Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

डॉ. रेखा चौधरींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

$
0
0

धुळे : नंदुरबार येथील डॉ. रेखा चौधरी यांना भारताच्या वेलनेस ब्रॅन्ड ऍम्बेसेडर सहित दोन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘द पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी’ हा पुरस्कार एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज यांच्यावतीने रेखा चौधरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या मराठमोळ्या संस्कृती आणि नंदुरबारसाठी ही अभिमानाची बाब आहे. या सोहळ्यात रशिया, यु. के., स्पेन आणि अाफ्रिका त्याचप्रमाणे अनेक देशातील जनरल कौन्सिल, राजदूत व मंत्री, अधिकारी यांचा सहभाग होता. डॉ. चौधरी यांना दुसरा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला तो फेमिना महिला विशेष अच‌व्हिर पुरस्कार. २०१६-१७ या वर्षात आरोग्य, ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा अॅवॉर्ड स्वीकारल्यानंतर डॉ. रेखा चौधरी यांनी, संपूर्ण जगातील ४७ डायनॅमिक स्त्रियांमध्ये हा अवॉर्ड घेण्याचा मान मला मिळाल्यामुळे अभिमानाने माझे मन भरून आल्याचे यांनी सांगितले. डॉ. रेखा चौधरी या तैलिक समाजाचे ज्येष्ठ नेते हिरालाल चौधरी यांच्या कन्या तसेच आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव कारने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रासबिहारी शाळा लिंक रोड भागात हा अपघात झाला. पंचवटी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

अमित नंदू मधे (१८, रा. इरिगेशन कॉलनी, ओझर) असे मृत्यू झालेल्या मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. तो मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास मोटरसायकलवरून ओझरकडे जात होता. त्यावेळी हा अपघात झाला. हिंदुस्थान पेट्रोल पंपासमोर समोरून भरधाव येणाऱ्या कारने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. या दुर्घटनेत अमित गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.

महिलेची आत्महत्या
महिलेने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जेलरोड परिसरात घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. नाशिकरोड पोलिसात याबाबत नोंद करण्यात आली आहे. प्रियंका तुषार परदेशी (२२, रा. पवारवाडी, जेलरोड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिने घरातील पंख्यास गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तात्काळ बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता.

ट्रकचालकावर जीवघेणा हल्ला
परप्रांतीय ट्रक चालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावर आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. लोखंडी गजाने चालकावर हल्ला चढवीत संशयिताने मालट्रकची काच फोडून नुकसान केले. पैशांसाठी हा हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुशांतो कार्तिक सरकार (रा. रायपूर) या चालकाने तक्रार दिली आहे. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मालट्रक उभा करून ते आराम करीत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोराने चालकाच्या बाजूचा दरवाजा ठोठावला. सरकार यांच्याकडे पैशांची मागणी केली. सरकार यांनी नकार दिला असता हल्लेखोराने त्यांच्या कपाळावर लोखंडी गजाने प्रहार केला. या हल्ल्यात सरकार जखमी झाले. त्यानंतर संशयिताने क्लिनर साईडला जाऊन पुढील काच फोडून पोबारा केला. आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मेरी कॉलनीत टीव्हीची चोरी
बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील एलईडी टीव्ही चोरून नेला. मेरी वसाहतीत ही घटना घडली. पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशा दिलीप वाघ यांनी फिर्याद दिली आहे. वाघ कुटुंबीय सोमवारी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील १५ हजार रुपयांचा एलईडी टीव्ही चोरून नेला.

महादेववाडीतून

बुलेटची चोरी
बनावट चावीच्या सहाय्याने बुलेट चोरून नेल्याची घटना सातपूर येथील महादेववाडी परिसरात घडली. महादेववाडीत गणेश सोसायटीत राहणारे नरेंद्र पांडुरंग मुसळे यांची बुलेट मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमध्ये लावली असताना संशयिताने बनावट चावीच्या सहाय्याने चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी विनायक अर्जुन गांगुर्डे (रा. स्वारबाबानगर, सातपूर) या संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.

जीवे मारण्याची धमकी
महिलेला अश्लिल चित्रफिती पाठवून तिच्या पतीस गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयितावर मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या पतीने फिर्याद दिली आहे. गोविंदनगर भागात राहणाऱ्या महिलेस मंगळवारी सकाळी एका मोबाइल क्रमांकावरून अश्लिल चित्रफिती पाठविण्यात आल्या. महिलेने याबाबत आपल्या पतीस माहिती दिली. पतीने संशयिताला फोन करून जाब विचारला. तसेच पोलिस स्टेशन तक्रार करेन असे सांगितले. पोलिसात तक्रार दिली तर जीवे ठार मारेन, अशी धमकी संशयिताने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कारची काच फोडून लॅपटॉपची चोरी
गंगापूर रोड येथे कारची काच फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह लॅपटॉप चोरून नेला. सुमारे ४८ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद गंगापूर पोलिसांनी दाखल केली आहे. रघवेंद्र कुमार (रा. मातोश्रीनगर, मखमलाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ते गंगापूररोड येथील एका हॉटेलात कुटुंबासह जेवणासाठी गेले होते. हॉटेलच्या वाहनतळात कारची मागील काच फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, टॅब व लॅपटॉप असा सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत कोसळली व्हॅन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

घोटी-सिन्नर महामार्गावरील धामणगाव येथे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सोडून परतत असलेली व्हॅन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत बुधवारी दुपारी कोसळली. मात्र, स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी व्हॅन बाहेर काढली. व्हॅनचालकाला वाचविण्यात यश आले.

