Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरण्यास अडचण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार विविध अडचणींवर मात करीत जिल्ह्यातील ९० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांचे अर्ज भरणे बाकी असून, सर्व्हर डाऊनची समस्या येत असल्याने हे शेतकरी हैराण झाले आहेत.

याचबरोबर या सर्व शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची मुदत सुरुवातीला आज (दि. १५) मध्यरात्रीपर्यंत दिली असल्यामुळे शेतकऱ्यांकडे काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने त्यांची धावपळ उडाली होती. मात्र गुरूवारी, रात्री राज्य सरकारकडून अर्ज भरण्याची मुदत वाढवून दि. २२ सप्टेंबर करण्यात आल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तरीही रांगेत उभे राहून सर्व्हर डाऊनमुळे कर्जमाफीचा अर्ज भरला जात नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी मध्यरात्री तसेच पहाटेच्या सुमारास कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजारांच्या आसपास शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांचे अर्ज भरणे अद्यापही बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना मात्र दिवसभर महा-ईसेवा केंद्राजवळ सर्व्हर सुरू होण्याची वाट पाहत बसावे लागत आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून भारनियमनामुळेदेखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांचे श्वान, भलतेच गुणवान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या १५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यात पोलिस श्वानांनी आपले कलागुण सादर केले. या स्पर्धेला बुधवारी (दि. १३) महाराष्ट्र पोलिस अकादमीत सुरुवात झाली.

या मेळाव्यामध्ये घातपात विरोधी तपासणी स्पर्धा, कम्प्युटर स्पर्धा, श्वान स्पर्धा, पोलिस फोटोग्राफी, पोलिस व्ह‌िडिओग्राफी, विज्ञानाची तपासास मदत अशा सहा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. वरील स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांची आगामी अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड करण्यात येते. गुरुवारी पोलिस श्वान स्पर्धेस सुरुवात झाली. यात राज्यभरातील पोलिस श्वानांनी प्रशिक्षकांसह सहभाग घेतला.

..या घेतल्या चाचण्या

प्रशिक्षकांच्या आज्ञेचे पालन करणे, गुन्ह्यांचा तपास, गुन्हेगाराचा माग काढणे, अंमली पदार्थ व स्फोटके शोधणे, मालमत्तेचे रक्षण करणे, अनोळखी व्यक्तीने दिलेल्या अन्नाचा स्वीकार न करणे इत्यादी चाचणी घेण्यात आल्या. श्वानांचे प्रशिक्षण पुणे येथील गुन्हे अन्वेषन विभागाच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात घेण्यात येते. प्रशिक्ष‌ित श्वानांची राज्यातील पोलिस घटकांना तपास कामाकरीता नियुक्ती करण्यात येते. अनके संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासात श्वान पथकांची मदत घेण्यात येते.

श्वानांचे बहुमूल्य कर्तृत्व

१९९३ साली मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपासात बहुमूल्य मदत करणाऱ्या ‘जंजीर’ या श्वानाची तसेच २६/११ च्या स्फोटामधील तपासात मदत करणाऱ्या ‘सुलतान’ या श्वानाची आठवण आजही पोलिस दलासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. या श्वानांनी हजारो किलो स्फोटकांचा छडा लावून नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत राज्यभरातील श्वान असाच प्रकारे कामगिरी करीत असून, १८ सप्टेंबर रोजी स्पर्धेचा समारोप आहे. सदर स्पर्धेमध्ये देशातील सर्व राज्यातील पोलिस दले तसेच केंद्रीय पोलिस संघटना आपले संघ पाठवून आपल्या व्यावसायिक कौशल्याचे दर्शन घडवतात.


घातपात विरोधी तपासणी

घातपात विरोधी तपासणी स्पर्धे अंतर्गत आणखी एक स्पर्धा घेण्यात आली. पोलिस अधीक्षक प्रसाद अक्कानवरू यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सुरू होती. महत्त्वाची व संवेदनशील ठिकाणे, विविध महत्त्वाच्या आस्थापना, महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीची बाह्य व अंतर्गत ठिकाणी अद्यावत उपकरणांनी तपासणी करणे आदी विषयांबाबत यावेळी परीक्षा घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, शिकूया गरबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रीत मुख्य आकर्षण असते ते गरब्याचे. पण, अनेकांना सर्वसाधारण गरबा अन् गरब्याच्या विविध स्टेप्सदेखील जमत नाहीत. अशा गरबाप्रेमींसाठी मटा कल्चर क्लबतर्फे गरबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. संजय सोनार हे बॉलिवूड स्टाइल गरबा या वर्कशॉपमध्ये शिकविणार आहेत.

येत्या सोमवारी (दि. १८), मंगळवारी (दि. १९) आणि बुधवारी (दि. २०) असे तीन दिवस शहर परिसरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत हे वर्कशॉप रंगणार आहे. ४५ नीलरत्न बंगला, विसे मळा, कॅनडा कॉर्नर या ठिकाणी सकाळी ११.३० वाजता, विश्वकर्मा गार्डन हॉल, महालक्ष्मीनगर महाराष्ट्र कॉलनी, हिरवाडीरोड पंचवटी या ठिकाणी सकाळी १० ते ११ या वेळेत, के. एन. केला हायस्कूल, करन्सी नोट प्रेसच्या समोर, जेलरोड, नाशिकरोड या ठिकाणी दुपारी ३.३० ते ४. ३० वाजेदरम्यान, तर आर. के. लॉन्स, पाथर्डी फाटा या ठिकाणी दुपारी २.३० ते ३.३० वाजेदरम्यान आयोजित वर्कशॉपमध्ये गरबोली अर्थात, बॉलिवूड स्टाइल गरबा शिकविला जाणार आहे. इच्छुकांनी आपापल्या परिसरातील मटा कल्चर क्लब आयोजित गरबा वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--

रजिस्ट्रेशनसाठी साधा संपर्क

या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असून, महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी २०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या ठिकाणी गरबोली वर्कशॉपचे रजिस्ट्रेशन होईल. अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४, ६६३७९८७ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री घेणार समृद्धीबाध‌तिांची बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

समृद्धी महामार्ग संदर्भात सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी पालकमंत्री समृद्धी महामार्गाशी संबंध‌ति सर्व अधिकारी व शेतकऱ्यांची सयुक्तंपणे नाशिकमध्ये स्वतंत्र बैठक घेणार असल्याची माहिती सभागृहनेते दिनकर पाटील यांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गासाठी काही शेतकऱ्यांनी जम‌निी दिल्या असल्या, तरी काही शेतकऱ्यांमध्ये मोबदल्यासंदर्भात संभ्रम आहेत. त्यांच्या तक्रारी

