Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रियेस प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व महिला क्रीडा मार्गदर्शक, संघटकांना देण्यात येणाऱ्या जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

www.mumbaidivsports.com या संकेतस्थळावर ३० नोव्हेंबर २०१७ पूर्वी अर्ज सादर करावयाचे आहेत. ऑनलाइन अर्जाची प्रत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ५ डिसेंबर २०१७ पूर्वी स्वयंसाक्षांकित कागदपत्रांसह सादर करावी. सन २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षांसाठी राज्यातील मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत आंतराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावरील पुरुष व महिला खेळाडू, कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदकविजेते, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक-कार्यकर्ते, महिला क्रीडा मार्गदर्शक, महिला संघटक-कार्यकर्ते यांनी अर्ज सादर करावेत. उमेदवारांनी‌ अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, संबंधित विभागाचे क्रीडा व युवक सेवा विभागीय उपसंचालक अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे.

सन २०१४-१५ या वर्षातील पुरस्कारांसाठी ज्यांनी यापूर्वी अर्ज केले असतील त्यांनी नवीन नियमावलीनुसार नव्याने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) आणि एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) या प्रकारांच्या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेगाब्लॉकमुळे कोलमडले नियोजन

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे मनमाड रेल्वे स्थानकात नवीन होणाऱ्या पादचारी पुलाच्या कामाकरिता नवे लोखंडी गर्डर टाकण्यासाठी मंगळवारी मनमाड रेल्वे स्थानकात मेगा ब्लॉक घेण्यात आला. हे काम पूर्वनियोजीत असले तरी यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सकाळपासूनच फलाट १ व २ वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आले होते. काही पॅसेंजर गाड्याही रद्द करण्यात आल्या.

मंगळवारी सकाळी ७.४० ते दुपारी १२.३५ दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला. काही गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसला. मुंबईकडे जाणारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मनमाड-इगतपुरी शटल, मनमाड-पुणे पॅसेंजर, साईनगर-जालना डेमो पॅसेंजर या प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

फलाटावर पोलिस बंदोबस्त

दरम्यान रेल्वे पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हे काम पूर्ण करण्यात आले. काम पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. रेल्वे सुरक्षा बल पोल‌सि निरीक्षक के. डी. मोरे व सहकाऱ्यांनी चोख पोल‌सि बंदोबस्त ठेवला.

उद्या पुन्हा ‘ब्लॉक’

गुरुवारी (दि.२३) मनमाड रेल्वे स्थानकात अशाच प्रकारचा मेगा ब्लॉक ठेवण्यात येणार असल्याचे व पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

बसेसला गर्दी

मेगा ब्लॉकमुळे रेल्वेचे प्रवाशांनी बसस्थानकांकडे मोर्चा वळविला. गाड्या रद्द झाल्यामुळे मनमाडहून सुटणाऱ्या काही बसेसला प्रचंड गर्दी होती. नाशिकरोड-भुसावळ, भुसावळ-नाशिकरोड या दोन्ही पॅसेंजर गाड्या रद्द असल्याने मनमाड-नाशिक दरम्यान निफाड-लासलगाव-कसबे-सुकेणे-नांदगाव येथे जाणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मेगा ब्लॉकमुळे विविध एक्स्प्रेस उशिराने धावत होत्या. महानगरी एक्स्प्रेससह काही गाड्या फलाट क्रमांक सहावरून रवाना करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्डम, डीपीएस, जुन्नरेचा संघ विजयी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रासबिहारी क्रिकेट करंडक २०१७-१८तील दुसऱ्या दिवशी सकाळ सत्रात विस्डम हायस्कूल आणि पुरुषोत्तम स्कूलच्या संघात झालेल्या सामन्यात विस्डम हायस्कूलने ३२ धावांनी विजय मिळविला. तर दुपारच्या सत्रात दिल्ली पब्लिक स्कूल आणि फ्रावशी अकॅडमी स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली स्कूल संघाने ८ गडी राखून विजय मिळविला.

रासबिहारी क्रिकेट करंडक २०१७-१८चे आयोजन रासबिहारी इंटरनॅशनल शाळेकडून करण्यात आले आहे. सकाळ सत्रादरम्यान जी-१ मैदानावर पुरुषोत्तम स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विस्डम हायस्कूलने २० षटकांत सर्व गडी गमावून ११९ धावा केल्या. प्रतिउत्तर देताना पुरुषोत्तमचा संघ १८ व्या षटकात ८६ धावांवर सर्व गडी गारद झाले. विस्डम हायस्कूलचा मास्टर साहिल पारीखला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने ४ षटकात ४ बळी घेतले. या सामन्यासाठी विवेक केतकर आणि सतीश हांडोरे हे अंपायर होते.

दुसरीकडे जी-२ मैदानावर दुपारच्या सत्रात दिल्ली पब्लिक स्कूल आणि फ्रवशी अकॅडमी स्कूल या संघांमधे झालेल्या सामन्यात दिल्ली पब्लिक स्कूल संघाने ८ गडी राखून मोठ्या दिमाखात विजय मिळविला. दरम्यान दिल्ली पब्लिक स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फ्रवशीच्या संघ ७७ धावांतर गारद झाला. दिल्ली स्कूलच्या संघाने ११.४ षटकांत दोन गडी गमावून सामना जिंकला. दिल्ली स्कूल संघाचा शिवम

काकडे यास सामनावीर घोषित करण्यात आले. रंगुबाई जुन्नरे स्कूल आणि अशोका यूनिव्हर्सल स्कूल (चांदसी) संघांमधे झालेल्या चुरशीच्या सामन्यात
रंगुबाई जुन्नरे संघाने २५ धावांनी विजय मिळविला. रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडियम स्कूलने २० षटकात ५ बडी गमावून १२७ धावांचे केल्या. अशोकाचा (चांदसी) संघ २० षटकात १०८ धावाच करू शकला. जुन्नरे स्कूल संघाचा साहिल अखाडे यास सामनावीर घोषित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात आजपासून मिळणार दाखले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शैक्षणिक कामासह जवळपास इतर सर्वच शासकीय योजनांच्या लाभासाठी महत्त्वाचा ठरणारा अन् गावोगावच्या सज्जावरील तलाठी तात्यांकडून तब्बल गेल्या दीड महिन्यांपासून देणेच बंद झालेला उत्पन्नाचा दाखला बुधवारपासून (दि.२२) मिळणार आहे. नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी अर्जदारांकडून स्वयंघोषणापत्रासह एका विशिष्ट नमुन्यात अर्ज भरून घेवून उत्पन्नाचा हा दाखला देण्याबाबत येवला तालुक्यातील तलाठी संघाने निर्णय घेतला. त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्याची मोठी कोंडी तात्पुरती का होईना फुटली आहे.

तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखला मिळव‌ण्यिासाठी आधी तलाठ्याकडील दाखला गरजेचा असतो. मात्र गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून तात्यांकडील दाखला कोंडीत सापडला आहे. यावर महाराष्ट्र टाइम्सने सोमवारच्या (दि.२०) अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर येवला तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी तालुक्यातील तलाठ्यांशी याविषयावर चर्चा केली. त्यातून नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी अर्जदाराकडून स्वयंघोषणापत्रासह एका विशिष्ट नमुन्यात अर्ज भरून घेवून उत्पन्नाचा दाखला देण्याची भूमिका तलाठ्यांनी घेतल्याने उत्पन्नाच्या दाखल्यांचा विषर्य मार्गी लागणार आहे.

तहसील स्तरावर दिले जाणारे उत्पन्नाचे दाखले बंद नसून, तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला प्राप्त होताच तत्काळ दाखले देण्याची करण्याची कार्यवाही होईल.

- नरेशकुमार बहिरम, तहसीलदार, येवला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्यामुळे उत्पादकांना अच्छे दिन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

सध्या सगळीकडे ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळले असले, तरी कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळत आहे. मनमाड नांदगावसह चांदवड बाजार समितीत मंगळवारी कांद्याला तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चांदवड बाजार समितीत लाल कांद्याने थेट ३८१६ रुपयांपर्यंत मजल मारली.

लाल व उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चांदवड नांदगाव मनमाड व बोलठाण बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. चांदवड समिती खालोखाल नांदगाव बाजार समितीत मंगळवारी उन्हाळी कांद्याने चांगला भाव खाल्ला. तब्बल ३६१२ असा भाव मिळाल्याने शेतकरी खुशीत होते. मनमाडमध्ये कमाल ३३६० व बोलठाणमध्ये २९२० भाव मिळाला. नांदगावमध्ये लाल कांद्याची १७७ वाहने, मनमाडमध्ये ५०० वाहने असल्याचे प्रशासनाने सांगितले. बहुतांश समित्यांत कांदा तीन हजारांच्या पुढे गेल्याचे चित्र आहे. ढगाळ हवामानामुळे रब्बी पिके संकटात सापडली असली तरी घरात आलेला कांदा चांगला भाव देत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार कदमांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

महावितरण, जलसंपदा विभाग आणि सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार अनिल कदम यांनी विविध प्रश्नांवर जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. पालखेड, शिरवाडा, कुभांरी, वावी, गौरठाण, लोणवाडी, दावचवाडी, आहेरगाव आदी भागातील शेतकऱ्यांसह या अधिकाऱ्यांची पालखेड मिरचीचे येथे बैठक बोलावली. या बैठकीत तीनही विभागाबाबात शेतकऱ्यांनी तक्रारी मांडल्या.

पालखेड, शिरवाडा, कुभांरी, वावी, गौरठाण, लोणवाडी, दावचवाडी, आहेरगाव आदी भागातील शेतकऱ्यांनी वीजेचे भारनियमन, गैरसोयीचे वेळापत्रक, पालखेड कालव्याचे आवर्तन, शिवार रस्ते आदी प्रश्नांबाबत निफाडचे आमदार अनिल कदम यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार अनिल कदम यांनी पालखेड मिरचीचे येथे बैठक बोलावली.

वीजवितरण कंपनीने तत्काळ शेतकऱ्यांच्या सोयीचे वेळापत्रक तयार करून व‌जिेचा दिवसा व अंखडीत पुरवठा करावा. तसेच कृषीपंपांचे वाजवी व निर्दोष बिले घ्यावे, असे फर्मान आमदार कदम यांनी काढले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच पालखेड कालव्याच्या आर्वतनाचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. आमदारांसह शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

पालखेड, शिरवाडासह दावचवाडी, लोणवाडी परिसरात अनेक दिवसांपासून भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन शेतकऱ्यांसाठी गैरसोयीचे आणि धोक्याचे आहे. तसेच वीजबिलातही तीन अश्वशक्तीच्या कृषी पंपास पाच अश्वशक्तीचे, तर पाच अश्व शक्तीच्या कृषीपंपास साडेसात अश्वशक्तीचे बिल आकारून शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. आमदार कदम यांनी दखल घेत अधिकाऱ्यांसमवेत पालखेड येथे शेतकरी दरबारच भरविला आणि सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी अशोक आहेर, सभापती पंड‌तिराव आहेर, ज‌ि. प. सदस्य दीपक शिरसाठ, गटविकास अधिकारी वैशाली रसाळ, लोणवाडीचे सरपंच सुभाष चोपडे, पालखेडच्या सरपंच शकंतला जाधव आदींसह महावितरण, जलंसपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्वमेध स्पर्धेसाठी ८३ खेळाडूंची निवड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय क्रीडा महोत्सवाचा मंगळवारी समारोप झाला. विविध क्रीडा प्रकारांत सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेत कोल्हापूर विभागाने आपले वर्चस्व कायम राखत बाजी मारली. सांघिकमध्ये विदर्भाने जोरदार लढत देत विजेतेपद पटकावले. दोन दिवस चाललेल्या एकूण १७ क्रीडा प्रकारांतून वैयक्तिक व सांघिक गटातून एकूण ८३ विद्यार्थ्यांची दापोली येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठीय अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहिःशाल विभागातर्फे आयोजित केंद्रीय क्रीडा महोत्सवाच्या मैदानी स्पर्धेत धावणे १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ५००० मीटर, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, ४ x १०० रिले, ४ x ४०० या मैदानी स्पर्धा झाल्या.

