Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एम. जी.रोडवर ‘चक्का जाम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक पोलिसांनी गुरुवारी दुपारी एम. जी. रोडसह परिसरात अचानक कारवाई करीत जवळपास ६० चारचाकी वाहनांना जॅमर बसविले. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. पोलिसांच्या अचानक कारवाईमुळे व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची चांगलीच धावपळ उडाली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या मटा सिटिझन रिपोर्टर अॅपद्वारे मांडण्यात आली होती.

एम. जी. रोडवर पार्क होणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे मोठा रस्ता अडला जातो. त्यातच रस्त्यावरून एखादी बस अथवा मोठे वाहन गेल्यास रस्त्यावर जागाच उरत नाही. यावर पर्याय म्हणून वाहतूक पोलिसांनी मध्यतंरी छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या काही जागेचा वापर करण्याचे नियोजन आखले. मात्र, ही योजना मार्गी लागली नाही. त्यामुळे एम. जी. रोडवरील वाहतुकीचा प्रश्न जैसे थे आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एक आंदोलन झाले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक थांबली. पर्यायी रस्ता असलेल्या एम. जी. रोडवर अगोदरच वाहने पार्क झालेली असल्याने मोठी वाहतूक कोंडी उद्भवली. यावेळी उपस्थित पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अजय देवरे यांनी लागलीच कर्मचाऱ्यांना सूचना करीत कारवाई करण्याचे आदेश दिले. वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर पार्क झालेल्या जवळपास ६० वाहनांच्या चाकांना जॅमर बसविले. एम. जी. रोडवरील बहुतांश इमारतींना पार्किंगची सुविधाच नाही. त्यामुळे सर्व वाहने रस्त्यावर पार्क होतात. या कारवाईमुळे वाहनचालकांचे धाबे चांगलेच दणाणले.

--

हेल्मेट नसलेल्यांवर कारवाई

हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीस्वारांवरही गुरुवारी कॉलेजरोडसह शहराच्या इतर भागात कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात कारवाईला गती देण्यात आली असून, मागील दोन दिवसांतच जवळपास २७५ दुचाकीस्वारांवर कारवाई झाली आहे. गुरुवारी हा आकडा शंभरच्या पुढे सरकण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅन्सर सेंटरसाठी ४५ कोटींचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शालीमार येथील संदर्भसेवा रुग्णालयातील टर्शरी कॅन्सर सेंटरसाठी ४५ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

या रुग्णालयावर उत्तर महाराष्ट्रातील शेकडो रुग्ण अवलंबून आहेत. नऊ वर्षापूर्वी या रुग्णालयाचे हस्तांतरण करण्यात आले. स्थापनेपासून रुग्णालयातील गैरसुविधांबाबत तक्रारी होत्या. नवीन कर्करोग व किडनी प्रत्यारोपणाचे विभाग प्रस्तावित आहेत. गोडसे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेतली. रुग्णालयाच्या टर्शरी कॅन्सर केअर सेंटरच्या विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव देण्याचे ठरवले आहे. केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राज्य कॅन्सर सोसायटीतर्फे राज्यातील शासकीय, खासगी रुग्णालयात टर्शरी कॅन्सर केअर सेंटर प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. गोडसे यांनी हे मंत्र्यांच्या निर्दशनास आणले. संदर्भ सेवा रुग्णालयात सध्या कॅन्सर रुग्णांसाठी वीस खाटा व अधिकाच्या तीस खाटांचे नियोजन करुन तेथे वरीलप्रमाणे प्रकल्प राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. भविष्यात सध्याच्या इमारतीवर दोन मजले बांधून तेथे वाढीव शंभर खाटांचे नियोजन केले जाणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.


नवीन मशिनरी

या रुग्णालयात २००८ पासून आतापर्यंत २६,१७४ कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये शस्त्रक्रिया झालेले ३४६३, केमोथेरपी घेतलेले ७९११ व रेडिओथेरपी घेतलेले ७९१ रुग्ण आहेत. गोडसे यांनी सांगितले की, प्रस्तावित प्रकल्पातंर्गत आधुनिक मशिनरीची मागणी केली आहे. त्यामध्ये साडेवीस कोटींच्या किरणोपचार मशिनचा समावेश आहे. या मशिनने साइडइफेक्टस होत नाहीत. इतर रुग्णांना किरणोत्साराचा संसर्ग होऊ नये म्हणून जमिनीखाली दीड कोटींचा आधुनिक बंकर बांधण्यात येणार आहे. या रुग्णालयात ५० लाखांची वैद्यकीय आँकोलाजी किंवा पॅलिएटिव्ह केअर यंत्रणा व बोनमॅरो ट्रान्सप्लान्टसाठी ५० लाखांच्या ऑपरेशन थिएटरच्या सुविधा झाल्यास कॅन्सर रुग्णांना वरदान ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दोन अपघात; डॉक्टर, जवानासह सहा ठार

$
0
0

टीम मटा, नाशिक

नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत गुरुवारी लष्करी जवान, तरुण महिला डॉक्टरसह सहा जण ठार झाले, तर एक महिला जखमी झाली. वावी गावाजवळ झालेल्या अपघातात दोन, तर मालेगाव येथे झालेल्या अपघातात चार जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दहा महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे.

वावीजवळ शिंदे वस्तीवर झालेल्या दोन मोटारसायकलींच्या धडकेत लष्करी जवान बाळासाहेब अशोक वाजे (वय २७, रा. डुबेरे, ता. सिन्नर) आणि विशाल चंद्रभान वेताळ (२०, रा. वरझडी ता. संगमनेर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर संगीता चंद्रभान वेताळ गंभीर जखमी झाल्या.

बालिकेचा करुण अंत

मालेगाव ः मालेगाव-मुंबई आग्रा महामार्गावरील पाटणे फाट्यावर गुरुवारी झालेल्या अपघातात धुळ्यातील चार जण ठार झाले. नाशिकहून धुळ्याकडे जाणाऱ्या कारच्या (एमएच१८/व्हीव्ही ८८)चालकाने पाटणे फाट्याजवळ गतिरोधकावर कारचा वेग कमी केला. त्याच वेळी मागून स्विफ्ट कार (एमएच १६/ एजे ०४३५) धुळ्याकडे जात होती. पुढच्या कारने गती कमी केल्यावर स्विफ्ट कारचालक शफिक रसूल अहमद (रा. नाशिक) याने ऐनवेळी ब्रेक लावला. त्यामुळे कार गोलाकार फिरून पुढच्या कारवर आदळली. त्याच वेळी या कारमागे असलेला कंटेनर स्विफ्ट कारवर आदळल्याने कारचा चक्काचूर झाला. अपघातात स्विफ्ट कारचालक अहमद जागीच ठार झाला, तर डॉ. रुची शहा (वय २६), प्राची चिंतन दवे (२३), चिंतन दवे (वय १० महिने) यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त कार ताब्यात घेतल्या असून, तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतर्कतेने टळेल मास हॅकिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक अकाउंट हॅक होण्याचा शहरातील हा पहिलाच प्रकार आहे. यामुळे सोशल मीडियावरील महिलांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा अधोरेरखीत झाला आहे. सायबर पोलिसांनी सतर्कता राखत संशयिताला शोधून काढले असून, लवकरच त्यास बेड्या पडणार आहेत. मात्र, सोशल मीडिया यूजर्सने पुरेशी सतर्कता बाळगल्यास असे प्रकार टळू शकतील, ही बाब या घटनेमुळे स्पष्ट झाली आहे.

एखाद्-दुसरे अकाउंट हॅक होण्याचा प्रकार शहरात नवीन नाही. मात्र, २८ किंवा त्यापेक्षा जास्त अकाउंट्सवर हॅकरने पहिल्यांदाच डल्ला मारल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराबाबत माहिती देताना सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक हॅक करण्यासाठी हॅकरला फारतर काही मिनिटांचा वेळ लागतो. असे प्रकार टाळण्यासाठी सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. आपण सजग असू तरच हॅकरला रोखता येऊ शकते. ओटीपी पासवर्ड कोणीही मागितला तरी देऊ नये. अगदी कुटुंबातील एखाद्या सदस्याने तो मेसेज करून मागितला असला तरीही. अशा वेळी संबंधितांशी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष बोलून खात्री करावी. शक्यतो, मोबाइलमध्ये आलेला ओटीपी हा पासवर्ड बदलण्यासाठी किंवा एखाद्या व्यवहारासाठी वापरला जातो, हे लक्षात घ्या.

--

हे करा...

