Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

त्र्यंबकच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या तृप्ती धारणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक‌ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या तृप्ती पंकज धारणे यांची बिनविरोध निवड झाली आाहे. २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या ‌भाजपकडून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. विजया लढ्ढा या राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदासाठी त्यांनी निवड करण्यात आली.

शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. धारणे यांच्या समर्थनार्थ त्यांच्यासह सर्व १३ नगरसेवक उपस्थित होते. त्याचबरोबर विरोधी गटातील चारपैकी एक सदस्य देखील त्यांना येवून मिळाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान धारणे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड झाल्याचे राहुल पाटील यांनी घोष‌ित केले. त्यानंतर तेथेच अभिनंदन आणि स्वागताची सभा घेण्यात आली. त्या करिता जिल्हाध्यक्ष दादा जाधव, आमदार डॉ. अपूर्व हिरे, सचिन ठाकरे, सुनील बच्छाव, बाळासाहेब कोकणे आदी उपस्थित होते.

या सभेचे सूत्रसंचलन ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र यांनी केले. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण केले. यावेळेस त्यांनी त्र्यंबक शहराचा विकास आराखडा लवकरच शासनाला सादर केला जाईल, नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करून तक्रारपेटीची सुविधा निर्माण करू असे आश्वास दिले. जून २०१७ मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना एका मताने पराजय स्वीकारावा लागला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण

$
0
0

टीम मटा

हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत शनिवारी (दि. १) नाशिक शहरात ठिकठिकाणी विविध संस्थांकडून वृक्षारोपण करण्यात आले. सृष्टीसंवर्धनाचा संदेश देत सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था, शाळा-कॉलेजेसनी या चळवळीत सहभाग नोंदविला. शहरातील विविध संस्थांकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच मागील वर्षी लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शहर परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, तसेच अन्य संस्था-संघटनांतर्फे पर्यावरण संवर्धनाचा जागर करून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली. अनेकांनी वृक्षारोपण करतानाचे सेल्फीही काढून सोशल मीडियावर शेअर केले.
राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक महानगरपालिका, सोशल नेटवर्किंग फोरम आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १) म्हसोबावाडी येथे ५००० रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली. या वृक्षारोपणासाठी फेसबुक आणि व्हॉटस अॅपवर केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दीड हजार नाशिककरांनी या वृक्षारोपणास भर पावसात हजेरी लावली.

या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अतिशय शिस्तबद्ध रितीने केवळ १ तासात ५००० रोपांची योग्य शास्त्रीय पद्धतीने लागवड झाल्याने एका नव्या हरित इतिहासाला सुरुवात झाली आहे. यावेळी उपमहापौर प्रथमेश गीते, शिवाजी गांगुर्डे, आयएमएचे अध्यक्ष मंगेश थेटे, फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, पंकज भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली.

दिंडोरी रोडवर आरोग्य विज्ञान पीठामागे नाशिक मनपाची जागा असून, या जागेतील साडे चार एकर जागेवर मागील वर्षी सोशल नेटवर्किंग फोरमने २२०० झाडांची लागवड केली होती. वर्षभर त्यांचे जतन करण्यातही फोरमला यश मिळाले. यातून प्रोत्साहन मिळून यावर्षीही उर्वरित जागेवर वृक्षारोपण करण्याचे ठरले होते. या कामासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्यापासून खड्डे खोदणे, रोपे उपलब्ध करून देणे यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. या नंतरचे खरे आवाहन या रोपांचे संवर्धन आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन ही वैद्यकीय प्रॅक्टिशनर्स संघटनेने पुढाकार घेतला असून, पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय राखण आणि रोपांची दैनंदिन निगा ठेवण्यासाठी रखवालदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी आयएमएच्या सदस्यांनी घेतली आहे. या ‌अभियानाला नागरिकांनी पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


एकलहरे औष्णिक वीज केंद्र

नाशिकरोड : एकलहरे येथील औष्णिक वीज केंद्रातर्फे आज वृक्षारोपण करण्यात आले. महानिर्मितीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे यांच्याहस्ते सुरुवात झाली. केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे, मनुष्यबळाचे मुख्य अभियंता भिंताडे, वितरणच्या मुख्य अभियंता पगारे, उपमुख्य अभियंता राजेंद्र खालापूरकर, सुनील इंगळे, अधीक्षक अभियंता राजेशकुमार कमटमकर, मनोहर तायडे, नितीन पुणेकर, माशळकर, लीना पाटील, सूर्यकांत पवार, कल्याण अधिकारी निवृत्ती कोंडवले, उपमुख्य अभियंता राजेश मोराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शासनाने या केंद्राला ९३३ झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते तेही पूर्ण करण्यात आले. विविध बारा कर्मचारी संघटनांनी मिळून बाराशे झाडे लावली.

'पर्यावरणात झाडे बजावतात महत्त्वाची भूमिका'

देवळाली कॅम्प : महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे त्यात पर्यावरणात झाडे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. राज्य शासनाने ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचे यंदा केलेल्या संकल्पास आपण हातभार लावत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कारप्राप्त तानाजी भोर यांनी केले. ओम साई राम सेवाभावी संस्था व भोर नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे औचित्य साधत शनिवारी (दि. १) येथील नूतन माध्यमिक विद्या मंदिरात बदाम, काशिद, रेन ट्री, गुलमोहर, कडुलिंब सारख्या ५० वृक्षांचे रोपण करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका लता जोशी, अशोक बोराडे, जितेंद्र भावसार, अनिल ढोकणे, जितेंद्र पावशे, देविदास आंबेकर, अनिल कपडे, संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.


महावितरणतर्फे वृक्षांचा वाढदिवस साजरा

नाशिकरोड : जेलरोड परिसरातील शिवाजीनगर येथील स्काडा सेंटरच्या आवारात मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेत नाशिक व नगर जिल्ह्यातील महावितरणच्या विविध कार्यालयांच्या परिसरात जवळपास सात हजार वृक्षांची लागवड होईल. तसेच या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. गतवर्षी राबविलेल्या मोहिमेतील बहुतांश वृक्ष सुस्थितीत आहेत. यातील काही वृक्षांचा वाढदिवस शनिवारी (दि. १) साजरा करण्यात आला. नाशिक शहर विभाग-२ कार्यालय परिसरातील वृक्षाजवळ केक कापून वाढदिवस साजरा करतानाच नवीन वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटीमुळे कररचना अधिक पारदर्शी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यानंतर सात दशकांनी आलेला जीएसटी संदर्भातील बदल हा
हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गेल्या १४ वर्षांच्या प्रयत्नांनंतर आपण या दिशेने यशस्वी पाऊल टाकले. जीएसटीचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होणार असून, सध्या असलेली गुंतागुंतीची कररचना अधिक सुरळीत आणि पारदर्शक होईल, असा विश्वास कर सल्लागार प्रदीप कोरडे यांनी व्यक्त केला.

