Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘एव्हरेस्ट बेस’वर चिमुकल्यांची स्वारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हल्लीच्या युगात लहान मुले मोबाइल, कॉम्प्युटरसमोर बसलेली असल्याचे दिसून येते. मात्र, काही पालकांच्या जागरूकतेमुळे लहान वयातच मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात ट्रेकिंग करण्याची आवड निर्माण होत असल्याचीही उदाहरणे आहेत. नाशिकमधील साडेसहा वर्षांचा श्रीरंग व नऊ वर्षांची अयाना माने हे दोन चिमुकले त्यापैकीच असून, त्यांनी जगप्रसिद्ध एव्हरेस्ट बेस कॅम्प हा अत्यंत खडतर मानला जाणारा ट्रेक पूर्ण केला.

गेल्या महिन्यात पंचवीस भारतीय ट्रेकर्स या ट्रेकसाठी काठमांडू येथे गेले होते. मुंबई, नागपूर, बेंगळूरू, हैदराबाद, म्हैसूर अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून काही अनुभवी, तर काही नवखे ट्रेकर्स या ट्रेकमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये नाशिकमधील युरो किड्स इंटरनॅशनल प्री-स्कूलच्या मुख्याध्यापिका सुचित्रा माने, विश्वनाथ माने व त्यांची मुले श्रीरंग व अयाना सहभागी झाले होते. माने दाम्पत्य नियमित ट्रेकिंग करतात. यावेळी आपल्या मुलांनीही ट्रेकिंगमध्ये सहभाग घ्यावा, या भूमिकेतून त्यांनी मुलांना प्रोत्साहन दिले. एव्हरेस्ट बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून १७ हजार ५९८ फूट (५ हजार ३६४ मीटर) उंचीवर आहे. दहा वर्षांखालील अतिशय मोजक्या मुलांनी ही ट्रेक पूर्ण केल्याचे माने दाम्पत्याने सांगितले.

हा सोळा दिवसांचा ट्रेक आहे. रोज किमान सहा ते सात तास चालावे लागते. जसजसे आपण समुद्र सपाटीपासून उंच जातो तसतसे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे श्वसनाचा त्रास, डोकेदुखी, मळमळ यांसारखा त्रास होताे. या सगळ्यावर मात करून या दोन चिमुकल्यांनी हा ट्रेक पूर्ण केला आहे. त्यांच्याबरोबर नागपूरची बारावर्षीय तानिया पटवर्धन व तेरावर्षीय रिया सोलंकी यांनीही हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला.

--

मुलांमध्ये कमालीची क्षमता असते. पालकांनी ती ओळखण्याची गरज असते. त्यांना योग्य ती संधी उपलब्ध करून दिल्यास मुले उल्लेखनीय कामगिरी करू शकतात.

-सुचित्रा माने, पालक

--

या ट्रेकसाठी तीन महिन्यांपासून आम्ही मुलांची तयारी करवून घेतली होती. रोज सहा ते आठ किलोमीटर चालणे, जिन्यांची चढ-उतर आदी प्रकारांचा त्यात समावेश होता.

-विश्वनाथ माने, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गुन्हेगारीमुक्त मालेगाव’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या आठवड्याभरात शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या असून, गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी आता मालेगाव पोल‌िस दलाच्या वतीने शनिवारपासून गुन्हेगारीमुक्त मालेगाव मोहीम सुरू करण्यात येत असल्याची माहिती येथील अपर पोल‌िस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत व गेल्या आठवड्यात झालेल्या गुन्हेगारी कारवायांचा आढावा घेण्यासाठी पोद्दार यांनी पोल‌िस उपाधिक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मोहिमेबाबत बोलतांना पोद्दार म्हणाले की, या मोहिमेअंतर्गत सराइत गुन्हेगारांवर नजरबंदी, अचानक तपासणी होणार असून, सर्व पोल‌िस ठाण्यातील १० प्रमुख गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सात झोपडपट्टी दादाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून, तूर्तास त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. २८ जणांवर तातडीने हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. तर स्थानिक गुन्हे शाखेकडून ३६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव आहेत. शहरातील महसूल विभाग, स्थानिक गुन्हे शाखा व पोल‌िस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी पोलिसांकडून ही खास मोहीम राबविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळी मिरवणुकीने त्र्यंबकमध्ये उत्साह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शेकडो वर्षांच्या परंपरेने ग्रामदेवता महादेवीस सवाद्य मिरवणुकीने ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात शनिवारी बली अर्पण करण्यात आला. गावावरील अरिष्ट टळावे म्हणून सुमारे साडेतीनशे वर्षांपेक्षा अधिक कालावधी पासून ही प्रथा सुरू आहे. कार्तिक पौर्णिमेस हा बळी अर्पण करण्यात येतो. यावर्षी शुक्रवारी आणि शनिवारी अशा दोन दिवस पौर्णिमा आल्याने शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कुशावर्त येथून बळीची सवाद्य मिरवणुक निघाली.

कुशावर्तावर पूजा विधी करून ग्रामस्थांनी जमा केलेला सुमारे सव्वाशे किलो तांदुळ शिजवला. तो बह्मवृंदांच्या मंत्रघोषात बैलगाडीत ठेऊन मंगलवाद्यांच्या गजरात शहराच्या उत्तरेस असलेल्या ग्रामदेवता महादेवीस अपर्ण करण्यात आला. या प्रसंगी बलीच्या प्रतिकात्मक म्हणून कोहळा हे फळ कापण्यात आले. येथील नरेंद्र पेंडोळे यांनी सहकारींच्या मदतीने हा तांदूळ शिजवून अर्पण केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरदवाडी’च्या देखभालीकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

येथील सरदवाडी धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दूर्लक्ष झाले असून, धरणाचा भरावा काटेरी झाडे-झुडुपांनी वेढला आहे. पिचिंगदेखील उद्ध्वस्त झाल्याने गळतीचे प्रमाण वाढले आहे. सांडवा फोडण्याचे प्रकार घडल्याने लाखो लिटर पाणी वाहून अपव्यय झाला आहे. पाटबंधारे विभागाने या बाबींकडे वेळीच लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.

सरदवाडी धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर शिवनदीद्वारे हे पाणी देवनदीला मिळते. या धरणातून लोणारवाडी, जामगाव, पास्ते आणि सरदवाडी अशा चार गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे धरणाच्या पाण्यावरच या गावांची तहान भागत असते. तसेच सरदवाडी परिसरात पाण्याचा पाझर होत असल्याने शेतीसाठी धरण उपयोगी ठरते. ७० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता घटली आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून, त्या पार्श्वभूमीवर धरणात साठलेल्या प्रत्येक थेंबांचे जतन होणे, त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. धरणाच्या भरावाला मोठ्या प्रमाणात बाभुळ व अन्य काटेरी झुडपांनी वेढा घातला आहे. झुडपे वेळोवेळी काढण्याची गरज आहे. त्यामुळे भरावाला धोका पोहचत असून, गळतीचे प्रमाण वाढले आहे.