-व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन टू स्टेप व्हेरिफिकेशनवर क्लिक करून व्हिरिफिकेशन करून घ्यावे. -फेसबुकसाठीही अनेक सिक्युरिटी फीचर्स असून, त्यांचा वापर करावा.

-सोशल मीडियावर रिप्लाय देताना अनेकदा विचार करावा.

-जवळच्या व्यक्तींकडून अश्लिल मेसेज अथवा चुकीचा फोटो आल्यास त्या व्यक्तीशी फोनवर संपर्क करा.

-अकाउंट हॅक झाल्याची खात्री पटल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधा.

--

हे टाळा...

-स्मॅप लिंक ओपन करणे.

-ओटीपीसह इतर पासवर्ड शेअर करणे.

-अनोळखी व्यक्तींना फ्रेंडलिस्टमध्ये ठेवणे.

-व्हॉट्सअॅप अथवा फेसबुकच्या सिक्युरिटी फीचर्सकडे दुर्लक्ष.

--

या प्रकरणातील संशयिताचा माग काढण्यात आला असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल. नागरिकांनी सोशल मीडियाच्या सिक्युरिटीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्यांना वेळीच प्रतिबंध बसतो.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टीधारकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारी योजनेतून आम्ही राहतो त्याच ठ‌िकाणी घरे बांधून द्या, तेथे मूलभूत सुविधा पुरवून घरपट्टी लागू करा आदी मागण्यांसाठी आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या आंदोलकांनी गुरुवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दुपारी अडीचच्या सुमारास तीन आंदोलकांनी राॅकेल अंगावर आेतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंधरा मिनिटांनी दोन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोरच राॅकेल अंगावर आेतून घेतले. एकापाठोपाठ आंदोलक आक्रमक होऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करू लागल्यामुळे पोलिसांनी दोन्ही वेळेस हस्तक्षेप करून आंदोलकांच्या हातातून आगपेटी हिसकावून घेतली. त्यानंतर पोलिसांनी जास्तीची कुमक मागवून आंदोलकांवर नियंत्रण आणले.

गौतमनगर, शांतीनगर, साठेनगर आणि रमाबाई आंबेडकरनगर परिसरातील रहिवासी गेल्या आठवड्यापासून उपाेषणाला बसले आहेत. त्याची दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे त्यांनी अगोदरच आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी हे आंदोलन केले. याअगोदर या आंदोलकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य दोन्ही रस्त्यांवर ठ‌िय्या मांडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ हे आंदोलन सुरू राह‌िल्याने भरपावसात नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर दोनच दिवसांत आंदोलकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मनसेच्या नेतृत्वाखालील आंदोलन चांगलेच पेटले.

दरम्यान, दुपारी या आंदोलकांनी गोल्फ क्लबच्या शासकीय विश्रामगृहात आलेल्या आदिवासी समितीच्या सदस्यांची भेट घेऊन प्रशासन दखल घेत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर समितीच्या आमदार सदस्यांनी जेवणानंतर आयुक्तांना बोलावण्याचे व सायंकाळी आंदोलनाला भेट देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलक थेट उपोषणस्थळी गेले व त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आदिवासी समितीची बैठक असल्यामुळे निम्म्याहून अधिक जिल्हाधिकारी कार्यालयातले कर्मचारी गोल्फ क्लबच्या शासकीय विश्रामगृहात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात ४० ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्वात मोठी समस्या असलेल्या पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने ४० ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’ सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. या ४० ठिकाणी पार्किंगसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन कोटी ५० लाखांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

शहराच्या पाच विभागांत ऑनस्ट्रीट ३४ ठिकाणी, तर ऑफस्ट्रीट ६ ठिकाणी पार्किंग स्थळे विकस‌ित केली जाणार आहेत. ती खासगी ठेकेदाराला चालविण्यासाठी दिली जाणार आहेत. तसेच ‘पे अॅन्ड पार्क’ची स्थळे ही महापालिकेच्या मार्फत विकस‌ित करण्यात येणाऱ्या मोबाइल अॅपद्वारे नियंत्र‌ित केली जाणार असल्याने त्यावर पालिकेचे नियंत्रण राहणार आहे.

गुरुवारी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जादा विषयांमध्ये शहरातील ‘पे अॅण्‍ड पार्क’साठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. शहरातील वाहतूक नियंत्रणासह पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी बांधकाम विभागाने आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत ४० ठिकाणी ‘पे अॅन्ड पार्क’ स्थळे विकस‌ित केली जाणार आहेत. हा ठेका एकाच ठेकेदाराला देण्याचा प्रयत्न पालिकेने केला. परंतु, त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या पार्किंग ठिकाणांचे पाच विभाग करण्यात आले असून, पाच स्वतंत्र ठेके दिले जाणार आहेत. पार्किंगचे नियंत्रण हायटेक पद्धतीने केले जाणार असून, मोबाइल अॅपद्वारे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ठेकेदारांसाठी पालिकेच्या वतीने पार्किंगस्थळावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी २ कोटी ५० लाखांचा खर्च गृहीत धरला असून, त्याला स्थायी समितीने विनाचर्चाच मंजुरी दिली आहे. पाच विभागांत स्वतंत्रपणे ‘पे अॅण्ड पार्क’चे ठेके दिले जाणार आहेत.

ठेकेदाराला थेट मदत?

शहरात उभी केली जाणारी ही पे अॅण्‍ड पार्किंग स्थळे ही खासगी ठेकेदाराला चालविण्यासाठी दिला जाणार आहे. पंरतु, त्या ठेकेदाराला पायाभुत सुविधा महापालिका पुरवणार असल्याबददल आश्चर्य व्यक्त केेले जात आहे.या ठिकाणाहून ठेकादार पैसा कमावणार आहे.परंतु त्याच्या पैशांसाठी महापालिकेने सुविधा का उपलब्ध करून द्याव्यात असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे महापालिका थेट ठेकेदारांचेच लाड पुरवत असल्याचे या प्रस्तावावरून समोर आले आहे.तर स्थायीच्या सदस्यांनीही कोणतीही खातरजमा न करताच प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


पार्किंगसाठी कॅशलेस सुविधा

या ४० पार्किंगच्या ठिकाणांवर पेमेंट अदा करण्यासाठी कॅशलेश सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी महापालिका स्वतंत्रपणे मोबाइल अॅप तयार करत असून, हे अॅप वापरणे ठेकेदाराला बंधनकारक आहे. या अॅपच्या माध्यमातून वाहनधारकाला थेट कॅशलेस पद्धतीने पार्किंगचे बील भरता येणार आहे. या अॅपमुळे किती वाहने आली आणि ठेकेदाराला किती पैसे मिळाले, याचे नियंत्रण होणार आहे. तसेच ठेकेदारावर वॉचही ठेवता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता, बिटको हॉस्पिटलचा मुद्दा गाजला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

आरोग्यासह, बिटको रुग्णालय, पथदीपांविषयीच्या प्रश्नांवर नाशिकरोड प्रभाग समितीची पहिली सभा चांगलीच गाजली. मनपाच्या निवडणुकीनंतर गुरुवारी सकाळी झालेल्या पहिल्याच प्रभाग सभेदरम्यान उपस्थित नगरसेवकांनी प्रभाग सभापती सुमन सातभाई यांच्यासमोरच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरी समस्यांवर लक्ष्य केले. नव्याने निवडून आलेल्या व एक पंचवार्षिक विश्रांती घेतलेल्या नगरसेविकांनी पहिलीच प्रभाग समितीची सभा गाजवली.

नाशिकरोड प्रभाग समितीची सभा गुरुवारी येथील विभागीय कार्यालयात प्रभाग सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या उपस्थितीत झाली. या सभेदरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी मास्क, ग्लोव्हज, रेनकोट पुरविण्याची मागणी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी लावून धरली. याशिवाय बिटको रुग्णालयातील समस्यांचा त्यांनी या स्भेत पाढाच वाचला. बिटको रुग्णालयातील पाण्याच्या टाक्या वेळच्या स्वच्छ केल्या जात नसल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला. रुग्णालयातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने या रुग्णालयात दुर्गंधी पसरली असून बालरुग्ण विभागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मलेरिया विभागाच्या थंडावलेल्या कामाबाबत व शहरातील बंद पथदीपांच्या दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नगरसेविका सीमा ताजणे यांनी जाब विचारला. बिटको रुग्णालयाच्या समस्यांवर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सरोज आहिरे यांनी आवाज उठवला. शहरात पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असून, गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील व्यावसायिक रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक रमेश धोंगडे यांनी केली. या सभेस विविध विभागांचे अधिकाऱ्यांसह नगरसेवक संभाजी मोरुस्कर, दिनकर आढाव, मंगला आढाव, रंजना बोराडे, मीरा हांडगे, जयश्री खर्जुल, ज्योती खोले, सुनीता कोठुळे, केशव पोरजे, संतोष साळवे, पंडित आवारे, प्रशांत दिवे आदी उपस्थित होते.

निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निषेध

बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर या सभेस गैरहजर राहिल्याने या रुग्णालयाविषयीच्या समस्यांवरील चर्चेदरम्यान नगरसेवकांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नगरसेवक संतप्त झाले. यावेळी बिटको रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी विनापरवानगी गैरहजर राहिल्याचा आरोप उपस्थित नगरसेवकांनी करुन त्यांच्या कामकाजाचा निषेध केला. यापुढील प्रभाग समिती सभेत त्याविषयीचा अहवाल सादर करण्याची मागणीही यावेळी उपस्थित नगरसेवकांनी केली.


विषय पत्रिकेवर जुनेच प्रभाग

या प्रभाग समितीच्या सभेच्या विषयपत्रिकेवर मनपा निवडणूक होऊन चार महिने उलटले तरी जुन्याच प्रभाग क्रमांकांचा उल्लेख आढळून आला. गेल्या निवडणुकीत नाशिकरोड प्रभागात प्रभाग क्र. १७ ते २२ असे सहा क्रमांकांचे चार सदस्यीय प्रभाग नव्याने अस्तित्वात आले आहेत. केवळ प्रभाग क्र. १९ मध्येच तीन सदस्य आहेत. असे असूनही विषय पत्रिकेवर मात्र जुन्याच प्रभाग क्रमांकाची नोंद दिसून आली. यावरुन मनपाचे ढिसाळ कामकाज स्प्ष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलासाठी पुन्हा रांगा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

केंद्र सरकारने गरजूंना घरकुले मिळावीत यासाठी पंतप्रधान आवास योजनेखाली नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शहरात असलेल्या महा ई-सेवा केंद्रांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल १५ हजारांहून अधिक नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महा ई-सेवा केंद्रांवर नोंदणी केली होती. परंतु, महा ई-सेवा केंद्रांवर नोंदणी केलेल्यांना महापालिकेत नावनोंदणी करण्याबाबत कळविण्यात आल्याने गुरुवारी पुन्हा महिला व पुरुषांच्या लांबच लांब रांगा महापालिका कार्यालयांत लागल्या होत्या.

शहरी भागात पंतप्रधान आवास योजनेची महापालिकेत नोंदणी करणे सक्तीचे असल्याने पुन्हा नव्याने अर्ज भरण्यात येत असल्याचे यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यात मात्र सर्वसामान्य जनतेवरच दिवसभर रांगेत उभे राहून गैरसोय सहन करण्याची वेळ आल्याने रोष व्यक्त करण्यात आला.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने गरजूंनी नोंदणी करण्याबाबत आवाहन केले होते. त्यानंतर शहरातील अनेक महा ई-सेवा केंद्रांवर महिला व पुरुषांच्या रांगा लागल्या होत्या. नोंदणी करताना गर्दी होत असल्याने अखेर महापालिकेने महा ई-सेवा केंद्रे काही दिवस बंद ठेवण्याचाही निर्णय घेतला होता. त्यातच सायबर कॅफेचालकांकडूनदेखील पंतप्रधान आवास योजनेचे ऑनलाइन अर्ज अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन भरण्यातही आले होते. महा ई-सेवा केंद्रचालक पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज भरत असतानाच महापालिकेनेदेखील सहा विभागांत शहरी भागातील अर्ज विक्रीसाठी ठेवले होते. अगोदरच महा ई-सेवा केंद्रात १५ हजारांहून अधिक गरजूंनी पंतप्रधान आवास योजनेची नोंदणी केली होती. त्यातच पुन्हा महापालिकेतदेखील हजारोंनी अर्ज दाखल झाले होते. आता पुन्हा महा ई-सेवा केंद्रांत नोंदणी केलेल्यांना महापालिकेत पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज भरणे सक्तीचे केल्याने सर्वसामान्यांवर पुन्हा रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान आवास योजनेबाबत अगोदरच व्यवस्थित माहिती दिली न गेल्याने अनेकांना त्याचा फटका बसला.

--

भविष्यात वाढणार गुंता

एकाच व्यक्तीने महा ई-सेवा केंद्र व महापालिकेत नोंदणी केल्याने त्याचाही गुंता भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऑनलाइन अर्ज भरणाऱ्यांची महापालिकेतून अर्ज घेण्यासाठी महापालिकेच्या सर्वच विभागीय कार्यालयांत मोठी गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंट्रोल रूमवरही ठेकेदारांचा ताबा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील घंटागाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी जीपीएस यंत्रणेसह कंट्रोल रूम पालिका मुख्यालयात तयार करण्यात आला आहे. पालिकेच्या या कंट्रोल रूमवर मात्र घंटागाडी ठेकेदारांचा ताबा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जीपीएस यंत्रणेच्या उपयोगितेबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे. स्थायी समितीच्या सभेत खुद्द आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीच माहिती देऊन कंट्रोल रूमचे रहस्य उघड केले आहे. त्यामुळे घंटागाडी ठेकेदारांचे पालिका करत असलेल्या लाडाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेच्या घंडागाडी ठेक्यामागील वादाचे शुल्ककाष्ट संपत नसून, वाद आणि घंटागाडी शब्द आता समानार्थी झाला आहे. वेळेवर घंटागाडी न येणे, कचऱ्याऐवजी दगडमाती भरून वजन वाढविणे, नादुरुस्ती, ठेकेदारांची अरेरावी, कर्मचाऱ्यांना नियमित वेतन न देणे यामुळे घंटागाडीचा ठेका बदनाम झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षी नव्याने करार करताना घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. घंटागाडीचे मार्ग निश्चित करत ठराविक वेळेत घंटागाडी निश्‍चित ठिकाणी न पोहोचल्यास ठेकेदारांना दंड करण्याचीदेखील तरतूद आहे. कचरा डेपोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून घंटागाडीच्या कामात पारदर्शकता आणण्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला. त्यासाठी महापालिका मुख्यालयात कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात आधुनिक यंत्रणा बसविली असताना त्यावर काम करण्यासाठी महापालिकेचेच कर्मचारी कार्यरत असणे अपेक्षित असताना त्या यंत्रणांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांमार्फतच होत असल्याचे आज स्थायी समितीच्या बैठकीत समोर आले. खुद्द आरोग्य अधिकाऱ्यांनीच याबाबत कबुली देऊन घंटागाडीच्या कारभारात पारदर्शकतेचा दावा फोल ठरविला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या गैरकारभाराचे पितळ उघड झाले आहे. दरम्यान, ठेकेदाराचे दोन कर्मचारी आणि पालिकेचे दोन कर्मचारी कार्यरत असल्याची सारवासारव आता अधिकाऱ्यांनी केली आहे.

वर्गीकरणावरून वाद

घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याची व्यवस्था अजूनही नसल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवीण तिदमे आणि भाजपच्या अलका आहेर यांनी केला आहे. या संदर्भातील पुरावेच दोघांनी स्थायीत सादर केले. आयुक्त आणि महापौरांनी कचरा वर्गीकरणासंदर्भात वारंवार प्रशासनाला आदेशित केले, तरीही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. आरोग्य विभागाला काम करायचे नसेल तर आम्हाला सांगा, असा सज्जड इशाराच सदस्यांनी दिल्याने वर्गीकरणाचा वाद पुन्हा उफाळला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्त, महागाईचा संभ्रम

$
0
0

टीम मटा

देशाच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरू पाहणारा वस्तू व सेवा कर (जीएसटी) अवघ्या काही तासांनी (दि. १ जुलै) लागू होणार आहे. हा दिवस तसा भारतीयांसाठी ऐतिहासिकच म्हणावा लागेल. ही कर प्रणाली लागू करण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर तयारी केली असली, तरी व्यावसायिक, व्यापारी अशा वर्गांसह सामान्य जनतेत त्याबाबत संभ्रम आणि उत्सुकता आहे. नव्या कररचनेमुळे नेमके काय महागणार आणि काय स्वस्त होणार, नेमक्या कुठल्या वस्तूंवर किती कर लागणार, सामान्यांना फायदा होईल की तोटा, जीएसटी प्रणाली लगेचच पूर्ण क्षमतेने अस्तित्वात येईल का, याबाबतही संभ्रम आहे. नाशिकमधील तज्ज्ञ आणि व्यावसायिक चित्रही यापेक्षा वेगळे नाही. काहींनी जीएसटीचे स्वागत केले आहे, तर काहींनी चक्क नाके मुरडत होऊ घातलेल्या महागाईवरून आगपाखड केली आहे.

