Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गर्भपात करणारा डॉक्टर चतुर्भुज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करून मुलीचा गर्भपात करणाऱ्या संशयित आरोपीस मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी डॉ. उमेश आर. मराठे यास अटक केली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. संशयित डॉक्टरास कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व गर्भपात केल्याप्रकरणी स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांचा मुलगा अजिंक्यवर इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीड‌ित युवतीच्या तक्रारीनुसार, बलात्कारानंतर संशयित आरोपीने इच्छा नसताना लेखानगर येथील लाइफ केअर हॉस्पिटलचे डॉ. उमेश मराठे यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य संशयित आरोपी अजिंक्य चुंभळेने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने २३ नोव्हेंबरपर्यंत अजिंक्यचा अटकपूर्व जामिन अटी-शर्तींसह मंजूर केला. सदर प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी काही हॉटेलांमधील व्हिड‌िओ फुटेज जप्त केले आहेत. दुसरीकडे पीड‌ित मुलीच्या तक्रारीनुसार डॉ. मराठे यांची दोन दिवस कसून चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान डॉक्टरांनी समाधानकारक खुलासा दिला नाही. त्यामुळे डॉक्टर मराठे यांना कलम ३१३ नुसार पोलिसांनी रविवारी उशिरा अटक केली. एखाद्या महिलेच्या इच्छेविरोधात गर्भपात करणाऱ्या व्यक्तीस कलम ३१३ नुसार दहा वर्ष किंवा आजीवन कारावास अशी शिक्षा होऊ शकते. दरम्यान, सोमवारी डॉ. मराठे यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले. बचाव तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने डॉ. मराठे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह राजकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.
मुंबईलाही तपास
या गुन्ह्याचे कनेक्शन मुंबई येथे जोडले गेले आहे. पीड‌ित मुलीच्या तक्रारीनुसार मुंबईतील काही बड्या हॉटेल्समध्ये संशयित आरोपीने वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. नाशिकमधील अशाच एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत. आता तपास पथकाने मुंबईकडे आपले लक्ष वळवले असून, तेथील व्हिड‌िओ फुटेज जप्त करण्यात येणार आहे. याप्रकरणी सध्या तरी नवीन आरोपी होण्याची शक्यता नाही, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एचओआय’ संचालकांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
२४ टक्के व्याजाचे आमिष दाखवून शहरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंटच्या (एचओआय) तिघा संचालकांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
या घोटाळ्यातील चौथा फरार संचालक देखील पोलिसांनी जेरबंद केला असून त्याचीही रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. एचओआयच्या माध्यमातून जवळपास तीन हजार गुंतवणूकदारांना ३०० कोटी रुपयांना चुना लावण्यात आला आहे. या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने १५ नोव्हेंबर रोजी सतीश शेषराव कामे (रा. सिडको), विजय लक्ष्मण खूनकर (रा. जेजूरकर मळा, तपोवन) व मुख्य संशयित विनोद पाटील याची पत्नी प्रियंका विनोद पाटील यांना अटक केली होती. या सर्वांना न्यायालयाने आज, सोमवारपर्यंत पोल‌िस कोठडी सुनावली होती. वरील संशयितांकडे केलेल्या चौकशीनुसार पोलिसांनी रविवारी (२० नोव्हेंबर) या प्रकरणातील आणखी एक फरार संचालक सुशांत रमेश कोठुळे (२९, आगरटाकळी, जेजुरकर मळा, नाशिकरोड) यास अटक केली. या चौघांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने कोर्टाने सर्व संशयितांना २४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीलाच पाच संचालकांना जेरबंद केले होते. पोलिस कोठडी संपल्यानंतर संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार विनोद पाटील मात्र पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला आहे. विनोद पाटील गुंतवणूकदारांशी सोशल मीड‌ियाच्या माध्यमातून संपर्कात राहत असल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. विनोद पाटीलच्या अटकेनंतरच या घोटाळ्यातील सर्व तथ्यावर प्रकाश पडेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकेवर चेनस्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
द्वारका सर्कल येथील बस स्टॉपवर उभ्या असलेल्या अहमदनगर येथील महिलेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी ओरबाडून नेली. ऐन वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी चेन स्नॅचिंग करून एक प्रकारे पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
या प्रकरणी ज्योती महावीर मंडलेचा (रा. टाकळी, ता. पाथर्डी ) यांनी भद्रकाली तक्रार पोलिसांकडे तक्रार दिली आहे. चेन स्नॅचिंगची घ्टना रविवारी सांयकाळी घडली. अहमदनगर येथे जाण्यासाठी मंडलेचा या पुणे रोडवरील द्वारका सर्कल भागात असलेल्या बस स्टॉपवर उभ्या असताना चोरट्यांनी संधी साधली. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बसची वाट पाहत असताना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी मंडलेचा यांच्यासमोर आपली दुचाकी उभी केली. यानंतर, दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी तोडली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मंडलेचा यांनी आरडाओरड केली. मात्र, भरधाव वेगात चोरटे पसार झाले. सोन्याचा हार सुमारे तीन तोळे वजनाचा व ६० हजार रुपये किमतीचा होता. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे करीत आहेत.
एकास मारहाण
चेष्टा मस्करी करण्यास विरोध केल्याने दोघांनी बेदम मारहाण करीत एकास गंभीर जखमी केले. ही घटना मद‌िना चौकात रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इरफान खान (२६) व मोसीन खान (२४, दोघे रा. मदिना चौक) अशी मारहाण करणाऱ्या संशय‌ितांची नावे आहेत. फरमान मुकीन कुरेशी याने दिलेल्या तक्रारीनुसार, फरमान रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आपल्या घराजवळ उभा असताना तेथे वरील दोघे संशय‌ित पोहचले. त्यांनी फरमानची टिंगलटवाळी करण्यास सुरुवात केली. मात्र, फरमानने त्यांना विरोध करून माझी चेष्टा करू नका असे सुनावले. यानंतर, दोघा संशय‌ितांनी फरमानला पकडून त्याचे डोके भिंतीवर आपटून जखमी केले. तसेच दोघांनी लाथाबुक्यांनी मारल्याचे फरमानने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कडारे करीत आहेत.
श्रमिकनगरला आत्महत्या
सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथील विवेक कन्स्ट्रक्शन परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. युवकाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. राजेंद्र भागवत पाटील (३४ रा.श्रमिकनगर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. राजेंद्रने आपल्या घरात कुणी नसतांना अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. रविवारी सकाळी तो मृतावस्थेत मिळून आला. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार आव्हाड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डोस मिळताच आमदार सक्र‌िय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूम‌िवर भाजपचे तीनही आमदार पुन्हा सक्र‌िय झाले आहेत. भाजपच्या आमदारांनी शहर विकासाच्या प्रश्नांना हात घालत त्यांना सोडविण्यासाठी महापालिकेतील ये-जा वाढव‌ली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून भाजप आमदारांची स्वतःची विकासकामे मंजूर घेण्यासह निवडणुकांसाठी फिल्ड‌िंग लावण्यासाठी पालिकेतील वर्दळ वाढवली आहे. मनपा निवडणुका जिंकणे भाजप आमदारांसाठी प्रतिष्ठेचा विषय असल्याने त्यांनी सर्व शक्ती पणाला लावून कामाला सुरूवात केली आहे. एकीकडे महापालिकेत भाजप सक्र‌िय झाली असतांना सत्ताधारी मनसे मात्र पूर्ण निष्क्र‌िय झाली आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुका असून, त्या जिंकण्यासाठी भाजप व सेनेत चढाई सुरू आहे. शहरातील भाजपचे तीनही आमदार हे नगरसेवकही आहेत. त्यामुळे या निवडणुका जिंकण्याचा सर्वाधिक दबाव या तीनही आमदारांवर आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूम‌िवर शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी पालिकेतील सक्र‌ियता वाढवली आहे. विशेषतः आमदार बाळासाहेब सानप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असून, त्यांच्यावर नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी सर्वाधिक आहे. सानप यांनी गेल्या पंधरा दिवसात आयुक्तांची तब्बल चार ते पाच वेळा भेट घेत शहर विकासाच्या प्रश्नांवर चर्चा केली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळापाठोपाठ आता कपाट प्रश्नातही त्यांनी थेट भूमिका घेतली आहे. तर प्रा. देवयानी फरांदे यांनीही प्रभागातील विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमा हिरे यांनीही सक्र‌ियता वाढवली आहे. तीनही आमदारांची वर्दळ वाढल्याने व त्यांनी नाशिककरांच्या प्रश्नांना त्यांनी उश‌िरा का होईना हात घातला आहे.

