Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

घरबसल्या होता येणार कल्चर क्लबचे सदस्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘मटा कल्चर क्लब’चे सदस्य होण्याची संधी तुम्हाला महाराष्ट्र टाइम्सने घरबसल्या उपलब्ध करुन दिली आहे. खास तुमच्यासाठी तुमच्या आग्रहास्तव मटा कल्चर क्लबचे फॉर्म तुम्हाला घरबसल्या मिळणार आहेत.

‘मटा कल्चर क्लब’तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन केले जाते. मग ते हॅप्पी स्ट्रीट, श्रावण क्विन असो किंवा नाटक. त्याचबरोबर झुंबा डान्स, खाऊचा डब्बा, कल्चर क्लब सदस्यांचे गेट टुगेदर, लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट, टेन्शन खल्लास कार्यक्रम, किट्टी पार्टी, गानतंत्र, सिनेतारकांची भेट, किड्स कार्निवल, सहल, मँगो फेस्टिवल, नवरंग नवरात्रीचे, मंगळागौर, एज्युकेशनल सेमिनार, क्विझ कॉन्टेस्ट, संगीत मैफिली, ख्रिसमस कार्निव्हल, कलासंगम अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद तुम्हाला वर्षभर घेता येतो. तसेच तुमच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘मटा कल्चर क्लब’ व्यासपीठही उपलब्ध करून देते. नाटकांसारख्या कार्यक्रमांमध्ये ‘मटा कल्चर क्लब’ सदस्यांसाठी विशेष सवलतही देण्यात येते. अशा विविध कार्यक्रमांत सहभागी व्हायचे असेल, तर आजच ‘मटा कल्चर क्लब’चे सदस्य व्हा. हे सदस्यत्व तुम्हाला घरबसल्या घेता येईल.

फक्त इतकेच करायचे...

तुम्हाला घरी मिळालेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती व्यवस्थित लिहा. हा फॉर्म आणि २९९ रुपयांचा BCCL च्या नावाचा चेक तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे द्या. चेकमागे तुमचं नाव आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. तुमचा चेक क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला कल्चर क्लब सदस्यत्वाचे कार्ड थेट तुमच्या घरी मिळेल. तेव्हा आजच तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधा आणि ‘मटा कल्चर क्लब’चे सदस्य व्हा. अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४, ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडकोकडून आर्थिक लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडको प्रशासनाच्या वतीने बांधकामासाठी ना हरकत परवाना देताना नागरिकांची अार्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी असून, एका परवान्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली जात आहे. ही रक्कम अधिकृत असली, तरीही अन्यायकारक असून, याबाबत सिडको प्रशासनाने तोडगा काढावा आणि अार्थिक लूट थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नाशिक सिडको गृहनिर्माण योजना १९८२ साली अस्तित्वात आली. या योजनेंतर्गत ३० हजार बांधीव घरे व अनेक वाणिज्य वापराचे गाळे, तयार करण्यात आले. सिडको प्रशासनाने उच्च, मध्यम व अल्प उत्पन्न अशी वर्गवारी करून सामान्य लोकांना मालमत्ता हस्तांतर केली आणि आजपर्यंत लोकांकडून कराराप्रमाणे मोठ्या प्रमाणात महसूल वसूल केला. या ठिकाणी ९० वर्षांचे करार करण्यात आलेले असून, सद्यःस्थितीत सुमारे तीन लाख नागरिक कायमस्वरूपी स्थायिक झालेले आहेत. परंतु, सिडको प्रशासन वेळोवेळी अचंबित करणारे निर्णय घेत असून, जनतेला वेठीस धरण्याचे काम करीत असते. सिडको प्रशासनाने बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेच्या नगररचना विभागाकडे वर्ग केला आहे व फक्त ना हरकत देण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवला आहे. परंतु, त्याकरिता सिडको प्रशासन तब्बल ५५ हजार रुपये अाकारणी करीत असून, त्यामुळे जनतेला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

नाशिक शहराची मेट्रो सिटीकडे होणारी वाटचाल लक्षात घेऊनही सिडको प्रशासन कात टाकण्यास तयार नाही. कोणताही नवीन प्रकल्प राबविण्याचे नियोजन दिसत नसून, नाशिक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून प्रशासकही पूर्णवेळ नाहीत. अशा अवस्थेत येथील नागरिकांना त्यांची कामे करणे अतिशय कठीण व त्रासदायक झाले आहे. घरे, जागा, हस्तांतर करणे, त्यावर गृहकर्ज घेण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे, बांधकाम परवाणगी घेणे आदी गरजेची कामे करणे कठीण झाले आहे. अशा सर्व बाबींमुळे नागरिकांना अार्थिक झळ बसण्यासह मानसिक ताणही सहन करावा लागत आहे.

--

पारदर्शी कारभाराची अपेक्षा

परिसरातील रहिवाशांत सिडको प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी असून, या कार्यालयाने पारदर्शी कारभार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नाशिक शहर जोमाने प्रगती करीत असताना नाशिकमधील कार्यालयाकडून पुरेसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. यासंदर्भात कोणताही प्रतिनिधी अांदोलन करीत नाही किंवा जाब विचारत नाही, ही खेदाची बाब असल्याची प्रतिक्रियादेखील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

--

सिडको विभागात नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. अनेकदा निवेदने देऊनही प्रशासन या समस्या सोडविण्यास उत्सुक नाही. जागा हस्तांतराचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपये मागितले जातात ही अन्यायकारक बाब आहे. प्रशासनाने कार्यवाही करावी.

-जी. के. मनियार, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, बनवू या चॉकलेट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेळोवेळी बहुविध उपक्रमांची पर्वणी देणाऱ्या मटा कल्चर क्लबतर्फे पॅरेंट्स डेनिमित्त येत्या रविवारी (दि. २३) चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले अाहे. या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेकअप व्हाउचर्स आणि बंपर प्राइज जिंकण्याची संधीही सहभागींना मिळणार आहे.

चॉकलेट हा जसा लहान मुलांचा आवडीचा विषय असतो, तसा तो मोठ्यांचाही वीक पॉइंट ठरताना दिसतो. त्यामुळे सर्वांनाच आवडणारी चॉकलेट्स घरच्या घरी बनविता आली तर..? सर्वांची हीच आवड ओळखून मटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत निर्माण उपवन, काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ पंचवटी, नाशिक या ठिकाणी करण्यात आले आहे. सीमा गवारे पाटील या चॉकलेट कसे बनवायचे, चॉकलेटचे फिलिंग कसे करायचे, तसेच चॉकलेट रॅपिंग, टेम्परिंग, चॉकलेटचे विविध प्रकार, चॉकलेट ब्राऊनीज वर्कशॉपमध्ये बनवून दाखवणार आहेत. हे वर्कशॉप सर्वांसाठी मोफत राहणार आहे. या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन गरजेचे असून, त्यासाठी ७०४०७६२२५४ अथवा ०२५३-६६३७९८७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

सेल्फी पाठविणाऱ्यांना सुसंधी

पॅरेंट्स डेनिमित्त ज्यांनी सेल्फी पाठविले आहेत त्यांनी चॉकलेट मेकिंग वर्कशॉपला उपस्थित राहावे. भाग्यवान ५० जणांना हेल्थ चेकअप व्हाउचर्स चॉकलेट मेकिंग वर्कशॉपमध्ये दिले जातील. या वर्कशॉपमध्ये रेफ्रिजरेटर, म्युझिक सिस्टिम यांसारखे बंपर प्राइज जिकंण्याचीही संधी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनमाड-इंदूर’ रेल्वेमार्गाला अखेर मुहूर्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मनमाड-इंदूर या बहुप्रतिक्ष‌ति रेल्वेमार्गाला अखेर मुहूर्त लागला असून, येत्या शनिवारी (दि. २९) रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा धुळे दौरा निश्चित झाला आहे. यामध्ये धुळ्यात रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक होणार असून, याचवेळी मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजनही केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

प्रस्तावित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळविली आहे. या मार्गाची पुढील प्रक्रिया वेगाने व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. भामरे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना धुळे भेटीसाठी आग्रह करीत होते. गेल्या तीस वर्षांत जिल्ह्यात देशातील सुरेश प्रभू हे पहिलेच रेल्वेमंत्री आहेत जे धुळेकरांना गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित असलेले मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या स्वप्नपूर्तीची भेट देण्यासाठी धुळ्यात येत आहेत. त्यासाठीच डॉ. सुभाष भामरे यांनी सुरेश प्रभू यांना प्रत्यक्ष धुळे येथे येऊन समस्त धुळेवासियांना ही अमूल्य भेट द्यावी म्हणून आग्रह धरला. या आग्रहामुळे रेल्वेमंत्री प्रभू धुळ्यात येणार आहेत.

