Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नगरपालिकांचाही लवकरच शहर विकास आराखडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभागातील नगरपालिका, नगरपंचायतींसह काही गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रादेशिक विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, तीन वर्षांच्या कालावधीत नव्याने अस्तित्वात आलेल्या सर्व नगरपालिका व नगरपरिषदांचे शहर विकास आराखडे तयार केले जाणार आहेत.

नाशिक विभागात पाच महानगरपालिका, ४० नगरपरिषदा व १४ नगरपंचायती आहेत. अशा सर्व शहरांना स्वतःचा शहर विकास आराखडा असतो. नाशिक विभागातील नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपालिका व नगरपरिषदांच्या विकास आराखड्याचे कामही येत्या तीन वर्षांत सुरू होणार आहे. विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नगर व मालेगाव या पाचही महापालिकांचे शहर विकास आराखडे यापूर्वीच प्रादेशिक विकास योजनेत तयार झालेले आहेत.

बारा जिल्ह्यांना प्रथमच मिळाली प्रादेशिक योजना

राज्यातील तब्बल १२ जिल्ह्यांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही स्वतःची प्रादेशिक योजना नव्हती. त्यामुळे या जिल्ह्यांच्या विकासाचा आलेख मंदावला होता. परंतु, या बाराही जिल्ह्यांसाठीची प्रादेशिक विकास योजना नुकतीच तयार करण्यात आली. यात ठाणे, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, परभणी, वर्धा, गोंदिया, बुलढाणा, यवतमाळ व भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या शहरात होणार नवीन डीपी प्लॅन

नाशिक जिल्ह्यातील चांदवड, देवळा, दिंडोरी, कळवण, निफाड, पेठ, जळगाव जिल्ह्यातील बोदवड, नगर जिल्ह्यातील जामखेड, अकोले, पारनेर, धुळे जिल्ह्यातील साक्री व नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव या नगरपालिका व नगरपरिषदांचा शहर विकास आराखडा येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार असून, प्रस्तावित दृतगती विकास योजनेचा या कामासाठी मोठा लाभ होणार आहे.

डीपी पूर्ण असलेली शहरे

नाशिक जिल्ह्यातील नाशिकसह, मालेगाव, सटाणा, येवला, सिन्नर, इगतपुरी, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, अंमळनेर, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, यावल, फैजपूर, सावदा, रावेर, भडगाव व जामनेर, नगर जिल्ह्यातील नगर, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, देवळाली, राहता व श्रीगोंदा, धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, दोंडाईचा व नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शाहादा, नवापूर व तळोदा या शहरांचा शहर विकास आराखडा यापूर्वीच मंजूर झालेला आहे.

डीपी प्लॅनचे नूतनीकरण

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, भगूर, त्र्यंबक व मनमाड, जळगाव जिल्ह्यातील पारोळा व रावेर, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शिर्डी व नेवासा या शहरांच्या शहर विकास आराखडा तयार असून, त्यात दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. या शहरांचे शहर विकास आराखडे शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत. लवकरच या शहरांच्या शहर विकास आराखड्याला शासनाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

नॉन म्युनिसिपल डीपी प्लॅन

शहर विकास आराखडा हा नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदा व महानगरपालिकांना असतो. या शहरांची वेगाने वाढ होत असल्याने या शहरांची रचना सुनियोजित पध्दतीने व्हावी यासाठी शहर विकास आराखड्याची गरज असते. अशा शहर विकास आराखड्यांनुसार त्या त्या शहराचा विकास होत असतो. मात्र नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड व नगर जिल्ह्यातील बेलापूर व शेवगाव या तीन नॉन म्युनिसिपल गावांसाठीही स्वतंत्र विकास आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. या विकास आराखड्यांना यापूर्वीच मंजुरीही मिळालेली आहे. त्यामुळे या तिन्ही गावांची रचना सुनियोजित झालेली आहे.

एनएमआरडीएला चालना कधी

नाशिकच्या विकासासाठी एनएमआरडीएची शासन निर्णयानुसार स्थपना झालेली आहे. मात्र पुरेसे मनुष्यबळ व कार्यालयाअभावी एनएमआरडीएचे कामकाजाला गती मिळालेली नाही. एनएमआरडीएमुळे नाशिक शहरालगतच्या दहा किलोमीटरच्या परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.

शहर विकास आराखड्यांअभावी शहरांची असंतुलित व अनियंत्रित वाढ होते. झोन बदलासाठी मोठा कर लागतो. नियोजनबद्ध विकासासाठी दूरदृष्टीने तयार केलेल्या शहर विकास आराखड्याची आवश्यकता असते.

- प्रदीप काळे, आर्किटेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिपाइंत धुसफूस

$
0
0

प्रकाश लोंढेच जिल्हाध्यक्षपदी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रकाश लोंढे यांच्या विरोधकांनी एकत्र येत रिपाइंचे जिल्हाध्यक्ष म्हणून पवन पवार यांची नियुक्ती करण्याचा ठराव करीत शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर पदाधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्यानंतर रिपाइंमधील अंतर्गत धुसफूस चर्चेचा विषय ठरली आहे. रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी रविवारी दुपारी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर खंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्षपदी प्रकाश लोंढेच असल्याचे स्पष्ट केले.

प्रकाश लोंढे यांना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात आली असली तरी या वादामुळे लोंढेंवरील नाराजी समोर आली आहे. लोंढे यांनी पवन पवार सदस्यच नसल्यामुळे त्यांना जिल्हाध्यक्ष कसे करता येईल, असे सांगितले असले तरी स्टॅम्पवर सह्या करणारे रिपाइंचे पदाधिकारी असल्यामुळे पक्षांतर्गत विरोधही समोर आला आहे. खंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की रिपाइंमधील स्थानिक पातळीवरच निवडीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे अशी कोणतीही नेमणूक झालेली नाही. जिल्हाध्यक्षपदाबाबत राज्य पातळीवर चर्चा होते. त्यानंतर सर्वांचा विचारविनिमय करून निर्णय घेतला जातो. प्रकाश लोंढे हे जिल्हाध्यक्ष आहेत व त्यांनी कोणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय स्थानिक पातळीवरच घ्यायचे सांगून या विषयावर अधिक बोलणे टाळले. माझा दौरा नियोजित होता असे सांगून या वादामुळे मी आलो नसल्याचाही खुलासा त्यांनी केला. यावेळी रिपाइंचे पदाधिकारी अर्जुन पगारे, पवन क्षीरसागर, फकिरा जाधव, सुनील कांबळे, नंदकुमार जाधव यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

ऐक्याची प्रक्रिया जोरात

रिपाइं ऐक्य व्हावे यासाठी प्रक्रिया वेगात सुरू आहे. आमचे नेते रामदास आठवले यांनी ऐक्यासाठी त्याग करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे ही पक्षाची भूमिका आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या ऐक्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत.

काळेंची हकालपट्टी, पठारे ‌निलंबित

जिल्हाध्यक्ष लोंढे यांनी पवन पवार रिपाइंचा सदस्य नसल्याचे सांगून त्यांना समर्थन देणाऱ्या विश्वनाथ काळे यांची पक्षातून हकालपट्टी, तर रामाभाऊ पठारे यांना सहा महिन्यांसाठी निलंबित केल्याचे जाहीर केले.