विद्यार्थ्यांना धावपटू कविता राऊत, नाशिक ग्रामीणचे पोल‌िस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते सुवर्णपदक, रजतपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. निशिगंधा पाटील आणि स्नेहा राठोड यांनी परिचय करून दिला. डॉ. विजया पाटील यांनी आभार मानले.





विजेते संघ आणि प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१४ दरम्यान दापोली येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठीय अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

विविध स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –

वैयक्तिक खेळ :-

तिहेरी उडी (मुले) : निखील पावले (कोल्हापूर)

तिहेरी उडी (मुली) : शामल व्यवहारे (अमरावती)

थाळीफेक मुले : अभिनंदन पाटील (कोल्हापूर)

थाळीफेक मुली : मयुरी कदम (नांदेड)

भालाफेक मुले : धम्मराज परघरमोल (अमरावती)

भालाफेक मुली : कीर्ती दुकाने (कोल्हापूर)

लांब उडी मुले : धिरज पाटील (कोल्हापूर)

लांब उडी मुली : अश्विनी जगदाळे (पुणे)

उंच उडी मुले : वीरेंद्र उज्जैनकर (अमरावती)

४ x १०० मीटर मुले : कोल्हापूर विभाग प्रथम, उपविजेता नाशिक विभाग

४ x १०० मीटर मुली : कोल्हापूर विभाग प्रथम, उपविजेता पुणे विभाग

४ x ४०० मीटर मुली : पुणे विभाग प्रथम, उपविजेता कोल्हापूर विभाग

१०० मीटर मुले : धिरज पाटील (नाशिक)

१०० मीटर मुली : प्रियांका पवार (अमरावती)

२०० मीटर मुले : प्रकाश तनगे (कोल्हापूर)

२०० मीटर मुली : सिमरन शेख (कोल्हापूर)

४०० मीटर मुले : देवेंद्र वसावे (नाशिक)

४०० मीटर मुली : सिमरन शेख (कोल्हापूर)

८०० मीटर मुले : अमित भडकमकर

८०० मीटर मुली : शारदा धाड

१५०० मीटर मुले : सुमय्या अय्युब (अमरावती)

१५०० मीटर मुली : शारदा धाड (अमरावती)

५००० मीटर धावणे मुले : विशाल तामकर (कोल्हापूर)

५००० मीटर धावणे मुली : सुमय्या अय्युब (अमरावती)

सांघिक खेळ :-

खो-खो, मुले : नागपूर संघ विजयी, नाशिक उपविजेते

व्हॉलीबॉल, मुले : नांदेड विभागीय केंद्र विजयी, नाशिक विभागीय केंद्र उपविजेते

बास्केटबॉल, मुले : नांदेड संघाचा कोल्हापूरवर १९ गुणांनी विजय

कबड्डी - मुले : अमरावती विजयी, नाशिक उपविजेते जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास ठेवून क्रीडा क्षेत्रात कामगिरी केल्यास यश निश्चित मिळेल. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे वळायला हवे.- कविता राऊत, धावपटू


जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या कविता राऊत हिचा आदर्श समोर ठेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी.-- संजय दराडे, पोल‌िस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोडाऊनसह घरे भस्मसात

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहरातील कोर्ट रोडवरील एका भंगार दुकानासह गोडाऊनला मंगळवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. गोडाऊनसह नजीकची काही घरे या आगीत जाळून खाक झाली. तब्बल साडेचार तासांपेक्षा अधिक वेळ धूसमुसणाऱ्या या आगीत भंगार दुकानदाराचे लाखोंचे नुकसान झाले. तसेच जवळच्या घरांमधील संसारोपयोगी साहित्यांसह एक दुचाकी आगीत जळाली.

सुदैवाने या भीषण आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी साडेतीन तास प्रयत्न करावे लागले. येवला शहरातील कोर्ट रोडवर तालुका पोल‌सि स्टेशनपासून काही अंतरावर तबरेज रसूल शेख यांचे भंगार दुकान व गोडाऊन आहे. जवळपास दोन गुंठे क्षेत्रातील या भंगार गोडाऊनला मंगळवारी पहाटे सव्वाचार साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने काही क्षणातच मोठा भडका घेतला. आग लागल्यानंतर जवळपास अर्धा तासाने जागे झालेल्या तबरेज शेख व त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या परिसरात राहणारे नगरसेवक शफिकभाई शेख यांच्याकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. शफिकभाई यांनी तत्काळ येवला नगरपालिकेच्या दोनही अग्निशमन विभाग, पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ मनमाड व कोपरगाव नगरपालिकेशी संपर्क साधत तेथील अग्निशमन बंब बोलावले. अग्निशमन बंब येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.

रौद्ररूप धारण केलेल्या या आगीत भंगार गोडाऊन संपूर्ण जळून खाक झाले. गोडाऊनलगत असलेल्या संजय वरदे व फारुख शेख यांच्या घरांनाही मोठी झळ बसली. वरदे यांची दुचाकी यात भस्मसात झाली. त्यांच्या घराचेही आगीत नुकसान झाले. फारुख शेख यांचे घर या भीषण आगीच्या चपाट्यात सापडून घरातील संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.भंगार गोडाऊन मधील प्लास्टिक व फायबर कटिंगचे किंमती मशिन, तसेच रद्दी,प्लास्टिक,लोखंड आदी मोठया प्रमाणावर असलेले भंगार सामान असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात नाही

येवला पालिकेचे दोन, तर मनमाड व कोपरगाव नगरपालिकेचा प्रत्येकी एक अशा एकूण चार बंबांनी पाण्याचा जोरदार मारा करूनही आग आटोक्यात येत नव्हती. त्यासाठी अग्निशमन बंबांना पाणी भरण्यासाठी येवला जलशुद्धीकरण केंद्रावर अनेक फेऱ्या माराव्या लागल्या. अग्निशमन चालक तसेच इतर कर्मचाऱ्यांसह शफिकभाई शेख, निसारभाई शेख, अमजदभाई शेख या तिघा नगरसेवकांसह माजी नगरसेवक रिजवान शेख, निसारभाई निंबूवाले, निसारभाई भंगारवाले आदींसह परिसरातील नागरिकांनी मदत केली.