एसएमबीटी कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला सोडण्यासाठी पंकज शेजवळ हा व्हॅनचालक गेला होतात. त्यांना सोडून परत‌ येत असतांना त्याला मुंबईच्या दिशेला जायचे होते. मात्र, रस्ता चुकल्याने सिन्नर मार्गाला तो गेला. आगसखिंडजवळ गाडीने कट मारल्याने पंकजचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मुख्य रस्त्यापासून पाच फुट दूर असलेल्या विहिरीत गाडी कोसळली. सुमारे तीस फुट खोल असलेल्या या विहिरीत १० फुटापर्यंत पाणी आहे. पंकजने तातडीने व्हॅनचा दरवाजा उघडला. पोहता येत असल्याने त्याने विहिरीतील कड्यांचा सहारा घेत स्वत:चा जीव वाचविला.

आगसखिंड गावकऱ्यांनी याबाबत पांढुर्ली पोलिस चौकीचे सहाय्यक गणेश परदेशी, विनोद टिळे यांनी कळविले. त्यांनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेऊन व्हॅनचालकाला विहिरीतून बाहेर काढले. एसएमबीटी कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. नंतर सिन्नर येथून क्रेन मागवून गाडी विहिरीबाहेर काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलाचे अर्ज घेण्यासाठी गर्दी

$
0
0

पंतप्रधान आवास योजनेबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम

म. टा. वृत्तसेवा, सातपूर/पंचवटी

नाशिक महापालिकेत दोन महिन्यांपासून सरकारने नियुक्त केलेल्या महा ई-सेवा केंद्रावर पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज भरण्यात आले होते. आता पुन्हा महापालिकेनेच सहा विभागांत पंतप्रधान आवाज योजनेचे अर्ज विक्रीसाठी ठेवले आहेत. विशेष म्हणजे अर्ज घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. पंतप्रधान आवास योजना एकच परंतु, अर्ज दोन ठिकाणी कसे असा संभ्रम ग्राहकांमध्ये उपस्थित होत आहे.

याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी सरकारने आदेशीत केल्याप्रमाणे अर्ज विक्रीसाठी ठेवले असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे महा ई-सेवा केंद्राच्या अधिकाऱ्यांना विचारले असता नियमानुसार आधार कार्ड लिंकिंगसह पंतप्रधान आवाज योजनेतील अर्जदाराची नोंदणी करण्यात आली असल्याचे ‘मटा’शी बोलताना सांगितले.

आधार कार्ड अर्ज सादर करताना लिंकिंग केल्याने संबधित ग्राहकाला दुसरीकडे अर्ज भरताच येणार नसल्याचे महा ई-सेवा केंद्रातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर महापालिकेने केवळ २० रुपयांना अर्ज देत ते पुन्हा भरून आणून देण्याचे सांगितले आहे. यामुळे ऑनलाइन व ऑफलाइन अशा सावळा गोंधळाने ग्राहकांनाच भुर्दंड बसणार असल्याचे बोलले जात आहे.

दोन लाख ग्राहकांचे अर्ज

१ जानेवारी २०१७ नंतर पंतप्रधान आवास योजनेला सुरुवात केल्यानंतर शहरातील ३५० महा ई-सेवा केंद्रांवर या योजनेत नावनोंदणी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. ग्राहकांची वाढती संख्या पहाता काही ठिकाणी सायबर कॅफेत पंतप्रधान आवास योजनेची अनधिकृतपणे नोंदणी जास्त

पैसै घेऊन करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांनीच योजनेच्या नोंदणी बंद करण्याचे ठरविले होते. अचानक नोंदणी बंद करण्यात आल्याने

ग्राहकांमध्ये उलटसुलट चर्चाही रंगू लागल्या होत्या. नगरसेवकांच्या कार्यालयात नोंदणी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी होत होती. पुन्हा महा ई-सेवा केंद्रांवर पंतप्रधान आवास योजनेची नोंदणी करण्यात सुरुवात करण्यात आली असून

आतापर्यंत अंदाजे दोन लाख ग्राहकांनी महा ई-सेवा केंद्रांवर योजनेत नावनोंदणी केली आहे. हे अर्ज भरून ते पुन्हा महापालिकेत सादर करावयाचे आहेत.

चुंचाळे घरकुलांचे काय?

महापालिकेने शहरात असलेल्या अनेक झोपडपट्टीचा सर्व्हे करून ठिकठिकाणी जवाहरलाल नेहरू पुनर्रत्थान योजनेत घरकुले उभारली आहेत. यात चुंचाळे शिवारातदेखील तब्बल ६,५०० घरकुलांची योजना पूर्णत्वास येत आहे. यामुळे महापालिकेने उभारलेल्या चुंचाळे घरकुलांचे काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने चुंचाळे शिवारात उभारलेल्या घरकुलांची अनेकदा दुरूस्ती देखील करण्यात आली आहे. त्यातच केवळ दोनशे गरजूंनाच चुंचाळे घरकुल योजनेत घरे मिळाली आहेत. यात अनेकांनी ती दुसऱ्यांना भाड्याने दिलेले आहे.



पंचवटीत दोन हजार अर्जांचे वितरण

केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भारतातील प्रत्येक नागरिकाला घर मिळावे यासाठी ‘सर्वांसाठी घरे २०२२’ ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घर नसलेल्या व्यक्तींसाठी पंचवटी विभागीय कार्यालयातून दोन दिवसात दोन हजार अर्जांचे वितरण करण्यात आलेले आहे. झोपडपट्टीतील नागरिकांना २० रुपये भरून हे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या अर्जांच्या खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी उसळली होती. शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये कमी पैशात किंवा मोफत घरे मिळून देते असे सांगून अर्ज भरून घेणारे काही एजंट या नागरिकांची लूट करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेत २० रुपयाला मिळणारा अर्ज शंभर रुपयाला भरून देण्याच्या प्रकाराची चर्चा होत आहे.


