Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विक्रमी मतदानाने उमेदवारांना धडकी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी नाशिकचा वाद वगळता शांततेत मतदान झाले असून, राजकीय पक्षांच्या सहभागामुळे प्रथमच ९२.३० टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक ९५ टक्के, तर नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजे ९१.८० टक्के मतदान झाले. वाढलेल्या मतदानामुळे उमेदवारांना धडकी भरली असून, विक्रमी मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत राष्ट्रवादी पुरस्कृत संदीप बेडसे, शिवसेनापुरस्कृत किशोर दराडे, भाजपचे अनिकेत पाटील, 'टीडीएफ'चे भाऊसाहेब कचरू पाटील, अपक्ष प्रतापदादा सोनवणे आणि शालीग्राम भिरुड यांच्यात आहे. राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने उत्कंठा अधिक वाढलेली आहे. पाच जिल्ह्यांमध्ये ९४ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. एकूण ५३ हजार ८९२ मतदारांपैकी ४९ हजार ७४२ मतदारांनी हक्क बजावला. सकाळी पावसाचा जोर असल्याने नाशिकमध्ये संथ मतदान सुरू झाले. परंतु, दुपारनंतर मात्र मतदानाचा जोर वाढला. गेल्या वेळी ८२.३० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे सुमारे १० टक्के मतदान वाढल्याने त्याचा फायदा की तोटा होणार याचे गणिते मांडण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे.

राजकीय नेत्यांची हजेरी

शहरातील महत्त्वाचे केंद्र म्हणून पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी मोठी गर्दी केली होती. आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप यांनी या केंद्रावर हजेरी लावली. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे यांनीही उपस्थित राहून कार्यकर्त्यांना बळ दिले. 'राष्ट्रवादी'चे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनीही हजेरी लावत मारहाणीच्या घडलेल्या प्रकाराची शहानिशा केली. राजकीय नेत्यांच्या हजेरीमुळे पोलिसांचा ताण वाढला. शिवाय वाहतूक व्यवस्थेवरही विपरित परिणाम झाला.

जिल्हाधिकाऱ्यांनी झापले

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बी. डी. भालेकर शाळेतील मतदान केंद्रास भेट दिली. यावेळी एक कर्मचारी त्यांच्यासमोर फोनवर बोलत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतरही या महाशयांनी आपले बोलणे थांबविले नाही. याचा संबंधित कर्मचाऱ्यास जाब विचारत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मतदानाचा टक्का

जिल्हा झालेले मतदान

नाशिक ९१.८०

जळगाव ९१.८९

अहमदनगर ९२.१४

धुळे ९२.२७

नंदुरबार ९५.०८

सरासरी ९२.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्रपटाच्या पटकथा उत्तम होतात

$
0
0

दिग्दर्शक राजू फिरके यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'हुंदका' चित्रपटात त्याकाळातील आघाडीची स्टारकास्ट असूनही केवळ पटकथा चांगली नसल्याने शुटिंग थांबवावे लागले. त्यानंतर मी पटकथेचा अभ्यास हाती घेतला आणि त्यातील बारकावे शिकलो. पुढे मात्र माझ्या चित्रपटांच्या पटकथा उत्तम असल्याचे सर्व कलाकार आवर्जून सांगतात, असे प्रतिपादन नाशिक येथील सुप्रसिद्ध पटकथा लेखक, सिनेदिग्दर्शक राजू फिरके यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे आयोजित संवाद सृजनशी या मालिकेतील १२ वे पुष्प फिरके यांनी गुंफले. ते म्हणाले, की 'इन्हे सम्हालिये' या डॉक्युमेंटरीपासून मी वयाच्या १९ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. पहिलीच कलाकृती सर्वांनी उचलून धरल्याने, पुढे सिनेमातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. 'वाहिनी साहेब' या पहिल्या फिचर फिल्मने चांगले यश संपादन केल्यावर, 'हुंदका' नावाची फिल्म सुरू केली. 'गाईड' हा चित्रपट विजयानंद या हरहुन्नरी दिग्दर्शकामुळे खूप गाजला. 'चायना टाउन' सिनेमाची पटकथा आदर्श असून सर्वजण तिचा संदर्भ घेतात, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, कार्यवाह रवींद्र मालुंजकर, कार्यकारणी सदस्य दशरथ लोखंडे व सुरेखा गणोरे, अरुण गिते, राजेश जाधव, रफिक सय्यद, राजेश भालेराव, मंगेश कदम, ललित कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यकारणी सदस्य प्रशांत केंदळे यांनी शाल, स्मृतीचिन्ह, ग्रंथभेट देऊन फिरके यांचा सत्कार केला. मनीषा विसपुते यांनी सूत्रसंचलन केले तर योगिता मिंडे यांनी स्वागत काव्य सादर केले. महेश वाजे यांनी प्रास्ताविक केल्यावर मनोज नाग्पुरेंनी अतिथींचा परिचय करून दिला. रविकिरण औटे यांनी आभार मानले तर अनिल गुरव यांनी पसायदान गायले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकारणी सदस्य सुदाम सातभाई, शिवाजी म्हस्के, रेखा पाटील, संतोष हुदलीकर, जयंत गायधनी, रमेश औटे, मंगला सातभाई यांनी प्रयत्न केले.

