Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गटसचिवांचे ‘असहकार’ होणार तीव्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. या संस्थेतील गट सचिवांचे पगार थकल्यामुळे त्यांनी सरकारच्या सुलभ पीक कर्ज अभियान व कृषी कर्ज माफी योजनेच्या प्रक्रियेत सहभाग न घेण्याचा निर्णय घेवून अप्रत्यक्षरित्या असहकार आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अध्यक्ष विश्वनाथ निकम, सरचिटणीस रविंद्र काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.

या पत्रकार परिषदेत त्यांनी गटसचिवांनी जोपर्यंत वेतनाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सरकारच्या सुलभ पीक कर्ज अभियान व कृषी कर्ज माफी योजनेच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचे सांगत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सरकारच्या या दोन्ही योजनेत गावपातळीवर गटसचिवांचीच महत्त्वाची भूमिका आहे. त्यात पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करणे, ती व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकांना पाठवणे, शेतकऱ्यांचे मेळावे घेवून त्यांना योजना समजून सांगणे असे महत्त्वाचे काम आहे. पण यासाठी आमच्या संस्थाकडे व्यवस्थापन खर्चासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे संस्थेची अडचण झाली आहे. राज्य सरकारने नाशिक जिल्हा बँकेला निधी उपलब्ध करून देणे व राष्ट्रीयकृत बँकेचे कर्जही विविध कार्यकारी सोसायटीतून दिल्यास त्याचा संस्थेला फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व गटसचिवांनी याअगोदरच विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक सह जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. नाशिक जिल्ह्यात १०४५ विविध कार्यकारी सोसायटीमध्ये ३११ गटसचिव आहेत. त्यांनी आपल्या वेतनाचा मुद्दा रडारवर आणला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बिघडण्याची शक्यता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवक निमसेंना नोटीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

स्थायी समितीचे माजी सभापती व भाजप नगरसेवक उद्धव निमसे यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणी महानगरपालिकेने नोटिसा बजावल्याने खळबळ उडाली आहे. निमसे यांचे संपर्क कार्यालय, औरंगाबाद रोडवरील त्यांचे दोन्ही लॉन्स, द्वारका चौफुली येथील त्यांच्या मालकीच्या जागेत असलेल्या दुकानांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सत्तारूढ पक्षाच्या या मातब्बर नगरसेवकाविरोधात कारवाईचे धाडस प्रशासनाकडून दाखवले जाईल काय, याची चर्चा सुरू झाली आहे.

स्थायी समितीचे सभापती राहिलेले निमसे सलग तीन टर्म ते या भागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. निमसे यांचे नांदूर नाका परिसरातील संपर्क कार्यालय, विजय लक्ष्मी व लक्ष्मी विजय लॉन्स, नांदूरनाका चौफुली येथील त्यांच्या मालकीच्या जागेवरील द्वारका स्वीट्स आणि इतर दुकानांनी बांधकाम करताना नगररचना विभागाची परवानगी घेतली नसल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत या भागातील राजू कारंडे यांनी निमसे यांची संबंधित बांधकामे अनधिकृत असून, त्याची चौकशी करून त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी तक्रार महानगरपालिका आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत नगररचना विभागाने निमसे यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना पंधरा दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्यात सांगण्यात आले असून, तसे न केल्यास बांधकाम पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुगल नंबरिंगचा प्रस्ताव बारगळला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेचे कारभारी बदलताच यापूर्वीच्या निर्णयांना फाटा दिला जात असल्याचे समोर आले आहे. शहरातील मोठ्या व लहान रस्त्यांना नंबर देण्याचा प्रस्ताव एमआयटी बोस्टनने महापालिकेला दिला आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी फेसबुक व गुगलच्या मदतीने शहरातील सर्वच रस्त्यांचे नंबरिंग करून दिले जाणार होते. त्यासंदर्भातील घोषणा तत्कालीन आयुक्तांनी केली होती. परंतु, ही घोषणात आता हवेतच उरली असून, हा प्रस्ताव आता बारगळला आहे. दरम्यान, पालिकेने या प्रस्तावाऐवजी शहरच हायटेक करण्याचा धडाका सुरू केल्याने या प्रस्तावाला आता फारसा अर्थही राह‌िलेला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नाशिक हे धार्मिक शहर असल्याने शहरातील रस्त्यांना व गल्ल्यांना नंबर देऊन ते गुगल नकाशावर आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता. शहरातील रस्त्यांचे नंबरिंग झाल्यास थेट संबंधितांच्या घरापर्यंत पोहचणे सहज शक्य होणार आहे. गुगलवर शहरातील मुख्य रस्ते, प्रसिद्ध स्थळे, चौक यांचे मॅपिंग झाले आहे. परंतु, लहान गल्लीबोळात जायचे असल्यास पर्यटक किंवा नागरिकांना त्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. हे टाळण्याठी एमआयटी बोस्टनच्या प्राध्यापकांनी पालिकेला शहरातील रस्त्यांचे नंबरिंग करून देण्याचा प्रस्ताव दिला होता. फेसबुक व गुगलच्या मदतीने लहान रस्त्यांनाही क्रमांक दिले जाणार होते. गुगलवर शहराचे नाव व रस्त्याचा क्रमांक टाकल्यानंतर थेट घरापर्यंत पोहचता येणार, असा हा प्रस्ताव होता. परंतु, आयुक्त डॉ. गेडाम यांची बदली होताच हा प्रस्ताव बारगळला आहे. पालिकेच्या तांत्रिक विभागालाही या प्रस्तावाचा आता विसर पडला आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी वर्षभरानंतरही झाली नाही. एमआयटी बोस्टनच्या प्राध्यापकांनाही आपला प्रस्ताव गुंडाळावा लागला आहे.

पालिकाच होतेय हायटेक

स्मार्ट सिटीत समाविष्ट झालेल्या नाशिकलाच हायटेक करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासह शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावून नागरिकांचा त्रास कमी केला जात आहे. स्मार्ट सिटीत स्वतःचे फायबर नेटवर्क उभारण्याचे काम पालिका हाती घेणार आहे. त्यामुळे सर्व रस्तेच नकाशावर येणार असल्याचा दावा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव उप-वनविभाग वृक्षवल्लीने बहरणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत वनमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत राज्यात चार कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सोडला आहे. या वन महोत्सवात येथील उप-वन विभागांतर्गत ९ लाख ५३ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती उप-विभागीय वन अधिकारी जगदीश येडलावार यांनी दिली.