जीएसटीचा परिणाम समजून घेण्यासाठी शहरातील तज्ज्ञ व्यावसायिक आणि संस्था जीएसटीइ फाईलतर्फे डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

कर व्यावसायिक प्रदीप क्षत्रीय यांनीही मार्गदशेन केले. यावेळी व्यासपीठावर विक्रीकर विभागाचे उपायुक्त संजय पोखरकर आणि जीएसटीइ फाईलचे संचालक हेमंत देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत देशपांडे यांनी केले.

तंत्रज्ञानाची ओळख

प्रमुख वक्ते प्रदीप कोरडे यांनी जीएसटीकडे सकारात्मकतेने बघण्याचा सल्ला दिला. जीएसटीचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. व्यापारी, ग्राहक, किंमती आणि सरकारी महसूल सर्वांवरच याचा परिणाम जाणवेल. ‘वन नेशन वन टॅक्स’ या संकल्पनेवर जीएसटी आधारित आहे. जीएसटीला मूर्त रूप देण्यासाठी तंत्रज्ञानाची मोठी मदत होणार आहे. यासाठी अगदी छोटे ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत व्यवहार बिले हे जीएसटी पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात १५ सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधकांनी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या सहकारी संस्थांत नाशिकच्या चिंतामणी नागरी सहकारी पतसंस्थेबरोबरच सहा पतसंस्था व ८ विविध कार्यकारी सोसायट्यांचा समावेश आहे. या पतसंस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारयाद्या तयार केल्या जात आहेत. त्यात प्रारूप मतदारयादी एक जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्या जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयासह तालुका उपनिबंधक कार्यालयांत पाहायला मिळणार आहे.

प्रारूप मतदारयादीवर हरकती व स्वीकारण्यासाठी १ जुलै ते १० जुलै ही मुदत दिली आहे. त्याचप्रमाणे या हरकतींवर २० जुलैला निर्णय देण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदारयादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध होईल. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदानाचा कार्यक्रमही घोषित होणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या निवडणुकांमध्ये नाशिकची चिंतामणी, पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था, शरयूताई व गंगोत्री नागरी पतसंस्थेबरोबरच मनमाडची छत्रपती शिवाजी महाराज नागरी सहकार पतसंस्था, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पतसंस्था, देवळ्यातील श्रीमान सुगनमलजी सुराणा पतसंस्थेचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये कळवण, निफाड, येवला या तालुक्यांतील आठ संस्थांचा समावेश आहे.

...तरीही चुरस कायम

सहकार कायद्यात पाच वर्षांनी निवडणुका घेण्याचा नियम असला तरी या निवडणुका अगोदर कागदावरच होत होत्या; पण त्यावर तक्रारी होऊ लागल्यानंतर जाहीर स्वरूपात त्याचा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचू लागला आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये चुरस वाढली आहे. या निवडणुकांमध्ये लाखो रुपयांचा खर्च केला जातो. त्यामुळे या निवडणुका स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या असतात. नोटाबंदीनंतर या सर्व संस्था अडचणीत आलेल्या आहेत. त्यांच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झालेला आहे. असे असले तरी या निवडणुकांध्ये मात्र चुरस कायम असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयओटी प्रकल्पाची संधी कौतुकास्पद’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञान न मिळविता प्रज्ञावंत होणेही महत्त्वाचे असून, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांना कमी वयातच ‘आयओटी’चे प्रकल्प तयार करण्याची दिलेली संधी कौतुकास्पद आहे. मंडळाच्या शतकी महोत्सवातील इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी)च्या माध्यमातून तयार करण्यात येणारे प्रकल्प, उपक्रम स्तुत्य असून, या प्रकल्पांना अमेरिकेतील एमआयटी बोस्टनच्या भारतातील शाखेतर्फे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन ‘एमआयटी’चे शास्त्रज्ञ व पुरुषोत्तम शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. रमेश रासकर यांनी दिले.

पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये ‘आयओटी’च्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रासकर बोलत होते. संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, डॉ. रमेश तिवारी, संगणक विभागप्रमुख दिवाकर यावलकर, ‘एमआयटी’चे मॅगी चर्च व अला मुराबिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

महेश दाबक म्हणाले, की संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त ‘आयओटी’च्या माध्यमातून विद्यार्थी दैनंदिन जीवनातील उपयोगी गोष्टींपासून स्मार्ट शालेय स्तरावरील, तसेच विज्ञानाच्या संकल्पनांवर आधारित प्रकल्प तयार करणार आहेत. त्याचे प्रदर्शन मुख्यमंत्री पाहणार आहेत. शालेय स्तरावरच प्रकल्पाचे विषय मिळतील. डॉ. रमेश तिवारी, विवेक गोगटे, पंकज देवरे, प्रा. एम. यू. खरात, प्रकाश भिडे, अनुराग केंगे आदींनी मार्गदर्शन केले. वैशाली जाधव यांनी सूत्रसंचालन केले. खजिनदार वैशाली गोसावी, सहसचिव पी. एम. कुलकर्णी, मुख्याध्यापक प्र. ला. ठोके, संजीवनी धामणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश चौकात भरदिवसा घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील गणेश चौकातील घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, साड्या व रोकड असा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

लक्ष्मीकांत मधुसूदन भार्गवे (रा. कमोदनगर, इंदिरानगर) यांच्या तक्रारीनुसार, भार्गवे कुटुंबीय शुक्रवारी कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी दुपारी एकच्या सुमारास भार्गवे यांच्या गणेश चौकातील शीतल इलेक्ट्रीकल्ससमोरील बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, साड्या व रोकड असा सुमारे ८,७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हवालदार उघडे तपास करीत आहेत.