सदस्यसंख्या वाढविण्यावर भर

आगामी त्र्यंबकेश्वर व इगतपुरी नगरपालिकेत सदस्य संख्या कशी वाढवता येईल, यासाठी माझा दौरा आहे. त्यात नाशिकचा निरीक्षक म्हणून माझ्यावर नुकतीच जबाबदारी सोपवली असल्याचेही त्यांनी सांगितले. आमचे संघटन चांगले असून, पक्षही सक्रिय आहे पण, सदस्य निवडून येत नाहीत. त्यामुळे त्यावर विचारमंथन करून आम्ही सदस्यसंख्या कशी वाढवता येईल यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाहुबली’मुळे छप्पर फाडके महसूल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाने जगभर दीड हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली. नाशिकमध्येही बाहुबलीने तिकिट खिडकीवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्याचे करमणूक शुल्कापोटी अडीच कोटी रुपये वसूल झाले आहेत. तर विभागात साडेपाच कोटींपेक्षा जास्त विक्रमी करमणूक करप्राप्त झाला आहे.

सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात नाशिक विभागासाठी ५५ कोटी ५० लाख रुपये इतके करमणुक शुल्काचे उद्द‌िष्ट होते. त्यापैकी ५१ कोटी ४६ लाख रुपये अर्थात ९२.७२ टक्के इतकी करमणुक शुल्कापोटी वसुली झाली होती. परंतु, गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाने सरकारला करमणूक शुल्कापोटी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे.

विभागात नाशिक प्रथम

‘बाहुबली २’ प्रदर्शित झाल्यानंतर नाशिक विभागात एकूण उद्द‌िष्टाच्या १०.१९ टक्के इतके करमणूक शुल्क मेअखेर शासनास प्राप्त झाला आहे. विभागात २ कोटी ४९ लाख १८ हजार रुपये वसुली करुन नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल १ कोटी ५२ लाख ३८ हजार रुपये वसूल झालेल्या नगर जिल्ह्याने करमणूक शुल्क वसुलीत दुसरा नंबर पटकावला आहे. मात्र, विभागातील धुळे, जळगाव व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांना कोटीचा टप्पा पार करता आला नाही. दर्जेदार चित्रपटांना नाशिककर दोन्ही हातांनी भरभरुन देतात, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

मे अखेर करमणूक शुल्क वसुली

जिल्हा शुल्क वसुली (रु. लाखांत)

नाशिक २४९.१८

धुळे ४७.५२

नंदुरबार २४.९१

जळगाव ९१.५३

नगर १२५.३८

एकूण - ५६५.५२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवार बनला आनंदवार…

$
0
0

कलासंगम मटा आर्ट फेस्टमध्ये सहभागी झालेल्या नाशिककरांनी आमचा रविवार आनंदवार बनल्याची भावना व्यक्त केली. तरुणाईला तर अनेक गोष्टी प्रथमच प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाल्याने त्यांनीही हा अनोखा फेस्ट एन्जॉय केला.

--

कलासंगम या ‘मटा’च्या आर्ट फेस्टमुळे आमचा रविवार अगदी आनंदवार होऊन गेला. विविध हौशी कलावंतांनी कार्यक्रमांत रंगत आणली. या उपक्रमाद्वारे खूप काही शिकता आले. ‘मटा’ने पुढील वर्षीही हा कलासंगम महोत्सव आयोजित करावा.

-समीर परदेशी

--

‘मटा’ने आयोजित केलेल्या कलासंगम आर्ट फेस्टमध्ये खरोखरच विविध कलांचा संगम पाहायला मिळाला. मनाला भुरळ घालणारे विविध विषयांवरील पेंटिंग्ज, तसेच विविध प्रकारची शिल्प यामुळे कलासंगमची रंगत आणखीच वाढली होती.

-संदीप बोराडे

--

‘मटा’ने कलासंगम या आर्ट फेस्टच्या रुपाने नाशिककरांना कलागुणांच्या सादरीकरणासाठी अतिशय उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या अनोख्या आर्ट फेस्टद्वारे भरपूर नवनव्या गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळाल्या.

-प्राची पाटील

--

कलासंगम आर्ट फेस्टमधील चित्रे, शिल्प, छायाचित्रे फारच अप्रतिम होती. हौशी कलावंतांचे सादरीकरणही मस्त होते. कलेला अतिशय जवळून अनुभवण्याची संधी मला केवळ ‘मटा’मुळेच मिळाली, त्याबद्दल ‘टीम मटा’ला धन्यवाद!

-चेतन पाटील

मी प्रथमच माझे लाइव्ह पोर्ट्रेट काढले. ‘मटा’ने जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मुलाने सादर केलेली लावणी अन् डोक्याने पियानो वाजवणे या वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. कॉलेजियन्सचा मिळालेला सपोर्ट हे या फेस्टचे यश ठरले.

-साक्षी काबरा

---

मटा आर्ट फेस्टमध्ये माझ्यासारख्या तरुणाईला अनेक गोष्टी पाहायला, शिकायला मिळाल्या. अनेक आर्टिस्टचे चित्रप्रदर्शन बघून कलेच्या बाबतीत नाशिक कुठेच मागे नसल्याचे जाणवले. मटाने असे फेस्ट ग्रामीण भागासह सर्वच कॉलेजमध्ये घ्यावेत.

-जनार्दन गायकवाड

--

सर्व छोट्या-मोठ्या कलाकारांना या फेस्टमुळे संधी मिळाली. त्यामुळे भविष्यात नक्कीच मोठ्या व्यासपीठावर अनेकांना संधी मिळेल यात शंका नाही. हा आर्ट फेस्ट नाशिकसाठी जणू पर्वणीच ठरला. लाइव्ह गाणी एेकताना मजा आली.

-धीरज बच्छाव

--

नाशिकमध्ये पहिल्यांदा असा आर्ट फेस्ट झाला. ‘मटा’चे प्रत्येक इव्हेंट्स खूप खास असतात, त्यांना आम्ही सहकुटुंब हजेरी लावतो. चित्रप्रदर्शन, लाइव्ह कॉन्सर्ट रॉक बँड्सने धमाल आणली. वेगळाच माहोल तयार करणाऱ्या ‘मटा’चे आभार.

-रुही आरोटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला दर आवाक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

शेतकरी संपामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली होती. मात्र रविवारी नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची दुप्पट आवक झाली. यामुळे दरात घसरण झाली. मुंबईसह, गुजरातमध्ये भाजीपाला नेहमीप्रमाणे विक्रीसाठी जाऊ लागला आहे. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर शेतकरी संप मागे घेतल्याने येत्या आठवड्यात भाजीपाल्याची आवक वाढण्याची शक्यता असून, दर आवाक्यात आल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

विविध मागण्यांसाठी शेतकरी १ जूनपासून संपावर गेले होते. यामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली होती. शहरात भाजीपाला दुप्पट दराने विक्री होत होता. यामुळे जेवणातून भाजीपाला कमी होऊन अंडे, डाळी, कडधान्य यांचे प्रमाण वाढले होते. यामुळे अंड्यासह कडधान्याचेही दर वाढले होते. संपाची धार कमी झाल्यानंतरही फारशी आवक होत नव्हती. यामुळे दर चढेच होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून बाजार समितीत आवक वाढू लागली आहे. रविवारी भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली. याचा दरावर परिणाम झाला. गेल्या आठवड्यात दामदुप्पट झालेल्या भाजीपाल्याचे दर प्रचंड आवकेमुळे पूर्वपदावर आले आहेत. रविवारी सर्व पालेभाज्या व फळभाज्यांचे दर तीस ते चाळीस रुपये किलोदरम्यान स्थिरावले. संपाबाबत संभ्रमावस्था असल्याने भाजीपाला आवकेवर परिणाम झाला. आता मात्र संप मागे घेतल्याचे जाहीर केल्याने आवक नियमित सुरू होणार आहे.

