Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘दिवाणी’च्या आदेशालाच पालिकेचे आव्हान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभागरचनेला नाशिकच्या दिवाणी न्यायालयात आव्हान दिले असले तरी, दिवाणी न्यायालयाला यावर सुनावणी घेण्याचा अधिकारच नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे पुढील ९ डिसेंबरच्या सुनावणीत पालिका दिवाणी न्यायालयाच्या कार्यक्षेत्रालाच आव्हान देणार आहे. प्रभागरचना ही राज्य निवडणूक आयोगाच्या गाइडलाइन प्रमाणेच तयार करण्यात आल्याचा दावाही पालिकेने केला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेसंदर्भातील अर्ज निकाली काढला जाण्याचीच शक्यता अधिक आहे. दरम्यान दिवाणी न्यायालयाचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे.

महापालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात हर्षल जाधव यांनी नाशिकच्या दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, दिवाणी न्यायाधिशांनी यांसदर्भात महापालिका, जिल्हाधिकारी व राज्य निवडणूक आयोगाला विचारणा केली आहे. तसेच येत्या ९ डिसेंबरला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे प्रभाग रचनेसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. परंतु या अर्जावर पालिकेने खुलासा केला असून, प्रभागरचना ही राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या दिशानिर्देशानुसारच तयार केली आहे. गुगल मॅपच्या आधारे प्रगणक गट तयार केले असून, त्याची माहिती सार्वजनिक करण्याची गरजच नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे या अर्जाला अर्थच नाही असा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. तसेच येत्या ९ डिसेंबरला दिवाणी न्यायालयाच्या आदेशालाच आव्हान दिले जाणार आहे. संबंधित विषय हा दिवाणी न्यायालयाच्या न्यायकक्षेत येत नाही, तरीही न्यायालयाने आदेश दिला असल्याने प्रथम या आदेशालाच महापालिका आव्हान देणार आहे. त्यामुळे हा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता आहे. संबधित प्रभाग रचनेला हायकोर्टात आव्हान देण्याऐवजी दिवाणीत आव्हान देण्यात आल्याबद्दल प्रशासनानेही आश्चर्य व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अर्जुन पगारे अखेर गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
तळेगाव दंगल प्रकरणात फरार असलेला रिपाइंचा शहराध्यक्ष अर्जुन पगारे यास नाशिक ग्रामीण पोल‌िसांनी मंगळवारी चाळीसगाव येथून ताब्यात घेतले. पगारेला आज (दि.७) कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. पगारेविरोधात दंगलीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, मागील महिन्यापासून तो फरार होता.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी (तळेगाव) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांत दंगल उसळली होती. पोलिसांनी दंगल परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यानंतर दसऱ्याच्या दिवशी धार्मिक कार्यक्रमानंतर अर्जुन पगारेसह इतर समाजकंटकांनी पुन्हा दगडफेक, गाड्यांची तोडफोड व गावा-गावांमध्ये जाऊन शिवीगाळ केली. यामुळे पुन्हा दोन समाजांत वाद निर्माण होऊन दंगल भडकली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी पगारेसह शेकडो जणांवर दंगल, शासकीय कामात अडथळा आणणे, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. पगारेने कोर्टात अटकपूर्व जामीन सादर केला. मात्र, कोर्टाने पगारेचा अर्ज फेटाळून लावला. पोलिस अटक करतील या भीतीने पगारेने शहरातून पलायन केले. नाशिक ग्रामीण पोलिसांचा शोध सुरू होता. मात्र, त्याचा ठावठिकाणा मिळत नव्हता. दरम्यान, २८ नोव्हेंबरला चाळीसगाव पोलिसांनी शिताफीने पगारेच्या मुसक्या आवळल्या. चाळीसगाव शहरातील ब्रिज कॉर्नर हॉटेलमधे छापा टाकून चाळीसगाव पोलिसांनी अर्जुन पगारेसह इतर सहा संशयितांना अटक केली आहे. दरोड्याच्या प्रयत्नात काही जण असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव पोलिसांनी हा छापा मारला होता. पोलिसांनी संशयितांकडून गावठी कट्टा, पाच काडतुसे, धारदार शस्त्रे, दोर, मिरचीची पूड, लोखंडी रॉड, एमएच १५ डीसी २०५९ क्रमांकाची स्कॉर्पिओ कार असा ४ लाख १२ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला होता. त्यांच्याविरोधात दरोडापूर्व तयारी, शासकीय कामात अडथळा आणणे आणि मुंबई पोल‌िस आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाळीसगाव कोर्टाने अर्जुन पगारेसह त्याच्या इतर साथीदारांना पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने चाळीसगाव गाठून संशयितांचा ताबा घेतला. संशयितांना बुधवारी कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांबाबत १३ला सुनावणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यांसदर्भात महापालिकेने सुरू केलेल्या कारवाई विरोधात शिवसेनेच्यावतीने दिलीप दातीर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्या. नरेश पाटील यांच्या पीठासमोर सुनावणी झाली असून, कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ डिसेंबरला ठेवली आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने पहिल्या टप्प्यात शहरातील ८४ अनधिकृत धार्मिक स्थळे जमीनदोस्त केली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यांतील १३३ स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. परंतु या कारवाईला शिवसेनेसह भाजपनेही विरोध केला आहे. शिवसेनेने तर या आदेशालाच आव्हान देत, हायकोर्टात जनहीत याचिका दाखल केली आहे. शिवसेनेने माजी सभागृहनेते दिलीप दातीर यांनी याचिका दाखल केली असून, यावर मंगळवारी न्या. पाटील व एम. एस. कर्णिक यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. न्यायाधिशांना दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पुढील सुनावणी आता १३ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. या दिवशी या कारवाइला स्थगिती मिळेल, असा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने केला जात आहे.