धरणाच्या भरावाला आतल्या बाजूने असलेली दगडी पिचिंग बऱ्याच प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे. या गंभीर बाबींकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर बरेच दिवस सांडवा वाहत असतो. मात्र, पावसाळ्यानंतर काही दिवसातच धरणाचा सांडवा फोडण्याचा अज्ञात व्यक्तींनी खोडसाळपणा केल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. विशेष म्हणजे असा प्रकार घडूनही पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोणीही याकडे फिरकले नाहीत. सांडवा फोडण्याचे प्रकार वारंवार घडत असतानाही पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैयाकुमारची आज सभा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा युवा नेता कन्हैया कुमाररी रविवारी सभा होणार आहे. याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेवरुन वाद होवू नये यासाठी प्रशासनाबरोबरच आयोजकांनी विशेष काळजी घेतली आहे. या सभेला जास्तीत जास्त युवकांनी उपस्थित रहावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी विविध संघटनांनी त्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाने तर कन्हैया यांच्या मतांविषयी संभ्रम असलेल्या युवकांनी सभेस आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

तूपसाखरे लॉन्समध्ये दुपारी चार वाजता ही सभा होणार आहे. सभेत पाणी बॉटल्ससह कुठलेही साहित्य नेण्यास बंदी करण्यात आल्यानंतर माहितीसाठी सूचनांचे पोस्टरही तयार करण्यात आले. शिक्षण बाजार समितीने एक पत्रक काढत कन्हैयाकुमार विषयी अनेक वादही निर्माण केल्यामुळे त्याच्या विषयी अनेकांचा संभ्रम आहे. त्यामुळे सभेस उपस्थित राहून कन्हैयाकुमारचे मत समजून घ्या. त्यानंतर पुढील आठवड्यात शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, छात्र भारती, एआयएसएफ व इतर संघटनांच्या वतीने खुल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पटलेल्या व न पटलेल्या अशा दोन्ही मुद्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे डॉ. मिलिंद वाघ यांनी सांगितले. या सभेसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), छात्रभारती, महाराष्ट्र युवा परिषद, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), सम्यक विद्यार्थी आंदोलन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ), शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच, प्रगतिशील लेखक संघ इत्यादी आयोजक संघटना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांवर इस्रोची मात्रा लागू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इस्रोमार्फत नाशिक जिल्ह्यात मोबाइल अॅपद्वारे रस्त्यांवरील खड्ड्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातील (इस्रो) तंत्रज्ञांच्या मदतीने हे काम होत असून, सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे त्याचा प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ करण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक जिल्ह्यात होणारे असे सर्वेक्षण हा राज्यातील पहिलाच पहिलाच प्रयोग आहे. त्याअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर सिन्नर तालुक्यातील नायगाव गटासाठी रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रस्तेदुरुस्तीच्या कामात पारदर्शकता यावी, हा उद्देश आहे. या अॅपमुळे रस्तेदुरुस्ती कामांचे प्राधान्यक्रम ठरविता येणार आहेत. त्याचप्रमाणे शासनाचा निधी योग्य कामासाठी खर्च व्हावा याचे नियोजनही यामुळे करता येणार आहे.

खासदार गोडसे म्हणाले, की खड्डेमय रस्ते सर्वांनाच अतिशय त्रासदायक ठरतात. शहरी व ग्रामीण भागातही त्याचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो. आज सगळीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. अशा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांची स्वतंत्र यंत्रणा साध्या पद्धतीने खड्ड्यांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करते. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीही निधीची वानवा असते. अशावेळी सर्वाधिक खड्डे झालेल्या रस्त्यांना प्राधान्य मिळण्याची गरज आहे. मात्र, हे काम कागदावर अधिक प्रमाणात अवलंबून असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या भागातील रस्त्यांची किंवा खड्ड्यांबाबतची अचूक माहिती मिळत नाही. ही उणीव या तंत्रज्ञानाचा वापर करून दूर करता येणार आहे.
0000
जनता दरबारमधील तक्रारींची दखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या जनता दरबारात मांडण्यात आलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावरील तक्रारीची तत्काळ दखल घेऊन काम सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ओझर व पिंपळगाव येथील नॅशनल हायवे लगत नवीन सर्व्हिस रोड व फ्लायओवर्स च्या कामाबाबत जनता दरबारमध्ये तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर पालकमंत्री यांनी त्याची गंभीर दखल घेऊन त्याबाबत काम सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या.

जनता दरबारमध्ये केलेल्या सुचनेनंतर राष्ट्रीय राजमार्ग रस्ते प्राधिकरणचे व्यवस्थापक प्रशांत खोडस्कर यांनी ठेकेदारांना आदेश दिले. त्यानंतर ओझर व नाशिक येथील लेखानगर येथे तत्काळ रस्ता सफाइ करून सर्व्हिस रोडचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. आता प्लायओव्हरच्या कामही महिनाभरात केले जाणार आहे.

जिल्ह्यात रस्त्यांच्या अनेक तक्रारी आहे. पण, त्याची दखल अधिकारी घेत नसल्यामुळे जनता दरबारमध्ये या तक्रारी करण्यात आल्या व त्याची दखल घेतली गेली. खरं तर प्रशासनाने हे स्वतःहून करणे आवश्यक असताना नागरिकांना वेठीस धरले जाते. त्यामुळे जनता दरबारमध्ये आम्ही तक्रारी केल्या व हा प्रश्न आता सुटला अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परांजपे, झाकोरकर यांना ‘पूर्णवाद’चा पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

सात्विकतेने भारलेले वातावरण आणि मंत्रोच्चारांचा जयघोष अशा मंगलमय वातावरणात पूर्णवाद विद्या आणि कला पुरस्कारांचे रविवारी वितरण करण्यात आले. गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात हा सोहळा झाला.

पूर्णवाद परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वेदमूर्ती कै. प्रल्हाद गुरू पारनेरकर आणि कै. वेदशास्त्रसंपन्न पुरुषोत्तम काका भडकमकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. यंदा पुण्याचे माधवशास्त्री परांजपे यांना डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते ‘वेदमूर्ती’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इंदूरच्या कल्पना झाकोरकर यांना पूर्णवाद संगीत पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पूर्णवाद परिवारातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे यंदा ११ वे वर्षे होते. पुरस्कार वितरणाच्या मुख्य सोहळ्यानंतर कल्पना झाकोरकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

आज म्हसरूळला कार्यक्रम

आज (दि. ६ नोव्हेंबर) निवृत्त न्यायाधीश प्रमोद घाटे यांना पूर्णवाद सत्यबोध समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. म्हसरूळ येथील शिवराम मंदिरात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल. डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थ‌ितीत आणि निवृत्त न्यायाधीश जयंत पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कै. प्रमोद भडकमकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैष्णवी भडकमकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा तबला वादनाचा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा हजार दिव्यांनी झळाळले पिंपळगाव

$
0
0

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिंपळगाव बसवंत येथे शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विक्रमी ११ हजार पणत्यांचा दीपोत्सव झाला. यात ११ दीपस्तंभांचा समावेश होता. सरपंच आक्कासाहेब बनकर यांच्या हस्ते येथील संत जनार्दन स्वामींच्या पर्णकुटीसमोर हा दीपोत्सव झाला. जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा दीपोत्सव असल्याचा दावा भक्त परिवाराने केला आहे. पर्णकुटीशेजारीच हनुमान मंदिर, शनैश्वर मंदिर व सप्तशृंगीमातेचे मंदिर असून, वर्षभर शनैश्वराला भाविकांनी वाहिलेल्या तेलातून हा दीपोत्सव साजरा केला.

