Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘शेतकऱ्यांचा अंत पाहू नका’

$
0
0

धुळे : सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये संपूर्ण कर्जमाफी करून राज्य सरकारने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर आता कर्जमाफी द्यावी. तसेच शेतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

‘संवादपर्व’ अंतर्गत खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी (दि. २०) जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी धुळे शहरातील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, शेतकरी आत्महत्या विषय गंभीर असल्याचे सांगितले. आतापर्यंत कधी नव्हे एवढे गंभीर चित्र असताना सरकार कर्जमाफीबाबत गंभीर नाही. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, महापौर कल्पना महाले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे सभासद असलेल्या ६,३७१ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे. या शेतकऱ्यांना २ कोटी ८८ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली आहे.

यावेळच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे झालेल्या नुकसानीपोटी ६,३७१ शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील ५,८५१ शेतकऱ्यांना २ कोटी ६७ लाख ९८ हजार १८ रुपये तर नंदुरबार जिल्ह्यातील ५२१ शेतकरी सभासदांना २० लाख १६ हजार ६३४ रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. पीक विम्याची रक्कम विमा कंपन्यांकडून बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत बँकेतून शेतकरी सभासदांच्या बचत खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

दरम्यान मंजूर करण्यात आलेला विमा हा फक्त खरीप हंगामासाठी आहे. खरीप हंगामासाठी धुळे जिल्ह्यातून रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला तर नंदुरबार जिल्ह्यासाठी अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आले होते. दरम्यान, पीक विम्याची रक्कम खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे शिक्षणाधिकारी कार्यालय रामभरोसे

$
0
0

वरिष्ठ लिपिकाने नेमला खासगी व्यक्ती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कारभार हा रामभरोसे असल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रवींद्र बेडसे यांनी स्वत:ची कामे करण्यासाठी कार्यालयात खासगी व्यक्तीची नेमणूक केली आहे. याबाबत शिक्षण विभागाला कोणतीही कल्पना त्यांनी दिली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करून लिपीक रवींद्र बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संग्राम पाटील यांनी दिले आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या महिन्यांत शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. त्यानंतर रिक्त जागेवर प्रामाणिक अधिकाऱ्याची नियुक्ती होणे अपेक्षित असताना, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील विस्तार अधिकारी शांताराम दुसाणे यांच्याविरोधात आधीच फौजदारी गुन्हे दाखल असताना त्यांच्याकडे उपशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत लिपीक रवींद्र बेडसे यांनी स्वत:च्या सोयीसाठी कार्यालयीन कामकाजासाठी खासगी व्यक्तीची कार्यालयात नेमणूक करून दररोज या व्यक्तीकडून कार्यालयीन वेळेत कामकाज करून घेत आहे, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे रविवारी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही संबंधित व्यक्ती कार्यालयात काम करताना दिसते, असेही यात नमूद केले आहे. शासनाची परवानगी नसतांना एक लिपिक स्वत:च्या सोयीसाठी खासगी कर्मचारी नियुक्त करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संग्राम पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याविषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रभारी शिक्षणाधिकारी यांनादेखील निवेदन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणाचे पाणी देण्यास विरोध

$
0
0

साक्री तालुक्यातील मालनगाव धरणाबाबत शेतकऱ्यांसह समिती आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मालनगाव धरणातून साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला शनिवारी (दि. २२) धरणालगतच्या गावातील शेतकऱ्यांसह मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीने तीव्र विरोध केला. तसेच याविरोधात आंदोलन करण्याचा इशारादेखील या आंदोलकांनी प्रशासनासह सिंचन विभागाला दिला आहे.

मालनगाव धरणातून साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव पाठबंधारे विभागाकडे सादर करण्यात आला. मात्र, मालनगाव धरणाच्या लाभदायक क्षेत्रातील २५ गावातील शेतकऱ्यांनी या प्रस्तावास जोरदार विरोध दर्शवित मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीकडून आंदोलन करण्याचाही निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात मालनगाव रोपवाटिकेत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत साक्री शहराला पिण्यासाठी पाणी देण्यास विरोध नाही. पण जलवाहिनी ऐवजी साक्री शहरासाठी आरक्षित पाणी कॅनलद्वारे किंवा नदीपात्रातून घेऊन जावे, अशी भूमिका घेण्यात आली. मालनगाव धरणातून थेट साक्रीपर्यंत बंदिस्त जलवाहिनीद्वारे हे पाणी घेऊ दिले जाणार नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिंचन विभाग काय भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांसह संघर्ष समितीचे लक्ष लागले आहे.

समितीने धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी घेतल्यास परिसरातील व नदीपात्रालगत असणाऱ्या विहिरींची पाण्याची पातळी कमी होईल. परिणामी, दुष्काळाला सामोरे जावे लागेल. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीही कोरड्या होतील. धरण बांधण्यासाठी ज्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी दिल्या त्यांच्याच तोंडाचे पाणी पळवण्याचा हा प्रकार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळी सुटीत ३३ जादा बसेस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शाळांना सुटी लागली आहे. त्यामुळे गावाकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या सोयीसाठी धुळे विभागातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नऊ आगारातून ३३ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १५ एप्रिल ते ३० जूनदरम्यान जादा बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज राहणार असल्याची माहिती यावेळी विभाग नियंत्रक देवरे यांनी ‘मटा’ला दिली.