दोन दिवसांत ४३२ अर्जांची विक्री

नाशिकरोड : विभागीय कार्यालयातून मंगळवारी २०० व बुधवारी २३२ अशा दोन दिवसांत एकूण ४३२ नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज खरेदी केले.
या योजनेसाठीचे अर्ज पालिकेच्या स्लम विकास विभागात प्रत्येकी २० रुपये किंमतीला विक्री करण्यात आले. नाशिकरोड विभागीय कार्यालयातून अर्ज घेणाऱ्या नागरिकांची माहिती नोंदवून घेण्यात आली आहे. हा अर्ज भरून पुन्हा योग्य त्या कागदपत्रांसह जमा करताना त्याची पडताळणी करून जमा केला जाणार असल्याने या योजनेच्या अर्जांचा काळाबाजार रोखला जाणार आहे. असे असले तरी शहरातील काही झेरॉक्स सेंटरवर नागरिकांना हा अर्ज मिळत होता. आज (दि. २) पालिका कार्यालयात नागरिकांच्या माहितीसाठी लावण्यात येणार असल्याची माहिती नाशिकरोडचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीए इन्स्टिट्यूट अध्यक्षपदी विकास हासे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट ऑफ इंडियाच्या नाशिक शाखा अध्यक्षपदी सीए विकास हासे यांची एकमताने निवड करण्यात आली. सीए इन्स्टिट्यूटच्या आयसीएआय भवन येथे नवीन वर्षासाठी निवडणूक घेण्यात आली. यात २०१७-१८ साठी हासे यांच्यासह उपाध्यक्षपदी मिलन लुणावत, सचिवपदी रोहन आंधळे, खजिनदारपदी हर्षल सुराणा, तसेच राजेंद्र शेटे यांची विद्यार्थी शाखाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी कार्यकारणी सदस्य रणधीर गुजराथी, रेखा पटवर्धन आणि सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागीय कार्यकारणीचे सदस्य विक्रांत कुलकर्णी उपस्थित होते. संघटनेचे मावळते अध्यक्ष रवी राठी यांनी नवनिर्वाचित कार्यकारणीकडे पदभार सोपविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेअर मार्केटमध्ये सर्वसामान्यांनी यावे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेअर मार्केट हा नक्कीच सर्वसामान्यांसाठी लाभदायक होऊ शकेल; मात्र त्यासाठी अभ्यास आणि आवश्यक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि मोतीलाल ओसवाल कंपनीचे उपाध्यक्ष चंदन तापडिया यांनी केले.

उद्योगवर्धिनीद्वारा आयोजित फायदेशीर शेअर मार्केट कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी तापडिया बोलत होते. भारतीय शेअर मार्केट अजूनही किशोरावस्थेत आहे. येथे सर्वसामान्यांसाठी खूप वाव आहे. प्रगत देशाच्या तुलनेत भारतीय लोकांची यात सहभाग खूप कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. नोटाबंदी, चांगला मान्सून, चांगले बजेट आणि देशातील विकाससंधी यामुळे शेअर मार्केट वाढू शकेल. सोने, चांदी, बँक डिपॉझिट किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा तुलनेत शेअरमार्केट खूप चांगला परतावा देऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

उद्योगवर्धिनचे किरण चांडक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. उद्योगवर्धिनीच्या शेअर मार्केटमधील योगदानाबद्दल संचालक सुनील चांडक यांनी माहिती दिली.शेअर मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या दीपक साळी, राजेश ताजनपुरे आणि अजितकुमार अडम यांनी आपले व्यावसायिक अनुभवांचे कथन केले. उद्योगवर्धिनी प्रशिक्षक सलील केळकर यांनी डिलिव्हरी बेस ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग तसेच फ्युचर ऑप्शन कमोडीटी आणि करन्सी मार्केटमधील संधी सांगितल्या. प्राची इनव्हेस्टमेंटचे संचालक सुरेश लोया यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुमारे ८०० हून अधिक लाभार्थीनी या चर्चासत्राचा लाभ घेतला .

शनिवारपासून मोफत ‌प्रशिक्षण
शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर सर्वांना सखोल ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने टाटा कॅपिटलमार्फत शनिवार, ४ मार्चपासून ४५ दिवसाचे मोफत प्रशिक्षण सुरू केले जाणार असल्याचे विशाल वाघ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भय इथले संपत नाही

$
0
0

गुंडगिरीने नाशिकरोडला नागरिक, विद्या‌र्थिनी त्रस्त; पाेलिसांपुढे आव्हान

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडला ‘भय इथले संपत नाही’, अशीच परिस्थिती आहे. या परिसरात तलवारीच्या सहाय्याने एकाने केक कापून आपला वाढदिवस साजरा करून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला. वडाळागावातही असाच प्रकार घडला होता. उपनगरलाही दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या गुंडगिरीच्या तक्रारी आल्या होत्या. उपनगरलाच एका युवतीच्या फोटो मिळवून संगणकाच्या सहाय्याने अश्लील फोटो चिकटवून पाच लाख रुपयाची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नवीन भाईंचा उदय

नाशिकरोडला राजकीय वरदहस्त असलेल्या अनेक भाईंच्या मुसक्या पोलिसांनी निवडणुकीत आवळल्या. त्यामुळे नागरिकांनीही पोलिसांचे कौतुक केले होते. अनेक गुंडांना पोलिस ठाण्यात बोलावून पोलिसांनी कडक समज दिली होती. देवळालीगाव आणि जेलरोडला गुंडांची वरातही काढली होती. मात्र, या गुंडांचा (चुकीचा) आदर्श घेऊन नवीन भाई नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, सिन्नरफाटा येथे उदयास येत आहेत. त्यांना राजकीय पाठिंबाही मिळत आहे. भाईच्या वाढदिवसाला होर्डिंग्जवर फोटो झळकल्यावर आणि भाईचा सपोर्ट मिळाल्यावर पोरं गुन्हा करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. या सर्वांमधूनच नवीन भाई तयार होत आहेत. पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करूनही गुंडगिरीच्या नवनवीन घटना घडत आहेत. नव्या भाईंचा बीमोड करण्याची मागणी होत आहे.