संशयित गजाआड

घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या भारतनगर झोपडपट्टीतील दोन संशयितांच्या मुसक्या आवळण्यात मुंबई नाका पोलिसांना यश आले. हे संशयित वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी मध्यरात्री लपलेले असताना गस्तीपथकाने त्यांना पकडले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फकिरा रमेश बढे (वय २५) व अजय जीवन बिचडे (१९, दोघे रा. म्हाडा कॉलनी, भारतनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. बढे याला विधातेनगर भागात, तर बिचडे याला रजा कॉलनीत पकडण्यात आले. मुंबई नाका पोलिसांचे गस्तीपथक शुक्रवारी गस्त घालत असताना बढे साक्षी अपार्टमेंट परिसरात, तर बिचडे पूजानगरी सोसायटी परिसरात चोरीच्या उद्देशाने लपलेला आढळला. या प्रकरणी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, हवालदार माळोदे आणि उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

घरात घुसून महिलेस मारहाण

घरात नवीन वीजमीटर बसविण्याच्या कारणातून चौघांनी घरात घुसून महिलेला मारहाण केल्याची घटना पंचवटीतील सुकेणकर लेन परिसरात घडली. या घटनेत महिलेस लाकडी बॅटने मारहाण करण्यात आली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पद्माकर पाटील, रोहिणी पाटील, रोहित पाटील (तिघे रा. तारवालानगर) व प्रतिभा देसाई (रा. सुकेणकर लेन) अशी संशयितांची नावे आहेत. वैशाली प्रवीण पाटील (रा. सुकेणकर लेन) यांच्या तक्रारीनुसार, पाटील यांनी आपल्या घरात नवीन वीजमीटर बसविण्याचे काम हाती घेतल्याने ही मारहाण करण्यात आली. १७ जून रोजी रात्री संशयितांनी घरात घुसून वीजमीटर बसवायचे नाही, असे म्हणत कुरापत काढली. तसेच शिवीगाळ करीत मारहाण केली. या वेळी पद्माकर पाटील यांनी हातातील लाकडी बॅट त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले. हवालदार झाडे तपास करीत आहेत.

सातपूरला दुचाकी पळविली

घरासमोर पार्क केलेली दुचाकी चौघांनी पळवून नेल्याची घटना समतानगर परिसरात घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये चार संशयितांविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख उर्फ पप्पू विजय बागडे, श्रावण पोपट भालेराव, अक्षय प्रदीप कुरकुरे आणि विक्रम यादव अशी दुचाकी चोरी करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. समतानगर भागात राहणारे अविनाशचंद सुरेहप्रसाद श्रीवास्तव यांची हिरो होंडा मोटारसायकल (एमएच १५/बीके १७०९) २५ जून रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असताना या संशयितांनी ती पळवून नेली. उपनिरीक्षक कुऱ्हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवीदास पिंगळेंचा राजीनामा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी अविश्वास प्रस्तावाचा सामना करण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. येत्या ४ जुलै रोजी विरोधक त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करणार होते. बाजार समितीतील १८ पैकी १३ संचालक पिंगळे यांच्या विरोधात गेले आहेत. बाजार समितीवरही बरखास्तीची टांगती तलवार आहे. न्यायालयीन अडचणीमुळे राजीनामा दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेच्या अपहाराप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती. या कारवाईत बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या कारमधून ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांसह पिंगळे यांच्यावर म्हसरूळ पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.बाजार समितीत १८ संचालक असून, त्यातील बरेच संचालक हे भाजपच्या गोटात गेले आहेत. त्यामुळे अविश्वासबाबतच्या हालचाली सुरू होत्या. या प्रस्तावाला भाजपने बळ दिल्याने गेल्या महिन्यात २३ तारखेला त्यांच्या १३ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. परंतु या सुनावणीपूर्वीच पिंगळे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकाकडे आपला राजीनामा सादर केला. न्यायालयीन अडचणीमुळे येवू शकत नसल्याने दिलीप थेटे यांच्यामार्फत त्यांनी राजीनामा सादर केला आहे.

चुंभळे नवे सभापती?

बाजार समितीतील पिंगळे यांच्या गटातील सदस्य फोडण्यात पिंगळे यांचे विरोधक व संचालक शिवाजी चुंभळे यांचा मोठा वाटा राहीला आहे. त्यामुळे पिंगळेच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या सभापती पदावर चुंबळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या फुटीर गटाचे नेतृत्व चुंभळे करीत आहेत. त्यामुळे भाजपमधे गेलेले संचालकही त्यांनाच मदत करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग प्रवेशाला विलंब

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

डिप्लोमा इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यानंतर डिग्री अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश दिला जातो. मात्र, डिप्लोमा इंजिनीअरिंगचे निकाल लागून महिना उलटला तरी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर प्रवेशप्रक्रियेसंबंधी प्राथमिक माहितीही दिलेली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. इंजिनीअरिंगच्या थेट द्वितीय वर्षासाठीची प्रवेशप्रक्रिया नक्की कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डिप्लोमा इंजिनीअरिंगचे निकाल लागून एक महिना उलटला आहे. मात्र, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर प्रवेशाची माहितीच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. बहुतांश इंजिनीअरिंग कॉलेजांनी डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल प्रवेशप्रक्रिया देणे सुरू केले असले तरी अधिकृत कोणतीही माहिती पुढे येत नसल्याने हे प्रवेश निश्चित मानले जाणार नाहीत.

विलंबामुळे शैक्षणिक नुकसान

यापूर्वी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर, प्रवेश जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती. आता जुलै उजाडूनही प्रवेशप्रक्रियेविषयी काहीही माहिती वेबसाइटवर देण्यात आलेली नाही. ही प्रवेशप्रक्रिया जर उशिरा सुरू झाली तर ऑगस्टमध्ये विद्यार्थांचे प्रवेश निश्चित होतील आणि लगेच परीक्षा सुरू होईल. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगची प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे विद्यार्थांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छत्री, रेनकोट रंगवा मनासारखे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाचा जोर जून महिन्याच्या अखेरीपासूनच वाढू लागला असून, पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री, रेनकोटसारख्या साधनांचा वापरही अत्यावश्यक ठरत आहे. दर वर्षी छत्री, रेनकोटची खरेदी करताना बाजारात काही तरी हटके शोधण्याकडे अनेकांचा कल असतो. यावेळी मात्र स्वतः डिझाइन केलेली छत्री, रेनकोट वापरण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे आयोजित केलेल्या वर्कशॉपमधून याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, कॅलिग्राफीच्या माध्यमातून छत्री, रेनकोटवर पेंटिंग केले जाणार आहेत.