येथील उप-वन विभागाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वन महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी वन अधिकारी व्ही. डी. कांबळे उपस्थित होते. मालेगाव उप विभागांतर्गत मालेगाव व सटाणा हे दोन तालुके असून, या विभागांतर्गत मालेगाव, सटाणा व ताहाराबाद या तीन वनक्षेत्रांचा समावेश आहे. १ ते ७ जुलै या वन महोत्सवानिमित्त मालेगाव उप-वनविभागांतर्गत ९ लाख ५३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, या विभांतर्गत एकूण ४३ ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

या ४३ ठिकाणी नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, प्रत्येकाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी होणाऱ्या वृक्ष लागवडीची नोंद या नियंत्रण अधिकाऱ्यास वन विभागाच्या वेबसाइटवर नोंदविणे गरजेचे असणार आहे. एक जुलै रोजी या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते तालुक्यातील दहिदी येथे होणार आहे.

वनक्षेत्रात १७ ठिकाणी वृक्षलागवड

मालेगाव वनक्षेत्रात एकूण १७ ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यात तालुक्यातील डोंगराळे, जळकू, कंक्राले, गाळणा, विराणे, गारेगाव, दापुरे, घाणेगाव, दह‌िदी, गुगुळवाड, उंबरदे, निंबायती आदी गावांचा समावेश असून, या क्षेत्रात एकूण ४ लाख १६ हजार, तर सटाणा वनक्षेत्रात खमताने, आखातवाडे, विरंगाव, फोफिर, ब्राह्मणगाव, सावरपाडा, केरसाने, साकोडे, आदी ठिकाणी एकूण २ लाख २००, तसेच ताहाराबाद वनक्षेत्रात मानूर, पिंपळकोठे, सोमपूर, राहुड, एकल्हरे, मुल्हेर, गोळवाड, कातरवेल, साल्हेर आदी ठिकाणी ३ लाख ३६ हजार ७०० वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी 30 जून रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरीप हंगामासाठी मका फेव्हरीट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामात ३२.३४ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ३० टक्के अधिक परेणी झाली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात अवघे २ टक्के पेरणी झाली होती. पावासाने जूनमध्ये सुरुवातीला सर्वत्र जोरदार हजेरी लावली असली तरी नंतर ओढ दिल्यामुळे अनेक ठिकाणीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जेथे पाऊस चांगला झाला त्यांनी पेरणी करून आघाडी घेतली तर काही शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा करणेच योग्य समजले. दुबार पेरणीचे संकट येऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेतली असली तरी हे क्षेत्र जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

जिल्ह्यातील पावसामुळे धरण क्षेत्रात वाढ किंचितशी वाढ झाली असली तरी शेतीसाठी मात्र पावसाने सर्वत्र हजेरी लावली. त्यामुळे पेरणीच्या कामाने वेग घेतला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेतकरी सध्या पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीसाठी शेतकऱ्यांनी मका पिकाला पसंती दिली आहे. जून महिन्यात १ लाख ४ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रात मका लावण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र मालेगाव, सटाणा, नांदगाव, कळवण, चांदवड व येवला येथील आहे. त्या खालोखाल बाजरी ५६ हजार ३१९ हेक्टर, कापूस २९ हजार ४३१ हेक्टर व सोयाबीन ८ हजार ५४० हेक्टर खरीप पिकाची पेरणी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. पानतावणेंना ‘पद्मश्री’साठी प्रयत्न करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा निष्ठेने पुढे नेणारे आणि सर्व जातीधर्मातील माणसांना जोडणारे सच्चे रिपब्लिकन म्हणजे डॉ. गंगाधर पानतावणे. त्यांचे अस्मितादर्श नियतकालिक आम्हा सर्वांसाठी आदर्श आहे. आयुष्यभर आंबेडकरी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या डॉ. पानतावणे यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा, यासाठी केंद्रात सर्वोतोपरी प्रयत्न करीन, असे प्रतिपादन केंद्र‌यि समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी मनमाड येथे केले.

मनमाड नगरपरिषद व डॉ गंगाधर पानतावणे नागरी सत्कार समितीतर्फे आयोजित अभिष्टचिंतन, सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब कुशारे, नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, प्रभारी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, डॉ ऋषिकेश कांबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे उपस्थित होते.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले, आजच्या समाजाला डॉ. पानतावणे यांच्यासारख्या सात्विक माणसांची गरज आहे. अशी माणसे टिकली पाहिजेत. बाबासाहेबांनी जे सामाजिक समतेचे स्वप्न पाहिले ते डॉ पानतावणे यांनी आपल्या वैचारिक साहित्यातून व कृतीतून साकार केले. डॉ. कांबळे व प्रा. आहिरे यांनी डॉ पानतावणे यांच्या साहित्यिक सामाजिक चळवळीतील कार्याचा आढावा घेतला. यावेळी डॉ. गंगाधर पानतावणे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. पानतावणे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची होणारी विटंबना व विकृतीकरण हा सांस्कृतिक दहशतवाद

आहे. तो थांबवण्यासाठी तरुण लेखकांनी पुढे यावे.

आठवलेंच्या कविता

आपल्या धमाल खुसखुशीत कवितांनी रामदास आठवले यांचा दौरा मनमाड दौरा मनमाडकरांच्या आठवणीत राह‌लिा. त्यांनी डॉ. पानतावणेंवर कविता केली.

ते म्हणाले, ‘आजच्या कार्यक्रमाचे जे आहेत प्रमुख पाहुणे, नाव त्यांचे डॉ. पानतावणे, त्यांच्या लिखाणाचे काम, समाजात समतेचे बीज लावणे, आणि भीमाच्या विचारांच्या मागे धावणे,’ ही कविता आठवले यांनी व्यासपीठावरच तयार केली. त्यांनी अण्णा हजारेंवरीही कविता केली.

‘अनेकांच्या भ्रष्टाचाराचा उघडला ज्यांनी पन्ना

ते आमचे लाडके हजारे अण्णा

जसा गोड असतो गन्ना

तसे आमचे अण्णा’

ही कविता हशा पिकवून गेली.

मुख्यमंत्र्यांशी बोलणार

येवला ः शेतकरी संपादरम्यान शेतकऱ्यांवर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करू, असे आश्वासन रामदास आठवले यांनी पिंपळगाव जलाल येथील शेतकऱ्यांना दिले. शिर्डी येथून मनमाडकडे जात असताना बुधवारी दुपारी ते पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर थांबले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा धोरणाला पालिकेचा ठेंगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक महापालिकेचे तत्कालीन महापौर यतीन वाघ यांनी जुलै २०१४ रोजी झालेल्या महासभेत क्रीडा धोरण जाहीर केले होते. अनेक वर्षांपासून प्रलंब‌ति असलेले धोरण जाहीर झाल्याने शहरातील क्रीडाप्रेमी व खेळाडूंनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, हा आंनद क्षणभंगूर ठरला आहे. क्रीडा धोरण तयार होऊन तीन वर्ष उलटली तरीही महापालिकेने यातील एकही बाब पूर्णत्वास नेलेली नाही.