मार्च ते एप्रिल या कालावधीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपुष्टात येतात. बाहेरगावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये तसेच सुट्टीच्या काळात वाढती प्रवाशांची संख्या लक्षात परिवहन महामंडळाच्या धुळे विभागतून निरनिराळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ३३ अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्राबाहेर सुरत, वापी, बडोदा, अहमदाबाद, राजकोट, सेलवास तसेच इंदौर याठिकाणी जाण्यासाठी २४ जादा बसेस सुरू करण्यात येणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. मे महिन्याच्या सुट्टीत लग्नसराईच्या तारखा असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसेस फायद्याच्या ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलस्त्रोतांच्या तपासणीस अॅपचा आधार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील जलस्त्रोतांची मोबाइल अॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. हे कर्मचारी जिल्ह्यातील तीन हजार जलस्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी मोबाइल अॅपद्वारे करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून नुकतीच देण्यात आली.

धुळे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष हा उपक्रम राबवित असून, या कक्षाच्या पाणी गुणवत्ता शाखेकडून शुद्ध निर्जंतुक पाणी ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी दरवर्षी जून महिन्यात पाणी गुणवत्ता कार्यशाळा घेतली जाते. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम जैविक तपासणी अभियान राबविले जाते.

३,००० जलस्त्रोतांचे नमुने संकलन

यंदा नागपूर येथील एमआरएसएसी निर्मित अॅप्सची मदत घेतली जात आहे. ‘जिओफेन्सिंग मोबाइल अॅप्लिकेशन’ असे या अॅप्सचे नाव आहे. त्याच्या मदतीने पाण्याच्या नमुन्यांचे संकलन तसेच जलस्त्रोतांचे मॅपिंग केले जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे तीन हजार जलस्त्रोत असून, या सर्व स्त्रोतांची तपासणी याद्वारे होणार आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यात धुळे, शिरपूर, शिंदखेडा साक्री तालुक्यातील आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. तसेच प्रशिक्षणानंतर कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवातही केली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या पूर्ण तपासणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काच्या पगारासाठी गुरुजींना शिक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या सर्वच शाखांत चलनटंचाई निर्माण झाल्याने गुरुजींना हक्काच्या वेतनासाठी दिवसभर बँकेच्या शाखेत तिष्ठत बसण्याची शिक्षा सहन करावी लागत आहे. खात्यावर पैसे असूनही काढता येत नसल्याने गुरुजी वैतागले आहेत.

अभ्यास, शिस्त, गृहपाठ या कारणांवरुन विद्यार्थ्यांना वर्गात उभे करणाऱ्या शिक्षकांवरच आता वेतनासाठी बँकेचे उंबरठे झिजवत दिवसभर ताटकळत उभे राहण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे गुरुजी प्रचंड संतापले आहेत. जिल्हा बँकेच्या सर्वच शाखांत सकाळपासूनच गुरुजी वेतनाचे पैसे काढण्यासाठी रांगा लावत आहेत. मात्र, गेल्या आठवड्यापासून गुरुजींना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत आहे.

निकालाच्या कामावर परिणाम
सध्या सर्वच शाळांत निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, पैसे काढण्यासाठी दिवसभर थांबावे लागत असल्याने गुरुजींना निकालाचे कामकाज सोडून बँकेत काउंटरवर टोकन सांभाळण्याही वेळ आली आहे. अनेक गुरुजींनी आरटीजीएसचा वापर करुन जिल्हा बँकेतील आपल्या खात्यावरील पैसे इतर बँकांत ट्रान्स्फर करण्याचा केलेला प्रयत्नही निष्फळ ठरल्याचे शेवगेदारणा येथील शिक्षिका सी. आर. चोपडे यांनी सांगितले. आठ दिवसांपूर्वीच जिल्हा बँकेच्या खात्यातून पैसे कमी झाल्याची नोंद पासबुकात असूनही आरटीजीएस केलेल्या बँकेत मात्र पैसे जमा झालेले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा बँकेतून पगाराचे पैसे काढता येत नाहीत. कोरा चेक मागतात. मॅनेजर कॅश आणण्यासाठी गेल्याचे सांगितले जाते. मात्र दिवसभर थांबूनही पैसे मिळत नाहीत.

- वाय. झेड. पाटील, शिक्षक
पगाराचे पैसे काढण्यासाठी आठवड्यापासून बँकेत वेळ घालवावा लागत असल्याने निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दिवसभर टोकन सांभाळण्याची वेळ आली आहे. जिल्हा बँकेचे चेकही इतर बँका स्वीकारण्यास नकार देत आहेत.
- आर. सी. जगताप, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजपुरवठ्यासाठी ग्रामविद्युत व्यवस्थापक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

तीन हजारापर्यंत लोकसंसख्येच्या गावात वीजपुरवठा व्यवस्थापनासाठी ग्रामविद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. वीज महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यक्षेत्रातील नाशिक, मालेगाव व नगर या तिन्ही सर्कलमध्ये सुमारे २५०० गावांमध्ये या पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महावितरणने जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींना केले आहे.