यावेळी आमदार दिलीप बनकर, संजय मोरे, गणेश बनकर, अल्पेश पारख, सत्यभामा बनकर, दीपक मोरे, दीपक विधाते, नानासाहेब देशमाने, नारायणराव विधाते, प्रकाश गोसावी, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब आंबेकर, उल्हास पाटील प्रमुख पाहुणे होते. अनिल पठाडे, राकेश आंबेकर, सचिन देशमाने, नंदकुमार सोनवणे, बबन विधाते, भाऊलाल वर्पे, गोकुळ घडोजे, अशोक शिंदे, सुभाष वाळेकर, कैलास भागडे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजकीय कलगीतुऱ्यात अडकला उड्डाणपूल

$
0
0

अभिजित राऊत, आडगाव

गतवर्षी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून के. के. वाघ परिसर ते जत्रा हॉटेलपर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन गाजावाजा करीत उरकण्यात आले. त्यावेळी या कामाच्या मंजुरीच्या श्रेयवादावरून भाजप व शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर महापालिकेत भाजपला सत्ता मिळाली, पण येथील उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने या कामाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे.

शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील अमृतधाम येथील फलकावर हा उड्डाणपूल चोरीला गेल्याची कोटी करण्यात आली असून, हा फोटो परिसरात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ५ नोव्हेंबर २०१६ रोजी के. के. वाघ परिसर ते जत्रा हॉटेलदरम्यानच्या उड्डाणपुलाचे घोषणाबाजीत उद्घाटन केले गेले. पण, वर्ष उलटले तरी उड्डाणपूल कुठे? ४१४ कोटी मंजूर झाले, पण उड्डाणपूल चोरीला गेला की काय, असा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांना पडला असल्याचे या फलकावरील मजकुरात म्हटलेले आहे.

या रस्त्यावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. शिवाय हा रस्ता एक बाजूने औरंगाबाद महामार्ग, पुणे रस्त्याकडे जातो. त्यामुळे चारही बाजूंनी अवजड व मालवाहतूक गाड्यांची कायम वर्दळ असते. वाहनांचा वेग प्रचंड असल्याने बघता क्षणी गाडी अंगावर येते की काय, असा गोंधळ निर्माण होऊनदेखील बऱ्याचदा अपघात घडतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय दुचाकीस्वारांना रस्ता ओलांडणे म्हणजे अपघातांना आमंत्रण देण्यासारखे ठरत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

---

भूमिपूजनानंतर १५ अपघाती मृत्यू

मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, रासबिहारी, जत्रा चौफुली धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी रोज लहान-मोठे अपघात होतात. या अपघातांत काही लोक मुत्युमुखी पडतात, तर काहींना अपंगत्व येत आहे. मागील वर्षी मोठ्या दिमाखात हा भूमिपूजन सोहळा पार पडला असला, तरी तब्बल एक वर्ष उलटूनही उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. या एका वर्षाच्या काळात परिसरात जवळपास १५ व्यक्तींचा अपघातांत बळी गेला असून, अजून किती बळी घेण्याची प्रशासन वाट बघत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

---

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या दिमाखात पुलाचे भूमिपूजन केले गेले. पण, वर्ष उलटूनही कामाला सुरुवात झालेली नाही. येथील काम तात्काळ सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडण्यात येईल.

-अमोल सूर्यवंशी, स्थानिक रहिवासी तथा शिवसेना पदाधिकारी

--

अपघात व वाहतूक कोंडीची दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी येथे उड्डाणपूल गरजेचा आहे. अनेक लोकांनी या परिसरात झालेल्या अपघातात जीव गमावला आहे. प्रशासन अजून किती बळी घेणार आहे. या पुलाचे काम त्वरित सुरू होणे गरजेचे आहे.

-अजित पाटील, स्थानिक रहिवासी

---

पाच वर्षांत परिसरात झालेले अपघात

--

वर्ष संख्या मृत जखमी

२०१३ ७८ २० ६४

२०१४ ९३ ३२ ६५

२०१५ ७८ ३९ ५२

२०१६ ७४ ४० ४२

२०१७ ३५ १५ ३१

एकूण ३५८ १४६ २५४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूटपाथ झालेत गायब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरातील मुख्य रस्त्यांवरील फूटपाथ फेरीवाले आणि व्यावसायिकांनी गिळंकृत केल्याने पादचाऱ्यांसाठीचे फूटपाथच दिसेनासे झाले आहेत. या व्यावसायिकांवर पालिकेचा अतिक्रमण विभागही मेहरबान असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशही पायदळी तुडविले गेल्याचे चित्र सध्या नाशिकरोडमध्ये बघायला मिळत आहे.

शहरातील सर्वच रस्त्यांना पालिकेने फूटपाथ तयार केलेले आहेत. नागरिकांना सुरक्षितपणे पायी चालता यावे यासाठी फूटपाथ केलेले असले तरी सध्या या फूटपाथचा वापर फेरीवाले, व्यावसायिक आणि दुकानदारांकडून केला जात आहे. सर्वच रस्त्यांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असल्याने शहरात फूटपाथ दिसेनासे झाले आहेत. शहरातील प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांचे फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकलेली आहे. असे असतानाही नाशिकरोडमधील फूटपाथची परिस्थिती बघता न्यायालयाच्या निर्देशांना पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केराची टोपली दाखवली असल्याचे उघड झाले आहे.

हे रस्ते फूटपाथलेस..

बिटको चौक ते शिवाजी पुतळा

शिवाजी पुतळा ते देवी चौक आणि बसस्थानक

बसस्थानक ते शिवाजी पुतळा व महात्मागांधी टाऊन हॉल

बिटको चौक ते दुर्गादेवी गार्डन

वास्को चौक ते मस्जिद

मुक्त‌िधाम चौक ते मनपा शाळा क्र.१२५

संपूर्ण जेलरोड,

बिटको चौक ते दत्तमंदिर

वाहनबाजारचालक शिरजोर

शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवरील फूटपाथवर दुकानदारांनी आपले व्यवसाय थाटलेले आहेत. याशिवाय जेलरोडला फूटपाथवरच वाहनबाजार आहेत. दुकानदार आणि वाहनबाजार चालकांच्या या मुजोरीमुळे मुख्य रस्त्यांवरील रहदारीलाही अडथळा निर्माण होत आहे. या दुकानांत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने मुख्य रस्त्यांवरच पार्क केली जातात. परिणामी सार्वजनिक वाहतुकीचा फज्जा उडत आहे.