--
- वातानुकूलित रेस्तराँवर १८ टक्के, तर पंचतारांकित रेस्तराँवर २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी

- गोड केलेले एअरिएटेड तसेच विविध स्वादांचे पाणी यांवर ४० टक्क्यांपर्यंत कर

- हेअर ऑइल, टूथपेस्ट, साबण यांच्यावर १८ टक्के

- गूळ, तृणधान्ये, दूध यांसारखा कच्चा माल जीएसटीमुक्त

- आयुर्वेदिक उत्पादनांवर १२ टक्के कर

- होमकेअर उत्पादने व शाम्पू यांवर २८ टक्के कर

--

विमाधारक भरणार कर!

जीएसटी लागू झाल्यामुळे जीवन विमा, आरोग्य विमा व जनरल इन्शुरन्स यावर साधारण २.५ ते ३ टक्क्यांपर्यंत हा कर लागू होणार असल्याची माहिती आहे. त्याचा व्यवसायावर परिणाम म्हणजे विमाधारकास हा कर भरावा लागेल. मात्र, त्यामुळे त्याच्या परिपक्वता ( मॅच्युरिटी ) लाभात त्या प्रमाणातील वाढ होणार नाही. परंतु, ही नवी कर प्रणाली राष्ट्रीय स्वरूपाची असल्याचे विमा व्यवसायावर त्याचा सुरुवात वगळता फारसा परिणाम होणार नाही, असे मला वाटते. मात्र, हे ग्राहकांना पटवून देताना कसरत करावी लागेल.

- एस. डी. निकम, विमा प्रतिनिधी

सराफ व्यावसायिक साशंक

सध्या सोन्यावर १.२ टक्के व्हॅट, १ टक्का एक्साइज, ०.५ टक्के एलबीटी असा एकूण २.७ टक्के कर होता. जीएसटी लागू झाल्यानंतर हा ३ टक्के असणार आहे. त्यात अजूनही काही तरतुदी आहेत. जीएसटीच्या बाबतीत सरकारी यंत्रणा कशाप्रकारे कामकाज करेल याविषयी साशंक आहोत. माहिती अपलोड करणे, इंटनेट, सर्व्हर डाउनलोड होणे यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. सराफ असोसिएशनची याबाबतची दोन ते तीन महिन्यांचा कालावधी मिळावा अशी, मागणी आहे. काही कमी-जास्त झाल्यास व्यावसायिकांना सांभाळून घेतले पाहिजे. चुका झाल्यास सरकारने लगेच आसूड घेऊन उभे राहू नये. ऑनलाइन प्रक्रिया करताना दहावी व बारावीच्या निकालानंतर प्रवेशप्रक्रियेच्या वेळी गोंधळ उडाला, तसे याबाबतीत व्हायला नको. संपूर्ण देशभरात ही ऑनलाइन प्रक्रिया उभी करताना ती सुरळीत राहील का, याविषयी साशंकता आहे.

- राजेंद्र ओढेकर, माजी अध्यक्ष, सराफ असोसिएशन

बांधकाम व्यवसायात सुसूत्रता

जीएसटीचा बांधकाम व्यवसाय व ग्राहकांवर फारसा परिणाम होणार नाही. उलट कार्यपद्धतीत सुसूत्रता येईल. ग्राहक, बांधकाम व्यावसायिक आणि सरकार अशा सर्वांनाच जीएसटीचा लाभ होईल. बांधकाम व्यवसायात जीसएसटी १२ टक्के आहे. मात्र, ग्राहकांवर त्याचा फारसा भार पडणार नाही. कारण, त्याचे इनुपट क्रेडिट मिळणार आहे. कराचे दायित्व साडेपाच टक्के होते व जीएसटीनंतरही जवळपास तेवढेच राहील. फक्त ते प्रोजेक्टच्या स्वरूपावर अवलंबून असेल. पूर्वी ग्राहकाने घर विकत घेतल्यानंतर बिल्डर साडेचार टक्के सर्व्हिस टॅक्स आणि एक टक्का व्हॅट आकारायचे. ग्राहकांतर्फे हे पैसे ते सरकारकडे जमा करायचे. आर्किटेक्ट, बांधकाम मटेरियल सप्लायर, कान्ट्रॅक्टर यांनाही सर्व्हिस टॅक्स द्यावा लागायचा. आता असे वेगळे अकौंटिंग राहणार नाही.

- तुषार संकलेचा, बांधकाम व्यावसायिक

इलेक्ट्रॉनिक्सबाबत संमिश्र स्थिती

टेलिव्हिजन, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिन यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीत २ ते ३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज आहे. शिवाय इलेक्ट्रिकल इस्त्री, मिक्सर-ग्राइंडर्स आणि ज्युसर्स यांसारखी छोटी घरगुती उपकरणे एकाच जीएसटी स्लॅबमध्ये आल्याने महागण्याची चिन्हे आहेत. अशा वस्तूंवर पूर्वी २५ ते २६ टक्के असलेला कर आता, २८ टक्के होणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रत्यक्ष कर प्रणाली लागू झाल्यानंतरच सर्व संभ्रम दूर होतील.

- बालाजी चौरे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे विक्रेता

पालक, विद्यार्थ्यांनो निर्धास्त राहा

शैक्षणिक साहित्य विक्रीवर जीएसटीचा काहीही परिणाम होणार नाही. कारण जीएसटी कर हा छापील किमतींवर आकारला जाणार नसून, तो त्या वस्तूच्या छापील किमतीमध्येच समाविष्ट केला जाणार आहे. सर्व प्रकारच्या छापील पुस्तकांवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लावण्यात आलेला नाही. मात्र, वह्या, रजिस्टर, पेन, पेन्सिल या साहित्याला १२ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. ड्राईंग कलर्सला १८ टक्के कर लागणार आहे. या टॅक्समुळे शैक्षणिक साहित्याच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. पालक, विद्यार्थ्यांनी निर्धास्त राहावे.

- अतुल पवार, अध्यक्ष, नाशिक बुक सेलर्स अॅण्ड स्टेशनर्स असोसिएशन

खेळांची साधने महागणार

जीएसटीचा फटका खेळाच्या साहित्यालाही बसणार असून, व्यायामाची व खेळांची साधने महागणार आहेत. व्यायाम व खेळाच्या साधनांचे वर्गीकरण चैनीच्या गोष्टीत केल्याने सामान्यांना झळ पोचणार आहे. एक हजार रुपयांच्या आतील किमतीच्या होजिअरी कपड्यांवर पूर्वी ५ टक्के टॅक्स लागत होत. आता तो ८ टक्के लागणार आहे. होजिअरीच्या ज्या वस्तूंची किंमत एक हजार रुपयांच्या पुढे आहे, अशा कपड्यांना १२ टक्के टॅक्स लागणार आहे. खेळाच्या साहित्यावर १२ टक्केच टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे. परंतु, योगा मॅट, डंबेल्स, लेझिम, घुंगरू काठी या वस्तूंचा समावेश चैनीच्या वस्तूंमध्ये केल्याने त्यांच्यावर २८ टक्के टॅक्स लागणार आहे. अॅथलेटिक्स खेळासाठी लागणाऱ्या प्रत्येक साहित्यावर २८ टक्के कर आकारणी करण्यात येणार आहे. अॅथलेटिक्स खेळासाठी येणारे खेळाडू हे ग्रामीण भागातून येत असतात. महागडे साहित्य घ्यायला त्यांना परवडत नाही. एकच शूज दोघेमिळून वापरतात. पोलिस भरतीसाठी जाणारे खेळाडूदेखील एकच साहित्य दोघेमिळून वापरतात. अशा खेळाडूंचे मात्र हाल होणार आहेत. प्रत्येक खेळाला वेगळा कर आकारला गेला आहे. खेळाच्या करात सुसूत्रता येणे आवश्यक आहे. सर्व साधनांना एकच कर आकारणी व्हायला पाहिजे. खेळ ही अत्यावश्यक बाब असल्यामुळे कर कमी असावेत.

- अनंत जोशी, संचालक साई स्पोर्टस

छापील किमतीबाबत सामान्यांना मिळणार दिलासा

कारखान्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या स्टील, प्लास्टिकच्या वस्तूंवर अवाजावी किमती दिलेल्या असतात. मात्र, आता प्रत्यक्ष उत्पादन केलेल्या मालाच्या किमतीवर जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादन केलेल्या मालाची किंमत मुळातच कमी होणार आहे. त्याचा सर्वसामान्यांना दिलासाच मिळणार आहे. आतापर्यंत होणारी ग्राहकांची फसवणूक यामुळे निश्चितच टळू शकणार आहे. मात्र, आता यासंदर्भातील अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने केली जाते, हे महत्त्वाचे ठरेल.