महापालिकेने क्रीडा धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास क्रीडा विकासाला चालना मिळेल असा सूर त्यावेळी खेळाडूंनी व्यक्त केला होता. या धोरणामुळे नवीन खेळाडू निर्माण होण्यास हातभार लागेल, असेही जाणकरांनी मत व्यक्त केले होते. माजी महापौर यतीन वाघ हे पायउतार होताच या धोरणाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यानंतरचे महापौर अशोक मुर्तडक यांनीदेखील महापौर क्रीडा स्पर्धा घेतल्या जातील, असे सूतोवाच केले होते. परंतु, त्यांनीही याकडे काणाडोळा केला. मनसेची सत्ता असताना राज ठाकरे यांच्याकडून खेळाडूंना अपेक्षा होती. मात्र, तीही फोल ठरली. क्रीडा धोरण कागदावर न राहता त्याच्या अंमलबजावणीसाठी दबावगट तयार होईल अशी अपेक्षा होती मात्र, संस्थांनीदेखील लक्ष घातले नाही. शहरात महापालिकेच्या मालकीच्या क्रीडांगणासाठी राखीव असलेले भूखंड आहेत, त्या ठिकाणी चांगली क्रीडांगणे तयार झाली असती तर क्रीडा क्षेत्राचा विकास झाला असता. परंतु, महापालिकेने तेही केलेले नाही. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंना महापालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, आजवर एकाही खेळाडूला नोकरी दिलेली नाही. क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली जाईल, त्यासाठी वेगळा कर्मचारी वर्ग दिला जाईल, असेही या धोरणात नमूद करण्यात आले होते. परंतु, सर्व घोषणा हवेतच विरल्या. महापालिकेने राजकारण बाजूला ठेवून क्रीडांगणाचा विकास करावा. केवळ कागदावर असलेले क्रीडा धोरण प्रत्यक्षात आणावे, यासाठी खेळाडू संस्था यांची मदत घेण्यात यावी, अशी मागणी क्रीडा संस्थांनी केली आहे.

महापालिकेने केवळ राजकीय स्टंट म्हणून क्रीडा धोरण जाहीर केले. परंतु, त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही. त्याकरता एक समिती तयार करुन त्वरीत अंमलबजावणी करावी.
- प्रशांत भाबड, क्रीडा प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’च्या सुनावणीवर शेतकऱ्यांचा बहिष्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील तळोशी गावातील शेतकऱ्यांना शासनाने सुनावणीसाठी बोलावले असता शेतकऱ्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. या शेतकऱ्यांनी आपले म्हणणे आणि मागण्या लेखी निवेदनाद्वारे नायब तहसीलदार कांबळे यांच्यामार्फत शासनाकडे पाठविल्या आहेत.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात शासनाने ‘समृद्धी’ महामार्गासाठी नवीनच भूसंचय योजना अंमलात आणण्याचे ठरवून त्यासाठी वृत्तपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यावर बुधवारी (दि. २८) रोजी तळोशी येथील शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्यात आले असता शेतकऱ्यांनी त्यावर बहिष्कार टाकून लेखी म्हणणे मांडले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या महामार्गास पूर्णतः विरोध असताना व उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल केली असताना शासन न्यायालयाचा देखील अवमान करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे.

यावेळी शेतकरी कृती समितीचे सचिव भास्कर गुंजाळ, उपसरपंच त्र्यंबक गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ, भागवत गुंजाळ, गंगाधर गुंजाळ, शिवराम शेळके, रामदास शेळके, भिका गिते, सुदाम गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ, आदींसह शेतकरी हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्हॉट्सअॅप हॅकच्या नाशिकमध्ये तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक होत असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. मॉडेलिंग, सायकलिस्ट आणि डॉक्टर्सशी संबंधित काही ग्रुपमधील सदस्यांचे अकाऊंटस हॅक झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. डॉ. गौरी पिंप्रोळकर आणि नीलेश सुदाम दाते यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

अज्ञात व्यक्ती एक व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक केल्यावर सदर व्यक्तीच्या अकाऊंटमधील इतर ओळखीच्या व्यक्तीस व्हॉट्सअॅप करून ओटीपी जनरेट करून या ओटीपीची मागणी करते. हा ओटीपी प्राप्त होताच संबंधित अकाउंटसुध्दा हॅक होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉटसअॅप करा सुरक्षित

नागरिकांनी व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित करून घ्यावे, असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अनिल पवार यांनी केले आहे. ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर चॅट करून ‘ओटीपी’ची मागणी केल्यास ओटीपी देऊ नये. तसेच स्वत:चे व्हॉट्सअॅप अअकाउंट व्हॉट्सअॅपच्या Two step verification मध्ये जाऊन सुरक्षित करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: २८ व्हॉटसअॅप-फेसबुक अकाउंट हॅक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । नाशिक

नाशिक शहरात अवघ्या काही तासांत २८ पेक्षा अधिक व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हॅक करण्यात आलेल्या २८ अकाऊंट पैकी २६ अकाऊंट महिलांचे आहेत. यावरून हॅकर्सनी महिलांना टार्गेट करायला सुरूवात केल्याचे उघड झाले असून त्यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ माजली आहे.

व्हाटसअपही हॅक होऊ शकतो अशा बातम्या येऊन अवघे काही तास उलटत नाही तोच नाशिकमध्ये तब्बल २८ व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे हॅकरने या अकाऊंटद्वारे अश्लिल मॅसेज पाठवण्याचा सपाटा लावला आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे वैतागलेल्या अकाऊंटधारकांनी सायबर पोलिसांत धाव घेऊन तक्रारी नोंदविल्या नंतर हा अकाऊंट हॅक झाल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनीही सतर्क होऊन या हॅकर्सचा छडा लावण्यासाठी कंबर कसली आहे.

वन टाईम पासवर्ड वापरून हॅकरने हा उद्योग केला आहे. व्हॉटसअॅप किंवा फेसबुक रिइन्सॉटल करताना संबंधीत कंपीनकडून एक ओटीपी पाठवण्यात येतो. या पासवर्डच्या मदतीनेचे आपण संबंधीत अॅप्लिकेशन वापरू शकतो. या प्रकरणात हॅकरने या पध्दतीने त्याच्याच परिचितांपैकी एकाचे व्हॉट्सअॅप हॅक केले. नंतर कॉन्टेक्ट लिस्टमध्ये पोहचून इतरांचे मोबाईल हॅक करण्याचा सपाटा सुरू केला. व्हॉटसअॅप अकाउंट हॅक करून रिइन्सॉटल करताना नागरिकांच्या मोबाईलवर ओटीपी आल्यावर हॅकरने हॅक केलेल्या अकाउंटवरून ओटीपी पाठवण्याबाबत विनंती केली. आपल्या ओळखीतील व्यक्ती मदत मागते म्हणून संबंधितांनी तो मॅसेज फॉरवर्ड केला. परिणामी, हॅकरला सहजतेने आपला कार्यभार उरकता आला असे, सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी स्पष्ट केले. यापुढे जाऊन संशयित आरोपीने काहींचे फेसबुक अकाउंट देखील हॅक केले असून बुधवारपासून सायबर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी २८ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तक्रारींचा हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होते आहे.

