Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बँक संपामुळे दुसऱ्या दिवशीही हाल

$
0
0

एटीएमवर गर्दी ; कर्मचारी संघटनेकडून निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

प्रलंबित मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेतर्फे पुकारण्यात आलेला संप शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सुरू होता. स्टेट बँक ऑफ इंडिया स्टॉफ युनियनच्यावतीने स्टेट बँकेच्या मुख्यशाखेच्या प्रवेशद्वारासमोर घोषाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. तर बँक बंद असल्याने क्लिअरिंग ठप्प झाले असून एटीएमवर नागरिकांची गर्दी झाली होती. विविध मागण्यांसाठी व शासनाच्या धोरणाविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. नफा नसल्याने वेतन वाढ अल्प प्रमाणात ही अट सरकारने लादलेली आहे. याचा निषेध संपादरम्यान करण्यात आला. स्टेट बँकेच्या मुख्य कार्यलयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी विभागीय सचिव शाम पाटील, उपसचिव बाबुलाल चव्हाण, अशोक देवरे, प्रसाद पाटील, पुरुषोत्तम चव्हाण, विजय सपकाळे, भालचंद्र कोतकर, किशोर सुर्वे, प्रतिक देव, विनया जोशी, अनुप जाजू आदी उपस्थित होते.

क्लिअरिंग ठप्प

बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही पुकारलेल्या संपामुळे शहरातील बँकांमधील दोन दिवासात सुमारे ७०० कोटी रुपयांच्यावर व्यवहार ठप्प झाले. तर या दोन दिवसात १ हजार २०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे चेक क्लिअरिंग ठप्प झाले असल्याने व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे.

बेमुदत संपाचा इशारा

प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला संप हा दोन दिवसीय होता. दरम्यान, संपानंतर शासनदरबारी बैठक होणार आहे. बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास येत्या आठ दिवसांत बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचे विभागीय सचिव शाम पाटील यांनी सांगितले.

एटीएमध्ये पैशांचा तुटवडा

दोन दिवसांपासून शहरातील राष्ट्रीयकृत व शासनाच्या बँका बंद आहे. त्यामुळे बँकेतील व्यवहार बंद झाले आहेत. पैसे काढण्यासाठी शहरातील एटीएमवर दोन दिवसांपासून गर्दी दिसून येत आहे. मात्र एटीएममध्ये पैशांचा तुटवडा असल्याने शहरातील बहुतांश एटीएम बंद स्थितीत दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लूटमार करणाऱ्या सात जणांना अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चारचाकी वाहनांना रस्त्यात अडवून वाहनचालकास मारहाण करीत वाहन चोरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून दोन कार जप्त करण्यात आल्या असून, लुटमारीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

प्रवीण पारधी (२८, रा. निनावी, पिंपळगाव डुकरा, ता. इगतपुरी), कृष्णा निसरड (२०, रा. घोटी, ता. इगतपुरी), योगेश टोचे (३५, रा. साकुरफाटा, ता. इगतपुरी), रोहिदास वाकचौरे (३०, रा. पिंपळगाव डुकरा, ता. इगतपुरी), हर्षद सहाणे (२२. रा. हिवरे, ता. सिन्नर), सचिन टोचे (२७, रा. भरवीर, तो इगतपुरी) आणि सचिन जाधव (१८, रा. पिंपळगाव डुकरा, ता. इगतपुरी) अशी या संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. या प्रकरणी ग्रामसेवक भाऊराव नामदेव ठाकरे (रा. कळवण) यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांनी ४ मार्च २०१८ रोजी नाशिककडून कळवणकडे जाणाऱ्या ठाके यांना रस्त्यात गाठून मारहाण करीत त्यांची कार (एमएच ४१, व्ही. ८६९८) पळवली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे यांना पिंपळगाव डुकरा येथील प्रवीण पारधी आणि निसरड यांची माहिती मिळाली. अधिक तपास केला असता पोलिसांना दोघांकडे एक संशयास्पद कार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यात इतर संशयित आरोपींची नावे समोर आली. यातील योगेश टोचे याचे साकूर फाट्यावर गॅरेज असून, त्यानेच अन्य साथिदासोबत नवीन कार चोरण्याचा कट आखला होता. संशयित आरोपींनी ४ मार्च रोजी गुन्ह्यात वापरलेली आणखी एक कार (एमएच १५, डी. सी. ३८१६) जप्त केली. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक अशोक कर्पे, पीएसआय मच्छिंद्र रणमाळे, एएसआय नवनाथ गुरूळे, रवींद्र शिलावट, हवालदार दीपक आहिरे, दत्तात्रय साबळे, पुंडलिक राऊत, गणेश वराडे, पोलिस नाईक अमोल घुगे, कॉन्स्टेबल हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, विश्वनाथ काकड, संदीप लगड, राजू वायकंडे, योगेश गुमलाडू आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपोषणमुक्तीसाठी महंतांचा पुढाकार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुका कुपोषणमुक्त करण्यासाठी बेझे येथील श्रीराम शक्तीपीठ भक्त मंडळ पुढे सरसावले आहे. महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या प्रेरणेने हरसूल येथे शनिवारी (दि. २) आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. ब्रह्मचार्य सोमेश्वर कल्याणकारी संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. या आरोग्य शिबिरात आदिवासी भागातील महिला आणि, बालके यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांना योग्य तो औषधोपचार करण्यात येणार आहे. मोतीवाला कॉलेज व स्पंदन हॉस्पिटल बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील पाटील, स्रीरोगतज्ञ डॉ. काळे, डॉ. गोसावी, डॉ सप्नील सैंदाणे, डॉ. प्रणव नायकवाडे, डॉ. अजय कापडणी आदींचे सहकार्य लाभणार आहे. शिबिरात महिला, बालके, वयोवृद्धांची कान, नाक, घसा, खरुज या आजारांची तपासणी करून त्यावर औषधोपचार करण्यात येणार आहे. हरसूल येथील हिरे महाविद्यालयात सकाळी ९ ते ५ या वेळेत येण्याचे हे शिबिर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गेट’मध्ये प्रांजल देशाच्या मानांकन यादीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