- आबा देवरे, ग्राहक


पादत्राणे व्यावसायिकांत संभ्रम

जीएसटीविषयी अचूक माहिती उपलब्ध होणे, पुरेस प्रबोधन होणे आवश्यक आहे, तरच त्याची उपयुक्तता कळेल.पादत्राणांवर आधीचा कर १२.५ टक्के होता, तो नव्याने १८.५ टक्क्यांवर जाणार आहे. आधीच्या करापेक्षा ५ ते ६ टक्के वाढीव कर द्यावा लागणार असला, तरी ५०० रुपयांपर्यंतच्या विक्रीला करात चांगली सवलत मिळणार असल्याने फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, ५१० रुपयांचा माल विकला, तर अधिक कराचा बोजा, हे धोरण अन्यायकारक वाटते. त्यामुळे संपूर्ण माहिती मिळणे व्यावसायिकांसाठी गरजेचे असून, त्यानंतरच खऱ्या अर्थाने मूल्यमापन करता येईल.

- सलीम शेख, पादत्राणे व्यावसायिक

अवजारांमुळे शेतकऱ्यांवर पडणार बोजा

केंद्र सरकारने ट्रॅक्टरद्वारे चालणाऱ्या कृषी अवजारांवर १२ टक्के कर लावला आहे. जीएसटीपूर्वी सहा टक्के कर होता. मात्र, नवीन कर प्रणालीत तो १२ टक्के केल्याने हा बोजा शेतकरीवर्गावर पडणार आहे. परिणामी शेतकरीवर्गात नाराजीची भावना आहे. मात्र, बैलजोडी अथवा हाताने वापरावयाची साधने जीएसटीमधून वगळली आहेत, ही समाधनाची बाब आहे. एकंदरीतच शेतकरीबांधवांसाठी कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

- यशवंत अमृतकर, कृषी अवजारे व्यावसायिक

कर चुकवेगिरीला बसणार आळा

जीएसटीमुळे कर क्षेत्रात पारदर्शकता येईल. आजवर होत असलेल्या व्यापार, उद्योग, व्यवहारांत मोठा बदल होईल. आपल्या देशात मोठ्या प्रमाणत कर चुकवेगिरी होते. त्याला आळा घालण्यासाठी जीएसटी महत्त्वपूर्ण ठरेल. दप्तर, पर्स, बॅग व्यवसायाला प्रारंभी याचा फटका बसू शकतो, हे खरे आहे. कारण, सध्या या वस्तूंवर ६ ते १४ टक्के कर आकाराला जातो. जीएसटी लागू झाल्यावर मात्र तो २८ टक्के असेल. अर्थात, सरकारने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी केले आहेत. त्यामुळे महागाई कमी होऊ शकेल. कर व्यवस्थेत सुसूत्रता, पारदर्शकता येण्यासाठी जीएसटी उपयुक्त ठरू शकेल.

- दिलीप सोनग्रा, दप्तर, बॅगविक्रेते

हार्डवेअर व्यवसायाला ठरणार पूरक

थेट ग्राहकांपेक्षा बिल्डर व कॉन्ट्रॅक्टर हेच हार्डवेअर मटेरियलची खरेदी करताना दिसतात. त्यात अधिकाधिक व्यवहार चेक पेमेंटद्वारे होत असतात. प्रत्यक्ष बिल देताना पक्के बिल द्यावे लागते. त्यामुळे सर्व कर लावले जातातच. जीएसटीमुळे व्यवसायावर फारसा परिणाम होणार नसला, तरी सरकारला वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये कर द्यावा लागत होता. आता हा कर एकाच ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये चक्कर मारणे कमी होईल. हार्डवेअरसाठी आधी १३.५ टक्के कर दिला जात होता. आता तो २८ टक्के लागणार आहे. त्यामुळे तो फायद्याचाच असणार आहे आणि शासनाला आपण तो देणार असल्याने त्याचे लाभही आपल्यालाच विविध योजना व सरकारी सुविधांमार्फत मिळणार आहेत.

- उमेदभाई गड्डा, हार्डवेअर व्यावसायिक

प्लंबिंग व्यवसायावरील ताण घटणार

प्लंबिंग साहित्यामधील विक्रीवरील कर पूर्वीपेक्षा एक ते दीड टक्क्याने कमी होणार असला, तरी तांत्रिक बाबी स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत अडचण जाणवू शकते. याआधी प्रत्येक ग्राहकाला मालविक्री करताना ६ टक्के व्हॅट व १२. ५ टक्के एक्साइज कर भरणा करावा लागत होता. त्यावर २ टक्के सीएसटी कर. आता मात्र ९ टक्के सीजीएसटी व ९ टक्के एसजीएसटी असा एकूण १८ टक्के कर भरणा करावा लागणार आहे. परिणामी व्यवसायावर कोणताही ताण येणार नसला, तरी ग्राहकांना तसे समजावून सांगण्यात बराच वेळ खर्ची करावा लागणार आहे.

- आनंद चोपडा, प्लंबिंग व्यावसायिक

छोट्या स्वरूपातील कपडे व्यापाऱ्यांना दिलासा

जीएसटीत व्यापाऱ्यांसाठी दोन स्कीम आहेत. वीस लाख रुपयांपर्यंतची वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना केवळ पाच टक्के कर असून,

त्यापुढील ७५ लाखांपर्यंतच्या वार्षिक उलाढालीवर १८ टक्के कर राहणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांची जास्त करातून सुटका झाल्याने वस्तूंच्या किमती काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. किमती कमी झाल्यास त्याचा थेट फायदा ग्राहकांना होईल. फिरते चलन वाढून बाजारातील चलन तुटवडा भरून निघेल. कररचनेत सुटसुटीतपणा येऊन वेळ व पैशाचीही बचत होणार आहे. त्यामुळे छोट्या स्वरूपातील कपडे व्यापारीबांधवांना जीएसटी पायेदशीर ठरणार असून, मोठ्या स्वरूपातील व्यापारीबांधवांना मात्र काहीशी समस्य निर्माण होण्याची स्थिती सध्या तरी दिसून येत आहे. अंमलबजावणीनंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल.

- प्रभाकर बडगुजर, रेडीमेड कपडे व्यापारी

काळा पैसा वाढणार

क्रेडिट कार्डच्या वापारावरील सर्व्हिस टॅक्स १५ वरून १८ टक्के करण्यात आला. पुढील महिन्यांपासून हा दर लागू होईल. यापूर्वी तो ११ वरून १५ टक्के करण्यात आला होता. गत दोन ते तीन वर्षांत सर्व्हिस टॅक्समध्ये किमान आठ टक्के वाढ झाली. एकीकडे ऑनलाइन व्यवहारांना चालना द्यायची आणि दुसरीकडे टॅक्स वाढवयचा, असे दुहेरी काम सरकारकडून सुरू आहे. सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ झाल्यानंतर नागरिक पुन्हा कॅश व्यवहारांकडे वळतील. वस्तूंवर टॅक्स द्यायचा आणि वस्तू कार्डवर खरेदी केली म्हणून सर्व्हिस टॅक्स द्यायचा, ही तर सरळ लुटच म्हणावी लागेल. ऑनलाइन व्यवहारांमुळे पारदर्शकता येते. सरकारसाठी ते सोयीचे असताना सर्व्हिस टॅक्स वाढविण्यात आला. यामुळे पुन्हा नगदी व्यवहार तेजीत येऊन काळा पैसा वाढू शकतो.

- अमोल शिंदे, नागरिक

संगीत क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम नाही

नाशिक ही सांस्कृतिक भूमी असल्याने येथे रसिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तानसेन नाही, तर कानसेन तर बनूया, अशा भावनेतून लोक संगीताची मोठ्या प्रमाणात सेवा करताना दिसतात. नाशकात संगीत वाद्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी वाद्यांवर १३.५० टक्के इतका कर होता. आता तो २८ टक्के राहणार आहे. वाद्यांच्या किमतीत किती फरक पडतो, यावर त्याचे होणारे परिणाम अवलंबून राहणार आहेत. तरीही माझ्या अनुभवानुसार याचा फारसा प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे वाटते.