टवाळखोरांची फूस

नाशिकरोडचे बिटको कालेज, के. जे. मेहता हायस्कूल, महिला कॉलेज, खासगी क्लासेस सुटल्यावर हे टवाळखोर विद्यार्थिनींचा घरापर्यंत पाठलाग करतात. रात्री मोबाइलवर त्रास देतात. काही टवाळखोर शालेय मुलींना फूस लाऊन पळवून नेतात. त्यामुळे पालकांसह विद्यार्थिनी त्रस्त झाल्या आहेत. उपनगरच्या एका युवतीचे फोटो मिळवून त्यावर संगणकाच्या सहाय्याने अश्लील फोटो चिकटवून ते व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या दोघांना उपनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली.

‘लव्ह सेंटर’ हटवा

नाशिकरोडला अनेक ठिकाणी लव्ह सेंटर आहेत. तेथे लव्ह बर्डस असतात. देवळाली कॅम्पची खंडोबाची टेकडी, सोमाणी गार्डन, महिला कॉलेजचा परिसर, रोकडोबावाडी, रेल्वेस्टेशन, नाशिकरोडचा एलआयसी रोड, तपोवन, टाकळीरोड, जेलरोडचा घाट, नेहरूनगर अशा ठिकाणी आठवी-दहावीच्या विद्यार्थिनी लेक्चर बुडवून स्कार्फ बांधून मित्रासोबत बसतात. यातूनच गुन्हेगारी वाढते. जेलरोडला अशा वादातून वर्षभरापूर्वी दोन युवकांचा बळी गेला होता. रोकडोबावाडीत तीन वर्षांपूर्वी लवबर्डवर सामुहिक अत्याचार झाला होता.

पालकांनी सतर्क रहावे

पालकांनीही मुला-मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे. जेलरोडला या व्हॅलेन्टाईन डेला तीन अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. एकीकडे सतरा हजाराचा मोबाइल होता हे गरीब पालकांनाही माहित नव्हते. दहावीची वार्षिक परीक्षा सुरू असताना रेल्वेस्टेशनवर वाहनांचे पेट्रोल चोरणाऱ्या विद्यार्थ्यांची टोळी पकडण्यात आली होती. पंचवटीत एका अल्पवयीन गुंडाचा खून दहावीतील मुलांनी केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली. आपला मुलगा किंवा मुलगी कोणाच्या संगतीत राहते, ते काय करतात, शाळा-कॉलेजात जातात की नाही, मोबाइल, इंटरनेटचा वापर कसा करतात याकडे पालकांनीच बारकाईने लक्ष दिले पाहिजे, असा पोलिसांचा सल्ला आहे.

मनसेची मागणी

नाशिकरोड, जेलरोड, उपनगर परिसरात वाढलेले अवैध धंदे, गुन्हेगारी यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांना निवदेन देण्यात आले. याप्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे, शहराध्यक्ष शाम गोहड, अस्लम मणियार, प्रकाश कोरडे, संतोष क्षीरसागर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य संकटात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. मात्र, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कृषी क्षेत्र उपेक्षित राहिले आहे. केवळ शहरी विकासामागे लागलेल्या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाभा असलेल्या शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे केले.

येथील कुलथे मंगल कार्यालयात शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल घनवट, माजी अध्यक्ष गुणवंत पाटील, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा गीता खांडेभराड, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी, सुधीर बिंदू, सीमा नरोडे, आप्पासाहेब कदम, शशिकांत भदाणे, शेतकरी संघटना न्यास सचिव अनंत देशपांडे, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे आदींसह राज्यभरातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी वामन चटप म्हणाले, की शेतकऱ्याला आपण गरिब का होत आहोत याचेच कारण समजत नाही. शेतकऱ्यांच्या सुखदु:खात त्यांच्या पाठीशी उभे रहा. शेतकऱ्यांचे शोषण करणारी व शहर धार्जिण्यांची व्यवस्था उलथून टाकण्यासाठी सर्वांनी तयार राहा.

नागरिकांचे मतस्वातंत्र्य सध्याचे राजकीय पक्ष विकत घेत आहेत. मात्र, शेतकरी संघटना प्रामाणिक कार्यकर्त्यांची संघटना आहे. निवडणुकांत यश मिळाले नसले तरी आत्मविश्वास गमावु नका.निर्धाराने शेतक-यांच्या प्रश्नांवर एकत्र या असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