कादवा सहकारी साखर कारखाना राजाराम नगर येथील विद्यार्थिनी प्रांजल शरदचंद्र चव्हाणके हीने गेट (ग्रॅज्युएट अॅपटिट्यूड टेस्ट फॉर इंजिनीअरिंग) परीक्षेत देशात १५०वी रँक मिळवली आहे. तिची एम.टेक.साठी आयआयटी खरगपूर येथे निवड झाली आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याचे स्थापत्य अभियंता शरदचंद्र चव्हाणके यांची कन्या प्रांजल हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कादवा कारखाना येथील शाळेत झाले. चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत प्रांजल जिल्ह्यात तिसरी आली होती. दहावीतही ती विद्यालयात प्रथम आली होती. केटीएचएम कॉलेजमध्ये बारावी उत्तीर्ण होत जेईई परीक्षेतही चांगले गुण मिळत तिला पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. टेक प्लॅनिंगसाठी प्रवेश मिळाला होता. बी. टेक मध्येही तिने गुणवत्ता मिळवली होती. एम. टेक.च्या प्रवेशासाठी तिने गेट परीक्षा देत तेथेही गुणवत्तेत देशात दीडशे रँक मिळवली.

फोटो :कादवा सहकारी साखर कारखाना राजाराम नगर येथील विद्यार्थिनी प्रांजल शरदचंद्र चव्हाणके हीने गेट परीक्षेत देशात 150 वी रँक मिळवली असून तिची एमटेक साठी आय.आय.टी. खरगपुर येथे निवड झाली त्याबद्दल तिचा सत्कार करताना कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे,कार्यकारी संचालक बाळासाहेब उगले, स्थापत्य अभियंता,शरदचंद्र चव्हाणके आदी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्तेबंदीच्या अधिकाराने देवळालीत संभ्रमात भर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळालीसह देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंटमध्ये लष्कराकडून नागरी वापराचे रस्ते बंद करण्यात आल्यानंतर ते संरक्षण मंत्रालयाच्या आदेशाने खुले करण्यात आले आहेत. यापुढे नागरी वापरातील कोणताही रस्ता बंद करायचा असल्यास ते अधिकार फक्त स्थानिक कॅन्टोन्मेंट बोर्डाला राहणार असल्याची माहिती नव्या आदेशामुळे समोर आली आहे.

या निर्णयाबाबत लष्करी प्रशासनाकडून विरोध दर्शविताना घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत काही लष्करी अधिकाऱ्यांसह कुटुंबीयांनी असे रस्ते खुले करणे म्हणजे देशाची लष्करी सुरक्षा ऐरणीवर आणल्यासारखे होईल, अशी भूमिका घेत या निर्णयाविरोधात काही अधिकारी व जवानांच्या पत्नींकडून स्वाक्षरी मोहीमही राबविली जात आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून हा आदेश मागे घेण्याबाबत सांगण्यात येत आहे. मात्र, त्याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट नसले, तरी या निर्णयामुळे लष्कर व नागरिक यांच्यात अधिक सलोखा निर्माण होऊन नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार असल्याने या निर्णयात बदल करू नये, अशी मागणी दि. २६ मे रोजी संरक्षणमंत्री याची भेट घेऊन केली होती. त्यानुसार दि. २८ मे रोजी संरक्षण मंत्रालयाने देशभरातील सर्व लष्करी आस्थापनांना पत्र पाठवून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा व मान्यतेशिवाय कुठलाही रस्ता बंद होणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’ हरकतींसाठी २१ दिवस

$
0
0

तोपर्यंत शेतकऱ्यांना थेट खरेदीने देता येणार जमिनी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाकरिता भूसंपादन कायद्याद्वारे जमिनी खरेदी करता यावी याकरिता प्रशासनाने आता अंतिम प्रक्रिया सुरू केली आहे. अलीकडेच त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, या अधिसूचनेवर शेतकऱ्यांना २१ दिवसांत हरकती घेता येणार आहेत. हरकती आणि त्यावरील सूनावणीसाठी एक ते दीड महिना जाणार असून, तोपर्यंत शेतकरी थेट खरेदीने जमिनी देऊ शकणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असून त्यांनी थेट खरेदीद्वारे जमिनी देऊन आपले आर्थिक नुकसान टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