ऐकून घेतल्या जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे महापालिकेतील सभागृहनेते पाटील याच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष कचरू पाटील डुकरे, भाजपचे उपाध्यक्ष अनिल भालेराव यांच्यासोबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. महाजन यांनी समृद्धी महामार्ग संदर्भात सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे विस्तृतपणे समजून घेतले. त्यांच्या तक्रारींबाबत तात्काळ नाशिक जिल्हाधिकारी, समृद्धीचे मुख्य अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नाशिकमध्ये लवकरच समृद्धीच्या विषयातील सर्व मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी, कृती समिती, बाधित शेतकरी यांची बैठक सयुंक्तपणे पालकमंत्रांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिटको’ही व्हेंटिलेटरविना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयातदेखील नवजात अर्भकांसाठी आवश्यक असणारे एकही व्हेंटिलेटरच उपलब्ध नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत या रुग्णालयात जन्मलेल्या १२,७२६ बाळांपैकी विविध कारणांमुळे रुग्णालयात दाखल करून घ्याव्या लागलेल्या २,८४२ बाळांपैकी तब्बल २३२ बाळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या रुग्णालयात आजवर शेकडो नवजात अर्भकांचा बळी गेला असला, तरी हॉस्पिटल चालविणे हे महापालिकेचे काम नसते, अशी दर्पोक्ती या रुग्णालयाच्या प्रशासनाने केली आहे. सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचा गळा घोटणारी सरकारी व्यवस्था अजूनही किती नवजात बालकांचे जीव घेणार आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. व्हेंटिलेटर्सअभावी शेकडो नवजात अर्भकांचा हकनाक बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात उघडकीस आला. त्यामुळे नाशिकच्या सिव्हिलमधील अनागोंदी राज्यात चर्चेचा विषय ठरली. परंतु, महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयातही अशीच विदारक स्थिती आहे. गोरगरीब कुटुंबांसाठी हक्काचे रुग्णालय म्हणजे पालिकेचे बिटको रुग्णालय अशी या रुग्णालयाची पंचक्रोशीत ओळख आहे. त्यामुळे नाशिक तालुक्यासह शेजारील सिन्नर, इगतपुरी या तालुक्यांतील अतिदुर्गम भागातील रुग्णही या रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पसंती देतात. सामान्य कुटुंबांकडून डिलिव्हरीसाठी बिटको रुग्णालयालाच प्रथम पसंती मिळते. त्यामुळे या रुग्णालयात डिलिव्हरीचे रुग्ण मोठ्या संख्येने येतात.

--

एकही व्हेंटिलेटर नाही

बिटको रुग्णालयात आजमितीस एकही व्हेंटिलेटर नाही. त्यामुळे या रुग्णालयात जन्मलेल्या नवजात अर्भकांपैकी ज्या नवजात अर्भकांना व्हेंटिलेटरची गरज आहे, अशा नवजात अर्भकांच्या पालकांना या रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी संदर्भित केले जाते. मात्र, ज्या कुटुंबांची खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची ऐपत नसते अशी कुटुंबे निराश होतात. त्यापैकी गेल्या पाच वर्षांत तब्बल २३२ बाळांचा मृत्यू या रुग्णालयात झाला आहे. मृत्यू झालेल्या या नवजात अर्भकांत १३३ मुले, तर ९९ मुली होत्या. या रुग्णालयात चार वॉर्मर व चार फोटोथेरपी मशिन्स आहेत. येथून दुसऱ्या रुग्णालयात दाखल झालेल्या १६५ नवजात अर्भकांचे प्राण मात्र वाचले आहेत. या रुग्णालयात जन्मलेल्या बाळांपैकी मुलांचे जन्मप्रमाण जास्त असल्याने शहरात पीसीपीएनडीटी कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याची दाट शक्यता आहे.

--

‘आयपीएचएस’ला हरताळ

इंडियन पब्लिक हेल्थ स्टॅंडर्डच्या अटी व शर्तींनुसार रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम व सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असताना बिटको रुग्णालयात मात्र या अटी व शर्तींचे या रुग्णालयाच्या उभारणीपासून अद्यापही पालन करण्यात आलेले नाही. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांकडेही या रुग्णालयात दुर्लक्ष होत आहे. या रुग्णालयाचा दर्जा हा प्राथमिक आरोग्य केंद्राचा असल्याचे येथील प्रशासनाचे म्हणणे आहे.

--

हॉस्पिटल चालविणे महापालिकेचे काम नसते, तर शासनाचे असते. पालिका केवळ पीएचसी चालवतात. बिटको रुग्णालयाचाही दर्जा पीएचसीचाच आहे. त्यामुळे येथे व्हेंटिलेटर्स नाहीत. व्हेंटिलेटर्सची गरज असलेल्या नवजात अर्भकांना मेडिकल कॉलेजला दाखल करण्याचा सल्ला दिला जातो.

-डॉ. जयंत फुलकर, प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी, बिटको रुग्णालय

--

पाच वर्षांतील आकडेवारी..

वर्ष - अॅडमिट - मृत्यू - रेफरल - एकूण डिलिव्हरीज

पुरुष स्त्री एकूण - पुरुष स्त्री एकूण- पुरुष स्त्री एकूण

२०१३-१४ ३५८ २५२ ६१० ३८ १६ ५४ ३१ १८ ४९ ३११२

२०१४-१५ ३८२ २८५ ६६७ ३१ २६ ५७ १७ १३ ३० २६३८

२०१५-१६ ३९७ ३१३ ७१० ३५ ३२ ६७ १९ ११ ३० २८७७

२०१६-१७ ३३७ २६२ ५९९ २२ १७ ३९ २० १६ ३६ २८७७

२०१७-१८ १४३ ११३ २५६ ०७ ०८ १५ १३ ०७ २० १२२२

एकूण १६१७ १२२५ २८४२ १३३ ९९ २३२ १०० ६५ १६५ १२,७२६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंडो-वेस्टर्न थीमवर ठेका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला असून, नवरात्रीचे प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या रास दांडिया, गरब्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाई वर्कशॉप्सच्या माध्यमातून ठेका धरत सज्ज होताना दिसत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्ती, मंदिरे, मंदिरांचे आवार आदींचे रुपडे पालटत आहे. बहुतांश देवी मंदिरांतील रंगरंगोटीची कामे पूर्णत्वास आली आहेत.

गणेशोत्सवानंतर काही दिवसांतच येणाऱ्या नवरात्रोत्सवाकडे अवघ्या तरुण पिढीचे लक्ष लागते. वर्षभरातील नऊ दिवस गरबा, दांडिया खेळत देवीची आराधना करताना वातावरणात चैतन्य निर्माण झालेले असते. यंदाही हा उत्सव जल्लोषात साजरा करण्याची आतुरता शहरात दिसून येत आहे.

ढोलिडा ढोल धिमो, कुकडा तारी बोली, पंखिडा तू उडी जाये… अशा पारंपरिक गीतांबरोबरच बॉलिवूडच्या रिमिक्स गीतांसह इंडो-वेस्टर्न थीमवर थिरकण्यासाठी तरुणाई सज्ज होत आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दहा, पंधरा दिवसीय वर्कशॉपला प्रारंभ झाला असून, गरब्याच्या पारंपरिक स्टेप्सबरोबरच आधुनिक स्टेप्स उत्साहात भर टाकत आहेत. याशिवाय खरेदीचा जोरही वाढला आहे.

