Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महाशिवरात्रीसाठी रताळी बाजारात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उपवासाच्या पदार्थांमध्ये आवडीने खाल्ले जाणारे रताळी हे कंदमुळ बाजारात दाखल झाले आहे. खास महाशिवरात्रीसाठी रताळांची वाढलेली मागणी लक्षात घेऊन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रताळीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रताळीची लागवड अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकच्या बाजारात रताळी दाखल झाली आहेत.

चवीला काहीसे गोड असलेल्या रताळीला उपवासाच्या पदार्थांमध्ये स्थान असल्यामुळे उपवासांच्या काळात त्याची मागणी वाढते. ही मागणी लक्षात घेऊन रताळीची लागवड केली जाते. नाशिक जिल्ह्यात रताळीची लागवड फारच कमी प्रमाणात होत असल्याने येथील मागणी लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यातून ट्रकमधून नाशिकच्या बाजारात सध्या रताळी दाखल होत आहेत.

नाशिक बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर हे रताळीची पोते भरलेल्या ट्रक येऊ लागले आहेत. घाऊक बाजारात रताळीला दर्जानुसार १५ ते २५ रुपये किलो असा दर मिळत आहे. किरकोळ विक्रीत हा दर दुप्पटीने वाढत असल्याने ग्राहकांना ३० ते ५० रुपयांपर्यंत रताळीची खरेदी करावी लागत आहे.

द्राक्ष झाले स्वस्त

फेब्रुवारी महिना उजाडला की द्राक्षांची रेलचेल वाढण्यास सुरुवात होते. गेल्या महिन्यात ७० ते ८० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या द्राक्षांची आवक वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत आता ५० ते ६० रुपये दर मिळत आहे. आणखी दहा ते पंधरा दिवसांत आवक वाढून दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. इतर उन्हाळी फळांचीही आवक वाढली असून, दरही थोडे कमी झाले आहेत.

जानेवारी महिन्यापासून बाजारपेठेत द्राक्षांची आवक सुरू झाली. फेब्रुवारीत आवक वाढल्याने दरात १० ते २० रुपयांची घसरण झाली आहे. स्थानिक बाजारपेठेत द्राक्षाला दर्जानुसार दर मिळत आहे. बाजारात ५० ते ७० रुपये किलो दरानुसार द्राक्षांची विक्री होत आहे. निर्यातक्षम द्राक्षांचे बाजारभावही कमी झाल्याने त्याचा स्थानिक बाजारभावावर परिणाम झाला आहे.

उन्हाळी फळांची आवक वाढू लागली आहे. टरबूज, खरबूज, संत्री या फळांची आवक वाढली आहे. संत्र्याला ५० रुपये किलो दर मिळत आहे. आणखी पंधरा दिवसांत आवक वाढून दर कमी होतील. सफरचंद, पपई व चिक्कूचे दर स्थिर आहेत. टरबूज १५ ते २० रुपये किलो, तर खरबूज ३० रुपये किलोने दराने मिळत आहे. कडाका व उमराणा या बोरांची आवक घटली असली तरी अॅपल बोरची आवक मात्र वाढली आहे. अॅपलबोर ३० रुपये किलोने विक्री होत आहे. डाळिंबाला सध्या चांगले दर मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून दरात वाढ झाली आहे. चांगल्या दर्जाच्या डाळिंबाच्या वीस किलोच्या क्रेटला १२०० पासून १८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

महाशिवरात्रीमुळे मागणी वाढणार

येत्या मंगळवारी महाशिवरात्री असल्याने फळांची मागणी वाढणार आहे. यामुळे दरात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. महाशिवरात्रीनिमित्त विक्रेत्यांनी फळांचा स्टॉक वाढवला असून, चौकाचौकात दुकाने थाटण्यात आली आहेत.

किलोचे दर

पपई - ३०, द्राक्ष - ५० ते ५०, अॅपल बोर - ३०, टरबूज - १५, खरबूज - २०, संत्री - ५०, चिक्कू - ५०, सफरचंद - ८० ते १२०, केळी ३० रुपये डझन, किवी - ४० रुपये नग, डाळिंब ५० ते ७०, पेरू - ४० ते ६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनेगाव अपघातात एक ठार, पाच जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावर मनेगाव फाट्याजवळ देवनदी पुलावर बोलेरो जिप व इंडिका कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघतात एक ठार, तर पाच जण जखमी झाले. शनिवारी (दि.१०) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. नितीन रावसाहेब रोडे (वय ४२, रा. वैजापूर, जि. औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे.

मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील ओम कंटेनर कारखान्यात कामाला असलेल्या नितीन रावसाहेब रोडे हे वैजापूर येथील मित्रांसोबत इंडिका व्हीस्टा कारने (एमएच १७, एई ४८६) संगमनेरहून खासगी काम आटोपून सिन्नरकडे येत होते. यावेळी रात्री ८.३०च्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर मनेगाव फाट्याजवळ देवनदी पुलावर समोरून येणारी बोलेरो जिप (एमएच १७, एझेड ९१६४) व इंडिका कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात नितीन रावसाहेब रोडे हे ठार झाले, तर कुंडलीक गायकवाड (वय ३६), प्रवीण दिलवाले (वय ३५), संजय सोनवणे (वय ३७) रा. वैजापूर, जि. औरंगाबाद यांच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने जखमींना उपचारार्थ नाशिक येथील सुविचार हॉस्पिटलमध्ये हलविले. या प्रकरणी सिन्नर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांनी करावे गोदावरीशी नाते घट्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मानवाच्या जडणघडणीत योगशास्त्राची भूमिका महत्त्वाची आहे. नदी आणि योगशास्त्र यांचे नाते अतूट आहे. आपण जसे आपले जगणे विसरत नाही तसे आपण आपल्या नदीला विसरू नये. नाशिककरांनी गोदावरीशी आपले नाते घट्ट करावे, असे प्रतिपादन डॉ. निवेदिता खोत-दंडगव्हाळ यांनी केले.

गोदावरी नदीबाबत जनजागृती वाढावी यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी रामकुंड ते तपोवन, तसेच तपोवन ते रामकुंड अशी गोदा परिक्रमा करण्यात येते. रविवारी (दि. ११) झालेल्या या परिक्रमेप्रसंगी त्या योगशास्त्र आणि नदी या विषयावर बोलत होत्या.

गोदावरी परिक्रमेतून गोदावरीचा शहरातील भाग नेमका कसा आहे, कसा असायला हवा, गोदाघाटावरील वारसा, कुंड, नाशिकचा इतिहास या अनुषंगाने होणारी ही परिक्रमा हा परिसर अधिक सुंदर करण्यासाठी उपयोगी ठरत आहे. गोदावरीचे प्रदूषण नेमके कशामुळे आणि कोणकोणत्या कारणांमुळे होते, याबाबतची माहिती शिल्पा डहाके यांनी या परिक्रमेत दिली. रविवारी सकाळी ७ वाजता दुतोंड्या मारुती येथून परिक्रमेस सुरुवात झाली. ११ वाजता रामकुंडावर या परिक्रमेचा समारोप झाला. पुढील परिक्रमा दि. ११ मार्च रोजी होणार असल्याची माहिती डहाके यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यानुष्ठान पदन्यासाने श्रोते मुग्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कीर्ती कलामंदिराच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आयोजित नृत्यानुष्ठान कार्यक्रम परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडला. पंडित नंदिकशोर कपोते यांच्या शिष्या नीलिमा हिरवे यांनी गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात केली. नाशिकच्या ख्यातनाम स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.