अशी निर्मिती पटकथेची

ऑरसन वालेसचे 'सिंगल शॉट टेक्निक' म्हणजे काय, हे फिरके यांनी रसिकांना समजावून सांगितले. जागतिक स्तरावरील तीन अंकी पटकथा म्हणजे आरंभ-मध्य-शेवट अशा स्वरूपाची असते. पहिला प्लॉट महत्त्वाचा असतो आणि त्याहूनही महत्त्वाचा असतो चेतवणारा प्रसंग. अशातून कथा निर्माण होते, असेही फिरके म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्र्याच्या घरात मिळवले ‘विशाल’ यश

$
0
0

विशाल शेवाळे

VISHAL SHEVALE

९३.८० टक्के

--

bhavesh.brahmankar@timesgroup.com

@BhaveshBMT

--

नाशिक : म्हणतात ना, जिथे लक्ष्मी नांदत नाही तिथे सरस्वतीचा वास असतो. अवघ्या काही चौरस फुटांच्या चार भितींमध्ये राहणाऱ्या शेवाळे कुटुंबीयांच्या ठिकाणी याचा प्रत्यय येतो. उदरनिर्वाहासाठी अहोरात्र सामना चालू असताना शिक्षणाचा मार्ग खडतरच राहणार. पण, विशालने आपल्यातील प्रज्ञेच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. ५०० पैकी ४६९ गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला आहे, पण आता करायचे काय, असा प्रश्न त्याच्यासह कुटुंबीयांना पडला आहे. समाज पाठीशी उभा राहिला, लढ म्हणाला तर कॉम्प्युटर इंजिनीअर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे विशालचे ध्येय आहे.

'घरभाडे पण परवडत नाही, पोरगं हुशार आहे, असे शिक्षक कायम सांगायचे म्हणून दहावीच्या परीक्षेसाठी आम्ही दोनशे रुपये वाढवून दिवसा एका लाइटचं कनेक्शन घेतलं. दिवसरात्र अभ्यास करून पोरानं ९३ टक्के पाडले. पण, आता काय करायचं? कसं होणार त्याचं? शिक्षण कसं करायचं?', विशाल मारोतराव शेवाळे या गुणवंत विद्यार्थ्याची आई राधा या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सांगत होत्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी धुणीभांडी करते, राबराब राबते. साधा चहापण बाहेर कधी पित नाही. विशालची हुशारी पाहूनच जगण्याचं आणि कामाचं बळ येतं. एवढं सारं करूनही पोराचं शिक्षण करू असं वाटत नाही. महागडी फी, कॉलेजचे पैसे, कसं करणार सारं? त्यांच्या या प्रश्नांनी त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष ठळकपणे समोर येतो.

कामटवाडे येथील इंद्रानगरी परिसरात एका चाळीमध्ये पत्र्याच्या खोलीत शेवाळे कुटुंब राहते. घर म्हणजे काय तर केवळ चार भिंती. माणसं चार अन् उत्पन्न केवळ तीन आकडी. विशालचे वडील मारोतराव हे पहाटे पाच वाजता उठून परिसरातील कार आणि अपार्टमेंटच्या स्वच्छतेचे काम करतात. घरी परतायला दुपारचे १२ होतात. त्यानंतर काही हमालीची व इतर कामे करतात. आई आणि वडील दोघांच्या कष्टातून महिन्याकाठी कुटुंबाच्या पदरी काही शेकडा रुपयेच पडतात. त्यात त्यांच्या संसाराची गाडी पुढे चालली आहे.