पालेभाज्या तेजीत

रविवारी बाजार समितीत पालेभाज्यांनी चांगलाच भाव खाल्ला. मेथीच्या जुडीला २५ ते ५५ रुपये दर मिळाला. कांदापात, शेपू, पालक, कोथिंबीर यांचे दर दहा रुपयांच्या पुढे होते. दोन ते तीन दिवसात आवक कमी झाल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भाजीपाला बाहेर रवाना

संपामुळे मुंबईसह गुजरातमध्ये भाजीपाला पाठविणे बंद झाले होते. मात्र दोन दिवसांपासून नियमित भाजीपाला रवाना होऊ लागला आहे. यामुळे भाजीपाल्याला चांगले दर मिळत शकतील.

किलोचे दर

टोमॅटो - १० ते १५, वांगे - २०, कारले - ३० ते ३५, गिलके - ३० ते ३५, दोडके - ३० ते ३५, भेंडी - २० ते २५, मिरची - ४० ते ५०, गवार - ३०, कोबी - १०, फ्लॉवर - १०, काकडी - १५ ते २०, मेथी - २५ ते ५५ जुडी, कोथिंबीर - ५ ते २५, शेपू - १५ ते २०, पालक - ५ ते १०, कांदापात - १५ ते ३०, भोपळा - ५ ते १० नग

आंबा दरात घसरण

नाशिक : फळांच्या राजा आंब्यांची आवक चांगली असल्याने दरात घसरण झाली आहे. ४० रुपयांपासून १२० रुपये किलोने आंब्यांची विक्री होत आहे. पावसाला सुरुवात झाल्याने आंबा दरावर त्याचाही परिणाम झाला आहे. लोणचे भरण्यासाठी कच्चा कैऱ्यांची मात्र मागणी वाढली आहे. गेल्या महिन्यात आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. मात्र दरात घसरण झाल्याने दर आवाक्यात आले आहेत. सफरचंदाचे दर जैसे थे आहेत. चिकू ६० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहेत. पपईची बाजारात आवक कमी असूनही दर मात्र ३० रुपये किलोवर ‌स्थिरावले आहेत. टरबुजांचीही आवक घटली आहे. टरबूज २० रुपये किलोने विक्री होत आहेत. अननस ५० ते ८० रुपये नगाने विक्री होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्ट फेस्टमध्ये हरखले कलारसिक

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता तूच करता आणि करविता, देवाचिया द्वारी उभा क्षणभरी, माझा सखा पांडुरंग... आदी सुमधूर भक्तिगीतांच्या सुरावटींत नाशिककर कलारसिक हरखून गेले होते. निमित्त होते, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित कलासंगम आर्ट फेस्टचे. बहारदार गाणी, सुगम संगीत, मंत्रमुग्ध करणारे ताल अन् स्वर यासोबतच विविध कलांचा आविष्कार याची अफलातून मेजवानी नाशिककर रसिकांनी रविवारी कमालीची एन्जॉय केली.

‘मटा’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन सोहळ्यानिमित्त नाशिकमधील हौशी कलाकार, तसेच कलाप्रेमींना हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता कलासंगम हा दोनदिवसीय आर्ट फेस्ट आयोजित करण्यात आला होता. शनिवारप्रमाणेच रविवारीही मविप्रच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये सकाळी १० वाजल्यापासूनच आर्ट फेस्टची रंगत वाढत गेली.

पुष्कराज भागवत आणि त्यांच्या सहकलावंतांनी कलाकारांनी मिळून भक्तिगीते, भावगीते, शास्त्रीय संगीत सादर करीत कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. वंदे मातरम या देशभक्तीपर गीतावर गायत्री देशपांडे हिने सादर केलेल्या भरतनाट्यमला प्रेक्षकांनी कमालीची दाद दिली. ज्योती चव्हाण यांनी अॅबस्ट्रॅक स्टाइलने अमूर्त चित्रशैलीचे रेखाटन केले. सोबतच अतुल भालेराव यांनी लॅण्डस्केपची चित्रशैली, तर बाळासाहेब पारसकर यांनी व्यक्ती स्केच रेखाटत आपली कला सादर केली. नारायण चुंबळे यांनी आर्ट फेस्टच्या प्रवेशद्वारावर एका काल्पनिक मॉडेलची रांगोळी रेखाटून प्रेक्षकांना आकर्षित केले. यासोबतच ऋषिकेश पगारे याने तबल्यावर तीनताल आणि बंदिश सादर करीत दर्दी दाद मिळविली. प्रिहास पवार याने की-बोर्डवर गाण्यांची धून वाजवत रसिकांची मने जिंकली. यासोबतच विविध कलाविष्कार आर्ट फेस्टमध्ये सादर करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अनेक हौशी कलाकारांनी आपली कला सादर करीत रसिकांची दाद मिळवली. नाशिकमधील टॅलेंट बघण्यात नाशिककरदेखील हरखून गेल्याचे दिसून आले.

--

भक्तिगीतांची बरसात

कानडा राजा पंढरीचा… यासारखी पंढरपूरच्या वारीला अनुसरून अनेक भक्तिगीते पुष्कराज भागवत आणि टीमने सादर केली. यासोबत घेई छंद मकरंद, फिटे अंधाराचे जाळे या गाण्यांची मेजवानीही नाशिककरांनी अनुभवली. या मैफलीत गिटारवादन साक्षी काबरा, तबलावादन गौरव तांबे आणि कुणाल काळे, साइड ह्रिदम अमित भालेराव, तर संगीत साथ भूषण खालोखे यांनी केली.

..

हे ठरले आकर्षण...

राघव बाग याने बचना एे हसिनों लो मैं आ गया, ना सिखा कैसे जिना... यांसारख्या वेस्टर्न गाण्यांवर रॉकबॅण्डची पेशकश केली. राजलक्ष्मी कुलकर्णी हिने शास्त्रीय गायनातील मालकंस हा राग सादर केला. सूरज चेके याने मला जाऊ द्या ना घरी या लावणीवर मराठमोळी अदा सादर केली. प्रेक्षकांनी शिट्ट्या-टाळ्यांच्या गजरात त्याला दाद दिली. नंदकुमार आढाव याने डोक्याने पियानो वाजवत रसिकांची मने जिंकली. ह्रिदम म्युझिक या ग्रुपने मला वेड लागले प्रेमाचे, ये मौसम ये राते ये नदी का किनारा यांसारखी अनेक लोकप्रिय मराठी-हिंदी गीते सादर केली. एबीसीएल या डान्स ग्रुपच्या कलाकारांनी सोलो आणि ग्रुप डान्स सादर करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.