महिला टार्गेट

संशयित हॅकरने महिलांना टार्गेट केले आहे. नाशिकमध्ये हॅक करण्यात आलेल्या २८ अकाऊंटपैकी २६ अकाऊंटस महिलांचे आहेत. अकाऊंट हॅक केल्यानंतर तो फ्रेंडलिस्टमधील व्यक्तींशी, विशेषतः महिलांशी अश्लिल चॅटींग सुरू करतो. त्यामुळे आपल्या परिचित किंवा जवळच्या नातेवाईकांकडून असे अश्लिल एसएमएस किंवा फोटोग्राफ्स आल्यास महिलांनी संबंधित व्यक्तीशी फोनद्वारे संपर्क साधवा. त्याचे अकाऊंट हॅक झाले असल्यास त्याला हा प्रकार माहितही नसू शकतो, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वावीजवळ अपघातात लष्करी जवानासह २ ठार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी गावाच्यापुढे शिंदेवस्तीजवळ दोन मोटारसायकलीची समोरासमोर जोरदार धडक होऊन लष्करी जवानासह दोन जण ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

देवपूर येथून मामाकडून आमरसाचे जेवण करून वरझडीकडे मोटारसायकलवरून (एमएच १ एचए ४४६) घरी जात असताना सिन्नरकडे जाणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकल (एमएच १५ पी ९७८८) यांची सद्गुरू पेट्रोल पंपाच्यापुढे शिंदेवस्तीजवळ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात सुटीवर आलेले लष्करी जवान बाळासाहेब अशोक वाजे (२७, रा. डुबेरे ता. सिन्नर) आणि विशाल चंद्रभान वेताळ (वय २०, रा. वरझडी ता. संगमनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संगीता चंद्रभान वेताळ या गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच किरण पाटील यांच्यासह वावी पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त गाड्या बाजुला करीत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी वावी पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप शिंदे, दशरथ मोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंचा १५ पासून दौरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक दत्तक घेण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्याकडून शहराची उपेक्षा सुरू असतांना मनसे प्रमुख राज ठाकरे १५ जुलैपासून तीन दिवस नाशिक भेटीवर येत आहेत. या काळात मुक्कामी थांबून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह विकासकामांचाही आढावा घेणार आहेत.

शहरात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे करणाऱ्या मनसेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर नाशिककरांनी महापालिका निवडणुकीत नाकारले. त्यामुळे नाराज झालेल्या राज यांनी नाशिककडे पाठ फिरवली होती. पाच वर्षाच्या मनसेच्या कार्यकाळात शहरात मोठ्या प्रमाणावर सीएसआर फंडातून विकासकामे झाली. सोबतच भ्रष्टाचाराला आळा बसला. परंतु, महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी भाजपला निवडून दिले. मुख्यमंत्र्यानी नाशिकच दत्तक घेण्याची घोषणा केल्याने मनसे भूईसपाट झाली. विकासकामे करूनही नाशिककरांनी नाकारल्याने राज ठाकरे व्यथित झाले होते. पैशांवर निवडणुका जिंकल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. परंतु नाशिककरांवरची नाराजी आता कमी झाली आहे. राज आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात पक्षाची नव्याने बांधणी करणार असून विविध आघाड्यांचा आढावा घेणार आहेत.

विकासकामांचे पोस्टमार्टम
मनसेच्या काळात नाशिकमध्ये उभ्या राहिलेल्या विकासकामांचे पोस्टमार्टमही करणार आहेत. मनसेच्या काळात सुरू झालेल्या बॉटनिकल गार्डनकडे भाजपने दुर्लक्ष केले. या मुद्यावरून ते भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. तसेच ‘दत्तक नाशिक’बाबत मुख्यमंत्र्यानी केलेल्या घुमजावावरून ते भाजपला जाब विचारण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठरोडला गोळीबार; तरुण गंभीर जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोड परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास एकावर गावठी कट्ट्याने केलेल्या गोळीबारात कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळिंब बाजारात काम करणारा एक जण गंभीर जखमी झाला आहे. संदीप अशोक लाड (रा. भराडवाडी, फुलेनगर, पंचवटी) असे जखमी झालेल्याचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळीबाराच्या प्रकरणात नाशिकरोडला महिनाभरापूर्वी झालेल्या खून प्रकरणातील संशयितांचे नावे समोर आले आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सूरज रमेश बोडके यांनी तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. जखमी संदीप लाड हा पेठरोड येथील शरदचंद्र मार्केटमध्ये डाळिंबाच्या गाड्या भरून देण्याचे काम करतो. एप्रिल महिन्यात झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अगोदर सराईत गुन्हेगार शेखर निकम हा डाळिंब मार्केट येथे येऊन संदीपला भेटला होता. त्यावेळी निकम याने लाडकडे हप्त्यापोटी १० हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी लाडने दोन दिवसांनी पैसे देतो, असे म्हणून वेळ मारून नेली होती. १५ दिवसांनी पुन्हा निकमने लाडकडे पाच हजार रुपयांची मागणी केली, तेव्हाही दोन दिवसानंतर पैसे देतो असे सांगून दोन दिवसांनी निकम याला पाच हजार रुपये दिले होते.