वरदे यांच्यामुळे टळली जीवितहानी

भंगार गोडाऊनला आग लागली तेव्हा नजीकच्या फारुख शेख यांच्या घरास फारुख शेख, त्यांची पत्नी, लहान मुले पहाटेच्या साखरझोपेत होते. आगीने शेख यांच्या घरास आगीने विळखा घातल्याचे लक्षात येताच जवळ राहणारे संजय वर्दे यांनी तत्काळ शेख यांच्या घराकडे धाव घेतली. स्वतःचा जीव धोक्यात घालत संजयने फारुख यांचे दार जोरजोरात वाजवत त्यांना जागे केले. तसेच त्यांना घराबाहेर काढण्यासही मदत केली. संजय वरदे यांच्या या समयसूचक पावलांमुळे जीवितहानी टळली. मात्र, या प्रयत्नात संजय वरदे यांचे हात भाजले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भोंदूबाबाच्या कोठडीत सात दिवसांची वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठाणे येथील भोंदू बाबा उद्यराज रामआश्रम पांडे याच्या पोलिस कोठडीत मंगळवारी कोर्टाने सात दिवसांची वाढ केली. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील दोन तर नाशिकमधील एका सराफाकडील सोने हस्तगत करणे, ऑनलाइन बँकिंगमार्फत ट्रान्सफर झालेल्या पैशांचा शोध घेणे यासाठी सरकारी पक्षाने संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती केली होती.

मूळ उत्तर प्रदेश राज्यातील जौनपूर येथील भोंदूबाबा पांडेने ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथे बस्तान बांधले होते. पाच मुले व पत्नी असलेल्या पांडेने धार्मिक पूजांच्या माध्यमातून भक्त परिवार जोडला. त्यात नाशिकमधील एक कुटुंब होते. या कुटुंबातील १८ वर्षाच्या मुलीला अर्धवट पूजा सोडल्याचा धाक दाखवत संशयित आरोपीने लाखो रुपये उकळले. अगदी या पीडित मुलीला दुसऱ्याच्या घरात चोरी करण्यास भाग पाडल्यानंतर पांडेचे भिंग फुटले. सरकारवाडा पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी पांडेला बेड्या ठोकल्या होत्या. तपासासाठी कोर्टाने त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यास मंगळवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले.

सराफांना विकले सोने

सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या सहायक निरीक्षक सारिका आहिरराव व त्यांच्या पथकाने मागील सात दिवसात जैनपूर येथे पोहचून २९ तोळे सोने जप्त केले. परतीच्या प्रवासात असताना पांडेने जौनपूर येथीलच आणखी दोन सराफांना सोने विकल्याची कबुली दिली. भोळ्या भक्तांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळणाऱ्या पांडेने जौनपूर येथे अलिशान बंगला असून, नातेवाइकांमार्फत अनेक आर्थिक व्यवहार पार पाडले आहेत.

नातेवाइकांच्या खात्यात पैसे वर्ग

संशयित पांडेने नाशिकमधील एका सराफास सोने विकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तसेच या गुन्ह्यातील फिर्यादी असलेल्या पीडित मुलीने पांडेच्या बँक खात्यात एक लाख ३० हजार रुपये वर्ग केले होते. हे बँक खाते पांडेच्या नातेवाइकाचे असून, तोही जौनपूरचा रहिवाशी आहे. या सर्व घटनांचा तपास करण्यासाठी पांडेच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली असून, लवकरच सरकारवाडा पोलिसांचे एक पथक जौनपूरकडे रवाना होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिथॉन प्रदर्शनाचे उद्या उद्‍घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कृषी क्षेत्रात अहोरात्र राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या कृषीथॉन या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला गुरूवारपासून (दि. २३) नाश‌िक येथे सुरुवात होते आहे. राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता ठक्कर डोम येथे या प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार आहे. राज्यातून आणि परराज्यांतून तब्बल अडीच लाख लोक या प्रदर्शनाला भेट देतील असा विश्वास आयोजकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ह्यूमन सर्व्ह‌िस फाउंडेशन आणि मीडिया एक्झ‌िबिटर्स यांच्यातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. एबीबी सर्कल आणि सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर डोम येथे होणाऱ्या या प्रदर्शनाचे यंदाचे बारावे वर्ष आहे. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रदर्शन होत असून प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, निर्मला गावीत, नीलिमा पवार आदी मान्यवर उपस्थ‌ित राहणार आहेत. प्रदर्शन २७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्याची तयारी अंत‌िम टप्प्यात आल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर आणि साहिल न्याहारकर यांनी दिली.

न्याहारकर म्हणाले, की निसर्गाचे दृष्टचक्र आणि तत्सम अनेक कारणांमुळे शेतकरी नाउमेद झाला आहे. त्याला उमेदीने उभे करण्याचे काम हे कृषिथॉन प्रदर्शन करेल. देशविदेशातील एकूण ३५० कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. शेतीसाठीची अवजारे, ट्रॅक्टर, सोलर याचे अनेक पर्याय येथे शेतकऱ्यांना पहावयास मिळतील. गेल्या वर्षी सुमारे पावणेदोन लाख नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. यंदा अडीच लाख लोक प्रदर्शनाला भेट देतील, असा अंदाज साहिल न्याहारकर यांनी व्यक्त केला. शेती क्षेत्रातील चांगले प्रयोग जाणीवपूर्वक पुढे आणण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. शेळीपालन, कु्क्कुटपालन, शेत तळ्यांमध्ये मत्स्यपालन, अन्नप्रक्रिया उद्योग या सारख्या विविध पूरक व्यवसायांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी परिसंवाद, चर्चासत्रांचा लाभही या चार दिवसांत शेतकऱ्यांना घेता येणार आहे. दुग्ध उत्पादकांसाठी विशेष परिसंवाद होणार असून राज्यस्तरीय नर्सरी उद्योजकांची परिषद होणार आहे.