या धुळे बैठकीदरम्यान संबंधित रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या विषयांसंदर्भात प्रगतीचा आढावा घेणार आहेत. तसेच मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामास लवकरच सुरुवात होण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना सूचनादेखील करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ बाजार ‘व्हेईकल फ्री’?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सराफ बाजार, फुलबाजार आणि भद्रकाली परिसरातील वर्दळीची कोंडी फोडण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्तांसोबत आमदार देवयानी फरांदे आणि व्यावसायिकांची बैठक झाली. या बैठकीत सराफ व्यावसायिकांनी हा भाग ‘नो व्हेईकल’ आणि ‘नो हॉकर्स झोन’ करण्याची मागणी केली. फुलबाजारासह किरकोळ विक्रेत्यांसाठी हाटबाजार तयारी करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर आता महापालिका, पोलिस आणि स्थानिक व्यावसायिकांची एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.

सराफ बाजार, फुलबाजार आणि भद्रकालीतील काही परिसरात मोठी कोंडी निर्माण होते. त्यामुळे या भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिका आयुक्त, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, आमदार फरांदे व सराफ व्यावसायिकांची एकत्र‌ित बैठक झाली. त्यात व्यावसायिकांनी हा भाग ‘नो व्हेईकल झोन’ करण्यासह येथील हॉकर्सधारकांना स्थलांतरित करण्याची मागणी केली. उत्सवाच्या काळात येथे मोठी गर्दी होते. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र ‘हाटबाजार’ असावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावर आयुक्तांनी शहर अभियंत्यांना जागा शोधण्याच्या सूचना केल्या. तसेच येथे ज्या हॉकर्सधारकांची नोंदणी झाली असेल, त्यांना तत्काळ स्थलांतरीत करण्यात यावे, असे आयुक्तांनी सूचित केले. फुलबाजारही गणेशवाडीत हलविण्याची सूचना करण्यात आली.

हा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ करण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली आहे. पालिकेने या ठिकाणी साहित्य उपलब्ध करून दिल्यास पोलिस त्याची अंमलबजावणी करतील, असे पाटील यांनी सांग‌ितले. त्यामुळे या बाजाराची कोंडी फोडण्यासाठी एक संयुक्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यात महापालिका, पोलिसांचे प्रतिनिधी आणि व्यावसायिक असतील. ही समिती या भागातील कोंडी फोडण्यासंदर्भातील अहवाल देणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीला प्रमोद कुलथे, राजेंद्र ओढेकर, प्रसाद आडगावकर, मेहुल थोरात, गिरीश टकले, अमर सोनवणे आदी व्यावसायिक उपस्थित होते.

इलेक्ट्रिक वाहने चालवा

हा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ केल्यास नागरिकांनी परिसरात फिरण्यासाठी अडचण होणार आहे. त्यामुळे या भागात बॅटरीवर चालणारी वाहने सुरू करावीत, असा प्रस्ताव आमदार फरांदे यांनी ठेवला. परंतु, या ठिकाणी येणाऱ्या वाहन चालकांची वाहने कुठे पार्क करायची हा मोठा प्रश्न असणार आहे. या भागात अगोदरच पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. हॉकर्स आणि फुलविक्रेते येथून हलण्यास तयार होणार नाहीत. त्यामुळे या समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायद्याच्या विद्यार्थ्यांवरच अन्याय!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक
एप्रिल २०१७ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या लॉ विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांच्या वार्षिक परीक्षेतील गुणदानामध्ये अन्याय झाल्याच्या तक्रारी या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी मागवून पडताळणी केल्यानंतर यातील एकूण बेरजेतच मोठी गफलत असल्याचा प्रकार उघड होतो आहे.
एप्रिलमध्ये लॉच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात १० जूननंतर जाहीर झाला. या निकालात विद्याशाखेतील विद्यार्थी थोड्या गुणांहून मोठ्या प्रमाणात अनुत्तीर्ण झाले होते. यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे फोटोकॉपीजची मागणी केली. या फोटोकॉपी नुकत्याच विद्यार्थ्यांच्या हाती पडल्या असून त्याचा पडताळणी केल्यानंतर उत्तरपत्रिकेच्या आतील भागात देण्यात आलेले बरेच गुण मुखपृष्ठावरील एकूण गुणांमध्ये मिळविले नसल्याने विद्यार्थ्यांना पडलेल्या एकूण गुणांपेक्षा कमी गुणांचे दान झाल्याच्या काही केसेसही विद्यार्थ्यांनी ‘मटा’कडे मांडल्या आहेत.
यामध्ये बीएसएल एलएलबी, बीए एलएलबी आणि एलएलबी या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही उत्तरपत्रिकांमध्ये तर विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर लिहिल्यानंतर ते उत्तर तपासून त्याला गुणही देण्यात आले आहेत मात्र मुखपृष्ठावर त्या प्रश्नाचे उत्तरच विद्यार्थ्याने लिहिले नसल्याच्या अजब खुणा तपासणीसाने केल्या आहेत.

दरवर्षीची डोकेदुखी
विद्यापीठातून लॉ विद्याशाखेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर वारंवारअन्याय होत असल्याचा प्रकार दरवर्षीच्या निकालात प्रत्ययास येतो आहे. यापूर्वीही विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी यात लक्ष घातले होते.
तात्पुरता हे प्रकरण सुरळीत झाल्यानंतर आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था झाली आहे. यंदा कॉन्स्टिट्यूशन, हिस्ट्री ऑफ कोर्ट, कॉन्ट्रॅक्ट या विषयांचे अनुत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे.


अन्यथा फोटोकॉपीजची होळी

विद्यापीठाकडे या प्रश्नांबाबत तक्रारी करून विद्यार्थ्यांच्या समस्या कायम राहत आहेत. या प्रकरणाची तड लागण्यासाठी नाशिकमधील विद्यार्थी लवकरच कुलगुरूंची वेळ घेऊन भेट घेणार आहेत. यानंतरही याप्रश्नी तोडगा न निघाल्यास सदोष फोटोकॉपीजची होळी करण्याचा इशारा अॅड. अजिंक्य गिते यांनी दिला आहे.

फोटोकॉपीच झाली गहाळ
नाशिकमधील एका लॉ शाखेच्या विद्यार्थ्याने ठरलेल्या मुदतीच्या आत फोटोकॉपीसाठी अर्ज केला होता. इतरच्या विद्यार्थ्यांची फोटोकॉपी आली व त्या विद्यार्थ्याची कॉपी न आल्याने त्याने विद्यापीठाकडे चौकशी केली. यावर तुमचे फी पेमेंटच पोहोच झाल्याची नोंद विद्यापीठात नसल्याने हा प्रकार घडल्याचे विद्यापीठाने सांगितले. मात्र या विद्यार्थ्यांकडे फी भरल्याच्या रीतसर पावत्या आणि आवश्यक तपशील आहे. याची दखल घेत आता नव्याने त्याला फोटोकॉपीच्या प्रक्रियेत समाविष्ट केले आहे. यासाठी अवघे दोन दिवस हाती असून आज रविवारच आहे.
-----
विद्यापीठ बदलाचा कल
लॉ विद्याशाखेबाबतचा विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचा अनुभव प्रतिकूल आहे. याला कंटाळून विद्यार्थी आता पुणे विद्यापीठाबाहेर प्रवेश घेत आहेत. विद्यार्थ्यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेऊन नाराजी व्यक्त केली आहे.
------
उत्तरपत्रिका तपासणीनंतर अत्यंत अंधपणे या गुणांच्या बेरजा मांडण्यात आल्याचे फोटोकॉपी बघितल्यानंतर निदर्शनास येते. मी ही या प्रकाराचा बळी ठरलो आहे. गुणांची बेरीज ३८ होत असताना ती ३५ दर्शविण्यात आली आहे.
महेश गायकवाड, विद्यार्थी
सर्व उत्तरे तपासून त्यातील काहींचे गुणच त्यांना देण्यात आलेले नाहीत. बहुतांश विद्यार्थ्यांच्या गुणांची एकूण बेरीज चुकवून कमी गुण देण्यात आले आहेत. तर काहींनी उत्तरे सोडवूनही मुखपृष्ठावर तो प्रश्न अटेम्प्ट केलाच नसल्याच्या खुणा दिसताहेत - तुषार जाधव, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावच्या ‘तरुआई’ने जगव‌िली ५३८ झाडे

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

राज्यात नुकताच वन महोत्सव सप्ताह साजरा झाला. या सप्ताहांतर्गत चार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. मालेगाव उपविभागीय वनक्षेत्रातही ९ लाखाहून अधिक वृक्ष लागवड केल्याचा दावा प्रशासनाने केला. शासनाने राबविलेल्या या मोहिमेत शहरातील पर्यावरणस्नेहींनी एकत्र येत वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी सुरू केलेली ‘तरुआई’ ही चळवळ तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेल्या दोन वर्षांत या चळवळीने तब्बल ५३८ झाडे लावली आणि जगविली सुद्धा. दोन वर्षांपूर्वी शहरातील रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी ओसाड जमीन आता या झाडांनी फुलली आहे.