पावसाची मजा लुटणे हा अनेकांच्या आनंदाचा भाग असतो. पण, पावसात भिजल्यामुळे आरोग्य खराब होऊ न देणेदेखील महत्त्वाचे असते. त्यामुळे पावसापासून बचाव करणाऱ्या साधनांचा वापर या ऋतूत महत्त्वाचा असतो. ही साधने इतरांपेक्षा वेगळी व तितकीच आकर्षक असावीत, यासाठी हे वर्कशॉप महत्त्वाचे ठरणार आहे. आज, रविवारी (दि. २) दुपारी ३ ते ५ या वेळेत गंगापूररोडवरील मविप्रच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये या कॅलिग्राफी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. सुलेखनकार नंदू गवांदे त्यात मार्गदर्शन करणार आहेत. छत्रीवर किंवा रेनकोटवर कॅलिग्राफी करण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे. या वर्कशॉपला येताना काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची छत्री किंवा रेनकोट, तसेच अॅक्रेलिक कलर, एक आणि दोन इंचांचा ब्रश, प्लास्टिकचा मग, बाउल, कापड बरोबर आणायचे आहे. कल्चर क्लब सदस्यांना विनामूल्य प्रवेश आहे, तर इतरांसाठी ३०० रुपये प्रवेशमूल्य आहे. नोंदणीसाठी कमलेश यांच्याशी संपर्क साधावा.

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनश्रीने यशासाठी केला रात्रीचा दिवस

$
0
0

नाशिक : कुटुंबाचा चरितार्थ चालव‌िता यावा म्हणून त्यांनी बेडरूमचे रुपांतर सायकल दुरुस्तीच्या दुकानात केले. सायकलचा वापर कमी झाल्यामुळे या व्यवसायालाही उतरण लागली. आर्थिक परिस्थ‌िती पूर्वीपासूनच बेताची. कसाबसा उदरनिर्वाह होईल एवढेच पैसे पदरात पडतात. घर म्हणाल तर दहा बाय दहाची खोली आणि छोटेसे किचन. तेथेच चिमुकल्या भावंडाची लुडबूड. अशा परिस्थ‌ितीत धनश्रीने जीवतोड अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ९४.४० टक्के गुण मिळविले. डॉक्टर होण्याचे स्वप्न ती उराशी बाळगून आहे. पण त्यासाठी तिला हवाय दातृत्वाचा हात.

धनश्री भाऊसाहेब राजोळे असे या गुणी विद्यार्थिनीचे नाव. नवजीवन डे स्कूलमधून घवघवीत गुण मिळवून तिने यश संपादन केले. दहावीच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हाच तिने घरातील भिंतीवर टार्गेट ९१ ते ९८ % असे लिहून ठेवले. हे ध्येय गाठण्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट घेण्याची तयारी ठेवली. दिवसा अभ्यासात अनेक अडचणी येत. त्यामुळे रात्रीचा दिवस केला. पहाटे किमान तीन तास अभ्यास करू लागली. अभ्यासाचा हा नियम तिने कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न केला. ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकले नाही याची खंत तिच्या बोलण्यातून डोकावते. विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन तिला मेडिकल क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. स्पर्धा परीक्षांचा पर्याय देखील तिने प्राधान्याने डोळ्यांसमोर ठेवला आहे.

दहावीत घवघवीत यश मिळविणाऱ्या धनश्रीने मेडिकल आणि स्पर्धा परीक्षा ही दोन क्षेत्रे डोळ्यांसमोर ठेवून अभ्यास सुरू केला आहे. तिच्या या स्वप्नपूर्तीसाठी तिला दातृत्वाचा हात हवा आहे. राजोळे कुटुंब मूळचे निफाड तालुक्यातील करंजगावचे. धनश्रीचे वडील भाऊसाहेब शिक्षणासाठी गाव सोडून शहरात आले. बहिणीकडे राहिले. त्यांच्या सायकल दुरुस्तीच्या व्यवसायाला हातभार लावत त्यांनी कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. इतिहासाचा प्राध्यापक होण्याचे त्यांचे स्वप्न; पण आर्थिक परिस्थ‌िती बेताची. शिक्षण अर्ध्यावर सोडल्यामुळे हे स्वप्न भंगले. सायकल दुरुस्तीचे काम शिकल्यामुळे सिडकोलगतच्या शाहूनगर परिसरात टपरीवजा दुकानात व्यवसाय सुरू केला. कामगार वर्गाकडे सायकलच असल्याने व्यवसाय सुरळीत सुरू होता. पैन् पै जमवून त्यांनी परिसरात घर खरेदी केले. पोटाची खळगी भरता यावी, यासाठी या घराच्याच बेडरूमला गाळ्याचे रूप देऊन त्यामध्ये सायकल दुरुस्तीचा व्यवसाय थाटला. त्यासाठी इमारतीमधील रहिवाशांची परवानगी आवश्यक होती. रहिवासीही मोठ्या मनाचे. त्यांनी आढेवेढे न घेता राजोळे यांना परवानगी दिली. मात्र, सायकल कमी आणि मोटारसायकल्सचे प्रमाण वाढल्यामुळे राजोळे यांच्या व्यवसायालाही उतरती कळा लागली. मोटारसायकलचे पंक्चर काढण्यास त्यांनी सुरुवात केली. मात्र, हा व्यवसायही बिनभरवशाचा. धनश्रीची आई मनीषा गृहिणी आहे. जीविका आणि देवदत्त ही तिची लहान भावंडे. धनश्री अभ्यासात हुशार. भावंडांना सांभाळून ती आईला घरकामात मदतही करते. ना अभ्यासाला स्वतंत्र खोली, ना पुरेशी शांतता. तरीही तिने अभ्यासावर मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे.

मेडिकल आणि स्पर्धा परीक्षा या दोनपैकी कुठल्याही क्षेत्रात गेले तरी यशस्वी होऊन दाखवेन, असे ती आत्मविश्वासाने सांगते. आपली आर्थिक परिस्थ‌िती बिकट असल्याची तिला जाणीव आहे. जास्तीत जास्त अभ्यास करून सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ती सांगते. या गुणी मुलीला गरज आहे आर्थिक पाठबळाची. तिची स्वप्ने प्रत्यक्षात अवतरावी यासाठी दानशूरांनी पुढे यायलाच हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅकिंग प्रकरणी आणखी एका महिलेची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून त्याद्वारे अश्लील मेसेज पसवल्याप्रकरणी आणखी एका महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सायबर पोलिस स्टेशनकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदारांची संख्या ३१ झाली असून, यात २९ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, संशयितांच्या मागावर दोन पथके असली तरी तीन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरतो आहे.

