमिक विद्यामंदिरची इमारत होती. जागा खाली करण्यासाठी चर्चा झाली होती. मात्र, शाळेने जागा खाली करण्यास नकार दिल्याने इमारत पाडून टाकू, अशा शब्दात शेवतेकर यांना धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ४ ऑगस्ट २००७ ला ही इमारत पाडण्यात आली. यात शाळेच्या फर्निचरचेही नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकातील तरुणाई ‘इंटरनेट अॅडिक्ट’

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : नाशकातील तरूण हे इंटरनेट वापरात मध्यम स्तरावर असल्याची बाब समोर आली आहे. एचपीटी कॉलेजमध्ये आयोजित अंकुर फेस्टिव्हल दरम्यान ही इंटरनेट चाचणी घेण्यात आली. त्याचे निष्कर्ष आले असून, चार तरूण इंटरनेटच्या पूर्णतः आहारी गेल्याचेही स्पष्ट झाले आहे.

एचपीटी कॉलेजच्या सायकॉलॉजी विभागातर्फे नुकतेच अंकुर फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टमध्ये इंटरनेट अॅडिक्शन संदर्भात माहिती तसेच, टेस्ट देण्यासाठी एक विभाग ठेवण्यात आला होता. या दरम्यान कॉलेजियन्सचा इंटरनेट वापराबाबतचा सर्व्हे देखील करण्यात आला. इंटरनेट वापरामुळे होणारे मानसिक आणि शारीरिक परिणाम यावेळी तरुणांना सांगण्यात येत होते.

इंटरनेट अॅडिक्शन काय असते, हे समजावून सांगून त्याचे साइड इफेक्टची माहिती देण्यात आली. यावेळी नाशिकमधील अनेक कॉलेजियन्सनी इंटरनेट अॅडिक्शनची टेस्ट देत आपण अॅडिक्ट आहोत का याची तपासणी करवून घेतली. अंकुर फेस्टच्या अगोदर काही दिवस सायकॉलॉजी विभागातील कॉलेजियन्सनी यासंदर्भात अनेकांच्या चाचण्या घेत जनजागृती केली होती. यावेळी आणि फेस्ट दरम्यान झालेल्या सर्वेक्षणात सुमारे दोनशे यंगस्टर्सनी (तरुण आणि तरुणी) इंटरनेट अॅडिक्शनची टेस्ट दिली. यात सुमारे ११६ यंगस्टर्स अॅडिक्शनच्या पहिल्या लेव्हलला, सेकंड लेव्हलला ८० यंगस्टर्स निदर्शनास आले. अनेक यंगस्टर्स इंटरनेट वापरात माध्यम स्तरावर दिसत असली तरीही हायर लेव्हल म्हणजेच पूर्ण अॅडिक्टेड असे चार यंगस्टर्स निदर्शनास आले. या अॅडिक्टेड यंगस्टर्सला लवकरच एचपीटी कॉलेजचा मानसशास्त्र विभाग संपर्क साधणार असून, त्यांची इच्छा असल्यास त्यांचे कौन्सिलिंग करून देणार आहेत.

नाशिकच्या यूथ मध्येही इंटरनेटचं भूत चांगलंच सवार झालं असल्याचं या सर्वेक्षणातून दिसून येते. इंटरनेट ही काळाची गरज असली तरी त्याचा वापर हा काळजीपूर्वक तसेच गरजेपुरताच होणे फायदेशीर असल्याचे मानसशास्त्र सांगते. यासोबतच जे यंगस्टर्स पहिल्या आणि दुसऱ्या लेव्हल वर आहेत, त्यांनीही खबरदारी बाळगणे महत्त्वाचे आहे. इंटरनेटचा वापर तोलामोलात करण्यासाठी सेल्फ कंट्रोल ही सर्वोत्तम थेरी असल्याचे एचपीटी कॉलेजच्या सायकॉलॉजी विभागातर्फे सांगण्यात आले. इंटरनेट वापराचे आणखी धोके जसे, पाठ दुखणे, झोप न लागणे, डोळ्यांच्या बाजूस काळवणने, हाताची बोटे दुःखू लागणे अशी लक्षणे जाणवत असल्याचे डॉ. चुडामण बडगुजर यांनी सांगितले.