समृद्धी महामार्गासाठी सरकारला शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. या जमिनी थेट खरेदीने घेण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी बाजारभावाच्या पाचपट दर दिला जात आहे. जिल्ह्यात ११०८ हेक्टर जमीन सरकारला या प्रकल्पासाठी संपादित करावयाची असून आतापर्यंत ७० ते ७२ टक्के जमिन संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जमिनी देण्यास सर्वाधिक शिवडे ग्रामस्थांनी केला. त्यांची मनधरणी करण्यास प्रशासनाला यश आले आहे. तरी देखील अजूनही काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होऊ शकलेल्या नाहीत. प्रकल्प अधिक रेंगाळू नये याकरिता अशा जमिनी थेट भूसंपादन कायद्याद्वारे अधिग्रहीत करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ज्या जमिनी संपादित करावयाच्या आहेत त्याबाबतची अधिसूचना सरकारने बुधवारी (दि.३०) प्रसिद्ध केली. त्यामुळे समृद्धीसाठी २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. या अधिसूचनेवर हरकती घेण्यासाठी किंवा सूचना करण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना २१ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत शेतकरी इगतपुरीचे प्रांताधिकारी राहुल पाटील तसेच सिन्नरचे प्रांताधिकारी महेश पाटील यांच्याकडे आपल्या हरकती नोंदवू शकणार आहेत. या हरकतींवर सूनावणी घेण्याची प्रक्रिया त्यानंतर पार पाडली जाणार आहे. हरकतींवरील सूनावणीच्या प्रक्रियेपर्यंत शेतकरी त्यांच्या जमिनी थेट खरेदीने देऊ शकणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोठ्याला आग; दोन जनावरांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील वाढोली येथील शेतकरी दशरथ राधाकृष्ण ठाणगे यांचा जनावरांचा गोठा जळून खाक झाला. शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे या गोठ्याला आग लागली. या आगीत दोन जनावरांचा मृत्यू झाला. सोबत १० ट्रॅक्टर गवत व शेणखत जळून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तलाठी संतोष जोशी, संजय पाटील, एस. बी. बोंद्रे यांनी पंचनामा केला.

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे बंबाची मागणी केली असता मुख्याधिकाऱ्यांनी ही गाडी जागेवरून हलवायची नाही, असे बजावले असल्याचा खुलासा संबंधित कर्मचाऱ्याने केला. नगरपालिकेकडे अग्निशमन बंब आहे परंतु फायरब्रिगेडसाठी आस्थापना येथे नाही. वाहनचालकही नाही. त्यामुळे हा बंब केवळ शेभेची वस्तू ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला चोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेतील शिक्षकाने आठवीतील विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला असून, संतप्त नागरिकांनी शिक्षकाला चोप दिला. यानंतर शिक्षकाविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेतील सुनील कदम या शिक्षकाने शाळेतील आठवीतील विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून 'आय लव्ह यू म्हणून तूपण मला आय लव्ह यू म्हण' अशी गळ घातली. विद्यार्थिनीने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही दिवसांपूर्वी कदम या विद्यार्थिनीच्या घराजवळसुद्धा गेल्याचे समजते. यामुळे ती घाबरली. त्यातच सुनीलने या विद्यार्थिनीला हा प्रकार कोणाला सांगितला तर बघ म्हणून दमसुद्धा दिला. या भीतीपोटी विद्यार्थिनीने शाळेतच न जाण्याचा निर्णय घेतला. पालक या तिला शाळेस जाण्यास सांगत असतानाही ही जातच नसल्याने पालकांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर पालकांनी थेट शाळेतच जाऊन शिक्षकाला चोप देऊन जाब विचारला. इंदिरानगर पोलिसांना याबाबतची माहिती देऊन सुनीलविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर कदम फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान कदम याच्या विरोधात यापूर्वीही काही तक्रारी असल्याची चर्चा पालकांमध्ये होती. त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

संबंधित शिक्षक निलंबित

शाळेत शुक्रवारी उघडकीस आलेल्या प्रकाराबाबत शाळा व्यवस्थापनाला काहीही माहीत नव्हते. संबंधित मुलीच्या पालकांनी शिक्षकांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराची दखल घेत आज आम्ही संबंधित शिक्षकाला निलंबित केले आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमराणा, मालेगाव बाजार समितीकडून नोटिशीला ठेंगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याप्रकरणी मनमाड, येवला, मालेगाव, उमराणे बाजार समितीला जिल्हा उपनिबधकांनी नोटिसा बजावल्या आहेत. परंतु उमराणा आणि मालेगाव बाजार समितीने या नोटिसांना ठेंगा दाखविला असून, त्यांना ११ जूनपर्यंत मुदत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाजार समित्यांमध्ये २० व्यापाऱ्यांनी १४९९ शेतकऱ्यांचे सुमारे पाच कोटी रुपये थकविले आहेत. चौदाशेहून अधिक शेतकऱ्यांची पाच कोटी रुपयांची देणी न देणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात जिल्हा उपनिबंधकांनी पाच बाजारसमित्यांना बरखास्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. जिल्ह्यातील देवळा, मनमाड, येवला, मालेगाव, आणि उमराणे बाजारसमित्यांचा त्यामध्ये समावेश आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर येवला व देवळा बाजार समितीने शेतकऱ्यांचे थकित पैसे परत केले. तर मनमाड बाजार समिती संचालकांनी स्वतः अनामत रक्कम भरून शेतकऱ्यांचे पैसे परत करण्याची तयारी दर्शविली. उमराणे आणि मालेगाव बाजार समित्यांनी मात्र अद्याप या नोटीसला अनुसरून कार्यवाही केलेली नाही. त्यांना शेतकऱ्यांचे पैसे परत करण्यासाठी ११ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा बाजार समिती बरखास्तीची कारवाई होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस दलात खांदेपालट

$
0
0

२० पोलिस निरीक्षकांसह ३४ अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलातील २० पोलिस निरीक्षकांसह (पीआय) ३४ एपीआय आणि पीएसआर यांची बदली करण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुरूवारी रात्री याबाबत आदेश काढले. या बदल्यांमध्ये प्रशासकीय, विनंती आणि कालावधी पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश असला तरी काहींना दिरंगाई केल्याचा फटका बसला आहे.

अंबडचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्याकडे पंचवटीची धुरा देण्यात आली असून, पंचवटीचे दिनेश बर्डेकर यांच्याकडे शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून या बदल्यांकडे पोलिस दलाचे लक्ष लागले होते. ३१ मे पर्यंत बदल्याबाबत अंतिम निर्णय बंधनकारक असल्याने मागील काही दिवसांपासून याबाबत बैठका पार पडल्या. यातील बहुतांश बदल्या प्रशासकीय तसेच विनंतीनुसार असल्या तरी काही पोलिस निरीक्षकांबाबत येणाऱ्या तक्रारींमुळे बदलीस सामोरे जावे लागले.

१७ जणांच्या अंतर्गत बदल्या

आयुक्तालयातील ३४ एपीआय आणि पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या गुरूवारी करण्यात आल्या. त्यात म्हसरूळचे वाल्मीक शार्दुल यांची पंचवटी, संजय बेडवाल यांची वाहतूक शाखा, भद्रकालीच्या मोहिनी लोखंडे यांची नियंत्रण कक्षात, मुंबई नाक्याचे केतन राठोड यांची विशेष शाखा, मनीषा घोडके यांची अंबड, मनोज शिंदे यांची भद्रकाली, नितीन कंडारे यांची गंगापूर, वाहतूक शाखेचे सुरेश भाले यांची सातपूर, गुन्हे शाखेचे दीपक गिरमे व नागेश मोहिते यांची पंचवटी, सातपूरचे योगेश देवरे यांची नियंत्रण कक्ष, वीज वितरणचे अभिजीत सोनवणे यांची युनिट दोन, पंचवटीचे महेश कुलकर्णी यांची युनिट एक, सायबरचे अतुल डहाके यांची बीडीडीएस, आडगावचे अशोक महिरे यांची नियंत्रण कक्ष उपनगरचे सदाशिव भडीकर यांची म्हसरूळ अंबडच्या पुष्पा निमसे यांची युनिट एकला बदली करण्यात आली आहे. वरील सहाय्यकांसह १७ उपनिरीक्षकांच्याही अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलिस निरीक्षक-सध्या कार्यरत- बदलीचे ठिकाण

नम्रता देसाई-वाहतूक शाखा-तांत्रिक विश्लेषण विभाग

विजय पन्हाळे- आर्थिक गुन्हे- पोलिस मुख्यालय, प्रशासन

किशोर मोरे- विशेष शाखा- गंगापूर पोलिस स्टेशन

सोमनाथ तांबे- दहशतवादविरोधी विभाग- अंबड

मधुकर कड-अंबड पोलिस स्टेशन- पंचवटी पोलिस स्टेशन

गुरूनाथ नायडू- वाहतूक शाखा- नियंत्रण कक्ष

दिनेश बर्डेकर- पंचवटी पोलिस स्टेशन- क्राइम युनिट दोन

राजेश आखाडे- सातपूर पोलिस स्टेशन- दहशतवादविरोधी विभाग

सिताराम कोल्हे- नियत्रंण कक्ष- विशेष शाखा

सुरज बिजली-नाशिकरोड-आडगाव

सुरेंद्र सोनवणे- मुंबईनाका-वाहतूक विभाग

अनिल पवार- महिला सुरक्षा विभाग- देवळाली कॅम्प

सुभाष डौले- देवळाली कॅम्प- महिला सुरक्षा विभाग

के. डी. पाटील- गंगापूर पोलिस स्टेशन- नियंत्रण कक्ष

नीलेश माईनकर- युनिट दोन- दंगल नियंत्रण पथक

सुनील पुजारी- आडगाव- आर्थिक गुन्हे शाखा

सुनिल नंदवाळकर- मुंबईनाका पोलिस स्टेशन- आर्थिक गुन्हे शाखा

मनोज कंरजे- दंगल नियंत्रण पथक- मुंबई नाका

कमलाकर जाधव- भद्रकाली पोलिस स्टेशन- सायबर पोलिस स्टेशन

राजेंद्र कुटे- तांत्रिक विश्लेषण विभाग- सातपूर पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ वर्षांनंतर पहिला वीज चोरी गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्यातील महावितरणची सर्व पोलिस ठाणी कायमस्वरुपी बंद झाल्याने या पोलिस ठाण्यांतील वीजेविषयीचे सर्व प्रलंबित गुन्हे स्थानिक पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्यात वीज चोरीचा पहिला गुन्हाही दाखल झाला आहे.

नाशिक शहर मंडळातील वडनेर पाथर्डी रोडवरील बालाजी बेकरी या शॉपचे मालक जसवंतसिंग चव्हाण यांनी मीटरमध्ये वीज चोरीच्या उद्देशाने फेरफार केल्याचे उघड झाल्याने त्यांच्या विरोधात महावितरणच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणच्या नाशिक शहर मंडळाच्या भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या पथकातील सहाय्यक अभियंता ए. जी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता डी. जी. पंडारे, कनिष्ठ तंत्रज्ञ एल. एम. सोनवणे आदींच्या पथकाने जसवंतसिंग चव्हाण यांच्या केक शॉपच्या वीज मीटरची एप्रिलमध्ये पाहणी केली. त्यांना वीज मीटर वजा ६८.३७ टक्के मंद गतीने फिरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या पथकाने पंचक येथील वीज मीटर चाचणी कक्षाकडे तपासणीसाठी पाठविले. या वीज मीटरमध्ये लूप वायर टाकून फेरफार केल्याचे तपासणीतून उघड झाले.