व्हॉट्सअॅप अथवा फेसबुक हॅक करून त्याद्वारे अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका संशयिताने शहरातील तब्बल ३१ नागरिकांच्या खात्यावर अतिक्रमण केल्याची बाब समोर आली आहे. हॅकरने वन टाइम पासवर्डच्या मदतीने २९ महिलांसह दोन पुरुषांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले. याच पद्धतीने त्याने काही फेसबुक अकाउंटवरदेखील डल्ला मारला. हॅक केलेल्या अकाउंटवरून हॅकरने कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा फ्रेंडलिस्टमधील महिलांना अश्लील मेसेज पाठवले. असाच प्रकार पुणे, तसेच इतर काही जिल्ह्यांत घडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या प्रकरणी अज्ञात हॅकरविरोधात सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हॅकरच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की हॅकरचा शोध सुरू असून, अद्याप तो सापडलेला नाही. मात्र, लवकरच त्याला अटक होईल. तक्रारदारांची संख्या ३१ झाली असून, इतर जिल्ह्यांतील प्रकाराबाबत तक्रार आली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या नागरिकांनी ओटीपीबाबत कोणालाही अगदी कुटुंबातील सदस्यांनादेखील माहिती देऊ नये, तसेच व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जाऊन टू स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्यावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे. दरम्यान, एखाद्या नागरिकाचे व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक अकाउंट हॅक झालेले असल्यास त्यांनी त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल फोनच जेव्हा शिक्षक बनतो...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील मराठी माध्यमातून पाचवी ते दहावीच्या वर्गांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरच्या घरी गणित व विज्ञानाचा संपूर्ण अभ्यास मोबाइलच्या माध्यमातून करता आला तर..? ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे शेषगिरी चिकेरूर यांनी. मोबाइल फोनच्या माध्यमातून अथवा घरात संगणक असल्यास त्याद्वारे हा अभ्यास करता यावा आणि शाळेत शिकवतात त्याच पद्धतीने उत्कृष्ट शिक्षकांनी त्यांना प्रत्यक्ष शिकवावे यासाठी ‘माझा क्लास अर्थात, कोचिंग क्लास चोवीस तास’ हा अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.

महाराष्ट्रातील एसएससी बोर्डाकडे नोंदणीकृत शाळांमध्ये ऐंशी टक्के विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकतात. मात्र, गेल्या पाच वर्षांत गणित अथवा विज्ञान अथवा दोन्ही विषयांतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २४ लाखांच्या वर आहे. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षकांचा लाभ मिळालेला नाही. ग्रामीण भागातील सुमारे ४० टक्के विद्यार्थ्यांची तर फारच दयनीय अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर ‘माझा क्लास’ हा प्रकल्प महाराष्ट्रातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान प्रत्यक्ष व उत्तम शिक्षकांकडून घरच्या घरी शिकण्याची अनमोल संधी देणारा आहे. भांबावून टाकणारे अॅनिमेशन, बालिश संवाद वगैरे अनाकलनीय गोष्टी टाळून अगदी वर्गात शिकवतात, तसेच माझा क्लासमध्ये शिक्षक शिकवितात.

या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत सशक्तपणे उतरण्याचा आत्मविश्वास प्राप्त होणार आहे. चांगले शिक्षकच नसलेल्या महाराष्ट्रातील हजारो शाळांमधील विद्यार्थ्यांना आता या प्रकल्पातून उत्तम शिक्षक त्यांच्या घरीच मिळणार आहेत. महाराष्ट्रातील मराठी माध्यमातील विद्यार्थी, शाळा, महिला बचतगट, शिक्षणप्रेमी व्यावसायिक, शैक्षणिक साहित्य वितरक यांनी या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी mazaclass.com या वेबसाइटवर भेट देण्याचे आवाहन ‌शेषगिरी चिकेरूर यांनी केले आहे.

--

विद्यार्थ्यांची दमछाक थांबणार

या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांची फार मोठी सोय होणार आहे. त्यांची शाळेव्यतिरिक्त क्लाससाठी होणारी दमछाक थांबणार आहे. तो वेळ त्यांना मैदानी खेळांसाठी देता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सवडीनुसार आणि ते जेथे असतील तेथे अभ्यास करता येणार आहे. विशेष म्हणजे न समजलेले प्रकरण पुन्हा-पुन्हा अभ्यासता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिअल इस्टेटमध्ये उत्साह

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्याची सातव्या वेतन आयोगाची शिफारस केंद्र सरकारने स्वीकारल्याने घरभाडे भत्ता, पेन्शनरांसाठीचा वैद्यकीय भत्ता, अपंग कर्मचाऱ्यांसाठीचा नियमित उपस्थिती भत्ता तसेच प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या जवानांसाठीच्या भत्त्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. १ जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना हे लाभ सुरू झाले आहेत. यामुळे नाशिक शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत कर्मचारी संघटनांच्या चर्चेनंतर आयोगाने याबाबत केंद्र सरकारला काही शिफारशी केल्या होत्या. सातव्या आयोगाने निश्चित केलेल्या भत्त्यांच्या देण्यामध्ये १४४८ कोटींची वाढ झाली आहे. ३४ लाख केंद्रीय कर्मचारी व १४ लाख संरक्षण दलांतील कर्मचारी-जवानांना भत्ते वाढीचा लाभ मिळणार आहे. नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणारे विविध विभाग आहेत.

टू बीएचकेला मागणी

२५ ते ३० लाख रुपयांपर्यंत असलेल्या वन आणि टू बीएचके फ्लॅटला शहरात मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्यास ग्राहकांचा प्रतिसाद लाभत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारी भत्तेवाढ ही आनंददायी बाब आहे. अनेक ग्राहक सध्या घराची चौकशी करीत आहेत. बजेट फ्लॅटला मागणी आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.

- जयेश ठक्कर, माजी अध्यक्ष, क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोटरी क्लबचे कार्य देवदूताप्रमाणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

जागतिक स्तरावर रोटरी क्लब एक समाजसेवेचे मंदिर आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने सुरू असलेले कार्य एखाद्या देवदूताप्रमाणे आहे. या कार्यात भर घालण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्यासाठी सिद्ध व्हावे. रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यासाठी आपल्या वर्तुळाच्या बाहेर जात मैत्रीचे संबंध वाढवावेत. प्रसंगी विविध संस्था व उद्योजकांकडून मदत मिळवून आपले कार्य अव्याहत सुरू ठेवावे, असा संदेश रोटरीचे माजी प्रांतपाल दीपक शिकारपूर यांनी दिला.