- केतन छत्रिसा, संचालक, वाद्य सूरसंगम

व्यवसायात सुटसुटीतपणा येईल

नव्या कर प्रणालीमुळे छोट्या वस्तूंवरील टॅक्स वाढणार आहे. सध्या रेनकोट आणि छत्री यांची असणारी किंमत जीएसटीमुळे वाढणार आहे. सध्या रेनकोट, छत्रीवर ६ टक्के कर आकारला जातो. मात्र, हा दर दुप्पट किंवा तिप्पट म्हणजे १२ ते १८ टक्के वाढणार आहे. ही करप्रणाली समजायला अवघड असली आणि टॅक्सची टक्केवारी वाढणार असली तरी पारदर्शक व्यवहारांकरिता हा निर्णय हितकारक आहे. व्यावसायिकांना ही करप्रणाली समजून घेण्यास अवघड जाईल पण एकदा सवय झाल्यावर हे सगळं सोपं होणार आहे. अपडेटेड व्यवसायासाठी जीएसटी लाभदायक आहे. नोटबंदीचा निर्णय झाल्यावर काही दिवस त्रास सहन करावा लागला, तसा कदाचित काही दिवस जीएसटीनंतर त्रास होऊ शकतो. पण यामुळे छोट्या व्यासायिकांपासून बड्या व्यवसायिकांपर्यंत सर्वांच्या कारभारात सुटसुटीतपणा येईल.

- संदीप मानकर, व्यावसायिक, मानकर बॅग हाऊस

मोबाइलसाठी उपयोगी करप्रणाली

जीएसटीमुळे मोबाइलवरील कर दीड टक्क्याने कमी होणार आहे. अगोदर त्यावर १३.५ टक्के व्हॅट लावला जात होता. पण, आता १२ टक्के कर लागणार आहे. त्यामुळे किमती कमी होतील. कॉम्प्युटरवर मात्र आता ६ टक्क्यांऐवजी १८ टक्के कर लागणार आहे. त्यामुळे त्याच्या किमती वाढणार आहेत. पुढील काळात कॉम्प्युटरवरही हा कर कमी होईल, अशी अपेक्षा करूया. या एकाच करामुळे अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत. भविष्यात ही कर पद्धती सर्वांच्या दृष्टीने उपयोगीच ठरणार आहे. अगोदर थोडा त्रास झाला, तरी त्यानंतर त्याचा

फायदाच आहे.

- तुषार शहाणे, मोबाइल विक्रेते

स्टीलच्या भांडी खरेदीत सुलभता

स्टीलच्या भांडे उत्पादक कारखान्यांकडून बऱ्याच वस्तूंवर अव्वाच्या सव्वा किमती टाकल्या जात असतात. त्यामुळे ग्राहकांकडूनदेखील भांडी घेताना घासाघीस केली जाते. जीएसटी लागू झाल्यावर याला निश्चितच आळा बसणार आहे. उत्पादन केलेल्या वस्तूंवरच तत्काळ कर लागू होणार असल्याचे त्याचा फायदा सर्वासामान्य ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे अशा भांडे खरेदीत ग्राहकांचा फायदा होणार असला, तरी नेमके चित्र लवकरच स्पष्ट होईल.

- पारस दगडे, संचालक, सुमित स्टील सेंटर

ट्रान्स्पोर्ट व्यवसायासंदर्भात भूमिकाच नाही

केंद्र शासनाने ट्रान्स्पोर्टसंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नसल्याने मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. अद्यापही कोणतीही भाडेवाढ नसली, तरीही ती अटळ असून, परिणामी महागाईत वाढ होणारच आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने तशी मानसिकता ठेवावी. वास्तविक देशभरातील सर्वच वस्तूंच्या दरांवर मोठा प्रभाव टाकणारा ट्रान्स्पोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो. मात्र, त्याबाबत फारसा विचार झाल्याचे दिसत नाही.

- विलास दंडगव्हाळ, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक

प्रिंटिंग व्यवसायासाठी सुलभ

जीएसटीमुळे प्रिंटिंग प्रेसच्या व्यवसायाला एका चाकोरीत काम करता येईल. शासनाने एक करप्रणाली लागू केल्याने व्यवसायात सुलभता येईल. प्रिंटिंग व्यवसायासाठी लागणारे पेपर, इंक व अन्य घटक यांच्या रेटवर हा व्यवसाय अवलंबून असल्याने त्यावर आजच काही सांगता येणार नाही. जीएसटी लागू होणारच आहे, तेव्हा जे नियमानुसार असेल ते होईल. यासंदर्भात आमची तयारी आहे. सर्वसामान्य ग्राहकांचा फायदा होणे हे महत्त्वाचे असून, या कर प्रणालीमुळे किमान आमच्या व्यवसायातून तरी सरकारचा हा उद्देश सफल होईल, असे प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे.

- उमेश सोनवणे, प्रिंटिंग व्यावसायिक

फर्निचर उत्पादकांवर वाढणार करांचे ओझे

फर्निचरच्या किमतीमध्ये सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पादनावर लागू होणारा २८ टक्के कर, अधिक नफ्यावर लागू होणारा २८ टक्के कर, अधिक इन्कम टॅक्स अशी गोळाबेरीज केल्यास फर्निचर उत्पादनांची किंमत वाढून जवळपास एकूण ६० टक्क्यांंपेक्षाही अधिक कर फर्निचर व्यावसायिकांकडून वसूल केला जाईल. त्यामुळे किंमत २० ते ३० टक्क्यांंनी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- मनीष हरियाणी, फर्निचर उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगावात चोरांचा हैदोस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पिंपळगाव बसवंत येथे चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. बँकेतून पैसे घेऊन निघालेल्या शेतकऱ्यांच्या गाडीतून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली. शहरातील बस डेपो शेजारच्या एचडीएफसी बँकेजवळ ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून पिंपळगा बसवंत शहरात चोऱ्या, दरोड्यांचे सत्र सुरुच असून, त्यामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणत्याही घटनेतील चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती सापडले नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दलही नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

जऊळके वणी (ता.दिडोरी) येथील शेतकरी राजेंद्र बाबुराव पाटील यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता बँकेतून दोन लाख रुपये काढले. त्यानंतर ते बँकेच्या बाहेर लावलेल्या कारमध्ये (एमएच १५ ईडी ९९७३) पैसे ठेवून शेजारच्या दुकानात वस्तू घेण्यासाठी गेले. त्यानंतर काही वेळात चोरट्यांनी गाडीच्या डाव्या बाजूची काच फोडून दोन लाखांची रोकड लंपास केली.

पल्सर मोटारसायकवरून हे दोन आले होते. काही क्षणातच त्यांनी काच फोडून गाडीतील दोन रुपये लंपास केले. त्यानंतर हे दोन्ही चोरटे मोटारयायकलने मुंबई-आग्रा महामार्गाने न जाता शहरातून पसार झाले. त्यामुळे ते शहरातील आहेत की, शहराबाहेरच्या याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

गुन्ह्यांमध्ये वाढ

शहरातील चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या शुक्रवारी (दि.२३) पहाटे येथील चिंचखेड रोड लगत राहणाऱ्या रवींद्र रामदास मोरे यांच्या घरावर दरोडा पडला होता. चोरट्यांनी मोरे कुटुंबावर प्राणघातक हल्ला करून दहा हजार रुपये, मंगळसूत्र लंपास केले होते. तसेच आजूबाजूच्या घरांवरही दगडफेक केली होती. त्यानंतर सोमवारी (दि. २६) शहरात खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटन घडल्या होत्या. पिंपळगाव बसवंत हे शहरा मुंबई-आग्रा महामार्गावर असल्यामुळे चोरट्यांनी येथून लगेच पसार होता येते. मात्र शहरातच मोठे पोलिस ठाणे असूनही पोलिसांचा चोरट्यांवर धाक उरला नसल्याचे वरील घटनांवरून दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार लाखांचे दागिने केरसानेतून लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहराजवळील पाकळे वस्तीवर सोने व दोन दुचाकी चोरीच्या घटनेची रात्र उलटते न उलटते तोच तालुक्यातील केरसाने येथे निवृत्त शिक्षक राजाराम आनंदा आहिरे यांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल साडेचार लाख रुपये किमंतीचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. अहिरे यांनी सटाणा पोलिसात तक्रार दिली आहे.