आठ लाखांची फसवणूक

जसवंतसिंग चव्हाण यांनी गेल्या २२ महिन्यांत तब्बल ४७ हजार ६६ इतक्या वीज युनिटची चोरी करून महवितरणचे तब्बल ७ लाख ९० हजार ५८० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महावितरणच्या शहर मंडळाच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय काळे यांनी नाशिकरोड पोलिसात चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभराच्या नोटांची छपाई बंद

$
0
0

नाशिकरोड प्रेसमध्ये पाचशेच्या नोटांचे उत्पादन तिप्पट

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

नाशिकरोड नोट प्रेसमध्ये (सीएनपी) पाचशेच्या नोटांचे उत्पादन तिपटीने वाढविण्याची ऑर्डर रिझर्व्ह बँकेने दिली आहे. या प्रेसमध्ये शंभराच्या नोटेची छपाई अनेक वर्षांपासून होत होती. 'आरबीआय'ने शंभराच्या नोटेच्या छपाईची जबाबदारी या प्रेसकडून काढून घेतल्याची माहिती प्रेसच्या सूत्रांनी दिली. नोटांचे उत्पादन तब्बल ७० टक्क्यांनी वाढविण्यात आल्याने आता प्रेसमध्ये पूर्ण क्षमतेने म्हणजे दिवसाला १७ दशलक्ष नोटांचे उत्पादन सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरबीआय'ने काही दिवसांपूर्वीच सीएनपीला शंभराच्या नोटांची छपाई थांबविण्यास सांगितले. त्याचवेळी पाचशेच्या नोटांची छपाई तिपटीने वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिकरोड प्रेसला चालू आर्थिक वर्षात पाचशेच्या एक हजार दशलक्ष नोटा छापण्याचे निर्देश दिले होते. आता हे लक्ष्य तिप्पट म्हणजे तीन हजार दशलक्ष करण्यात आले आहे.

'आरबीआय'ने अलिकडे स्वतःचे म्हैसूर (कर्नाटक) आणि सालगोणी (पश्चिम बंगाल) येथे नोट कारखाने सुरू केले आहेत. त्यामध्ये आधुनिक मशिनरी लावलेली आहे. तेथेही नोटांची छपाई होते. प्रेस महामंडळाच्या नाशिकरोड आणि देवास (मध्य प्रदेश) येथे नोट प्रेस आहेत. नाशिकरोड प्रेस एवजी देवास प्रेसला आता शंभराच्या तसेच दोनशेच्या नोटांची छपाई करण्यास 'आरबीआय'ने सांगितले आहे.

सरकारी निर्णयातील दिरंगाईमुळे नोटांची टंचाई जाणवतच असते. उपलब्ध नोटांमध्येही व्यवहार सुरळीत होऊ शकतात. मात्र, 'आरबीआय'ने काढलेल्या दोनशे, पाचशे व दोन हजाराच्या नोटा परत बँकेत भरणा केल्या जात नसल्याने एटीएममध्ये खडखडाट आहे. नोटा बँकेतून काढण्याचे प्रमाण वाढले आहे. भरणा तेवढा होत नाही.

'त्या' ऑर्डरचे काय?

नाशिकरोड नोट प्रेसला या आर्थिक वर्षात शंभराच्या तब्बल दोन हजार दशलक्ष नोटा छापण्याचे निर्देश 'आरबीआय'ने दिले होते. तसे पत्र प्रेसला मिळालेही होते. तयारीही झाली होती. तथापी, एक एप्रिलपासून शंभर आणि वीसच्या नोटांची छपाईच बंद पडलेली आहे. या नोटा नव्या स्वरुपात येणार आहेत. मात्र, अर्थमंत्रालयाच्या दिरंगाईमुळे या नोटांचे नवीन डिझाईन प्राप्त झाले नाही. त्यामुळे गेल्या एक एप्रिलपासून या दोन्ही नोटांची छपाई ठप्प आहे. त्याऐवजी पाचशेच्या नोटा छापण्याचे आदेश 'आरबीआय'ने नाशिकरोड प्रेसला दिले आहेत.

नाशिकरोड प्रेसमध्ये शंभराच्या नोटांची छपाई थांबली आहे. त्याऐवजी 'आरबीआय'ने या प्रेसला पाचशेच्या नोटांची छपाई जास्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून प्रेसमध्ये आता पूर्ण क्षमतेने नोंटांचे उत्पादन सुरू आहे. कामगारांसह सर्वांचे चांगले सहकार्य मिळत आहे.

- जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी परताव्यावर खास शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयातर्फे जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी भरलेल्या कररूपी रकमेच्या परताव्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. यासाठी नाशिक येथील जीएसटी कार्यालयातर्फे ३१ मे ते १४ जून या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांसाठी जीएसटी परताव्यासाठी खास शिबिर होणार आहे.

व्यापाऱ्यांनी भरलेल्या रकमेच्या परताव्यासाठी अनेकदा फेऱ्या माराव्या लागत होत्या. करपरतावा कधी मिळेल, याचे ठोस उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे यात सुसूत्रता यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन निवेदनही दिले होते. त्याचा परिणाम म्हणून जीएसटी आयुक्तांनी १४ जूनपर्यंत विशेष शिबिर आयोजित केले आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी सिडकोतील कमिशनर ऑफ सीजीएसटी कार्यालयात शिबिर होणार असून, त्यासाठी अमोल केत, विवेकानंद जाधवार व श्वेता पचौरी या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी २३९९९५३, ५४, ४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर येथील व्यापाऱ्यांसाठी किसान क्रांती बिल्डिंग मार्केट यार्ड, स्टेशन रोड, अहमदनगर येथे शिबिर होईल. या ठिकाणी नोडल अधिकारी म्हणून गिरीश वडसेरी यांची नेमणूक करण्यात आली असून, अधिक माहितीसाठी ०२४१-२४५०१८१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. धुळे विभागासाठी सीजीएसटी कार्यालय, पहिला मजला, प्लॉट नं १९, स्वामी दयानंद हौसिंग, सिंचन भवनामागे, साक्री रोड, धुळे येथे शिबिर होणार आहे. येथे संजय दवे यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, माहितीसाठी ०२५६२-२७६३६५ या क्रमांक दिला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी सीजीएसटी कार्यालय, डॉ. बेंद्रे टॉवर, इच्छादेवी चौक, जळगाव येथे शिबिर होणार असून, त्यासाठी सी. पी. सिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ०२५७- २२२५४९१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपायुक्तपदी सुरेखा पाटील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला बाल कल्याण विभागाच्या उपायुक्तपदाचा कार्यभार महिला व बाल कल्याण अधिकारी सुरेखा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. उपायुक्त बी. टी. पोखरकर सेवानिवृत्त झाल्यानंतर पाटील यांनी शुक्रवारपासून कामकाज पाहण्यास सुरुवात केली.