संदीप लाड, तात्या पिंगळे आणि लखन राथड हे तिघे गुरुवार (दि. २९) रोजी दुपारी तीनच्या सुमारास पेठरोड येथील मच्छिबाजारातून बच्छाव हॉस्पिटलजवळील हॉटेलमधून चहा पिऊन बाहेर पडत असताना संशयित शेखर निकम व त्याचा भाऊ केतन निकम (रा. खंडेराव मंदिर, पेठरोड) हे दोघे आले. त्यांनी लाडला तू दहा हजार रुपयांचा हप्ता दिला नाही, असे म्हणत भांडणाची कुरापत काढून शिवागाळ करू लागले. त्याचवेळी केतनने गावठी पिस्तूल काढून लाडवर गोळीबार केला. गोळी छातीच्या उजव्या बाजूला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल अकाउंट हॅकर्सकडून लक्ष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या काही तासात शहरातील २८ पेक्षा अधिक व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी लागलीच हालचाली करून संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला असून, यामुळे सोशल मीड‌यिाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. २८ पैकी २६ अकाउंट महिलांचे असून, महिलांनी अकाउंटच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शहरसह देशभरात एखाद दुसरे व्हॉट्सअॅप अथवा फेसबुक अकाउंट हॅक होण्याचा प्रकार नवीन नाही. मात्र, नाशिकमध्ये तब्बल २८ व्हॉट्सअॅप अथवा फेसबुक हॅक झाले आहेत. हॅकरने हॅक केलेल्या अकाउंटद्वारे अश्ल‌लि मेसेज पाठवण्याचा सपाटा लावला. एक एक करीत अकाउंटधारकांना माहिती मिळाली, तशी सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदारांची रीघ लागली. याबाबत बोलताना सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले की, वनटाइम पासवर्ड वापरून हॅकरने हा उद्योग केला आहे. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक रिइन्स्‍टॉल करताना संबंध‌ति कंपनीकडून एक ओटीपी पाठवण्यात येतो. या पासवर्डच्या मदतीनेचे आपण संबंध‌ति अॅप्लिकेशन वापरू शकतो. या प्रकरणात हॅकरने या पद्धतीने त्याच्याच परिच‌तिांपैकी एकाचे व्हॉट्सअॅप हॅक केले. नंतर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पोहचून इतरांचे मोबाइल हॅक करण्याचा सपाटा सुरू केला. व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून रिइन्स्टॉल करताना नागरिकांच्या मोबाइलवर ओटीपी आला. त्याचवेळी हॅकरने हॅक केलेल्या अकाउंटवरून ओटीपी पाठवण्याबाबत विनंती केली. आपल्या ओळखीतील व्यक्ती मदत मागते म्हणून संबंध‌तिांनी तो मॅसेज फॉरवर्ड केला. परिणामी, हॅकरला सहजतेने आपला कार्यभार उरकता आला असे, पोलिस निरीक्षक पवार यांनी स्पष्ट केले. यापुढे जाऊन संशयित आरोपीने काहींचे फेसबुक अकाउंटदेखील हॅक केले. बुधवारपासून सायबर पोलिस स्टेशनमध्ये २८ तक्रारदार आले असून, हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होते आहे.

महिला अकाउंटस् टार्गेट
संशयित हॅकरने महिलांना टार्गेट केले आहे. २८ पैकी २६ अकाउंटस् महिलांचे आहेत. अकाउंट हॅक केल्यानंतर तो फ्रेंड लिस्टमधील व्यक्तींशी, विशेषतः महिलांशी अश्लिल चॅटींग सुरू करतो. आपल्या परिच‌ति किंवा जवळच्या नातेवाईकांकडून असे अश्लिल एसएमएस किंवा फोटोग्राफ्स आल्यास महिलांनी संबंध‌ति व्यक्तीशी फोनद्वारे संपर्क साधावा. त्याचे अकाउंट हॅक झाले असल्यास त्याला हा प्रकार माहितीही नसू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग प्रकरणी तरुणास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन युवतीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या सिडकोतील तरुणास पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमनानुसार (पोस्को) अन्वये गुन्हा तरुणाविरोधात दाखल करण्यात आला आहे.

संदीप बबन खैरे (रा. प्रतापचौक, हॉटेल फॉर्मुलाजवळ, सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रामवाडी परिसरातील अल्पवयीन युवती रविवारी रात्री अशोकस्तंभाकडून घराकडे जात असतांना संशयिताने तिचा पाठलाग केला. त्यानंतर रामवाडी पुलाजवळ रस्ता अडवित त्याने युवतीचा विनयभंग केला. ही घटना पीडित युवतीने घरी आल्यानंतर पालकांना सांगितली. त्यानुसार त्यांनी पंचवटी पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. संशयिताविरोधात विनयभंगासह पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास अटक करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक जी. एम. जाधव करीत आहेत.

महिलेची पर्स पळविली
घराचे प्रवेशद्वार उघडणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पल्सरवरील चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना बॉईज टाऊन पब्लिक स्कूल परिसरातील आनंदवन कॉलनीत घडली. पर्समध्ये मोबाइल, सोन्याचे दागिने असा सुमारे ४३ हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजली प्रमोद कुलकर्णी (रा. आनंदवन कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, कुलकर्णी या बुधवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. साडेअकरा वाजेच्या सुमारास घरी परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार घडला. कुलकर्णी बंगल्याचे प्रवेशद्वार उघडत असताना पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील पर्स बळजबरीने हिसकावली. कुलकर्णी यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे भरधाव वेगात दुचाकीवर पसार झाले. पर्समध्ये मोबाइल, सोन्याच्या रिंगा, घराच्या व लॉकरच्या चाव्या असा सुमारे ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या
म्हसरूळ परिसरातील गायत्रीनगर भागात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. समाधान अशोक जेजुरकर (१८, रा. साईसेवा पार्क गायत्रीनगर, म्हसरूळ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अज्ञात कारणातून समाधानने बुधवारी घरात गळफास लावून घेतला. ही घटना लक्षात आली.

भरदिवसा घरफोडी
अंबड लिंक रोडवरील केवलपार्क भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीला जगन्नाथ रायते (रा. आकृती अपार्टमेंट, केवलपार्क ) यांच्या तक्रारीनुसार, रायते या बुधवारी सायंकाळी घराजवळ योगाच्या सरावासाठी गेल्या. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमध्ये सोप्यावर ठेवलेला मोबाइल, कपाटात ठेवलेला सोन्याचा राणीहार व रोख रक्कम असा सुमारे एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

कॉलेजरोडला घरफोडी
कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून लॅपटॉप, रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना कॉलेजरोड भागात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरती राजेश राऊळकर (रा. सन्मित्रा अपार्ट. आरवायके कॉलेजजवळ) यांच्या तक्रारीनुसार, राऊळकर कुटुंबीय १० ते १४ जून दरम्यान बाहेरगावी गेले असता घरफोडीचा प्रकार घडला. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील डेल कंपनीचा लॅपटॉप, कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी असा सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोकडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकाऱ्यांची झाडाझडती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने गोल्फ क्लबच्या शासकीय विश्रामगृहातील हॉलमध्ये प्रमुख शासकीय विभागाचा आढावा घेत गुरुवारी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

गेल्या वेळी पुरेशी माहिती नसल्याने या समितीने दौरा अर्धवट सोडला होता. आता ही समिती पुन्हा चार दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात समिती आढावा घेणार होती; पण जागेत बदल करीत शासकीय विश्रामगृहातच या समितीने अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. समिती २ जुलै रोजी आढावा घेऊन परतणार आहे. ‘भिवंडी पूर्व’चे शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीने सकाळी जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर महसूल विभागासह पोलिस विभागाचा आढावा, महावितरण कंपनी, राज्य परिवहन महामंडळ विभाग, उत्पादन शुल्क, आदिवासी विकास विभाग यांचा या समितीने आढावा घेतला.