अहिरे कुटुंबियांसह केरसाणे शिवारात वास्तव्यास आहेत. बुधवारी ते पत्नी आणि मुलासह घरात झोपलेले होते. गुरुवारी पहाटे ते लघुशंकेसाठी उठले असता घराच्या दोन्ही खोल्यांच्या कड्या बाहेरून लावल्याचे त्यांना समजले. त्यांनी किचनच्या दरवाजातून बाहेर आले. त्यांना इतर खोलीतील सर्व सामान अस्ताव्यस्त आढळले. घराच्या छतावरील तीन कौलेही काढलेली दिसली. कपाट तपासले असता त्यातील सोन्याच्या दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. ४ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनात बिघाड; नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक


नाशिक-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक मागील दीड तासांपासून ठप्प पडली आहे. नाशिकजवळ वाराणसी-दादर एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेस बंद पडल्यामुळे अन्य लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गोदावरी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. बिघाडग्रस्त इंजिन काढण्याचे प्रयत्न सुरू असून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस स्टेशनजवळच चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जेवण करून हॉटेलमधून बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तोडून नेले. ही घटना मुंबई नाका पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, २४ तास उलटूनही चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाही. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची नातेवाईक असलेल्या नाझीया फैयाज सय्यद (रा. पोलिस वसाहत, गंगापूर रोड) या महिलेने घटनेबाबत तक्रार दिली आहे. नाझीया सय्यद कुटुंबीयांसह मुंबई नाका पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायबा हॉटेल येथे बुधवारी (दि. २८) रात्री जेवणासाठी गेल्या होत्या. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास त्या कारमध्ये बसत असताना एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडून पोबारा केला. या घटनेनंतर सय्यद यांच्या पतीने तात्काळ कारने चोरट्याचा पाठलाग केला. मात्र, पुढे उभ्या असलेल्या दुचाकीस्वार साथीदारासमवेत आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर आला आहे. दरम्यान, चेन स्नॅचिंगच्या घटनेनंतर महिलेने आरडाओरड केल्याने हॉटेलमधील नागरिकांसह नजीकच असलेल्या पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ हॉटेल व परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये आरोपी दिसत असून, ते महिलेच्या पाळतीवर असल्याचे स्पष्ट होते. मात्र, घटना घडून २४ तासानंतरही चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.

मृतदेह आढळला
पंचवटीतील होंडा शोरूम भागातील पाणपोईच्या बाकड्यावर बुधवारी (दि. २८) दुपारी ४० ते ४५ वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे खालील वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन हवालदार बी.व्ही. थेटे यांनी केले आहे. रंगाने निमगोरा, उंची साडे पाच फूट, शरीराने सडपातळ, चेहरा उभट, डोक्याचे केस वाढलेले, पाठीवर जुन्या जखमेचे व्रण असे मृतदेहाचे वर्णन आहे. त्याने अंगात विटकरी रंगाचा बारीक चौकटींचा शर्ट व विटकरी रंगाची पॅण्ट परिधान केली आहे.

अपघातामधील जखमीचा मृत्यू
नाशिक : भरधाव दुचाकीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची घटना सोमवारी (दि. २६) दुपारी त्र्यंबकरोडवर झाली होती. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सुधाकर बाबुराव भावसार (रा. फुले शासकीय वसाहत, टिळकवाडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी भावसार सिव्हिल हॉस्पिटलच्या सेवेतून निवृत्त झाले होते. भावसार टिळकवाडीकडून भवानी सर्कलकडे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पायी जात असताना भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली होती.

कॉलेजरोडला भरदिवसा चोरी
नाशिक ः भरदिवसा घरात प्रवेश करून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून सोने-चांदीचे दागिने, रोकडसह असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना कॉलेजरोड परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद केली आहे.
सपना नंदलाल जैन (रा. रुपक सोसा. विसेमळा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. मंगळवारी (दि. २७) सायंकाळी ही घटना घडली. जैन कुटुंबीय कामात व्यस्त असतांना चोर उघड्या घरात घुसला. त्याने थेट बेडरुममध्ये प्रवेश करीत कपाटातील रोकड, सोन्याचांदीचे दागिने तसेच बेडवर ठेवलेला लॅपटॉप, माऊस, चाजर्र, हेडफोन असा सुमारे चार लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.

पेटीएम वॉलेटचा गैरवापर
हरवलेल्या मोबाइलवर डाऊनलोड केलेल्या पेटीएम वॉलेटचा गैरवापर करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भामट्यांनी सापडलेल्या मोबाइलवरील पेटीएम वॉलेटचा वापर करीत बँक खात्यातील चार हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिष अशोक जोशी (रा. निसर्ग रो हाऊस, देवळालीरोड) यांच्या तक्रारीनुसार, २१ ते २४ जून दरम्यान जोशी कुलू मनाली येथे पर्यटनासाठी गेले होते. या ठिकाणी त्यांची बॅग हरवली. बॅगमध्ये कॅमेरा, मोबाइलसह अन्य साहित्यही होते. दरम्यान ते सहलीवरून परतले. मात्र, त्यांच्या हरवलेल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेल्या पेटीएम वॉलेटचा भामट्यांनी गैरवापर केला. जोशी यांच्या बँक खात्यातील चार हजार १० रुपयांची रक्कम चोरट्यांनी परस्पर खर्ची केली. घटनेचा अधिक तपास निरीक्षक चौधरी करीत आहेत.

ज्येष्ठ नागरिक बेपत्ता
नाशिकरोड : उपनगर परिसरातील लोखंडे मळ्यातील हनुमंत नगरमधील शांताराम दगडू रुपवते (६८, रा. रुख्मिणी हौसिंग सोसायटी) हे सोमवार (दि. २६) दुपारी तीनच्या सुमारास फिरायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. त्यानंतर सायंकाळी नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला असता ते कुठेही सापडले नाहीत. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात नातेवाइकांनी तक्रार दिली आहे. रंग सावळा, मध्यम बांधा, उंची चार फूट असे त्यांचे वर्णन आहे. ते आढळल्यास उपनगर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळीबारप्रकरणी चौघे ताब्यात

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

हप्ता न दिल्याच्या रागातून गुरुवारी (दि. २९) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या संदीप लाड याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आली होती. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणातील चार संशयितांवर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यातील एका संशयिताला गुरुवारी रात्री तर फरार झालेल्या तिघा संशयितांना औरंगाबाद येथे ताब्यात घेण्यात आले आहे.

गोळीबारानंतर फरार झाल्यांचा शोध घेत असताना ते औरंगाबादला गेल्याचा सुगावा पोलिसांनी लागला, पोलिसांचे एक पथक रात्रीच औरंगाबादला रवाना झाले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शेखर निकम, केतन निकम आणि विशाल भालेराव यांना ताब्यात घेतले. चौथा संशयित संदीप पगारे याला गुरूवारी रात्रीच अटक झाली होती.

संदीप अशोक लाड (रा. भराडवाडी, फुलेनगर, पंचवटी) याच्यावर गोळीबार करणाऱ्या संशयित शेखर निकम व केतन निकम यांचा भाऊ किरण निकम याची पेठरोड येथे हत्या झाली होती. या खूनाचा सूड घेण्याच्या उद्देशाने शेखर आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या भावाचे मारेकरी जेलरोड येथे असल्याचे समजून कसारा येथून नातेवाइकाकडे आलेल्या एका युवकाची हत्या केली होती. या हत्येतील संशयित शेखर निकम तेव्हापासून फरार होता. पोलिसांना हुलकावण्या देऊन तो हप्ता वसुलीचे काम करीत असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. संदीपकडून अपेक्षित हप्ता मिळला नसल्याने त्याने गोळी झाडली होती. घटनेनंतर चौघे संशयित फरार झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॅकर्सकडून महिला लक्ष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून त्याद्वारे अश्लिल मॅसेज पसरवणाऱ्याचा फटका आणखी दोन महिलांना बसल्याचे उघड झाले आहे. सायबर पोलिस स्टेशनकडे फिर्याद देणाऱ्या तक्रारदारांची संख्या ३० झाली असून, यात २८ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, संशयितांच्या मागावर दोन पथके असून, लवकरच तो जेरबंद होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

व्हॉट्सअॅप अथवा फेसबुक आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले असले तरी ते तितके सुरक्षित नसल्याचा प्रत्यय नाशिककरांनी बुधवारी घेतला. एका हॅकरने अगदी छोट्याशा ट्रिकद्वारे तब्बल २६ महिलांसह दोन पुरुषांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले होते. याच पध्दतीने त्याने काही फेसबुक अकाउंटवरदेखील डल्ला मारला. हॅक केलेल्या अकाउंटवरून हॅकरने

कॉर्न्टक्ट लिस्ट किंवा फ्रेंडलिस्टमधील महिलांना अश्लिल मॅसेजेस पाठवण्यास सुरुवात केली. काही जणांना याबाबत संशय आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दिली. एकापाठोपाठ एक येणाऱ्या तक्रारीवरून हा मास हॅकिंगचा प्रकार असल्याचे पोलिसांचे लक्षात आले.