शहरातील मोठमोठ्या मंडळांकडून दांडिया उत्सव आयोजित केला जात असतो. अशा नावाजलेल्या ठिकाणीच जाऊन गरबा, दांडिया खेळण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे रीतसर प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी जाण्याकडे गेल्या काही वर्षांत कल वाढला आहे. चौकाचौकांमध्ये पोस्टर्सद्वारे गरबा, दांडिया वर्कशॉपची जाहिरातबाजी करण्यात येत असून, तरुणाईला प्रशिक्षणासाठी आकर्षित केले जात आहे. असे क्लासेस तरुणाईबरोबरच प्रौढांनाही आकर्षित करत असून, तेथे जाऊन शिकण्यावर भर दिला जात आहे. अनेक क्लासेस वेगवेगळ्या स्पर्धांसाठीही प्रशिक्षकांना तयार करत असल्याने एकएका स्टेप्सवर लक्षपूर्वक मार्गदर्शन केले जात आहे.

--

पारंपरिक पोशाखांची चलती

नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी त्याला साजेशी वेशभूषा केली जाते. यासाठी घागरा चोली, धोती अशा पारंपरिक कपड्यांना मागणी मिळत आहे. बाजारपेठाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोशाखांनी सजल्या असून, गुजरात, जयपूर या ठिकाणांहून ते विक्रीस आणले जात आहेत. शिवाय, गेल्या एक-दोन वर्षांपासून इंडो वेस्टर्न थीमलाही मोठी पसंती मिळत असून, जिन्स, टॉपबरोबर बांधणीची ओढणी व ऑक्साइडचे दागिने अशा मिक्स मॅच फॅशनला पसंती दिली जात आहे.

--

दागिन्यांना वाढती मागणी

नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यास जाताना वेशभूषेला साजेसे दागिने घालण्याची गरज लक्षात घेत तरुणींचा सिल्व्हर, ऑक्साइडचे दागिने खरेदीकडे कल वाढला आहे. टिका, घुमर, कमरपट्टा, पायल, बाजूबंध, साज, कवड्यांनी तयार केलेले दागिने असे विविध प्रकारचे दागिने खरेदी करण्यावर किंवा ब्यूटिपार्लरमधून भाडेतत्त्वावर मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

--

गरबा शिकण्यासाठी येणाऱ्यांची संख्या चांगली असल्याने उत्साह मोठा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे.

-प्रतीक हिंगमिरे, कोरिओग्राफर

--

मूर्ती, मंदिरे रंगरंगोटीस वेग

शहर परिसरातील देवी मंदिरांतील मूर्ती, मंदिरे, तसेच मंदिरांच्या आवाराची रंगरंगोटी पूर्णत्वास आली आहे. नाशिकचे ग्रामदैवत कालिका देवी, सांडव्यावरची देवी, नाशिकरोडची दुर्गा देवी, तसेच भगूर येथील रेणुकामाता आदी मंदिरांतील अशी कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. विविध मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरविला जात असून, अनेक ठिकाणी विविध रुपांतील देवीच्या मूर्तींचे स्टॉल्सदेखील लागले आहेत. त्याचप्रमाणे घट बसविण्यास आवश्यक असलेल्या टोपल्या तयार करण्याच्या कामानेही वेग घेतला आहे. भगूर येथील रेणुकामाता देवी मंदिरासमोरील बारवाची शिवशाही फाउंडेशन व शिवसेनेतर्फे स्वच्छता करण्यात आली. बारवेतून सुमारे दोन टन कचरा काढण्यात आला. या मोहिमेत चंद्रकांत कासार, वैभव पाळदे, धर्मेंद्र मल्ल, सुरेश आव्हाड, ऑल्विन स्वामी, युवराज कासार, पप्पू काशिद, सिराज शेख, पावन कासार, रोहित कासार आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृतसाठी भाजप-सेनेत धावपळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या (दि. १६) शेवटचा दिवस असून, अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आता कमीच आहे. त्यामुळे स्वीकृतपदावर संधी मिळण्यासाठी भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षावर दबाव वाढवला आहे. शनिवारी यासंदर्भातील नावे आयुक्तांना द्यावी लागणार असली, तरी शिवसेना व भाजपच्या स्थानिक नेत्यांनी डोकेदुखी नको म्हणून नावांची निवड पक्षश्रेष्ठींवर सोपवली आहे. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत ठाण मांडले असून, थेट प्रदेशातील नेत्यांमार्फत लॉबिंग लावले आहे.

महापालिकेच्या पाच स्वीकृत नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस आहे. पालिकेतील संख्याबळानुसार भाजपचे तीन, तर शिवसेनेचे दोन नगरसेवक नियुक्त होणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे संख्याबळ कमी असल्याने त्यांना कोटा मिळालेला नाही. त्यामुळे भाजप आणि सेनेलाच संधी असून, या दोन्ही पक्षांकडून स्वीकृत सदस्यपदावर जाण्यासाठी लॉबिंग केले जात आहे. भाजपमध्ये तीन जागांसाठी तब्बल ३८ जणांमध्ये रस्सीखेच आहे. निष्ठांवतांना संधी द्यायची की पक्षात येऊन पराभूत झालेल्यांना संधी द्यायची यावरून भाजपमध्ये गोंधळ आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने भाजपच्या नेत्यांनी ३८ जणांची यादी प्रदेश भाजपकडे पाठवली आहे. पुणे महापालिकेसारखा राडा होऊ नये म्हणून इच्छुकांच्या नावाची निवड आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री गिरीश महाजन करणार आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी आपली डोकेदुखी कमी करून घेतली आहे.

सेनेकडून नवख्यांना संधी

शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागा असून, या जागांसाठीही मोठी रस्सीखेच आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनीही नाराजी नको म्हणून मातोश्रीवर निर्णय सोपवला आहे. त्यासाठी इच्छुक १२ जणांची नावे पाठविण्यात आली आहेत. त्यातील अनेक नावे नवीन परंतु, पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांनाच सेनेकडून न्याय दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडीकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सिंगची इमारत महिनाभरात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील सामान्य रुग्णालयानजीक उभारण्यात येत असलेल्या मालेगाव नर्सिग महाविद्यालयाची ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत येत्या १५ दिवसात नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्या इमारतीत विद्यार्थ्यांची राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन भुसे यांनी दिले.