चिमुकल्या साराची अदाकारी

सारा अरोरा या साडेचार वर्षांच्या बालिकेने आपली नृत्यकला आर्ट फेस्टमध्ये सादर केली. बद्री की दुल्हनिया... या गाण्यावर साराने ठुमकेदार अदा सादर करत प्रेक्षकांचा उत्साह वाढविला. यावेळी प्रेक्षकांनीही ठेका धरत साराला साथ दिली. साराच्या नृत्याने आर्ट फेस्टची रंगत कमालीची वाढली.



थिंक आउट ऑफ बॉक्स

शिल्पकार यतिन पंडित यांनी स्क्रॅब स्टाइलमध्ये गाड्यांचे वेस्ट मटेरियल वापरत आपला कलाविष्कार आर्ट फेस्टमध्ये दाखविला. थिंक आउट ऑफ बॉक्स ही थीम घेऊन यतिन पंडित आणि टीमने तीन फिगर असलेली मोठी कलाकृती तयार केली. विचारांच्या दुनियेत गुंतून बसण्यापेक्षा क्रिएटिव्ह काही तरी करा. कलाकाराला आउट ऑफ बॉक्स विचार करूनच नेमकं काय ते साध्य करायचं असतं, असे याद्वारे अधोरेकित झाले. ‘मटा’च्या आउट ऑफ बॉक्स इव्हेंटमुळे कलासक्त तरुणाईला अपग्रेड होण्याची संधी मिळाल्याचे दिसून आले.

--

संकलन ः सौरभ बेंडाळे, पवन बोरस्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पावसाची जोरदार हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बरसणाऱ्या पावसाने रविवारी शहरातही जोरदार हजेरी लावली. रविवारच्या सुटीचा फायदा घेत काही हौशी नाशिककरांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. मात्र, ऐन सायंकाळी आलेल्या पावसाने विक्रेत्यांची धांदल उडवत नागरिकांच्या खरेदीच्या नियोजनावरही पाणी फिरविले. त्यामुळे नागरिकांत दिवसभर असलेला खरेदीचा उत्साह सायंकाळी मावळला.

गेल्या तीन-चार दिवसांपासून ग्रामीण भागात पाऊस जोरदार हजेरी लावतो आहे. मात्र, शहरवासीयांना मात्र दाटून येणाऱ्या ढगांवरच समाधान मानावे लागत होते. पाऊस वाटेत कोठेही गाठू शकतो याचा पूर्ण अंदाज शहरवासीयांना आला असला तरी पावसाच्या सरी बरसण्याचे नाव घेत नव्हता. त्यामुळे नागरिकांची निराशा होत होती. रविवारी सकाळपासूनच शहरावर ढगाळ वातावरणाने मांडव धरला होता. दुपारी काही वेळ उन्हाचा चटका जाणवला, परंतु पुन्हा तीननंतर ढग जमून आले. दुपारी सव्वाचार ते साडेचारच्या सुमारास शहराच्या बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली. पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शहरवासीय सुखावले. पावसाचा आनंद घेण्यासाठी बच्चे मंडळींसह तरुणाईदेखील घराबाहेर पडली. त्यामुळे यंदाचा रविवार खऱ्या अर्थाने पावसाचा आनंद लुटण्याचा वार ठरला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. मात्र, पुन्हा साडेसहानंतर ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्यानंतर काही वेळ पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या नऊ तासांत शहरात २६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ग्रामीण भागात चांदवड, मनमाड, नांदगावसह आणखी काही भागात पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवामान असले तरी रविवारी कमाल तापमान ३३.२ आण‌ि किमान तापमान २३.५ अंश सेल्स‌िअस एवढे नोंदवले गेले.

खरेदीच्या नियोजनावर पाणी

एकीकडे काही लोक पावसाचा आनंद लुटत असताना व्यापारी वर्गाच्या व्यवसायावर मात्र या पावसाने विपरीत परिणाम केला. कामगार आणि नोकरदार वर्गाचे पगार झाले असून, लवकरच शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेकांनी रविवारची ही सुटी बच्चे मंडळींच्या गणवेश, वह्या- पुस्तके व तत्सम खरेदीसाठी राखून ठेवली होती. मात्र, सायंकाळी पावसाने हजेरी लावत नागरिकांच्या नियोजनावर पाणी फिरविले. त्यामुळे सायंकाळी शहरातील मेनरोडसह सर्वच मुख्य बाजारपेठांमध्ये गर्दीचा ओघ कमी असल्याचे पाहावयास मिळाले. अर्थात, काही नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन दुपारीच खरेदी आटोपली.

जिल्ह्यात ६९.२ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारचा पूर्ण दिवस आणि रविवारी सकाळी साडेआठपर्यंत ६९.२ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीत शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तेथे ३७.० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बागलाणमध्ये २४, तर येवल्यात पाच मिलिमीटर पाऊस झाला. देवळ्यात २.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ४.६ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असून, १ ते ११ जून या कालावधीत ९४६ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ६३.९ मिलिमीटर पाऊ‌स झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावरील पाणीटंचाई होणार दूर

$
0
0

भवानी तलावासाठी अडीच कोटींच्या निधीस मान्यता

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंगी गडास पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाचे रुपांतर साठवण तलावात करण्यासाठी सरकारने २ कोटी ४९ लाख ७१ हजारांचा निधी मंजूर करीत त्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे आता गडावर उन्हाळ्यात दरवर्षी भेडसावणारी तीव्र पाणीटंचाईची समस्या मिटणार असल्याने सप्तशृंगी गड ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

सप्तशृंगी गाव व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांना लागणाऱ्या पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी भवानी पाझर तलावातील पाणी वापरले जाते. मात्र या तलावाला गळती लागल्याने ३० ते ३५ टक्के पाणी वाया जाते. तसेच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला असल्याने तलावातील साठवण क्षमताही कमी झाली आहे. गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दीबरोबरच गडावरील लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची गरजेपेक्षा पाणीसाठा कमी राहात असल्याने उन्हाळा सुरू होताच रहिवाशी व न्यासास पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.

परिणामी टंचाई काळात ग्रामस्थ, हॉटेल व्यवसायीकांबरोबरच ग्रामपंचायत व ट्रस्टला पाणी वाहून आणण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. याबाबत गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंगी ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच गिरीश गवळी व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी भवानी तलावाची गळती थांबविणे व तलावाची क्षमता वाढविण्याच्या कामासाठी पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे व अधिकाऱ्यांकडे पाणीप्रश्न सोडविण्यासाठी निवेदने दिली.

पाठपुराव्यास मिळाले यश

त्याबाबत राज्यमंत्री दादा भुसे यांनी काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी व संबधित विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गडावरील भवानी तलावाच्या कामाबाबत सूचना केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी हेही गडावर आले असता राजेश गवळींनी तलावाच्या गळती व क्षमता वाढविण्याची मागणी केली होती. तर दोन महिन्यापूर्वी गडावरील प्लास्टिक बंदी मोहिमेच्या शुभांरभासाठी आलेल्या जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनीही भवानी तलावाचे काम मार्गी लावण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपअभियंता धुम, मेरीचे कार्यकारी अभियंता तांबोळी, शाखा अभियंता गुंजाळ यांनी तलावाची पाहाणी करून कामाचा प्रशासकीय अहवाल शासनास सादरही केला होता. त्यानुसार भवानी पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करण्याचा प्रशासकीय मान्यता आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता लघुसिंचन, नाशिक यांना दिला आहे.