अनेक यंगस्टर्स सध्या इंटरनेटच्या आहारी गेले आहेत. इंटरनेरमुळे होणारे सायकॉलॉजिकल आणि बायॉलॉजिकल इफेक्टस् या सर्वेक्षणा दरम्यान अनेकांना समजावून सांगण्यात आले. जे यंगस्टर्स संपूर्ण अॅडिक्टेड निदर्शनास आले आहेत, अशा तरुणांशी एचपीटी सायकॉलॉजी विभाग लवकरच संपर्क साधणार असून, त्यांना समुपदेशन हवे असल्यास ते देणार आहे. त्याचसोबत इतर यंगस्टर्सला याबाबत आपली टेस्ट वा माहिती हवी असल्यास एचपीटी सायकॉलॉजी विभागात संपर्क साधावा. - डॉ. चुडामण बडगुजर, विभागप्रमुख, एचपीटी सायकॉलॉजी विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५६० विद्यार्थ्यांची निवड

$
0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च या गंगापूर रोडस्थित संस्थेत मेगा जॉब मेळा आयोजन करण्यात आले होते. जवळपास तीस कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात ५६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

नाशिकमध्ये पहिल्यांदाच इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये अशा प्रकारचा जॉब मेळा घेतला गेला. प्रामुख्याने इन्फोसिस, हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन, रिलायन्स, टाइम्स ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, जिंदाल, इंडस हेल्थ प्लस, एचबीएल ग्लोबल, सेवा मेडिकल्स, पाइम फोकस वर्ड, ग्लोबल सर्विस, एल. आय. सी., वैभव प्लेसमेंट, एडिक्को इंडिया लियासारख्या कंपन्यांचा समावेश होता. यात सॉफ्टवेअर डेव्हलपर, आयटी ट्रेनी, मॅकेनिकल, सिव्हिल, फायनान्स, अकाऊंट, एचआर, सेल्स, नॉनटेक्निकल सपोर्ट, डोमेस्टिक वॉइस या पदांसाठी जवळपास ५६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

जेआयटी कॉलेजच्या दहापेक्षा जास्त विद्यार्थांना जॉब प्लेसमेंट मिळाल्याचे जेआयटीचे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश पाटील यांनी सांगितले. भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थांना त्यांच्या आवडीनुरूप आणि योग्यतेनुसार जॉब मिळावा, यासाठी कॉलेज व्यवस्थापन कटिबद्ध असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. व्ही. भटकर यांनी दिली.

नाव नोंदणीसाठी गर्दी सकाळी आठ वाजेपासूनच विद्यार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी कॉलेज परिसरात गर्दी केली होती. सुमारे दोन हजार विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित होते. विद्यार्थ्यांत विशेषतः बी. ई., डिप्लोमा, आयटीआय, एम. बी. ए., बी. कॉम. ई. झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय पाटील यांना यंदाचा ‘नाशिक भूषण’

$
0
0





परशुराम साईखेडकर सभागृहात सोमवारी (दि. ७) सायंकाळी ६.३० वाजता मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे. गंजमाळ येथील रोटरीच्या हॉलमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी जायखेडकर यांनी सांगितले, की संजय पाटील यांनी नाविन्यपूर्ण कल्पनांमधून आर्किटेक्चरद्वारे नाशिकचे नाव उज्ज्वल केले. पत्रकार परिषदेस संस्थेचे सचिव अनिल सुकेणकर, जनसंपर्क संचालक मनीष चिंधडे, डॉ. श्रेया कुलकर्णी, दिलीपसिंग बेनिवाल, मिलिंद जहागिरदार उपस्थित होते.