नगरसेवकांचेही अतिक्रमण

मुक्त‌िधामभोवतीच्या सर्व रस्त्यांवरील फूटपाथ हॉटेल व्यावसायिकांसह इतर विक्रेत्यांनी गिळंकृत केलेले असल्याने या रस्त्यावर दररोज सायंकाळी वाहतुकीचा खेळखंडोबा होताना दिसून येतो. या रस्त्यावरील फूटपाथवरच व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. विशेष म्हणजे मुक्तिधाम चौकातील फूटपाथवरील काही टपऱ्या चक्क आजी-माजी नगरसेवकांच्याच आहेत. त्यांनी या व्यावसायिकांना भाडेतत्वावर दिलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील फूटपाथवरील अतिक्रमणाबाबत पालिका प्रशासन मूग गिळून आहे. सामान्य नागरिकांचे मात्र फूटपाथअभावी हाल सुरू आहेत.

हप्ते वसुली जोरात

फूटपाथवर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक आणि फेरीवाल्यांकडून काही माजी नगरसेवक हप्ते वसुली करीत असल्याचीही या व्यावसायिकांत चर्चा आहे. बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरातील हातगाडे व इतर व्यावसायिकांचे अतिक्रमण प्रवाशांसाठी प्रचंड तापदायक झालेले आहे. मात्र, वाहतूक शाखेचे कर्मचारीही हप्ता मिळत असल्याने या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडूनही या गंभीर प्रश्नाची दखल घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.

सध्या धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. हॉकर्स झोनचा प्रश्नही मिटलेला नाही. शहरातील फूटपाथवरील व्यावसायिकांची लवकरच एक बैठक बोलावली जाणार असून, त्यांना बिटको रुग्णालयाजवळील जागेत स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.

-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्याय मिळवून देणे कर्तव्यच

$
0
0

मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘प्रत्येक घटकास न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य न्यायाधीश आणि वक‌लिांनी पार पाडावे. यातूनच सर्वसामान्यांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ होतो. आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक न्यायाधिशासह वक‌लिांनीही प्रयत्नशील रहायला हवे,’ असे प्रतिपादन मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

नाशिक वकील संघ आणि सर्व तालुका वकील संघांच्यावतीने आयोज‌ति केलेल्या नवनियुक्त न्यायमूर्तींच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी गवई बोलत होते. हा कार्यक्रम गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी सकाळी पार पडला. यावेळी अॅड. इंद्रभान रायते यांचे मालकी हक्कासंबंधीचा शोध या पुस्तकाचे प्रकाशन झाले. तसेच नाशिक वकील संघाच्या www.nashikbarassocitaion.co.in या संकेतस्थळाचा शुभारंभही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेले संदीप शिंदे, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव आणि औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण ढवळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी गवई यांच्यासह मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे, अत‌रिीक्त महाअधिवक्ता अनिल सिंग, औद्योगिक प्राधिकरणचे अध्यक्ष शशिकांत सावळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सतीष देशमुख हे उपस्थित होते. लोकशाहीचा महत्त्वाचा भाग असलेल्या न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम आहे. या विश्वासास पात्र ठरण्यासाठी सजग आणि प्रयत्नशील कामगिरी महत्त्वाची असल्याचे न्यायमूर्ती गवई यांनी यावेळी स्पष्ट केले. नाशिक जिल्हा कोर्टास नव्याने अड‌ीच एकर जागा मिळाली असून, तिथे बांधकाम व्हावे यासाठी आम्ही सदैव पाठीशी राहू, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, न्यायमूर्ती मोरे यांनी कोर्टातील प्रलंब‌ति खटल्यांवर प्रकाश टाकला. प्रलंब‌ति खटले निकाली काढण्यासाठी न्यायाधिशांसह वक‌लिांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत मोरे यांनी व्यक्त केले. कोर्टात आलेल्या नागरिकांना जलद तसेच स्वस्त न्याय देण्यासाठी प्रयत्न झाल्यास सर्वसामान्यांचा या यंत्रणेवरील विश्वास आणखी दृढ होण्यास मदत होईल, असे मोरे यांनी स्पष्ट केले. सत्कारमूर्ती म्हणून उत्तर देताना न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आजवर काम करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या तसेच न्यायदान क्षेत्रात काम करीत असताना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचे आभार मानले. आजच्या कार्यक्रमानिमित्त नाशिकशी असलेले नाते आणखी दृढ झाल्याची भावना न्यायमूर्ती देव यांनी व्यक्त केली. नाशिकमध्येच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून काम पाहिलेल्या आणि सध्या औरंगाबाद खंडपीठात काम पाहत असलेल्या न्यायमूर्ती ढवळे यांनी सुध्दा आपल्या यशात सर्वांचा वाटा असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी केले. नाशिक कोर्टास जागा मिळवून देण्यासाठी न्यायमूर्तींनी प्रयत्न केल्याची आठवण करून देत ठाकरे यांनी त्यांनी त्यांचे आभार मानले. व्यासपीठावर वकील संघाचे उपाध्यक्ष प्रकाश आहुजा, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, महाराष्ट्र व गोवा वकील बार असोसिएशनचे सदस्य अॅड. जयंत जायभावे, अॅड. अविनाश भीडे, वकील संघाचे सचिव अॅड. जालिंदर ताडगे, खजिनदार अॅड. संजय गिते यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी व तालुका वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॅड. जयंत ढोमसे यांनी केले. या सत्कार सोहळ्यास जिल्ह्याभरातील वकील मोठ्या संख्येने हजर होते.

चर्चासत्राचे आयोजन

या कार्यक्रमानंतर हिंदू वारसा कायदा कलम ८ व सुप्रीम कोर्टाचा उत्तमसिंग निवाडा आणि मिळकतीचा शोध अहवाल या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या विषयावर पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुधाकर आव्हाड, सदस्य असलेले अॅड. आशिष देशमुख आणि निफाड येथील अॅड. अण्णासाहेब भोसले यांनी मार्गदर्शन केले. हिंदू वारसा कायदा स्वातंत्र्यानंतर अस्तित्त्वात आला असून, यामुळे संपत्ती लयास जात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तर, मिळकतीचा शोध अहवाल या विषयावर अॅड. इंद्रभान रायते, औद्योगिक प्राधिकरणाचे अध्यक्ष शशिकांत रायते, अॅड. नंदकिशोर भुतडा, उत्सव हेळंबकर, अॅड. अविनाश भिडे, राजेश खर्चे, अॅड. जयंत जायभावे या तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त केली. टायटल व्हिरिफिकेशन करताना वक‌लिांनी समोरच्या व्यक्तीकडूनच प्रतिज्ञापत्र घेऊन दोन वेळेस जाहिरात प्रसिध्द करूनच पुढे जावे, असे मत मांडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटकांतून ज्येष्ठांच्या भूमिकांना कात्री!