या कामाने आता तलावाची गळती थांबवून गाळ उपसा होणार असल्याने तलावातील पाणीसाठ्याची क्षमता वाढणार आहे. तसेच सप्तश्रृंगी गडवासींयाची पाण्यासाठी वणवण थांबणार आहे. सप्तशृंगी गडावरील सुमारे पंधरा वर्षांपासूनची पाणीटंचाई साठवण तलावाच्या माध्यमातून दूर होणार आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून भवानी तलावाच्या कामासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाल्याचा निश्चितच आनंद होत असल्याची प्रतिक्रिया राजेश गवळी यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, उपसरपंच ललिता व्हरगळ, सदस्य जगन बर्डे, हसंराज बर्डे, मेघा बर्डे, जयश्री गायकवाड, ग्रामसेवक आर. बी. जाधव, विजय वाघ यांच्यासह सप्तशृंगी न्यासाचे विश्वस्त, अधिकारी व ग्रामस्थांचेही तलावाच्या कामाच्या मागणीसाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहरातील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या देखभालीकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. मंदिर प्रांगणातील फरसबंदीच्या सिमेंट निघाल्याने असून, ठिकठिकाणी खळगे पडले आहेत. यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक ठेचकाळतात. आता पावसाळ्यात त्यात पाणी साठल्याने अधिक झीज होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पर्यटकांसाठी पावसाळ्यात पसंतीचे डेस्टिनेशन असणाऱ्या त्र्यंबकेश्वरला दरवर्षी लाखो भाविक येतात. मात्र त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा या कितपत चांगल्या आहेत, याबाबत मात्र व्यवस्थापन लक्ष देताना दिसत आहे. यात प्रामुख्याने मंदिर परिसरातील समस्यांबाबत पुरातत्त्व खात्याचे अधिकार आहेत, असे सांगितले जाते. मात्र व्यवस्थापनाने संबंधित खात्याचा पाठपुरावा करून डागडुजीचं हे काम तातडीने करणे गरजेचे आहे. देशविदेशातून येणाऱ्या भाविकांना अशाप्रकारे दुरवस्था दिसल्यास ते नापसंती व्यक्त करत असल्याचे चित्र सध्याला पाहण्यास मिळत आहे. तरी याबाबत कोण पुढाकार घेणार हाच प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्किटेक्ट देवरे यांचा ‘अर्कासिया’ने सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील नामवंत आर्किटेक्ट रोहन देवरे यांनी डिझाइन केलेल्या नाशिकच्या बोटक्लब पॅव्हेलियन व सी प्लेन टर्मिनलसाठी आशियास्तरावरील ‘अर्कासिया’ पुरस्कार मिळाला आहे. नुकत्याच जयपूर येथे झालेल्या एक कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही डिझाइन भविष्यातील वाहतुकीसाठी एक उत्तम संकल्पना समजली जाते.

‘अर्कासिया’ म्हणजे आर्किटेक्टस रिजिनल कौन्सिल ऑफ एशिया ज्यामध्ये आशिया खंडातील २१ देशांचा समावेश आहे. यावर्षी या कौन्सिलच्या बैठकीचे यजमानपद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसने भूषवले. आर्किटेक्ट रोहन देवरे यांच्या समवेत या पुरस्कारासाठी सुमारे २१ देशांमधून दहा विविध श्रेणीत सुमारे ७२८ प्रवेशिका आल्या होत्या. जयपूरमध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, राजस्‍थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आदी मान्यवर उपस्थित होते. याच डिझाइनसाठी आर्किटेक्ट रोहन देवरे यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टतर्फेहि प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामस्थांच्या सतर्कतेने एक शिकारी जेरबंद

$
0
0

गोळी लागून एक नर काळवीट ठार

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील वनविभागाच्या हद्दीत हरणांची शिकार करण्यासाठी आलेल्या एका शिकारी टोळीने एका नर काळवीटाची गोळी झाडून शिकार केली. मात्र, परिसरातील सतर्क ग्रामस्थांनी सिनेस्टाइल पाठलाग करीत शिकारी टोळीतील एक शिकारीच ग्रामस्थ अन् वनविभागाच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. शिकारी टोळीतील इतर चार शिकारी मात्र आलेल्या वाहनातून पसार होण्यात यशस्वी झाले. येवला तालुक्यातील राजापूर वनहद्दीतील कोळम येथे शनिवारी (दि. १०) सायंकाळी ही खळबळजनक घटना घडली.

तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील वनविभागाच्या हजारो हेक्टर वनक्षेत्रात हजारो हरणे, काळवीट आदी वन्यजीवांचा संचार असतो. याच वनक्षेत्रातील जंगलामध्ये बंदूक, सर्चलाईट आदी सामानानिशी हरणांची शिकार करण्यासाठी आलेल्या एका शिकारी टोळीचा पाठलाग करून टोळीतील एकास पकडण्यास शनिवारी सायंकाळी ग्रामस्थांना यश आले. तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीतील कोळम शिवारात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाच जणांच्या टोळीने इंडिगो सीएस गाडीमध्ये येऊन हरणांचा पाठलाग करून गोळी झाडली. यावेळी एक चार वर्षांचे नर काळवीट बंदुकीचा निशाण्‍ाा साधला जाताना पोटात गोळी लागल्याने जागीच गतप्राण झाले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी या शिकाऱ्यांचा पाठलाग करीत एकाला पकडले, तर उर्वरित ४ शिकारी आलेल्या वाहनातून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपरिमंडल अधिकारी अशोक काळे, वनरक्षक दौंड व वन विभागाची टीम घटनास्थळी तत्काळ हजर झाली. यावेळी पकडण्यात आलेल्या संशयीत शिकाऱ्याला ग्रामस्थांनी वनविभागाच्या ताब्यात दिले. संशयित शिकाऱ्याचे नाव दस्तगीर मोहंमद हारून (वय २४, रा. मालेगाव) आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर या मृत काळविटाचे पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचे दफन करण्यात आले. वनविभागाच्या तावडीत आलेल्या दस्तगीर मोहंमद हारून याच्यासह पसार झालेल्या त्याच्या इतर साथीदारांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला असून, त्याला न्यायालयाने १६ जूनपर्यंत फॉरेस्ट कोठडी सुनावली आहे. वनविभागाचे अधिकारी दस्तगीर याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिकारी अशोक काळे, वनरक्षक दौंड, पाटील, शिरसाठ, वाघ, टेकनर, सोनवणे, वनसेवक वाघ, लोंढे, गंडे, आहेर, मोहन गायकवाड आदी तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलपंप संपाची घोषणा १३ जूननंतर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरातील सर्व पेट्रोलपंपांवर १६ ते २४ जून दरम्यान पेट्रोल आणि डिझेलची खरेदी-विक्री बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप डिलर्स असोसिएशनने घेतलेला नाही. याबाबत १३ जूनला डिलर्स असोसिएशनची देशव्यापी संघटना सीआयपीडीशी बैठक होईल. त्यानंतर त्यावर निर्णय होईल, अशी माहिती नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले, सचिव आनंद काकड, उपाध्यक्ष साहेबराव महाले यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात दररोज चढ-उतार होत असल्याने दरदिवशी पेट्रोल-डिझेलचे दर बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्सने विरोध दर्शवला आहे. देशातील सर्व ऑइल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे डिझेल-पेट्रोलचे दर रोज बदलण्याचे ठरवले आहे. नवीन तंत्रज्ञान येणे, बदल होणे या गोष्टीचे फामपेडा स्वागतच करते. मात्र याद्वारे डीलरला सरळ सरळ होणारे आर्थिक नुकसान व इतर बाबी फार मोठ्या आहेत. डिलरला विश्वासात न घेता तसेच ऑइल कंपन्यांनी स्वतःची तांत्रिक बाजू सक्षम नसताना घेतलेला हा निर्णय आहे. याद्वारे पेट्रोल डिलरची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होणार आहे, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.