सर्वांसाठी वीज या धोरणानुसार प्रत्येक कुटुंब, वाडी-वस्ती, आदिवासी भागात सुरळीतपणे वीजपुरवठा करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या धोरणांतर्गत तीन हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात एक ग्रामविद्युत व्यवस्थापक नेमण्यात येणार आहे. या धोरणानुसार संबंधित ग्रामपंचायती महावितरणच्या फ्रँचायझी म्हणून काम करणार आहेत.

एका गावासाठी एक व्यवस्थापक

राज्याच्या ऊर्जा व ग्रामविकास विभागांनी संयुक्तपणे ‘एक गाव एक विद्युत व्यवस्थापक’ ही योजना हाती घेतली आहे. विद्युत सहाय्यकांचा तुटवडा व ग्रामीण भागातील वीजपुरवठ्यातील अडचणी तातडीने सोडविण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचा विचार करून ही योजना कार्यान्वित केली आहे.

असे असणार निवडीचे निकष

मराठी विषयासह १० वी पास व आयटीआयमधून विद्युत तंत्री किंवा इलेक्ट्रिकल या विषयांत अधिक शिक्षण घेतलेले उमेदवार या पदासाठी पात्र ठरणार आहेत. कंत्राटी तत्वावरील या पदावर गुणवत्तेच्या आधारावर संबंधित ग्रामपंचायतींनी निवडलेल्या उमेदवारास महावितरणमार्फत तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अकरा महिन्यानंतर एक दिवसासाठी सेवा खंडीत करून पुढील नव्याने कार्यादेश वाढवून दिला जाणार आहे. त्याला प्रतिग्राहक ९ रुपये किंवा ३ हजार यापैकी जी रक्कम अधिक असेल ती रक्कम मासिक मानधन म्हणून दिली जाणार आहे.

अशी होणार नियुक्ती

ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नियुक्ती संबंधित ग्रामपंचायतीनेच करावयाची आहे. असमाधानकारक काम किंवा काही अपरिहार्य कारणास्तव ग्राम विद्युत व्यवस्थापकाचे काम रद्द करण्याचे अधिकारही संबंधित ग्रामपंचायतींकडेच असतील. महावितरणची ‘फ्रँचाइजी’ म्हणूनच संबंधित ग्रामपंचायती काम करणार असून ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ त्याचे प्रतिनिधित्व करेल.

अशा असणार जबाबदाऱ्या

गावातील सर्व मीटरचे रिडींग घेणे, वीज बिलांचे वाटप, ब्रेकडाऊन पूर्ववत करून वीज पुरवठा सुरळीत करणे, डीओ, फ्यूज टाकणे, पथदीपांची देखभाल व दुरुस्ती, नवीन वीजजोडणी, थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करणे आदी कर्तव्ये ग्राम विद्युत व्यवस्थापकाला पार पाडावी लागणार आहेत. तसेच ग्रामविकास विभागाचे प्रशासकीय व ऊर्जा विभागाचे तांत्रिक नियंत्रण राहणार आहे.

ग्रामीण वीजपुरवठा समस्या सोडविण्यासाठी ग्रामविद्युत व्यवस्थापकांची नेमणूक ग्रामपंचायतीमार्फत केली जाणार आहे. पात्र उमेदवारांचे प्रस्ताव सादर करावेत.
- दीपक कुमठेकर,
मुख्य अभियंता, परिमंडळ नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायबर पोलिस स्टेशनची लवकरच मुहूर्तमेढ

$
0
0

महाराष्ट्र दिनी कामकाज होणार सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलासाठी स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन सुरू होणार आहे. १ मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी सायबर पोलिस स्टेशनचा कार्यभार सुरू होणार असून, यामुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसण्याची शक्यता आहे. हे पोलिस स्टेशन पोलिस आयुक्तालयातच कार्यन्वित होईल.

शहरीकरणासोबत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, या गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. एखादा सायबर गुन्हा घडल्यानंतर हद्दीनुसार गुन्ह्याची नोंद केली जाते. मात्र, सायबर गुन्ह्यांचा तपास आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनेच केला जातो. इतर गुन्ह्यांप्रमाणे सायबर गुन्ह्याचे स्वरूप नसते. पोलिस स्टेशन पातळीवर अशा गुन्ह्यांचा तपास करताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा सायबर सेलकडे वर्ग केला जातो. राज्यभरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या संख्येचा विचार करता, राज्य सरकारने प्रत्येक पोलिस आयुक्तालयासह ग्रामीण भागातदेखील सायबर पोलिस स्टेशन सुरू करण्याबाबत अधिसूचना काढली आहे. पोलिस आयुक्तालयात सध्या त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. दरम्यान, शहर पोलिसांनी सायबर क्लब स्थापन केले असून, त्याद्वारे जवळपास २८ हजार विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी यांना सायबर विश्वाबाबत जागृत करण्यात आले असल्याचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार ‌सिंगल यांनी सांगितले.