दर महिन्याला नवनवीन संकल्पनांनी सजलेल्या या नृत्यानुष्ठानातील रविवारचे सहावे पुष्प होते. कीर्ती कलामंदिराच्या वतीने १९९४ ला सुरू झालेल्या नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे रजत महोत्सवी वर्ष असल्याने २०१७ ते २०१८ या पूर्ण वर्षभर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हे सत्र सादर होते. एकल कथक नृत्याचा हा रंगमंचीय सौंदर्यानुभव सादर करण्यात आला. सहाव्या पुष्पाचा विषय '१३ मात्रा' असा होता. नीलिमा यांनी १३ मात्रांचा रास, ताल, थाट, आमद, परण, प्रिमलू, ततकार या पारंपरिक रचनांनी हा कार्यक्रम सजला. अभिनयात सूरदासांच्या तीन दोह्यांनी कृष्णाच्या मुरलीबद्दल असूया असणाऱ्या गोपिकांची व्यथा मांडली. बासरी लवपून ठेवली तर कृष्ण काय करीत असेल, असा विचार करून गोपिका बासरी लपवतात, पण बासरीविना त्यांचेच जगणे निरस होऊन जाते. नीलिमा यांना तबलासंगत पराग हिरवे, संवादिनीवर स्वानंद कुलकर्णी, गायनासाठी श्रीपाद लिंबेकर आणि पढंतवर ऋतुजा जोशी होत्या.

उत्तरार्धात पंडित विजय शंकर यांच्या शागीर्द शीला मेहता यांनी प्रस्तुती केली. त्यांनी १३ मात्रांचा रासताल लखनौ घराण्याच्या पारंपरिक गुरू-शिष्य परंपरेतून सादर केला. लखनौच्या खास लखनवी मिजाज, ऐट आणी नजाकतीचे सुरेख दर्शन यावेळी मेहता यांनी घडवले. रामचरितमानस मधील तुलसीदासांची राग अलोट, ताल रूपकमधील रचना प्रस्तूत केली. कौसल्या छोट्या रामाला सकाळच्या प्रहरी उठवते. तिच्या अनेक तऱ्हा आणि सकाळच्या सौंदर्याचे वर्णन यात आले. पियू आरोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मेहता यांना विवेक मिश्रा, मनाोज देसाई, अपर्णा देवधर यांनी साथसंगत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसाआड एक बळी!

$
0
0

वर्षाच्या सुरुवातीलाच १६ जणांचा अपघातात मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात जानेवारी महिन्यात १६ जीवघेण्या अपघातांमध्ये १६ जणांचा बळी गेला. रस्ते अपघातात दोन दिवसाआड एका जणाचा मृत्यू होत असून, हे प्रमाण कमी करण्यासाठी आणखी ठोस उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, मागील तीन वर्षांपासून जीवघेण्या अपघातांची संख्या घटत आहे. मात्र, २०१८ मध्ये पोलिसांसह नाशिककरांना अपघातांना आणखी आळा घालण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे.

शहरात २०१२ ते २०१७ या सहा वर्षांच्या कालावधीत एकूण तीन हजार ५११ अपघात झाले. यातील एक हजार ४५ जीवघेण्या अपघातांमध्ये तब्बल १०९७ व्यक्तींचा जीव गेला. तर, दोन हजार ७१४ व्यक्ती गंभीर जायबंदी झाल्या. मागील दोन वर्षांच्या कालावधीत रस्ते अपघातात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लक्षणीय पध्दतीने घटते आहे. सन २०१६ मध्ये शहरात २०३ जीवघेण्या अपघातांमध्ये २१३ नागरिकांचा जीव गेला होता. तर, एकूण अपघातांची संख्या ६२८ इतकी होती. सन २०१७ मध्ये जीवघेण्या अपघातांच्या संख्येत ४५ इतकी घट झाली. या वर्षात १५८ जीवघेण्या अपघातांची नोंद झाली. त्यात १७१ नागरिकांचा बळी गेला. एकूण अपघातांची संख्या ५०३ इतकी राहिली. सन २०१६ च्या तुलनेत पाहता एकूण अपघातांच्या संख्येत १२५ एवढी मोठी घट झालेली दिसते. जानेवारी २०१८ मध्ये १६ जीवघेणे अपघात झाले. यात १६ जणांचा मृत्यू झाला. गंभीर अपघातांची संख्या २६ इतकी राहिली. या अपघातांमध्ये ३६ व्यक्ती जायबंदी झाल्या. याशिवाय किरकोळ दुखापतीप्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, सात जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. मागील तीन वर्षांपासून जीवघेण्या अपघातांमध्ये घट होत असून, यंदाही हे प्रमाण कायम ठेवण्यासाठी पोलिसांसह महापालिका प्रशासनाला लक्ष घालावे लागणार आहे.

अपघात-जीवघेणा-दुखापत-एकूण-मृत्यू-जखमी

हिट अॅण्ड रन-४-११-१५-४-१३

डोक्यास दुखापत-४-१-५-४-१

पाठीमागून धडक-१-५-६-१-६

बाजूने धडक-०-४-५-०-७

रस्त्यावरील स्थिर वस्तूला धडक-१-०-१-१-०

पादचारी धडक-४-९-१३-४-१०

वळणावर अपघात-१-३-४-१-५

इतर-१-१-२-१-१

एकूण-१६-३४-५०-१६-४३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विष्णू, महिषासूर मर्दिनीच्या मूर्तींचे होणार संशोधन

$
0
0

धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाची माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादामधील प्रकाशा गावात घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना दि. २४ जानेवारी रोजी काळ्या पाषाणातील विष्णू व महिषासूर मर्दिनी अवतारातील दोन मूर्ती आढळल्या होत्या. त्या दोन्ही मूर्ती धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळात दाखल झाल्या असून, ऐतिहासिक मूर्तींचे संकलन, जतन, संवर्धन व संरक्षणाची जबाबदारी आता राजवाडे संशोधन मंडळ करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा यांनी दिली.

धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाकडून शुक्रवारी (दि. ९) याबाबत पत्रकार परिषद आयोजित करून माहिती देण्यात आली. या वेळी कार्याध्यक्ष संजय मुंदडा, मुख्य सचिव डॉ. सर्जेराव भामरे, ग्रंथसचिव नंदलाल अग्रवाल, श्रीपाद नांदेडकर आदी उपस्थित होते. या वेळी सविस्तर माहिती देताना सचिव भामरे म्हणाले की, प्रकाशा येथे दि. २४ जानेवारी रोजी भोईगल्ली परिसरात घराच्या बांधकामाचे खोदकाम सुरू होते. त्यावेळी १५ फूट खोदकाम झाल्यानंतर जमिनीत काळ्या रंगाच्या दोन मूर्ती आढळून आल्या. दरम्यान, ग्रामस्थांनी या मूर्तींचे विसर्जन करण्याचे ठरविले होते. मात्र काही नागरिकांनी विरोध करून राजवाडे संशोधन मंडळाशी संपर्क केला. त्यांनी माहिती घेऊन ग्रामपंचायतीकडून ठराव करीत राजवाडे मंडळात संशोधकांना अभ्यासासाठी ठेवण्यात आल्या, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

अशी आहे मूर्तींची माहिती...