- इंजिनीअर होण्याचे स्वप्न...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर जणांची यादी जाहीर करणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष केदा आहेर यांनी थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. वारंवार जप्ती आदेश बजावूनही थकबाकी न भरणाऱ्या सातशे बड्या थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. बँकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात टॉप शंभर बड्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात जाहीर केली जाणार आहेत. त्यानंतरही थकबाकी जमा केली नाही तर थेट कायदेशीर कारवाईचा इशारा अध्यक्ष आहेर यांनी दिला आहे.

जिल्हा बँकेची थकबाकी मोठ्या प्रमाणावर असून, मार्चअखेर केवळ मुद्दल ५३५ कोटी आणि व्याज अवघे २६० कोटी वसूल झाले आहे. आजमितीस बँकेची थकबाकी दोन हजार ७६९ कोटींची असल्याने बँक अजूनही आर्थिक अडचणीत आहे.

बँकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर आहेर यांनी कर्जवसुलीसाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश देऊन वसुलीचे प्रयत्न केले होते. त्यात जंगम जप्तीद्वारे थकबाकी झालेली वाहने म्हणजे ट्रॅक्टर, जीप, मोटारसायकल अशा जवळपास १२५ वाहनांच्या जप्तीद्वारे २ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे मुद्दलाची वसुली ही ५३५ कोटींवरून ६९१ कोटींपर्यंत पोहचली होती. तर व्याज २६० कोटींवरून २७० कोटींपर्यंत वसूल झाले आहे. जून २०१८ अखेर जास्तीत जास्त कर्जवसुली होण्यासाठी १ जूनपासून पुन्हा कर्जवसुली मोहीम राबवून व जुन्या तसेच ऐपतदार थकबाकीदारांचे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना कलम १५६ च्या प्राप्त अधिकारान्वये सहकार नियम १९६१ चे नियम १०७ नुसार जप्ती करून जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ६०० ते ७०० थकबाकीदारांचे स्थावर जप्ती आदेश दैनिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले असून पुढील लिलाव प्रक्रिया पर्यंतच्या कार्यवाहीसाठी आदेश देण्यात आलेले होते. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तसेच सेंट्रल ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही जुने मोठे व ऐपतदार थकबाकीदारांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आता ७०० पैकी १०० टॉप थकबाकीदारांची नावे थेट वर्तमानतत्रात जाहीर केली जाणार आहेत. वर्तमान पत्रात नावे जाहीर करूनही जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर कायद्यातील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आहेर यांनी सांगितले.

वन टाइम सेटलमेंट

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअतंर्गत ज्या शेतकऱ्याकडे मुद्दल व व्याजासह दीड लाखावरील थकीत कर्ज आहे व ज्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आलेली आहेत, अशा शेतकऱ्यांनी दीड लाखांवरील त्यांच्या हिश्श्याच्या रकमेचा भरणा केल्यानंतर शासनाकडून एकवेळ समझोता योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील २१ हजार ७०० खातेदारांपैकी फक्त ११ हजार खातेदारांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. सदर योजनेची अंतिम मुदत ३० जून २०१८ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेटी बचाओ’चा जागर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

लिंगभेद चाचणी व स्त्रीभ्रूणहत्या या समाजविघातक कृत्यांना आळा बसावा, जनमानसात मुलींच्या जन्माचे महत्त्व पटावे, मुलगा व मुलगी असा भेदभाव समाजात राहू नये, या हेतूने नाशिक डिस्ट्रिक्ट मेडिकल असोसिएशनतर्फे विविध संस्थांच्या सहकार्याने सोमवारी बेटी बचाओ जनजागृती रॅली काढण्यात आली.

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा संदेश देण्यासाठी या रॅलीत शेकडो डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी दिलेल्या 'बेटी बचाओ'च्या घोषणांनी शहर दुमदुमले. पंचवटीतील स्वामीनारायण मंदिर परिसरातून डॉ. सोनाली मळगावकर, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, दीपाली गिते, माधवस्वामी, वासंतीदीदी आदींच्या हस्ते रंगीत फुगे आकाशात सोडून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे रॅलीचा समारोप झाला.