समिती शुक्रवारी (दि. ३०) आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठला भेट शनिवारी (दि. १ जुलै) दिवसभर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृह यांना भेटी देऊन तपासणी करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (दि. २ जुलै) जाऊन आढावा बैठक घेणार आहे.

सात जण उपस्थित
समितीमार्फत आदिवासींच्या विविध योजनांचा व निधींचा आढावा दरवर्षी घेतला जातो. या समितीत अध्यक्ष म्हात्रे यांच्यासह आमदार सदस्य वैभव पिचड, प्रा. चंद्रकात सोनवणे, प्रभुदास भिलावेकर, काशिराम पावरा, आंनद ठाकूर, पांडूरंग बरोरा, चंद्रकांत रघुवंशी यांची उपस्थिती आहे.

‘झेडपी’ची आज बैठक
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना हे बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे अनुसूचित जमाती कल्याण समितीसोबतची त्यांची बैठक शुक्रवारी (दि. ३०) होणार आहे. गुरुवारी सकाळी मीना उपस्थित होते. मात्र, नंतर बैठकीची वेळ आल्यानंतर ते नव्हते. त्यामुळे ही बैठक गुरुवारी होऊ शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेसिक्स पक्के करा; आव्हाने सोपे बनतील’

$
0
0

इंजिनीअरिंगमध्ये मूळ संकल्पना पक्क्या करून कुणाच्या आधाराशिवाय निरीक्षणाने उभे राहू शकले तर यश तुमच्या मागे येईल, असा संदेश महावीर एज्युकेशन सोसायटीच्या संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. जयंत पत्तीवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

प्रत्येक संस्थेचे वेगळे असे वैशिष्ट्य असते. आपल्या संस्थेबद्दल काय सांगाल?
- संस्थेला दिशा देणाऱ्या व्यवस्थापनाचा दृष्टीकोन या वाटचालीसाठी महत्त्वाचा मानला जातो. उद्योग वर्तुळात काम करताना प्रत्यक्षात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाचा जाणवणारा अभाव दूर करण्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून या संस्थेचा उदय झाला. प्रत्यक्षात उद्योग वर्तुळात कार्यरत व्यवस्थापन असल्याने या विद्यार्थ्यांच्या हाती शाश्वत भविष्य कसे देता येईल, या दृष्टीने व्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येते. परिणामी, येथील विद्यार्थी उत्पादकतेच्या बाबतीत कमी भरत नाही.

ग्रामीण विद्यार्थ्यांना अनेकदा पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही, पण त्यांच्यात क्षमता उत्तम असते...
- आमच्याकडे शिक्षण घेणारे विद्यार्थी शहरी, निमशहरी आणि ग्रामीण, दुर्गम असे संमिश्र भागातून येतात. सरतेशेवटी ते सर्व एकाच मंचावर येत असल्याने त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड किंवा त्यांच्या अध्ययन, विकास प्रक्रियेत अडसर येऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे विद्यार्थी प्रत्यक्षात व्यावसायिक वर्तुळात कमालीचे यशस्वी ठरतात. तशी तपशीलवार नोंदही आमच्याकडे आहे.

इंजिनीअरिंग कॉलेजेसची वाढती संख्या आणि घसरता दर्जा हे प्रमाण चिंताग्रस्त करते...
- हे एकंदरीत बाहेरचे चित्र असले तरीही आमच्या संस्थेच्या वतीने यात बदलण्यासाठी अॅकॅडमिक्सच्या पलिकडे जाऊन आम्ही प्रयोग करतो आहोत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आम्ही ‘झिरो वायडी’ (म्हणजे शून्य टक्के इयर ड्रॉप) या मथळ्याखाली उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. पदवीस प्रथम वर्षी प्रवेश घेतल्यापासून अखेरच्या वर्षापर्यंत एकाही विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाऊ नये, यादृष्टीने सर्व बाजूने परिश्रम घेतले जात आहेत. यासाठी विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत शैक्षणिक प्रगतीवर फॅकल्टी व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. प्रसंगी समुपदेशन, संवाद आणि मार्गदर्शन या तंत्राने शैक्षणिक गुणवत्ता वधारण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत.

अलिकडील नवीन अचिव्हमेंट काय आहे?
- इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना या विद्याशाखेची क्षमता आणि व्याप्ती समजावी व सामाजिक जबाबदारीचे भान रहावे, यादृष्टीने काही प्रकल्प त्यांना कॉलेजकडून दिले जातात. हे प्रकल्प विद्यार्थी मन लावून पूर्ण करतात. अलिकडेच एका विद्यार्थिनीने महिला सुरक्षेसंदर्भात व्हर्च्युअल चेंज रूम प्रोजेक्ट, केंद्राच्या स्वच्छता अभियानाशी तंत्रज्ञानाच्या अविष्काराने जोडणारा असाच एक प्रकल्प राज्यभर गाजला. नवनव्या प्रयोगांचे सुमारे १४ पेटंट शोधकर्त्या विद्यार्थ्यांच्या नावे मिळविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. याशिवाय १०० टक्के प्लेसमेंट ही सुध्दा एक अचिव्हमेंट सांगता येईल.

इतरांनीही प्रेरणा घ्यावी, असा काही आपल्याकडील उपक्रम?
- आमच्याकडे ग्रामीण आणि दुर्गम भागातूनही विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर येतात. या सर्व विद्यार्थिनींनी पदवीच्या चार वर्षांसाठी दररोज कॉलेज ते त्यांचे गाव या मार्गावर मोफत बससेवा देण्यात येते. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने काय वाटतात?
- तंत्रज्ञानात दरदिवशी नवीन भर पडते आहे. या स्थितीत विद्यार्थ्यांना कायम अपडेट रहावे लागेल. पण जगातले कुठलेही नवे तंत्रज्ञान हे विज्ञानाच्या मूळ संकल्पनांवर आधारित आहे. त्यामुळे यापासून तुटून त्यांना चालणार नाही.

विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?
- आपल्या बौद्धिक क्षमता, अभिरूची इत्यादी कल तपासून योग्य विद्याशाखेत व योग्य कॉलेजातच प्रवेश घ्या. इंजिनीअरिंगमध्ये कुणाच्या अनुकरणाने तग धरता येणार नाही त्यासाठी तुमची स्वत:ची निरीक्षण क्षमता आणि प्रचंड आत्मविश्वास हवा. पदवीची ही चार वर्षे खडतर परिश्रमाची आहे हे स्वीकारल्यास जीवनातील आव्हाने जड जाणार नाहीत.
•शब्दांकन : जितेंद्र तरटे
Jitendra.tarte@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक संकट झुगारून शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न

$
0
0

नवनाथ वाघचौरे, सिन्नर फाटा

घरची हलाखीची परिस्थिती, ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजारातून बाहेर आलेले वडील सायकलच्या दुकानात काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात... वडिलांबरोबरच आजोबांवर होणारा औषधोपचाराचा खर्च... अशा अनेक संकटांवर मात करीत आदित्यने देवळाली कॅम्पच्या सुभाष गुजर इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये दहावीत ९५.०४ टक्के गुण मिळवत यशाला गवसणी घातली. सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणारे अल्बर्ट आइनस्टाइन यांना आपले रोल मॉडेल मानणाऱ्या आदित्यला भौतिक विषयात शास्त्रज्ञ बनायचंय. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असूनही परिस्थितीचा बाऊ न करता आदित्यने जीव तोडून अभ्यास करून सुवर्णयश प्राप्त केलं आहे. मात्र, यापुढील उच्चशिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

‘‘मुलगा खूप कष्टाळू आहे हो! पण परिस्थितीने पुरता गांजलाय. त्याला शिकून खूप मोठं होण्याची इच्छा आहे. त्याला शास्त्रज्ञ का काय म्हणता ते व्हायचंय. कुठून आणू एवढा पैसा? पोरांची स्वप्न झाली मोठी अन् आम्ही झालो खुजे, अशी आमची अवस्था झालीय बघा! कोण शिकवल हो माझ्या पोराला? कसं होईल त्याचं शिक्षण?’’ आदित्य नाईकच्या आईचा हा काळजीयुक्त सूर. तिला वाटतं, आदित्यने शिकावं, मोठं व्हावं आणि या दारिद्रयातून बाहेर काढावं. कष्टाळू आईवडील व ध्येयवादी आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या जिद्दी व हुशार आदित्यने संशोधक होण्याचा निर्धार पक्का केला आहे.

आदित्यला लहान बहीण असून, ती नववीत आहे. आजही त्याचे कुटुंब एकत्र कुटुंबपद्धतीचा संस्कार जपतेय. आदित्यच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला आणि त्याच वेळी कुटुंबावर नवा आघात झाला. आदित्यचे वडील मिलिंद यांना ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान झाल्याने त्यांच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. घरातील सर्व किडुकमिडुक विकून वडिलांना वाचविण्यासाठी त्याची आई व आजोबांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर त्यात त्यांना यश आले. मात्र, वडिलांच्या कामावर परिणाम झाला. आजही दर महिन्याला त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च येतोय. अशाही परिस्थितीत आदित्य त्यांच्या सेवेत कधी खंड पडू देत नाही.

आदित्यचे वडील पाथर्डी फाटा येथे एका दुकानात काम करतात. खर्चात बचत करून कुटुंब सावरण्यासाठी २५ वर्षांपासून ते २८ किलोमीटरचा प्रवास सायकलनेच करीत आहेत. यातून झालेल्या बचतीतून ते आदित्यच्या शिक्षणावर खर्च करतात. घरात आदित्यचे आजोबाही आजारी आहेत. आदित्यची आई त्यांच्या आजारपणातही सेवा करतेय. घरखर्च सांभाळताना त्यांची मोठी तारांबळ होतेय. आदित्यच्या शिक्षणाचा खर्च आजवर कसा तरी पेलला असला तरी पुढील उच्च शिक्षणासाठीच्या खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा असा यक्ष प्रश्न आदित्यच्या आई-वडिलांपुढे आहे.

आदित्य खूप हुशार आहे. मात्र, आम्ही त्याला सोयी-सुविधा पुरविण्यात कमी पडू लागलो असल्याची खंत व्यक्त करताना आदित्यच्या आईच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. आदित्य आठवीत गेला तेव्हा वडिलांचा आजार पुन्हा बळावला. खर्च वाढला. शाळेतील सविता अडवानी या शिक्षिका देवासारख्या धावून आल्या. त्यांचा मदतीचा हात ऐनवेळी मिळाल्याने आदित्यची नौका दहावीच्या किनाऱ्याला लागली. या काळात त्याने अविश्रांत मेहनत घेतली. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असूनही आदित्यने केंद्रीय शिक्षण मंडळाच्या पुस्तकांचा अभ्यास केला. सिजनप्रमाणे सौरऊर्जेवर चालणारे पथदीप बनविणारा आदित्य सातवीच्या वर्गातच इन्स्पायर अॅवॉर्डचा मानकरी ठरला. राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनातही सहभागी झाला. कबड्डी, क्रिकेट व चेस या खेळांत व एनटीएस व एमटीएस या परीक्षांतही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. कष्टाळू आईवडील व ध्येयवादी आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या जिद्दी व हुशार आदित्यने संशोधक होण्याचा निर्धार पक्का केला आहे. त्याचा निर्धार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आदित्य दानशूरांच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे. पुढील शैक्षणिक वाट सुकर होण्यासाठी त्याला नाशिककरांच्या मदतीची गरज आहे.

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळवणाऱ्या, पण पुढील शैक्षणिक वाटचालीत आर्थिक समस्या उभी ठाकलेल्या विद्यार्थ्यांना बळ देणारा ‘महाराष्ट्र टाइम्स’चा उपक्रम म्हणजे ‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमाचे यंदा सातवे वर्षे आहे. खडतर परिस्थितीशी झगडून मिळवलेल्या यशाचा आणि या मदतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास आम्ही या उपक्रमांतर्गत मांडणार आहोत. या प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असला तरी त्यांच्या डोळ्यांत स्वप्न एकच आहे... शैक्षणिक भरारीचे. हे स्वप्न साकार करण्यासाठी ‘मटा’चे संवेदनशील व सुजाण वाचक या विद्यार्थ्यांच्या पाठीशी गेल्या सहा वर्षांप्रमाणेच यंदाही उभे राहतील, ही खात्री आहेच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवीस टक्के माता मारकुट्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलांवर होणाऱ्या हिंसाचारात २५ टक्के माता सहभागी असल्याचा निष्कर्ष युनिसेफची महाराष्ट्र शाखा, नाइन इज माइन, आणि मुंबई स्माइल्स या संस्थांनी काढला आहे. मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचे स्वरुप कसे असते याचा मागोवा घेण्यासाठी या तीनही संस्थांच्या वतीने राज्यव्यापी संशोधन हाती घेण्यात आले होते. या संशोधनात आठ जिल्ह्यांतील १३ ते १७ वयोगटातील पाच हजार मुलामुलींनी भाग घेतला. याबाबतचा अहवाल युनिसेफच्या अलका गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी प्रसिद्ध केला.