मोदी फुगा फुटणार!
सध्याचे केंद्र सरकार शेतकरी हिताविरोधी कृषीधोरण राबवत आहे. मोदी नावाचा फुगा येत्या वर्षभरात नक्कीच फुटणार असल्याचेही चपट यांनी दावा केला. शेतकरी संघटना आपली आई असून शरद जोशी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेंडी तुटो की पारंबी तुटो पण निर्धार पक्का राखा, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंदा पाणीसंकट टळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वरुणराजाच्या कृपेने भरलेलेल्या धरणांमधील पाणी आता तळाकडे जाऊ लागले आहे. जिल्ह्यातील २४ धरणांमधील पाणीसाठा निम्म्याहून कमी झाला असून आजमितीस धरणांमध्ये ४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो दुप्पट असून नाशिककरांवर यंदा पाणीटंचाईचे संकट नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ख्याती आहे. या जिल्ह्याच्या उशाला २४ धरणे आहेत. तीन ते चार वर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या नाशिककरांवर गतवर्षी वरुण राजाने कृपादृष्टी केली. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे पाण्याने ओसंडली. गोदावरी, तिच्या उपनद्यांसह जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला. जायकवाडी धरणासाठी अनेक टीएमसी पाणी सोडावे लागले. ऑक्टोबरपर्यंत फुल्ल असलेल्या धरणांमध्ये चार महिन्यांना पाणीसाठा निम्म्याने कमी झाला आहे. धरणांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट असली तरी सद्यस्थितीत धरणांमध्ये ३१ हजार ७३ दशलक्ष घनफुट पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षी याच कालावधीत धरणात केवळ ३५ टक्के पाणी होते. काश्यपीमध्ये ९६ टक्के तर गौतमी गोदावरीत केवळ २६ टक्के पाणी शिल्लक आहे. गतवर्षी या धरणात केवळ तीन टक्के पाणीसाठा शिल्लक होता. अन्य धरणांच्या तुलनेत पालखेड धरण समूहातील पाणीसाठा सर्वाधिक खालावला आहे. या समूहातील धरणांमध्ये सध्या १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी त्यामध्ये केवळ नऊ टक्के पाणी शिल्लक होते. गिरणा खोऱ्यात मात्र अजूनही ७६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी या धरणसमूहात २० टक्केच पाणी शिल्लक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता अधिकाऱ्यांचाही अनुशेष!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेत एकीकडे नोकरभरतीअभावी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असताना आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही वानवा निर्माण झाली आहे. अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी पालिकेला टाटा केला आहे. शहर अभियंता सुनील खुने येत्या ९ मार्च रोजी निवृत्त होत आहेत, तर प्रशासन उपायुक्त विजय पगार यांचा पालिकेतील कार्यकाळ हा शुक्रवारी पूर्ण होत आहे. त्यामुळे पालिकेतील ही तीन महत्त्वाची पदे रिक्त होत असून, तेथे कोणाची नियुक्ती करायची असा प्रश्न आयुक्तांना पडला आहे.
महापालिकेत सध्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीमुळे अगोदरच पालिका खाली झाली आहे. पालिकेला ७०९० कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ ५४५३ कर्मचाऱ्यांवरच पालिकेचा गाडा चालत आहे. त्यामुळे जवळपास १६३३ कर्मचाऱ्यांचा अनुशेष असून, निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची दरमहा वाढ होत आहे. तर शासनाने दुसरीकडे नोकरभरतीला अटकाव घातला आहे. त्यामुळे प्रशासन पेचात पडले असताना आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पालिकेला सोडचिठ्ठी देणे सुरू केले आहे.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेले अनिल चव्हाण यांनी पालिका सेवेतील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सेवेला सोडचिठ्ठी दिली आहे. सेवेतून मुक्त करण्याची चव्हाण यांची विनंती आयुक्तांनी मंजूर केली आहे, तर शहर अभियंता सुनील खुने यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली असून, ते ९ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सोबतच प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार यांचा पालिकेतील कार्यका‍ळ हा तीन मार्च रोजी संपत आहे. पगार यांच्याकडेच स्मार्ट सिटीच्या सीईओ पदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यांच्या पालिकेतील सेवेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे एकाच वेळी पालिकेतील महत्त्वाची चार पदे रिक्त होत आहे. या जागांवर नव्या अधिकाऱ्यांची इथे नियुक्ती होणार आहे. नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली तरी त्यांना कारभार समजण्यासाठी बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे नागरी कामांची कोंडी होणार आहे.
सीईओसाठी पगारांची शिफारस
स्मार्ट सिटीच्या सीईओपदाचे प्रभारीपद प्रशासन उपायुक्त विजय पगार यांच्याकडे आहे. त्यांचा कार्यकाळ ३ मार्च रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे सीईओपदावर त्यांची नियुक्ती करावी अशी शिफारस आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी शासनाकडे केली आहे. पगार यांना पालिकेत मुदतवाढ मिळाली नाही तर त्यांना किमान स्मार्ट सिटीच्या सीईओपदी तरी नियुक्त करावे, अशी विनंती आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या शिफारशीवर शासन काय निर्णय घेते याकडे प्रशासनाच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडीसाठी विभागीय आयुक्तांना पत्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची नोंद करण्यात आल्यानंतर शासनाकडून गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता महापौरपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या नगरसचिव विभागाने निवडणुकीसंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र लिहिले असून, निवडणुकीची तारीख घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गुरूवारी महापौरपदाच्या निवडीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची नावे गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला. मंगळवारी नवनिर्वाचित सदस्यांची नावे गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाली. त्यामुळे राजकीय पक्षांना गटनोंदणीचे, तर महापालिकेला महापौरपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी महापालिकेच्या वतीने विभागीय आयुक्तांना महापौर पदाच्या निवडीसाठी तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले. त्यात महापौर व उपमहापौरांच्या निवडीसाठी पिठासन अधिकाऱ्यांची नियुक्ती व तारीख जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे विभागीय आयुक्तालयातून निवडणूक तारखेची घोषणा केली जाणार आहे. तसेच, पिठासन अधिकारी कोण असणार त्यांचे नाव पालिकेला कळविले जाणार आहे. विद्यमान महापौरांची मुदत ही १५ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे १४ तारखेपर्यंत नव्या महापौरांची निवड करावी लागणार आहे. विभागीय आयुक्तालयाकडून १४ मार्च हीच तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. गुरुवारी विभागीय आयुक्तांकडून तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईव्हीएमची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पुण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनची (ईव्हीएम) प्रतिकात्मक अंत्ययात्रा निघाल्यानंतर आता नाशकातही छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने ईव्हीएम हटावसाठी अंत्ययात्रा काढली. ईव्हीएम हटाव, संविधान बचाव अशा घोषणा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच, मतपत्रिकांद्वारेच मतदान घेण्याची मागणीही करण्यात आली.
राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांची निवडणूक नुकतीच झाली आहे. या निवडणुकीत ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप अनेक पराभूत उमेदवारांनी केला आहे. ईव्हीएममध्ये सेटिंग करून उमेदवार विजयी झाल्याचा गौप्यस्फोटही केला जात आहे. असाच आरोप करीत ब्रिगेडचे अजिज पठाण, योगेश निसाळ, प्रफुल्ल पाटील, तृषाल आंबोरे, इब्राहीम अत्तार, राजाभाऊ जाधव आदींनी शहरात इव्हीएमची अत्यंयात्रा काढली. निवडणूक आयोगाकडे निवडणुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा असावी, संशयास्पद ईव्हीएम बंद करावेत, मतपत्रिकांचा वापर सुरू करावा, मतदार यादीतील घोळ लक्षात घेता मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारयादी गोंधळाची टोलवाटोलवी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतदारयाद्यांच्या गोंधळावरून जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेत जुंपली असून, दोन्ही विभागांमध्ये टोलवाटोलवी सुरू झाली आहे. याद्यातील गोंधळाला महापालिकाच जबाबदार असल्याचा ठपका ठेवणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाला महापालिका प्रशासनानेही तोडीस तोड उत्तर देत मतदारांचे पत्ते हे महापालिकेने नोंदवले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदारांच्या दिलेल्या पत्त्यानुसारच मतदारयाद्या फोडण्यात आल्याचा दावा मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी केला आहे. त्यामुळे गोंधळाला जिल्हाधिकारी कार्यालयाच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. महापालिकेने विधानसभेची यादी जशीच्या तशी घेणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात मात्र यादी फोडतांना घोळ निर्माण झाला. तसेच महापालिकेने संकेतस्थळावर यादी उपलब्ध करून देणे आवश्यक असतांना त्यात शेवटपर्यंत घोळ घालण्यात आला. त्यामुळे मतदारयाद्यांच्या गोंधळाचे खापर पालिकेवर फोडण्यात आले.