२४ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा फौजफाटा

पोलिस आयुक्तालयात सायबर सेल सुरू असून, त्याच जागी सायबर पोलिस स्टेशन कार्यान्वित करण्यात येणार आहे. एक पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक तसेच इतर पोलिस कर्मचारी असा २४ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा फौजफाटा सायबर पोलिस स्टेशनसाठी देण्यात आला आहे.

ऑनलाइन फसवणूक, एटीएमसंबंधी गुन्हे, सोशल मीडियाचा वापर करून बदनामी असे गुन्हे घडतात. या शिवाय मोबाइलचा वापर करीत गुन्हे केले जातात. या गुन्ह्यांचा जलद तपास होण्यासाठी सायबर पोलिस स्टेशन उपयुक्त ठरेल. हे पोलिस स्टेशन २४ तास सुरू असेल.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेनऊ लाख वृक्षांची गणना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून शहरात करण्यात येत असलेल्या वृक्षगणना मोहिमेत आतापर्यंत तब्बल नऊ लाख ८० हजार वृक्षांची गणना करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत १४५ प्रजाती आढळून आल्या आहेत. आतापर्यंत चार प्रभागांमध्ये वृक्षगणनेचे काम पूर्ण झाले असून, १२ पथके वृक्षगणनेचे काम करीत आहेत.

महापालिकेच्या वतीने शहरातील वृक्षांची गणना केली जात आहे. एका खासगी कंपनीला वृक्षगणनेचे काम देण्यात आले असून, पाच महिन्यांपासून हे काम सुरू आहे. आतापर्यंत शहरातील ३१ पैकी चार प्रभागातील वृक्षगणनेचे काम पूर्ण झाले असून, पाचव्या प्रभागाची वृक्षगणना सुरू आहे. आतापर्यंत ९ लाख ८० हजार वृक्षांची गणना झाली आहे. त्यात विविध प्रकारच्या १४५ प्रजाती आढळून आल्या आहेत. या वृक्षगणनेत प्रत्येक वृक्षाला क्रमांकही दिले जात असून, यामुळे कोणालाही सहजपणे वृक्षतोड करणे अशक्य होणार आहे. शहरात जवळपास २५ लाखांपेक्षा जास्त वृक्ष असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडांवरच्या कैऱ्या, जणू खुल्या तिजोऱ्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चोरीच करायची म्हटले तर चोरट्या प्रवृत्तींना फुकट मिळणाऱ्या कोणत्याही वस्तूचे अप्रूपच असते. अगदी कैरीचे सुध्दा! वाचून आश्चर्य वाटेल कदाचित. परंतु, हे वास्तव आहे. सिडको परिसरात गेल्या काही दिवसांपासून कैऱ्या चोरणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. कैऱ्यांनी लगडलेली डेरेदार आंब्याची झाडे एका रात्रीतून फळरहित होत आहेत. सावतानगर, पाटीलनगर, पवननगर परिसरात अशा घटना घडल्या असून, नागरिक पोलिसांत तक्रार करीत नसल्याने चोरट्यांचे फावत आहे.

कैरीचं नाव काढलं तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटणारच. फळांच्या राजाचे कूळ सांगणारी, आंबट अन् हिरवीगार कैरी. सध्या पहावे तेथे आंब्याच्या झाडांना कैऱ्या लगडलेल्या दिसतात. जेवणामध्ये या कैरीने आपले स्थान पक्के केले आहे. सिडको परिसरात अनेक नागरिकांनी आपल्या अंगणात आंब्याची झाडे लावली असून, ती कैऱ्यांनी बहरली आहेत. या कैऱ्यांचे लोणचे करावे किंवा पाडालाच प‌‌िकणाऱ्या आंब्याची चव चाखावी या विचाराने सुखावणाऱ्या नागरिकांचा चोरट्यांनी अपेक्षाभंग केला आहे. या कैऱ्यांवर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली असून, रात्रीतून कैऱ्यांवर डल्ला मारला जात आहे. सावतानगर येथील राधाकृष्ण चौक आणि आसपासच्या परिसरात अशा चोरीच्या घटना घडल्या आहेत. राधाकृष्ण चौकात प्रत्येकाच्या दारापुढे आंब्याची झाडे आहेत. त्यापैकी दोन झाडांच्या तब्बल सहाशे कैऱ्या चोरीस गेल्याची माहिती रहिवाशांनी दिली. सावतानगर परिसरात गत आठवड्यात रात्री वीजपुरवठा खंड‌ित झाला होता. त्याचा फायदा घेऊनच चोरट्यांनी कैऱ्या उतरविल्याचा संशय रहिवाशांनी व्यक्त केला आहे. रात्रीच्या वेळी कैऱ्या चोरण्यासाठी बॅटरीची मदत घेतली असावी, असा अंदाजही नागरिक व्यक्त करीत आहेत.