भगवान विष्णूची उभी खंडीत झालेली मूर्ती आहे. तिची उंची ३३ इंच आहे. तर दुसरी मूर्ती ही चांमुडादेवीची असून, ही मूर्ती क्रोधमुद्रेत आहे. तिची उंची २० इंच आहे. तसेच दोन्ही मूर्ती या कर्नाटक शैलीतील आहेत. प्रकाशा गावाला गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक व सांस्कृतिक वसा आहे. खान्देशातील तापी खोऱ्यांमध्ये संशोधन केल्यास अशा अनेक मूर्ती सापडण्याची शक्यता संशोधकांनी वर्तविली आहे.

दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज

खान्देशातील तापीखोऱ्यातील गावांमध्ये संशोधन होणे गरजेचे आहे. तर प्रकाशा गावातील प्राचीन काळातील ३० एकर जमिनीत वसाहत झाल्याने त्याठिकाणी खोदकाम झाल्यास अशा प्राचीन काळातील मूर्ती आढळतात, असे यावेळी सांगण्यात आले. प्राचीन काळात मध्यप्रदेश व गुजरात सीमारेषेलगत असलेल्या प्रकाशा गावात व्यापाऱ्यांचा खरेदी-विक्री व्यवहार होत असे, त्यामुळेच या मूर्ती खोदकामादरम्यान आढळून आल्या असाव्या, असा अंदाज आहे. या दोन्ही मूर्ती १ हजार वर्षांपूर्वीच्या म्हणजेच नवव्या ते दहाव्या शतकातील असल्याचा अंदाजही राजवाडे मंडळाकडून माहिती देताना वर्तविण्यात आला. सध्या या मूर्ती अभ्यासकांसाठी राजवाडे मंडळात ठेवण्यात आल्या असून, पुणे येथील मूर्तीशास्त्राचे तज्ज्ञ अभ्यासासाठी बोलविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘युवारंग’ची धूम आजपासून

$
0
0

विद्यापीठात आयोजन; पाच कलाप्रकाराचे सादरीकरण

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय युवारंग युवक महोत्सवाला आज (दि. १२) पासून प्रारंभ होत आहे. या महोत्सवाची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून संपूर्ण तयारी झाली आहे. आजपासून या महोत्सवाची धूम सुरू होणार असल्याने तरुणाई उत्साहात आहे.

युवारंगात संगीत, नृत्य, साहित्यकला, नाट्यकला व ललितकला या पाच कला प्रकारातील २५ उपकलाप्रकारांत होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन (दि. १२) सकाळी ८ वाजता कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात होणार आहे. या वेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर हे उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाच्या या युवारंगात सहभागी होण्यासाठी अनेक कॉलेजेसचे संघ रविवारी (दि. ११) विद्यापीठात दाखल झाले आहेत. रविवारी, सायंकाळी अधिसभा सभागृहात संघव्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. एस. टी. इंगळे, निरीक्षक प्रा. विलास चव्हाण, प्रा. सत्यजित साळवे, प्रा. राम पेटारे, प्रा. पंकजकुमार नन्नवरे यांनी मार्गदर्शन केले. युवारंगचे समन्वयक प्रा. अजय सुरवाडे यांनी आभार मानले.

यापूर्वी विद्यापीठाने २५ ते ३१ जानेवारीदरम्यान चार ठिकाणी जिल्हास्तरीय युवक महोत्सव घेतले होते. तेथील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांचा हा विद्यापीठस्तरीय महोत्सवात सहभाग असणार आहे. यामध्ये ६० पेक्षाही अधिक कॉलेजेसमधील जवळपास ८८३ जण सहभागी होणार असून, त्यामध्ये ५९५ विद्यार्थी, १५७ संगीत साथीदार तर १३१ संघव्यवस्थापकांचा समावेश आहे. यासाठी विद्यापीठ परिसरात या महोत्सवासाठी सहा रंगमंच तयार करण्यात आले आहेत.

पहिल्या दिवशी असे होतील कार्यक्रम


रंगमंच क्रमांक १.............दीक्षांत सभागृह.............मूकनाट्य, विडंबन, मिमिक्री, शास्त्रीय नृत्य, समूह लोकनृत्य स्पर्धा

रंगमंच क्रमांक २.............अधिसभा सभागृह..........शास्त्रीय गायन, सुगमगायन आणि समूहगीत (भारतीय) स्पर्धा

रंगमंच क्रमांक ३.............डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी भवन...........शास्त्रीय वादन (सूरवाद्य), शास्त्रीय वादन (तालवाद्य), भारतीय लोकगीत व लोकसंगीत हे कलाप्रकार

रंगमंच क्रमांक ४...........पर्यावरणशास्त्र प्रशाळा सभागृह......वक्तृत्व, काव्यवाचन, वादविवाद, सुगमगायन (पाश्चिमात्य), समूहगायन (पाश्चिमात्य) हे कलाप्रकार

रंगमंच ५ व ६.................ग्रंथालय इमारत व परिसर.............रांगोळी, चित्रकला,कोलाज, स्पॉट पेंटिंग, क्ले मॉडेलिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन व रंगचित्र स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे मागितल्याने व्यावसायिकास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दाढी केल्यानंतर पैसे मागितल्याचा राग आल्याने चार जणांनी मिळून एका व्यावसायिकास जबर मारहाण केली. ही घटना गंगापूर गावातील आम्रपाली विहारसमोर लुंबीनी सलून दुकान येथे शनिवारी (दि. १०) रात्री पाऊणे वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी गंगापूररोड पोलिसांनी राजेश रामेश्वर इंगळे (वय ३५, रा. गंगापूर गाव, आम्रपाली विहारसमोर) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. अक्षय जाधव, निखील कटारे, अनिल भगवान जाधव आणि मन्या (पूर्ण नाव नाही) अशी मारहाण करणाऱ्या चौघा संशयितांची नावे आहेत. घटनेच्या दिवशी संशयित आरोपी अक्षय जाधव दाढी करण्यासाठी इंगळे यांच्या सलुनमध्ये आला होता. दाढी झाल्यानंतर इंगळे यांनी पैशांची मागणी केली. मात्र, पैसे मागितल्याचा राग आल्याने संशयित जाधवसह कटारे आणि निखील जाधव यांनी थेट मारहाण करीत इंगळेला खाली पाडले. तसेच मन्या नावाच्या संशयित आरोपीने हातातील दगड इंगळेच्या डोक्यात मारला. आमच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली तर सर्वांचा बेत पाहून घेऊ, अशी धमकी संशयितांनी दिली. घटनेचा अधिक तपास हवालदार जी. वाय. पाटील करीत आहेत.

इंदिरानगरला चेन स्नॅचिंग

चेतनानगर परिसरातील श्रीजी अपार्टमेंटसमोरून पायी जाणाऱ्या युवतीच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवरील चोरट्यांनी तोडून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री ८ वाजून २० मिनीटांच्या सुमारास घडली. याप्रकरणी शलाका प्रल्हाद बोरसे (रा. फ्लॅट क्रमांक ५, योगेश्वर अपार्टमेंट, चेतनानगर, इंदिरानगर) या युवतीने फिर्याद दिली. गार्डनमध्ये फिरण्यासाठी गेलेली शलाका घरी परत येत असताना चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला. श्रीजी अपार्टमेंटसमोर दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने शलाकाच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाची आणि २२,५०० रुपये किमतीची सोन्याची चेन तोडून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, पीएसआय शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पीएसआय शिंदे करीत आहेत.