आयुक्तांकडून आढावा

निवडणुकीत अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाली, तर काहींचे मतदान सध्याच्या निवासाऐवजी दुसऱ्याच प्रभागात होते. परिणामी शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिले. मतदारांची नावे कशी गहाळ झाली, कुठल्या स्तरावर ती रद्द झाली किंवा कोणी ती स्थलांतरीत केली याचा आढावा मुख्य निवडणूक आयुक्त अश्‍विनकुमार यांनी मुंबई येथे बैठकीत घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत ६८ पदांसाठी भरती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या जम्बो नोकरभरतीला शासनाकडून हिरवा कंदील मिळत नसला तरी काही निवडक जागांवरील भरतीसाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेने मंजूर झालेल्या ६८ पदासांठीची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात कनिष्ठ अभियंत्याची १९ तर डॉक्टरांच्या ३२ पदांचा समावेश आहे. महापालिकेने या भरतीप्रक्रियेसाठी महाऑनलाइन सोबत चर्चा सुरू केली असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे. दरम्यान, नियमित पदोन्नतीचीही प्रक्रिया प्रशासनाने सुरू केल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
महापालिकेत आजमितीस जवळपास १६३३ पदे रिक्त आहेत. महापालिकेच्या आकृतीबंधानुसार पालिकेला ७ हजार ९० कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु, शासनाकडून नोकरभरतीला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे पालिकेत रिक्त पदामुळे कमी कर्मचाऱ्यांवरच कामकाज चालवावे लागत आहे. तांत्रिक व वैद्यकीय विभागात रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने विशिष्ट पदांना तरी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेला ६८ पदासांठी आता भरती करता येणार आहे. त्यात वैद्यकीय विभागात ३२ डॉक्टर्स, १९ कनिष्ठ अभियंता आणि मिस्तरीची १७ पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी महाऑनलाइनकडून भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी बोलणी सुरू असून यांसदर्भात लवकरच जाहिरात काढली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमी युगुलाची धुळ्यात आत्महत्या

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,धुळे

शहरातील देवपूर परिसरातील बिलाडी गावाच्या रस्त्यालगत बुधवारी दुपारी प्रेमी युगुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याघटनेमध्ये आत्महत्येचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले.

शहरातील देवूपर परिसरात सिंघलनगर, नगावबारी जवळील महिला कॉलेजमागे राहणारा कल्पेश संजय नंदन (वय ३०) अभियांत्रिकी शिक्षणासाठी धुळ्यात आला होता. त्याचे शहरातील राहत असलेल्या परिसरतील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र या दोघांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. कारण कल्पेश हा सामान्य कुटूंबातील वाहनचालकाचा मुलगा होता. तर तरुणीला वडील नसल्याने ती आईसह मावशीच्या गावी धुळ्यात राहण्यास आली होती. त्यामुळे प्रेमीयुगुलाच्या प्रेमाला मान्यता मिळणे शक्य नसल्यानेे दोघांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार वर्षांतील उच्चांकी तापमान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरात उष्णता ३६.४ अंश सेल्सियसवर पोहचली असून मार्च महिन्यातच मे महिन्याचा फील नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत. गेल्या चार वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद गुरुवारी करण्यात आली.
शहरात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली असून त्यामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. नाशिक शहरातील गुरुवारचे कमाल तापमान ३६.४ तर किमान तापमान १५ इतके होते. दिवसेंदिवस ऊन वाढत असल्याने सकाळी जॉगिंग ट्रॅकवर फिरणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. नाशिक शहरात कमी तापमान असले तरी नाशिककरांच्या दृष्टीने यंदाचा उन्हाळा कडक जाईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उष्णतेत वाढ होत असून अनेकांनी कुलर व एसी सुरू केले आहेत. दिवसा उष्णता आणि रात्री थंडी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सकाळचे ऊनही नकोसे वाटू लागल्याने जॉगिग ट्रकवर येणाऱ्यांची गर्दी कमी झाली आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम होत असून आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पारा ३६ अंशांवर पोहचला असल्याने ऐन उन्हाळ्यात तो कितीवर जाईल याचा अंदाज नागरिक लावत आहे. बदलत्या वातावरणात नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी असे आवाहन करून जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि साधे जेवण करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे हायवेला मिळणार गती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाने गेल्या वर्षभरापासून वेग घेतल्याने नाशिकरोड ते सिन्नर या दरम्यानच्या महामार्ग रुंदीकरणाचे सत्तर टक्के काम आजमितीस पूर्ण झाले आहे. शिंदे गाव येथील अतिक्रमणाचा अडथळाही नुकताच दूर झाल्याने आता महामार्गाच्या उर्वरित कामाला गती मिळणार आहे.
नाशिक-पुणे महामार्गापैकी नाशिक ते सिन्नर दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा प्रारंभ १५ जून २०१३ रोजी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते, तत्कालीन रस्ते व महामार्ग राज्यमंत्री डॉ. तुषार चौधरी, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सिन्नर फाटा येथे झाला होता. गेल्या सिंहस्थापर्यंत हा महामार्ग तयार होण्याची अपेक्षा होती. मात्र, रस्ता रुंदीकरणात आलेल्या अतिक्रमणांचे अडथळे, वृक्षतोडीवरील हरकती यामुळे या महामार्गाचे काम अद्यापही पूर्णत्वास जाऊ शकले नाही.