युवा शेतकऱ्यांचा होणार सन्मान

युथ इन अॅग्रीकल्चर ही संकल्पना आयोजकांकडून राबविली जात आहे. त्याअंतर्गत शेती क्षेत्रासाठी भरीव कार्य करणारा यशस्वी उद्योजक, यशस्वी संशोधक, यशस्वी युवा शेतकरी आणि एका महिला शेतकऱ्याला या प्रदर्शनामध्ये युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कृषी अभ्यासक्रमांमध्ये यश संपादन करणाऱ्या राज्यातील ३६ विद्यार्थ्यांना या प्रदर्शनामध्ये गौरविण्यात येणार आहे. काही स्वयंसेवी संस्था तसेच गावांना जलसंवर्धक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रासाठी लवकरच कृषिथॉनतर्फे इ नियतकालिक तसेच नियतकालिक लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही न्याहारकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ कार्यालयात जुन्या वाहनांचे भंगार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

शहरातील आर. टी. ओ. कार्यालयात जुन्या रिक्षा, ट्रक आणि इतर वाहनांचे भंगार गेल्या कित्येक दिवसांपासून पडलेले आहे. यामुळे या प्रवेशद्वारातून आत येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता हे प्रवेशद्वार खुले करण्यात येणार असल्याने त्यासाठी या भंगार तातडीने हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वाहतूक शाखेच्या कार्यालयाचे तिसरे प्रवेशद्वार काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे याकडे लक्ष जात नव्हते पण आता हे प्रवेशद्वार मोटर सायकल पार्किंगसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रवेशद्वाराजवळील जुन्या रिक्षा, ट्रक आणि इतर वाहनांचे भंगार हटविण्याची मागणी केली जात आहे. यामुळे या प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होईल. तरी ही समस्या सोडविण्याची मागणी वाहनचालकाकडून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृह मिळेना

$
0
0

मनपाच्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना नाहक त्रास

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानात प्रत्येकाच्या घरात स्वच्छतागृह असावे यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु, असे असताना आजही अनेक घरांमध्ये स्वच्छतागृहे नसल्याने उघड्यावर शौच करण्याची वेळ येत आहे. नाशिक महापालिकेत आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिलांनादेखील स्वच्छतागृहाची सुविधा मिळत नसल्याने चक्क कामाच्या ठिकाणाहून घरी जाण्याची वेळ येते. यामुळे महिला कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिलांच्या या समस्येबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडेही महिला कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी मांडल्या. मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत त्वरित ही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियानात जाहिरातींद्वारे सरकार प्रबोधन करताना दिसते. परंतु, दुसरीकडे आरोग्याचे काम करणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेच्या आयुक्तांनीच याकडे लक्ष देत शहरात गरजेच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.


रहिवाशी भागातही स्वच्छतागृहे उभारा

स्वच्छ भारत अभियानात केंद्र व राज्य सरकारनेच प्रत्येकाच्या घरी शौचालय असावे यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु, सार्वजनिक ठिकाणीही शौचालयांची व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. शहरात मुख्य रस्त्यांवर सरकारकडून स्वच्छतागृहांच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. परंतु, रहिवाशी भागातदेखील गरजेच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारली जावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

महापालिकेच्या आरोग्य विभागात शेकडो महिला कर्मचारी काम करतात. आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था मिळत नसल्याने गैरसोय होत असल्याचे चित्र सध्याला तरी दिसू लागले आहे. अनेकदा कामाच्या ठिकाणाहून घरी जाण्याची वेळ महिला कर्मचाऱ्यांवर येत असते. याबाबत अनेकदा महिला कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, याकडे वरिष्ठ अधिकारीच लक्ष देत नसल्याने स्वच्छ आरोग्यासाठी झटणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातांना आमंत्रण

$
0
0


तुषार देसले, मालेगाव

शहरातील बहुतांशी रस्ते हे वाहनचालकांसाठी धोकादायक बनले आहेत. कॉलेज स्टॉप ते रावळगाव नाका दरम्यान असलेल्या कॉलेज रोडवरून होणारी वाहतूक धोकादायक झाली आहे. प्रशस्त रस्ता असला तरी रस्त्यालगत फूटपाथ, भुयारी मार्ग नसणे यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवूनच शाळेची वाट धरावी लागत आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्डे, वाढती रहदारी, अतिक्रमण या समस्या शहरवासीयांना नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र कॉलेज रोडवरील वाहतूक समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शहरातील अनेक शैक्षणिक संस्था तसेच कॅम्प परिसरात जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. साक्री, नामपूरसह अनेक गावांतून होणारी प्रवासी वाहतूक याच रस्त्याने होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी खूप वाढली आहे. या रस्त्यालगत आर. बी. एच. कन्या विद्यालय, भारत विद्यालय, महिला कॉलेज, आदिनाथ स्कूल, एलव्हीएच स्कूल, केबीएच व मसगा महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक याच रस्त्याने प्रवास करतात.

बाईकरायडर्सला आवरा

बरेच दिवस खड्डेमय असलेला हा रस्ता अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त केला असला तरी त्यावरील समस्या संपलेल्या नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ नाहीत. दुभाजक, पथदिवे नाहीत. रस्त्यावर कोठेही ‘पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा’ असे सूचना फलक नाहीत. शाळांजवळ गतिरोधक नावालाच आहेत. त्यात अनेक कॉलेजतरुण धूमस्टाइलने दुचाकी चालवित असल्यामुळे त्यांना पायबंद घालण्यासाठी या रस्त्यावर कोठेही पोल‌सि यंत्रणा तैनात नसते. या समस्याबाबत लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने उपयोजना कराव्यात अशी मागणी विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून होत आहे.