मुंबईतील मासे विक्रेत्यास मारहाण

मासे विक्री करण्यासाठी शहरात आलेल्या व्यावसायिकास चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील १५ हजार रुपये काढून घेतले. ही घटना सातपूर परिसरातील पपाया नर्सरी येथे ३० डिसेंबर २०१७ रोजी सांयकाळी चार वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी शहाजन मनियान काटू टाडाटिल जॉन (वय ४९, बीवींजे रेसीडेन्सी, एवा स्टाइॅन सिटी, वसई इस्ट) यांनी सातपूर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन रमेश धोत्रे (घर क्रमांक ८३५, महाराष्ट्र हौ. सोसायटी, आंबेडकरनगर, सातपूर) याच्यासह त्याच्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मासे विक्रीचा व्यवसाय करणारे जॉन ३० डिसेंबर रोजी शहरात आले होते. त्यावेळी संशयित धोत्रेने फोन करून त्यांना पपाया नर्सरीजवळ बोलावून घेतले. तिथे वरील संशयितांनी मिळून जॉन यांच्या वाहनाची चावी काढून घेत मारहाण केली तसेच खिशातील १५ हजार रुपयांची रोकड काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेले जॉन मुंबईला परत गेले. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी, शनिवारी गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी मुख्य सूत्रधार धोत्रे यास लागलीच अटक केली. घटनेचा पुढील तपास पीएसआय राउत करीत आहेत.

जुगारी ताब्यात

नाशिकरोड परिसरातील आश्विनी वाईन शॉपसमोरील शिवाजी पुतळ्यासमोरील मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. स्वप्नील शंकर हिवराळे (वय ३०, बर्माशेलवाडी, सुभाषरोड) आणि रमेश फकिरा शिंदे (वय २६, रा. किरणनगर, चेहडीगाव) अशी या दोघांची नावे आहेत. ही कारवाई नाशिकरोड पोलिसांनी शनिवारी (दि. १०) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास केली. याप्रकरणी पोलिस शिपाई वाघचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांविरोधात नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार खिल्लारे करीत आहेत.

चौघांकडून तलवार जप्त

देवळालीतील वालदेवी नदीच्या किनारी थांबलेल्या चौघाजणांकडून उपनगर पोलिसांनी धारदार तलवार जप्त केली. या प्रकरणी शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे. उमेश संजय बुचडे (वय १९, रा. देवळालीगाव, धनगरगल्ली), ओमकार दत्तू जावरे (वय १८, रा. वरच्ची गल्ली, देवळालीगाव) आणि आणखी दोन अल्पवयीन मुलांचा यात समावेश आहे. यापैकी उमेश बुचडेला पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून पोलिहांनी साडेतीन फुट लांबीची तलवार जप्त केली. पोलिस नाईक मधुकर दावले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.

सातपूरला तरुणाची आत्महत्या

सातपूर परिसरातील सुतारवाडा येथील निगळ गल्लीत राहणाऱ्या रवींद्र बापू क्षीरसागर (३२) या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. १०) रात्री पाऊणे दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. रवींद्रच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी तानाजी किसन विधाते यांनी दिलेल्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकेश्वर लोकअदालत केवळ फार्स

$
0
0

९२ पैकी एकही प्रकरण निकाली नाही

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगर परिषदेच्या लाखोंच्या थकबाकी वसुलीकरिता घेतलेली लोकअदालत केवळ फार्स ठरली आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचे न्यायालयीन दावे दाखल होण्यापूर्वी वाद सोडविण्यासाठी आयोजन केले होते. मात्र त्यात ९२ पैकी एकही प्रकरण निकाली निघालेले नाही. त्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे.

त्र्यंबकेश्वरमधील थकबाकी वसुलीसाठी या लोकअदालतीचे आयोजन केले होते. त्यामध्ये थकबाकीदार वेळेत हजर झाले मात्र तडजोडीसाठी प्रशासनाचे सक्षम अधिकारीच नसल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. जिल्हा न्यायाधीश जे. डब्लू. गायकवाड यांच्यासमोर झालेल्या सुनावणीस पालिका प्रशासनाच्या वतीने कक्ष अधिकारी आणि वसुली अधिकारी उपस्थित होते. त्यांना केवळ ५०० रुपये कमी करण्याचा अधिकार होता, असे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी आपल्यावर दाखविण्यात आलेली थकीत रक्कम चुकीची असून, अमान्य असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांना या लोकअदालतीस उपस्थित राहता आले नाही. अन्यथा याबाबत तडजोडीने प्रलंबित वाद मिटले असते, असे मत आरोग्य सभापती विष्णू दोबडे यांनी व्यक्त केले.

मोठी थकबाकी असलेल्या काही संस्थांनी गतवर्षी मार्चअखेर ५० टक्के रक्कम हरकत ठेवून भरलेली आहे. त्यांच्या हरकतीचा विचार न करता प्रशासनाने अशा संस्थांना थेट लोकअदालतीमध्ये बोलावून नेमके काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील करआकारणी अन्य 'क' वर्ग नगर परिषदेच्या तुलनेत येथे अधिक पटीने होत आहे. गत काही वर्षांपासून नागरिक सातत्याने याबाबत तक्रारी करत असताना संगणकात फिडींग झाले आहे, आता काही करता येणार नाही यासारखी उत्तरे मिळतात. याबाबत ग्राहक पंचायतीने पुढाकार घेतला असून, नागरिकांच्या वतीने ग्राहक न्यायालयात याबाबत दावा दाखल करण्यात येणार असल्याचे तालुका संघटक अमर सोनवणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतराशेवर प्रकरणे लोकन्यायालयात निकाली

$
0
0

४७ लाखांच्यावर वसूली

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुका विधी सेवा समिती व येवला वकील संघाच्या वतीने आयोजित लोकन्यायालयाच्या माध्यमातून सतराशेच्यावर दावे व प्रकरणे सामंज्यस्याने मिटवली गेली. यामध्ये विविध दावे व वादपूर्व प्रकरणातून सुमारे ४७ लाख रुपयांच्यावर वसुलीही लोकन्यायालयाच्या निमित्ताने झाली आहे.

येवला येथील न्यायालयामध्ये शनिवारी (दि. १०) सकाळी लोकन्यायालयाला न्या. एस. एन. शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. शनिवारी दिवसभर चाललेल्या या लोकन्यायालयामध्ये तालुक्याच्या न्यायक्षेत्रातील ग्रामपंचायती, नगरपालिका, विविध बँकाचे एकूण ५४३१ वादपूर्व प्रकरणांपैकी १६९६ प्रकरणांमध्ये परस्पर सांमज्यसांने तोडगा काढण्यात आला. या वादपूर्व प्रकरणांतून ३०,४३,७५१/- रुपयांची वसूली झाली. न्यायालयातील इतर १९८ प्रकरणातून ४९ प्रकरणे निकाली निघाली. यामध्ये १७,३०,१७८/- रुपयांची वसूली करण्यात आली. न्यायालयातील २८ दिवाणी प्रकरणांपैकी ३ निकाली काढण्यात आले तर एक दिवाणी दरखास्तही यात निकाली निघाली.