झाडे राखण्याची वेळ

कैऱ्यांवर कुणाची वक्रदृष्टी पडू नये यासाठी गृहिणींनी आपल्या ठेवणीतल्या साड्या बाहेर काढल्या आहेत. या साड्यांनी झाडावरील कैऱ्या झाकल्या जात असल्याचे पहावयास मिळू लागले आहे. तर उकाड्याच्या त्रासापासून वाचतानाच कैऱ्यांचीही राखण व्हावी यासाठी अंगणात झोपण्याची शक्कल नागरिक लढवू लागले आहेत. रात्री परिसरात फेरफटका मारणाऱ्या गुरख्यालाही लोक जाब विचारू लागले आहेत. कैऱ्या चोरीचे प्रकार वाढू नयेत यासाठी नागरिकांनी पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. लहाडेंच्या अर्जावर सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा लहाडे यांच्या अटकपूर्व जामिनाच्या दोन्ही अर्जांवर गुरुवारी (दि. २७ एप्रिल) सुनावणी होणारी आहे. मंगळवारी बचाव पक्षाच्यावतीने अॅड. राहुल कासलीवाल यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या कोर्टात अडीचतास युक्तिवाद केला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद बाकी असल्याने पुढील सुनावणी गुरुवारी घेण्याचे आदेश कोर्टाने दिले.

उन्हाची दाहकता घटल्याने दिलासा

नाशिक ः गत काही दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट ओसरल्याने जिल्ह्याच्या तापमानात घट झाली आहे. मंगळवारी नाशिकचे तापमान ३५.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. होरपळून काढणाऱ्या उन्हाची दाहकता कमी झाल्याने नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. वातावरणात अचानक बदल होऊन हवेचा जोर वाढल्याने आणि आर्द्रता सुमारे ७४ टक्यांनी वाढल्याने सकाळी दवबिंदू पडलेले होते. त्यामुळे दिवसभरात तापमानात पाच अंशाची घट झाली.

गावठी कट्टा जप्त

नाशिक : गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या संतोष विलास आल्हाट (वय २३, रा. विल्होळी राजवाडा) या संशयितास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. पोलिस कर्मचारी बाळासाहेब नंद्रे यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई झाली. पाथर्डी फाटा येथील शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील बसस्टॉपजवळ आल्हाटला जेरबंद करण्यात आले. त्याच्याविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२३ जुगाऱ्यांना अटक

नाशिक : मखमलाबादरोडवरील शिंदे कॉलनी येथे जुगार खेळणाऱ्या २३ जणांवर क्राईम ब्रँचच्या युनिट एकने कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक एन. एन. मोहिते यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने छापा मारला. संशयित जुगाऱ्यांकडून २६ हजार ३५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिस कोठडीत वाढ

नाशिक : साई डे स्टार व धनलक्ष्मी डिव्हिजन ऑफ एसडीएसचे विजय नंदू वानखेडे आणि अजय अशोक राणे या दोघा संचालकांच्या पोलिस कोठडीत कोर्टाने दोन दिवसांची वाढ केली. २७ तारखेला त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येईल. साई डे स्टार, लेब्लिस आणि धनलक्ष्मी डिव्हिजन ऑफ एसडीएस या कंपन्यांकडून फसवणूक झाली असल्यास गुंतवणूकदारांनी तत्काळ सरकारवाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुदानासाठी आवाहन

नाशिक : सामाजिक न्याय विभागामार्फत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार व पुनर्वसन केंद्र योजनेंतर्गत अनुदानासाठी पात्र संस्थांनी त्यांचे प्रस्ताव दिनांक २५ मे २०१७ पर्यंत सायंकाळी ५.०० पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवीदास नांदगांवकर यांनी केले आहे.

रिक्षाचालकांचा उपद्रव

नाशिक : द्वारका सर्कल येथे रिक्षाचालकांच्या उपद्रवाने प्रवाशी त्रस्त झाले आहेत. रिक्षाचालक सर्कलमध्येच रिक्षा उभ्या करत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक पोलिस या रिक्षाचालकांचा बंदोबस्त करण्याऐवजी त्यांना संरक्षण देत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे द्वारका सर्कल येथील रिक्षाचालकांचा उपद्रव कमी करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टेंडरसाठी अनुत्सुक?

नाशिक : समृध्दी महामार्गाबाबतच्या कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी वकिलाची नेमणूक करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला तरी त्यासाठी वकील उत्सुक नसल्याचा दावा जिल्हा समृध्दी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. या टेंडरबाबतची जाहिरात अलीकडेच प्रसिध्द झाली असून, वकिलांनी हे टेंडर भरू नये, असे आवाहन समितीचे निमंत्रक दत्तात्रय पांगेरे यांनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालगाडीचे डबे रुळावरून घसरले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड स्टेशनवरील रेल्वेच्या अपघातांचे शुक्लकाष्ठ थांबण्याचे नाव घेत नाही. मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असताना दौलताबादकडे जाणाऱ्या मालगाडीचे चार डबे रुळावरून मनमाड स्टेशनवर मंगळवारी घसरले. दरम्यान, रेल्वेच्या भुसावळ विभागीय प्रबंधकांनी मनमाड स्टेशनला भेट देत घटनेची पाहणी केली. वारंवार घडणाऱ्या अशा अपघातांमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मालगाडी पुणे येथून मनमाडला येऊन दौलताबादकडे जात होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सादर मालगाडी कंटेनर (कॉनकोर) म्हणून ओळखली जाणारी ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक सातवरून जात असताना पॉइंट नंबर १२० जवळ मागील बाजूच्या १३, १४, १५ आणि १६ क्रमांकाचे चार डबे रुळावरून घसरले. गाडी लूप लाइनवर असल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरू करून डबे बाजूला केले. दरम्यान, या घटनेनंतर पाच ते सहा क्रमांकावरील गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर वळविण्यात आल्या. सोलापूर लाईनचे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असेल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले. काही गाड्या उशिराने धावत होत्या.