मुख्यमंत्र्यांचा बूस्टर डोस

नुकतेच नाशिक दौ-यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिनर डिप्लोमसीत भाजपच्या आमदारांसह पदाधिका-यांना निवडणुका जिंकण्यासंदर्भात बूस्टर डोस दिला आहे. निवडणुकांच्या पूर्वीच रखडलेला शहर विकास आराखडा व नियंत्रण नियमावली ही जाहीर केली जाणार असून, त्याचा थेट फायदा भाजपला होईल, अशा तरतुदी त्यात केल्या जाण्याची शक्यता आहे.

मनसेत चलबिचल

एकीकडे भाजपचे पदाधिकारी सक्र‌िय झाले असतांना सत्ताधारी मनसेचे पदाधिकारी मात्र निष्क्रिय झाल्याचे चित्र आहे. भाजपच्या पदाधिका-यांची वर्दळ आयुक्तांकडे वाढली असतांना मनसे पदाधिकारी मात्र हातावर हात धरून बसले आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकारींमध्ये चलबिचल सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायटेक वृक्षगणनेचा श्रीगणेशा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या हायटेक वृक्षगणनेचा श्रीगणेशा झाला असून, जीपीएस प्रणालीच्या आधारे जूनपर्यंत शहरातील नेमक्या वृक्षांची संख्या कळणार आहे. सोमवारी महापौर अशोक मुर्तडक व आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या उपस्थितीत या हायटेक वृक्षगणनेचा शुभारंभ करण्यात आला. मनपा मुख्यालयातून पिंपळ या वृक्षापासून या मोह‌िमेचा श्रीगणेशा करण्यात आला. हायटेक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या वृक्षगणनेत वृक्षांच्या प्रजाती, उंची, वय, बांधा कळणार आहे. तसेच शहरातील झाडांची नेमकी वस्तुस्थिती समजणार असल्याने बनवेगिरी टळून अवैध वृक्षतोडही थांबणार आहे.

शहरातील वृक्षांची संख्या कळण्यासाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी महापालिकेने वृक्षांची गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील तीन मीटरपेक्षा जास्त उंचीच्या वृक्षांची गणना केली जाणार असून, ही गणना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाणार आहे. जीआयएस व जीपीएस तंत्रज्ञानाच्या आधारे फोटो घेऊन वृक्षांची गणना होणार आहे. विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, सभापती शिवाजी गांगुर्डे, प्रा. कुणाल वाघ, परशुराम वाघेरे, संजय साबळे, महेश तिवारी, टेरेकॉन कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी वृक्षगणनेची सविस्तर माहिती दिली. या वृक्षगणनेमुळे संबंधित वृक्ष गुगलमॅपवर आला आहे. या झाडाची उंची साडेआठ मीटर, बुंधा चार मीटर, वय अंदाजे ७५ वर्ष आदी नोंदणी गुगलवर करण्यात आली.