आज महासभेत लक्षवेधी

शिवेसनेने हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर बुधवारच्या महासभेत लक्षवेधी मांडली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईला शिवसेनेने विरोध केला असून, पालिकेलाही आव्हान दिले आहे. त्यामुळे बुधवारच्या महासभेत या कारवाईवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका दिवसात तीन विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सोमवारी दिवसभरात विनयभंगप्रकरणी तीन वेगवेगळ्या घटनांची नोंद संबंध‌ित पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
विनयभंगाची एक तक्रार भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहे. तक्रारीनुसार उपनगर येथे राहणारी पीड‌ित मुलगी शालेय विद्या‌र्थिनी असून, सोमवारी सायंकाळी ती मित्र-मैत्र‌िणींसमवेत नेहरू गार्डन येथे चायनीज गाड्यांवर गेली असता अन्नपदार्थ अंगावर पडल्याने ती बाजूला गेली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या आकाश अशोक बनसोडे (रा. आम्रपाली झोपडपट्टी) व त्याच्या तीन साथीदारांनी युवतीची छेड काढली. यावेळी दुसरी मैत्र‌िण पीड‌ित मुलीच्या मदतीला धावून गेली. मात्र, संशय‌ितांनी दोघींना पकडून ठेवले. ही घटना दोन्ही मुलींच्या शालेय मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी वाद मिटविण्यासाठी धाव घेतली. यावेळी संशय‌ितांपैकी एकाने युवतीस दोन किलो वजनाच्या लोखंडी मापाने तर तिच्या मदतीला धावून आलेल्या मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत युवतींचा विनयभंग केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक लोखंडे करीत आहेत.
दरम्यान, अल्पेश लुंकड व त्याच्या एका साथीदाराने आनंदवली परिसरातील काळेनगर भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संशयित आरोपी पीड‌ित महिलेच्या घरात घुसले. राजेंद्र कानतोडे याच्यावर दाखल केलेली पोलिस तक्रार मागे घे, नाहीतर तुम्हाला बरबाद करून टाकेल असा दम देत संशयितांनी महिलेचा विनयभंग केला. पीड‌ित महिलेच्या तक्रारीनुसार गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.
विनयभंग प्रकरणी पंचवटी पोलिसांनी सुध्दा गुन्ह्याची नोंद केली आहे. पेठरोड भागातील १६ वर्षीय युवतीसोबत सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मनपाच्या पंचवटी विभागीय इमारतीसमोर हा प्रकार घडला. पीड‌ित मुलगी आपल्या मैत्र‌िणीसमवेत पायी जात असताना संशयित आरोपी सोनू विठ्ठल चौघुले (२५ रा. शनिमंदिरामागे, नवनाथनगर) याने आपल्या ताब्यातील रिक्षा त्यांना आडवी लावली. यावेळी चौघुलेने मुलीच्या हातात चिठ्ठी देत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी विनयभंग आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयात बसवले स्वाइप मशिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सरकारी कर्मचाऱ्यांना बँक खात्यातून पैसै काढण्यासाठी रांगेत ऊभे राहावे लागू नये यासाठी स्टेट बँकेने पुढाकार घेतला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये स्वाईप मशिनद्वारे दोन हजार रुपये मिळणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातही अशा प्रकारचे मशिन बसविण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात कर्मचाऱ्यांना सुमारे दोन लाखांचे चलन वाटप करण्यात आले.
चलन तुटवड्याचा परिणाम सरकारी कार्यालयांमधील दैनंदिन कामकाजावर होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँकेने सरकारी कार्यालयांमध्ये स्वाइपद्वारे दोन हजार रुपये उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश स्टेट बँकेला दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी २२१ कर्मचाऱ्यांनी २ लाख १३ हजारांचे चलन वाटप केले. जिल्ह्यातील महत्वाच्या सरकारी कार्यालयांमध्ये स्वाइप मशिन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खो-खोत जय हिंद, शिवभक्त जेते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा खो-खो संघटना व समर्पण नाशिकतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू असलेल्या अखिल भारतीय आमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये इचलकरंजीचा जय हिंद, तर महिलांमध्ये बदलापूरचा शिवभक्त संघाने विजेतेपद मिळविले. येथील शिवछत्रपती शिवाजी स्टेडियमवर ही स्पर्धा झाली. प्रियंका भोपी, विजय हजारे या खेळाडूंना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा बहुमान मिळाला.

अखेरच्या सेकंदांत हुकला मुंबईचा विजय

पुरुषांच्या सुपरलीग गटातील पुण्याचा नवमहाराष्ट्र संघ विरुद्ध मुंबईचा महात्मा गांधी संघ यांच्यातील लढत उत्कंठावर्धक झाली. महात्मा गांधी संघाने पहिल्या सत्रात आक्रमणात नऊ गडी टिपले, तर पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने ८ गडी टिपले. मुंबईकडे अवघ्या एका गुणाचे अधिक्य होते. दुसऱ्या सत्रात सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली. मुंबईने ७ गडी बाद केल्यानंतर पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाला जिंकण्यासाठी मुंबईचे नऊ गडी बाद करावे लागणार होते. मात्र, सात गडी बाद केल्यानंतर पुण्याकडे अखेरचे ४० सेकंद शिल्लक होते, तर मुंबईकडे जिंकण्यासाठी फक्त ४० सेकंद हुलकावणी देणे एवढेच हातात होते. मात्र, पुण्याने अखेरची काही सेकंद शिल्लक असताना एक गडी बाद केला आणि सामना १६-१६ असा बरोबरीत सुटला. ठाण्याचा विहंग मंडळ व इचलकरंजीचा जय हिंद क्रीडा मंडळ यांच्यातील सामनाही १५-१५ असा बरोबरीत सुटला.

प्रियंकाची सात मिनिटांची विक्रमी ‘बॅटिंग’

महिला गटातील सुपरलीगमध्ये बदलापूरच्या शिवभक्त मंडळाच्या प्रियंका भोपीने स्पर्धेतील सर्वोच्च ७ मिनिटांची पळतीची नोंद करीत स्पर्धाविक्रम केला. इचलकरंजीच्या जय हिंद संघाविरुद्ध तिने ही कामगिरी केली. विशेष म्हणजे दुसऱ्या सत्रातही तिने ४.१० मिनिटांची नोंद करीत ‘जय हिंद’च्या आक्रमणाची हवाच काढून घेतली. पहिल्या सत्रात ‘जय हिंद’ने पाच गडी गमावल्यानंतर बदलापूरविरुद्ध आक्रमण रचले. बदलापूरच्या प्रियंका भोपीसह तीन खेळाडूंची पहिली बॅच मैदानात उतरली. ‘जय हिंद’ने सुरुवातीलाच प्रियंकावर आक्रमण रचले. मात्र, त्यांची ही सर्वांत मोठी चूक ठरली. प्रियंकाने ‘जय हिंद’च्या खेळाडूंना तब्बल सात मिनिटे झुंजवले. अखेर प्रचंड थकवा आल्याने प्रियंका बाद झाली. उर्वरित दोन मिनिटे अन्य खेळाडूंनी आरामात खेळून काढले. प्रियंकाच्या सर्वांगसुंदर खेळाच्या जोरावर बदलापूरच्या शि‍वभक्तने जय हिंदवर दणदणीत विजयाची नोंद केली.

स्पर्धेचा निकाल

पुरुष गट ः प्रथम- जय हिंद क्रीडा मंडळ, इचलकरंजी, द्वितीय (विभागून)- नवमहाराष्ट्र संघ (पुणे) व महात्मा गांधी क्रीडा मंडळ (मुंबई), चतुर्थ- विहंग क्रीडा मंडळ (ठाणे) (द्वितीय क्रमांक विभागून दिल्याने तृतीय क्रमांक जाहीर केला नाही)

महिला गट ः प्रथम- शिवभक्त, बदलापूर, द्वितीय- आर. एफ. नाईक, ठाणे, तृतीय- आर्यन क्रीडा मंडळ, रत्नागिरी, चतुर्थ- जय हिंद क्रीडा मंडळ, इचलकरंजी.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट

संरक्षक ः प्रांजल मगर, हर्षद हटनकर.
आक्रमक ः ऐश्वर्या सावंत, सुयश गरगटे.
अष्टपैलू ः प्रियंका भोपी, विजय हजारे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगेतील आणखी एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीमुळे देशभरात रांगांचे सत्र सुरू असतानाच नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनात दोन जणांचा बळी गेला आहे. नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील निवृत्त कृषी अधिकारी केशवराव देवरे आणि जव्हार येथील दिनेश जाधव (४०) यांचा त्यात समावेश आहे.