$
0
0

नाशिक ः हौशी राज्य नाट्य स्पर्धांचा बिगूल वाजला आणि रंगकर्मींची एकच धावपळ सुरू झाली. गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या तालमींचे चीज होण्याची वेळ आली असल्याने रंगकर्मी अत्यंत उत्साहात आहेत. परंतु, या सर्व गर्दीत सीनिअर कलाकारच दिसत नसल्याचे चित्र आहे. सध्या सादर होणाऱ्या नाटकांच्या संहितांमधून सीनिअर कलाकारांच्या भूमिकांनाच कात्री लावण्यात आली असून, त्यांनी जायचे कुठे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्य नाट्य स्पर्धा गाजवत असलेले सीनिअर्स सध्याच्या नाटकांच्या गर्दीत कुठे नजरेस पडत नाहीत. त्याचे कारण म्हणजे नाटक लिहिणारे, नाटकाचे दिग्दर्शन करणारे आणि प्रस्तुती करणारे एकूणच सर्वजण तरुण तुर्क असल्याने त्यांच्या कलाने संहिता लिहिली जाते, दिग्दर्शन केले जाते. त्यामुळे सीनिअर कलाकाराला या सगळ्यात कुठेच वाव मिळत नसल्याचे चित्र आहे.

वयाची पन्नाशी ओलांडलेले पात्र नाटकातून गायब झाल्याने हा प्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते. कोणत्याच नाटकात आजी, बाबा किंवा त्या वयाचे कलाकार नकोच असतात. त्यांना टाळून संहिता लिहिली जात असल्याने त्यांचा समावेश तेथे होतच नाही. मग सीनिअर्स फक्त मार्गदर्शनापुरतेच राहतात. तेथेही त्यांच्याकडून दोन-चार टिप्स शिकायच्या तर यंगिस्तानला ते नको असते. त्यामुळे या कलाकारांना राज्य नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची इच्छा असूनही शक्य होत नसल्याचे चित्र आहे.

संहितालेखन तरुणांच्या हाती

नाटकाची संहिता लिहिणारा मोठा वर्ग तरुण आहे. त्याला नाटकात फक्त ग्लोबलायजेशन, डिजिटायजेशन आणि यंगिस्तानच्या भोवती फिरणाऱ्या बाबी दाखवण्यातच रस असतो. किंबहुना परीक्षक त्यालाच भुलतो असा समज त्यांनी करून घेतल्याने लिहिताना पात्र निवडीच्या वेळी केवळ तरुण-तरुणी यांच्यापुरतेच नाटक मर्यादित ठेवले जाते. या नाटकांमध्ये पन्नाशीच्या वरचा कलावंत औषधालाही सापडत नाही.

नाटकातील सामाजिकतेवर प्रश्नचिन्ह

नाटकांचे विषय पाहता ग्लोबल संकल्पनेवर अधिक भर दिला जातो. त्यात एखादे हसते खेळते कुटुंब, घरातील चार-दोन मोठी माणसे, पारावर गप्पा मारणारे वृद्ध, घरात काठी टेकत येणारी आजीबाई या भूमिका लिहिल्याच जात नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी सीनिअर कलाकार केवळ तरुणाईचे नाटक पाहण्यात समाधान मानत असून, त्यांची अभिनयाची भूक मात्र भागत नाही.

ज्यांना नाटकाचे वेड आहे ते वयाकडे बघत नाहीत. परंतु, नाटक आता प्रोफेशनल होत चालले आहे हेदेखील खरे आहे. नाटकाची गरज जशी असेल तसे पात्र निवडले जातात. अर्थात पन्नाशीच्या पुढे ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यावर इतरही जबाबदाऱ्या असतातच. त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही म्हणूनही पुढे ते बायकॉट झाले असतील.

- हेमंत देशपांडे, ज्येष्ठ रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामटवाड्यात आत्महत्या

$
0
0

कामटवाड्यात आत्महत्या

नाशिक : कामटवाडे परिसरातील तुळजाई अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तुळशीदास किसन क्षीरसागर यांनी (वय ५७) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. क्षीरसागर यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांना कामटवाडे परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

मेरी-दिंडोरीरोडवरील तलाठी कॉलनी परिसरातील शिवनगर येथील तुळजाभवानी निवास येथे राहणाऱ्या तेजस्विनी प्रकाश राठोड (वय १८) या युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तेजस्विनीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी प्रकाश राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार मेतकर करीत आहे.

कुऱ्हाडीने वार

घरगुती वादातून एकाने दुसऱ्याच्या पायावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मखमलाबाद गाव परिसरातील कोळीवाडा येथे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य संशयितास अटक केली असून, रमेश कारभारी झोले असे संशयिताचे नाव आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी पंडित रामभाऊ झोले (वय ५०) हे त्यांचा पुतण्या अतुल यास काही समजावून सांगत होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अतुलच्या वडीलांना ही बाब आवडली नाही. रमेश झोले यांनी थेट कुऱ्हाड घेऊन रामभाऊ यांच्या पायावर वार केला. यात रामभाऊ गंभीर जखमी झाले. घटनेचा अधिक तपास पीएसआय सावळा करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांत दुर्दशेचा ‘बहर’

$
0
0

नवनाथ वाघचौरे, सिन्नर फाटा

शहरातील उद्यानांच्या देखभालीसाठी महापालिकेने लाखो रुपयांचा ठेका दिलेला असतानाही या उद्यानांच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या शहरातील उद्यानांत दिसून येत आहे. बहुतांश उद्यानांची देखभालच होत नसल्याने जणू या उद्यानांत दुर्दशेचा बहरच आल्याची स्थिती आहे.

नाशिकरोड प्रभागातील १२२ पैकी एक-दोन उद्यानांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व उद्यानांची केवळ कागदोपत्री देखभाल सुरू असल्याचे चित्र आहे. उद्यानांच्या या दुर्दशेमुळे दिवाळीच्या सुटीत बच्चेकंपनीला उद्यानांत खेळण्याच्या आनंदापासून वंचित राहावे लागल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

नाशिकरोड प्रभागात एकूण १२२ उद्याने आहेत. या उद्यानांपैकी लोकमान्य उद्यानासारख्या एक-दोन उद्यानांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व उद्यानांची दुर्दशा झाली आहे.या उद्यानांच्या देखभालीचा ठेका डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी एका मजूर सहकारी संस्थेला दिलेला आहे. मात्र, प्रत्यक्षात येथील उद्यानांची दुरुस्ती होत नसल्याने शहरातील उद्यानांना अवकळा आली आहे. बहुतांश उद्यानांत काटेरी झाडे-झुडपे, गवत वाढले असल्याने अशा उद्यानांत पाय ठेवायलाही जागा राहिलेली नाही. काही उद्याने तर मद्यपींचा अड्डा बनली असून, काही उद्यानांना कायमचे टाळे ठोकण्यात आले आहे. याशिवाय काही उद्यानांना कचराकुंडीचे स्वरूप आले असून, भटक्या जनावरांचाही कायम वावर असतो. उद्यानांच्या या दुर्दशेमुळे शहराच्या बकालपणातही वाढ झाली आहे.

--

खेळण्यांची दुरुस्तीच नाही

शहरातील ज्या मोजक्या उद्यानांत लहानग्यांसाठी खेळण्या उपलब्ध आहेत त्या खेळण्याची सध्या मोडतोड झालेली आहे.या खेळण्यांची दुरुस्तीच होत नसल्याने तुटलेल्या खेळण्यामुळे लहान मुलांसाठी या खेळण्या धोकादायक ठरु लागल्या आहेत.काही उद्यानांतील खेळण्यांची चोरीही झालेली आहे.