फामपेडाशी संलग्न असणाऱ्या सीआयपीडी या देशव्यापी संघटनेने याबाबत विचारणा केल्यानंतर ऑइल कंपन्यांनी सीआयपीडीला १३ जून २०१७ रोजी बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीनंतरच भूमिका ठरणार आहे.

रोज बदलणार किमती

भारतातील सर्व तेल कंपन्या १६ जूनपासून देशभरात रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेणार आहेत. सायंकाळी ज्या किमतीत पेट्रोल भरले असेल त्याच किमतीत सकाळी पेट्रोल मिळेल असे आता होणार नाही. कधी पेट्रोल स्वस्त तर कधी महाग मिळणार असल्यामुळे ग्राहकांचाही गोंधळ उडणार आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या महत्त्वाच्या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलपंपचालकांनी त्यास विरोध करणे सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विठ्ठल नाम गाऊ मुखी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

टाळ दिंडी घेऊ हाती, विठ्ठल नाम गाऊ मुखी, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे...! असे म्हणत भागवत धर्माची उदात्त शिकवण व वारकरी संप्रदायाची पिढ्यांपिढ्यांची असलेली परंपरा जपत खांद्यावर पताका, हाती टाळांचा गजर करणारे वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना तिसऱ्या दिवशीच्या दुपारच्या विसाव्यासाठी नाशिकरोडला आगमन झाले. त्यावेळी हजारो भाविकांना पालखीचे दर्शन घेतले.

नाशिक-पुणे महामार्गावरून मुक्तिधामच्या दिशेने येणाऱ्या पालखीचे बिटको चौकात आगमन झाले. नाशिकरोडकरांच्या वतीने खासदार हेमंत गोडसे, रमेश गायकर, गोरख खर्जुल आदींनी मुक्तिधामच्या प्रवेशद्वारावर स्वागत करीत केळाच्या प्रसादाचे वाटप केले. पालखीचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रस्त्यावर जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. खासदार गोडसे यांच्या हस्ते पंचोपचार विधी, आरती करण्यात आली.

पुढील मुक्कामाकडे प्रस्थान

पालखीसह वारकऱ्यांनी आपल्या पुढील मुक्कामाकडे प्रस्थान करताना वारकरी संप्रदाय केवळ ‘पंढरीसी जावे ऐसें माझे मनी, विठाई जननी भेट केंव्हा’ हा एकाच ध्यास उराशी बाळगत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई व पुंडलिक वर दा हरी विठ्ठलचा गजर करीत पंढरीच्या दिशेने कूच केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रवेशोत्सवा’ने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यांच्या आनंदांनतर विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे तसेच त्यांना हसत खेळत शिक्षण मिळावे, यासाठी यंदाही शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. शाळेच्या परिसरात रांगोळ्या काढून, वर्ग पताकांनी सजवून तसेच विद्यार्थ्यांना फूल देऊन, त्यांना गोड खाऊ वाटून हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खास बनवला जाणार आहे.

शाळेचे नवे शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी उत्सुकतेबरोबरच पुढील वर्गाच्या अभ्यासाची चिंताही घेऊन येते. नवे विषय, नवे शिक्षक, नवी पाठ्यपुस्तके यात रमण्यात विद्यार्थ्यांना वेळ द्यावा लागतो. तर काही विद्यार्थ्यांना याचे दडपण येते. उन्हाळ्याच्या सुटीत केलेल्या मौजमजेमुळे अनेकांना तर शाळेत जाणेच नकोसे होऊन जाते. अशा विद्यार्थ्यांना शाळा हवीहवीशी वाटावी, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून शाळा प्रवेशोत्सव ही संकल्पना शाळेच्या पहिल्या दिवशी राबवली जाते. १५ जूनला शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांकडे तीन दिवसांचा कालावधी प्रवेशोत्सवाच्या तयारीसाठी आहे. त्यादृष्टीने शिक्षकांनी नियोजनही केले आहे. यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी देशभक्तीपर गीते, प्रभातफेरी, प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची नावे लाऊड स्पीकरवर घोषित करण्यात येणार आहे. शाळेत बालकांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच वर्षभर शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती, एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही, याविषयी प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठई वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही काही शाळा करणार आहेत.

शाळा सजावटीवर भर

शाळेचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थी शाळेत येताच त्याला प्रसन्न वाटावे यासाठी शाळा सजावटीवर भर देण्यात येणार आहे. यासाठी शाळा परिसर स्वच्छ करुन, सडा टाकून, रांगोळी, फुलापानांची तोरणे, पताका बांधून वर्ग खोल्या सुशोभित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाम नाही, तर काम नाही!

$
0
0

पगार मिळत नसल्याने १९ जूनपासून शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या चार महिन्यांपासून पगार थकले असून त्यावर कोणताही मार्ग काढला जात नसल्याने आता ‘दाम नाही तर काम नाही’ अशी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. त्यामुळे १९ जूनपासून बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य संस्थाचालक संघटना (महामंडळ) व नाशिक जिल्ह्यातील सर्व संघटना यांची संयुक्त सहविचार सभा रविवारी व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. विजय नवल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली. संस्थाचालक महामंडळानेही यावेळी शाळा बंदला पाठिंबा दिला.

गेल्या चार महिन्यांपासून शिक्षकांचे पगार जिल्हा बँकेकडे थकीत आहेत. वारंवार आंदोलने करुनदेखील हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आता दाम नाही तर कामदेखील नाही, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. याविषयी या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार १५ जूनपासून सर्व शाळा सुरू होणार असून, सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करावे, १६ जून रोजी पालक मेळावे घेऊन पगाराबाबत पालकांमध्ये जागृती करावी व सरकार कशा पद्धतीने शिक्षकांच्या पगाराबाबत निर्दयी भूमिका घेत आहे व हक्काचे पैसेदेखील देत नाही ही बाब त्यांच्या लक्षात आणून देत पालकांचा पाठिंबा मिळवावा, असे नियोजन आखण्यात आले आहे. त्यानंतर १७ जून रोजी मुख्याध्यापकांसह संपाची नोटीस संस्थाचालकांना देऊन १९ जूनपासून बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला. संस्थाचालक, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांनी एकत्र येऊन हे शाळा बंद आंदोलन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जोपर्यंत पगार हातात मिळत नाही, तोपर्यंत शाळा बंदच राहतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी कोंडाजीमामा आव्हाड, अॅड. जयसिंग सांगळे, संदीप गुळवे, राजेश गडाख, जिल्हा समन्वय समिती शिवाजी निरगुडे, फिरोज बादशाहा, संजय चव्हाण, शशांक मदाने, साहेबराव कुटे, के. के. अहिरे, एस. बी. देशमुख, एस. बी. शिरसाठ, मोहन चकोर, प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते.