निवृत्त कृषी अधिकारी केशवराव देवरे (६८) यांना बँक अधिकाऱ्यांनी कर्जावरील फॉर्मवर सही करण्यासाठी बँकेत बोलावले होते. त्यानुसार देवरे हे नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील बँकेच्या शाखेत गेले. बँकेत मोठी गर्दी असल्याने त्यांना बँकेतच अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी त्यांना चक्कर आली. ते बँकेच्या आवारातच कोसळल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोल‌िस ठाण्यात या घटनेबाबत बाबत सोमवारी रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.
दिनेश जाधव (४०) हे जव्हार येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढण्यासाठी असलेल्या रांगेत ते उभे राहिले. मात्र, याचवेळी ते अचानक बेशुद्ध पडले. त्यांना जव्हारच्या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने नाशिकच्या सिव्हिलमध्ये आणण्यात आले. मात्र, मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी नोंद केली आहे. नोटाबंदीच्या या घडामोडीत नाशिकमध्ये दोन दिवसात दोन जणांचा बळी गेल्याने चिंतेचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदी : चलनबदलानंतर शिक्षणसम्राटांची कोंडी

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : @jitendratarteMT

शिक्षणाच्या नावाखाली नफेखोर शिक्षणसम्राटांना चलनबदलाच्या निर्णयाने चांगलाच दणका दिला. या निर्णयाच्या पंधरवड्यानंतर आता ज्ञानमंदिरात लपलेल्या काळ्या मायेचे किस्से हळूहळू बाहेर येत आहेत. आजवरच्या ‘अर्थ’ व्यवस्थापनाची घडी पुढे उसवेल काय, या चिंतेने या क्षेत्रातील काही बड्या मोहऱ्यांचीही झोप उडाली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया नुकतीच पार पडली असतानाच पाचशे अन् हजाराच्या नोटा रद्द झाल्याचा दणका केंद्राने दिला. यामुळे अल्पावधीत काळ्याचे पांढरे करण्यासाठी काही बड्या शिक्षण संस्थांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चलनाचा खुबीने वापर केला गेला आहे.

शिक्षक नव्हे; प्यादी!

जिल्ह्यात हजारो शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फौजफाटा काही बड्या शिक्षण संस्थांमध्ये नोकरीस आहे. बहुतांश संस्थांनी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि विद्यापीठांचे कर्मचारी नियुक्तीचे नियम धाब्यावर बसवून हुकमाची ताबेदारी करणाऱ्या अन् व्यवस्थापनाच्या हातचे बाहुले बनू शकणाऱ्या मोहऱ्यांनाच महत्त्वाची पदे बहाल करण्यात धन्यता मानली आहे. या निवडीची तपासणी करणाऱ्या यंत्रणाही या सम्राटांच्या दबावतंत्रापुढे गुढघे टेकतात. एरव्ही निवडणुकांच्या प्रचारासाठी शाळा सोडून झेंडे खांद्यावर घेणारे हे कर्मचारी उन्हातान्हात संस्थाचालकांच्या नोटा घेऊन बँकांच्या रांगेतही उभे राहिले. यामुळे त्यांना बुद्धिबळाच्या पटावरील प्याद्यांची उपमाही शिक्षण संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

एकाच संस्थेतील अनेक कर्मचारी सारख्या रकमा घेऊन बँकांच्या रांगेत उभे राहिल्यानंतर या प्रकरणाची चर्चाही दबक्या आवाजात रंगली. काहींनी कर्मचाऱ्यांना रात्रीतून ऋणमुक्त करण्याचाही फंडा अवलंबला.

गुंतवणूकही कॅशलेस

शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी कायदेशीर तरतुदींचा शंभर टक्के लाभ उचलत काही संस्थांनी नाममात्र मोबदल्यावर बड्या जमिनीही संपादित केल्या आहेत. अवैध शिक्षण संस्थांचा इमारत निधी, व्यवस्थापन खर्च, परीक्षा फी, पुस्तक खर्च अन् देणग्यांची हरप्रकारे घडवून आणली जाणारी बरसात अशा वेगवेगळ्या शीर्षकाखाली लाटलेल्या ‘कॅपिटेशन फी’च्या गोंडस नावाने बहुतांश संस्था कधीच गब्बर बनल्या आहेत. काळ्या मायेतून काही शिक्षणसंस्थांनी जमिनी, इमारती, वाहने आदी प्रकारातून इन्फ्रा स्ट्रक्चरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे केंद्राच्या या निर्णयाने १०० पैकी ३ ते ५ टक्के काळ्या पैशाला चाप बसणार असल्याचा अंदाज या विषयातील अभ्यासकांनी ‘मटा’शी बोलताना मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मका उत्पादकांवर आली संक्रांत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील नामपूर येथील नामपूर सोसायटी व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र आठ दिवसांत उलटूनही केवळ २८ क्विटंल मका खरेदी करण्यात आला झाला आहे. मका ओला असल्याची कारणे देवून व्यापारी शेतकऱ्यांच्या ‌मालाला नाकारत असल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

राज्य व केंद्र सरकार दर वर्षी शेतमालाची आधारभूत किंमत ठरवत असते. शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळावा हा यामागचा हेतू असतो. यावर्षी शासनाने मक्यास एक हजार ३६५ रुपये प्रति क्विंटल ही आधारभूत किंमत ठरवली आहे. चालू वर्षी मकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आवक वाढली असून, व्यापारी कमी दरात मका खरेदी करीत आहेत.

नामपूर सोसायटीचे संचालक बाजीराव सांवत यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून नामपूरला मका खरेदी केंद्र सुरू केले. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनमार्फत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आठ दिवस उलटून अवघा २८ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. मका खरेदी केंद्रातील कर्मचारी व स्थानिक बाजार समितीतील व्यापारी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक सांवत, भाजप गटप्रमुख किरण सावंत, सोमनाथ सोनवणे, दिनेश सावळा यांनी केला आहे.

कितीही सुका, कोरडा, वाळलेला मका विक्रीससाठी आणला तरी तो ओला असल्याचा बनाव अधिकारी करतात. या ठिकाणी अजून मक्यातील पाण्याचे प्रमाण तपासणारे मशिन उपलब्ध नाही. पैसेही रोख मिळत नाहीत. या सर्व समस्यांना कंटाळून शेतकरी खासगी व्यापाऱ्याला मका विक्री करीत आहेत. व्यापारी कमी भावात माल खरेदी करून मका उत्पादकाची लूट करीत असल्यामुळे शेतकरी अक्षरशः भरडले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ठरतोय शोपीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गोदावरी नदी प्रदूषणाकडे त्र्यंबक पालिकेचे दुर्लक्ष झाले असून, नदीकाठाला असलेल्या कचरा डेपो आणि नदीपात्रात सोडलेले सांडपाणी यामुळे नदी प्रदूष‌णात वाढ होत आहे. एकिकडे नदीचे प्रदूषण वाढत असताना दुसरीकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केवळ नावालाच उरला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पावर पालिका दर महिन्याला किमान ८० ते ९० हजार रुपये खर्च करीत आहे.