येथील मालेगाव नर्सिंग महाविद्यालयास सन २०१७-१८ साठी महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई यांनी मान्यता दिल्यानंतर या महाविद्यालयासाठी एक ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. सद्यस्थितीत याठिकाणी ३० विद्यार्थी शिक्षण घेत असून, नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्यांची तात्पुरत्या स्वरुपात सामान्य रुग्णालयात राहण्याची व्यवस्था केली आहे. येत्या १५ दिवसात नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्या इमारतीत त्यांना राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन भुसे यांनी दिले. चालू शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून २८ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवून नाशिकच्या मेरिटप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. सद्यस्थितीत या महाविद्यालयात ३० विद्यार्थी शिक्षण घेत असून ४ शिक्षक व प्राचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

महिला रुग्णालयाचे काम जानेवारीत मार्गी

सटाणा रोडवरील स्वंतत्र महिला रुग्णालयाविषयी माहिती देतांना भुसे म्हणाले की, गेल्या बऱ्याच वर्षांपासून ही इमारत पडून असल्याने दुरुस्तीसाठी व इतर कामकाजासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच जानेवारीपर्यंत सदर रुग्णालयाचे काम मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन भुसे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीड तासात सहा चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात सक्रिय झालेल्या चोरट्यांनी गुरूवारी सकाळी शहरात धुमाकूळ घालत तब्बल सहा ठिकाणी स्नॅचिंग केली. अवघ्या दीड ते पाऊणे दोन तासात गंगापूररोड, द्वारका आणि पंचवटी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष्य करण्यात आले. यात सुमारे आठ तोळे वजनाचे सोने चोरीस गेले. विशेष म्हणजे चोरट्यांनी एका ठिकाणी हेल्मेट घालून चेन स्नॅचिंग केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.

सहापैकी चार घटना गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तर उर्वरित दोन घटना भद्रकाली आणि पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडल्या. पंचवटीतील घटनेबाबत सायंकाळपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. सकाळी पाऊणेसात वाजेपासून साडेआठ वाजेपर्यंत कॉलेजरोडवरील बिग बाजार चौक ते गंगापूररोडवरील मर्चंट बँकेदरम्यान काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी तब्बल चार महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन ओरबोडून नेले. या प्रकरणी चंदा पुखराज जैन (५९, रा. पंपिंग स्टेशन, गंगापूररोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित तीन महिलांना यात साक्षिदार म्हणून नोंदवण्यात आले. जैन यांच्या फिर्यादीनुसार, गुरूवारी सकाळी फिरण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या होत्या. घरापासून थोडे दूर गेल्यानंतर काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे आणि ३६ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबोडून नेले. या गुन्ह्याबाबत आरडाओरड सुरू असतानाच चोरट्यांनी थोड्याच अंतरावर मालती रामचंद्र कुलदेवरे यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे आणि ३६ हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडले. दोन गुन्ह्यानंतरही चोरट्यांनी याच परिसरात पायी फिरणाऱ्या उषा हरिभाऊ थेटे यांना लक्ष्य केले. त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे आणि ३६ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी तोडून धूम ठोकली. दरम्यान, चेन स्नॅचिंगची तिसरी घटना घडल्यानंतर पोलिसही सावध झाले. काही ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. मात्र, त्याचा परिणाम झाला नाही. चोरट्यांनी याच परिसरात पुष्पा श्रीकृष्ण कुलकर्णी यांच्या गळ्यातील २० हजार रुपयांचे आणि १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तोडून धूम ठोकली. सर्व महिला ५५ ते ६० वयोगटातील आहे. यामुळे गंगापूरसह कॉलेजरोड परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, चेन स्नॅचर्सने तपोवनरोड आणि पंचवटी परिसरातही हात साफ केला. तपोवनरोडवरील जैन स्थानकाजवळ सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास स्नॅचिंगचा प्रकार घडला. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या शंकुतला आर. पाटील (५३, गणेशनगर, काठेगल्ली) या देवपूजेसाठी फुले तोडत असताना हा प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांचे आणि पावणे दोन तोळा वजनाचे मंगळसूत्र तोडून धूम ठोकली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीतील टकलेनगर येथेही चेन स्नॅचिंग झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र सायंकाळपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नव्हता.

नाकाबंदीचा फायदा नाही

एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांनंतर पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह सहायक आयुक्त, सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी लावली. चोरटे आले त्या मार्गी लंपास झाले. या गुन्ह्यांमध्ये स्थानिक गुन्हेगारांसह महिलांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवली जाते.


चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये बाहेरच्या काही सराईत गुन्हेगारांचा हात असावा. एकाच वेळी झालेल्या या घटनांची पोलिसांनी गंभीर नोंद घेतली असून, त्याचा सर्वांगाने तपास करून संशयितांना जेरबंद करण्यात येईल. अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथक तैनात असून, दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आंबिवली येथे जाऊन शोध घेतला.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरोग्य’तर्फे फेलोशिपसाठी प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षातील फेलोशिप अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. राज्यभरातील विविध संलग्नित मेडिकल कॉलेजेसमध्ये याअंतर्गत उमेदवारांना प्रवेश घेता येईल. त्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

याबाबत कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, की आरोग्य विद्यापीठातर्फे राज्यातील आरोग्य शिक्षण देणाऱ्या कॉलेजेससमवेत विविध विषयांतील तज्ज्ञांची उपलब्धता आणि उत्तम दर्जाची रुग्णसेवा व मूलभूत सुविधा असणाऱ्या रुग्णालयांना फेलोशिपचे अभ्यास केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या फेलोशिप अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेल्या डॉक्टरांना अधिक कौशल्याधिष्ठित ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळावी, असा आहे. या अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट सिस्टिम पद्धती आहे. एकूण २०० क्रेडिट मिळविणारा विद्यार्थी अंतिम परीक्षेसाठी पात्र ठरणार आहे.

--

९४ अभ्याक्रमांसाठी ६७५ प्रवेशक्षमता

वैद्यकीय शाखेच्या ९४ फेलोशिप अभ्यासक्रमांसाठी ६७५ प्रवेशक्षमता आहे. दंत विद्याशाखेच्या १७ फेलोशिप अभ्यासक्रमासाठी १८५, आयुर्वेद विद्याशाखेच्या ८ फेलोशिप अभ्यासक्रमासाठी २२५, नर्सिंग विद्याशाखेच्या एका फेलोशिप अभ्यासक्रमासाठी ६, फिजिओथेरपी विद्याशाखेतील एका फेलोशिप अभ्यासक्रमासाठी ५ आणि ऑक्युपेशनल थेरपी विद्याशाखेच्या एका फेलोशिप अभ्यासक्रमासाठी ५ याप्रमाणे प्रवेशक्षमता असल्याची माहिती प्रतिकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांनी दिली.