या अहवालात म्हटले आहे की, हातात जे असेल ते फेकून मारणे, लाथाबुक्क्यांनी तुडवणे, गरम पळीचा डाग देणे, असे अत्याचार घरातच होतात. घरात होणाऱ्या हिंसेबद्दल मुले बोलत नाहीत. पण मुलांच्या मनावर त्याचे खोलवर परिणाम होतात. सर्वात जास्त २५ टक्के हिंसा ही आईकडून होते. २१ टक्के हिंसा वडिलांकडून, १७ टक्के हिंसा दुसऱ्यांच्या मारहाणीतून तर २ टक्के मुलांना चटके देऊन हिंसा केली जाते. मुलांना घरात कसे वाटते याबाबत देखील सर्वेक्षण करण्यात आले. ६८.२७ टक्के मुलांनी सांगितले की, आम्ही आमच्या घरात सुरक्ष‌ित आहोत ११.१६ टक्के मुलांनी सांगितले की आम्ही आमच्याच घरात दुःखी आहोत. ६.७३ टक्के मुले म्हटली, घरी जायला भीती वाटते तर ६.३५ टक्के मुले म्हटली की, घरच्यांचा आम्हाला राग येतो.

या तीनही संस्थांनी केवळ निष्कर्ष काढला नाही तर त्याबाबत उपायदेखील सुचवले आहेत. या मुलांना मुलभूत सुविधा पोहचविणे आवश्यक आहे. मुलांच्या संवेदनांचे रिपोर्टिंग झाले पाहिजे. मुलांची देखभाल करणाऱ्यांना सूचना द्यायला हव्यात. कोणताही अन्याय सहन न करता त्यावर आवाज उठविला पाहिजे. मानसिक दृष्ट्या अपंग व्यक्ती जास्त होरपळल्या जातात. त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे असेदेखील म्हटले आहे.

लैंगिक अत्याचाराचे धक्कादायक निष्कर्ष

यावेळी लैंगिक अत्याचाराबद्दलदेखील मुले बोलली. याबाबतचा निष्कर्षदेखील धक्कादायक होता. १० टक्के अत्याचार हे वड‌िलांकडून होतात. ८.५ टक्के अत्याचार भावांकडून, ७ टक्के काकांकडून तर ६ टक्के आत्याचार आजोबांकडून होत असल्याचे उघडकीस आले आहे. अत्याचार झाल्यानंतर २४ टक्के मुलांनी कुणाला सांगितले नाही. १६ टक्के मुलांनी त्याला विरोध केला. ११ टक्के मुलांना सांगण्यात आले की त्याची पर्वा करू नका, याबाबत कुठेही वाच्यता करू नये असे ४ टक्के मुलांना सांगण्यात आले. ३.५ टक्के मुलांच्या अत्याचाराबाबत पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली. या गोष्टींची पर्वा करू नये असे ६२ टक्के मुलांना वाटते. ६० टक्के मुले म्हणतात, ही सामान्य बाब आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आऊटसोर्सिंगने ३० व्हॉल्व्हमनची नियुक्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराची अत्यावश्यक सेवा असलेल्या दैनंदिन पाणीपुरवठ्याची मदारही आता ठेकेदाराच्या हाती राहणार आहे. पाणीपुरवठा विभागात व्हॉल्व्हमनची संख्या कमी असल्याने पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. या व्हॉल्व्हमनची नियुक्ती आऊटसोर्सिंगने करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जवळपास ३० व्हॉल्व्हमनची सेवा देण्यासाठी पालिकेने पावणेदोन कोटी रुपये खर्च खासगी एजन्सीला देण्याची तयारी दर्शवली आहे. सोबतच अतिरिक्त ३० व्हॉल्व्हमनची गरज असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातही मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. परंतु, मुख्यमंत्र्यांनी नोकरभरतीला नकार देत, आऊटसोर्सिंगद्वारे कामे करण्याचा सल्ला सत्ताधाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवांचेही खासगीकरण होण्यास सुरुवात झाली आहे. त्याची सुरुवात पाणीपुरवठा विभागातून झाली आहे. शहराचा वाढता विस्तार बघता पाणीपुरवठा विभागात व्हॉल्व्हमनची पदे रिक्त आहेत. तर जवळपास ४२ व्हॉल्व्हमन रिटायर होत असल्याचा दावा विभागाने केला आहे. पालिकेला २६३ व्हॉल्व्हमनची आवश्यकता असताना सध्या ५८ व्हॉल्व्हमन कार्यरत आहेत. त्यामुळे आऊटसोर्सिंगद्वारे ३० व्हॉल्व्हमन भरण्याचा प्रस्ताव स्थायीला सादर करण्यात आला. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मे. गायत्री इलेक्ट्रिक अॅण्‍ड एंटरप्रायजेस या कंपनीला त्यासाठी एक कोटी ७९ लाख ७१ हजार रुपये वर्षाकाठी दिले जाणार आहेत. सोबतच सभापतींच्या सूचनेनुसार अधिक ३० व्हॉल्व्हमनची गरज असल्याचे विभागाने सांग‌ितले. उपसूचनेद्वारे त्यालाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेची अत्यावश्यक असलेली पाणीपुरवठ्याची सुविधाही आता ठेकेदाराच्या हाती गेली आहे.

आयुक्तांची समयसूचकता

व्हॉल्व्हमनच्या आऊटसोर्सिंगच्या प्रस्तावावर चर्चा करताना सभापती गांगुर्डे यांनी अजून व्हॉल्व्हमनची आवश्यकता आहे काय, अशी विचारणा केली. त्यावर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने चव्हाणके यांनी रिक्त पदांचा पाढा वाचला. पूर्वी पालिकेत २६३ व्हॉल्व्हमन असल्याचा दावा करत ठेकेदाराकडून अधिकची माणसे हवी असल्याचे स्पष्टीकरण दिले. पाणीपुरवठा विभागाची अवास्तव मागणी लक्षात येताच आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गरज आहे तेवढीच मागणी करा असे सांगत पाणीपुरवठ्याच्या अवास्तव मागणीला लगाम घातला. निव्वळ ठेकेदाराकडून माणसे घ्यायची म्हणून वाढ करण्याच्या विभागाच्या प्रयत्नांना आयुक्तांनी समयसूचकता दाखवून ब्रेक लावला.


मुदतवाढीला मंजुरी

महापालिकेच्या एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण समितीच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रजनन व बालकल्याण कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या ३३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी नियुक्तीला स्थायीने मान्यता दिली आहे. सोबतच चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीलाही समितीने मंजुरी दिली आहे. गेल्या आठवड्यात हे सर्व प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images