त्र्यंब‌क शहराला गौतमी बेझे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराची लोकसंख्या १२ ते १३ हजारांपर्यंत पोहचली आहे. दररोजच्या पाण्याचा वापर वाढलेला असतांना बारा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला हा एकमेव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प येथे नावाला अस्त‌ित्त्वात आहे. सन २००३ च्या सिंहस्थ नियोजनात गोदावरी कृती आराखड्यातून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाची क्षमता एक एमएलडी इतकी आहे. अर्थात शहरास अंबोली, अहिल्या आणि गौतमी अशा तीन धरणांमधून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात होतो. मुळातच सांडपाणी प्रकल्पाची कार्यक्षमता यापूर्वीही निर्दशनास आली आहे. पालिका प्रशासनासह आणि लोक्रपतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. ठेके पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या या प्रकल्पावर अवघे दोन कर्मचारी आहेत. तर यामधील केवळ एक वॉटर पंप सुरू आहे. नादुरूस्त वॉटरपंप दुरुस्त करण्यास पालीकेचे पाणीपुरवठा विभागाचे ठेकेदार तयार नाहीत. एकूणच या प्रकल्पाला पूर्ण क्षमतेने चालव‌िणे गरजेचे आहे. मात्र प्रकल्पाकडे सातत्याने झालेल्या दुर्लक्षामुळे नदीपात्र दूष‌ित होत आहे. शहराची लोकसंख्या वाढली आहे. मंदिराच्या पूर्व बाजूस असलेला हा सांडपाणी प्रकिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला तरी देखील शहराची अर्धी वस्ती या प्रकल्पाच्या पुढील बाजूस आहे. त्यामुळे तेथील प्रदूषण कायम राहणार आहे. नवीन बस स्थानकाच्या बाजूने शहराच्या उत्तर भागातील ड्रेनेज लाइन थेट नदीपात्रात सोडली आहे.

सिंहस्थातही नाराजी
सिंहस्थ कालावधीसाठी घाट बांधले. मात्र सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. सिंहस्थ नियोजनात राज्याचे प्रधान सचीव येथे आले असता त्यांनी हे दृष्य पाहून ‘येथे कोण स्नान करणार?’ असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर स्थानिक यंत्रणांचा बराच मोठा खलही झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रैनाकडून नाशिककरांची निराशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सुरू असलेल्या उत्तर प्रदेश आणि बडोदा यांच्यातील रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेश संघाने ९० षटकांत सात गडी गमावून ३७० धावा केल्या. अवघ्या नाशिकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला सुरेश रैना अवघ्या सहा धावांवर तंबूत परतल्याने क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कुलदीप यादव ७७ धावांवर तर सौरभ कुमार ८५ धावांवर खेळत होते.

बडोदा संघाचा कर्णधार इरफान पठाण याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश संघाकडून शिवम चौधरी आणि अलमास शौकत या जोडीने डावाची सुरुवात केली. बडोद्याच्या सागर मंगळुरकर यांच्या गोलंदाजीवर शिवम पायचीत बाद झाला. शिवमने आपल्या ३५ मिनीटाच्या खेळीत २९ चेंडूत ३ चौकार ठोकत १६ धावा केल्या. अशीच काहीशी परिस्थिती अल्मस शौकतच्या खेळाबाबत झाली. तोही बाबा सैफी पठाणचा शिकार झाला. पठाणने टाकलेल्या चेंडून शोकतही पायचीत झाला. त्याने ५५ चेंडूत ५ चौकारांसह २८ धावा केल्या. दोन गडी बाद झाल्यानंतर आकाशदीप याने डावाला सावरत सावध खेळी केली. मात्र तो अर्धशतकापासून पाच धावा दूर असताच रिशी आरोटेने टाकलेल्या चेंडूवर तो झेलबाद झाला. आकाशदीपने ७९ चेंडूत ७ चौकार लगावत ४५ धावा केल्या. बडोदा संघाचा आदित्य वाघमोडे याने त्याचा झेट टिपला. त्यानंतर रैनाही अवघ्या सहा धावांवर बाद झाला.

रिंकू सिंगकडून फटकेबाजी
रैनानंतर रिंकू सिंग हा बाबा सैफी पठाणने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्याने ५८ चेंडूत ५ चौकार लगावत ४० धावा केल्या. त्यानंतर उपेंद्र यादव हा मैदानात उतरला. रिशी आरोटेने टाकलेल्या बॉलवर तोही झेल देवून तंबूत परतला. दिपक हुड्डाने त्याचा झेट टिपला. त्याने २३ धावा केल्या. उत्तर प्रदेश संघाचा उपकर्णधार कुलदीप यादव हा पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा १३६ बॉलध्ये ७ चौकारांसह ७७ धावांवर नाबाद होता. त्याच्या जोडीला असलेला प्रवीण कुमार मात्र सागर मंगळुरकर याने टाकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. प्रवीणने ३३ चेंडूत ३ चौकार आणि एक षटकार लगावत २३ धावा केल्या. पहिल्या दिवशी षटकार मारणारा तो एकमेव खेळाडू ठरला. सौरभ कुमार १३२ म‌नि‌टिाच्या खेळात १२ चौकार मारत ८५ धावा करून नाबाद आहे. बडोदा संघाने १७ अतिरिक्त धावा दिल्या. पहिल्या दिवशी कुलदीप व सौरभने १६२ धावांची भागीदारी केली.


रैना आला अन् गेला...
आकाशदीप बाद झाल्यानंतर मैदानवर टाळ्यांचा कडकडाट होण्यास सुरुवात झाली. संपूर्ण नाशिककर ज्याच्या खेळाची वाट पहात होते तो सुरेश रैना मैदानात प्रवेश करत असतांना प्रेक्षकांनी अक्षरशः रैना रैना..असे म्हणत जल्लोष केला. परंतु मैदानावर आलेला रैना बाबा सैफी पठाणने टाकलेल्या चेंडूचा शिकार झाला आणि मैदानावर सकाळपासून जमलेले त्याचे फॅन स्तब्ध झाले. रैना झेलबाद झाला. पिनल शहाने त्याचा झेट टिपला. रैनाने ९ चेंडूत अवघा एक चौकार लगावत सहा धावा केल्या.


दोघेही शतकाच्या उंबरठ्यावर
उत्तर प्रदेश संघाने ९० षटकांत सात गडी गमावून ३७० धावा केल्या असल्या तरी त्यांचे दोनही खेळाडू शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. कुलदीप ७७ धावांवर तर सौरभ ८५ धावांवर खेळत आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळच्या सत्रात हे दोघूही खेळाडू शतक ठोकण्याच्या इराद्याने उतरतील. नाशिकच्या क्रिकेट रसिकांना उद्या दोन गोल्फ मैदानावर दोन शतक साजरे होतांना पाहण्याची संधी मिळू शकते. अर्थात बडोद्या संघांने भेदक गोलंदाजी करत उत्तर प्रदेश संघाच्या रैनासह सात गडी तंबूत पाठविल्याने सौरभ आणि कुलदीप कसे करतात हे उद्याचा खेळच ठरविणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदिशा महोत्सव उद्यापासून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरिअर डिझायनर्स (ट्रीपल आयडी) या संस्थेच्या नाशिक शाखेला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेने शहरात ‘विदिशा’ या नाविन्यपूर्ण महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवार ते रविवार (९ ते ११ डिसेंबर) असे तीन दिवस हा महोत्सव होणार असून, यात देशभरातील नामांकीत आर्किटेक्ट सहभागी होणार आहेत.

ट्रीपल आयडी ही राष्ट्रीय पातळवर काम करणारी आर्किटेक्टसची नामांकीत संस्था आहे. या संस्थेच्या नाशिक शाखेची स्थापना १९९१मध्ये करण्यात आली. त्यामुळे यंदा संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने संस्थेने विदिशा या वैशिष्ट्यपूर्ण महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष हेमंत दुगड यांनी दिली. यानिमित्ताने नाशिककरांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डिझानर्ससोबत संवाद साधण्याची संधीही मिळणार असल्याचे सचिव तरन्नुम काद्री यांनी सांगितले. विदिशा उत्सवात डिझाइन्सच्या विविध पैलूंची माहिती देतानाच त्यावर चर्चा होणार आहे. तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात असणारे डिझाइनचे महत्त्व विषद करण्यासाठी कथा, संवाद, सचिंतन, अनुनाद, रौप्य परिक्रमा, प्रभातफेरी अशा वैविध्यपूर्ण संकल्पनांचा वापर केला जाणार असल्याचे माजी अध्यक्षा राखी टकले यांनी सांगितले. प्रख्यात आर्किटेक्ट पलिंगा कंनांग्रा (श्रीलंका), रफिक आझम (बांगलादेश), ट्रीपल आयडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप जाधव, राष्ट्रीय सचिव जबीन झकारीस हे उत्सवात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार असल्याचे सुप्रिया नाथे म्हणाल्या. या उत्सवाची संकल्पना आर्किटेक्ट रितू शर्मा यांची असून, इनटॅक्टचे सहकार्य त्यास लाभत असल्याचे समीर बटाविया यांनी सांगितले आहे.