पाटील यांचा परिचय

संजय पाटील सन १९८० सालापासून आर्किटेक्चर क्षेत्रात कार्यरत आहेत. निसर्ग व परंपरा यातून प्रेरणा घेऊन पर्यावरण संवेदनशील वास्तूरचना निर्मिती करण्यात त्यांचा हातखंडा आहे. रहिवासी, कॉमर्स, औद्योगिक, संस्थानिर्मिती क्षेत्रात अनेक नामांकित प्रकल्पांची त्यांनी निर्मिती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपळगाव बसवंत

पिंपळगावच्या क. का. वाघ कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांसाठी संकलित केलेल्या ४६ हजाराच्या निधीतून जोपूळ आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

प्राचार्य डा. दिलीप शिंदे, उपप्राचार्य एस. वाय. मोळोदे, डी. डब्ल्यू. शेळके, एनएसस प्रमुख प्रा. ज्ञानोबा ढगे, डॉ. शंकर बोऱ्हाडे, प्रा. डॉ. बाळकृष्ण शेलार, प्रा. शिवाजी गांगुर्डे, शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या साखरे, अशोक देवरे, अधीक्षक एकनाथ भामरे, बी. आर. गुळवे, प्रियंका ढोकरे व्यासपीठावर होते. एनएसएसचे विद्यार्थी सरस्वती जाधव, प्रतीक्षा रकिबे, अभिषेक गांगुर्डे, गोकुळ निंबाळकर, जर्नादन कडाळे, अपेक्षा रकिबे आदींनी निधी संकलित केला. आदिवासी विद्यार्थ्यांना फॅन, संतरंज्या, पंचपात्री, बल्ब, शूज आदी वस्तू वाटण्यात आल्या. प्राचार्य शिंदे म्हणाले की, या आश्रमशाळेत पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आदी भागातील आदिवासी विद्यार्थी आहेत. त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने मदत देणे गरजचे होते. विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारी दाखवून दिली.

शिक्षक नानासाहेब धनराव यांनी प्रास्तविक, तर दीपाली रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब निकम यांनी आभार मानले. जर्नादन भरसट, सुनीता चौधरी, मनीषा पाटील, राजेंद्र शेवाळे, मीना क्षीरसागर, ओकांर जाधव, मीना क्षीरसागर, विशाल सायखेडे आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतापुढील आव्हानांवर चर्चा

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

ह्यूमन रिसोर्स या मुख्य विषयाशी निगडीत विषयांवर चर्चा व्हावी, यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व एम.ई.टी भुजबळ नॉलेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद पार पडली. पहिल्या ‌दिवशी 'डिजिटल इंडिया २०२० आव्हाने व संधी' या विषयावर मान्यवरांनी आपापली मते मांडत विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले.

परिषदेचा पहिला दिवस शुक्रवारी दिमाखात पार पडला. परिषदेसाठी शार्प इंडिया लिमिटेड कंपनीचे एम. डी टोमियो इसागोई हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. त्यांनी जपानच्या विकासाचा आलेख मांडला. तसेच, भारत व जपानच्या एकत्रित प्रगतीत आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सहकार्य करणार असल्याचे नमूद केले.

भारतातील कृषी क्षेत्रावर प्रकाश टाकत डॉ. विजय पागे यांनी भविष्यातील आव्हानांबद्दल लोकांशी संवाद साधला. उदयपूर येथील महाराजा कॉलेज ग्रुपचे प्राध्यापक डॉ. सतीश शर्मा यांनी डिजिटल भारत या विषयावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटचे डीन डॉ. खेडकर यांनी ही डिजिटल इंडिया विषयावर जोर देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दोन दिवसाच्या या राष्ट्रीय परिषदेत ७५ हून अधिक प्राध्यापक, रिसर्च स्कॉलर, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कॉलेजच्या वतीने इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर नीलेश बेराड, डीन हर्षवर्धन गोखले, शेफाली भुजबळ यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

शोधनिबंधांचाही आढावा राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी सादर झालेल्या शोधनिबंधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. खेडकर यांच्यासह बिजसोल लिमिटेड कंपनीचे संचालक वेंकटचलम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते मेटारॉईड या जर्नलचे अनावरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साधूंची निर्दोष सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाही मिरवणुकीदरम्यान चांदीची नाणी उधळल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या चार साधू महंतांची पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. सन २००३ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही मिरवणुकी दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत २९ भाविकांचा मृत्यू झाला होता, तर ११८ भाविक जखमी झाले होते.