यासाठी न्या. एन. एन. चिंतामणी, येवला वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाशराव गायकवाड यांच्यासह सदस्य, येवला शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील, गटविकास अधिकारी सुनील अहिरे व सर्व ग्रामसेवक, उपमुख्याधिकारी शेख आणि न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाज दाबण्याचा प्रयत्न

$
0
0

ठार मारण्याच्या धमकीप्रकरणी आमदार आसिफ शेख यांचे स्पष्टीकरण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

'सनातन हिंदू धर्म' या नावाच्या यू-ट्यूब चॅनलवरून एका व्हिडीओद्वारे विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री व गोरक्षक मच्छिंद्र शिर्के तसेच हिंदू आश्रम मुंबईचे आचार्य जितेंद्र महाराज यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच माझ्यावर आतंकवादी आमदार, माफिया डॉन असल्याचे केलेले आरोप बिनबुडाचे आहे. काही जातीयवादी संघटना माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र मी यामुळे घाबरून जाणार नसून, याविरोधात आवाज उठवणार असल्याचे स्पष्टीकरण आमदार अशिफ शेख यांनी दिली आहे

यू-ट्यूबवरील एका व्हिडीआद्वारे शुक्रवारी (दि. ९) शिर्के व आचार्य जितेंद्र यांनी आमदार शेख यांना जीवे मारण्याची धमकी देत रोहिंग्या मुस्लिम, गोवंश हत्या अशा विविध मुद्द्यांवरून त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर येथील आयेशानगर पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल केला होता. या संपूर्ण प्रकरणावर आमदार शेख यांनी रविवारी (दि. ११) उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

या वेळी शहर काँग्रेसचे प्रवक्ता साबीर गौहर, नगरसेवक अस्लम अन्सारी, लतीफ बागवान, फारुख कुरेशी, अनिस अजहर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बोलताना आमदार शेख यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडण करित माझा कुठल्याही गुन्हेगारी माफियाशी संबंध नाही. येथील जनतेला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भडवण्याचा, दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा, कसायांना हाताशी धरून गोवंशाची कत्तल घडवण्याचे कृत्य मी केलेले नसल्याचे म्हणत आरोप चुकीचे असल्याचे आमदार शेख म्हणाले. गोवंश हत्या कायद्याचे पालन झालेच पाहिजे. मात्र शिर्के यांच्याकडून या कायद्याच्या आडून शहरातील दोन समाजात तेढ निर्माण केला जातो आहे. त्यांचा गो-रक्षणाशी कुठलाही संबध नाही, असे प्रतिज्ञापत्र सरकारने उच्च न्यायालयात सादर केले आहे. त्यामुळे शिर्के हे बोगस गोरक्षक असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

माझ्यावरील आरोप चुकीचे

ब्रम्हदेशात होत असलेल्या मुस्लिमांवरील अत्याचाराबाबत मानवतावादी भूमिकेतून केंद्राने परवानगी दिली तर शहरात आश्रय देऊ, असे वक्तव्य केले होते. मात्र त्या विधानाचा विपर्यास करून माझ्यावर आतंकवादी असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम आरक्षणाची लढाई सनदशीर मार्गाने लढत असून, त्यासाठी मुस्लिम बांधवांना भडकवण्याचा प्रश्नच येत नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

१६ फेब्रुवारीला आंदोलन

या सर्व प्रकरणाबाबत आपण पोलिसात तक्रार केली असून, स्वतः कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. या धमकी प्रकरणाने माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे आमदार शेख म्हणाले. सरकारने मला संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच येत्या १६ फेब्रुवारीला येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी देशाच्या व राज्याच्या पोलिस यंत्रणेला आव्हान दिले आहे. यामागे 'सनातन', 'अभिनव भारत' यांसारख्या जातीयवादी संघटना असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच येत्या २० फेब्रुवारी रोजी आपण मुंबईत असू, त्यांनी माझ्यावर हल्ला करावाच असे खुले आव्हानदेखील दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना निवडणूक जिंकण्याचे धडे

$
0
0

शिवसेनेकडून रणनीती आखण्यास सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा, विधानसभा व विधानपरिषद निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारण्यासाठी राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेनेही लोकसभा मतदारसंघातील महापालिकेसह काही नगरपालिकांच्या नगरसेवकांना महाबळेश्वर दर्शन घडवित निवडणुका जिंकण्यासाठीचे धडे दिले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिक महापालिका, इगतपुरी, सिन्नर, भगूर व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांसाठी नुकतेच दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर महाबळेश्वर येथे घेण्यात आले. शिबिरात आगामी नाशिक लोकसभा, विधानसभा व विधानपरिषद निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत चर्चा करण्यात आली. राज्यात शिवसेना आणि भाजप युतीच्या माध्यमातून सत्तेत असले तरी त्यांच्यामधील दुरावा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच आगामी निवडणुका स्वबळावरच लढविण्याची भाषा या पक्षांकडून वापरली जाऊ लागली आहे. नाशिकमध्येही आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढविता येतील का याबाबत या प्रशिक्षण शिबिरात चर्चा झाल्याचे समजते. किंबहूना स्वबळावरच निवडणुका लढवायला हव्यात असा आग्रह नगरसेवकांनी धरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे राजकीय पदाधिकाऱ्यांनी धकाधकीच्या जीवनमानात स्वत:चे आरोग्य कसे जपायला हवे याच्या टिप्सही या शिबिरात आंतरराष्ट्रीय आहारतज्ज्ञ नितीन दढे यांनी 'हसत खेळत जपा स्वत:चे आरोग्य' या विषयावर मार्गदर्शन करताना दिल्या. समीर देव यांनी प्रभावी जनसंपर्क आणि संघटन या विषयावर मार्गदर्शन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अंदाजपत्रकातील विविध बाबींवर नगरसेवक चंद्रकांत खाडे यांनी मार्गदर्शन केले. सभागृहातील कामकाज व आयुधे या विषयावर मुंबई शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. निवडणुकीची आव्हाने व तयारीबाबत संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण शिबिरात जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, राजू लवटे, इगतपुरीचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर, सिन्नरचे नगराध्यक्ष किरण डगळे, भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, सुधाकर बडगुजर, प्रशांत दिवे यांसह शिवसेनेचे सर्व नगरसेवक सहभागी झाले.

एकत्रीत कामकाजाची ग्वाही

आगामी लोकसभा, विधानसभा व विधानपरिषद निवडणुकासाठी पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी एकत्रीतरित्या कामकाज करून आदर्श वस्तुपाठ घालून देतील अशी ग्वाही नगरसेवकांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांचा मागण्यांसाठी मूकमोर्चा

$
0
0

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांनी सोमवारी (दि. १२) शिवतीर्थ चौकातील कल्याण भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. रिक्त जागांची भरती करा, तीस टक्के नोकरकपातीचा निर्णय रद्द करा अशा अनेक मागण्या त्यांनी यावेळी केल्या. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना या मागण्यांचे निवेदन देऊन तरुणांनी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

या तरुणांनी आपल्या निवेदनात राज्यसेवेच्या पदांमध्ये वाढ करण्यात यावी, पीएसआय, एएसओ तसेच कर सहाय्यक, लिपीक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग गट-क, संयुक्त परीक्षा पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे स्वतंत्र परीक्षा राबवा, प्रत्येक पदाकरिता प्रतीक्षा यादी जाहीर केल्यानुसार पोलिस भरतीमध्ये जास्त पदांची भरती करा, २३ हजार रिक्त शिक्षक भरतीची केंद्रीय पद्धतीने कार्यवाही करावी, २०१० पासून रिक्त पदाकरिता शिक्षक भरती झालेली नाही, ती तत्काळ करण्यात यावी, तीस टक्के नोकरी कपातीचा निर्णय रद्द करावा, सरकारच्या जिल्हा पातळीवरील सर्व जागा भरण्यात याव्या, एमपीएससी स्पर्धा परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरणाची चौकशी करावी यासारख्या मागण्या नमूद केल्या आहेत. या मूकमोर्चात टीडीएड, बीएड स्टूडंट असोसिएशन, पोलिस बॉइज असोसिएशन, धुळे जिल्हा एमपीएससी विद्यार्थी मोर्चा समन्वय समिती आणि इतर बेरोजगार संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चात समितीचे शाम पाटील, सचिन बोरसे, विवेक पाटील, हेमंत पाटील, बॉबी वाघ, इम्रान शेख, मोहसिन शेख, फारुक काझी यांच्यासह शेकडो बेरोजगार तरुणतरुणी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाशिवरात्रीनिमित्त सजली मंदिरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात शिवभक्तांचा आनंद द्विगुणीत झाला असून, महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. १२) शहरातील शंकराच्या मंदिरांची रंगरंगोटी, सजावट, विद्युत रोषणाई आदी कामे पूर्ण झाली होती.