भुयारी मार्ग होणे गरजेचे

शाळा व महाविद्यालयाच्या सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेला विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. अशा वेळी शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. याचवेळी भरधाव वेगाने येणारे दुचाकी, रिक्षाचालक यांच्यामुळे अपघात होण्याची भीती कायम असते. अनेकदा अपघात झालेलेही आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांसमोर अंडरपास (भुयारी मार्ग) होणे भविष्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभाजकाबाबत दुजाभाव?

$
0
0

त्र्यंबकेश्वर रोडवर अपघातांत वाढ; वाहनचालकांची गैरसोय

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेवर मनसेच्या सत्ताकाळात अनेक रस्त्यांची कामे करण्यात आली होती. यामध्ये त्र्यंबकेश्वर रोडचेही डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु, त्र्यंबकरोडला महापालिकेच्या हद्दीत दुभाजक टाकताना दुजाभाव करण्यात आला आहे. तरी याकडे लक्ष देत तातडीने पिंपळगाव बहुलाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे दुभाजक टाकून वाहनचालकांची गैरसोय थांबवावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

महापालिकेवर मनसेची सत्ता असल्यावर झालेल्या रस्त्यांच्या कामामध्ये त्र्यंबकेश्वर रोडवरील रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी दुभाजक नसल्याने वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या रोडवरील पिंपळगाव बहुला गावाकडे जाणाऱ्या रोडवरचे दुभाजक गेले कुठे, असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. अनेकदा झालेल्या अपघातात दुभाजक नसल्याने दुचाकीचालकांना प्राण गमविण्याची वेळ आली. परंतु, याकडे महापालिकेचा बांधकाम विभाग कधी लक्ष देणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दुभाजक नसल्याने अपघातात वाढ झाली असल्याचे पिंपळगाव बहुला ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने तत्काळ त्र्यंबकेश्वर रोडवर दुभाजक टाकावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

दुभाजक टाकताना समृद्धनगर ते पिंपळगाव बहुला गावाचा भाग सोडला आहे. दुभाजक नसल्याने अनेकदा दुचाकीचालकांना अपघाताला बळी पडावे लागते. याकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

-मिलिंद नागरे,

रहिवाशी, पिंपळगाव बहुला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार हजार सहकारी संस्थांची नोंदणी रद्द

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात सहकार चळवळीचे जाळे मोठे असले तरी आता संस्था रद्द होण्याची संख्या वाढू लागली आहे. नाशिक सहकार विभागात असलेल्या पाच जिल्ह्यांत आतापर्यंत ४ हजार ५५१ विविध सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यात नाशिक जिल्हा आघाडीवर असून, या जिल्ह्यातील तब्बल १२४० संस्था सहकार खात्याने रद्द केल्या आहेत. त्याखालोखाल अहमदनगरचा नंबर असून, या जिल्ह्यात १११५ संस्था रद्द झाल्या आहेत. सहकारी संस्थांचे जाळे सर्वत्र पसरावे यासाठी प्रयत्न केले जात असताना ही गोष्ट सहकारी चळवळीला मारक आहे. नोंदणी रद्द केलेल्या संस्थांमध्ये धुळ्याच्या ८९०, नंदुरबारच्या ४०७ व जळगावच्या ८९९ संस्थांचा समावेश आहे.

नाशिकला गडकरी चौकात सहकारी संस्था सहनिबंधकांचे विभागीय कार्यालय असून, या कार्यालयातून पाचही जिल्ह्यांतील कारवाईची एकत्रित माहिती देण्यात आली. या रद्द झालेल्या संस्थांबरोबरच अवसायनात काढण्यात आलेल्या संस्थांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत अंतिम आदेश काढलेल्या संस्थांची संख्या ९ हजार ४४ इतकी आहे. विशेष म्हणजे या संस्थांमध्ये पुनर्जीवित केलेल्या संस्थांची संख्या अवघी ३३० आहे. लेखापरीक्षण पूर्ण करण्यात आलेल्या संस्थांची संख्या अवघी ७४ इतकी आहे.

या संस्थांमध्ये पतसंस्था, सहकारी बँका, गृहनिर्माण संस्थ यांसह सहकारातल्या विविध संस्थांचा समावेश आहे. अवसायनात काढून नंतर रद्द झालेल्या या संस्थांमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, त्यातून सहकार चळवळीचे दारही बंद झाले आहे. राज्यात सहकार चळवळ सर्वाधिक रुळल्यानंतर त्यातील गैरप्रकारांमुळे अनेक संस्था डबघाईस आल्या व त्यातून हे रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. सहकार विभागाची रद्द झालेल्या संस्थांची व अवसायनात गेलेल्या संस्थांची आकडेवारी ऑक्टोबरअखेरची आहे. या कारवाईची सुरुवातीची नोंद मात्र वेगवेगळ्या सालातील असून, २०१५ पासून मागील कारवाईच्या आकडेवारीचा समावेश करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.