वैश्विक सोहळा म्हणून गणला जाणारा सिंहस्थ कुंभमेळा दर बारा वर्षांनी नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये होतो. सन २००३ मध्ये कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीला म्हणजे २७ ऑगस्ट २००३ रोजी शाही मिरवणुकीदरम्यान मालवीय चौकात वृंदावन, मथुरा येथील स्वामी ग्यानप्रकाशजी महाराज, स्वामी मुकेशरदासजी महाराज व अन्य दोघे हत्ती व वाहनांवरून तपोवनातील साधुग्रामकडे परत जात होते. त्यांनी भाविकांच्या दिशेने प्रसाद म्हणून चांदीची नाणी, मणुके, चॉकलेट, फुले व इतर वस्तू फेकले. त्यामुळे भाविकांची झुंबड उडाली आणि राममंदिराकडून येणाऱ्या भाविकांमुळे गर्दी उसळून चेंगराचेंगरी झाली. यात २९ भाविक ठार झाले, तर ११८ भाविक जखमी झाले होते. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटला सुरू झाल्यानंतर साधूंतर्फे अॅड. श्रीरंग भांड, अॅड. प्रवीण अंतापूरकर यांनी काम पाहिले. सरकारतर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सिन्नर फाटा येथील युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. योगेश बारकू सजगुरे (३०, असे मृत्युमुखी झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांकडे झालेल्या नोंदीनुसार गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा परिसरातील राहणारा योगेश हा आपल्या मोटरसायकलवरून निफाडकडे निघाला होता. सिन्नर फाटा येथेच भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. यामध्ये योगेश गंभीर जखमी झाला. त्यास तानाजी पवार यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात महिला ठार

दुचाकीच्या अपघातात सुरगाणा तालुक्यातील सानपाडा येथील महिलेचा मृत्यू झाला. भारती अशोक बोराईत (वय २५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सानपाडा येथील खोतळी दिगर येथे राहणाऱ्या भारती बोराईत गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पतीसमवेत मोटरसायकलवरून सानपाडाकडे येत होते. गोळशी फाटा येथे त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या भारती यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

दोघांची आत्महत्या

शहरात विविध ठिकाणी घडलेल्या दोन घटनेत शुक्रवारी सकाळी दोघा व्यक्तींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. चुंचाळे गावातील आंबेडकरनगर येथे राहणाऱ्या दिलीप गांगुर्डे (वय ५०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडेआठ वाजता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना द्वारका परिसरात घडली. याठिकाणी राहणारे पकंज हिरामण केदारे (वय ३५) यांनी घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही बाब शेजाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केल.

सायकल चोरी

स्टारकेन निओ कंपनीची २४ गिअरची सायकल अज्ञात चोरट्याने पळवू नेली आहे. ही सायकल २४०० रूपये किंमतीची असून, गंगापूर पोलिस स्टेशनला याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेच्या तिजोरी खरेदीत भ्रष्टाचार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेतील वाढत्या दरोड्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने खरेदी केलेल्या पहिल्या टप्प्यातील ४५ तिजोऱ्यांची खरेदी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जिल्हा बँकेचे संचालक जे. पी. गावित यांनी या तिजोरी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला असून, यासंदर्भात थेट विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार केली आहे.