तरुआई ही कुठलीही संघटना नाही किंवा एनजीओ नाही. तरुआई हा शहरातील पर्यावरणस्नेही नागरिकांचा गट आहे. या गटाने दोन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीला व्यक्तिगत छंदाला सर्वजनिक रूप देण्याचे ठरविले. आज त्याचे चळवळीत रुपांतरण झाले आहे. १२ जुलै २०१५ रोजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते तरुआईच्या कामाचा श्रीगणेशा झाला. त्यावेळी खरे तर एका रोपट्यापासून सुरू झालेली ही चळवळ हरित मालेगावच्या दिशेने वाटचाल करेल असे कुणाला वाटले नव्हते. केवळ फोटोसेशन करून थांबणारा हा इव्हेंट नव्हता हे आज रस्त्यांच्या दुतर्फा, मैदाने, सरकारी कार्यालयातील झाडांकडे बघून लक्षात येत आहे.

श्रमसेवकांचा अविष्कार

शहरात कुणाचा वाढदिवस असेल किंवा आपल्या प्रियजनांच्या स्मृती प्र‌ित्यर्थ काही करायचे असेल अशा अनेकांना तरुआईने सोशल मीडियावरून वृक्षदान करावे, ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रमदान करावे, असे आवाहन केले.

आज ३९४ हून अधिक कुटुंबांनी यासाठी योगदान दिले आहे. वृक्ष सुरक्षित राहावे यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने जाळी बनवल्या. गेल्या दोन वर्षांत याच हिरव्या जाळ्यांनी आणि वृक्षांनी मालेगाव शहरात काहीच होत नाही, हा समज चुकीचा ठरव‌िला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान, धिंगाणा कराल तर...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात आषाढ अमावस्येला तळीरामांकडून उपद्रव होऊ नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले आहे.
पावसाचा माहोल, रविवारची सुटी यांमुळे गटारी अमावस्येची रंगत अधिकच वाढण्याची शक्यता असून त्यातून दारू पिऊन धिंगाणा घालणे, मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरून गोंधळ घालणे, वेगात वाहने दामटविणे यासारखे प्रकार घडण्याची शक्यता अधिक आहे. अशा विघ्नसंतोषींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. तळीरामांच्या बंदोबस्तासाठी शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिस तसेच साध्या वेशातील पोल‌िसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह सारख्या कारवायांबरोबरच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
आषाढ अमावस्या अर्थात गटारीला शनिवारी (दि. २२) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास प्रारंभ झाला. रविवारी (दि. २३) रात्री सव्वातीनपर्यंत अमावस्या असणार आहे. त्यानंतर श्रावण महिनारंभ होणार आहे. श्रावण महिन्यात मद्य व मांसाहार व्यर्ज केला जातो. म्हणूनच आषाढ अमावस्येला मद्य व मांसाहाराची संधी साधली जाते. मात्र, अतिउत्साहातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरासह ग्रामीण भागातही चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
रविवारी शहरात त्र्यंबकरोड, आडगाव रोड, दिंडोरी रोड, पेठ रोड, मुंबई आग्रा महामार्ग तसेच पुणे रोड आदी ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी होणार आहे. विनापरवाना मद्यविक्री करणारे हॉटेल्स, ढाबे यांच्याबरोबरच विना परवाना मद्यप्राशन करणारे तळीरामांवरही कारवाई केली जाणार आहे.

थेट जागेवर गुन्हा दाखल
ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईसाठी २० ब्रेथ अ‍ॅनालायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑन द स्पॉट गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी ठेवली आहे. आधुनिक ब्रेथ अ‍ॅनालायझरमुळे मद्यपी वाहनचालकाची माहिती, त्याचा वाहन क्रमांक, लायसन्स क्रमांक, फोटो तसेच अल्कोहोलचे प्रमाण, कारवाई करणाऱ्या पोलिसाचे नाव रिपोर्टमध्ये येते. या रिपोर्टची जागेवरच प्रिंट काढून त्यावर मद्यपी वाहनचालकाची स्वाक्षरी घेण्यात येते व हाच रिर्पोट वैद्यकीय पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.

सेल्फीधारकांना कारवाईचा दणका
शहरातील सोमेश्वर धबधबा, गोदावरी नदी तसेच निसर्गरम्य ठिकाणी जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. स्वत:चा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी अशा ठिकाणांवर पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावठाणातील बांधकामांना दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठीची नियमावली जाहीर केली आहे. नाशिकमधील अनधिकृत बांधकामांनाही दिलासा मिळणार आहे. तसेच गावठाणातील बांधकामे नियमित होण्यास मदत होणार आहे.

अनधिकृत बांधकामे नियमित करणासाठी दहा टक्के हार्डशीप प्रिमियम आकारणी करण्यात आली आहे. दंडात्मक आकारणीमुळे पूर्ण इमारतच अनधिकृत ठरण्याचा धोका असल्याने या नियमावलीला व्यावसायिकांच्या प्रतिसाद अल्पसा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठीच्या नियमावलीवर हरकती मागवण्यास सुरूवात केली आहे. या नियमावलीवर एका महिना भरात हरकती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी
राज्य सरकारने राज्यातील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या निर्णय घेतला होता. परंतु, हायकोर्टाने ताशेरे ओढताच बांधकामे अधिकृततेसाठी नियमावली तयार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, नियमावली तयार केली जात असून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांसाठी ती लागू केली जाणार आहे. त्यासाठी आता हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठी नागरिकांना व बांधकाम व्यावसायिकांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. सध्या जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत बहुतांश अनधिकृत बांधकामांची कोंडी सुटणार आहे. रहिवाशी, इंडस्ट्री, व्यावसायिक, शाळा यांच्यासाठी सुध्दा ही नियमावली लागू राहणार आहे. यात ओटे, इमारतींची उंची, बंद टेरेस, बंद बाल्कनी, साईड मार्जिनमध्ये झालेले बांधकाम, एफएसआयचे उल्लंघन, इमारतीची वापर, रस्ता रुंदीकरणामुळे अनधिकृत ठरलेली बांधकामे, जिना व पॅसेजमध्ये डिफरन्स, पार्किंगचे उल्लंघन यांचेही नियमितीकरण करता येणार आहे. या नियमावलीमुळे शहरातील कपाटकोंडी फुटणार असून सुमारे ७० टक्के अनधिकृत बांधकामे अधिकृत करता येणार आहे. परंतु त्यासाठी जबर दंड आकारण्यात आल्याने त्यावर हरकतींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बांधकाम व्यावसायिकांची कोंडी
या नियमावलीने अनधिकृत बांधकामाना दिलासा मिळणार असला अनधिकृत बांधकामे नियमित करताना तीन प्रकारचे दंड आकारले जाणार आहेत. त्यात हार्डशीप प्रिमिअम, अतिरिक्त एफएसआय, इन्फ्रास्ट्रक्‍चर यांचा समावेश आहे. जमीन मूल्याच्या दहा टक्के हा दर असणार आहे. दरांचा समावेश राहील. त्यामुळे बिल्डरांचे कंबरडे यामुळे मोडणार आहे. या तीन दरामुळे बिल्डींगच अनधिकृत ठरण्याचा धोका असल्याने बिल्डरांचा प्रतिसादावर प्रश्नचिन्ह आहेत. योजना अमलात आणताना स्थानिक प्राधिकरणाकडून प्रशमन (कंपाउंड) दर आकारले जाणार असल्याने बिल्डरांची कोंडीच अधिक होणार आहे.