मोठ्या हानीची प्रतीक्षा का?

मनमाड रेल्वे स्टेशनवर रुळांना तडा जाणे, दोनदा मालगाडी घसरणे, एक्स्प्रेसच्या इंजिनसह चार डबे स्टेशन सोडून ४० ते ६० फूट पुढे जाणे, अशा घटनांनी मनमाड जंक्शन दोन आठवड्यापासून चर्चेत आहेत. अशा घटनांना कारणीभूत ठरणाऱ्या बाबींचा शोध घेऊन तातडीने उपाय योजना कराव्यात. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर प्रशासन बोध घेणार काय, असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.

मनमाड जंक्शनमध्ये वारंवार घडणाऱ्या अपघाताच्या घटना या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचे द्योतक आहे. कोणतेही नियोजन नाही, सुरक्षा केवळ कागदोपत्री आहे. याबाबत रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत.
- नितीन पांडे, पदाधिकारी, रेल्वे सल्लागार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बी. एड.च्या सीईटीसाठी यंदाही मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॅचलर ऑफ एज्युकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेस अर्ज करण्याची मुदत अखेरच्या दिवशी आणखी चार दिवसांनी वाढवून देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता १ मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

बी. एड. अभ्यासक्रमाकडे काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा कल कमी होतो आहे. अनेक नव्या शिक्षणसंस्थांचे आगमन झाले असले, तरीही इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांनी विद्यार्थ्यांपुढे मांडलेल्या संधी आणि बीएडनंतरचे आव्हानात्मक चित्र यामुळे अनेक कॉलेजेसनाही विद्यार्थी संख्येचे समीकरण साधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. यामुळे यंदाही शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सीईटीसाठी अर्ज करण्यास चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी यंदा ५ एप्रिल पासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ही परीक्षा १३ व १४ मे रोजी नाशिक शहरातील केंद्रात घेतली जाईल. ४ मे पासून प्रवेशपत्राची प्रिंट घेता येईल.

अर्ज भरण्याबाबत मविप्रतर्फे मार्गदर्शन
मविप्रच्या शिक्षणशास्त्र कॉलेजच्या वतीने वतीने बी. एड. व एम. एड. सीईटी परीक्षेचे मोफत प्रवेश अर्ज भरून दिले जात आहेत. त्याचप्रमाणे १५ एप्रिलपासून कॉलेजमध्ये सीईटी मार्गदर्शन वर्गदेखील घेतले जात आहेत. तसेच एम. एड. सीईटी परीक्षा अर्ज भरण्यास २५ एप्रिल ते १५ मे पर्यंत मुदत आहे, याचादेखील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोरसे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइनद्वारे २३ लाखांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँक खातेदाराची माहिती मिळवित दोघा भामट्यांनी आयसीआयसीआय बँक ग्राहकाच्या खात्यातील तब्बल २३ लाख रुपये ऑनलाइन पध्दतीने चोरी केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवधेश कुमारसिंह आणि ए. चक्रवर्ती अशी संशयित आरोपींची नावे आहेत. जयसिंग लक्ष्मण ढेमसे (रा. मोढेवाडी, पाथर्डीगाव, गौळाणे शिवार) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. इंदिरानगर येथील आयसीआयसीआय बँकेचे ढेमसे खातेदार आहेत. त्यांच्या खात्यावर २२ लाख ७४ हजार रुपयांची रोकड जमा होती. १४ डिसेंबर २०१६ ते १० एप्रिल दरम्यान संशयितांनी ढेमसे यांच्या बँक खात्याची सविस्तर माहिती मिळवली. यानंतर चोरट्यांनी ढेमसे यांच्या १८७४०१५०२६३६ या बँक खात्यातून अवधेश सिंह या संशयिताच्या एसबीआय बँकेच्या खाते क्रमांक १०३६९१०९४२६ आणि ए. चक्रवर्ती या संशयिताच्या पीएनबी बँकेच्या ३९८४००१५०००१३०५ या खात्यावर वर्ग केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर ढेमसे यांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सदानंद इनामदार करीत आहेत.

आंदोलनप्रकरणी ३३ प्रकल्पग्रस्तांवर गुन्हा

कायमस्वरूपी नोकरी, पीएपी योजनेतून भूखंड मिळावे यासह विविध मागण्यांसाठी उद्योजकांच्या संघटनेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणाऱ्या सुमारे ३३ प्रकल्पग्रस्तांविरोधात अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकल्पग्रस्त बचाव समिती आणि स्थानिकांच्या माध्यमातून सोमवारी सकाळी अंत्ययात्रा काढीत आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कलम १४९ अन्वये नोटीस बजावली होती. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केले. अंबड ते आयमा कार्यालय अशी अंत्ययात्रा काढत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.