शहरातील शिव मंदिरांमध्ये आज (दि. १३) पहाटेपासूनच अभिषेकाला प्रारंभ झालेला असेल. ओंकारेश्वर मंदिर, नवीन बसस्टॅण्डसमोरील चिमुकले राममंदिरातील महादेवाची राऊळ, गोलाणी मार्केटमागे, इंडो अमेरिकनच्या समोरील शिवमंदिर, तसेच शिवधाम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात रुद्राभिषेक, भस्म आरती, जलाभिषेक, सुका मेवा व हलाव्याने शिवलिंगाचा श्रृंगारदेखील करण्यात येणार आहे. उपवास असल्याने नागरिकांनी सोमवारी (दि. १२) दुपारनंतर बाजारात रताळी, केळी, बटाटे यांच्यासह उपवासाच्या पदार्थांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.

महाशिवरात्रीनिमित्त आज भजन संध्या

शहरातील शिव मंदिरांमध्ये आज (दि. १३) महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. ओंकारेश्वर मंदिरासह शहरात असलेल्या विविध ठिकाणच्या शिवमंदिरांना विद्युत रोषणाईही करण्यात आलेली आहे. युवा गुरव मंडळ, युवाशक्ती फाउंडेशन व भवरलाल अँड कांताबार्इ जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौकात आज (दि. १२) सायंकाळी ६ ते ९.३० वाजेदरम्यान भजन संध्येचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर व माजी आमदार सुरेश जैन यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, महापौर ललीत कोल्हे, आमदार सुरेश भोळे, दलीचंद जैन, फारुख शेख, नगरसेवक अमर जैन, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक बी. जी. रोहोम, सचिन नारळे, ललीत चौधरी, दीपक जोशी उपस्थित राहणार आहेत. भजन संध्या खिर्डी गावातील भजनी मंडळ सादर करणार आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवाशक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाइल पेंडन्सी आठवडाभरात काढा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सलग दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पहिल्या दिवशी दिलेल्या आदेशांची तपासणी करीत, सोमवारीही झाडाझडती घेतली. टपाल, फाइल ट्रॅकिंग व पेंडन्सीवरून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करीत, तब्बल दोन हजार फायलींचा आठवडाभरात निपटारा करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत 'पाहू', 'करू', 'नंतर या' अशी उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांची अडचण होणार आहे. आठवड्याच्या आतच फाइलचा निपटारा करण्याचे फर्मान मुंढे यांनी काढल्याने अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.

शुक्रवारी मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर कार्यालयाचा दौरा केला होता. यात अनेक ठिकाणी बेशिस्तीचे दर्शन घडले होते. अस्ताव्यस्त फाइल्स, टपाल विभागाचा गोंधळ, सर्वत्र अस्वच्छता दिसून आली होती. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांत स्वच्छता करण्याचे फर्मान काढले होते. त्यानुसार दोन दिवसांत अधिकाऱ्यांनी घाम गाळत शक्य तितकी स्वच्छता केली. फाइल्सचे ट्रॅकिंग बसवले. सोमवारी मुंढे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. मुंढे यांच्या सूचनेप्रमाणे कामकाज झाले नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. आठवडाभरात आलेल्या फायलींचे काय झाले, महिनाभरात किती फायली काढल्या, वर्षभरापासून किती फायली पेंडींग आहेत, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी यावेळी केली. त्यामुळे अधिकारीच बुचकळ्यात पडले. यापुढे कोणत्याही फाइलीचा निपटारा आठवडाभराच्या आत झाला पाहिजे, असा आदेशच दिला. आतापर्यंत महापालिकेत वर्षभरापासून दोन हजार फायली पेंडींग आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. एरवी महापालिकेत दिवसभर नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची वर्दळ असते. सोमवारी मात्र सर्वत्र शांतता दिसून आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा लोड वाढवल्याने ते व्यस्त दिसून आले.

जनता दरबार ४ ते ५

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील नागरिकांना दररोज भेटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रोज ४ ते ५ वेळेत जनता दरबार भरणार आहे. या वेळेत नागरिकांनी यावे असे आवाहन जनंसपर्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, फाइलचा निपटारा, अतिक्रमण, तक्रारी यासंदर्भात आयुक्तांना थेट भेटता येणार आहे. ही वेळ केवळ जनतेसाठीच राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या वेळेत नागरिकांना थेट मुंढे यांना भेटता येणार आहे. त्याची सुरुवात सोमवारपासूनच करण्यात आली असून, सोमवारी ४ ते ५ या वेळेत नागरिकांसह पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या तक्रारीही सादर केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफोडीसाठी ओएलएक्सवरील कारचे नंबर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात दिवसा घरफोडी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील चौघांनी मोबाइलसह इंटरनेटचा खुबीने वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दिल्ली ते नाशिक असा प्रवास करताना चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून हे संशयित आरोपी त्यांच्या कारला बनावट नंबर प्लेटचा वापर करीत होते. विशेषत: ओएलएक्सवर विक्रीसाठी आलेल्या आणि आरोपींच्या कारशी मेळ खाणाऱ्या वाहनांचा क्रमांक चोरटे आपल्या वाहनावर करीत होते. यामुळे पोलिसांना वाहन क्रमांक मिळूनही दिशाभूल होत होती. आडगावमध्ये झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिस यामुळे दुसऱ्याच व्यक्तीपर्यंत पोहचले होते. आरोपींनी अगदी सराईतपणे घरफोडीचे गुन्हे कसे करायचे याचे प्लॅनिंग केले होते. मात्र, नाशिक पोलिसांना जास्त काळ चकवा देण्यात त्यांना यश मिळाले नाही.

पोलिस पकडणारच नाही असा विश्वास

या टोळीचा मुख्य सूत्रधार शकील उर्फ मुल्ला इस्माईल कुरेशी हा असून, अनेक वर्षांपासून तो वेगवेगळ्या साथीदारांसमवेत घरफोडीसह इतर गुन्हे करीत आहे. पोलिसांना चकवा देणे सहज शक्य व्हावे म्हणून तो आपल्या साथीदारांसमवेत थेट दिल्ली ते नाशिक असा प्रवास करायचा. आलेल्या मार्गाने पुन्हा जायचे नाही, याकडे ही टोळी लक्ष द्यायची. या प्रवासात बंद असलेले घर अवघ्या १० ते १५ मिनिटांत फोडून मिळेल तो मुद्देमाल घेऊन ही टोळी पसार व्हायची. मोबाइलचा नियंत्रित वापर, परराज्य तसेच घरफोडी करून परत गेलेल्या आरोपींचा बंद होणारा संवाद यामुळे पोलिस आपल्यापर्यंत पोहचूच शकणार नाही, असा आरोपींना ठाम विश्वास होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर काही तासांपर्यंत आरोपी या धक्क्यातून सावरलेच नाहीत.