नदी काठावरील बांधकामे अनधिकृतच
नियमावलीत अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी निकषही देण्यात आले आहेत. या निकषांचा सर्वाधिक फटका हा नदी व नाल्यामध्ये अतिक्रमण करून तयार केलेल्या बांधकामांना बसणार आहे. नाशिकमध्ये पूररेषेमुळे अडकलेल्या हजारो बांधकामाना त्याचा झटका बसणार आहे. २००८ पासून निळ्या व लाल पूररेषेतील बांधकामांना परवानगी दिली जात नाही. शासन दरबारी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. नदी किनारी महापालिकेने स्टिल्ट बांधकामाला परवानगी दिली आहे. परंतु, अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या योजनेतून निळ्या पूररेषेतील बांधकामे वगळण्यात आल्याने नदी किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी धक्का मानला जात आहे. सोबतच हेरिटेज वास्तू, खेळाची मैदाने यावरील बांधकामे अधिकृत करता येणार नसल्याने हा मोठा झटका मानला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालसाहित्याचा अनोखा त्रिभाषिक आविष्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड
बालसाहित्य लिहिणे ही अवघड बाब. मात्र, चांदवड येथील शिक्षक कवी रावसाहेब जाधव यांचा ‘गरगर मोळ्या’ हा बालकवितासंग्रह मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये एकाच पुस्तकात प्रकाशित होणार आहे. पुण्याच्या अक्षर वाङमय प्रकाशनातर्फे होणारा हा त्रिभाषेतला अभिनव प्रयोग महाराष्ट्रातला पहिला प्रयोग ठरण्याची शक्यता आहे.

रावसाहेब जाधव यांच्या बालकविता इतक्या सकस व लक्षवेधी आहेत की त्या इतर भाषांमधून वाचकांसमोर याव्यात. तसेच ग्रामीण भागातील मुलांचे भावविश्व, तेथील ग्रामीण प्रतिमांसह सर्वदूर जावे यासाठी हा अनोखा प्रयोग करीत असल्याचे प्रकाशक बाळासाहेब घोंगडे यांनी सांगितले आहे. दरम्यान हा ग्रामीण भागातील कवीचा मोठा सन्मान असल्याचे मानले जात आहे.
चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील अजितदादा पवार विद्यालयात शिक्षक असणारे कवी रावसाहेब जाधव यांचा ‘गरगर मोळ्या’ हा बालकविता संग्रह केवळ मराठीच नव्हे तर हिंदी इंग्रजी अशा तिन्ही भाषेत प्रकाशित होत आहे. हा आगळा वेगळा प्रयोग आहे. पुण्याच्या अक्षर वाङमय प्रकाशनने बालसहित्यात ही वेगळी वाट चोखाळली आहे एकाच पुस्तकात एकच कविता तिन्ही भाषेतून येणार असल्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

जरासा वाकडा चिंचेचा आकडा
खाणाखुणा मज करतोय रे
झाडावर चढ मला म्हणतोय रे

ही चिंचेची कविता असो किंवा

उन्हात बोलवी काटेरी सावली
शेंगा वाळून गळतात
नाचाया मला लावतात

ही शेंगांवरची कविता हिंदी व इंग्रजीमधून सर्वांच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण भाषा, तेथील मातीतील विविध प्रतीके यांचा चपखल वापर करून कवी जाधव यांनी डोंगर, राने, वने, झरे ग्रामीण परिसर यांची छानशी सफर गारमोळ्या
कविता संग्रहात घडवून आणली आहे. या कविता अनुवादित करून एकाच काव्यसंग्रहाद्वारे वाचकांसाठी सादर करण्याचा बाळासाहेब घोंगडे यांचा प्रयोग अनोखा आहे. ‘गीत चिन्हांचे गाऊ या’ यासारख्या कविता तर मुलांच्या मनावर अधिराज्य करतील अशाच आहेत सध्या मराठी कवितांचे अनुवाद करण्याचे काम सुरू असून येत्या काही महिन्यात तिन्ही भाषेतील हा काव्यसंग्रह सर्वांच्या भेटीला येणार असल्याचे प्रकाशकांनी सांगितले. मराठी भाषेत द्विभाषी कवितांचा प्रयोग झाला; मात्र त्रिभाषेत हा पहिलाच भन्नाट प्रयोग असल्याने उत्सुकता वाढल्याचे चांदवडी रुपय्या या साहित्यिक ग्रुपचे सागर जाधव, विष्णू थोरे, जनार्दन देवरे, रवींद्र देवरे, रुपाली खैरनार, बाळा पाडवी यांनी सांगितले.

मुलांच्या भावविश्वाचे काव्यातून रेखाटन
कवी जाधव यांनी आपल्या या नव्या निर्मितीचे स्वागत केले आहे. त्यांचा ढेकूळ हा काव्यसंग्रह प्रकाशित असून त्यास राज्य पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामीण जीवन, तेथील जगणे, शेती मातीतील आयुष्य हिंदी व इंग्रजी भाषेत शिकणाऱ्यांना कळेल, या अर्थाने या प्रयोगाला वेगळे मोल आहे. डॉ. एकनाथ पगार या पुस्तकाची प्रस्तावना लिहित असल्याचे कवी जाधव यांनी सांगितले. मुलांचे भावविश्व कवितेतून रेखाटल्याचे ते सांगतात.

अक्षर वाङमय ही आमची प्रकाशन संस्था नवे प्रयोग करण्यास उत्सुक आहे. कवी रावसाहेब जाधव यांच्या ‘गरगर मोळ्या’ कविता संग्रहात चांगल्या कविता आहेत. वेगळेपण दिसल्याने त्या मराठीसह हिंदी, इंग्रजीमध्ये पण आणत आहोत. एखाद्या चौथ्या भाषेत या कविता आणण्याचा प्रयत्न आहे.
- बाळासाहेब घोंगडे, प्रकाशक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज ग्राहकांसाठी तक्रार निवारण दिन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फे मालेगाव, मनमाड, कळवण, सटाणासह नाशिक ग्रामीण मंडळातील विविध ठिकाणी ग्राहक तक्रार निवारण व संवाद दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा वीज ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

कळवण विभागातील सर्व उपविभागीय कार्यालयांसह मालेगाव मंडळातील पाटणे व रावळगाव शाखा कार्यालयात सोमवारी (दि. २४), सिन्नर एक आणी दोन उपविभागातील वीज ग्राहकांसाठी मंगळवारी (दि. २५) उपविभाग कार्यालय येथे ग्राहक तक्रार निवारण व सुसंवाद दिन होणार आहे. मनमाड विभागातील मनमाडसह नांदगाव व येवला शहर आणि ग्रामीण उपविभागातील सर्व शाखा कार्यालयांमध्ये १ ऑगस्ट रोजी तर विभागीय कार्यालयात २८ ऑगस्ट रोजी ग्राहक तक्रार निवारण व संवाद दिन होणार आहे. यापुढे प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी उपविभाग तर पहिल्या सोमवारी सर्व शाखा कार्यालयांत ग्राहक संवाद दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्हाला महापालिकेतून वगळा!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

महापालिका हद्दीतील पिंपळगाव खांब परिसरातील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये येणारे दाढेगाव समस्यांचे आगार बनले असून, अगदी दारातील कचऱ्यापासून रस्त्यापर्यंत व पिण्याच्या पाण्यापासून सार्वजनिक शौयाचालयांपर्यंत असंख्य समस्यांना येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कामे करा अन्यथा आम्हाला महापालिका हद्दीतून वगळा, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

केवळ नावापुरतेच महापालिकेत असलेले दाढेगाव अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिले आहे. हे गाव आता फक्त मतदानापुरतेच हिशेबात धरले जात असून, कधी कोणताही लोकप्रतिनिधी गावाच्या समस्या जाणून घेण्यासाठी फिरकत नाही, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. एकीकडे स्मार्ट सिटीचा डांगोरा पिटणाऱ्या महापालिका प्रशासनाला व सार्वजनिक बांधकाम खात्याला गावाकडे पाहायलादेखील वेळ मिळत नसून, या गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेली विकासकामे होण्यासाठी अजून किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. आमच्या गावापेक्षा एखाद्या ग्रामपंचायतीचा विकास जास्त झाला आहे, त्यामुळे एकतर गावाची रखडलेली विकासकामे त्वरित मार्गी लावा अन्यथा आम्हाला महापालिकेतून वगळा, अशी मागणी गावातील त्रस्त नागरिक करीत आहेत.