असा असेल महोत्सव

प्रदर्शन, मार्गदर्शन ः रौप्य महोत्सवी विदिशा उत्सवाला शुक्रवारी (९ डिसेंबर) सायंकाळी ५.३० वाजता प्रारंभ होणार आहे. ‘कथा’ या नाशिक शहराच्या इतिहास सांस्कृतिक परंपरा दर्शविणाऱ्या प्रदर्शनाचे उदघाटन गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे होईल. हे प्रदर्शन तीन दिवस सुरू राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हॉटेल एमराल्ड पार्क येथे शाश्वत वास्तुकला या विषयावर प्रख्यात आर्किटेक्ट पलिंगा कंनांग्रा, रफिक आझम हे संवाद साधणार आहेत.

मिरवणूक – नाशिकची सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या व नाशिकची ओळख असलेल्या नाशिक ढोल आणि बोहडा मिरवणुकीचे शनिवारी (१०डिसेंबर) सायंकाळी ४.३० वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजन करण्यात आले आहे.

प्रभातफेरी – रविवारी (११ डिसेंबर) सकाळी जुन्या नाशिकमधील फुलबाजारपासून प्रभात फेरी काढली जाणार आहे. गोदाघाट परिसरातील जुने वाडे, मंदिरे यांसारख्या पुरातन वास्तूंना भेट दिली जाणार आहे. त्यानंतर पारंपरिक मंगळागौरीच्या खेळाचाही आनंद घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेटसाठी नाशिक पोषक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील वातावरण क्रिकेटला पोषक असून, जिल्ह्याच्या ठिकाणी रणजी सामन्याचे आयोजन केल्याने क्रिकेट वाढीसाठी व नवीन खेळाडू तयार होण्यासाठी ही स्पर्धा पुरक ठरणार, असे प्रतिपादन भारतीय संघाचे पूर्व यष्टीरक्षक किरण मोरे यांनी केले.
अनंत कान्हेरे मैदानावर बुधवारपासून सुरू झालेल्या सामन्याच्यावेळी मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोरे म्हणाले की, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रणजी सामन्याचे आयोजन केल्याने नवीन खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे. नाशिकमधील वातावरण क्रिकेटला पोषक असून नाशिक डिस्ट्रक्ट क्रिकेट असोसिएशनने उत्तम व्यवस्था केली आहे. ग्राऊंडही उत्तम प्रकारे तयार केले असून, येथे सामने निश्चित रंगतील अशी आशा आहे. रणजी सामन्यांच्यावेळी फारसा प्रेक्षक वर्ग लाभत नाही, असा आमचा अनुभव आहे. परंतु नाशिककर क्रिकेटप्रेमींनी अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याने खेळाडूंनाही खेळण्यास हुरुप आला आहे. बडोदा आणि उत्तर प्रदेश हे दोन्ही संघ अत्यंत संतुलीत आहेत. रणजी सामन्याच्या वेळी दोन पिच तयार करावे व दोन बॉल्सच्या सहाय्याने मॅचेस घ्यावात, असे सचिन तेंडुलकर यांनी बीसीसीआयला सुचवले होते. त्यावर मोरे म्हणाले की, हा निर्णय ज्युनिअर क्रिकेटसाठी १६ व १९ वयोगटासाठी योग्य ठरेल. मात्र रणजीसाठी महत्त्वाचा तो तितकासा योग्य ठरणार नाही. त्यामुळे दोन पिच तयार करू नये असे मत त्यांनी मांडले. इतर खेळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी काही खेळांची प्रात्यक्षिके मध्यंतरात करावी असे देखील सुचवण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले की, हा निर्णय उत्तम आहे. यामुळे इतर खेळाडूंचा खेळ पहाण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे. क्रिकेट बरोबरच त्याही खेळांना निश्चित चांगले दिवस येतील.

भारतीय टीम सर्वोत्तम

सध्या भारताची टीम कसी आहे यावर मोरे म्हणाले, सध्याची टीम ही जगातील सर्वोच्च अशी टीम आहे. टीमच्या कामगिरासाठी जलदगती गोलंदाजांचे योगदान मोठे असते. भारतीय संघात ५ जलद गोलंदाज आहेत प्रत्येकाचा स्पीड १४५ ते १५० असा आहे. त्यामुळे आपल्या टीमच्या तोडीची टीम सध्यातरी कुठली दिसत नाही.

इरफानचे कमबॅक

नाशिकमध्ये होणारी रणजी मॅच ही इरफान पठाणच्या पुनरागमनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सध्या त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे. आणखी थोडा जोर लावल्यास त्याचे कमबॅक होऊ शकते. नुकतेच अशिष नेहरा व पार्थिव पटले यांचे पुनरागमन झाले आहे. आशिष नेहरा यांचे आठ वर्षानंतर पुनरागमन म्हणजे फार मोठी बाब आहे. आज तो पुन्हा नव्या उत्साहात खेळतांना दिसतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिमाखदार सोहळ्यात ‘रणजी’चा शुभारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीसीसीआय आणि नाशिक डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित रणजी क्रिकेट स्पर्धेला बुधवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीतसिंग बग्गा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, दोन्ही संघाचे कर्णधार इरफान पठाण व सुरेश रैना यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसीएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी दोन्ही कर्णधार आपल्या संघांसह उपस्थित होते. यानंतर सामन्याला सुरुवात झाली. सकाळचा गारवा आणि मैदानावर सुरू असलेले संगीत यामुळे वातावरण अधिकच खुलले होते. सुरेश रैना, इरफान पठाण, प्रवीण कुमार हे आघाडीचे खेळाडू या सामन्यात सहभागी झाल्याने क्रिकेट रसिकांनी गर्दी केली होती. मैदानात खेळाडूंनी प्रवेश करताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. या सामन्यासाठी शुल्क नसल्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन विनोद शहा यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइनसाठी मोबाइल असुरक्षित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

इंटरनेट युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे सायबर क्राईमदेखील वाढत आहे. त्यासाठी ऑनलाइन खरेदी आणि ऑनलाइन बँकिंग करताना स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे. ऑनलाइन बँकिंगमध्ये मोबाइल वापरण्यापेक्षा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करणे सुरक्षित आहे. कारण मोबाइलमध्ये सर्व डिटेल्स तत्काळ घेतो, त्यामुळे छोटीशी चूक त्रासदायक ठरू शकते, असे मत विकास नाईक यांनी व्यक्त केले.

रोटरी हॉल गंजमाळ येथे मंगळवारी (दि. ६) ‘ऑनलाइन बँकिंग व्यवहार’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी व्यासपीठावर सायबर तज्ज्ञ विकास नाईक, अॅड. नागनाथ गोरवाडकर, विजय दिनानी, राधेय येवले, राजेश्वरी वालजीवाले, स्मिता अपशंकर हे उपस्थित होते .