असा सुरू झाला तपास

पंचवटीपाठोपाठ गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीत दिवसा घरफोडी झाली होती. त्यापूर्वी सतत दिवसाच्या घरफोडीच्या घटना होतच होत्या. स्थानिक धागेदोरे सापडत नसल्याने पोलिसांनी आपले लक्ष परराज्यातील गुन्हेगारांकडे वळवले. दुसरीकडे सतत होत असलेल्या घरफोड्यांच्या पॅटर्नचा अभ्यास केला. गंगापूररोड परिरसरात झालेल्या घरफोडीत तर चोरट्यांनी तब्बल १७ लाख रुपये चोरी केले होते. त्यामुळे पोलिसांनी डिजिटल फूटप्रिंट शोधण्यास सुरुवात केली. हजारो मोबाइल क्रमांकांची छाननी केल्यानंतर पोलिसांना एक क्रमांक मिळाला. मात्र, हा क्रमांक सतत बंद मिळायचा. दुसरीकडे आरोपी सतत सिमकार्डही बदलत होते. मात्र, पोलिसांनी चिकाटीने आपला तपास तीन महिने सुरूच ठेवला. तीन ते चार दिवसांपूर्वी संशयित मोबाइल क्रमांकावरून गुजरात राज्यातील वडोदरा येथे एक कॉल झाला. पोलिसांनी लागलीच हालचाली सुरू केल्या. मात्र, काही सेकंदाच्या कॉलनंतर मोबाइल बंद झाला. त्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा संबंधित हॉटेलकडे वळवला. संशयितांना पकडण्याची संधी दिसताच युनिट दोनचे पोलिस निरीक्षक आंनदा वाघ, सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार रवींद्र बागूल, दीपक जठार, पोलिस शिपाई विशाल देवरे, विशाल काठे, स्वप्नील जुंद्रे, गणेश वडजे यांचे पथक वडोदऱ्यातील हॉटेलमध्ये पोहचले. तिथे संशयित आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, येथे पोहचेपर्यंत पोलिसांना सतत तीन महिने अथक परिश्रम करावे लागले.

२५ हजारांचे बक्षीस

यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी तपास पथकाचे विशेष अभिनंदन करून तपासाच्या दृष्टिकोनातून हा गुन्हा फारच विशेष असल्याचे सांगितले. अत्यंत किचकट स्वरुपाचा तसेच कोणतेही धागेदोरे नसलेला गुन्हा शोधून काढण्यात आल्याने पोलिस आयुक्तांनी तपास पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. गुन्ह्याच्या तपासात पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते, पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर, एपीआय महेश कुलकर्णी, खैरनार, दीपक गिरमे, एएसआय पोपट कारवाळ, जाकीर शेख, पळशीकर, हवालदार रवींद्र बागूल, संजय मुळक, वसंत पांडव, बाळासाहेब दोंदे, अनिल दिघोळे, पोलिस नाईक दिलीप मोंढे, संतोष कोरडे, आसिफ तांबोळी, शिपाई विशाल देवरे, विशाल काठे, स्वप्नील जुंद्रे, गणेश वडजे, शांताराम महाले, गणेश रूमाले, सचिन आजबे, विलास कुटे, निलेश भोईर, चालक सूर्यवंशी, दीपक जठार, प्रतिभा पोखरकर यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात दिवसा घरफोडी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील चौघांच्या टोळीला शहर पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या युनिट एक पथकाने मोठ्या खुबीने जेरबंद केले. संशयितांकडून ४५० ग्रॅम सोन्यासह १० लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या टोळीने नाशिकसह शिर्डी, पुणे, मुंबई, तसेच मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी ठिकाणी गुन्हे केल्याचे समोर आले आहे. सतत तीन महिने पोलिस या टोळीच्या मागावर होते.

शकील उर्फ मुल्ला इस्माईल कुरेशी (वय ६२, ग. मुरादनगर, उत्तर प्रदेश), इर्शाद सिंधू कुरेशी (४६, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश), इशरत अली इज्जत अली (२९, रा. दिल्ली) आणि मोहम्मद शमशाद निजाम (१८, रा. मुरादनगर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असून, त्याच्या अटकेनंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

शहरातील ११ घरफोड्यांची उकल

या टोळीने शहरात ११ घरफोड्या केल्याची माहिती समोर आली असून, त्यात पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीतील तीन, उपनगरमध्ये तीन, मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीत दोन, तर गंगापूर, भद्रकाली आणि आडगाव पोलिस स्टेशन हद्दीतील प्रत्येक एका गुन्ह्याचा समावेश आहे. संशयितांकडून या घरफोड्यांमधील ४५० ग्रॅम वजनाचे सोने, एक कार, तसेच १० लाख रुपयांची रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हे संशयित सराईत असून, वेगवेगळ्या टीम्स बनवून शिताफीने घरफोडीचे गुन्हे करीत होते.

संशयितांना झोपेतच उचलले

'हॉटेलमध्ये रूम बुक करा, आम्ही येतो आहे,' असे म्हणून संशयितांनी मोबाइल बंद केला. मोबाइलवरील हाच कॉल संशयितांपर्यंत पोहोचण्यास पुरेसा ठरला. या कॉलनुसार पोलिसांनी हॉटेलचा पत्ता शोधून काढला. संशयितांनी मुद्दाम हायवेपासून जवळपास ४० किलोमीटर आत असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामाचा बेत आखला होता. संशयितांना पकडण्याची चांगली संधी असल्याने क्राइम ब्रँच युनिट दोनचे पोलिस निरीक्षक आंनद वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार रवींद्र बागूल, दीपक जठार, पोलिस शिपाई विशाल देवरे, विशाल काठे, स्वप्नील जुंद्रे, गणेश वडजे यांचे पथक हॉटेलमध्ये पोहोचले. संशयितही तेथे आले होते. त्यांनी जेवण घेतले आणि ते निद्रिस्त झाले. हीच संधी साधून पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाच्या मदतीने अखेर आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुशावर्त, ब्रह्मगिरीचे दत्तकविधान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त आणि ब्रह्मगिरी पर्वत दत्तक घेत असल्याचेही सांगितले. येथे सोमवारी राज्याचे अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी देवदर्शनासाठी भेट दिली. मंदिराचे प्रवेशद्वारी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र, मंदिर विश्वस्त अॅड. श्रीकांत गायधनी, कैलास घुले आदींनी त्यांचे स्वागत केले. भाजप प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, मुख्याधिकारी तथा मंदिर ट्रस्ट सचिव डॉ. चेतना केरूरे, तहसीलदार महेंद्र पवार, बांधकाम सभापती दीपक लोणारी आदी उपस्थित होते. यावेळी मुनगंटीवार यांनी हे दत्तकविधान केले. मुनगंटीवार शिवसेनेचे मंत्री केसरकर यांना सोबत घेऊन आले होते. यावेळी चर्चेदरम्यान त्यांनी भाजप व शिवसेनेने एकत्र लढले पाहिजे असे सांगितले. मुनगंटीवार आणि केसरकर यांचे स्वागत करण्यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे एकही पदाधिकारी येथे आले नाही.