महिला व बाल कल्याण विभागाचे आयुक्तालय पुणे येथे असून, नाशिकमध्ये पाच जिल्ह्यांसाठी उपायुक्त काम पाहतात. काही वर्षांपासून पोखरकर हे काम पाहत होते. ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या पदाचा कार्यभार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. महिला व बाल विकास विभागाच्या योजना तसेच त्याअनुषंगाने असलेले कायदे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोखरकर यांच्यासह पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजीवनी, मोनिकाची ‘सुवर्णधाव’

$
0
0

लोगो

राज्य अॅथलेटिक्स स्पर्धा

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे सुरू असलेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकची संजीवनी जाधव, मोनिका आथरे, प्रगती मुळाणे, सुनील पावरा यांनी सुवर्णपदक पटकावले.

विभागीय क्रीडा संकुलाच्या सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा झाली. स्पर्धेत १८ वर्षांखालील (ज्युनिअर) मुले आणि मुली आणि सीनिअर पुरुष आणि महिलांच्या खुल्या गटातील स्पर्धा शुक्रवारी झाल्या. महिलांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नाशिकच्या खेळाडूंनी वर्चस्व राखत पहिली तिन्ही बक्षिसे जिंकली. नाशिकची आंतरराष्ट्रीय खेळाडू संजीवनी जाधव हिने लौकिकास साजेशी कामगिरी करीत १६:२२:८४ मिनिटांची वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळविले. नाशिकच्याच मोनिका आथरेने (१६:५३:२३ मि.) द्वितीय, तर आरती पाटीलने १७:०३:४० मिनिटे वेळ देऊन तिसरे स्थान मिळविले. ज्युनिअर मुलींच्या गटातील ३००० मीटर शर्यतीत नाशिकच्या प्रगती मुळाणे हिने १०:४५:४४ मिनिटे वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. ज्युनिअर मुलांच्या गटातील भालाफेक प्रकारात नाशिकच्या जीवन नुंदावा याने ५५.५६ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले. पोल व्हॉल्टमध्ये नाशिकच्या सुनील पावराने सुवर्णपदक पटकावले.

पुरुषांच्या ५००० मीटर शर्यतीत मुंबईच्या सुमित पाटीलने सुवर्णपदक मिळविले. लांब उडीत रायगडच्या अभिषेक पाटीलने, महिलांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत पुण्याच्या अंकिता गोसावीने सुवर्णपदक पटकावले. ज्युनिअर मुलींच्या गटात १०० मीटर अडथळा शर्यतीत ठाण्याच्या मिंटविली फर्नांडिसने सुवर्णपदक मिळविले, तर तिचीच जोडीदार मिकांनी रॉड्रिक्स हिने रौप्यपदक पटकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नगररचना’त मनुष्यबळाचा तुटवडा

$
0
0

अवघ्या ३२ कर्मचाऱ्यांवर भार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी राज्यसरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार नगररचना विभागाकडे प्रस्तावांचा ढिग पडला असला तरी, या प्रस्तावांच्या छाननीसह प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मात्र तुटवडा आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राबवलेल्या बदलीसत्राचा सर्वात मोठा फटका नगररचना विभागाला बसला असून जेमतेम ४५ जणांचे मनुष्यबळ असलेल्या या विभागात साफसफाई मोहीमेमुळे आता अवघे ३२ अधिकारी व कर्मचारी उरले आहेत. त्यामुळे दैनदिन कामकाजासह अडीच हजाराच्या वर प्रस्तावांचा निपटारा कसा करायचा असा प्रश्न पडला आहे.

'महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण-२०१७ अंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी राज्य सरकारने ३१ मेपर्यंत बंधन घालून दिले होते. त्यामुळे या धोरणाअंतर्गत अनेकांनी अनाधिकृत बांधकामे अधिकृत करून घेण्यासाठी पालिकेच्या नगररचना विभागामध्ये शेवटचे तीन दिवस मोठी गर्दी केली. ३१ मेपर्यंत जवळपास अडीच हजार प्रस्ताव दाखल झाले. बिल्डरांनी सादर केलेल प्रस्ताव दाखल करून घेण्याचे काम अजूनही सुरूच असून त्याची मोजदाद केली जात आहे. त्यामुळे त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे या धोरणामुळे नगररचना विभागाचा ताण वाढला असतानाच येथील मनुष्यबळ मात्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. आयुक्त तुकाराम मुंढेंनी गेल्या आठवड्यात नगररचना विभागाची साफसफाई करत, मोठ्या प्रमाणावर येथील अभियंता, उपअभियंत्यांच्या बदल्या केल्या. सुमारे २७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नगररचना विभागातील १७ अभियंता व उपअभियंत्याची बदली अन्य विभागात केली. तर ११ अभियंता व उपअभियंत्यांना या विभागात नियुक्त केले.