--

फेलोशिपसाठी ११७ अभ्यास केंद्रे

विद्यापीठाच्या फेलोशिप अभ्यासक्रमासाठी राज्यभरात ११७ अभ्यास केंद्रे आहेत. त्यामध्ये वैद्यकीय विद्याशाखेची ९२ अभ्यास केंद्रे आहेत. दंत विद्याशाखेची ९ अभ्यास केंद्रे, आयुर्वेद विद्याशाखेची १३ अभ्यास केंद्रे, तर नर्सिंग, फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी विद्याशाखेकरिता प्रत्येकी एक अभ्यास केंद्र आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम त्यांची नावनोंदणी करावी लागणार आहे. या अर्जासाठी एकूण सहा टप्पे आहेत. फेलोशिप अभ्यासक्रमांबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

--

२०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षासाठी १२२ विषयांच्या फेलोशिप कोर्सेसला विद्यापीठाने मान्यता दिली आहे. पदव्युत्तर शिक्षणानंतर अत्याधुनिक ज्ञान संकलनासाठी फेलोशिप अभ्यासक्रम गरजेचे आहेत. विशिष्ट विषयातील सखोल ज्ञान मिळविण्यासाठी परदेशातील शिक्षणास पर्याय नव्हता. आता विद्यापीठाच्या १२२ फेलोशिपमुळे ११०१ विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

-डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या लपंडावाने संताप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी नाशिकमध्ये येऊन सर्वांना चोवीस तास वीज देण्याचे आश्वासन देऊन २४ तास उलटत नाहीत तोच वीज वितरण कंपनीकडून इंदिरानगरवासीयांची परीक्षा पाहिली जात आहे. इंदिरानगर भागासह राजीवनगर भागात वारंवार होणारा विजेचा लंपडाव गुरुवारीही सुरूच राहिला. इंदिरानगर भागात तर दुपारी सुमारे चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्‍त केला.

इंदिरानगर भागात विजेचा लंपडाव हा नित्याचाच प्रकार झाला आहे. दररोज इंदिरानगर भागातील वीजपुरवठा कोणत्या ना कोणत्या कारणाने खंडित केला जाताना दिसतो. शहरात बुधवारीच ऊर्जा मंत्र्यांचा दौरा झाला असूनही यावर काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. इंदिरानगर भागात सलग दोन दिवसांपासून दुपारी चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता दररोज नवनवीन कामे सुरू असल्याचे सांगून नागरिकांची बोळवण केली जात अाहे. पाऊस आल्यानंतर तर विजेचा पुरवठा खंडित होणे हा अलिखित नियमच झालेला असून, केवळ पावसाळी वातावरण झाले तरी वीजपुरवठा बंद होत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असून, त्यातच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिाकंची लाहीलाही होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रस्त झालेले नागरिक वीज वितरण कंपनीकडे विचारणा करतात. मात्र, काही तरी कारण सांगून एक तासात लाइट येईल, असे सांगितले जाते. सर्वत्र भारनियमन बंद असताना केवळ इंदिरानगर भागातच भारनियमन करण्याचे काय कारण, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रश्नाकडे सध्या एकाही राजकीय पक्षाचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्‍त केले जात आहे. इंदिरानगर भागातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

--

राजीवनगरवासीयांनाही झळ

राजीवनगर भागातही आता अशीच परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. राजीवनगर भागात पाच-पाच मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांची विद्युत उपकरणेसुद्धा खराब झाली आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

---

केवळ येथेच भारनियमन कसे?

इंदिरानगर भागात लोडशेडिंग जाहीर करण्यात आले असून, याबाबतची माहिती नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी नगारिकांना दिली आहे. मात्र, सध्या कोठेही भारनियमन नसताना केवळ इंदिरानगरवासीयांवरच हा अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सोमवार ते बुधवारदरम्यान सकाळी ६ ते ८.३०, तर दुपारी २ ते ४, तर गुरुवार ते रविवारदरम्यान सकाळी ८.३० ते १०.४५ व दुपारी ४ ते ६.३० अशा पद्धतीने हे भारनियम जाहीर करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या पाच अधिकाऱ्यांना नोटीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महावितरण कंपनीच्या कारभाराचा गुरूवारी (दि. १४) झालेल्या जनता दरबारात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर जनतेकडून तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. त्यामुळे कामचुकार भ्रष्ट अधिकाऱ्यांचा जनता दरबारात घाम थांबेना झाला होता. महावितरण कंपनीचे बहुतेक अधिकारी सरकारी पैशांवर डल्ला मारतात. तर कुटुंबासह कंपनीच्या वाहनावर भटकंतीला जातात, असे गैरप्रकार जिल्ह्यातील अधिकारी करीत असल्याचा आरोपही जनतेकडून मंत्री बावनकुळे यांच्याकडे करण्यात आले. त्याची तत्काळ दखल घेत ऊर्जामंत्र्यांनी धुळे जिल्ह्यातील पाच अधिकाऱ्यांना तडकाफडकी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यभरात जनतेशी संवाद सादर असून, धुळ्यात गुरूवारी (दि. १४) शाहू नाट्यमंदिरात जनता दरबार घेण्यात आला. त्यावेळी जनतेने मंत्री बावनकुळे यांच्याशी थेट संवाद साधत आपल्या तक्रारी खुलेपणाने सांगितल्या. त्यामध्ये शहरातील साक्रीरोडलगत असलेल्या पावर हाऊसमध्ये अधिकारी व कर्मचारी एसी, पंखे, विद्युत दिवे अहोरात्र सुरूच ठेवतात. महावितरणचे काही अधिकारी अॅट्रॉसिटीची धमकी दाखवितात, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मुकूंद कोळवले यांनी यावेळी केला.

नवीन मीटर देणे, विद्युत पुरवठा बंद झाल्यावर त्वरित सुरू करणे, धोकादायक वीजतारांना ताण देणे यासह अन्य कामांना कर्मचारी हेतूपुरस्कर उशीर करतात. शहरालगत असलेल्या वलवाडी परिसरात तर रात्रंदिवस रस्त्यावरील पथदिवे सुरूच असतात मग विजेची बचत होते का, अशा तक्रारी नागरिकांकडून ऊर्जामंत्र्यांना करण्यात आल्या. मंत्री बावनकुळे यांनी यावर जे अधिकारी व कर्मचारी कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासनही यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांची मानसिक चाचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सात वर्षाच्या मुलाची हत्या झाल्यानंतर शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा मुद्दा समोर आला आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांना हानी पोहोचवल्याची उदाहरणे गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात समोर आल्याने आता शिक्षक, शिक्षकेतरांची मानसिक चाचणी करण्याचा फतवा ‘सीबीएसई’ने काढला आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत सर्व शिक्षक, शिक्षकेतरांच्या चाचण्या पूर्ण व्हाव्यात, असा निर्देशही या बोर्डाकडून देण्यात आला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याचा दिवसातील मोठा कालावधी शाळेत व्यतित होत असतो. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशीही त्याचा सातत्याने संपर्क होत असतो. मात्र, या वर्गाकडूनच त्यांना इजा पोहोचणार असेल तर विद्यार्थी सुरक्षेचे काय, हा मुद्दा आता चिंतेचा ठरत आहे. सुप्रीम कोर्टानेही या विषयाच्या सुनावणीत विद्यार्थी सुरक्षा विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यातील गांभीर्य लक्षात घेता ‘सीबीएसई’ संलग्न सर्व शाळांमध्ये हा निर्णय लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षक, शिक्षकेतर, कंडक्टर, स्वीपर्स, वाहनचालक अशा सर्वांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.