अवैध वृक्षतोड थांबणार

नव्या वृक्षगणना ही जीपीएस प्रणालीच्या आधारावर केली जाणार असून सर्व ठिकाणांवरील वृक्षांची मोजदाद केली जाणार आहे. प्रत्येक वृक्ष हा रेकॉर्डवर येणार आहे. यामुळे बेकायदेशीर वृक्षतोड थांबणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकी प्रकरणाचा वक‌िलांकडून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
फिर्यादीचे काम करीत असताना अॅड. शिरिष पारख यांना धमकवण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत याबाबत महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल रोहित देव यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय नाशिक बार असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.
असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जुनी लायब्ररी हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अॅड. पारख यांना धमकवण्यात आले. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार गंभीर असल्याने नाशिक बार असोसिएशने त्याचा निषेध करण्यासाठी बैठक बोलावली होती. धमकी देणाऱ्याविरोधात कडक कारवाई झालीच पाहिजे, असा ठराव या वेळी एकमताने मंजूर करण्यात आला. असोसिएशन सदैव पारख यांच्या सोबत असल्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे यांनीही सदर घटनेचा निषेध नोंदवत ही प्रवृत्ती न्यायसंस्थेविरोधात काम करणारी असल्याची टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतलेल्या थंडीचा नाशिककरांना कडाका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठवड्यात नाशिककरांना घाम फोडणारे हवामान आता चक्क नाशिककरांना हुडहुडी भरविणारे बनले आहे. नाशिकचा पारा १५ अंशांवरून कमी होत आता थेट ९ अंश सेल्सिअसवर आला आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री शहरात गारठा राहत असून पारा आणखी खाली जाण्याचा अंदाज आहे.

गेल्या गुरुवारी (दि. १६) नाशिकचे किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस तर कमाल ३०.१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यामुळे सहाजिकच नाशिककरांना थंडीच्या मोसमात काहीसा उकाडा सहन करावा लागला. वातावरणातील तत्कालिक बदलांचा हा परिणाम होता. मात्र, गुरुवारनंतर नाशिकचे किमान तापमान सातत्याने घसरत आहे. रविवारी (दि. २०) पहाटे ९.५ अंश सेल्सिअसची नोंद शहरात झाल्यानंतर सोमवारी त्यात आणखी ०.५ अंश सेल्सिअसची घट झाली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य-महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, कोकण-गोवा व मराठवाड्याच्या काही भागात व मध्य-महाराष्ट्र व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर कोकण-गोवा व मराठवाड्याच्या उर्वरीत भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत घट झाली आहे. नाशिकमध्ये सोमवारी (दि. २१) ९ अंश सेल्सिअसची नोंद झाली असून तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नाशिककरांना कडाक्याची थंडी अनुभवायला मिळणार आहे.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या काही दिवसात किमान तापमानातील हा बदल मानवी आरोग्यावर परिणाम करणारा ठरत आहे. लहान मुले आणि वृद्धांना त्याचा प्रकर्षाने त्रास होत आहे. लहान मुलांना खोकला, ताप आणि सर्दीने बेजार केले आहे. तर, वृद्धांना हाडे आणि सांधेदुखीचा त्रास होत आहे. दम्याचा त्रास असलेल्या पेशंटला पहाटेच्या सुमारास श्वसनास त्रास होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटबंदीने मोडले एसटी, रेल्वेचे कंबरडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द झाल्यामुळे जिल्ह्यात एसटी महामंडळ तोट्यात तर रेल्वेची मालवाहतूक निम्म्याने घटली आहे. नोटा बदलण्यापासून तर पैसै काढणे आणि पैसा खात्यात भरण्याची आर्थिक उलाढालही गेल्या १० ते १२ दिवसात कोट्यवधींमध्ये गेली आहे. या साऱ्या स्थितीचा आढावा राज्याचे मुख्य सचिव स्वधीन क्षत्रीय यांनी घेतला आहे. चलनात सुटै पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)द्वारे राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारी नोटाबंदीच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. गेल्या दहा दिवसानंतर राज्यात नोटा रद्द झाल्यामुळे काय परिणाम झाला याचा आढावा आता राज्य सरकारने घेण्यास सुरुवात केली असून, त्यात कशी सुधारणा करण्यात येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे याबाबत त्यांनी माहिती घेतली.

बसला फटका

नोटा रद्द झाल्यामुळे मनमाड, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, येवला, लासलगाव या बसस्थानकावर १२ ते १६ टक्के वाहतुकीत घट झाली आहे. त्यामुळे एसटीला मोठा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे उर्वरित बसस्थानकावर ५ ते ८ टक्के घट झाली आहे.

रेल्वेची वाहतूक निम्मी

नाशिक जिल्ह्यातून मनमाड, येवला, लासलगाव, खेरवाडी, नांदगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची वाहतूक रेल्वेच्या रॅकने केली जाते. त्यामुळे या दहा दिवसात त्यात मोठी घट झाल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. एका रॅकसाठी रेल्वे १८ लाख ते २० लाखापर्यंत भाडे आकारते. पण कांद्याचे लिलाव बंद पडल्यामुळे त्याचा परिणाम झाला असल्याचे बोलले जाते.

भाजीपाल्यालाही फटका

नाशिक हे देशाचे किचन म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील भाजीपाला मुंबईसह देशातील अन्य राज्य आणि शहरांमध्ये पुरवली जातो. कांद्याबरोबरच भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले असून, ११ ते १४ नोव्हेंबर या काळात जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. गेल्या १-२ दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्वपदावर आले आहेत.

माहिती गोळा?

नोटा रद्द झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालायतून नाशिक शहर व जिल्ह्यातील प्रमुख व्यापाऱ्यांना रोज फोन करुन व्यापारावर काय परिणाम झाला याची माहिती गोळा केली जात होती. याबाबत अनेक व्यापाऱ्यांना प्रश्न पडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भगूरकर भोगतायेत काळ्या पाण्याची शिक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नगरपालिकेत शिवसेना सत्तेत आल्यापासून भगूरकर काळ्या पाण्याचीच शिक्षा भोगत आहेत. हीच परिस्थिती राज्यातदेखील शिवसेनेची असून, पत नसल्याने जनतेला वाऱ्यावर सोडले, असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले.

भगूर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या वतीने आयोजित प्रचारसभेत मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी पक्षासह काँग्रेसचे शहर पदाधिकारी व सर्व उमेदवार उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, जर एखादा पक्षाच्या जिल्हाप्रमुख सतत २० वर्ष त‌िच आश्वासने देत नागरिकांची दिशाभूल करून सत्तेत येत असेल, तर त्यांची जागा नागरिकांनी त्यास दाखवत सत्तेत परिवर्तन घडविणे गरजेचे आहे.