बैठक घेण्याचे आवाहन

मुख्याधापक संघ, जिल्हा टीडीएफ अध्यक्ष व कार्यवाह, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक परिषद, शिक्षक सेना, शिक्षक भारती, मनसे शिक्षक सेना, शिक्षक परिषद, कला व क्रीडा संघटना, शहर मुख्याध्यापक संघ व सर्व संघटना, शिक्षकेतर संघटना, कास्ट्राइब संघटना, अपंग संघटना, खासगी प्राथमिक शाळा, इस्तू संघटना, आश्रम शाळा संघटना यांनी आपापल्या तालुक्यातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याचा अहवाल मुख्याध्यापक संघाला १४ जूनपर्यंत कळवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावरगावचा पाणीसाठा ४० लाख लिटरने वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी परिस्थ‌िती निर्माण होऊ नये, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविली जात आहे. सूलानेही सीएसआर निधीतून योगदान दिले असून त्यातून सावरगाव येथील पाझर तलावाची पाणीसाठवण क्षमता ६४ लाख लिटरने वाढली आहे.

या योजनेंतर्गत कामे करण्यासाठी सीएसआर निधी द्यावा, असे आवाहन राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाने उद्योगांना केले आहे. नाशिकमधील सूला कंपनीने त्याअंतर्गत मे २०१६ पासून काही कामे हाती घेतली होती. त्याअंतर्गत गंगापूर धरणातून २८८ ट्रक गाळाचा उपसा करण्यात आला. त्यामुळे २५ लाख लिटर पाणीक्षमता वाढली आहे. सावरगाव येथेही पाझर तलावातूनही ६४३ ट्रक वाळूचा उपसा करण्यात आला. त्यातून ६४ लाख लिटर पाण्याची क्षमता वाढविण्यात यश आले आहे. यापूर्वीही निफाड तालुक्यातील महाजनपूर, भेंडाळी, औरंगपूर या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे ३४७ लाख लिटर पाण्याचे क्षेत्र वाढले आहे. सावरगाव पाझर तलावात २५ मेपासून गाळ उपसा प्रकल्प हाती घेण्यात आला. आतापर्यंत तीन हजार ७७८ क्युबिक मीटर माती काढण्यात आली आहे. या माध्यमातून ४० लाख लिटर पाणी साठवण क्षमता वाढेल आणि सावरगावमधील रहिवाशांना त्याचा लाभ मिळेल, असा विश्वास सूला व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफवांचा बाजार त्रासदायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोमवारची सकाळ.. दहावीचा निकाल काय लागणार या चिंतेत विद्यार्थी, पालक. तर दुसरीकडे किती मार्क्स विचारले हे विचारण्यासाठी सातत्याने खणाणणारे फोन.. दहावीचा निकाल सोमवारी, १२ जून रोजी जाहीर होणार या अफवेचे गारुड इतके पक्के झालेले की ज्या घरात दहावीची परीक्षा दिलेला मुलगा, मुलगी आहे, त्यांना या परिस्थितीचा सामना सोमवारी करावा लागला. दहावीचा निकाल १२ जून रोजी जाहीर होणार, व्हॉट्सअॅपवरून फिरणाऱ्या या अफवेमुळे अनेकांना डोकेदुखी झाली.

सोशल मीडियाचे वाढता प्रभाव सामाजिक परिस्थितीच्या संवेदनशीलतेला धक्का पोहोचवत असल्याचे वारंवार समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरात घडलेली एक घटना अधिक पेटवण्यासाठी समाजकंटकांनी व्हॉट्सअॅप या माध्यमाचा वापर केला होता. अखेरीस आठवडाभर शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यापर्यंतचे पाऊल प्रशासनाला उचलावे लागले होते. सोशल मीडियामुळे सामाजिक शांतता कशी संकटात सापडली आहे, याचे प्रत्यक्ष चित्रच यानिमित्ताने समोर उभे राहिले होते. तशीच परिस्थिती दहावी, बारावीच्या निकालांबाबत सोमवारी दिसून आली. निकालाबाबत राज्य मंडळाकडून कोणतीही तारीख जाहीर केली जात नसतानाही खोट्या तारखा पसरवल्या जात आहेत. या दोन्ही परीक्षांना विद्यार्थी अधिक महत्त्व देतात. त्यामुळे साहजिकच पालक, विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता, चिंता सर्व काही असते. त्यातच सातत्याने कानावर आदळणाऱ्या या अफवांनी पालक, विद्यार्थी हैराण झाले होते.

नेटिझन्सचा उतावीळपणा

इंटरनेट, सोशल मीडिया यांच्या चांगल्या वापरापेक्षा गैरवापरामुळे समाजात सातत्याने वेगवेगळ्या अफवांचे पेव फोफावत आहे. कोणत्याही पोस्टची शहानिशा न करता सरळ ते इतर मित्रांना किंवा ग्रुप्समध्ये पाठवण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे कित्येकांची दिशाभूल होत आहे. एखादा तापलेला विषय अधिक पेटवून लोकांच्या मानसिकता भडकविण्याच्या उद्देशानीही अफवा पसरविल्या जात असल्याचे सातत्याने समोर येते. तर काही सुजाण नागरिकही अशा पोस्ट्सची शहानिशा न करता ते पुढे पाठवत असल्याने निकालाच्या अफवा वाढल्या आहेत.

... त्यांच्यावर गुन्हे दाखल करा!

समाजाची दिशाभूल करून त्यांना मानसिकदृष्ट्या वेठीस धरणाऱ्या समाजकंटकांवर सायबर क्राइम विभागाने गुन्हे दाखल करावे, अशा तीव्र प्रतिक्रिया पालक व्यक्त करत आहेत. मेच्या शेवटच्या आठवड्यापासून व्हॉट्सअॅपवर दहावी निकालाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सोमवारी निकाल जाहीर होणार या भीतीने एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटनाही शहरात घडली. त्यामुळे अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई व्हावीच, असा संताप व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॉगल विक्रेत्यास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गॉगल विक्रेत्यास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना त्र्यंबकरोडवरील वेदमंदिरजवळ घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दुचाकीस्वार टोळक्याविरोधात जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

दानिश प्यारेमिया अन्सारी (रा. वडाळारोड) यांनी फिर्याद दिली आहे. अन्सारी यांचे मेव्हणे ऐतेशाम इरशाद अन्सारी रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर रोडवरील वेदमंदिर परिसरात रस्त्यावर चष्म्याचे दुकान थाटून विक्री करीत होते. त्यावेळी तीन-चार मोटरसायकल्सवर आलेल्या टोळक्याने कुठलेही कारण नसताना ऐतेशाम अन्सारी यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली.