आठवड्याला संवाद साधा

राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तची स्वच्छता, जलशुद्धिकरण प्रकल्पासह ब्रह्मगिरी पर्वत हिरवागार करण्याचा संकल्प सोडला. तसेच आपण कुशवर्त आणि ब्रह्मगिरी दत्तक घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी डॉ. केरूरे यांनी नमामि गोदा अभियानातंर्गत केलेल्या कामांची माहिती दिली. कुशावर्त स्वच्छता, त्याचे सुशोभिकरण आणि ब्रह्मगिरी हिरवाई वाढविण्यासाठी दर आठवड्याला सचिवांशी संवाद झाला पाहिजे, अशा सूचना यावेळेस प्रशासनाला देण्यात आल्या.त्र्यंबक तालुक्यातील निसर्गसंपदा संर्वधनासाठी आपण स्वत: लक्ष घालत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या वतीने विविध विकास कामांबाबत त्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये शहरातील तलावांचे विकसन आदी सुविधांचा समावेश आहे. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांच्या हातून हे निवेदन सुधीर मुनगंटीवार यांनी स्वीकारले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटत्या नोकऱ्यांवर स्वयंरोजगार हाच राजमार्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या यापुढे कमी होत जाणार आहेत. ही परिस्थिती सत्य असली तरीही यातून मार्ग काढण्यासाठी स्वयंरोजगार हा राजमार्ग ठरू शकतो, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते माधव भडारी यांनी केले.

ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल अर्थात (बीबीएनजी) या राष्ट्रीय परिषदेत पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भंडारी बोलत होते. भंडारी म्हणाले, "आपले राज्य सुरळीत चालावे यासाठी ब्रिटिशांनी ब्राह्मण समाजाचे खच्चीकरण केले, तसेच अन्य समाजात भांडणे लावली. ब्रिटिशांच्या या कारस्थानास सर्व समाजातील घटक बळी पडले; पण आपण आता ही जुनी ओझी उतरवून भविष्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. राजकीय नेतृत्व अधिक काळ न मिळाल्यास फारसे काही बिघडत नाही. राजकीय नेतृत्वाशिवायही माणसे उद्योगासारख्या क्षेत्राद्वारे विकास साधू शकतात, या दृष्टिकोनावर समाजाने भर द्यायला हवा."

भंडारी म्हणाले, की आगामी काळात ज्ञान आणि शेती या दोन क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. ब्राह्मण समाजाने ज्ञान जोपासना आणि ज्ञानदानात आजवर मोठे योगदान दिले आहे. याच ज्ञानाचा उपयोग शेतीमधील बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरिता केल्यास त्याचा देशाला फायदा होईल.

परिषदेच्या शेवटच्या सत्रात प्रतिष्ठेच्या 'जीवनगौरव' व 'उद्यम कौस्तुभ' हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार भारत- इस्रायल संबंधाचे जनक ९२ वर्षीय एन. बी. एच. कुलकर्णी यांना देण्यावर आला, तर उद्यम कौस्तुभ पुरस्कार पुण्याचे प्रख्यात कंपनी सेक्रेटरी मकरंद जोशी, फाय फाउंडेशन पुरस्काराने गौरविलेले नाशिकचे उद्योजक नितीन केळकर, औरंगाबादचे शासकीय कंत्राटदार विवेक देशपांडे, भारतीय म्हशीचे वाण विकसित करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारे चितळे उद्योगसमूहाचे विश्वास चितळे व उद्योजकता विकास क्षेत्रात काम करणारी पुण्याची सामाजिक संस्था 'दे आसरा' व राजेंद्र बेडेकर यांना देण्यात आले. तत्पूर्वी दुपारच्या सत्रात 'कुटुंब रंगलंय काव्यात'फेम विसूभाऊ बापट यांनी कविता सादर केल्या.

अशोका बिल्डकॉनचे संचालक संजय लोंढे, प्रदीप पेशकार, मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते. मधुरा कुंभेजकर, रोहन कुलकर्णी, महेश देशपांडे ,समीर मुळे, यशवंत वेसीकर, सलील केळकर, दिनेश शर्मा, अविनाश शुक्ल, रोहित कावळे आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवीदेवतांचे फोटो नकोत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुसऱ्या दिवशी कार्यालयामध्ये देवी-देवतांचे फोटो लावून कामकाज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे. शासन निर्णयाचा आधार घेत, पालिकेच्या कार्यालयात देवी-देवतांची छायाचित्रे लावू नयेत असे सांगत, त्या हटविण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर आयुक्त कार्यालयासह विभागप्रमुखांच्या कार्यालयातीलही देवी-देवतांच्या तसबिरी हटवण्यात आल्या. यावरून नवा वाद ओढावण्याची शक्यता आहे. मुंढे यांनी अधिकाऱ्यांना माध्यमांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला असून, कोणत्याही अधिकाऱ्याने परस्पर मीडियाशी बोलू नये असे फर्मान काढले आहे.

मुंढे यांच्या अल्टिमेटमनुसार महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटीचे दोन दिवस राब राब राबून महापालिका कार्यालयाची स्वच्छता केली. त्यानंतर मुंढेंनी या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयासह विविध कार्यालयांत लावलेल्या देवी-देवतांच्या तसबिरी काढण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आयुक्तांच्या स्वीय सहाय्यक कार्यालयात असलेला दत्ताचा फोटोही हटविण्यात आला आहे. त्यासोबत शहर अभियंता, अतिरिक्त आयुक्त व विभाग प्रमुखांच्या कार्यालयात असलेले देवी देवतांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत. आयुक्तांच्याच सूचना असल्याने अधिकाऱ्यांनी त्याची तातडीने अंमलबजावणी केली आहे. पालिकेच्या भिंतींवर आता महापुरुषांचेच फोटो राहणार आहेत. या नव्या फर्मानामुळे वाद ओढावला जाण्याची शक्यता आहे. भाजपची महापालिकेत सत्ता आहे. महापालिकेत देवी-देवता हद्दपार झाल्याने हिंदूत्ववादी संघटनांकडून याबद्दल आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.

पारदर्शकतेला फाटा

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना माध्यमापासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. यामुळे पारदर्शक कारभाराच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला छेद गेला आहे. महापालिकेतील सर्व बातम्या ह्या जनसंपर्क विभाग तसेच आपणाकडूनच गेल्या पाहिजेत असे फर्मान त्यांनी काढले आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने मीडियाशी बोलू नये, अशी तंबी देतानाच मुंढे यांनी प्रसिद्धीचा झोत केवळ आपल्यावरच राहण्याची व्यवस्था केल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.

फॉर्मल ड्रेसमध्येच या!

महापालिकेतील कामकाजाला निपटारा करण्यासोबतच मुंढेंनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर नियमावलीची जंत्रीच ठेवली आहे. मुंढे यांनी अधिकाऱ्यांनी कार्यालयात येताना जीन्स पॅँट, टी-शर्ट घालून येऊ नये, फॉर्मल ड्रेसमध्येच यावे अशा सूचनाही केल्या आहेत. त्यामुळे अधिकारी वर्ग चांगलाच धास्तावला असून, आतापर्यंत मनमौजी ड्युटी करणाऱ्यांची या निर्णयाने चांगलीच गोची होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images