देवळाली रोटरी क्लबचा ६७ वा पदग्रहण सोहळा येथे उत्साहात पार पडला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. व्यासपीठावर रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल प्रा. सुनील सौंदणकर, मावळते अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडिअर अनिल गर्ग, इनरव्हील अध्यक्षा शैलजा गर्ग, सचिव मोहनदास कामत आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मावळते अध्यक्ष गर्ग यांनी अध्यक्षपदाची सूत्रे निवृत्त कर्नल अशोक शिरगावकर यांच्याकडे, तर सचिवपदाची सूत्रे मोहनदास कामत यांनी राजू कटारे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर माजी अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरजित सिंग यांनी अध्यक्षपदाची शपथ दिली. मावळत्या अध्यक्षांनी गतवर्षीच्या कार्याचा अहवाल सादर केला. नवनिर्वाचित अध्यक्षांनी आपण भविष्यात समाजोपयोगी कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. रोटरीच्या प्रांतापालांच्या संदेशाचे वाचन प्रा. सौंदणकर यांनी केले. त्यानंतर वार्षिक अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास माजी प्रांतपाल दादा देशमुख, गायिका गीता माळी, अशोक आडके, डॉ. आवेश पलोड, ओंकार महाले, रोहित सागोरे, राजेंद्र पवार, तानाजी जाधव आदींसह रोटरी व इनरव्हील क्लबचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

--

अशी आहे नवनिर्वाचित कार्यकारिणी

अध्यक्ष- निवृत्त कर्नल अशोक शिरगावकर, उपाध्यक्ष- हितेश कारिया, सचिव- राजू कटारे, सहसचिव- नंदिनी कारिया, कोशाध्यक्ष- अनंत अथनी, क्लब करस्पॉडन्स- निवृत्त कर्नल अरुण आनंद, इलेक्टेड प्रेसिडेंट- डॉ. प्रवीण जाधव, डायरेक्टर कमिटी- महाराज बिरमानी, विजय शेट्टी, जे. सुंदरामन, डॉ. अरुण स्वादी, निवृत्त कर्नल सुरजित सिंग, अण्णा नगरकर, मनोज कल्याणकर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णांच्या दातृत्वाने ‘कोंडी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत ७५ लाखांच्या नगरसेवक निधीवरून महापौर आणि प्रशासनात संघर्ष सुरू असतानाच सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पदाधिकारी म्हणून मिळालेला दोन कोटींचा निधी भाजप नगरसेवकांमध्ये वाटून दिला आहे. भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये प्रत्येकी पाच लाखांचा निधी विकासकामांसाठी दिला आहे. परिणामी आतापर्यंत निधीसाठी भांडत असलेल्या नगरसेवकांच्या ताटात थेट पाटलांच्या दातृत्वाने पाच लाखांचा निधी मिळाल्याने नगरसेवक भारावले आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींची मात्र गोची झाली आहे. नगरसेवकांना निधी दिला नाही, तर दिनकर पाटीलच हिरो होण्याची भीती आता अन्य पदाधिकाऱ्यांना सतावू लागली आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती डामाडोल असल्याने नगरसेवक निधीवरून सध्या प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. स्थायी समितीने ४० लाखांचा निधी दिला असताना महापौरांनी तो ७५ लाखांपर्यंत वाढविला. परंतु, प्रशासनाने एवढा निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नगरसेवक हतबल झाले आहेत. निवडून येऊन चार महिने झाले, तरी दमडीचेही काम झालेले नाही. त्यामुळे प्रभागात फिरतानाही अडचणी येत आहेत. महासभेने नुकताच बजेट मंजूर केले. त्यात महापौरांसाठी पाच कोटी, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना प्रत्येकी तीन कोटी, सभागृह नेत्यांना दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांना हा निधी विकासकामांसाठी दिला जातो. सभागृह नेता म्हणून मिळालेला दोन कोटींचा निधी दिनकर पाटील यांनी आपल्या प्रभागात खर्च करण्याऐवजी तो भाजपच्या ६६ नगरसेवकांना वाटून दिला आहे. प्रत्येक प्रभागात पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यासंदर्भात भाजपच्या नगरसेवकांना पत्र देण्यात आले आहे. पाटील यांच्या दातृत्वामुळे नगरसेवक मात्र खूश झाले आहेत.

इकडे आड तिकडे विहीर

पाटील यांना कार्यपद्धतीवरून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडूनच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. त्याला पाटील यांनी आपल्या कार्यपद्धतीने उत्तर दिले आहे. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींनी पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवले नाही, तर नगरसेवकांमध्ये झीरो होण्याचा धोका आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका मालामाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालमत्ताधारकासांठी महापालिकेने सुरू केलेल्या सवलत योजनेला एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. केवळ तीन महिन्यांतच महापालिकेच्या तिजोरीत सवलतीपोटी ३८ कोटी ३३ लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी तीन महिन्यांत २१ कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे चालू वर्षात १७ कोटी ३३ लाख रुपये अधिक जमा झाले आहेत. ऑनलाइन भरणाही चांगलाच वाढला असून, त्यातून सात कोटी रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या एकूण मिळकतधारकांपैकी ३० टक्के मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली. त्यामुळे सवलत योजना चालू वर्षी महापालिकेला चांगलीच पावली आहे.

नागरिकांनी मालमत्ता कर वेळेवर भरण्यासाठी पाच, तीन आणि दोन टक्के अशी सवलत योजना सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरल्यास पाच टक्के, मेमध्ये भरल्यास तीन टक्के आणि जून महिन्यामध्ये भरल्यास बिलात दोन टक्के सवलत दिली जाते. गेल्या वर्षी तीन महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत २१ कोटी ५३ लाख रुपये जमा झाले होते. मात्र, या वर्षी तीन महिन्यांत केवळ ३८ कोटी ३३ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीपेक्षा १७ कोटी रुपये अधिक मिळाले असून, सवलत योजनेतील आतापर्यंची ही सर्वांत जास्त रक्कम आहे. पश्चिम विभागात सर्वाधिक ११ कोटी रुपये मिळाले असून, पंचवटीत सर्वांत कमी प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षी सवलत योजनेचा लाभ ५४ हजार ६८१ मिळकतधारकांनी घेतला होता. यावर्षी मात्र लाभ घेणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. चालू वर्षी तीन महिन्यांतच एक लाख १२ हजार नागरिकांनी तीन महिन्यांत कर भरला असून, एकूण मिळकतींच्या ३० टक्के नागरिकांनी वेळेआधीच महापालिकेच्या तिजोरीत कर भरला आहे. त्यामुळे महापालिका पहिल्या तिमाहीतच मालामाल झाली आहे.