अवसायानातील संस्था

नाशिक - ३८१३

धुळे - १५३६

नंदुरबार - ५३३

जळगांव - १३३४

अहमदनगर - १८२८

रद्द झालेल्या संस्था

नाशिक - १२४०

धुळे - ८९०

नंदुरबार - ४०७

जळगाव - ८०९

अहमदनगर - १११५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकांनो, मराठीत पाट्या लावा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
मराठी राज्य भाषेचा सन्मान करण्यासाठी सर्व बँकांचे फलक मराठीत असले पाहिजे. तसेच पासबुक, खिडक्यांवरील सूचना व फलक, कर्मचाऱ्यांचे ग्राहकांशी संवाद मराठी भाषेतच असले पाहिजे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र राज्य भाषा सन्मान आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात बुधवारी (दि. २२) पंचवटीतील बँकांमध्ये जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
महाराष्ट्रातील अनेक शिक्षण संस्था, बँका, दुकाने आणि अस्थापनांमध्ये मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. सर्व संस्था, दुकाने व अस्थापनांना मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकाने आणि संस्था अधिनियम १९४८ अन्वये बंधनकारक आहे. महाराष्ट्रात मराठी राजभाषा असल्याचे घोषित करणारा कायदा विधानमंडळात मंजूर होऊन ११ जानेवारी १९६५ रोजी महाराष्ट्र राजपत्रातून जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या राजभाषेचा सन्मान व्हायला पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे.
सर्व राष्ट्रीयीकृत ‌बँकांमध्ये कामकाज व्यवहारासाठी वापरली जाणारी चलने मराठीत असावीत. त्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्याचे निवेदन पंचवटीतील बँकांना माजी महापौर अशोक मुर्तडक, अॅड. राहुल ढिकले, अनंत सूर्यवंशी, संदीप भवर आदींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटातर्फे २७पासून‘विंटर फिटनेस फेस्टिव्हल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि नवीन डान्स अकॅडमी घेऊन आलाय खास कल्चर क्लब सदस्यांसाठी विंटर फिटनेस फेस्टिवल’. २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर असा १० दिवस हा फिटनेस फेस्टिवल चालणार आहे. या फेस्टिवलमध्ये झुम्बा, बोकवा, स्टेप एरोबिक्स, बुट कॅम्प या डान्स प्रकारांचे कॉम्बिनेशन शिकवले जाणार आहे. शिवाय डाएटसंदर्भातील टीप्स आणि योगाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. कल्चर क्लब सदस्यांना यासाठी कुठलेही शुल्क मोजावे लागणार नाही. मात्र, रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश देण्यात येणार नाही.

हिवाळा आला की, अनेकजण सकाळी जॉगिंगला जाण्याचा संकल्प करतात. पण थंडीमुळे हा संकल्प काही प्रत्यक्षात उतरत नाही आणि फिटनेस फक्त विचारापुरताच मर्यादित राहतो. पण यंदा हा फिटनेस प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब तुम्हाला ही संधी उपलब्ध करून देत आहे.

कॉलेजरोडवरील फिटनेस लाउंज या ठिकाणी विंटर फिटनेस फेस्टिवल होणार आहे. सकाळी ८ ते ९, दुपारी ११ ते १२, संध्याकाळी ५ ते ६ आणि रात्री ८ ते ९ या वेळेत तुम्ही यात सहभागी होऊ शकता. पूर्ण १० दिवस या फिटनेस संदर्भातील बॅचेस असतील. त्यामुळे याचे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. कल्चर क्लब सदस्यांना यासाठी कुठलेही शुल्क मोजावे लागणार नाही. इतरांसाठी ४०० रुपये रजिस्ट्रेशन फी ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश देण्यात येणार नाही. त्यासाठी आधीच रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क - ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याभरात बुजविले १४५० किमीवरील खड्डे

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाभर सुरू केलेल्या खड्डे बुजविण्याच्या मोहिमेतून जिल्ह्यातील राज्य महामार्गाचे १६८५ कि. मी. पैकी ८१८ कि. मी. वरील खड्डे बुजविले आहे. याची टक्केवारी ४८ टक्के असून ५२ टक्के काम अद्यापपर्यंत बाकी आहे. त्याचप्रमाणे प्रमुख जिल्हा मार्गाचे २५०४ कि. मी. पैकी ६३२ कि.मी. चे खड्डे बुजविण्यात आले असून, याची टक्केवारी २५ टक्के आहे. आतापर्यंत या दोन्ही रस्त्याचे १ हजार ४५० कि. मी. वरील खड्डे बुजविण्यात आले असून २ हजार ७३९ कि. मी. रस्त्याचे काम बाकी आहे. हे सर्व कामे सार्वजिक बांधकाम विभागाने १५ डिसेंबपर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवले आहे. याची सरकारने ३१ डिसेंबर ही डेडलाइन दिली आहे.

दिवाळीनंतर या खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील राज्य महामार्गाचे १० नोव्हेंबरपर्यंत सर्व खड्डे बुजविण्याचे लक्ष्य ठेवले. पण, २२ नोव्हेंबरपर्यंत ५२ टक्के काम बाकी आहे. प्रमुख जिल्हा मार्गाचे १५ डिसेंबर हेच लक्ष्य होते. त्यात आतापर्यंत ते २५ टक्के पूर्ण झाले आहे. सुरुवातीला बांधाकाम कंत्राटदारांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे या कामाला उश‌रिा सुरुवात झाली. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीमुळे हे काम लांबणीवर पडले. सुट्टी संपल्यानंतर हे काम सुरू झाले असले तरी त्याला अधिक गती देण्याची गरज आहे. खड्डे बुजविण्याच्या कामाचा आढावाही रोज घेतला जात आहे. काम झाले की त्याची माहिती फोटो काढून अपलोड केली जात आहे. त्यामुळे राज्यात किती काम झाले याचा डेटाही तयार होत आहे. या खड्डे बुजविण्याच्या कामात काही ठिकाणी माती टाकल्याच्या तक्रारीही होत्या. त्यामुळे हे काम दर्जेदार असावे ही अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील सर्व खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, ते १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. जिल्ह्यातील राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. त्याचा रोज आढावा घेतला जात आहे.