अध्यक्षांसह संचालक मंडळाने प्रत्येक तिजोरीमागे तीन लाखाचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आल्याने अध्यक्षांचा कारभार व प्रस्तावाला मंजुरी देणारे संचालक अडचणीत आले आहेत. गावित यांनी या खरेदीला विरोध करीत चौकशीची मागणी केली आहे. जिल्हा बँकेत पडणाऱ्या दरोड्यांच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने त्या १६२ तिजोरी नव्याने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ४५ तिजोऱ्या खरेदी करण्यास मंजुरी दिली असून, त्यासाठी २ कोटी ७० लाख रुपये दिले जाणार आहेत. गोदरेज कंपनीला एक कोटी ८३ लाख रुपये अदा केले आहेत. प्रत्येक तिजोरीची किमत ही ५ लाख ९८ हजार दाखवली आहे. प्रत्यक्षात बाजारात याच तिजोरीची किमत ही २ लाख ९७ हजार रुपये आहे. त्यामुळे अध्यक्षांसह संचालक मंडळाने तिजोरीमागे कंपनीला तीन लाख रुपये अतिरिक्त मोजले आहेत. संबंधित खरेदीला आपला विरोध असल्याचे आमदार जे. पी. गावित यांनी म्हटले असून, तिजोरीच्या बिलांना व निर्णयाला आपला विरोध असल्याचे पत्र त्यांनी विभागीय सहनिंबधक एम. ए. आरीफ यांना दिले आहे.

बाजारात एका तिजोरीची किमत ही तीन लाख रुपये असताना जिल्हा बँक सहा लाख रुपये मोजत आहे. यास विरोध असून, या संशयास्पद बिल व ठरावाशी आपला काहीच संबंध नाही.

- जे. पी. गावित, संचालक

तिजोरी खरेदी प्रकरणावर तीन म‌हिने उशिराने आक्षेप घेतला आहे. रितसर निविदा प्रक्रिया राबवून तिजोऱ्या खेरदी केल्या आहेत. यामुळे कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही.

- नरेंद्र दराडे, अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी जिल्हाभर राष्ट्रवादी रस्त्यावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याची दिरंगाई न लावता युद्धपातळीवर सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी व कांद्याला हमी भाव जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रसेतर्फे जिल्हाभरात निदर्शने करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष अॅड. पगार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात तालुकावार निर्दशने करून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी दिला.

इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाप्रसंगी अॅड. रवींद्र पगार म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याने राज्यकर्त्यांच्या सुल्तानी कारभाराने हतबल असलेला शेतकरी अस्मानी संकटाने देखील वेढला गेला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीची कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला ही पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. पंचनामे करण्यात दिरंगाई होऊ नये व सरसकट सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत म्हणजे शेतकऱ्याला मदतीचा हात मिळेल. अन्यथा शेतकऱ्याचे भवितव्य अंधकारमय होईल, असेही पगार यांनी नमूद केले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, तालुकाध्यक्ष गोरख बोडके, शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव, महिला अध्यक्ष आशा थोरात, जिल्हा पदाधिकारी फिरोज पठाण, विलास सानप, नामदेव वाघचौरे, ज्ञानेश्वर फोकणे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

दिंडोरीत आमदार नरहरी झिरवाळ, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, राजेंद्र उफाडे, गंगाधर निखाडे, शंकरराव काठे, आदी आंदोलनात सहभागी झाले होते. नाशिकमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, विष्णूपंत म्हैसधुणे, तानाजी गायधनी, सोमनाथ खातळे, सचिन पिंगळे, नितीन मोहीते, प्रेरणा बलकवडे, दीपक वाघ, सोमनाथ बोराडे, रत्नाकर गायकवाड, अलका साळुंखे, मंदाताई निकम, रामदास पिंगळे, कचरू तांबेरे आदी उपस्थित होते.