आयशरसह बाइकची चोरी

शहरात वाहनचोरीच्या घटना वाढत आहेत. आयशर मालट्रकसह दोन मोटारसायकली चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिस स्टेशन्समध्ये दाखल झाल्या आहेत. सातपूर येथील क्रांती चौकात राहणारे रतन धर्माजी पवार यांचा तीन लाख रुपयांचा आयशर मालट्रक बुधवारी रात्री सातपूर गावातील टेम्पो स्टॅण्ड भागात उभा होता. चोरट्यांनी तो चोरून नेला. सिडकोतील उत्तमनगर भागात राहणारे विजय दिलीप सूर्यवंशी हे गुरूवारी रात्री नाशिकरोड येथे गेले होते. जयराम हॉस्पिटलसमोर त्यांनी पल्सर मोटरसायकल उभी केली. चोरट्यांनी ती चोरून नेली. नाशिकरोड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. गायवाडमळा भागात राहणारे चेतन सुभाष चौधरी परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये गेले होते. चोरट्यांनी त्यांची स्प्लेंडर मोटारसायकल चोरून नेली. उपनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दुहेरी शुल्काविषयी तक्रार

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या दुहेरी शुल्कवाढीसंदर्भात नाशिकमधील व्यापाऱ्यांनी सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांची मुंबई येथे भेट घेऊन नुकतेच निवेदन दिले. बाजार समितीत दुहेरी बाजार शुल्क व प्रक्रिया केलेल्या मार्केट फी संदर्भात देशमुख यांनी वस्तुस्थिती सांगितली. या प्रकरणी लक्ष घालण्याचे देशमुख यांनी आश्वासन दिले. राजू राठी, प्रफुल्ल संचेती, परेश बोधाणी, हेमंत पवार यांनी निवेदन दिले.

विवाहिता बेपत्ता

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव (अंजनेरी) येथील विवाहित महिला शुक्रवारपासून (दि. ९) बेपत्ता झाली आहे. भारती मधुकर पगार (४१) असे महिलेचे नाव आहे. जेवण झाल्यानंतर रात्री ११ वाजेच्या दरम्यान शतपावली करण्यास जाते, असे सांगून त्या घराबाहेर पडल्या. मात्र, त्या परत आल्याच नाही. याबाबत भारती यांचे पती मधुकर पगार यांनी तक्रार दाखल केली आहे. भारती यांच्या गळ्यात आखुड लांबीचे मंगळसूत्र आहे. तसेच त्यांनी निळ्या रंगाचे ब्लाउज, निळी साडी आणि पायात काळ्या रंगाचे सॅण्डल आहेत. भारती यांना हिंदी व मराठी दोन्ही भाषा उत्तमपणे बोलता येतात. त्र्यंबक पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मागदर्शनाखाली हवालदार ए. जी. कोरडे पुढील तपास करत आहेत.

दोन मित्रांना मारहाण

चौकात बसलेल्या दोघा मित्रांना तिघांनी जबर मारहाण केली. सिडकोतील कामटवाडा भागात ही घटना घडली. यामध्ये दोघे मित्र जखमी झाले असून अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दर्शन दोंदे, पिंटू दोंदे व उत्तम दोंदे अशी संशयितांची नावे आहेत. रायगड चौकातील अशोक मोहन सानप (३१) व अजय मनोज परदेशी (१८, रा. पवननगर) यांनी या प्रकरणी वेगवेगळ्या दोन तक्रारी दिल्या आहेत. रविवारी सायंकाळी ते दोघे कामटवाड्यातील गोपाल चौकात बसले होते. त्यावेळी तिघेजण तेथे आले. येथे बसू नका, असे सांगून त्यांच्याशी वाद घातला. तसेच त्यांना मारहाण करू लागले. यावेळी संशयित दर्शन याने दोघांच्या डोक्यात धारदार चाकू मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडेराव टेकडीवर पुन्हा ‘नो एन्ट्री’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

काही दिवसांपासून लष्करी विभागाचा देवळाली परिसरात मनमानी कारभार चालला असल्याचे निदर्शनास येत आहे. आता तर नाशिक तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडेराव टेकडीकडे जाणारा मार्गच लष्करी प्रशासनाने बंद केला आहे.

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या व धार्मिक भावना रुजलेल्या खंडोबा टेकडीवर जाण्यासाठी असलेला आपल्या हद्दीतील केवळ २५ मीटरचा रस्ता लष्करी आस्थापनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव काही वर्षांपासून बंद केला होता. त्यानंतर कॅन्टोन्मेंट प्रशासनाने लष्कराची बाजू समजून घेत टेम्पल हिल उद्यानातून पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला होता. मात्र, तोही रस्ता लष्कराने बंद करण्यास कॅन्टोन्मेंट प्रशासनाला भाग पाडले. त्यानंतर बनविण्यात आलेला रस्ताही काटेरी तारीचे कुंपण उभारीत बंद केला आहे. यामुळे भाविकांचा हिरमोड झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यापूर्वी हेगलाईन, वर्क्स शॉप, स्टेशनरोड यासह इतरही रस्ते लष्कराने नागरिकांसाठी बंद केले आहे. या रस्त्यांच्या निर्मितीसाठी कॅन्टोन्मेंटचा लाखो रुपयांचा फंड वापरण्यात आला आहे.

टेकडीवर दर्शनासाठी कसे जायचे? आणि शेजारी उभारलेल्या उद्यानात बालगोपाळांनी कसे खेळायचे? अशी समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने लष्करी आस्थापनाशी चर्चा करून तातडीने बंदिस्त केलेले गेट उघडण्यात यावे; अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे, मंदिराचे विश्वस्थ उत्तम मांडे, पूजारी आमले यांच्यासह सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

उद्यानातून देणार रस्ता

खंडेराव टेकडी परिसरात अनेक नागरिक पहाटेपासूनच व्यायाम, योगा करण्यासाठी येतात. तसेच नागरिकांचा भावनिक दृष्टीकोन लक्षात घेता पहाटे ४ ते रात्री १० वाजे दरम्यान टेम्पल हिल उद्यानाचे प्रवेशद्वार कायम उघडे ठेवण्यात येईल. यासाठी तशी तयारीही कॅन्टोन्मेंट प्रशासनाने केली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगमधील संधी आज उलगडणार

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

‘महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस’उपक्रमांतर्गत ‘इंजिनीअरिंग क्षेत्रांमधील करिअर संधी’ या विषयावर मंगळवारी (दि. १३) करिअर गाइडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीमधील आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेजमधील सेमिनार हॉलमध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

बारावीच्या निकालानंतर अनेकांनी इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे. सोबतच दहावीनंतर डिप्लोमा करत इंजिनीअर होण्याचे स्वप्नदेखील अनेक विद्यार्थी बघतात. सोबतच अनेक नामवंत प्लेसमेंट इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. याच अनुषंगाने ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ‘प्लॅनेट कॅम्पस’उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रातील करिअर संधी, प्लेसमेंट, अभ्यासक्रम तसेच इतर महत्त्वपूर्ण माहिती देण्यात येत आहे. इंजिनीअरिंगच्या कॅप राउंडची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यभरातून सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी सीइटीची परीक्षा दिली आहे. जेईई देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही काही लाखातच आहे. सध्याच्या प्लेसमेंट्समध्ये सर्वाधिक नोकरीच्या संधी या इंजिनीअर्ससाठी असल्याचे दिसते. इंजिनीअर्सला देशाबाहेरही चांगल्या पॅकेजच्या संधी मिळतात. या करिअर संधीची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी तसेच त्यांच्या मनातील शंकाचे निरसन व्हावे यासाठी ‘इंजिनीअरिंग क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. सी. कुलकर्णी तसेच इंजिनीअरिंग ए. आर. सी. सेंटरचे अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images