--
पुलावर जीवघेणी वाहतूक

या गावामधून वाहणाऱ्या वालदेवी नदीवर काही वर्षांपूर्वी बांधलेला एक पूल आहे. मात्र, त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत या गावाचा संपर्क शहराशी तुटतो. परिणामी गावातून शहराकडे जाण्यासाठी पिंपळगाव खांबमार्गे सुमारे ५ किलोमीटरचा वळसा घालून पाथर्डी फाट्याकडे जावे लागते. मात्र, अनेक जण धोकादायक पद्धतीने वाहत्या पाण्याखाली बुडालेल्या पुलावरून मार्ग काढताना दिसून येतात. गावातील शाळकरी विद्यार्थी व अंबड, सातपूरसारख्या जाणारा कामगारवर्ग यांना यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. या रखडलेल्या पुलाच्या निर्मितीकरिता खासदार हेमंत गोडसे यांनी महापालिकेला गतवर्षी २८ नोव्हेंबर रोजी पुलाची उंची वाढविण्याकामी पत्र दिले आहे. मात्र, प्रशासनाला त्याचा विसर पडला की काय, असा प्रश्न सवाल उपस्थित होत आहे. अनेक नगरसेवक व आमदारांनी या पुलाची उंची वाढविण्यासाठी अनेकदा शुभारंभाचा नारळदेखील फोडला आहे. मात्र, अजूनही या कामाचा प्रारंभ होत नसल्याने परिसातून संताप व्यक्त होत आहे.

मध्यरात्री पाणीपुरवठा

महापालिकेने गावातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, येथे मध्यरात्रीनंतर पाणीपुरवठा केला जात असल्याची स्थिती आहे. मध्यरात्री १२ ते ३ वाजेदरम्यान होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सर्वांनाच जागरण करून पाणी भरावे लागत आहे. येथून अवघ्या १.५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाथर्डी गावात लागेल तितका वेळ पाणीपुरवठा केला जातो. केवळ या गावासाठी रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा होत आहे.

घंटागाडीसाठी फोन

महापालिकेची घंटागाडी येथील कचरा उचलण्यासाठी चक्क १५ ते २० दिवसांनी एकदाच येते. काही नागरिक आमच्या गावातील कचरा उचलण्यासाठी गाडी पाठवा, असे पालिकेच्या संबंधित ठेकेदाराला फोन करून सांगतात, तेव्हा कुठे गाडी येते आणि कचरा नेते. ठेकेदार म्हणतात दिवसाआड गाडी येते, नागरिक म्हणतात पंधरा-वीस दिवसांतून एकदा गाडीचे दर्शन होते. त्यातही कचरा संपूर्णपणे घेऊन जात नाही. यामुळे गावात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते.

---

सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

महापालिकेने साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या गावासाठी महिला व पुरुषांसाठी प्रतेयकी १० असे २० सीटचे सार्वजनिक शौचालय उभारून दिले आहे. त्यात सुरवातीला काही दिवस पाणीपुरवठा होत होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तेथे पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना घरून पाणी घेऊन शौचालयात जावे लागत आहे. २० शौचालयांपैकी केवळ ५ ते ६ शौचालय वापरात आहेत. बाकी सर्व शौचालयांचे दरवाजे, आतील भांडी फुटल्याने ती बंद आहेत.

घंटागाडीसाठी फोन

महापालिकेची घंटागाडी येथील कचरा उचलण्यासाठी चक्क १५ ते २० दिवसांनी एकदाच येते. काही नागरिक आमच्या गावातील कचरा उचलण्यासाठी गाडी पाठवा, असे पालिकेच्या संबंधित ठेकेदाराला फोन करून सांगतात, तेव्हा कुठे गाडी येते आणि कचरा नेते. ठेकेदार म्हणतात दिवसाआड गाडी येते, नागरिक म्हणतात पंधरा-वीस दिवसांतून एकदा गाडीचे दर्शन होते. त्यातही कचरा संपूर्णपणे घेऊन जात नाही. अशा समस्येमुळे गावात रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते.


नदीवरील बंधारा फुटला

गाव परिसरात अनेकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, येथील बंधारा गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गेल्या २ ऑगस्ट रोजी वाहून गेला. येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता जानेवारी महिन्यामध्ये स्वखर्चातून त्यात दगड, माती, ताडपत्री टाकून भराव टाकला होता. मात्र, तोही यावर्षी वाहून गेल्याने शेतकऱ्यांना जमिनीसाठी लागणारे पाणी उपलब्ध होणे जिकिरीचे झाले आहे. याकामीदेखील खासदार गोडसे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला कार्यवाहीचे पत्र दिलेले आहे. मात्र, संबंधित विभाग पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.


गटारीचे पाणी नदीत

पालिकेने वालदेवी पात्रातून पंपिंग स्टेशनपर्यंत सिमेंटचे पाइप टाकून शहराच्या अंबड, सिडको भागातून येणारे गटारीचे पाणी वाहून नेण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, महापालिकेच्या सोयीसाठी येथील नदीपात्रातील चेंबरला छिद्र पाडून गटारीचे पाणी नदीपात्रात मिसळण्याची व्यवस्था केली गेली आहे. त्यामुळे गावात दुर्गंधीसह डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावातील मळे विभाग, शिव रस्ता, पीर बाबा मंदिररोड आदी भागात नागरिकांची शेती असून, या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्यांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. मागणी करूनही महापालिका उपाययोजना करीत नसल्याच्या तक्रारी आहेत.

--

आमच्या गावातील समस्या सुटण्याकामी आम्ही महापालिकेसह अनेक विभागांकडे वारंवार पाठपुरावा करीत आहोत. मात्र, आमच्या समस्या जाणून घ्यायला कोणाकडे वेळच नसल्याची परिस्थिती आहे.

-पंढरीनाथ भोर, नागरिक

--

पावसाळ्यात गावातील पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी व कामगारवर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. यंदाही तशीच स्थिती असून, महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाने आमच्या समस्या सोडविण्याकामी पुढाकार घ्यावा.

-सागर भालके, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’ने आमचे सोने केले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’ मदतीसाठी माध्यम झाले आणि आमचे दिवसच पालटले. आम्ही दहावीला चांगले गुण मिळवले होते, त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून ‘मटा’ने आमची निवड हेल्पलाइनचे विद्यार्थी म्हणून केली. आज येथपर्यंतचा शैक्षणिक प्रवास केवळ ‘मटा’मुळेच झाला आहे, अशी प्रतिक्रिया प्राजक्ता पाटील हिने व्यक्त केली.

स्वप्नील पवारची छोटी बहीण म्हणते, की दादा पास झाल्यानंतर खूप माणसे घरी येऊन गेली; मीपण त्याच्यासारखीच मोठ्ठी होणार आहे.’ राहुल बोरसे म्हणतो, की मला माझ्या परिस्थितीची जाणीव आहे; पण मी काहीही करून आईबाबांना सुखाचे दिवस दाखवणार आहे. ‘मटा’ने मला मदत केली नसती तर मी येथपर्यंत येऊच शकलो नसतो. रोशनी भालेरावकडे ‘मटा’चे आभार मानण्यासाठी शब्दच नाहीत. मटा हेल्पलाइन २०१२ चे हे विद्यार्थी. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ती आज झटत आहेत.

गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर आणि आदित्य जाधव आज ‘मटा’ने तुम्हा दहा जणांना निवडले. नक्कीच ‘मटा’ तुमचे सोने करणार, तुम्हाला हवी ती मदत केल्यानंतर तुम्ही मात्र यश मिळवायचे आहे. उद्या तुम्हीही कुणाला तरी मदत करण्याच्या पात्रतेचे व्हायचे आहे, याची जाणीव तुम्ही ठेवा. या उपक्रमाची आठवण ठेवा, असे रोशनी आवर्जून सांगते. आम्हीही सर्व जाण ठेवून अभ्यास करीत आहोत. शैक्षणिक उद्दिष्ट गाठल्यानंतर आम्हीही इतरांना मदत करण्यासाठी सज्ज होणार आहोत, असेही रोशनी सांगते.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा म्हणून वाचकांच्या सत्प्रवृत्तीला साद घालत हा ‘मटा हेल्पलाइन’चा उपक्रम हाती घेतला. या मुलांची कहाणी ‘मटा’त प्रसिद्ध झाली आहेच, त्यांच्या नावाने क्रॉस्ड चेक काढून ड्रॉपबॉक्समध्ये जमा करावेत. चेकच्या मागे पाठवणाऱ्याचे नाव आणि फोन नंबर लिहावा. कृपया ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नावाने चेक देऊ नयेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’चा हेल्पलाइन हा उपक्रम नाशिककर दिवसेंदिवस पुढे नेत आहेतच; परंतु या मुलांना आणखी मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे समाजातील दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मुलांच्या यशात तुमचाही वाटा असावा, ही जाणीव ठेवून त्यांना मदत करा. या मुलांच्या हितासाठी तुमचे योगदान नक्कीच कामी येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी बंद करणार ४५०० किमीच्या फेऱ्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तोट्यात चाललेली शहर बस सेवा बंद करण्याचा निर्णय राजकीय दबावापोटी एसटीने मागे घेतला असला, तरी ही सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या निर्णयावर महामंडळ ठाम आहे. एसटीने आता शहरातील विविध मार्गांवरून धावणाऱ्या १५० बसपैकी १० बस बंद बस करुन ४ हजार ५०० किमीची कपात केली आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही कपात टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. याअगोदर या बस दररोज ५० हजार किमी धावत होत्या. त्यात अगोदर १२ हजार व आता ४ हजार ५०० किमी कपात केली आहे. त्यामुळे सिटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. तोट्यात चाललेल्या मार्गांवरील या बस असून, यामुळे एसटीचा तोटा कमी झाला असला तरी प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