नाईक यांनी, तंत्रज्ञानात रोज नवनवीन बदल होत असल्याने आपण स्वतःचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन अॅप्लिकेशन व तंत्रज्ञानाची सखोल माहिती ठेवण्याचे सांगितले. कारण अपूर्ण माहितीमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. आता तर नोट बंदीमुळे ऑनलाइन बँकिंग व खरेदीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. सोबतच आपल्या देशाची लोकसंख्या मोठी असल्याने या ऑनलाइन शॉपिंगवर हॅकर्सची नजर असणार आहे. परिणामी, प्रत्येकाने ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगावी. अनेकदा फोन कॉल्सद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे कोणतीही गोपनीय माहिती कोणालाही सांगू नये आणि मोठी रक्कम जिंकल्याचे फेक मेसेज येतात त्यांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावितरण वसाहत धूळ खात

$
0
0

टवाळखोरांचा वावर; इमारतीला उपयोगात आणण्याचे साकडे

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या १३२ के. व्ही. विज उपकेंद्राच्या महावितरण कंपनीची वसाहत गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे. एकीकडे उद्योजकांना भुखंड उपलब्ध होत नसताना पडून असलेला भुखंड उपयोगात आणण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे.

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यावर महावितरण कंपनीलाही मोठा भुखंड मिळाला होता. यानंतर महावितरण कंपनीने याठिकाणी कारखान्यांना वीजपुरवठा करण्यासाठी १३२ के. व्ही. उपकेंद्राची उभारणी केली होती. या उपकेंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुंदर अशा इमारतीही महावितरण कंपनीने बांधल्या होत्या. तसेच उपकेंद्रावर काम करणारे कर्मचारी, अधिकारी महावितरणाने उभालेल्या वसाहतीत अनेक वर्ष वास्तव्यासदेखील होते. परंतू, महावितरणाच्या वसाहतीच्या बाजूलाच झोपडपट्टीचे मोठे अतिक्रमण झाल्याने अनेक कर्मचारी व अधिकारी यांनी वसाहतीतून काढता पाय घेतला. तर बदली होऊन गेलेल्या अनेकांची इमारतीतील घरे आता ओसाड पडली आहेत. पडून असलेल्या इमारतींचे मोठे नुकसान काही टवाळखोरांकडून झाले आहे.

अनेक वर्षांची मागणी

दरम्यान अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत उद्योगांना भुखंड मिळावा यासाठी नेहमीच उद्योजक मागणी करत असतात. परंतू महावितरणाचा मोक्याच्या जागी असलेल्या भुखंड गेल्या अनेक वर्षांपासून पडून असल्याने त्याचा योग्य उपयोग करावा अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीच्या वाटेत अडथळ्यांची शर्यत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेगाने विकसित होणाऱ्या शहरात नाशिकची गणना होत असली, तरीही अद्याप मूलभूत सुविधांमध्येच त्रुटी दिसत आहेत. केवळ प्रमुख रस्ते चकचकीत आहेत, तर अंतर्गत भागात रस्त्यांच्या खड्ड्यांची समस्या कायम आहे. याशिवाय एकवेळ पाणीपुरवठा, घंटागाडी सेवा आदी मुद्यांविषयी नाशिककरांनी सकारात्मक मत व्यक्त केल्याची बाब महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणातून अधोरेखित झाली आहे.

एचपीटी आणि आरवायके कॉलेजच्या मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम विभागातर्फे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत ही पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या या पाहणीत शहर विकासाशी संबंधित अनेक बाबी उघड झाल्या. शहरातील साडेचार हजार नागरिकांशी संपर्क साधून प्रश्नावलीद्वारे माहिती भरून घेण्यात आली. महापालिकेच्या पूर्व, पश्चिम, पंचवटी, सिडको, सातपूर आणि नाशिकरोड अशा सहा विभागांतील नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विभागप्रमुख प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे, डॉ. हेमंत राजगुरू, पत्रकार संजय पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी करण्यात आली.

शहरात निर्माण झालेली पाण्याची समस्या, पाणीकपात, एकवेळ पाणीपुरवठा या पार्श्वभूमीवर शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्यास ७३ टक्के नागरिकांनी अनुकूलता दर्शविली. महापालिकेचे पाणी वाया जात असल्याचे मत ४७ टक्के नागरिकांचे आहे. नळाच्या तोट्या सुरूच ठेवणे, वाहने धुणे, टाक्यांतून पाणी वाहत जाणे आणि जलवाहिन्यांना गळती इत्यादी कारणेही नागरिकांनी नमूद केली.

वाहतूक समस्या बिकट

रस्त्यांवरील खड्ड्यांकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे मत ८१ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम नाही, असे ५८ टक्के लोकांचे मत आहे. बहुमजली वाहनतळ असावेत, असे मत सुमारे ७६ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. पे अॅड पार्क सेवा सोयीची वाटते, या मताशी ६३ टक्के लोकांनी सहमती दर्शवली आहे. फूटपाथचा वापर केला जातो, असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण ५६ टक्के आढळून आले आहे. अतिक्रमणे, अस्वच्छता, जनावरांचा राबता आदी कारणांनी फुटपाथचा वापर करता येत नाही, असे ३२ टक्के नागरिकांचे मत आहे. शहरात हॉकर्स झोन अस्तित्वात आल्यानंतर अतिक्रमणांचा प्रश्न सुटेल, असे ६२ टक्के लोकांचे मत आहे. या सर्व परिस्थितीत मोकाट आणि भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याचा अभिप्राय ६४ टक्के लोकांनी नोंदविला आहे.

शहरात झोपडपट्ट्यांची संख्या वाढत असल्याचे मत सुमारे ६९ टक्के लोकांनी नोंदविले आहे. राजकीय सोय म्हणूनही झोपडपट्ट्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. परवडणारी घरे उपलब्ध होत नसल्याने झोपडपट्ट्या वाढतात आणि रोजगारीचा प्रश्नही यामागे कारण असल्याचे पाहणीमध्ये निदर्शनास आले आहे.

इंग्रजी शाळांना पसंती

मराठी भाषेचा जप करण्याचा सर्वत्र प्रयत्न केला जात असला, तरी महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, असे मत सुमारे ७९ टक्के लोकांचे आहे. याचाच अर्थ इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे लोकांचा कल वाढत असल्याचे दिसते.

‘अॅप’ला प्रतिसाद नाही

महापालिकेचे मोबाइल अॅप अस्तित्वात असले आणि डिजिटल इंडियाचा मोठा डांगोरा पिटला जात असला, तरी अॅप वापरणाऱ्यांचे प्रमाण मात्र तुलनेत कमीच आहे. मोबाइल अॅप वापरत नसल्याचे सुमारे ७६ टक्के लोकांनी नमूद केले.

आरोग्य अन् स्वच्छता...

नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी महापालिका सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुरेसे प्रयत्न करत नाही असे ५५ टक्के लोकांचे मत आढळून आले. दुसरीकडे मात्र घंटागाडीप्रभावी आहे, असे मत ५६ टक्के लोकांनी नोंदविले आहे. खासगी वैद्यकीय सेवेच्या तुलनेत महापालिकेची वैद्यकीय सुविधा चांगली नसल्याचे मत सुमारे ६५ टक्के लोकांनी व्यक्त केले. आरोग्य आणि पर्यावरणासाठी शहरात आणखी उद्यानांची गरज ७२ टक्के लोकांनी व्यक्त केली.