प्रास्ताविकातून अकबर सैय्यद यांनी गेल्या १६ वर्षांत गावातील प्राथमिक सुविधा वगळता अन्य काही भरीव काम झालेच नसल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी आमदार दिलीप बनकर, नाना महाले यांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर गोरखनाथ बलकवडे, अर्जुन टिळे, सोमनाथ खातळे, मोहन करंजकर, भारती साळवे, बी. डी. करंजकर आदी उपस्थित होते. विशाल बलकवडे यांनी आभार व्यक्त केले. सभेस मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. सभेनंतर पथनाट्य सादर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेरीच्या शाळेतून तोट्या लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेरी येथील सीडीओ मेरी शाळेच्या स्वच्छतागृहात बसविलेल्या सुमारे १५ हजार रुपये किमतीच्या ४५ नळांच्या तोट्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या शाळेत दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडली असून, शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची खंत संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, शाळेत पुरेशा सुरक्षारक्षकांची नेमणूक केली असतानाही पुन्हा अशी चोरी झाल्याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिंडोरी रोडवरील मेरी परिसरात सीडीओ मेरी शाळा आहे. पूर्वी गजबजलेली ही मेरी कॉलनी आता पूर्ण ओसाड असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे भुरट्या चोरांचे या परिसरात चांगलेच फावते आहे. काही महिन्यांपूर्वीही शाळेतील स्वच्छतागृहांचे नळ चोरीला गेल्याची घटना घडली होती. एक तोटी साधारणपणे शंभर ते दीडशे रुपयांना मिळते. मुख्याध्यापिका पूजा गायकवाड यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान ही चोरी झाल्याचे नमूद केले आहे. याबरोबरच शाळेच्या काचा फोडणे, शाळेच्या आवारात कचरा करणे यांसारख्या समस्यांनाही शाळा प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. पोलिस स्टेशनमध्ये पूर्वीही तक्रार दिली असली तरी पुरेसे लक्ष दिले जात नसल्यानेच अशा समस्या वारंवार घडत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच ग्लॅक्सो कंपनी व हॅबिटेट फॉर ह्युमॅनिटीतर्फे या शाळेत स्वच्छतागृहांचा सुधारित सेटअप उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना याद्वारे चांगल्या सुविधा पुरविण्याकडे एकीकडे शाळा लक्ष देत असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या समस्यांचा सामनाही विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.

यापूर्वी चोरी झाली तेव्हाही आम्ही तक्रार दिली होती. आता पुन्हा तशीच घटना घडली आहे. पोलिसांकडून या प्रकारणाची ज्या प्रकारे दक्षता घ्यायला हवी त्याप्रमाणे घेतली जात नसल्याने अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या परिसराकडे पोलिसांनी लक्ष द्यावे.

- प्रा. सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, नाशिक एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक विषमता दाखवणारे ‘वावटळ’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गरीब-श्रीमंत यांच्यातील भेद, सवर्ण व दलित यांच्यात सुरू असलेला संघर्ष पूर्वीपासून असून, त्यामुळे या दोहोमंधील दरी वाढतच चालली आहे. हे दाखवणारे ‘वावटळ’ हे नाटक सोमवारी सादर झाले. इतर दिवशी दोनच अंकी नाटक सादर झाले. मात्र, या नाटकाचे विशेष म्हणजे हे तीन अंकी नाटक होते.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे ५६ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत लक्ष्मण काटेलिखित ‘वावटळ’ हे नाटक सादर झाले. हे नाटक श्री शिवछत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ संस्थेतर्फे प्रस्तुत करण्यात आले होते.

विठोबा हा दारिद्र्याने गांजलेला वृद्ध गृहस्थ आहे. तो एका शेतात झोपडे बांधून राहतो. त्याला राम नावाचा मुलगा व सीता नावाची सून असते. हे दाम्पत्य म्हाताऱ्या विठोबाला खूप जीव लावते. अगदी स्वत: न जेवता त्याला जेऊ घालणे, आजारपणामध्ये त्याची काळजी करणे, त्याला जिवापाड जपण्याचे काम हे दोघे प्रामाणिकपणे करतात. अशातच सुंदर सीतावर डोळा असलेला पाटलाचा मुलगा रामला पैशांचे आमीष दाखवून काहीबाही काम करायला लावतो. घरात पोटापाण्यासाठी अन्नाचा कण नसल्याने राम त्याचे म्हणणे ऐकतो. मात्र, त्याच्या हातून बरेवाईट घडविण्याचा पाटलाच्या मुलाचा उद्देश असतो. त्यातून त्याला सीताला बळकवायचे असते. एक दिवस पाटलाचा मुलगा येतो आणि सीताला उचलून घेऊन जातो. तिच्या खूप विनवण्या करतो, त्याचे तिच्यावर प्रेम असते. ती नकार देते. त्यामुळे नैराश्यातून तो विष पिऊन आत्महत्या करतो. इकडे पाटील मुलाच्या मृत्यूमुळे खवळून उठतो व सीताला विहिरीत ढकलून देतो. त्यात तिचा मृत्यू होतो. राम पाटलाला जाब विचारायला येतो तेव्हा तो धोंड्या दरोडेखोराचे नाव पुढे करतो. राम धोंड्याला मारायला निघतो व त्याचा खात्मा करून येतो. मात्र, त्याला विहिरीत सीताचा मृतदेह दिसतो. त्यामुळे राम वेडापिसा होतो. त्याच वेळी इकडे विठोबा पुरलेले धन रामला देऊ, म्हणून ते खणतो तर त्यात सर्व दगडधोंडे निघतात. त्या धसक्याने त्याचाही मृत्यू होतो. राम वेडा होऊन निघून जातो. अशा प्र्रकारे वावटळ येऊन त्या कुटुंबाची वाताहत होते.