गेल्या सहा वर्षांत १२५ कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने याअगोदर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा तोटा भरून द्यावा, असे सांगत १ फेब्रुवारी रोजीच ही सेवा बंद करण्याचे नाशिक महापालिकेला कळविले होते. त्यानंतर अडीच महिने उलटूनही यावर काहीच निर्णय न झाल्यामुळे एसटीने पुन्हा हालचाली केल्या व १ मेपासून सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजकीय दबाव वाढला, तर महापालिकेने हात झटकले. नंतर एसटीने एकाच वेळी सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला. पण, टप्प्याटप्प्याने ही सेवा बंद करून तोटा कमी करण्याचा प्रयत्न एसटीने सुरू केला आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे.

एसटीने अगोदर मे महिन्यात १२ हजार किमीवर बस बंद केल्यानंतर तोट्यातही घट झाल्यामुळे त्यांनी आता ४ हजार ५०० किमीवरील धावणाऱ्या बस बंद केल्या आहेत. दरम्यान, सिटी बस सेवेसाठी महानगरपालिकेने कन्सल्टंटची नेमणूक करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून, त्यांच्या अहवालानंतर बससेवा ताब्यात घ्यायची की नाही, याचा निर्णय होणार आहे.

खासगी वाहतूकदारांची चंगळ

एसटीने तोट्यात चाललेल्या मार्गावरील बसेस बंद केल्यामुळे त्याचा फटका सामान्य माणसाला बसणार आहे. त्यामुळे खासगी वहातूकदारांची चंगळ होणार असून, त्यात रिक्षाधारकांकडून जास्तीचे पैसे उकळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

तोट्यात चालणाऱ्या मार्गावरील बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यात ४५०० किमीची कपात करण्यात आली आहे. गेल्या वेळीही अशी फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली होती. त्यानंतर तोटा कमी झाला म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

- राजेंद्र जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्टला पावणार ‘प्रभू’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील रेल्वे स्टेशनवरील दोन नव्या लिफ्टच्या उद्घाटनाचा अखेर मुहूर्त सापडला आहे. या लिफ्टचे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दि. ३० जुलै रोजी उद्घाटन होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. येथील लिफ्ट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचे वृत्त ‘मटा’ने छायाचित्रासह नुकतेच प्रसिद्ध केले होते.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या दोन्ही टोकांना दोन लिफ्ट उभारण्यात आल्या आहेत. त्यांची क्षमता तेरा प्रवाशांची आहे. येथील लिफ्टचा प्रश्न तीन वर्षांपासून प्रलंबित होता. लिफ्टला मान्यता मिळाली. त्यांचे काम गेल्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होते. अखेर दोन्ही लिफ्टचे काम महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले. परंतु, मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी न दिल्यामुळे या लिफ्ट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होत्या. अखेर त्यांच्या उद्घाटनास ३० जुलैचा मुहूर्त सापडला असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू दि. २९ व ३० जुलै रोजी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात या लिफ्टचे उद्घाटन होईल.

--

प्रवाशांसाठी दिलासादायी

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून दररोज शंभरवर रेल्वेगाड्या धावतात. पंधरा ते वीस हजार प्रवासी प्रवास करतात. त्यांना अवघड जिने चढून दुसऱ्या व तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्यासाठी धापा टाकत जावे लागते. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करणारे दररोजचे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग यांच्यासाठी जिने चढणे अवघड असते. नाशिकरोड स्टेशनवर लिफ्ट बसवावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांनी केली होती. नाशिकरोडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक व चारवर फार कमी गाड्या थांबतात. मुंबईहून येणाऱ्या २१ डब्यांच्या बहुतांश प्रवासी गाड्या या फ्लॅटफॉर्म दोनवर, तर मुंबईला जाणाऱ्या गाड्या फ्लॅटफॉर्म तीनवर थांबतात. गाडी चुकू नये म्हणून काही प्रवासी रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंगांना हे शक्य नसते. जिन्यावरून ये-जा करून त्यांना रक्तदाब, गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अशा प्रवाशांसाठी या लिफ्ट सुरू होणे दिलासादायक ठरणार आहे.

--

सरकत्या जिन्यांची गरज

नाशिकरोड स्टेशनवर सामान्य प्रवाशांसाठी सरकते जिने बसविण्याचे जाहीर होऊन एक वर्ष झाले आहे. तथापि, यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झालेली नाही. लिफ्टची क्षमता तेरा प्रवाशांची आहे. त्यामुळे तिचा लाभ सर्व गरजूंना होणे अवघड आहे. सरकते जिने बसविल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल. लिफ्टवरील ताणही कमी होईल. जास्त प्रवासी संख्या, जादा महसूल यामुळे नाशिक हे मध्य रेल्वेचे प्रथम दर्जाचे स्टेशन आहे. भुसावळ विभागात नाशिकरोडखेरीज मनमाड, जळगाव रेल्वे स्टेशनवरही लिफ्ट उभारण्याचे काम सुरू आहे.

--

मनमाड-इंदूर मार्गाला मुहूर्त

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गालादेखील मुहूर्त लागला आहे. दि. २९ जुलै रोजी दुपारी बारा वाजता रेल्वेमंत्री धुळ्यात रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत. त्याचवेळी मनमाड-धुळे-इंदूर मार्गाचे भूमिपूजनही केले जाणार आहे. या मार्गासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पाठपुरावा केला होता. धुळ्याला भेट देणारे प्रभू हे गेल्या तीस वर्षांतील पहिले रेल्वेमंत्री आहेत. शिर्डी-मुंबई रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्या जाणार असून, ३० जुलैला साईबाबांचे दर्शन घेऊन प्रभू या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील.

--

कांदा स्टोअरेजचे भूमिपूजन

लासलगाव येथे रेल्वे मंत्रालयाच्या कंटनेर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि लासलगाव खरेदी-विक्री संघातर्फे ओनियन कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. ३० जुलै रोजी त्याचे भूमिपूजन होईल. राज्यात प्रथमच असे कोल्ड स्टोअरेज उभे राहणार आहे. या कोल्ड स्टोअरजेची क्षमता दोन हजार टनांपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यातील कांदा, डाळिंब, आंबा, द्राक्ष आदी उत्पादकांना त्याचा लाभ होणार आहे. येथे प्री-कूलिंग चेंबर, राइपनिंग आदी सुविधा असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजीराव पाटील यांचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

ज्येष्ठ नेते आणि सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व पद्मभूषण शिवाजीराव गिरीधर पाटील (वय ९२) यांचे शनिवारी (दि. २२) पहाटे मुंबई येथील लीलावती रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. त्यांनी १२ वर्षे राज्याचे सहकारमंत्री म्हणून काम पाहिले. सन २०१३मध्ये त्यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील असलेल्या शिवाजीराव पाटील यांनी शनिवारी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली, नातू असा परिवार आहे. शिवाजीराव पाटील यांच्या पार्थिवावर उद्या, सोमवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता दिवंगत स्मिता पाटील पब्लिक स्कूल, दहिवद ता. शिरपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील होत.


सहकार क्षेत्रात अनमोल योगदान

स्वातंत्र्यानंतर शिवाजीराव पाटील यांनी प्रज्ञा समाजवादी पक्षामधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात असतानाच त्यांनी शिरपूर तालुक्याचे दोनवेळा आमदारपद, पाटबंधारे विभागाचे राज्यमंत्री, सहकार मंत्री आणि त्यानंतर खासदार अशी विविध पदे सांभाळली. सहकार क्षेत्रात काम करताना धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही त्यांचे विविध संस्थांच्या उभारणीत अनमोल योगदान होते. शिवाजीराव पाटील यांचा जन्म ५ मार्च १९२५ रोजी अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याने त्यांच्यावरही त्याचा पगडा होताच. त्यांचे मोठे बंधू उत्तमराव पाटील व वहिनी लीलाताई पाटील यांच्यासोबत शिवाजीरावांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेत अनेकवेळा तुरुंगवासही भोगला. त्यांनी साने गुरुजी यांच्यासोबतही काही दिवस तुरूंगात काढले होते.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे खास सल्लागार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेत केंद्र सरकारकडून २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याचबरोबर त्यांनी जागतिक ऊस व बीट साखर उत्पादक महासंघ, राष्ट्रीय हेवी इंजिनीअरिंग, वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या संस्थांच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची १५ ऑगस्टपूर्वी स्थापन करू, अशी घोषणा राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगकेर यांनी केली.

राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत राज्य विक्रेता संघटनेने दिलेल्या प्रस्तावातील सर्व योजनांचा सहभाग कल्याणकारी मंडळात करण्याचेही मान्य करण्यात आले.

राज्यात साडेतीन लाख वृत्तपत्र विक्रेते कार्यरत असून, अशा कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी युती शासनाने पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगानेच गेली शंभर वर्षे मुंबई शहरासह इतर जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या आणि अथक कष्ट करून सर्वदूर वेळेत वृत्तपत्रे पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे हितसंवर्धन व्हावे यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय झाला.

उद्योगमंत्री देसाई म्हणाले, की वृत्तपत्रे व वाचक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून वृत्तपत्र विक्रेते काम करतात. मात्र, हे विक्रेते सतत दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांना न्याय द्यावाच लागेल, अशी बाजू बैठकीत मांडली. सुनील पाटणकर यांनी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाचे स्वरूप, विक्रेत्यांच्या मागण्या सविस्तर मांडल्या. बालाजी पवार यांनी वृत्तपत्र विक्रेते, कुटुंबीय यांच्यासाठी घरकुल, आरोग्य, शिक्षण आदी कल्याणकारी योजना राबवाव्यात, अशी मागणी केली. विकास सूर्यवंशी म्हणाले, की वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ असावे. कल्याणकारी मंडळाच्या लाभासाठी नावनोंदणी करताना वृत्तपत्र विक्रेता संघटनेची शिफारस आवश्यक असावी, अशी सूचना गोरख भिलारे यांनी मांडली.


आधार कार्डद्वारे करावी नोंदणी

१२२ प्रकारच्या असंघटित कामगारांकरिता एकत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. मात्र, त्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी खास स्थान असेल. विक्रेत्यांना अधिक प्राधान्य देण्यात येईल. विक्रेता संघटनेने त्यासाठी तत्काळ आपल्या प्रत्येक शहर व जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची आधार कार्डद्वारे नोंदणी पूर्ण करावी. त्यामुळे कल्याणकारी मंडळाचा लाभ तत्काळ मिळण्यास मदत होईल, असेही कामगारमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी, दारणेला पुन्हा पूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, शनिवारी सकाळपर्यंत गंगापूर तसेच दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूरसह दारणा, नांदूरमध्यमेश्वर, भावली, कडवा या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पूरसदृश स्थ‌िती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

इगतपुरी तालुक्यात शनिवारी (दि. २२ जुलै) पुर्वीच्या २४ तासांमध्ये रेकॉर्डब्रेक वृष्टी झाली. या पावसाने हंगामात ‌सर्वाधिक असलेला गुरुवारचा रेकॉर्डही ब्रेक केला. गुरुवारी दिवसभरात १४२ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, शुक्रवारी रात्रीनंतर झालेल्या धुव्वांधार पावसामुळे गुरुवारच्या पावसाचे रेकॉर्ड वाहून गेले. शनिवारी सकाळी आठपर्यंत एकट्या इगतपुरी तालुक्यात १५३ मिमी पाऊस झाला. त्यामुळे दारणा धरणातील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून, मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये ७० मिमी, तर पेठमध्ये ७३ मिमी पाऊस झाला. धरणांमध्ये पाण्याची साठवणूक करणे शक्य नसल्याने सकाळपासून १३ हजार ९८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. ओव्हरफ्लो झालेल्या भावली धरणातूनही १६६३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर कायम असल्याने सायंकाळी तो १९०० क्युसेक करण्यात आला. नांदूरमध्यमेश्वर धरणातून सकाळी ३० हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. दुपारनंतर तो एक हजार क्युसेकने वाढविण्यात आला. सायंकाळी ३१ हजार ५१० क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. दुपारनंतर कडवा धरणातूनही ६ हजार ८३४ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. धरणांमधून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेले पाणी आणि नदीपात्रात मिसळणारे पावसाचे पाणी यांमुळे गोदावरी, दारणा आणि तिच्या उपनद्यांना पूर आला आहे. त्यामुळे पंचवटी परिसरातील गोदाकाठालगतची अनेक मंदिरे पाण्याखाली गेल्याचे पहावयास मिळाले.

गंगापूर धरणातून सकाळी १६६४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. परंतु पेठ, त्र्यंबकेश्वरसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राह‌िल्याने सकाळी साडेअकराच्या सुमारास तो २४९६ क्युसेकने तर दुपारी सव्वातीननंतर तो तीन हजार ३२८ क्युसेक करण्यात आला.

सुरक्षिततेचे आवाहन

नाशिक जिल्ह्यात बहुतांश भागात जोदार पाऊस असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना तसेच निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी असे अवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. विकेंड तसेच सुटी यामुळे लोक जंगल भागात पावसाचा तसेच धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जातात. पूर पाहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी संबंधित धोक्याच्या ठिकाणांपासून व पूर पाण्यापासून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा पावसालाच सांगायचे…

$
0
0

बळीराजाने नेहमीच त्याच्याशी आपुलकीचेच नाते सांगितले. पाऊस रूसला, हसला, हिरमुसला, बरसला अथवा कोपला तरीही त्याला तो आपलाच वाटला. आता बघा ना. एकीकडे तो ढगफुटीसारखा धो धो बरसतोय तर दुसरीकडे थेंब थेंब पाण्यासाठी लेकरांना तरसवतोय. त्यामुळे कुणाला किती थेंब वाटायचे हे पावसाला पुन्हा सांगायलाच हवे.

राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न गमतीने विचारला जातो. पूर्वी एखाद्याला झोडपून काढावे तसा पाऊस कोसळायचा. त्यामुळेच बहूदा तसे म्हटले जात असावे. परंतु आता पाऊस झोडपून काढत नाही. झोडपलेच तर ते अवेळी झोडपतो. म्हणूनच बळीराजाच्या नेत्रांमधून आसवांची धार लागते. आपल्या माणसांनी आपलाच घात करावा तसा अवकाळीच्या रूपात येणारा पाऊस शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये, बांधावर धुडगुस घालून पसार होतो. अत्यंत काळजीनं वाढविलेली पिकं डोळ्यांदेखत नष्ट होताना पाहून बळीराजाच्या जीवाची घालमेल होते. अन तेवढ्या काळासाठी तो त्याला ‘वैरी’ वाटू लागतो. परंतु मे महिन्यात उन्हाच्या तप्त झळा त्याच्या संयमाची आणि सोशिकतेची परीक्षा पाहू लागल्या, की पुन्हा त्याला पावसाची आठवण येऊ लागते. एखादी जिवलग व्यक्ती घरी येणार या विचाराने मन मोहरून निघावे तसे पाऊस येणार अन हिरवं स्वप्न फुलविणार, या आशेनं बळीराजा चातक चोचीने पावसाची वाट पाहू लागतो. त्याला पेरणीचे वेध लागतात. तरारून निघालेलं पिक त्याला पहायचं असतं. सुदैवाने यंदा जूनमध्येच पावसाला सुरूवात झाली. चांगला पाऊस झाला. त्यामुळे पेरणीला अनुकुलता लाभली. जिल्ह्यात यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा दीडपट अधिक पाऊस झाला. नाशिक तालुक्यात तर पावसाने विक्रमच केला. ३० दिवसांत सर्वाधिक ३५४ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी दोन हजार ३२४ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा तीन हजार ५३८ मिमी पाऊस पडला आहे. अर्थात दिंडोरी, कळवण, देवळा, निफाड आणि येवला या तालुक्यांमध्ये मात्र तो सरासरीही गाठू शकला नाही. जुलैमध्ये या तालुक्यांमधील बॅकलॉग पाऊस भरून काढेल अशी अपेक्षा होती. परंतु ती देखील फोल ठरू पहाते आहे. नाशिक, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी हे तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून गोदावरी, दारणा यांसारख्या नद्यांद्वारे पाण्याचा विसर्ग केला जात असून, मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी आतापर्यंत १० टीएमसीहून अधिक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जायकवाडीमधील पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे. औरंगाबादला पाऊस पडला नाही तरी मराठवाड्यातील जनतेला फारसे दु:ख होत नाही. पण नाशिकमध्ये जोरदार पाऊस पडला तर तेथील जनता खुष होते. नाशिकमध्ये जेवढा अधिक पाऊस पडेल आणि धरणं जेवढी अधिक वेगाने भरतील तेवढे अधिक पाणी जायकवाडी धरणामध्ये सोडले जाते. गतवर्षी नाशिक जिल्हावासियांनी दोनवेळा पूर पाह‌िला. शहरात एकाच दिवसात ९० मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. ६२ ते ६५ मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला तर ती अतिवृष्टी समजली जाते. गतवर्षी पावसाचा जोर अधिक असल्याने मराठवाड्याला ६० टीएमसीहून अधिक पाणी नाशिकने दिलं. यंदाही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं जात आहे. एकीकडे अशी सुबत्ता दिसत असताना काही तालुके पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: आसुसले आहेत. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ अशी काहीशी स्थ‌िती या तालुक्यांची झाली आहे. टंचाई आराखडा संपुष्ठात आल्यानंतर जुलैचे पहिले एक दोन आठवडे टँकरद्वारे पाणी पुरवठा बंद करण्यात आला. परंतु काही तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागल्याने तेथे पुन्हा टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. पावसाकडून ही संबंधित तालुक्यांची थट्टा नव्हे तर अन्य काय! निसर्गाची कृपा आणि अवकृपेचा अनुभव एकाचवेळी जिल्हावासी घेत आहेत. नाशिक जिल्ह्यात आजही ४३ गावे तहानेने व्याकूळ आहेत. सिन्नर, येवला, मालेगाव, चांदवड आणि बागलाण या पाच तालुक्यांमधील काही गावांमध्ये ग्रामस्थांना विशेषत: महिलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्यासाठीच पाणी नाही तेथे शेतीसाठी पाण्याचा प्रश्नच उदभवत नाही. जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही २० टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात जी परिस्थ‌िती आहे तीच नाशिक विभागातील अन्य जिल्ह्यांमध्येही. एकूण १५१ गावे आणि २२० वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. उत्तर महाराष्ट्रात अजूनही रहिवाशांची तहान भागविण्यासाठी दररोज ११३ टँकर्स धावत आहेत.