--

ऑनलाइनमध्ये तिपटीने वाढ

तीन महिन्यांत सवलत योजनेचा लाभ घेणाऱ्या एक लाख १२ हजार मिळकतधारकांपैकी तब्बल २६ हजार ४७१ नागरिकांनी ऑनलाइन कर भरला आहे. गेल्या वर्षी हा आकडा दहा हजारांच्या आसपास होता. चालू वर्षात त्यात तिपटीने वाढ झाली आहे. या ऑनलाइन योजनेतून महापालिकेला ६ कोटी ८६ लाख रुपये मिळाले आहेत. त्यातून महापालिकेला ४ लाख ६७ हजार रुपयांचे रिबेट द्यावे लागले आहे.

--

विभागनिहाय प्रतिसाद असा

--

विभाग जमा रक्कम (रुपयांत)

--

नाशिक पश्चिम १० कोटी ९३ लाख

नाशिकरोड ६ कोटी ५१ लाख

नवीन नाशिक ६ कोटी ३९ लाख

नाशिक पूर्व ५ कोटी ८० लाख

सातपूर ४ कोटी ६९ लाख

पंचवटी ३ कोटी ९८ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपाची तपासणी

$
0
0

ठाणे पोलिसांच्या पथकाची धुळ्यात कामगिरी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यात ठिकठिकाणी पेट्रोल विक्री करताना मापात पाप होत असल्याच्या तक्रारी सर्वत्र येत असल्याने ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने राज्यभरातील खासगी पेट्रोल पंप तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यात ठाण्यासह औरंगाबाद येथील तपासणीनंतर शनिवारी (दि. १) या पथकाने धुळ्यातील मालेगावरोडलगत क्रॉसिंगवर असलेल्या श्रीराम पेट्रोल पंपावर येऊन सकाळीपासून तपासणीला सुरू केली. यासाठी पंपावर असलेल्या चारही युनिटचे कव्हर काढून आतील मशिनरीची बारकाईने तपासणी केली.

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय व्ही. जॉन, पोलिस उपनिरीक्षक शरद पंजे, यांच्यासह पथकासह धुळे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील, महेंद्र कापुरे, नितीन मोहने, विजय सोनवणे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. यात भेसळ रोखणारे पथक पेट्रोल पंपावरील यंत्रसामुग्रीची कसून तपासणी करीत होते. पेट्रोल वितरीत करताना लिटरमागे ५० ते १०० मिली. पेट्रोल कमी देऊन पेट्रोल चोरी केली जात असल्याची मुख्य तक्रार असून, त्या अनुषंगाने ही तपासणी केली जात होती. धुळ्यातील श्रीराम पेट्रोल पंपावर छापा टाकल्यानंतर दुपारी उशिरापर्यंत ही तपासणी सुरूच होती. शहराच्या मध्यवर्ती भागात हा पंप असल्याने नागरिकांनी पंपावर काय सुरू आहे हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. या तपासणीत नेमके काय आढळले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. त्याबाबत माहिती देण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार

दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगण्यासाठी आत्मबळाचे अधिष्ठान लागते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अध्यात्म व विज्ञान हातात हात घालून जगत असतात. डॉक्टर विनित वानखेडे यांनीही विज्ञानाधिष्ठित असताना आध्यात्मिक अधिष्ठान ठेवले असल्याने त्यांना मिळालेले आत्मबळ हे जगण्याचे बळ देऊन गेले. आशावाद निर्माण झाला आणि कॅन्सरसारख्या आजारातून बरे झाले, असे प्रतिपादन फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले.

डॉ. विनित वानखेडे लिखित ‘कॅन्सरच्या वादळातून ऊर्मी जगण्याची...’ या पुस्तकाचे प्रकाशन फादर दिब्रिटो यांच्या हस्ते शनिवारी झाले. रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम झाला.

फादर दिब्रिटो म्हणाले, की दृश्यजगाच्या पलीकडे एक अदृश्य जग आहे. तेथे शरीर, मन व आत्मा या तीन गोष्टींचा संबंध येतो. उपचार शरीरावर होत असले तरी विज्ञानाने आता हे सिद्ध केले आहे, की ८० टक्के आजार मनाचे असतात. त्यामुळे मनावर उपचार करावे लागतात, तसेच आत्म्याला विश्वासात घ्यावे लागते. डॉ. वानखेडे यांच्या पुस्तकातून हेच दिसून येते.

‘कॅन्सरच्या वादळातून ऊर्मी जगण्याची...’ हे पुस्तक म्हणजे अध्यात्म व विज्ञान यांच्या सहयोगाची यशस्वी कथा सांगते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खूप उत्पात झाला. याच काळात खूप लोक अध्यात्माकडे वळले. विज्ञान सर्व प्रश्न सोडवू शकते, असाच तोपर्यंत सर्वांचा समज होता. मात्र, विसाव्या शतकात झालेल्या उलथापालथीनंतर अध्यात्माशिवाय तरणोपाय नाही, असे सर्वांच्याच लक्षात आले. अध्यात्माशिवाय विज्ञान पांगळे ठरतेय आणि विज्ञानाशिवाय अध्यात्म आंधळे ठरतेय हे सर्वांच्याच लक्षात आले. स्वत: डॉ. वानखेडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. ते त्या परमशक्तीला शरण गेले. एकदा का या शक्तीला शरण गेले, की ती तुम्हाला दुबळे राहू देत नाही. जगण्याची ऊर्मी देते. तीच ऊर्मी डॉक्टरांना मिळाली आहे, असेही फादर दिब्रिटो म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर डॉ. अरुण स्वादी, डॉ. राज नगरकर, अंजना वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. विनित वानखेडे यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली. हर्षवर्धन बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले. मनोगत आशुतोष राठोड, डॉ. शैलेश बोंदार्डे यांनी व्यक्त केली. अमित त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता नवोमी वानखेडे यांच्या विशेष गीताने झाली. डॉ. सु. म. वानखेडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसपोर्टच्या टेंडरला लाभेना प्रतिसाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एअरपोर्टच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणाऱ्या बसपोर्टच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. महामार्ग बस स्थानकावर १४९ कोटी रुपये खर्च करून हे बसपोर्ट खासगीकरणातून उभे केले जाणार आहे. पण, त्यासाठी विकसक पुढे न आल्यामुळे ११ जुलैपर्यंत टेंडर भरण्याची नव्याने मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर हे टेंडर १४ जुलैला उघडले जाणार आहे.