अंबड लिंकरोडला तरुणाची आत्महत्या

अंबड लिंकरोडवरील रमाबाई आंबेडकर नगर भागात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने घरात गळफास घेतला. तरुणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कमलेश काळफ कांबळे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, रमाबाई आंबेडकरनगर) असे तरुणाचे नाव आहे. सोमवारी दुपारी घरात कुणी नसताना कमलेशने घरातच गळफास लावून घेतला. ही घटना साडेतीन वाजता उघडकीस आली. घटनेचा अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.

युवतीची आत्महत्या

जेलरोड परिसरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. युवतीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कोमल नाना बच्छाव, असे या युवतीचे नाव आहे. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोमलने अज्ञात कारणातून घरात गळफास घेतला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घटनेचा अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँकेवर आता अशीही आफत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीच्या निर्णयानंतर अडचणीत आलेल्या जिल्हा बँकेकडून खातेदारांना पैसे देणे बंद झाल्याने मोर्चे, आंदोलने करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आता तर थेट हे प्रकरण पोलिसांकडे पोहचले असून, फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, व्यवस्थापकाविरोधातच गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे आल्याने बँकेवर नसती आफत ओढवली आहे.

रवींद्र विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पिंगळे यांनी यासंदर्भातील अर्ज पोलिसांकडे केला आहे. संस्थेचे या बँकेत खाते असून, नुकतेच त्यात पोषण आहाराचे ३ लाख ३५ हजार ८४९ रुपये जमा झाले. पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थेला धनादेश दिला. मात्र, पैसे नसल्याचे कारण देत बँकेने चेक बाऊन्स केला. खात्यात पैसे असताना बँक पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने या रक्कमेचे काय झाले, असा प्रश्न झाला. व्यवस्थापक शिरसाठ यांनी ‘आरटीजीएस’द्वारे पैसे वर्ग करण्याचे आश्वासन दिले. मात्र, हा व्यवहारही झाला नाही. पैसे मिळत नसल्याने या पैशांचा अपहार झाल्याची शक्यता पिंगळे यांनी व्यक्त केली. या सर्व घडामोडीसाठी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे तसेच व्यवस्थापक शिरसाठ कारणीभूत असून, त्यांच्याविरोधात फसवणूक तसेच अपहाराचा गुन्हा दाखल करण्याचा अर्ज त्यांनी भद्रकाली पोलिसांकडे केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी एसटी डेपोत आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जुन्या आडगाव नाका येथील पंचवटी शहर बस वाहतुकीच्या डेपोतील रद्दी ठेवलेल्या खोलीस मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. या आगीत शहर बस वाहतुकीचे जुने रद्दीचे कागदपत्र जळाली तसेच येथे ठेवण्यात आलेल्या चार खुर्च्यां आगीत खाक झाल्या.

सकाळीच्या सत्रातील चालक आणि वाहक पंचवटी डेपोतून बस घेऊन बाहेर पडण्याच्या तयारीत असताना काही कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या हजेरी रुमच्या शेजारच्या खोलीतून धूर निघत असताना दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्याने इतर कर्मचारी धावून आले. खोलीतील रद्दीला आग लागल्याचे स्पष्ट झाले. कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. बस डेपोमधील आग विझविण्याचे सिलिंडर घेऊन त्यापासून आग विझविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यातील एकालाही सिलिंडर उघडता आले नाही. फरशीच्या तुकड्यांनी हे सिलिंडर फोडण्याचा त्यांनी निष्फळ प्रयत्न केला. काहींनी प्लास्टिकच्या बादल्यामधून पाणी आणून ते खिडक्यातून आगीवर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आली. अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्यानंतर या दलाने खोलीत पाणी मारून आग इतरत्र पोहचू नये याची दक्षता घेतली. आग विझविण्यात आल्यानंतर या खोलीत असलेली रद्दी बाहेर काढण्यात आली. त्यावेळी खोलीत असलेल्या जुन्या खुर्च्याही आगीत जळून खाक झाल्या.

कुठे झाले नुकसान?

अर्धवट जळालेल्या कागदपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नोंदवही अशा कागदपत्रांच्या गठ्ठ्याचे प्रमाण जास्त होते. विद्यार्थी सवलतीच्या जुन्या पासेस आदी प्रकारचे रद्दीचे कागदपत्र असल्याने नुकसान झालेच नाही, असे येथील अधिकाऱ्यांकडूनव सांगितले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... ‘त्या’ पोलिसांना दाखविणार घरचा रस्ता!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालमत्तेसंबंधी गुन्ह्यांची उकल करण्याच्या प्रमाणात घट झाल्याची कबुली देत यामागे पोलिस कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याचे समोर आल्यास संबंधितांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी घेतला आहे.

मालमत्तेसंबंधी गुन्ह्याची उकल होत नसल्याची बाब ‘मटा’ने समोर आणल्यानंतर पोलिस आयुक्तांनी क्राइम ब्रँचसह डिटेक्शन ब्रँचची झाडाझडती घेतली. काही वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तंबी दिली असून, कार्यपध्दतीत सुधारणा न झाल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शहरात मालमत्तेसंबंधी म्हणजे घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाहनचोरी, चोऱ्या अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, झालेल्या गुन्ह्यांचा शोध लागत नसल्याचे सविस्तर वृत्त ‘मटा सिरीज’मधून मांडण्यात आले. याबाबत पोलिस आयुक्तांकडे विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गुन्हे शोधण्याच्या कामात काही प्रमाणात घट झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गुन्हेगारीत वाढ झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. पदभार स्वीकारल्यानंतर पहिले सहा महिने अनेक कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना वारंवार समजावून सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा दिसली नाही. त्यातच डीबीमधील काही कर्मचारी चोरट्यांच्या संपर्कात येत असल्याचे दिसले. म्हणून संशयास्पद कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली.