बदल्या सत्रापूर्वी नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या ही ४५ होती. परंतु बदल्यानंतर ही संख्या आता ३२ वर आली आहे. अन्य विभाागातील ११ अभियंते व उपअभियंते नगररचनात पाठविण्यात आले असून त्यापैकी केवळ ९ जण आतापर्यंत रुजू झाले आहेत. तर अजून दोघांची विभागाला प्रतीक्षा आहे. सोबत काही लिपिकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विभागाचा कारभार सध्या ३१ लोकांवरच सुरू आहे. अगोदरच कामाचा मोठा ताण असतानाच, त्यात नव्याने प्रशमित संरचना धोरणाचा अतिरिक्त ताण विभागावर आला आहे. आतापर्यंत अडीच हजार प्रस्ताव दाखल झाले असून त्यांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर डोअर टू डोअर तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे सध्याचे उपलब्ध मनुष्यबळ कमी पडणार असल्याने या फाईलींचा निपटारा कधी होणार याबाबत आता शंका आहेत. त्यामुळे अधिकचा कर्मचारी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीची पगारवाढ तुटपुंजीच

$
0
0

विविध संघटनांनी नोंदविला आक्षेप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटीच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्ताचे औचित्य साधत पगारवाढीची घोषणा केली असली तरी त्यावर विविध संघटनाच्या विरोधी प्रतिक्रिया उमटत आहे. या निर्णयाविरुद्ध पुन्हा संघर्ष करण्याची तयारी या संघटनांनी सुरू केली आहे.

राज्य परिवहन महामंडळाने एकतर्फी घोषित केलेली पगारवाढ तुटपुंजी आहे. या विरोधात सर्वांशी संपर्क करून संप पुकारून संघर्ष करू, असेही इंटक नेते जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले. कोणतेही सूत्र न वापरता ही पगारवाढ करण्यात आली आहे. कराराला दोन वर्षे उशीर झालेला असताना त्यातून चांगले अपेक्षित होते. पण, त्यातून कामगारांच्या हाती काहीच लागलेले नाही. कामगारांचे विविध थकबाकीच्या रक्कमाही उल्लेख नाही. तसेच महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते हे एसटीला खासगीकरणाकडे नेत आहे. त्याला विरोध होत असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

भत्त्यात व कनिष्ठांना सुद्धा वाटाघाटीत मान्य केल्याप्रमाने लाभ दिलेला दिसून येत नाही. या प्रस्तावाने कामगार समाधानी होईल, असे वाटत नाही. प्रथमच अशा प्रकारची एकतर्फी घोषणा करून कामगारांवर स्वीकृतीपत्रके भरण्याबाबत सुचविण्यात आले आहे. ज्यांना हा प्रस्ताव मान्य नाही त्यांनी नोकरी सोडून कंत्राटी पद्धतीने नोकरी स्वीकारण्याची सुवर्णसंधीच्या नावाखाली धमकीही दिली आहे. अगोदरच वेतनवाढीने त्रस्त झालेल्या कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप एसटी कामगार संघटनेचे नेते स्वप्नील गडकरी यांनी केला आहे. महामंडळाकडून सुस्पष्ट प्रस्ताव घेऊन राज्य कार्यकारीणीची बैठक घेऊन संघटना यावर अंतिम निर्णय घेईल; मात्र संमतीपत्र जबरदस्तीने भरून घेण्याचा प्रयत्न झाल्यास उद्रेक होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तविली.

वेतनवाढीत गोलमाल

एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते एकतर्फी वेतनवाढीच्या घोषणा करून गोलमाल केले आहे. कामगार संघटनेचा प्रस्ताव ३१ मार्च २०१६ चे मूळ वेतन + ३५०० x २.५७ असा होता व आहे. मात्र, आताच्या विनास्वाक्षरीच्या प्रसिद्धीपत्रकात फक्त २.५७ चे सूत्र दिलेले म्हटलेले आहे. ३१ मार्चच्या रकमेत काही वाढ दिलेली दिसत नसल्याचा मुद्दा एसटी कामगार संघटनेचे नेते स्वप्नील गडकरी यांनी मांडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोकडोबावाडीत बिबट्यासाठी पिंजरा

$
0
0

जेलरोड : देवळालीगाव परिसरातील रोकडोबावाडी येथील डोबी मळ्यात बिबट्याच्या वावराने रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या मदत पथकाने पाहणी केल्यानंतर बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी येथे पिंजरा लावण्यात आला आहे. डोबी मळ्यात गोरखनाथ बुवा, विश्वनाथ बुवा यांची शेती आहे. त्यांच्या शेतात आतापर्यंत चार-पाच वेळा बिबट्याने दर्शन दिले आहे. गुरुवारी अनिल बुवा यांच्या शेतात बिबट्या आढळल्याने नागरिकांनी वन विभागाला कळविल्यावर वन परिमंडळ अधिकारी रवी सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक उत्तम पाटील, बाळू मोरे, सुनील खानजोडे, डी. पी. जगताप, रोहिणी पाटील यांनी डोबी मळ्यात पाहणी करून पिंजरा लावला आहे.

--

'माण देशी'ची शाखा

जेलरोड : म्हसवड (सातारा) येथील माण देशी उद्योगिनीच्या जेलरोड शाखेचे नुकतेच उद्घाटन झाले. महिलांनी उद्योजक व्हावे यासाठी आर्थिक साक्षरता, व्यवसायवृद्धी, संगणक, ब्यूटिपार्लर, फॅशन डिझाइन आदींचे प्रशिक्षण संस्थेतर्फे अल्प शुल्कात दिले जाते. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सहाय्य या उपक्रमांसाठी लाभते, असे संयोजकांनी सांगितले.