हे नियमही पाळा
शिक्षकांच्या मानसिक चाचणीसह शाळेचा सर्पोटिंग स्टाफ हा नामांकित संस्थांमधील असणे आवश्यक असून त्यांच्या योग्य कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. शाळेच्या आवारात सुस्थितीत सीसीटीव्हीची कॅमेरे असणे, विद्यार्थी सुरक्षित राहावे यासाठी शाळेच्या स्टाफला प्रशिक्षण देण्यात यावे अशा वेगवेगळ्या सूचनाही ‘सीबीएसई’कडून शाळांना देण्यात आल्या आहेत.


शिक्षक, शिक्षकेतरांची मानसिक चाचणी घेण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. यामुळे त्यांच्या अंतर्मनात काय चालले आहे, त्यांची विद्यार्थ्यांप्रती मानसिकता काय आहे, परिस्थितीनुसार त्याच्या वागण्यात काय बदल होतात, हे जाणून घेणे सोपे होईल.
- सचिन जोशी, सचिव, असोसिएशन ऑफ नाशिक स्कूल

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मानसिकरित्या सक्षम आहेत की नाही हे पाहण्यासाठी हा निर्णय अतिशय चांगला आहे. इंग्लिश मीडियममधील अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर कार्यरत असतात. त्यामुळे ते तितक्या गांभीर्याने विद्यार्थ्यांकडे पाहत नाही. यासारखे अनेक मुद्दे या शिक्षकांना अस्वस्थ करतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर राग व्यक्त करण्यापर्यंत होतो. अशा चाचण्यांमधून त्यांची मानसिकता समजून ते शिक्षकी पेशासाठी पात्र आहेत की नाही हेदेखील ठरेल.
- विलास पाटील, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याच्या उत्पन्नात ५० कोटींची भर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जीएसटी करपद्धतीने राज्याला ५० कोटी रुपये जास्त मिळाले असून ते अपेक्षेपेक्षा जास्त आहे. त्यात व्हॅटचाही समावेश आहे. आम्हाला केंद्र सरकारकडून १५ हजार कोटी रुपये घ्यावे लागेल असे वाटत होते. पण त्यातून दिलासा मिळाला आहे. अजूही आयात वस्तूचा कर बाकी आहे पण रिफंडमध्ये तो जाईल. महाराष्ट्र जीएसटीचे टार्गेट पूर्ण करेल अशी माहिती राज्याचे अर्थ राज्यमंत्री डॉ. दीपक केसरकर यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चर व पूना मर्चंट्स चेंबर यांनी आयोजित जीएसटी राज्यपरिषदेसाठी ते नाशिकला आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की जीसटीबद्दल व्यापाऱ्यांचा गैरसमज जास्त आहे. अन्नधान्यावर कर नाही पण ब्रॅण्डेडवर आहे.पूर्वी त्यावर व्हॅट होताच. दोन दिवसापूर्वी झालेल्या हैदराबाद येथे झालेल्या परिषदेत ४० वस्तूवर कमी केले आहे. त्यात मोटारीपासून चिंचेचा सुद्धा समावेश आहे. ७५ लाखापर्यंत जीएसटी नाही पण त्याची मर्यादा वाढावी व ती एक कोटी असावी अशी आम्ही अगोदरच मागणी केली आहे. जीएसटीमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. हा कर शेतकऱ्यांना अनुकूल आहे. यातील त्रुटी दूर करून अधिकची शिबिर व परिपत्रक काढून त्याची पद्धती सोपी केली जाईल. त्यासाठी सहा महिन्याचा कालावधी जावा लागेल. नंतर प्रत्यक्ष कर कमी होईल. रिफंड सिस्टीमध्ये आलो की सर्व सुरळीत होईल, असेही ते म्हणाले.

खरेदीवर एलबीटी नाहीच
मुद्राक कार्यालय मालमत्ता खरेदी-विक्रीवर महापालिका क्षेत्रात एक टक्का एलबीटी घेत असलेल्या प्रश्नावर केसरकर यांनी एलबीटी रद्द झाला असल्याचे सांगून तो कोणीही वसूल करू नये असे सांगितले. त्यासाठी राज्य पैसे देते. त्याबाबत मी चौकशी करेल व योग्य ती कारवाई करेल असा इशाराही त्यांनी दिला.

मी मुळचा व्यापारीच
परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. दीपक केसकर म्हणाले, की मी राजकारणी असलो तरी मुळचा व्यापारी आहे. छोट-छोटे मुद्दे आहे. व्हॅटमध्ये सुद्धा ते होतेच. काही परिपत्रका काढायचे बाकी आहे. ७५ लाखाची मर्यादाही वाढवली जाण्यासाठी प्रयत्न करू. अनेक गोष्टीबद्दल जीएसटी कौन्सिलकडे मांडून त्यात सुधारण केल्या जात आहे. सुरुवातीला सहा महिने रिझल्ट मिळणार नाही. एलबीटी रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांनी घाई केली. त्यासाठी आंदोलन केले त्यामुळे तो अगोदर रद्द करावा लागला. त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले. केंद्राकडून भरपाई मिळाली नाही. त्यामुळे जीएसटी बाबत व्यापाऱ्यांनी श्रद्धा व सबुरी ठेवावी. त्यासाठी थोडा धीर धरावा लागेल. काही काळ वाट बघू. महाराष्ट्र सर्वांच्या प्रयत्नामुळे मोठा झाला आहे.

तर त्यांना दारे कायमची बंद होतील
पैशाच्या जोरावर राजकारण करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आता तर कोर्टाकडे कोणत्या नेत्याकडे किती संपत्ती जास्त वाढली याची यादी आली आहे. त्यातून पैसे कुठून आले याचा हिशोब द्यावा लागणार असल्याचे सांगत अर्थ राज्यमंत्री डॉ. दीपक केसरकर यांनी राणेच्या भाजप प्रवेशाबाबत चिमटा घेतला. राणे आपल्या भागातले असून त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी राणे हा विषय महाराष्ट्राच्या दृष्टीने फार मोठा विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॉलेरन्स टू झिरो करप्शन ही घोषणा केली आहे. त्यामुळे अशा नेत्यांना भाजपने प्रवेश देतांना मोदीच्या घोषणेची अमंलबजावणी करावी. अशी अमंलबजावणी भाजपने केली तर अशा नेत्यांची दारे कायम बंद होतील, असा टोला त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमनाने मालेगावकर त्रस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात सध्या भारनियमन सुरू असून, संध्याकाळी व रात्री वीजपुरावठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महावितरणकडून करण्यात येणारे सायंकाळ व रात्रीचे भारनियमन त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही मालेगावकर संघटनेने दिला आहे.