कामचुकार रडारवर

गुन्हे उघडकीस येत नसतील आणि त्यामागे एखाद्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास, तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. बदल्यांमुळे काही कर्मचारी नाराज असतील अन् कामापासून दूर पळत असतील तर अशा कर्मचाऱ्यांनादेखील रडारवर घेणार असल्याचा इशारा डॉ. सिंगल यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंड न भरल्यास कोर्टात केस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्ते नियमांकडे दुर्लक्ष करीत वाहन हाकणाऱ्या ४०० वाहनचालकांचे फोटो काढण्यात आले आहेत. या फोटोंचा पुरावा म्हणून वापर करीत संबंधितांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. शहरातील काही प्रमुख रस्त्यावर पोलिसांनी हे फोटो घेतले आहेत.

बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाते. वर्षभरात अगदी दोन ते अडीच कोटी रुपये यातून वसूल केले जातात. मात्र, वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता या कारवाईचा तितका फरक दिसत नाही. पोलिसांची संख्याही मर्यादीत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फोटोंचा वापर करण्याचा निर्णय घेतला. मागील दोन दिवसात शहर पोलिसांनी नाशिकरोडसह काही प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी बेशिस्त वाहनचालकांचे फोटो घेतले. विशेषतः झेब्रा क्रॉसिंग, हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष, सिग्नल जम्पिंग अशा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांचे छायाचित्र संकलीत झाले.

याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की जवळपास नियम मोडणाऱ्या ४०० वाहनचालकांचे फोटो घेण्यात आले आहेत. वाहनांच्या नंबर फ्लेटआधारे संबंधितांचे घराचे पत्ते मिळाले आहेत. लवकरच नियम मोडणाऱ्या या वाहनचालकांना कुरिअरद्वारे नोटीस आणि दंडाची पावती पाठवली जाईल. दिलेल्या मुदतीत वाहनचालकाने दंडाची रक्कम जमा केली नाही तर असे प्रकरण कोर्टात पाठवले जाईल. सध्या काही तांत्रिक मुद्द्यांवर काम सुरू असून, लवकरच या पध्दतीने व्यापक पध्दतीने कार्यवाही केली जाईल.

नियमपालनाची वाढली शक्यता

शहरात प्रथमच असा प्रयोग राबवला जात असून, यामुळे बेशिस्त वाहनचालकांमध्ये कारवाईची भीती निर्माण होऊ शकते. यामुळे ट्रिपल शीट, लेन कटींग, सिग्नल जम्पिंग, झेब्रा क्रॉसिंग, ओव्हर स्पीड अशा अनेक प्रकारांना आळा बसून नियमांचे पालन होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौपदरीकरणाचे काम शेतकऱ्यांकडून बंद

$
0
0

सुरत-नागपूर हायवेच्या कामासंदर्भात मोबदल्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी धुळे तालुक्यातील अजंग ते नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी (दि. २६) या रस्त्याचे काम बंद पाडले. यावेळी जोपर्यंत प्रशासन शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत निर्णय घेणार नाही तोपर्यंत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होऊ देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

या मार्गासाठी नवापूरपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. त्या काही शेतकऱ्यांना जुन्या भूसंपादन कायद्यानुसार कमी दर मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करून त्यांना चारपट मोबदला देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याने आता धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकरी चौपदरीकरणाचे काम दि. २४ मार्च रोजी बंद पाडले होते. त्यावेळी धुळे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची बैठक बोलावून एका महिन्याची मुदत मागितली होती. मात्र या गोष्टीला महिना झाला परंतु, जिल्हा प्रशासन व प्रकल्प संचालकांनी दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी बुधवार (दि. २६) पासून महामार्ग चौपदरीकरणाचे काम बंद पाडले आहे. या वेळी भटू नामदेव पाटील, गणेश शिंदे, फकिरा चौधरी, विलास पाटील, संजय शिंदे, संग्राम पाटील, परमेश्वर पाटील, पितांबर नवसारे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मजुरांचा रोजगाराचा प्रश्न

या काम बंद आंदोलनामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी सुरू असलेल्या सर्व मशिनरीचे काम ठप्प झाले आहे. तर या कामासाठी परराज्यातून आलेला मजुरांनी आपल्याला दुसरीकडे कुठे काम मिळेल, याचा शोध सुरू केला आहे. कारण, आंदोलक शेतकऱ्यांनी सर्व कामगारांना कोणीही काम करू नये, असे सांगितल्याने महामार्गावर चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या साहित्यासह माल वाहतूक करणारी वाहने जीएचव्ही कंपनीच्या गोडाऊनमध्ये लावण्यात आली आहेत. आता मजुरांना त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images