--

ज्येष्ठांचा वाढदिवस

जेलरोड : येथील श्री दुर्गामाता देवस्थान ट्रस्टच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश ढगे, उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र चव्हाण, शिवाजी भोर, संघाचे सचिव रमेश डहाळे, अरविंद भालेराव, राजेंद्र जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. भागवत गुरव यांचा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार झाला. १० जूनला सहस्रचंडी महायज्ञ होणार असून, त्याबाबत शिवाजी भोर यांनी माहिती दिली.

(थोडक्यात)

--

पॉइंटर्स

साधी राहणी, उच्च विचार... -२

९५ सुरक्षारक्षक सेवामुक्त -३

'यश मिळवण्याची घाई नाही' -४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात१

$
0
0

\Bमिलिंद जोशी निवृत्त

\Bनाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमधील वरिष्ठ लिपिक मिलिंद मधुसूदन जोशी ३१ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाले. प्राचार्य प्र. ला. ठोके यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. मदन शिंदे, रेखा हिरे, र. ज. चौहान गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संजीवनी धामणे, पर्यवेक्षिका प्रतिमा खैरनार आदी उपस्थित होते.

\Bआज मेळावा\B

नाशिक : म्हसरूळ येथील महावीर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शनिवारी, २ जून रोजी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थी मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी १९९९ ते २०१८ पर्यंतच्या सर्व बॅचच्या एकूण साडेसात हजार विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरीश संघवी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.

\Bबस्ती शिबिर\B

नाशिक : श्री गुरुजी रुग्णालयाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयुर्वेद विभागातर्फे वर्षाऋतू बस्ती शिबिर होणार आहे. एक जूनपासून शिबिरास प्रारंभ झाला असून, ३१ ऑगस्टपर्यंत शिबिर सुरू राहील. ग्रीष्म ऋतूत साठून राहिलेला वातदोष वर्षाऋतूतील थंड वातावरणाने वाढतो. यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या वात व्याधी उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी बस्ती ही पंचकर्म चिकित्सा आबालवृद्धांसाठी उपयुक्त असते. इच्छुकांनी श्री गुरुजी रुग्णालय, आयुर्वेद विभाग, आनंदवल्ली चौक, गंगापूर रोड येथे संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीड न्यूज पहिला टप्पा

$
0
0

तेजस्विनची माघार

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा उंच उडीपटू तेजस्विन शंकरने मानेच्या दुखापतीमुळे आगामी आशयाई स्पर्धेतून माघार घेतली आहे. १९ वर्षीय तेजस्विनने शुक्रवारी भारतीय अॅथलेटिक्स संघटनेला माघारीचा निर्णय कळवला. तेजस्विनने या वर्षी मार्च महिन्यात तेजस्विनने २.२८ मीटर उंच उडी मारून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. तेजस्विनच्या माघारीमुळे आशियाई स्पर्धेत उंच उडीमध्ये पदक पटकावण्याच्या भारताच्या आशांना धक्का लागला आहे.

.....

पॅक्वेटा यांची नियुक्ती

पुणे : इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील एफसी पुणे सिटी या संघाने शुक्रवारी ब्राझीलच्या मार्कोस पॅक्वेटा यांची नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. पॅक्वेटा यांनी प्रशिक्षक म्हणून ब्राझीलला दोन युवा वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहेत. पॅक्वेटा यांना प्रशिक्षक म्हणून सुमारे ३० वर्षांहून अधिक अनुभव आहे. रँको पोपोविच यांनी पुणे सिटीचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर पॅक्वेटा यांची या पदासाठी निवड करण्यात आली.

....

नेपाळ आयसीसी क्रमवारीत

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी नेपाळ, नेदरलँड्स, स्कॉटलंड आणि यूएई या चार देशांचा आयसीसीच्या वन-डे क्रिकेट क्रमवारीत समा‌वेश करण्याचा निर्णय घेतला. या समावेशामुळे वन-डे क्रमवारीतील संघांची संख्या १६ वर पोहोचली आहे. स्कॉटलंड २८ गुणांसह तेराव्या स्थानी असून यूएईचा संघ १८ गुणांसह चौदाव्या स्थानावर आहे. नेपाळ आणि नेदरलँड्स या संघांना क्रमवारीत येण्यासाठी किमान चार आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागणार आहेत.

....

विंडीजचा विजय

लंडन : एविन लुइस, दिनेश रामदिन आणि मार्लन सॅम्युअल्स यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने गुरुवारी वर्ल्ड इलेव्हन संघावर ७२ धावांनी विजय मिळवला. लुइसने २६ चेंडूंमध्ये ५ चौकार व ५ षटकारांसह ५८ धावा केल्या. रामदिनने २५ चेंडूंमध्ये नाबाद ४४, तर सॅम्युअल्सने २२ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज - २० षटकांत ४ बाद १९९ (एविन लुइस ५८, दिनेश रामदिन नाबाद ४४, मार्लन सॅम्युअल्स ४३, रशीद खान २-४८) विजयी विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन - १६.४ षटकांत सर्वबाद १२७ (थिसारा परेरा ६१, शोएब मलिक १२, विल्यम्स ३-४२, सॅम्युअल बॅड्री २-४).

.....

बेकरचे वर्चस्व

रोम : अमेरिकन धावपटू रॉनी बेकरने शुक्रवारी रोम डायमंड लीग स्पर्धेमध्ये १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने ही शर्यत ९.९३ सेकंदांमध्ये पूर्ण केली. ही यंदाच्या मोसमातील १०० मीटर शर्यतीतील सर्वोत्तम वेळ असून बेकरचीही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. फ्रान्सचा जिमी विकॉट (१०.०२ से.) रौप्य, तर इटलीचा फिलिपो टॉर्टू (१०.०४ से.) ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images