या नाटकात प्रसन्न काटे, अतुल महानवर, एकाग्रता सोनवणे, किरण शिंपी, चंद्रवदन दीक्षित, सुनील सूर्यवंशी, मयूर गरुड, प्रतीक साळी, सुनीता गरुड, हर्ष गरुड, प्रवीण पाटील यांनी भूमिका केल्या. संगीत प्रा. नीलेश जाधव यांचे व नेपथ्य सुनीता गरुड, प्रतीक साळी यांचे होते. प्रकाशयोजना दिनेश चौधरी यांची होती. नाटकाचे दिग्दर्शन प्रसन्न काटे यांनी केले होते. रंगभूषा माणिक कानडे यांची होती. विशेष सहाय्य बहुरूपी कलावंत यांचे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगेत मृत्यू झालेल्यांना शहीद म्हणणार का?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

देशात पाचशे, हजाराच्या नोटा बदलाच्या निर्णयामुळे जवळपास ६० लोकांनी जीव गमावला. त्या सर्वांना सरकार शहीद घोषित करणार का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विचारला. ते शहादा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.

सध्या संपूर्ण राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजीमंत्री आमदार वर्षा गायकवाड यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी खासदार चव्हाण यांनी शहादा नगरपालिकेत काँग्रेस पक्षाची सत्ता कायम ठेवा, असे आवाहन केले. नोटबंदीच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधला.

काँग्रेसच्या कार्यकाळात सरकार निर्णय घ्यायचे, पण जनतेला त्रास झाला, तर निर्णय मागेही घेत असे. पण सध्याचे सरकार मुस्कटदाबी करून चालविले जात आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. धुळे आणि नंदुरबार काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून येथे विरोधकांची डाळ शिजणार नाही, असा टोलाही चव्हाण यांनी मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे मनपात वसुलीतून १२ कोटी ८५ लाख जमा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेत विविध करांसाठी हजार व पाचशे रुपयांचे जुने चलन स्वीकारण्याची गुरूवारी (दि. २४) शेवटची मुदत होती. त्यामुळे मनपात करदात्यांची गर्दी फारशी दिसून आली नाही. कारण १० नोव्हेंबरपासून जुन्या नोटा स्वीकारण्यात येत असल्याने पहिल्याच दिवपासून कर भरण्यासठी मनपामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती.

शेवटच्या दिवशी शहरातील वृद्ध, अपंग, आजारी असलेल्या करदात्यांसाठी ‘महापालिका आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली. या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेत विविध कर भरण्यासाठी मनपाने काही दिवसांपासून थकीत कर दात्यांकडे धडक वसुली मोहीमही सुरू केली आहे. याद्वारे मनपाच्या तिजोरीत आतापर्यंत १२ कोटी ८५ लाख रुपये जमा झाले आहेत. नागरिकांनी कर भरण्यासाठी मोठे सहकार्य मनपाला केल्याने मनपातर्फे आयुक्त धायगुडे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. तर ज्या नागरिकांचे कर भरणा बाकी असले त्यांनीदेखील तत्काळ भरणा करावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात संघर्ष मूकमोर्चा उद्या

$
0
0

अॅट्रॉसिटी महामोर्चाची तयारी जाेरात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरात शनिवार (दि. २६) रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दलित-आदिवासी अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीने केले आहे. दरम्यान मोर्चाला अनेक संघटनांनी जाहीर पाठींबा दिला आहे.

दलित-आदिवासी-मुस्लिम-भटक्या विमुक्त जमाती-ओबीसी यांच्यातर्फे अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे कोणीही नेतृत्व करणार नसून समावेशक मोर्चा असणार आहे. तसेच मोर्चाचे निवेदन महिला, मुली हे उपस्थित जनसमुदायास मंचावरून संबोधित करणार आहेत. या मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला असून बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक मार्गे पोलिस कवायत मैदान, मनोहर चित्रमंदिर, आग्रारोड, कराचीखुंट, मनपा, झाशी राणी पुतळा या मार्गाने जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर त्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीथॉन शेतकऱ्यांनी फुलला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शेतकऱ्यांना बदलत्या तंत्रज्ञान व आधुनिक शेतीची माहिती व्हावी, यासाठी दरवर्षी मीडिया एक्झिबिटर यांच्यातर्फे कुंभथॉनचे आयोजन करण्यात येते. गुरुवारी ठक्कर डोम येथे शेतकऱ्यांच्या कृषी कुभांची उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावल्याने कृषीथॉन फुलला होता. यावेळी महाराष्ट्रभरातून निवड करण्यात आलेल्या युवा शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. २८ नोव्हेंबरपर्यंत शेतकरी, शेती उद्योजक व शेती संशोधन करणाऱ्यांना कृषीथॉनचा लाभ घेता येणार आहे.

कृषीथॉनचे उद्घाटन खासदार हरिचंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर अशोक मुतर्डक, आमदार सिमा हिरे, देवयानी फरांदे, निर्मला गावीत, सॅमसोनाईटचे उपाध्यक्ष यशवंत सिंग, नाडाचे विजय पाटील, कृषी विभागाचे सहसंचालक कैलास मोते, व्यंकटेश कुलकर्णी, नगरसेवक केशव आण्णा पाटील, आश्विनी बोरस्ते, माजी महापौर प्रकाश मते व आयोजक संजय न्याहारकर उपस्थित होते.

‘शेतकऱ्यांसाठी पर्वणी असलेल्या कृषीथॉनमध्ये दरवर्षी नवीन तंत्रज्ञान व आधुनिक शेतीबाबत माहिती मिळते. युवा शेतकऱ्यांनी त्यांच्या कल्पनेतून शेतीत मिळविले यश हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याने येत्या काळात तरुण वर्ग शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहू शकेल. यासाठी कृषीथॉनसारख्या प्रदर्शनाचा त्यांनी लाभ घ्यायला हवा.’ असे खासदार चव्हाण यांनी सांगितले.

महापौर मुतर्डक यांनी शेतकऱ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या कृषी कुभंबाबत न्याहारकर व त्यांच्या टिमला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात शेतकऱ्यांना बदलते तंत्रज्ञान व आधुनिक शेतीबाबत माहिती व्हावी यासाठी कृषीथॉन वरदान ठरत असल्याचे सांगितले. तसेच विदेशी कंपन्यांचा सहभाग हे कृषीथॉनचे यश असल्याने न्याहारकर यांनी नमुद केले. साहिल न्याहारकर यांनी आभार मानले.