दोन अंडरपास प्रगतीपथावर
नाशिकरोड ते सिन्नरदरम्यान चेहेडी, पळसे, शिंदे या ठिकाणी एकूण चार अंडरपास आहेत. त्यापैकी दोन अंडरपासचे काम प्रगतीपथावर आहे. मोह घाटातील कामही पूर्ण झालेले आहे.
पालिका हद्दीत सुरुवात नाही
महामार्गाच्या पालिका हद्दीतील कामाला अद्याप श्रीगणेशा झालेला नाही. चेहेडी गावाजवळील दारणा नदीपासून नाशिक मनपा हद्द सुरू होते. यादरम्यानचे चेहेडी गाव, सिन्नर फाटा, चेहेडी शिव या ठिकाणचे अतिक्रमण मात्र दोन वर्षांपूर्वीच काढण्यात आलेले आहे.

नाशिक-पुणे महामार्गाचे सिन्नर ते नाशिकरोड दरम्यानच्या कामापैकी सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. सिन्नर फाटा ते मोह घाटादरम्यान असलेल्या सर्व्हिस रोडचे कामही प्रगतीपथावर आहे. अंडरपास व मोठ्या पुलाचे कामही वेगाने सुरू आहे.
- हेमंत मोरे, सहाय्यक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोवासियांचे महापौरपदाचे स्वप्न भंगणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर यावेळी तरी सिडको विभागाला महापौरपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शहरात भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या एकहाती सत्तेमुळे यावेळीही महापौरपद मिळण्याचे सिडकोवासियांचे स्वप्न भंग पावले आहे. महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून केवळ सिडकोलाच अद्याप महापौरपद मिळालेले नाही. महापौरपद नसले तरी अन्य वजनदार पद मिळण्याची अपेक्षा सिडकोवासियांकडून व्यक्‍त होत आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या १९९२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून नाशिक शहरातील पंचवटी, सातपूर, नाशिकरोड व इतर भागांतील नगरसेवकांना महापौरपद मिळाले आहे. सिडकोतून निवडून येणाऱ्या नगरसेवकांना यापूर्वी स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता अशी पदे मिळाली असली, तरी महापौर व उपमहापौर पद सिडको विभागाला मिळालेले नाही. यंदा झालेल्या निवडणुकीनंतर महापौरपद सिडकोतील नगरसेवकांना मिळेल व सिडकोचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. शिवसेनेची सत्ता आली असती तर चंद्रकांत खाडे यांना महापौरपद मिळणार अशी चर्चा निवडणूक काळात सुरू होती. अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तर त्यांना महापौर म्हणूनच संबोधू
लागले होते. मात्र, शहरात भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याने हे स्वप्न भंग पावले आहे.
अडीच वर्ष तरी पद हवे
यंदाच्या पंचवार्षिकला पहिल्या अडीच वर्षांत नाही पण पुढच्या अडीच वर्षात तरी सिडकोला महापौरपद देण्याची तयारी भाजपने दाखविणे गरजेचे आहे. माजी नगरसेवक नाना महाले व शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या रुपाने सिडकोला स्थायी समितीचे सभापतीपद मिळाले होते. त्यानंतर सिडकोतून कायम सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल असतानाही असे मोठे पद मिळाले नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्‍त केली आहे. त्यामुळे आता सिडकोतील सत्ताधारी व विरोधक यांना नक्‍की कोणकोणती पदे मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बड्या असामींवर वक्रदृष्टी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या आदेशानंतर महापालिकेने आता शहरातील मालमत्ता कराच्या बड्या थकबाकीदारांवर अखेर वक्रदृष्टी केली आहे. सर्वसामान्य करदाता प्रामाणिकपणे कर भरत असताना शहरात नामवंत म्हणून मिरवणाऱ्या बड्या असामी आपल्या पदाचा वापर करून कर भरण्यास टाळाटाळ करतात. अशा बड्या असामींची वादग्रस्त मालमत्तांची लिस्ट पालिकेने तयार केली असून, थकबाकी असलेल्या साडेतीन हजार थकबाकीदार असून, त्यात एक लाखावरल थकबाकीदारांची संख्या २२०० पर्यंत आहे. त्यांच्यावर आता कारवाईची तयारी सुरू केली आहे. या असामींमध्ये शहरातील नामवंत व्यावसायिकांसह हॉटेलचालक, राजकारणी, बँका, उद्योजकांचा समावेश आहे. या सर्वांना जप्तीच्या कारवाईपूर्वीच्या प्राथमिक नोटिसा देण्यात आल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हक्काच्या मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचा आदेश राज्य सरकारने काढले आहेत. त्यानंतर महापालिकेनेही वसुलीसाठी जोरदार मोहीम उघडत पहिल्या टप्प्यात बड्या थकबाकीदारांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. सहा विभागांत ३० पथकांची स्थापना करत, नोटिसा बजावण्यासह जप्तीची कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या वतीने तब्बल ३३०० थकबाकीदारांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात एक लाख रुपयांच्या पुढे थकबाकीदार असलेले २२०० व पंचवीस हजार ते एक लाख रुपयांची थकबाकी असलेल्या ११०० थकबाकीदार ग्राहकांना नोटिसा बजावल्या आहेत. या ३३०० थकबाकीदारांमध्ये शहरातील नामवंत बड्या असामींचा समावेश आहे. त्यामध्ये अभय योजना, न्यायालयातील प्रलंबित खटले, तसेच सुनावणी प्रलंबित असलेल्या मालमत्तांचाही समावेश आहे. यांच्यावर कारवाईसाठी आतापर्यंत पालिका कचरत होती. मात्र, आता सरकारनेच आदेश काढल्याने पालिकेने या बड्या असामींवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. या बड्या असामींमध्ये हॉटेल्स चालक, राजकारणी, व्यावसायिक, व्यापारी, बँका, उद्योग यांचा समावेश आहे.