एसटी महामंडळावर एक पैशाचाही बोजा न पडता खासगीकरणाच्या माध्यमातून या अत्याधुनिक बसपोर्टची बांधणी केली जाणार आहे. राज्यात बसगाड्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या १३ मोठ्या बस आगारांची त्यात निवड करण्यात आली असून, त्यात नाशिकचा समावेश आहे. नामवंत वास्तुविशारद शशी प्रभू यांच्या कल्पनेतून हे आधुनिक बसपोर्ट तयार होणार आहे. या बसपोर्टमुळे बसच्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. टेंडर प्रक्रिया पार करून आलेल्या कंपनीला बसपोर्ट विकसित करण्याच्या मोबदल्यात व्यापार संकुल उभारण्यास एसटी महामंडळाच्या आगारांची जागा देण्यात येईल. त्याची देखभाल ३० वर्षे संबंधित कंपनीलाच करावी लागणार आहे.

आगारांचे अत्याधुनिक स्वरूप

हे बसपोर्ट बस आगारांचे अत्याधुनिक स्वरूप असेल. प्रवासी आणि बसगाड्यांना जाण्या-येण्यासाठी वेगळे मार्ग केले जाणार आहेत. त्यामुळे बसपोर्टमध्ये कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही. यात अधिक प्रशस्त प्रतीक्षालय उभारण्यात येणार आहे. तेथेच प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढच्या दोन वर्षांत पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा मानस अाहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनमहोत्सवाला प्रारंभ

$
0
0

टीम मटा

राज्य शासनाच्या वतीने १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपणाचा संकल्प सोडण्यात आला.

मालेगाव परिक्षेत्रात

दहा लाख वृक्ष लागवड

मालेगाव ः वनपरिक्षेत्रात ९ लाख ५३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, या महोत्सवाचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. वनपरिक्षेत्रातील दहीदी येथे वनविभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांच्या हस्ते मुख्य वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी उपविभागीय वनधिकारी जगदीश येडलावर, नगरसेवक तानाजी देशमुख, पंचायत समिती सदस्य जगदीश मालपुरे, सरपंच राजेंद्र कचवे उपस्थित होते. या वन महोत्सवाअंतर्गत तालुक्यातील वेगवेगळ्या १७ ठिकाणी ४६ केंद्रांवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. मुंगसे येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. मालेगाव महापालिकेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. फातमा गार्डन येथे महापौर रशीद शेख, आयुक्त संगीता धायगुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. येथील के. बी. एच. एस. एस. ट्रस्ट संचलित भायगाव रोड जाजुवाडी येथील वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी प्रसाद हिरे, इंदिराताई हिरे यांचे मार्गदर्शन लाभले. शाह विद्यालयात कौशल्य विकसन जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष शरद चमनलाल पटनी, प्राचार्य संजय बेलन उपस्थित होते.

न्यायाधीशांनी केले वृक्षारोपण

मनमाड ः येथील न्यायालय आवारात न्यायाधीश स्वाती फुलबांधे यांनी वृक्षारोपण केले. रेल्वे न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. ए. टेकवानी, वकील संघाचे अध्यक्ष व्ही. एम. कासार, सचिव सुधाकर मोरे, मोहन माळवतकर, एन जी बापट उपस्थित होते. नांदगाव तालुक्यातील सारताळे येथील आश्रमशाळेत हरित सेना उपक्रम कार्यक्रमात वृक्षारोपण करण्यात आले. पंचायत समितीचे उपसभापती सुभाष कुटे, जिल्हा परिषदेचे साकोरा गटाचे सदस्य रमेश बोरसे, ग्रामीण विकास संस्थेचे सरचिटणीस रमेश पगार आदी उपस्थित होते. एकलव्य प्राथमिक, कै. बाबूलाल देवचंद पगार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

झाडांचा वाढदिवस देवळ्यात साजरा

कळवण ः कृषिदिनानिमित्त दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते मात्र त्यांचे संगोपन व निगा नियमित राखली जावी याउद्देशाने अमृतकार पतसंस्थेने वृक्षलागवडीचा वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन देवळा येथील सहाय्यक निबंधक संजय गीते यांनी केले. कृषिदिनाचे औचित्य साधून देवळा येथील अमृतकार पतसंस्थेने मागील वर्षी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करून पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावर्षीही नवीन वृक्षांची लागवड करीत असताना मागील वर्षी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करून त्यांचे पुढील काळात चांगल्या प्रकारे संगोपन करण्याचा संकल्प संचालक मंडळाने केला आहे, अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत कोठावदे यांनी यावेळी दिली. यावेळी सहाय्यक निबंधक संजय गीते, सहकार अधिकारी सतीश देवघरे आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बागलाणमध्ये उत्साह

सटाणा ः वन विभाग व सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून तालुक्यात बागलाणच्या आमदार दीप‌किा चव्हाण यांच्या हस्ते मुळाणे, भाक्षी, फोफीर येथे वृक्षारोपण करण्यात आले. तालुक्यात दोन लाख वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यावेळी सामाजिक वनीकरण विभागासह तालुका वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील, माजी आमदार संजय चव्हाण उपस्थित होते. सटाणा नगर परिषदेकडून शहरात वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. भाक्षी रस्त्यावरील वृंदावन कॉलनी येथे सुयश क्लासेसचे संचालक बी. के. पाटील यांच्या हस्ते नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा निर्मला भदाणे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, गटनेते संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.

पाटविहीर येथे मार्गदर्शन

कळवण ः पाटविहीर येथील जि. प. शाळेत पंचायत समिती सदस्य मीनाक्षी चौरे, सरपंच श्रावण पालवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली. त्यानंतर शालेय परिसरासह गावात वृक्षारोपण करण्यात आले. माजी सरपंच शिवाजी चौरे, आर. एस. भोये, उपस्थित होते.

दिंडोरीत कृषी दिन

दिंडोरी ः येथील पंचायत समिती आवारात वृक्षारोप करण्यात आले. यावेळी सभापती एकनाथ गायकवाड, विलास सोनवणे, वसंतराव थेटे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images