शहरात सुरू असलेल्या भारनियामनाबाबत आम्ही मालेगावकर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता संजय आढे यांची भेट घेवून निवेदन दिले. यात सर्वत्र भारनियमनाची वेळ सायंकाळी व रात्रीची आहे. तर काही भागात सकाळी देखील वीज नसते. या भारानियामानाच्या वेळेत महापालिकेचा पाणी पुरवठा होत असल्याने अनेक भागात महिला वर्गास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अंधाराचा फायदा घेत चोरट्यांचा सुळसुळाट वाढण्याची भीती देखील व्यक्त होत आहे. आगामी काळात नवरात्र, दसरा, मोहरम व दिवाळी सारखे सण उत्सव असल्याने शहरातील बाजारपेठेत सायंकाळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने भारानियामानामुळे अंधराचा सामना करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ वृक्षांवर कुऱ्हाड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

सिव्ह‌लि हॉस्प‌टिलच्या आवारात माता व बालसंगोपन केंद्राच्या नवीन इमारतीस अडथळा ठरणारे ३० वृक्ष हटविण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने गुरुवारी परवानगी दिली. येथील तीस वृक्षांपैकी २७ वृक्षांचे पुनर्रोपण तर तीन वृक्ष तोडली जाणार असून, त्याबदल्यात सिव्ह‌लि हॉस्पीटलला प्रतीवृक्ष दहा याप्रमाणे तीनशे वृक्ष नवीन लावावे लागणार आहे. वृक्ष प्राध‌किरण समितीने परवानगी दिली असली तरी, हॉस्प‌टिल प्रशासनाला हायकोर्टात प्रमाणपत्र सादर करून अंतिम परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच इमारतीचे काम सुरू करता येणार आहे.

महापालिकेच्या वृक्ष व प्राधिकरण समितीची बैठक आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समितीवर नव्याने नियुक्त झालेल्या सदस्यांनी त्यात सहभाग घेतला. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, चंद्रकांत खाडे, ऋची कुंभारकर, नगरसेवक श्‍यामकुमार साबळे, शेखर गायकवाड, संदीप भवर, मनोज घोडके,योगेश निसाळ यांच्यासह तज्ञ समिती सदस्य उपस्थित होते. सिव्ह‌लि हॉस्पीटलमध्ये इन्क्‍युबेटरची संख्या कमी असल्याने पाच महिन्यांत १८७ बालकांना जीव गमवावा लागला आहे. हॉस्प‌टिलच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बालसंगोपन केंद्राची (एनसीएच विंग) इमारत मंजूर झाली आहे. त्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी पडून आहे. महापालिकेने येथील ३० वृक्ष तोडण्यास परवानगी न दिल्याने विस्तार होवू शकला नाही, असे कारण देत महापालिकेवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न सिव्ह‌लि प्रशासनाकडून केला जात होता. परंतु पालिकेने हा आरोप फेटाळला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा लिलाव बंद; शेतकरी संतप्त

$
0
0

टीम मटा

प्राप्तीकर विभागाने लासलगाव, चांदवड, सटाणा, येवला, पिंपळगाव, कळवण, उमराणे छापे टाकल्यामुळे शुक्रवारी कांदा लिलावावर त्याचा परिणाम झाला. या कारवाईचा निषेध करीत अनेक ठिकाणी रास्ता रोको करून ल‌लिाव बंद पाडण्यात आले. तसेच येत्या दोन ते दिवस जिल्ह्यातील कांदा ल‌लिाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर लिलाव बंद राहणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

लासलगावात

आज लिलाव बंद

निफाड ः प्राप्तीकर विभागाच्या या धाडसत्रमुळे सकाळच्या सत्रात येथील बाजार समिती कांद्याचे लिलाव सुरू न झाल्याने शेतक-यांमध्ये संभ्रमावस्‍था निर्माण झाली होती. बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर सचिव बी. वय. होळकर यांनी

कांदा खरेदीदारांशी चर्चा करून लिलाव सुरू करण्याची विनंती केली. त्यानंतर कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बैठक झाल्यानंतर मार्केटच्या आवारावर विक्रीसाठी आलेल्या कांद्याचा दुपारी लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र व्यापाऱ्यांकडे असलेला कांद्याचा निकास करण्यासाठी शुक्रवारी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

२०१३ मध्येही

पडला होता छापा

लासलगाव परिसरातल्या मुख्य व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. हे व्यापारी आधीपासूनच आयकर विभागाच्या रडारवर होते. यापूर्वी २०१३ अशीच कांद्याचे भाव वाढल्याने लासलगाव येथील व्यापाऱ्यांवर छापे मारण्यात आले होते.

शेतकरी परतले माघारी

लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव दुपारी तीन वाजता सुरू करण्यात आले. कांद्याचे बाजारभाव बुधवारच्या तुलनेत ३०० ते ३५० रुपयांनी कमी पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पडले. या दरम्यान बाजार समिती प्रशासन शेतकरी व व्यापारी यांच्यात समजोता सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास पाऊस चालल्याने कांद्याचे ट्रॅक्‍्टर घेऊन आलेले शेतकरी परतले. गुरुवारी बाजार समिती आवारात एकूण ४२४ ट्रॅकटर आले होते. त्यापैकी फक्त १९ ट्रॅक्टरमधील

कांद्याचा लिलाव झाला. ४०५ ट्रॅक्टर परत गेले.

सटाण्यातही लिलाव बंद

प्राप्तीकर विभागाच्या धाडसत्रामुळे बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दुपारी १ वाजेनंतर बाजार समिती मधील कांदा लिलाव बंद करण्यात आल्याने शेतकरी वर्गात नाराजी सूर उमटला होता. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आज सुमारे ६०० हून अधिक ट्रॅक्टरची आवक कांदा व्रिकीसाठी दाखल झाली होती.

देवळ्यात चर्चेला उधाण

कळवण ः कळवण येथील एका व्यापाऱ्याकडे छापे पडल्याची वृत्त सोशल मीडियावरून पसरल्याने दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात मात्र असे काहीही घडले नसल्याचे बाजार समितीचे व्यापारी गटाचे संचालक हेमंत बोरसे यांनी सांगितले. महसूल यंत्रणेकडून संबंधित कांदा व्यापाऱ्यांना कांदा तत्काळ पुढे पाठवण्यात यावा म्हणून तगादा लावला आहे. मात्र घेतलेला माल त्याच दिवशी निर्यात करणे अशक्य ठरत असल्याने व आलेल्या आवकसाठी जागा उपलब्ध नसल्याने देवळा तालुक्यातील देवळा व उमराणा बाजार समितीतील लिलाव १५ ते २२ सप्टेंबर दरम्यान बंद राहणार आहेत.

येवल्यात दोन दिवस बंद

येवला ः येवला बाजार समितीमधील रामेश्वर लालचंद आट्टल यांच्या खळे आणि घरातील छाप्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली. यामुळे येवला समितीत सकाळी लिलाव होऊ शकले नव्हते. मात्र दुपारी व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेतल्याने कांदा लिलाव सुरळीत झाले. येते दोन दिवस लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे.