--

गवत अन् झुडपे फोफावली

ठेकेदाराकडून उद्यानांची देखभाल दुरुस्ती वाऱ्यावर सोडण्यात आलेली असल्याने बहुतेक उद्यानांत काटेरी झाडे-झुडपे आणि रानगवत वाढले आहे. त्यामुळे या उद्यानांचा वापरच थांबला आहे. काही उद्यानांत उंदीर, घुशी अन् सापांसारख्या प्राण्यांचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिक धास्तावले आहेत.

--

मद्यपींच्या रंगतात मैफली

शहरातील काही उद्यानांत मद्यपींच्या मैफली दररोज रंगताना दिसत आहेत. अशा उद्यानांत मद्याच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून येतात. मद्यपींच्या उपद्रवामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा उद्यानांच्या परिसरातील पथदीपही मद्यपींनी फोडलेले आहेत. त्यामुळे या उद्यानांच्या परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने या भागातून ये-जा करणेदेखील अवघड बनले आहे.

--

अतिक्रमणांचा विळखा

शहरातील काही उद्याने अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेली आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील नेहरू गार्डनव्यतिरिक्त उर्वरित एकाही उद्यानाच्या अतिक्रमणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे काही उद्यानांचे अस्तित्व केवळ कागदोपत्री राहिलेले आहे. काही उद्यानांना व्यावसायिकांच्या टपऱ्यांचा विळखा पडलेला आहे. या व्यावसायिकांकडून उद्यानात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो.

---

नागरिक म्हणतात...

--

चेहेडी गावात मोठे उद्यान आहे. मात्र, या उद्यानाला कायमच टाळे असते. याच उद्यानात ग्रीन जिम आहे. परंतु, शेजारीच सार्वजनिक शौचालय असल्याने दुर्गंधीचा त्रास होतो. त्यामुळे हे उद्यान केवळ शोभेचे बाहुले बनले आहे.

-नितीन बोराडे, नागरिक

--

देवळालीगावातील उद्यानांची देखभालीअभावी दुरावस्था झाली आहे. काही उद्यानांत स्थानिकांकडून अतिक्रमण केले गेले आहे. वडारवाडीतील उद्यानाचा तर उकिरडाच झाला आहे. येथे काटेरी झाडे वाढली असून, खेळणीही तुटली आहेत.

-किशोर वाघ, नागरिक

---

लोकप्रतिनिधी म्हणतात...

-

शहरातील उद्यानांच्या दुरवस्थेबाबतचा विषय महासभेवर विषय घेतला असून, त्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल मागविला आहे. याप्रश्नी कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली जाणार आहे.

-सत्यभामा गाडेकर, नगरसेविका

--

परिसरातील सर्व उद्यानांची लवकरच पाहणी केली जाणार आहे. सध्याच्या ठेकेदाराकडून उद्यानांची देखभाल नियमानुसार केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. आयुक्तांच्याही ते निदर्शनास आणून दिले जाईल.

-पंडित आवारे, नगरसेवक

--

उद्यानांच्या देखभालीचे काम ठेकेदाराकडून वेळवेळी होत नाही. स्थानिक नगरसेवकांनीही या प्रश्नाची दखल घेतली पाहिजे. सर्व उद्यानांची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल.

-केशव पोरजे, नगरसेवक

नाशिकरोड प्रभागात उद्यान विभागाकडे केवळ दहा कर्मचारी असल्याने त्यांना सर्वच उद्यानांच्या देखभाल व्यवस्थेवर नियंत्रण ठेवता येत नाही. ठेकेदारानेही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.

-सरोज अहिरे, नगरसेविका

---

अधिकारी म्हणतात...

शहरातील उद्यानांची ठेकेदारामार्फत नियमितपणे साफ सफाई केली जाते. गवत काढण्यासह वेळेवर पाणी देणे, झाडांची निगा राखणे अशा स्वरुपाची कामे ठेकेदाराकडून केली जातात. काही उद्यानांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झालेले असेल, तर त्याची ठेकेदाराकडे चौकशी केली जाईल.

-बी. टी. कटारे, उद्यान निरीक्षक, नाशिकरोड प्रभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पमधील विकासकामांना खीळ

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे हौसनरोड व आनंदरोडसह आठवडेबाजारातील जुने शौचालय पाडण्याबाबत चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, ठेकेदारांचा प्रतिसादच मिळत नसल्याने बोर्डाचा खर्च वाया जात असून, याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून टेंडर रकमेत बदल करणे अनिवार्य झाले आहे किंवा वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून यातून उपाय शोधणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाने वॉर्ड क्रमांक ३ मधील हौसनरोडवरील प्राथमिक मुलींची शाळा तोडून मटेरिअलसह घेऊन जाण्यासाठी कमीत कमी रक्कम ८ लाख ९० हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. याच वॉर्डातील आठवडेबाजारातील जुने सार्वजनिक शौचालय पाडून मटेरिअलसह घेऊन जाण्यासाठी १ लाख १७ हजार रुपयांची, तर वॉर्ड १ मधील आनंदरोडवरील प्राथमिक मुलांची शाळा पाडून मटेरिअलसह घेऊन जाण्यासाठी २१ लाख ८० हजार रुपयांचा निविदा प्रसिद्ध केली. सदर शाळा पाडणे व मटेरिअल घेऊन जाणे यासाठी बोर्डात मंजुरी देताना तांत्रिकदृष्ट्या पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्यात आला. बोर्डाचे सदस्य व गॅरिसन इंजिनीअर यांच्या सल्ल्यानंतर रकमेबाबतचा ठराव करण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत चार वेळा जाहीर निविदा प्रसिद्धीस देत करून ऑनलाइन पद्धतीने टेंडर मागवूनदेखील किंमत जास्त असल्याच्या कारणास्तव कुणीही निविदा भरण्यास पुढे आलेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडलेल्या आनंदरोडवरील शाळेतील इमारतीमधील सागवानी दरवाजे, खिडक्या, लोखंडाचे साहित्य यांची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे असे काम करणारे कंत्राटदार हे काम घेण्यास पुढे येत नसल्याचे बोलले जात असून, बोर्डाचे हे काम कित्येक महिन्यांपासून लालफितीत अडकले आहे.

ही कामे रखडली

आनंदरोड मैदानावरील शाळेच्या जागेवर क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे, तर हौसनरोडवरील शाळेच्या जागी व्यापारी संकुलात ९० गाळे व सामाजिक सभागृह उभारले जाणार आहे. आठवडेबाजारात नवीन शौचालय उभारण्यात येणार आहे. मात्र, जुन्या इमारतीची पाडण्याची प्रक्रिया रेंगाळल्यामुळे वरील तीनही ठिकाणी होणारी विकासकामे खोळंबली आहेत.

---

निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन निविदा येणे आवश्यक असते. आतापर्यंत एकत्रित तीन निविदा न आल्याने वारंवार निविदा प्रसिद्धीस द्यावी लागत आहे.