२५० स्टॉल कृषीथॉनचे आकर्षण

कृषीथॉनमध्ये लागलेले देशविदेशातील स्टॉल शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरत आहेत. शेती व्यावसायला लागणारे अवजारे, औषधी, बि-बियाणे, अत्याधुनिक यंत्रसामग्री, सिंचनसाधने, खते, फलोउत्पादन, पॅकेजिंग, फळांची साठवणूक, सौरऊर्जा, पशुखाद्य, डेअरी उपकरणे, कृषी अर्थसहाय्य योजना, कृषीविषयक पुस्तके, नियतकालिके आदींचे स्टॉल शेतकऱ्यांची गर्दी खेचत आहेत.

आधुनिक शेती व उपकरणाबांबत व्याख्यान

हवामानाच्या बदलत्या वातावरणात आधुनिक शेती कशी करावी व कुठल्या उपकरणांचा वापर असावा. तसेच कुठल्या पिकाला किंवा फळबागांना कोणती औषधी द्यावीत याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन कृषीथॉनमध्ये व्याख्यानांच्या माध्यमातून मिळणार आहे.

युवा शेतकऱ्यांनी वेधले लक्ष

महाराष्ट्रातून शेती युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी, शेती, उद्योग व संशोधन यावर युवा शेतकऱ्यांच्या व्यावसायाने सर्वच अचंबित झाले होते. विविध क्षेत्रात तरुण व तरुणींनी शेतीला व्यावसायिकतेचा दर्जा दिल्याने मेहनत घेतल्यास यश निश्चित मिळते हे दाखवून दिले. आधुनिक शेती, तंत्रज्ञान व शेती उद्योग यांच्यात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील २६ युवा शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते शेती युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यात प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (पुरुष गट) : गोकुळ जाधव (नाशिक विभाग), ब्रह्मदेव सरडे (पुणे विभाग), कृषिभूषण शिवराम घोडके (औरंगाबाद विभाग), हर्षद पाटील (कोकण विभाग), सचिन सारडा (अमरावती विभाग), योगेश लिचडे (नागपूर विभाग).

प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (महिला गट) : संगीता मालकर (नाशिक विभाग), प्रिया घोडके (पुणे विभाग), सुनंदा क्षीरसागर (औरंगाबाद विभाग), ज्योती सावे (कोकण विभाग), सिंधू निर्मळ (अमरावती विभाग).

प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार : डॉ. धनराज चौधरी (नाशिक विभाग), डॉ. अभिनंदन पाटील (पुणे विभाग), डॉ. सुभाष घोडके (औरंगाबाद विभाग), डॉ. विवेक वर्तक (कोकण विभाग), डॉ. संतोष पाटोळे (अमरावती विभाग), डॉ. मुकेश कापगते (नागपूर विभाग).

प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार : शंतनू पाटील (नाशिक विभाग), शरद लाड (पुणे विभाग), किरण आहेर (औरंगाबाद विभाग), प्रसाद सावे (कोकण विभाग), आशिष आवटे (अमरावती विभाग), वैभव उघडे (नागपूर विभाग).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अटीतटीतही जुन्या मशिन सुसाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड प्रेसला चांगल्या प्रतीचा कच्चा माल आणि आधुनिक मशिन्स मिळाले तर उच्च प्रतिच्या नोटांची छपाई करून उत्पादनाचे लक्ष गाठू. तांत्रिक अडचणी असतानाही १३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान नाशिकरोड प्रेसमध्ये तीनशे दशलक्ष नोटांचे उत्पादन करण्यात आल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रेस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण गर्ग यांनी नाशिकरोड प्रेसला भेट देऊन उत्पादन आणि समस्यांची माहिती घेतली. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती गोडसे यांनी दिली.

जादा उत्पादन देणार

गोडसे म्हणाले की, नाशिकरोड प्रेसमध्ये पाचशेचे उत्पादन दुपटीने वाढविले जाणार आहे. त्याचबरोबर १०, २०, ५० या नोटांच्या छपाईचेही काम वाढणार आहे. नाशिकरोड प्रेसची तुलना रिझर्व्ह बँकेच्या कामाशी केली जाते. मात्र, बँकेच्या दोन्ही प्रेस अलिकडे सुरू झाल्या असून, मशिनरीही अत्याधुनिक आहेत. नाशिकरोड प्रेसच्या मशिनरी जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले आहे. तसेच आधुनिकीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. रिझर्व बँकेच्या दोन्ही प्रेसला चांगल्या प्रतिची शाई मिळते. प्रसंगी परदेशातूनही ती आयात करता येते. नाशिकरोड प्रेसला भारतीय शाई वापरावी लागते. चांगला कच्चा माल आणि आधुनिक मशिन्स दिल्या तर देशाच्या उत्पादनात भर पडेल.

‘डे-ला-रु’ला विरोध

करन्सी व सिक्युरिटी कागदपत्रे छापण्यात आघाडीवर असलेल्या ब्रिटीश डे-ला-रु कंपनीला महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद येथे जागा दिली आहे. या कंपनीला नोटा व अन्य सुरक्षा कागदपत्रे छापण्याची परवानगी देऊ नये, प्रेस कामगारांना टार्गेट अलाऊन्स मिळावा, सातवा वेतन आयोग त्वरित मिळावा, नवी कामगार भरती करावी आदी मागण्यांवर गांर्भीयाने विचार व कृती करण्याचे आश्वासन गर्ग यांनी दिले.