उमराण्यात आठवडाभर लिलाव बंद

मालेगाव ः तालुक्यातील उमराणे बाजार समितीतील कारवाईमुळे कांदा व्यापारी, शेतकरी यांच्यात एकाच खळबळ उडाली. गुरुवारी नेहमीप्रमाणे उमराणे बाजार समितीतच्या आवारात सकाळी १० वाजता कांदा लिलावाला सुरुवात झाली. गेल्या आठवड्याभरापासून कांद्याचे भाव सरासरी २०० रुपयांनी खाली आले आहेत. सकाळच्या सत्रात कांदा लिलावात सरासरी एक हजार १५० इतका भाव मिळाला. मात्र आयकर विभागाचा छापा पडल्याचे वृत्त येताच दुपारी लिलाव बंद करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी चार वाजता लिलाव पुन्हा सुरू करण्यात आला. तसेच १५ ते २२ सप्टेबर दरम्यान कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारसह दोन दुचाकींची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इनोव्हा कारसह दोन पल्सर दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी पोलिसांकड चोरट्यांनी पळवून नेल्याप्रकरणी पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
अवेस जिलानी कोकणी (रा. भाभानगर) यांची इनोव्हा कार (एमएच ०४ एफएफ ७०७२) एका ओळखीच्या व्यक्तीने लंपास केली. रविवारी सकाळी सारडा सर्कल येथील एक्सप्रेस टॉवर भागात हा प्रकार घडला. एका दिवसासाठी वाहन घेऊन गेलेला व्यक्ती पुन्हा परत आलाच नाही. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
रवींद्र प्रकाश महाजन (रा. साळुंखेनगर, गोदावरी पार्क मागे) हे मंगळवारी दुपारी कार्यक्रमासाठी सोमेश्वर परिसरातील पाटील लॉन्स येथे गेले होते. लॉन्स परिसरात पार्क केलेली त्यांची पल्सर (एमएच १९ एव्ही ०३११) चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत. दरम्यान, सिडकोतील किरण रमेश दराडे (रा. श्रीरामनगर, पवननगर) यांचीही दुचाकी चोरी झाली. दराडे हे नातेवाईक रुग्णास भेटण्यासाठी काकतकर हॉस्पिटल येथे गेले होते. हॉस्पिटल परिसरात पार्क केलेली त्यांची पल्सर (एमएच १५ डीव्ही ६६८६) चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार राठोड करीत आहेत.

सिडकोत भरदिवसा घरफोडी
सिडकोतील उत्तमनगर भागात भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी रोकड आणि दागिने सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अविनाश दत्तात्रेय मोरे (रा. कृष्णा अपा. गणेश कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सकाळी मोरे कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर पडले. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे मंगळसूत्र असा सुमारे २२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार मल्ले करीत आहेत.

रिक्षाचालकाचा अपघातात मृत्यू
नाशिकरोड : उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाचालकाचा अपघातात मृत्यू झाला. सतीश रघुनाथ जाधव (४०, मराठा कॉलनी, चेहेडी फाटा, नाशिकरोड) असे त्याचे नाव आहे. सतीश जाधव हे बुधवारी (दि. १३) रात्री आपल्या रिक्षाने (एमएच १५ झेड ७६३५) तपोवन मार्गाकडून नाशिकरोडकडे येत होता. रिक्षा वेगात होती. रात्री रात्रीची वेळ असल्याने त्यांना अंदाज आला नसावा. त्यामुळे तो एका झाडावर जाऊन आदळल्याने गंभीर जखमी झाले. त्यांचा मृत्यू झाला. उपनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला द्राक्ष उत्पादकांचा रविवारी सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
द्राक्ष विज्ञान मंडळाच्या निवड समितीने राज्यस्तरीय महिला द्राक्ष उत्पादक गौरव पुरस्कारासाठी १६ महिलांची निवड करण्यात आली आहे. नांदूर नाका येथील शेवंता लॉन्स येथे रविवारी (दि. १७) दुपारी बारा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नीलिमा पवार असणार आहेत. यावेळी आमदार सीमा हिरे यांची प्रमुख उपस्थिती असेल. महाराष्ट्रात द्राक्ष शेतीत प्रतिकूल परिस्थिती असतानाही अनेक महिला आपल्या कष्टातून व कल्पकतेतून अभिनव प्रयोग करून द्राक्षशेतीला रोजगाराचा नवा पर्याय म्हणून पाहत आहे. अशा महिला अनेक आव्हानांना सामोरे जाताना आणि तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्षशेतीला अधिक समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. अशा महिलांचा खऱ्या अर्थाने गौरव व्हावा आणि त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेतली जावी या हेतूने द्राक्ष विज्ञान मंडळ या संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमांतर्गत द्राक्ष शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव व्हावा व महिलावर्गास प्रेरणा मिळावी या हेतूने राज्यस्तरीय महिला द्राक्ष उत्पादक गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार वाटपाचे यंदा दुसरे वर्ष असून विविध जिल्ह्यातील १६ महिला द्राक्ष उत्पादकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाप्रसंगी गुजरात येथील ऑरगॅनिक मल्टीस्टेट को-ऑप संस्थेचे चेअरमन डॉ. कांजीभाई कलावाडिया, प्रयोगशील द्राक्ष शेतकरी मारोतराव चव्हाण (सांगली) आणि द्राक्ष शेती तज्ज्ञ नरेंद्र पाटील पिलीवकर हे उपस्थित द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन द्राक्ष विज्ञान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

यांचा होणार सन्मान
विद्या पगार, जयश्री पिंगळे, सुरेखा ढुमणे, सुरेखा पाटील, कल्पना नाठे, विद्या रकिबे, रुपाली गायकवाड, मंगला राजोळे, कमल रिकामे (सर्व नाशिक), शीतल झगडे, सुजाता गायकवाड, रेश्मा वाईकर (सर्व पुणे), सुजाता देशमुख, छाया बावके (सर्व अहमदनगर), चंद्रकला चव्हाण (जालना), मनीषा काळे (सोलापूर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीसाठी गेला; दुकानातच फसला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुख्य रस्त्यावरील बापू बंगला चौकातील स्टेशनरीचे दुकान चोरट्यांनी फोडल्याचा प्रयत्न केला. या चोरीतील एक जण दुकानातच अडकला तर त्याचा सहकारी फरार झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बापू बंगला परिसरात श्री विद्यालक्ष्मी स्टेशनर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात बुधवारी (दि. १३) रात्री चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र, यातील एक चोर या दुकानातच अडकला. त्याला बाहेर येताच आले नाही. सकाळी नागरिकांची वर्दळ सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. नागरिकांनी तातडीने दुकानमालकासह पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना दुकानात एक जण असल्याचे आढळून आले. दुकानातील सुमारे तीन हजार रुपयांचा माल लंपास झाल्याचे समजते.

पोलिसांचा दरारा घटला

इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डी या मुख्य रस्त्यावर चौकातील दुकान फोडण्यात येत असतानाही पोलिस कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे दिसून आले आहे. इंदिरानगर परिसरात पोलिसांचा दरारा कमी झाल्याने अशा पद्धतीने सर्रासपणे चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे मानले जात आहे. रात्री-अपरात्री पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घातली जात नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. इंदिरानगरमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images