- उमेश गोरवाडकर, कार्यालय अधीक्षक, कॅन्टोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दारुला महिलांचे नाव द्या

$
0
0

गिरीश महाजनांचे वादग्रस्त वक्तव्य

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दारूची विक्री वाढण्यासाठी त्यास महिलांचे नाव दिले तर त्याची विक्री निश्चित वाढेल. त्यामुळे साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या दारूचे नाव बदलून ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’ ठेवण्याचा अजब सल्ला महाजन यांनी भर सभेत दिला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामास शनिवारी प्रारंभ झाला, त्या कार्यक्रमात महाजन बोलत होते.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामासह शहादा शनिवारी येथे संगणकीकृत ऊस वजन काटा पूजन कार्यक्रमप्रसंगी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील, कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, सरकारसाहेब रावल, आत्माराम बागले आदी उपस्थित होते. त्यावेळी महाजन यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

नेमके वक्तव्य

कार्यक्रमात कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी कारखान्याची माहिती दिली. त्यात त्यांनी आपल्याकडे डिस्ट्रिलरी प्रकल्प आहे मात्र मद्याची विक्री कमी होत असल्याचे सांगितले. त्यानंतर मंत्री महाजनांनी याच मुद्द्याला अनुसरून, “राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री कोपरगावचे नेते शंकरराव काळे यांच्या कारखान्याची होत असते, त्यांच्या कारखानानिर्मित दारूचे नाव ‘भिंगरी’ आहे. तर माजी आमदार कोल्हे यांच्या कारखान्यातर्फे निर्माण होणाऱ्या मद्याचे नाव ‘ज्यूली’ असे आहे. त्याचप्रमाणे बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते. ही वस्तुस्थिती आहे. मद्य व तंबाखूजन्य पदार्थांना असलेली नावे बहुतांशी महिलांची आहेत. जसे अनेक गुटख्याचे प्रकार बंदी असताना विकले जातात. त्यामुळे सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’ करावे.”, असे विधान केले.

जळगावात निषेध

जिल्हा महिला राष्ट्रवादीने रविवारी शहरातील शिवतीर्थ मैदानासमोरील जी. एम. फाउंडेशन या कार्यालयाच्या बाहेर या विधानाचा निषेध केला. तसेच, त्यांच्या प्रतिमेला जोडेदेखील मारले. महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या महाजनांनी महिलांची माफी मागावी, अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणीही महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा कल्पना पाटील, सरचिटणीस मिनल पाटील, माजी शहराध्यक्षा प्रतिभा शिरसाठ यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अ‍ॅसिड टाकण्याची तरुणीला धमकी

$
0
0

सटाणा : सटाण्यातील एका तरुणीला नगरदेवळा (जि. जळगाव) येथील एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून माझ्याशी लग्न कर नाहीतर चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकून देण्याची धमकी दिली. तसेच तिच्या दुचाकीसह घरमालकांची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना सटाणा शहरातील नामपूर रोडच्या श्रमिकनगरमध्ये घडली. या तरुणीने सटाणा पोलिसात त्या तरुणाविरुद्ध फिर्याद दिली असून, अरूण ज्ञानेश्वर पाटील असे या तरुणाचे नाव आहे. तो फरार झाला असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे सटाणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गच्चीवरच्या बागेला ‘खतपाणी’

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

जल, जंगल, जमीन आणि नागरिक हे निसर्गाचे सूत्र आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून मानवाला कायम काही तरी मिळतच असते. पण, त्याचा सदुपयोग करणे मानवजातीला शक्य होत नाही. आजच्या बदलत्या लाइफ स्टाइलमुळे तर निसर्गाकडे मानवाचा कानाडोळा होत आहे. मात्र, आपल्या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ निसर्गासाठी काढणे खूप गरजेचे आहे. घरच्या घरी निसर्ग साकारायचा झाल्यास गच्चीवरची बाग हा खास प्रकल्प आहे, असा सल्ला निसर्गसंवर्धक संदीप चव्हाण यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांना दिला.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे रविवारी (दि. ५) रोजी ‘गच्चीवरील बाग’ या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. एचपीटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हे वर्कशॉप पार पडले. या वर्कशॉपसाठी मोठ्या संख्येने ‘मटा’च्या वाचकांनी हजेरी लावली होती. घरी उपलब्ध असलेल्या जागेत नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली रसायनमुक्त फळे, भाज्या तयार करण्याचे तंत्र यावेळी उपस्थिताना सांगण्यात आले. तसेच, उपलब्ध नैसर्गिक संसाधनात सहजसोपी बाग फुलविण्याच्या खास टिप्सदेखील देण्यात आल्या. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, की गच्चीवरची बाग ही एक इव्हेस्टन्मेंट आहे. आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात जगण्याचा आनंद यातून मिळतो. निसर्ग माणसाच्या जवळ येण्यासाठी आसुसला आहे. त्यामुळे त्याला स्थान भेटल्यास तो कुठेही फुलतो. गच्चीवर किंवा घरच्या मोकळ्या जागेत भाजी, फळे, फुले यांचे पीक घेतल्यास आपल्याला त्याच खूप लाभ होतो. त्यासाठी खर्च अगदी अत्यल्प आहे. मात्र, त्याचे फायदे अनेक आहेत. तुम्ही योग्य तंत्र शिकल्यास घरच्या घरी कोणतेही पिके घेणे सहज शक्य आहे. वांगे, बटाटे, कांदे, मोगरा, गुलाब, अडुळसा, भोपळा अशी अनेक पिके घरी घेता येतात. सोबतच चव्हाण यांनी उपस्थितांना घरच्या बागेत झाडे कशी लावावी, त्यांची निगा कशी राखावी, तसेच त्यासाठीचे खत कसे तयार करावे, याचीही प्रात्यक्षिके करून दाखविले. उपस्थितांच्या गार्डनिंगसंदर्भातील अनेक शंकांचे निरसनही यावेळी कररण्यात आले.

.....

यामुळे फुलेल गच्चीवरची बाग

..

अशी बनवावी कुंडी

नारळाची करवंटी, तेलाचा पत्र्याचा डबा, जुने शूज, बाटली, लाकडी बॉक्स, चहाचा कप, तांब्या, बादली, प्लास्टिकचा टब अशा अनेक टाकाऊ वस्तूंपासून कुंडी बनवून गच्चीवरची बाग साकारता येऊ शकते.

..

अशी भरावी कुंडी...

काळी, लाल आणि खतमिश्रित माती कुंडी भरताना वापरावी. वाळवलेल्या किचन वेस्ट मटेरिअलपासून कुंडी तयार केल्यास उत्तम असते. कुंडीत मातीसोबत गावठी गायीचे वाळवलेले शेण किंवा शेणखत भरावे. झाडांचा सुकलेला पालापाचोळा, झाडांच्या वाळलेल्या काड्या, उसाचा चोथा, नारळाच्या शेंड्या यांचा वापर कुंडीतल्या मातीमध्ये करावा. कोणतीही कुंडी २ ते ४ इंचच भरावी. रोप लावल्यानंतर कुंडी २ ते ३ इंच रिकामी असायला हवी. अशा पूरक कुंडीत रोपांची वाढ लवकर होते.