नागरिकांनी केलेल्या काही सूचना...

रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत.

अतिक्रमणे काढावीत.

चांगले फूटपाथ असावेत.

वाहनचालकांनी झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन केल्यास त्याला जबर दंड करण्यात यावा.

रस्ता दुभाजक आणि गतिरोधक वाढवावेत.

डास निर्मूलन करावे.

सीसीटीव्हींची संख्या वाढवावी.

पथदीपांची देखभाल करावी, प्रकाश क्षमता वाढवावी.

वीजतारा भूमिगत कराव्यात.

महापालिकेने जनसंपर्क वाढवावा.

सांडपाण्यासाठी गटार व्यवस्थेत सुधारणा करावी.

नियमित स्वच्छता हवी.

उघड्यावरील मांसविक्री बंद करावी.

वाहतूक पोलिसांना मास्क पुरवावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनांनी वाहतुकीचा फज्जा

$
0
0


टीम मटा

शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनांमुळे वाहतुकीचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवहारांवरील मर्यादांच्या निषेधार्थ बँकेच्या अध्यक्षांसह पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. सीबीएससारख्या वर्दळीच्या परिसरात त्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने सुमारे दोन तास वाहतुकीचा फज्जा उडाला. आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांशी त्यांची वादावादी झाली. दुसरीकडे भटके विमुक्त समाज विकास परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयावर पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनात समाजबांधवांनी रस्त्यावरच आपले पारंपरिक व्यवसाय थाटून रास्ता रोकोचा प्रयत्न केल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे दिसून आले. या सर्व गोंधळामुळे वाहनचालकांची मात्र प्रचंड गैरसोय झाली.

--

जिल्हा बँकेकडून नोटांसाठी रास्ता रोको!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवहारांवर प्रचंड मर्यादा आल्या असून, या निषेधार्थ जिल्हा बँकेच्या अध्यक्षांसह अनेक पदाधिकारी बुधवारी रस्त्यावर उतरले. सीबीएससारख्या

वर्दळीच्या परिसरात त्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने सुमारे दोन तास वाहतुकीचा फज्जा उडाला. बँकेत जमा ३४९ कोटी १७ लाख ७७ हजार रुपयांची रोकड बदलून द्यावी, तसेच रब्बी हंगामासाठी पीककर्ज वितरणास निधी उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्ह्याची अर्थवाहिनी समजले जाते. ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर अनेक बंधने घातली आहेत. परिणामी बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. या निषेधार्थ बुधवारी बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळ, ठेवीदार आणि शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. सुरुवातीला त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. या निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५०० व १००० रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटल्यानुसार, जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध कार्यकारी सेवा संस्थांद्वारे शेतकरी सभासदांपर्यंत कर्जपुरवठा व सवलती पुरवून सभासदांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले जाते. परंतु, विनाकारण आयकर विभागाकडून चौकशीचा ससेमिरा लावून बँकेची बदनामी केली जात आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने नोटारद्दचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा बँकेच्या २१२ शाखांमध्ये १० ते १३ नोव्हेंबर या कालावधीत तब्बल ३२४ कोटी १० लाख ६१ हजार रुपयांची रक्कम जमा झाली. त्यामध्ये ५०० च्या नोटांची संख्या ४१ लाख २५ हजार ७०२, तर एक हजार रुपयांच्या नोटांची संख्या ११ लाख ७८ हजार २१० होती. कोट्यवधी रुपये आजही बँकेकडे पडून आहेत. या नोटा रिझर्व्ह बँकेकडून बदलून मिळत नसल्याने ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्यास आणि रब्बी हंगामातील पीककर्ज वितरण करण्यास बँकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. ठेवीदार व ग्राहकांमध्ये बॅँकेची बदनामी होत आहे.

केंद्र सरकारने तत्काळ नवे चलन उपलब्ध करून द्यावे, बँकांमध्ये जमा झालेली रक्कम बदलून द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिला आहे. उपाध्यक्ष सुहास कांदे, नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भास्कर कोठावदे, संचालक शिरीष कोतवाल, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, दिलीप बनकर आदींसह शेकडो जण आंदोलनात सहभागी झाले.

--


पोलिसांशी वाद

धरणे देण्यासाठी बसलेले आंदोलक अचानक आक्रमक झाले. आंदोलनासाठी उभारलेला मंडप अपुरा ठरू लागल्याने आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. आंदोलनाचे नेतृत्व करणारे पदाधिकारीही आंदोलकांना पाठबळ देण्यासाठी रस्त्यावर येऊन बसले. पूर्ण रस्ता गर्दीने भरून गेला. आंदोलकांनी बाजूला बसावे, वाहनांना मार्गस्थ होण्यासाठी जागा करून द्यावी, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले. परंतु, आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. या सर्व गोंधळामुळे वाहनचालकांची मात्र प्रचंड गैरसोय झाली.

---


...तर निवडणुकांवर टाकणार बहिष्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागे व्हा, जागे व्हा महाराष्ट्र शासन जागे व्हा, भटके विमुक्त कलाकारांना मानधन मिळालेच पाहिजे, यांसारख्या घोषणा देत भटके विमुक्त समाज विकास परिषदेने जिल्हा प्रशासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

भटक्या विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करावी, जातीचे प्रमाणपत्र काढताना लागू करण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात, स्थानिक स्वराज्य संस्थेत ११ टक्के आरक्षण लागू करण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

समाजबांधवांनी रस्त्यावरच पारंपरिक व्यवसाय थाटत आंदोलन केले. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. समाजाच्या मागण्या हिवाळी अधिवेशनात मान्य करण्यात याव्यात, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे. आंदोलकांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. परिषदेचे अध्यक्ष रतन सांगळे, मांगुलाल जाधव, सोमनाथ मोहीते, बापू बैरागी, संतोष रोडगे, नवनाथ मोहिते, शिवाजी ढगे, संजय चव्हाण आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

--

प्रमुख मागण्या अशा

रेणके आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.

अर्थसंकल्पात १० टक्के निधी द्यावा.

समाजातील कलाकारांना दरमहा ३ हजार रुपये मानधन द्यावे.

वसंतराव नाईक महामंडळाला हजार कोटींचे भांडवल द्यावे.

सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगासाठी प्लॉट द्यावेत.

मेंढपाळांसाठी चराऊ कुरणे उपलब्ध करून द्यावीत.

--

...यांनी वेधले लक्ष

पारंपरिक व्यवसाय आणि अंगमेहनत करून चरितार्थ चालविणारे हे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पारंपरिक व्यवसायाचे बिऱ्हाड त्यांनी येथे मांडले. यात कडकलक्ष्मीकडून मरिआईला आवाहन केले जात होते. स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारत पोतराजही या आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बाजार टार्गेटवर

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गुन्हेगारांचा अड्डा असलेल्या अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजारवर बुलडोझर चालविण्याची नाशिककरांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. भंगार बाजारचे अतिक्रमण काढण्यासाठी हायकोर्टात दिवाणी अर्जाची गरज नसल्याचा सल्ला हायकोर्टाच्या वकिलांनी दिला आहे. त्यामुळे हा भंगार बाजार हटवण्यासाठी महापालिकेने आता पंधरा दिवसांची सार्वजनिक जाहीर नोटीस काढण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्तांसोबत महापालिका आयुक्त चर्चा करणार असून, हिवाळी अधिवेशनानंतर पोलिस बंदोबस्त उपलब्ध होताच भंगार बाजारवर बुलडोझर फिरवला जाईल, अशी माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. भंगार बाजारावरील कारवाईसाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या मागविल्या जाणार आहेत.