- रणजित हांडे,

अधीक्षक अभियंता, सा. बां. विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंपाषष्ठीसाठी खंडोबा मंदिरांत जय्यत तयारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पुरातन काळापासून खंडेराय हे महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते. राज्यातील अठरापगड जातींमध्ये खंडेरायाला विशेष मानाचे स्थान आहे. त्यामुळे घरा-घरातील देव्हाऱ्यात खंडेरायाच्या टाकाची स्थापना केलेली दिसते. चंपाषष्ठीला खंडेरायाची मोठ्या भक्त‌िभावाने आणि श्रद्धेने पूजा केली जाते. ‘भंडाऱ्याचा भडका आणि खोबऱ्याचा कडका’ करीत तळी भरण्याची प्रथा आजही घरोघरी आहे. भरीत-भाकरी आणि पुरणाचा नैवद्य दाखविण्यात येतो. शुक्रवारी (दि. २४) होणाऱ्या चंपाषष्ठीला खंडेरायाच्या आराधनेसाठी नाशिकनगरी सजली आहे.

चंपाषष्ठीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरातील खंडेराय महाराजांच्या मंदिरांना रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कपुरथळा मैदानाजवळील गंगाघाटावर असलेल्या खंडेरायाच्या मंदिरात रविवारी (दि. १९) देव घटी बसविण्यात आले आहेत. सहा दिवसांच्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. चंपाषष्ठीच्या दिवशी पहाटे ५ वाजता काकडा आरती होईल. दुपारी अभिषेक पूजा करण्यात येईल. सोमनाथ बेळे यांच्या हस्ते खंडेराय महाराजांना नैवेद्य अर्पण करण्यात येईल. भाविकांना दर्शनासाठी मंदिरात जाणे सोयीचे व्हावे यासाठी बॅरिकेटस् लावण्यात येणार आहेत. चंपाषष्ठीनिमित्ताने भरणाऱ्या यात्रोत्सवाची येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

हिरावाडी येथील शिव मल्हार मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. २३) जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी (दि. २४) सकाळी गंगाघाटावरील खंडेराय कुंड ते शक्त‌िनगर, हिरावाडीपर्यंत मिरवणूक काढण्यात येईल. दुपारी महाप्रसाद व भंडारा होणार असून, उदय गांगुर्डे यांच्या हस्ते बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. मिरवणूक आणि रहाडी जागरणाचा कार्यक्रम होणार आहे.

देवळालीच्या खंडेराव टेकडीवर यात्रा

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

चंपाषष्ठीनिमित देवळाली कॅम्पच्या प्रसिद्ध खंडेराव टेकडी येथे यात्रोत्सव साजरा होणार आहे. यात्रोत्सवासाठी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, पिवळ्या पताकांनी मंदिराचा परिसर झळाळून निघाला आहे. देवळालीसह पंचक्रोशीतील भक्तांची उद्या बेल-भंडार उधळीत देवाची तळी भरण्यासाठी येथे सकाळपासून गर्दी होणार आहे.

खंडेराव टेकडीवर सकाळी साप्तमिक पूजाविधी आमले परिवाराच्या वतीने होणार असल्याचे मंदिराचे पूजारी प्रकाश आमले व कमलाकर आमले यांनी सांगितले. त्यानंतर सकाळी १० वाजता मंदिराचे विश्वस्त आमले परिवाराच्या भगूर येथील निवासस्थानापासून पालखी मिरवणूक काढण्यात येऊन ती देवळाली शहरमार्गे खंडेराव टेकडी येथे आणण्यात येईल. दुपारी १२ वाजता महाआरती व नैवेद्य दाखविल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तदनंतर पुन्हा देवळाली कॅम्प शहरातून वाजत-गाजत पालखी काढण्यात येईल. पालखी सोहळा संपल्यानंतर सांयकाळी ५ वाजेच्या दरम्यान खंडेराव भक्त उत्तम मांडे हे १२ बैलगाड्या ओढणार आहेत. यात्रोत्सवास पंचक्रोशीतील नागरिकांची प्रचंड गर्दी उसळत असते.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि. २५ रोजी सायंकाळी ५ वाजता कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी यात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी यात्रा कमिटी प्रयत्नशील राहणार असून, देवळाली कॅम्प पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

भरीत-भाकरी प्रसाद वाटप

अण्णाज् टेम्पल हिल ग्रुपच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांच्यासह सदस्यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता पूजा, आरती होणार आहे. त्यानंतर धीरज मांडे यांच्या वतीने वांग्याचे भरीत व बाजरीच्या भाकरीचा नैवैद्य दाखविण्यात येऊन अन्नदान करण्यात येणार असल्याचे नागेश देवाडिगा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदल्यांसाठी शिक्षकांचे उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
२७ फेब्रुवारी २०१७चा शासननिर्णयानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश त्वरीत देऊन कार्यमुक्त करावे या मागणीसाठी समस्त बदली हवी प्राथमिक शिक्षक वर्ग यांच्याकडून जिल्हा परिषदेसमोर बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
२७ फेब्रुवारी २०१७च्या शासननिर्णयानुसार बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आहे. हा निर्णय सर्व घटकांना समान न्याय देणारा असल्याचे शिक्षकांचे मत आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयानेदेखील बदल्या करण्याचा सकारात्मक निर्णय दिला मात्र याबाबत अधिकृत कार्यवाही झाली नसल्याची भावना शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बदलीसंदर्भात त्यांच्याकडून विशेष संवर्ग १ यांना बदली कार्यवाही करून विनाअट कार्यमुक्त करावे, विशेष संवर्ग २ यांना पती-पत्नीचे एकत्रीकरण करून कार्यमुक्त करावे, बदली अधिकारी प्राप्त शिक्षकांना दुर्गम भागातून सुगम भागात बदली देऊन कार्यमुक्त करावे, विनंती बदली हवी असणाऱ्यांना बदली करुन कार्यमुक्त करावे या मागण्या यावेळी मांडल्या.
सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील एक सत्र संपले असून, दुसरे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे तत्काळ बदल्यांची कार्यवाही केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले. तसेच आमची आता बदली केली नाही तर राज्यभर आमरण उपोषण, जेलभरो, मुंडण, रास्ता रोको अशा प्रकारचे तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संजय तांबे, शंकर देवरे, संतोष थोरात, शैलेश गुंजाळ, केशव देवरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images