...

अशी वाढवावीत झाडे

झाडांना रोज पाणी घालताना त्यांच्याशी संवाद साधण्याचे तंत्र आपण शिकायला हवे. झाडांची निगा राखत पाणी घालतेवेळी त्यांच्याकडे लक्ष देत वेस्ट मटेरिअल काढल्यास त्यांना आत्मसंवर्धन मिळते. हा प्रयोग कायम केल्यास झाडे नक्की वाढतात, असे शास्त्र सांगते. झाडांची माती महिन्यातून एकदा भुसभुशीत करीत खतपाणी केल्यास झाडांची वाढ लवकर व योग्य होते.

........


बागेचे व्यवस्थापन करतानाची न्यूट्रिशिअन पद्धत या उपक्रमाद्वारे शिकायला मिळाली. घरच्या घरी बागेच्या रुपातून खूप काही विकसित करता येते हे माहिती झाले. ‘मटा’च्या या उपक्रमातून गार्डनिंगचे तंत्र शिकायला मिळाले. असे स्तुत्य उपक्रम राबविल्यामुळे सर्वांमध्ये नक्कीच निसर्गाची गोडी निर्माण होऊ शकेल.

-डॉ. वसंत टिकेकर

...

गृहिणी फावल्या वेळात घरीच अनेक पिके घेत बाग फुलवू शकतात, हे या वर्कशॉपद्वारे समजले. बाग साकारणे हे एक कौशल्य असून, त्यामागचे अनेक समज-गैरसमज या उपक्रमाद्वारे दूर झाले. घरी बाग तयार करणे खूप अवघड असेल, असे वाटायचे. मात्र, या उपक्रमाच्या मार्गदर्शनातून सगळे सोपे करून सांगण्यात आले.

-ज्योती माळोदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्य स्पर्धेत यंदा ‘महिलाराज’

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रावर आतापर्यंत लेखन आणि दिग्दर्शनात पुरुषांची मक्तेदारी दिसत होती. महिला किंवा मुली केवळ अभिनय करतानाच दिसायच्या, यंदा पहिल्यांदाच वेगळे चित्र दिसायला लागले आहे. माधवी शिंदे, शैलजा औटी व प्राची गोडबोले या तीन लेखिकांच्या संहिता आणि पल्लवी पटवर्धन व आरती हिरे या दोन दिग्दर्शिका नाटकांचे दिग्दर्शन करीत असल्यामुळे राज्य नाट्य स्पर्धेत यंदा महिलाराज दिसणार आहे.

एक काळ असा होता, की नाटकात फारच कमी महिला किंवा मुली दिसायच्या. नाटकाची आवड असली, तरी घरातून परवानगी मिळत नसायची. नाटकाच्या तालमीसाठी उशिरापर्यंत वेळ देणे कित्येकींना शक्य नसायचे. तालमींना जाण्या-येण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. अशा अनेक कारणांमुळे महिला आणि मुलांचा नाट्य स्पर्धेतील सहभागही मर्यादित असायचा. त्यामुळे कमीत कमी स्त्री पात्रे असलेल्या नाटकांची निवड केली जायची. स्त्री पात्रांची अभिनयाच्या पारितोषिकांतदेखील स्पर्धा फारशी नसल्यामुळे त्यांना सहज बक्षीस मिळायचे.

मात्र, बदलत्या काळात मुली कला क्षेत्राकडे गांभीर्याने बघत असल्याचे जाणवू लागले. नाटकातील त्यांचा सहभाग वाढू लागला. पुरुष अभिनयाच्या पारितोषिकांपेक्षाही स्त्री अभिनयाच्या पारितोषिकांमध्ये स्पर्धा वाढलेली दिसते. राज्य नाट्य स्पर्धेच्या नाशिकच्या इतिहासात यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने महिला लेखिका आणि दिग्दर्शिका उतरल्या आहेत. ‘प्रयास’सारख्या नाटकात तर महिला दिग्दर्शिका आणि तब्बल पंधरा स्त्री पात्रे साकारली जाणार आहे. त्यात पहिल्यांदा नाटकात काम करणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्य नाट्य स्पर्धेत महिलाराज बघायला मिळणार आहे.

...

‘प्रयास’ ही महिलाप्रधान संहिता वाचनात आली. त्यात महिलांना समाजात वावरताना येणारे अनेक प्रकारचे अनुभव असल्याने ती भावली. अनेक पातळ्यांवर महिलांना होणारा त्रास, त्यांची घुसमट, त्यांचा संघर्ष आदी दाखविणाऱ्या या नाटकाचे दिग्दर्शन तब्बल पंधरा स्त्री पात्रांना घेऊन करीत आहे.

-पल्लवी पटवर्धन, दिग्दर्शिका

--

लेखनाची आवड असली, तरी वेळ मिळत नव्हता. यापूर्वी एकांकिकांचे लेखन, त्यांचे प्रयोग केले आहेत. नाटकांत अभिनय केलेला आहे. अहिल्यादेवींचे चरित्र मनाला भावले, त्यावर नाट्य लेखन करण्याचे ठरविले आणि ही संहिता तयार झाली. माझे हे राज्य नाट्य स्पर्धेतील हे पहिलेच दोन अंकी नाटक आहे.

-माधवी शिंदे, लेखिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोडेनगर परिसराती दुकान फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खोडेनगर परिसरातील पखालरोडवरील श्रीनिवास टॉवर येथील बंद दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल ४१ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी राजीव मनोहर विश्वकर्मा (रा. प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरीची घटना शुक्रवारी रात्री साडेसात ते शनिवारी सकाळच्या दरम्यान घडली. दुकानात घुसलेल्या चोरट्यांनी पॅनोसोनिक कंपनीचा टीव्ही, दोन सायकलचे हेल्मेट, एक पेन ड्राइव्ह, एक सेट हॅण्डग्लोज व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहे.


ठार मारण्याचा प्रयत्न

भाईगिरी करतो, दुकानदारांकडे पैसे मागतो अशी बदनामी का करतो, याची विचारणा करीत दोघांनी एकाच्या डोक्यावर वार करीत त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास किशोर सूर्यवंशी मार्गावरील चेतना व्यसन मुक्ती केंद्राजवळ घडली. शैलेश रमेश पाटील (वय ३०, रा. आर्य सोसा. जुईनगर, किशोर सूर्यवंशी मार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेवेळी संशयित आरोपी सौनू उर्फ वैभव गजानन खिरकाडे (रा. श्रीधर कॉलनी, पेठरोड) आणि पुष्पक कैलास शिंगाडे (वय २२, शिवदर्शन सोसा. आरटीओ ऑफिससमोर, पेठरोड) या दोघांनी त्यास रस्त्यात गाठले. यावेळी खिरकाडेने पाटील यास तु माझी बदनामी का करतो, म्हणून विचारणा केली. तसेच याच वादातून खिरकाडेने चॉपर काढून पाटीलच्या डोक्यात सपासप वार केले. या दरम्यान शिंगाडेने देखील अॅक्टिव्हाच्या डिकीत ठेवलेला कोयता काढून पाटीलच्या डोक्यात मारला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बेडवाल करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images