लाखावरील थकबाकीदार

नाशिक डायोसेशन ट्रस्ट, गोखले एज्युकेशन सोसायटी, कृष्णाजी रघुनाथ काळे, भूमी बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड, पवनकुमार गुप्ता. कोमल इलेक्‍ट्रॉनिक्‍स, एशियन इलेक्‍ट्रॉनिक्‍स, आसारामबापू आश्रम, ज्योती उद्योग, नेमिचंद बेदमुथा, सुनील रुणवाल, रिजवानी रूपचंद.

मटा भूमिका

मनपाच्या तिजोरीत खडखडाट असताना गावभर आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणाऱ्या नाशिकच्या नवकोट नारायणांनी लाखोंची घरपट्टी थकविण्याचा प्रमाद केला आहे. तब्बल २२०० जणांकडे किमान एक लाखाहून अधिक, तर ११०० जणांकडे पन्नास हजाराहून अधिक थकबाकी असताना मनपाचे बाजिंदेही आतापर्यंत कसे गप्प बसले हा प्रश्नच आहे. गोरगरिबांकडची हजार-पाचशेची थकबाकीही ज्यांना सलते, त्या पालिका कर्मचाऱ्यांनी या धनदांडग्यांना इतके दिवस सवलत दिलीच कशी, याचीही आता आयुक्तांनी चौकशी करायला हवी. आता निवडणुका संपल्याने कारवाईला बळ मिळाले हे मान्य केले तरी वर्षानुवर्षे ही मंडळी पालिकेला नाचवत असताना समाजालाही फसवत होते असेच म्हणावे लागेल. थकबाकीदारांच्या यादीवर नजर टाकली तर त्यातील कथित महनीय पाहून या नाशिककरांची खरोखरच लाज वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयएसपी, नोटप्रेसवर जप्तीची नामुष्की?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोटप्रेस यांच्याकडील सहा कोटी रुपयांच्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिका आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने आयएसपी व करन्सी नोटप्रेसचे अपील फेटाळल्यानंतरही या दोन्ही संस्थांकडून अद्याप मालमत्ता कर भरण्यात आलेला नाही. पालिकेने या दोन्ही संस्थांवर जप्तीच्या कारवाईसाठी नोटिसा बजावण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भारताला नोटा पुरविणाऱ्या या संस्थेवर पैशांच्या थकबाकीवरून जप्तीची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या दोन्ही संस्थांमधील संघर्ष पुन्हा उफाळणार आहे.
राज्य सरकारने मंगळवारी महापालिकांना मालमत्ता कर शंभर टक्के वसुली करण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे महापालिकेने वसुलीसाठी जोरदार मोहीम उघडत आता उत्पन्न वाढीसाठी बड्या थकबाकीदारांच्या वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. बड्या थकबाकीदारांना नोटिसा काढून वसुली मोहीम तीव्र केली आहे. वसुलीसाठी अनेक थकबाकीदारांची मालमत्ता जप्त केली असली तरी, अनेक बड्या थकबाकीदार संस्था अजूनही पालिकेला जुमानत नसल्याचे चित्र आहे. नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरीटी प्रेस आणि करन्सी नोटप्रेसचाही त्यात समावेश आहे. १ नोव्हेंबर २००८ ते मार्च २०१६ पर्यंत इंडिया सिक्युरिटी प्रेसने महापालिकेकडे मालमत्ता कर जमा केलेला नाही. सिक्युरीटी प्रेसकडे ५५ लाख ६८ हजार, तर करन्सी नोट प्रेस कडे ५ कोटी ४३ लाख ९७ हजार रुपयांची थकबाकी आहे.
थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने या दोन्ही संस्थाना यापूर्वी नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, त्याविरोधात या संस्थांनी राज्य सरकारकडे अपील केले. केंद्र सरकारच्या संस्था असल्याने मालकमत्ता कर लागू होत नसल्याचा दावा केला होता. तर महापालिकेने असा आदेश दाखवा असा फतवा काढला होता. त्यामुळे मालमत्ता करांवरून या दोन्ही सरकारी संस्थामध्ये दोन वर्षापासून संघर्ष सुरू आहे. त्यातच आयएसपी व करन्सी नोटप्रेसचे मालमत्ता करा संदर्भातील अपील राज्य सरकारने फेटाळून लावले आहे. केंद्र सरकारने लोकसेवेचा प्रकल्प म्हणून नाशिकरोडच्या प्रेसला घोषित केले असल्याने पूर्वीप्रमाणेच यूजर्स चार्जेस आकारण्यात यावे, अशी मागणी प्रेसने केली होती. ही मागणी अगोदरच महापालिकेने फेटाळली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images