या बाजारात भंगार व्यावसायिकांची जवळपास चारशेच्या वर अनधिकृत दुकाने असून, ही दुकाने गुन्हेगारांचे अड्डे बनली आहेत. येथे परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. हायकोर्टाने संबंधित भंगार बाजारधारकांना स्थलांतर करण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली होती. हायकोर्टाने मुदत देऊन दीड वर्ष लोटले, तरीदेखील अद्यापही बाजाराचे स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे महापालिकेने आता या बाजारवर बुलडोझर फिरविण्याची तयारी केली आहे. हायकोर्टाच्या आदेशाचीही व्यावसायिकांनी अंमलबजावणी केेलेली नाही. त्यामुळे महापालिकेने यापूर्वी कारवाई करण्यासाठी हायकोर्टात दिवाणी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी हायकोर्टाच्या वकिलांचा सल्ला मागितला होता. हायकोर्टाच्या वकिलांनी आता दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल करण्याची गरज नसल्याचा सल्ला दिला आहे. महापालिकेने पंधरा दिवसांची सार्वजनिक नोटीस जाहीर करून अतिक्रमण काढता येणार असल्याचा सल्ला वकिलांनी दिला आहे. त्यामुळे महापालिकेने आता भंगार बाजार हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. यासाठी पोलिस आयुक्तांसोबत बंदोबस्तासाठी चर्चा केली जाणार आहे. पोलिसांनी बंदोबस्ताचे आश्वासन दिल्यानंतर लगेच १५ दिवसांची जाहीर अंतिम नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी बुलडोझर चालविला जाणार असल्याने नाशिककरांची या भंगार बाजाराच्या त्रासातून सुटका होणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे.

----

‘एसआरपीएफ’ची गरज

भंगार बाजार गुन्हेगारांचा अड्डा असून, या ठिकाणी भंगारही मोठ्या प्रमाणावर आहे. हे अतिक्रमण काढताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कारवाईसाठी महापालिकेला थेट राज्य राखीव दलाची गरज भासणार आहे. सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, ‘एसआरपीएफ’ व पोलिस नागपूरमध्ये तैनात आहेत. त्यामुळे अधिवेशन सुरू असेपर्यंत या तुकड्या महापालिकेला उपलब्ध होणार नाहीत. अधिवेशन संपताच ‘एसआरपीएफ’च्या तुकड्या उपलब्ध होणार असून, लगेच कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुडत्याला सहकारी बँकांचा आधार?

$
0
0

मटा सीरिज : ज्ञान मंदिरातील काळी माया!


Jitendra.tarte@timesgroup.com /Tweeter: @jitendratartemt

शिक्षण, सहकार आणि राजकारण या कुबड्यांच्या आधारावर पिढ्यान् पिढ्या समाजकारणाचा प्रपंच चालविणाऱ्या शिक्षणसम्राटांच्या सहकारी अन् खासगी बँकाही पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे राज्यभरात उगवल्या आहेत. चलनबदलाचा निर्णय जाहीर होताच सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या या बँकांमधील घडामोडी बघून आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया)ने या बँकांवरील बंधने कडक केली अन् पहिल्या टप्प्यात अर्जित पैशांची रात्रीतून चांदी करणाऱ्या काही दिग्गजांना मात्र चांगलाच चाप बसला.

नाशिकसारख्या १५ तालुके असणाऱ्या जिल्ह्यात अनुदानित शाळांमधील सुमारे १६ हजार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पगारावर सुमारे ६३ कोटी रुपये वेतनापोटी महिन्याकाठी जमा होतात. त्यांचे हे वेतन जिल्हा बँकेत जमा होत असले, तरीही ते नोकरी करत असलेल्या बहुतांश संस्थांच्या खासगी अन् सहकारी बँकाही जोमाने कार्यरत आहेत. वर्षभरातील या बँकांचे ऑडिटही लाभार्थी शिक्षकांच्या अर्थकारणाचे साक्षीदार आहे. चलनबदलाच्या निर्णयांनतर हक्काच्यां बँकांनीही काही प्रमाणात काही संस्थाचालकांना साथ दिली. मात्र, आरबीआयने मुसक्या आवळल्यानंतर ‘तेरी भू चूप... मेरी भी चूप’ या म्हणीचे अनुकरण करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. नाशिकसारख्या जिल्ह्यात पाऊण अब्जांची उलाढाल करणाऱ्या गुरुजींचाही शिक्षणसम्राटांच्या सहकारी बँकांना मोलाचा आधार आहे, तर पुणे, सोलापूर, मुंबई यांसारख्या जिल्ह्यांतील गुरुजींच्या अर्थकारणाचे बजेटही डोळे दीपवणारे आहे.

कायदेतज्ज्ञांना साकडे

सहकाराच्या आधाराने शिक्षण अन् राजकारणातील पैसा सांभाळण्याचे साधनच सद्यःस्थितीत गोंधळलेल्या स्थितीत अडकले आहे. यामुळे चलनबदलाच्या निर्णयाच्या रात्रभर शिक्षण संस्थांचा कायदेशीर अन् आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या काही कायदेतज्ज्ञ, सीए अन् अर्थ सल्लागारांचे फोन कॉल्स अखंड बिझी होते. यानंतरही या तज्ज्ञांकडे दरम्यानच्या कालावधीत त्या अर्थकारणाच्या फायलींचे ढिगारेही दाखल झाले आहेत. आरबीआय पुढील टप्प्यात सहकारबाबत काय नेमके काय धोरण अवलंबते, यावर या ‘पाचरात अडकलेल्या शेपटीची’ मदार अवलंबून राहणार आहे. यासाठी बड्या कायदेतज्ज्ञांना रात्रीतून पाचारण करत राज्यभरातील काही सम्राटांनी कोर्टाचीही पायरी गाठली आहे. आरबीआयने सहकारविषयक धोरणे शिथिल करून खातेदारांना दिलासा द्यावा, अशा शीर्षकाखाली हा लढा आता राज्यात आकार घेत आहे. मात्र, या धोरणांमध्ये शिक्षक-शिक्षकेतरांसारखे तटस्थ घटकही अकारण भरडले गेले आहेत.

हा तर शोषणाचा दाखलाच!

‘ज्ञान मंदिरातील काळी माया’ या वृत्त मालिकेचा पहिला भाग प्रसिद्ध होताच शोषणाचा अन्याय बिनबोभाट सहन करणाऱ्या शिक्षणक्षेत्रातील काही घटकांनी अत्यंत संवेदनशील प्रसंग ‘मटा’जवळ व्यक्त केले. एका प्रातिनिधिक घडामोडीचा दाखला देताना शहरातील एका नामवंत संस्थेतील प्राध्यापकावर गुदरलेला प्रसंग अत्यंत गंभीर आहे. महिन्याकाठी पूर्ण वेतन हाती घेण्यासाठी या प्राध्यापकांना दर महिन्यास संस्थेला देणगी रूपात एकूण पगाराच्या २० ते ५० टक्के रक्कम सक्तीने भरावी लागते. हा ‘शेअर’ भरण्यासाठी एका प्राध्यापकांना नुकतेच पत्नीचे दागिने मोडावे लागल्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार घडला. हे वास्तव अत्यंत दाहक आहे. हे शोषण नाही तर काय?

(क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images