टँकरमुक्त गावांचे स्वप्न साकारण्यासाठीच राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना कार्यान्वित केली. ही योजना दीर्घकाळ चांगले परिणाम देणारी असली तरी गेल्या तीन वर्षांत पाणी टंचाईचे चित्र फारसे बदलू शकलेले नाही. जुलै अखेरीसही अनेक गावे तहानलेली असणे हे याचेच द्योतक आहे. अलीकडेच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थ‌ित आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेतील अनेक त्रूटी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या निदर्शनास आणून दिल्या. मतदार संघातील समस्या सांगण्यासाठीचे हे व्यासपीठ नसल्याचे महाजन यांनी सांगितलेही. त्यानंतरही आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेतंर्गत झालेल्या कामांबद्दलची नाराजी व्यक्त केली. भौगोलिक परिस्थ‌ितीनुसार जलयुक्त शिवारच्या धोरणांमध्ये बदल करून त्यानुसार उपाययोजना करता यायला हव्यात, अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. जलयुक्त शिवारची धोरणे सरसकट सर्वच भौगोलिक परिस्थ‌ितीमध्ये लाभदायीच ठरतील असे नव्हे. स्थानिक प्रश्नांची, तेथील भौगोलिक परिस्थ‌ितीची स्थानिक लोकप्रत‌िन‌िधींनी काकणभर अधिक माहिती असते. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या वेळी त्यांन‌ी मंत्री महोदयांकडे अपेक्षा व्यक्त केली असेल तरी जनहितासाठी त्यावर सकारात्मक विचार व्हायला काय हरकत आहे.

यंदा आतापर्यंतच्या पावसाचा अंदाज घेता जिल्ह्यातील एकूण पाऊस तसा चांगला, दामदार भासतोय. दारणा, गोदावरी, वाकी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दारणा आण‌ि गोदाकाठ पावसाच्या सरींनी हल्ली रोजच न्हाऊन निघत आहे. मात्र याखेरीजही जिल्ह्यातील गिरणा पट्टा मात्र अजूनही कोरडाच आहे.

गेल्या दीड महिन्यात तर पावसाने जिल्ह्यातील सटाणा, नांदगाव, मालेगाव, देवळा, येवला या तालुक्यांवर अन्याय केला आहेच. उर्वरित पावसाळ्यात जर ही ओढ भरून निघाली तर उत्तमच. मात्र जर पावसाने या भागाकडे पाठ फिरवलीच तर, प्रशासनाने तरी पावसासारखा दुजाभाव न करता, समतोल साधण्याचा प्रयत्न करावा, हीच माफक अपेक्षा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीईटी’त मराठी व्याकरणाचे धिंडवडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक
शिक्षकांचा दर्जा उंचाविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) परिषदच ‘फेल’ ठरली आहे. या परीक्षेच्या शनिवारी पार पडलेल्या दोन्हीही सत्रांतील प्रश्नपत्रिकांमध्ये मराठी व्याकरणाच्या भरमसाठ चुका आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पहिल्या सत्रातील प्राथमिक विभागाच्या प्रश्नपत्रिकेत १५० प्रश्नांमध्ये तब्बल ११९ ढोबळ चुका विद्यार्थ्यांना सापडल्याने परिषदेच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शनिवारी शहरातील ६० केंद्रांवर सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पहिल्या सत्रात प्राथमिक तर दुपारच्या सत्रात माध्यमिक स्तरासाठी परीक्षा घेण्यात आली. काही महिन्यांपूर्वी ‘असर’ या एनजीओच्या अहवालात राज्याच्या प्राथमिक शिक्षणातील भाषा आणि गणितांसारख्या विषयांच्या कमकुवतपणावर बोट ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या या विषयाचा दर्जा उंचाविण्यासाठी टीईटीसारखी परीक्षा भावी गुरुजींचा कस लावेल, अशीही अपेक्षा केली गेली. मात्र, ती फाेल ठरली. परीक्षेची काठ‌िण्यपातळी योग्य असली तरीही छापील मराठीतील प्रश्नांमध्ये व्याकरणाच्या चुका निदर्शनास आल्या.
हास्यास्पद चुकांची शंभरी
प्राथमिक स्तरासाठी घेण्यात आलेल्या पहिल्या सत्रातील परीक्षेत इंग्रजी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास या ५ विषयांवर प्रत्येकी ३० प्रश्न विचारण्यात आले होते. प्रतिप्रश्न १ गुण असे स्वरूप होते. यानुसार १५० गुणांच्या या प्रश्नपत्रिकेतील चुकांचे दर्शन मराठी विभागापासून घडले. व्याकरणातील पूर्णविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्हे, वेलांटी-उकारांमधील ऱ्हस्व-दीर्घ लेखनाच्या अशा असंख्य चुका आढळल्या आहेत. ‘उताऱ्या’ ऐवजी ‘उतान्या’, मोहर ऐवजी ‘भाहोर’, ‘आंबा’ ऐवजी ‘आंखा’, ‘क्रियापदे’ ऐवजी ‘भियापदे’, ‘कैऱ्या’ ऐवजी ‘कैन्या’ अशा चुकांनी गंभीर चेहऱ्याने आलेल्या परीक्षार्थींना हसविले. बालकवींचेही नाव चुकीचे छापत त्यांच्या ठोंबरे नावातील अनुस्वारही खाऊन टाकण्यात आला आहे. एका प्रश्नाला दिलेला उत्तराचा एक पर्यायच छापून आला नाही.

१८ हजार परीक्षार्थींची उपस्थिती

शनिवारच्या परीक्षेच्या नियोजनात शहरात १९ हजार ५१६ परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. एकूण ६० केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. पहिल्या सत्रात प्राथमिक स्तरासाठी पेपर क्रमांक १ सकाळी १०.३० ते १ या वेळेत पार पडला. ३३ केंद्रांवर पहिल्या सत्रात सुमारे ११ हजार परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली, तर दुपारी २ ते ४.३० या माध्यमिक विभागासाठी साडेसात हजार विद्यार्थ्यांनी २७ केंद्रांवर ही परीक्षा दिली. परीक्षा केंद्राचे शूटींग, परीक्षा हॉलमध्ये ओळखपत्र आणि हॉल तिकिटाशिवाय इतर वस्तू नेण्यास मनाई होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images