कामगारांना रोख पगार

देशात नोट टंचाई असताना प्रेस कामगारांनी दररोज जादा काम केले. दोन रविवारी सुटी घेतली नाही. त्याबद्दल प्रवीण गर्ग यांनी कामगारांचे कौतुक केले. नोटा छापणाऱ्या कामगारांनाच सुट्या पैशांची समस्या भेडसावत आहे. ‘मटा’ने याबाबत वृत्त दिले होते. त्याची दखल घेत सरकारने परिपत्रक काढले आहे. त्यानुसार नाशिकरोड प्रेस कामगारांना दोन दिवसात पगारापोटी रोख दहा हजाराची रक्कम रोख मिळणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीब‌िल रीडिंग ऑनलाइन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून पाणीपट्टीची बिले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. स्मार्ट सिटी योजनेतंर्गत पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेत अामूलाग्र बदल होणार असून, पाणीबिलाचे रीडिंग ऑटोमॅट‌िक करण्याचे प्रयत्न महापालिकेने सुरू केले आहेत. टाटा कंन्सलटन्सी सर्व्हिसेसकडून इनोव्हेशन सेंटरमध्ये यासंदर्भातील संशोधन करण्यात येत आहे. नव्या अॅटोमॅट‌िक मीटर रीडींग (एएमआर)मध्ये थेट डिव्हाईस बसवून त्याचे पाणीवापराचे रीडिंग केले जाणार आहे. महापालिका व टीसीएस यावर एकत्र‌ित काम करित आहे. टीसीएसच्या या संशोधनाला यश आल्यास पाणीब‌िलाचे आऊटसोर्सिंगचा अडीच कोटींचे प्रस्ताव बारगळणार आहे.

महापालिकेत सध्या पाणीबीलाच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. शहरात पाणीपट्टीचे एक लाख ८५ हजार ग्राहक असून, पाणीबील दर तीन महिन्यांनी दिले जाते. परंतु पालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने ग्राहकांना पाणीपट्टीचे बीलच मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ग्राहकांना तर दोन दोन वर्ष बिल मिळत नाही. तर अनेक वेळा एकत्रीत बिल मिळाल्यास ग्राहक आणि पालिकेत संघर्ष निर्माण होतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने नुकतेच ब‌िल रीड‌िंग व त्याचे वाटप करण्यासाठी आऊटसोर्सिंगचा प्रस्ताव ठेवला होता. अडीच कोटी रुपये खर्चाचे हे काम खासगी कंपनीला देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेनेही मंजूर केला आहे. संबंधित कंपनीचे कर्मचारीच रीडिंग घेवून बिल पोहचते करणार होते. तसेच जागेवरच बिलाची वसुली होणार होती.

मात्र नाशिकचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाल्यानंतर आता पाणीपट्टीच्या बिल‌िंग पद्धतीत बदल करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा विचार आहे. त्यासाठी महापालिकेने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस सोबत करार केला असून, टीसीएसने नाशिकमध्ये इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे. त्यात महापालिकेच्या विविध विभागांसाठी संशोधन करण्यात येत आहे. त्यात अॅटोमॅट‌िक मीटर रीडिंगवरही संशोधन सुरू आहे. त्यानुसार पाणीमीटरमध्ये थेट डिव्हाईस बसवून बिलिंग ऑनलाइन करण्यावर काम सुरू आहे. या अॅटोमॅट‌िक रीडिंग मीटरचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले आहे. या रिंडीगबाबत आयुक्तही सकारात्मक आहेत. त्यामुळे सध्या बीलांचे आऊटसोर्सिग संदर्भातील पालिकेचा अडीच कोटी प्रस्ताव तुर्तास थांबवला आहे.

खरेदी कोण करणार

टीसीएसचा हे संशोधन यशस्वी झाल्यास महापालिकेवरील ताण कमी होणार असला तरी, या हे अॅटोमॅट‌िक मीटर रीडिंग कोण खरेदी करणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या मीटरची किंमत साधारण दहा हजाराच्या वर राहणार आहे. त्यामुळे ही खरेदी कोट्यवधीत राहणार असून, त्याचा भार नागरिकांवर टाकायचा की, महापालिकेने सोसायचा यावर विचार मंथन सुरू आहे. नागरिकांवर भार टाकल्यास त्याला विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे महापालिकाच ते खरेदी करतील अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी महिलांचा घेराव

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत समाविष्ट असलेल्या पिंपळगाव बहुला गावठाण भागाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. मागील अनेक महिन्यांपासून गावात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिलांच्या संयमाचा बांध गुरुवारी फुटला. महिलांनी रौद्रावतार धारण करीत स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच महापालिकेच्या अधिकायाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. आठवड्याभरात पाणीप्रश्न सुटला नाही, तर पुढील गुरुवारी महापालिकेच्या सातपूर कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याबरोबरच अधिकाऱ्यांना बांगड्यांचा अहेर दिला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

गावठाण क्षेत्रात मागील अनेक महिन्यांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा महापालिकेकडून केला जात आहे. खासकरून उंचावरील भाग असलेली धात्रक आळी, भावले गल्ली, थेटे गल्ली, नागरे गल्ली, कोळीवाड्याचा संपूर्ण परिसर, तसेच नव्याने निर्माण झालेल्या वसाहतीला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाण्याच्या पाइपलाइनपेक्षा खालच्या पातळीवर खड्डे करूनही पाणी येत नाही. त्यामुळे गुरुवारी संतापलेल्या महिलांनी अखेर स्थानिक नगरसेविका सुरेखा नागरे यांचे पती गोकुळ नागरे यांना बोलावून घेत, त्यांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारला. नागरे यांनी महिलांची समजूत काढत, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गावातीलच रहिवासी प्रकाश नागरे यांनाही घेराव घालून त्यांनाही जाब विचारण्यात आला. प्रकाश नागरे यांनीच नवी पाइपलाइन अडवून ठेवल्याचा आरोप करण्यात आला. पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनला कुणी अडथळा करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही महिलांनी केली. सातपूरच्या वाढत्या लोकवस्तीत पिंपळगाव बहुला शिवारात लोकवस्ती वाढली आहे. परंतु, ज्या गावाच्या उशाशी गंगापूर धरण आहे, तसेच ज्यांच्या शेतजमिनींवर लोकवस्ती वाढली त्याच गावाकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही महिला, तसेच ग्रामस्थांनी केला.

...तर थेट कारवाई

पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ए. व्ही. जाधव तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महिलांची पाण्याची मागणी रास्त असून, गावात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची कबुली उपअभियंता ए. व्ही. जाधव यांनी दिली. पाइपलाइनच्या कामात अडथळा न आणण्याचे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले आहे. तर, महापालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी असलेल्या पाइपलाइनच्या कामात कुणी अडथळा आणत असेल तर त्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल केले जातील, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


‘त्या’ आंदोलनाची पुनरावृत्ती?