बागलाणमध्ये माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा पदाधिकारी धर्मराज खैरनार, फईम शेख, नगरसेवक काका रौंदळ, भारत खैरनार आदींच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. देवळ्यात जिल्हा परिषदेच्या सभापती उषा बच्छाव, सदस्या डॉ. भारती पवार, जिल्हा पदाधिकारी जगदीश पवार, योगेश आहेर, चिंतामण आहेर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कळवण जिल्हा परिषदेचे गटनेते रवींद्र देवरे, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जिल्हा पदाधिकारी नारायण हिरे, पंचायत समितीचे सदस्य हिरामण पगार, कौतिक पगार, रामा पाटील यांनी निदर्शन केली.

येवल्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, ज्ञानेश्वर शेवाळे, नीलेश पटेल यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. नांदगावात तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, मनमाडचे शहराध्यक्ष राजेंद्र पगारे, जिल्हा पदाधिकारी साईनाथ गिडगे, विष्णू निकम, नाना शिंदे, महेंद्र शिरसाठ, किसन गायधनी आदींनी निदर्शन केली.

चांदवडमध्ये प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, तालुकाध्यक्ष सयाजी गायकवाड, उत्तम आहेर, विजय जाधव, अभिमन्यू ठाकरे, महेश देशमाने, आदी आंदोलनात सहभागी झाले होते. पेठ व सुरगाण्यात ही आंदोलन करण्यात आले. मालेगावात तालुकाध्यक्ष गुलाब चव्हाण, अरुण देवरे, धर्मा भामरे, बाळा बागूल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सिन्नरमध्ये तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, डॉ. विष्णू अत्रे, कल्पना रेवगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. त्र्यंबकेश्वरमध्ये तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज कान्नव, गोकुळ बत्तासे, स्वप्नील बागडे, कैलास वाटाणे आदीने आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीसाठी दारात ढोलताशे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक महापाल‌िकेत जकात व एलबीटी बंद झाल्यापासून उत्पन्नही कमी झाले आहे. यासाठी महापाल‌िका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रयत्न सुरू केले असून, थकबाकीदारांकडून वसुलीसाठी आता त्यांच्या दारात ढोलताशे वाजविण्यात येणार आहेत.

दहा हजारांच्यावर थकबाकी असलेल्या ग्राहकांकडून वसुली करण्यासाठी खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकाला मदत करण्यासाठी ढोल-ताशे लावून महापाल‌िका थकबाकीदारांकडून वसूली करत आहे.

शनिवारी आनंदवली, कामगारनगर, वनविहार कॉलनी, काळेनगर आदी भागात महापाल‌िकेचे वसुली पथक विभागीय अधिकारी चेतना केरुरे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरले होते. यात ढोल-ताशांच्या गजरात थकबाकीदारांच्या दारात जावून महापाल‌िकेची थकबाकी भरा, अशी विनंती करत होते. यावेळी काही थकबाकीदारांनी आधी ढोल-ताशा बंद करा लगेचच थकबाकीची रक्कम भरतो, असे विनवणी केली. सातपूरच्या वसुली पथकात आर. बी. सूर्यवंशी, गिरीश आहेर, रतन शिंदे, एन. एस. गुरव, एम. ए. पानसरे आदींनी दिवसभरात साडेतीन लाखांहून अधिक थकबाकी वसुली केली आहे. ढोल-ताशांचा गजर कानावर पडल्यावर अनेक रहिवाशी उत्सुकतेने घराबाहेर येऊन पाहत होते. नेमके थकबाकीदाराच्या दारात ढोल-ताशा गेल्यामुळे त्यांनादेखील महापाल‌िकेची शक्कल चक्रावून सोडणारी होती. ढोल-ताशा वाजवत महापाल‌िकेची वसुली मोहीम असल्याचे समजल्यावर नाचक्की होऊ नये म्हणून थकबाकीदारांनी लगेच चेक किंवा रोख आपली थकबाकी तत्काळ भरली. महापाल‌िकेच्या ढोल-ताशा लावून वसुली करणाऱ्या मोहिमेचे सूज्ञ नागरिकांकडून कौतुक होत आहे.

दरम्यान, महापाल‌िकेत असलेल्या बड्या थकबाकीदारांकडून देखील ढोल-ताशांचा गजर करून वसुली करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images