गुरूवारपर्यंत हॅकिंगचा फटका २८ जणांना बसला. याबाबत सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की हॅकिंगबबत आणखी दोन महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एकूण ३० तक्रारदार समोर आले आहेत. हा आकडा आणखी वाढू शकतो, असे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संशयित आरोपी हा तेवढाच निष्णात असून, ३६ तासानंतरही तो पोलिसांच्या हाती गवसलेला नाही. काही तांत्रिक बाबींचा त्यास फायदा होत असला तरी त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली असल्याचे पवार यांनी सांगितले.

संशयिताचा माग काढून त्यास लवकरच जेरबंद करण्यात येईल. कोणाचे व्हॉट्सअॅप अथवा फेसबुक अकाउंट या पध्दतीने हॅक झालेले असल्यास त्यांनी सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क साधवा. सोशल मीडियाचा वापर करताना सर्वांनीच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य ती काळजी घ्यावी.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अघोषित लोड‌शेडिंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहर परिसरात पावसाची संततधार आणि वीजेचा लंपडाव यामुळे जनजीवन त्रस्त झाले आहे. शहरात सलग आठ ते दहा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरी जीवनावर याचा थेट परिणाम होत आहे. शासनाने आपत्ती व्यवस्थापन करताना वीजपुरवठा अखंड सुरळीत राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचना केलेल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते.

सिंहस्थ नियोजनात जवळपास पाच कोटी रुपये खर्च करत शासनाने त्र्यंबक शहरातील वीज वितरण तारा भूमिगत केल्या आहेत. वादळी वारे आणि पाऊस याचा परिणाम होणार नाही याकरिता खास काळजी घेतल्याचे सांगण्यात येत होते. ते अवघ्या दोन वर्षात फोल ठरले आहे. शहरात मीनीपीलर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. तसेच रस्त्यावर तुंबणारे पाणी थेट या डीपीत जाणार नाही याबाबत कुठलीही दक्षता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे वीजवितरण कारभाराच्या चुकीच्या नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे.

गत महिन्याभरापासून वीजपुरवठा अचानक खंड‌ित होण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी भूमिगत तारा खडल्या तर कधी बिघाड न सापडणे असे प्रकार वाढले आहेत. जून महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी वाढली आहे. शहरात भाविकांची दाटी असतांना वीज नसणे ही एक प्रकारची गैरसोयच आहे. व्यवसाय‌िक जनरेटर सारखी यंत्रणा वापरत वीजेची गरज भागवतात मात्र, सर्वसामान्य ग्रामस्थांना हे परवडणारे नाही. सायंकाळी व रात्री वीज नसल्यास सुरक्षेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पर्यटक, भाविक अंधारात

राज्यात सर्वत्र भारनियमन असतांनादेखील त्र्यंबकेश्वर हे तीर्थपर्यटनस्थळ असल्याने येथे अखंड वीजपुरवठा ठेवण्यात आला होता. मात्र सध्या वीजपुरवठा सतत खंड‌ित होत आहे. त्र्यंबक शहरास ३३ केव्हीच्या दोन फिडर यंत्रणा आहेत. शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळचे आणि खंबाळे येथेल अशा दोन ठिकाणी पावरस्टेशन असतानाही नियोजनाअभावी नागरिकांवर अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे.
घोटीतही पुरवठा खंडित
इगतपुरी तालुक्याची उद्योगनगरी समजल्या जाणाऱ्या घोटी शहरात
शुक्रवार मध्यरात्रीपासून अचानक वीजपुरवठा खंडित झाला आहे. उद्योग व्यवसायांवर याचा थेट परिणाम झाला आहे. वीजमंडळाच्या अनागोंदी कारभाराला घोटीकर त्रस्त झाले आहेत. दरम्यान या आठवड्यात ही समस्या प्रखरपणे जाणवत असल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून घोटी व इगतपुरी परिसरात होत असलेल्या दमदार पावसामुळे वीजपुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली आहे. कधी दिवसा तर कधी रात्री वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सामान्य जनता त्रस्त असताना पदाधिकारी व विविध पक्षाचे राजकीय पुढारी मात्र तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत. तालुक्यातील खेड्यापाड्यांवर विजेचे पोल कोलमडले असून तेथेही पुरवठा खंड‌ित आहे. शुक्रवारी पहाटे एक वाजेपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सन्मान सिटिझन रिपोर्टर्सचा...

$
0
0

सन्मान सिटिझन रिपोर्टर्सचा...

मटा सिटिझन रिपोर्टर हे अतिशय प्रभावी अॅप असून, त्याद्वारे समाजाचे मोठे काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे मत मटा सिटिझन रिपोर्टर्सनी व्यक्त केले. दर आठवड्याप्रमाणे यंदाही निवडक सिटिझन रिपोर्टर्सचा सन्मान करण्यात आला. गिरीश ताजणे, सुरेश शेखरे, रवींद्र गुडी, मनीष निकुंभ या सिटिझन रिपोर्टर्सला ‘मटा’चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यापुढेही आम्ही या अॅपद्वारे सार्वजनिक समस्या, तक्रारी, अडी-अडचणी पाठवू, असा निर्धार सिटिझन रिपोर्टर्सनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाही वृक्षलागवडीचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात उद्यापासून (१ जुलै) वृक्षलागवड सप्ताह साजरा करण्यात येत असून, सात जुलैपर्यंत जिल्ह्यात ४४ लाख १३ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. राज्यात चार कोटी वृक्षलागवडीचे उद्द‌िष्ट ठेवण्यात आले आहे.

वन विभागाने वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्यासह सर्व तयारी पूर्ण केली आहे. एकूण वृक्षलागवडीपैकी वन विभाग १९४ ठिकाणी ३४ लाख ८९ हजार, ग्रामपंचायत १३१४ ठिकाणी पाच लाख आणि इतर सरकारी यंत्रणा ३१०१ ठिकाणी चार लाख १८ हजार वृक्षलागवड करणार आहे. वृक्षलागवडीसाठी वन विभागाच्या ८६ रोपवाटिकांत एक कोटी १२ लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. वृक्षलागवड कार्यक्रमानंतर उरणारी रोपे पुढील वर्षाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात उपयोगात आणली जाणार आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ९९ हजार ७६४ जणांनी वन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली असून, विभागातील ही सर्वाधिक नोंदणी आहे. गेल्या वर्षी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एकूण २९ लाख २९ हजार रोपे लावण्यात आली होती. त्यापैकी वन विभागाने लावलेली ९० टक्के, तर इतर यंत्रणांनी लावलेली ७५ टक्के रोपे जगली आहेत. नागरिकांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वृक्षलागवड कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि पर्यावरण रक्षणात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

येथे करा नोंदणी

नागरिकांना वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ‘My Plants’ या मोबाइल अॅप्लिकेशनची मदत घेता येणार आहे. तसेच ‘रोपे आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, मनमाड आणि चांदवड येथील १२ ठिकाणी कक्ष उभारून नागरिकांना रोपे वाटप करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत १९२६ क्रमांकावरदेखील नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. वृक्षलागवडीसाठी हरितसेना सदस्य नोंदणी सुरू असून, वन विभागाच्या mahaforest.gov.in या संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत अनुदानासाठी आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजनेतील तसेच अपंग, व विधवा महिला लाभार्थी अनेक महिन्यांपासून शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा बच्छाव यांच्या नेतृत्त्वाखाली येथील तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. लाभार्थ्यांना त्वरित वेतन अनुदान मिळावे, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.

शुक्रवारी सकाळी अकराला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुतळ्यापासून अपंग, वृद्ध व महिलांचा मोर्चा काढण्यात आला. तहसील आवारात मोर्चा येताच तहसीलदार सुनील सैंदाणे यांना निवेदन देण्यात आले. गोरगरीब लाभार्थ्यांना शासनाकडून एक आधार म्हणून दर महिन्याला गरीब कुटुंबाना काही अंशी रक्कम दिली जाते. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत राज्य शासनाकडून ही रक्कम अनुदान स्वरुपात दिली जाते. मात्र सहा ते सात महिन्यांपासून हे अनुदान रखडले आहे. या लाभार्थ्यांना ही रक्कम देण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या देण्यात आला आहे. या आंदोलनात वेणुबाई बच्छाव, मीराबाई पानपाटील, शांताबाई देवरे, सिंधुबाई अहिरे, शीलाबाई देवरे, रमाबाई अहिरे आदींसह महिला व पुरुष सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images