पंधरा वर्षांपूर्वीही पिंपळगाव बहुल्यात पाणीप्रश्नी महिलांनी महापालिकेच्या सातपूर कार्यालयावर धडक दिली होती. तेव्हा हंडा मोर्चा काढतानाच महापालिका अधिकाऱ्यांना बांगड्यांचा अहेर देण्यात आला होता. महिलांचा रौद्रावतार पाहून महापालिका अधिकाऱ्यांना पळताभुई थोडी झाली होती. हे आंदोलन संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरले होते. आता त्याच आंदोलनाची पुनरावृत्ती करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

---

मटा भूमिका
यंदा पावसाने कृपा केल्याबद्दल आपण आपलीच पाठ थोपटून घेत असलो तरी महापालिकेच्या हद्दीतील गावठाण भागात भर हिवाळ्यात सुरू झालेल्या पाणीबाणीमुळे अनवस्था प्रसंग तर उभा ठाकला आहे. मनपा प्रशासन पाणी पुरवठ्यात अपयशी ठरत असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले आहे. पालिकेची स्थापना होऊन तब्बल ३४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. पाण्यासाठी विविध भागात झालेल्या महिलांच्या उद्रेकाने, तेव्हा पालिकेत समाविष्ठ झालेल्या २३ खेड्यांच्या समस्या मात्र आजही जैसे थे असल्याचेच अधोरेखित झाले आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, अजिबातच न होणे यासारख्या अडचणी तर नित्याच्याच आहेत. अनेक भागात आजही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. इतर समस्यांची स्थितीही अशीच या भागाला सापत्नभावाची वागणूक देणारी आहे. स्मार्ट सिटीकडे झेपावतांना हा मुद्दा गांभार्याने पहावयास हवा, अन्यथा पालिकेतून बाहेर पडण्याची मागणी जोर धरू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांच्या साफसफाईला अखेर लागला मुहूर्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या २८२ उद्यानांची साडेसाती अखेर संपली आहे. खासगी ठेकेदारांनी या उद्यानांची देखभाल व दुरुस्तीच्या कामाला गुरुवारपासून सुरुवात केली आहे. त्यामुळे ही उद्याने पुन्हा एकदा फुलणार, येथे येणाऱ्या ज्येेष्ठांसह बालगोपालांचा विरंगुळा होणार आहे.

महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीचा प्रस्ताव दोन वर्षांपासून रखडलेला होता. त्यामुळे शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली होती. या उद्यानांची देखभाल ठेकेदाराला द्यायची की बचत गट या वादातच एक वर्ष निघून गेले. अखेर खासगी ठेकेदाराला काम देण्यात येवून ६० टक्के काम बचत गटांना देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर ठेकेदाराला ऑर्डर देण्यात आली असून, ठेकेदाराने कामाला सुरूवात केली आहे. गुरुवारी पंचवटी, नाशिकरोड, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, सिडको व सातपूरमधील उद्यानांच्या दुरुस्तला सुरुवात करण्यात आली आहे.

येथे कामांना सुरुवात

पूर्व विभागातील सिटी गार्डन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, नाशिक पश्चिम विभागातील तेजोप्रभा सोसायटी उदयान, राजीव गांधी भवन उद्यान, उत्कर्ष कॉलनी उद्यान, पंचवटी विभागात प्रमोद महाजन उद्यान, सरस्वती नगर, हनुमान नगर उद्यान, केवडीवन उद्यान येथे कामास सुरवात करण्यात आली. पंचवटी विभागात उद्यान देखभालीचे कामात आज प्रभाग क्र. ११ मधील संत जनार्दन स्वामी उद्यान, प्रभाग ७ मधील बक्षी पार्क उद्यान, ५ मधील प्रभात नगर उद्यानात साफसफाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुतूहल असेपर्यंतच माणसाचे अस्तित्व’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘कुतूहल ही माणसाला निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. सर्वच सजीव या देणगीचे धनी नाहीत. जोपर्यंत कुतूहल जागृत असते तोपर्यंतच माणसाचे खरे अस्तित्व असते. माणूसपण टिकविण्यासाठी तुमच्याजवळचे निसर्गदत्त कुतूहल कायम जागृत ठेवा. ज्ञान संपादन करा आणि मानव जातीला अधिकाधिक समृध्द बनवत चला’ , असे प्रतिपादन ज्येष्ठ विज्ञान लेखक व संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी केले.
विश्वास बँकेच्या वतीने शंकराचार्य न्यास येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. गोडबोले म्हणाले, ‘माणसाने कायम विद्यार्थी म्हणून जगायला हवे. तुम्ही विद्यार्थी म्हणून जगतात त्यावेळी तुमच्या मनाची कवाडे उघडी असतात. अन् ज्याच्या मनाची कवाडे असतात तोच मनुष्य ज्ञानसंपन्न बनू शकतो. घरातल्या कलासक्त वातावरणाने मला संपन्न विचारांचा वारसा दिला. साहित्यातील दिग्गज माणसांची सावली घरातील वातावरणामुळे लहानपणीच माझ्यावर पडली. आमच्या घरातील संस्कारांनी आम्हाला कधीही भेदाभेदाची दृष्टी दिली नाही, त्यामुळे मी बिनदिक्कत विश्वामध्ये संचार करू शकलो.’
लेखनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, ‘सर्वंकष लेखनावर माझा भर आहे. कधीही व्यावहारिक दृष्टीकोन ठेवून मी लिखाण केलेले नाही, ते माझे उद्दीष्टही नाहीच. केवळ विविध विषयांबाबत माणसांना आवड निर्माण व्हावी, या भावनेपोटी सोप्या अन् सरळ भाषेत लिहीण्यावर माझा भर राह‌िला. विशेषत: माझ्या लेखनावर अमेरिकन लेखकांचा पगडा राह‌िला, त्यातही बिल ब्रायसन, कार्ल सगान, स्टिफन हॉकिंग अशा अमेरिकन अन् आणि ब्रिटिश लेखकांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images