डॉ. नरहरी मळगावकर म्हणाले, की देशात अजूनही स्त्रीचे स्थान दुय्यम आहे. ही विचारसरणी बदलणे गरजेचे आहे. मुलींच्या घटणाऱ्या संख्येचे कालांतराने दुष्परिणाम दिसतील. ते टाळण्यासाठी आतून बदलले पाहिजे. पोलिस आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले, की मुलगा आणि मुलगी यांच्या भेदभाव करू नका. मुलगी म्हणून अर्भकाला टाकून दिले जाते, त्यावेळी खूप वाईट वाटते. हे होऊ नये म्हणून मेडिकल असोसिएशनने सुरू केलेले काम प्रशंसनीय आहे. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्याम थविल यांनी या कार्यासाठी कृती आराखडा तयार करून हे काम पुढेही चालू ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

सरचिटणीस डॉ. चारुदत्त कुलकर्णी यांनी स्त्रीभ्रूणहत्या व स्त्रीजन्माकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे हे फार मोठे आव्हान आहे. मुलींचा गर्भ वाचविण्यासाठी भविष्यातही एकत्र काम करू, असे सांगितले. रॅलीसाठी हैदराबाद येथून आलेल्या गीता मूर्ती यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. स्वप्निता कुलकर्णी, दर्शन सोनवणे, सुनील परदेशी, सूरज सोनार, डॉ. वैभव जोशी, मंगेश घुगे, चित्रा धनजल यांनी रॅलीचे संयोजन केले. श्याम देशमुख यांनी आभार मानले.

--

...यांनी नोंदविला सहभाग

पंचवटी डेपो, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, एम. जी.रोड या मार्गाने जाऊन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत मविप्र संस्था, काकासाहेब देवधर स्कूल, संदीप फाऊंडेशन, इस्कॉन, प्रजापिता ब्रह्माकुमारी, भारतीय मानव अधिकार परिषद, भोसला मिलिटरी स्कूल, छत्रपती सेना यांच्यासह विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला. डॉ. नरहरी मळगावकर, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, डॉ. गणेश राख, स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके-आहेर, सुधर्म हॉस्पिटलचे डॉ. मृगराज मुर्तडक, श्रीजी हॉस्पिटलचे डॉ. सचिन तांबे, डॉ. चारुदत्त कुलकर्णी, डॉ. संदीप पाटील आदींच रॅलीत प्रमुख उपस्थिती होती.

(फोटो आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरणतलाव मार्गावरील बहुतांश पथदीप बंदच

$
0
0

तरणतलाव मार्गावरील

बहुतांश पथदीप बंदच

जेलरोड : नाशिकरोड येथील गुरुद्वाराशेजारून तरणतलावाकडे जाणाऱ्या मार्गावरील बहुतांश पथदीप बंद असल्याने सायंकाळनंतर येथे अंधार पसरत आहे. त्यामुळे अपघात, लूटमार, चेन स्नॅचिंगची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गाने सायंकाळी महिला, युवतींना जाणे अशक्य झाले आहे. येथे समोरून चारचाकी वाहन आले, तर त्याच्या प्रखर प्रकाशझोताने डोळे दीपतात. त्यामुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे येथील बंद पथदीप त्वरित सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

--

तपोवनात पुन्हा झोपड्या (फोटो)

पंचवटी : चार दिवसांपूर्वी तपोवनातील झोपड्यांचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले होते. येथे करण्यात आलेल्या धडक करावाईत अतिक्रमण केलेल्या झोपड्या येथे राहणाऱ्यांनी काढून घेतल्या होत्या. मात्र, तरीही ते तेथेच थांबून होते. सोमवारी या झोपड्या पूर्ववत उभारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या परिसराला पुन्हा अवकळा आली असून, महापालिकेच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

--

'मसाप'ची जुलैत सभा

जेलरोड : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) नाशिकरोड शाखेची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २२ जुलै रोजी होणार आहे. चेहेडी जकात नाका येथील म्हस्के लान्स येथे सकाळी अकराला ही सभा होईल. शाखा कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी आणि कार्यवाह रवींद्र मालुंजकर यांनी ही माहिती दिली. शाखेचे उपाध्यक्ष दत्ता गायकवाड अध्यक्षस्थानी राहतील. मागील इतिवृत्त, कार्यवृत्त वाचून संमत करणे, २०१७-१८ या वर्षाचा ताळेबंद आणि उत्पन्न खर्चपत्रक संमती, हिशेब तपासनिसाची नेमणूक, शाखा कार्यालयासाठी निधी संकलऩ आदी विषयांवर चर्चा होईल. सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाखेने केले आहे.

---

कुत्र्यांची दहशत (फोटो)

सातपूर : कामगारनगरी असलेल्या सातपूर भागात मोकाट कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे. कंपनीत पहिल्या शिफ्टमध्ये कामाला जाताना व रात्रपाळीवरून घरी येताना कामगारांना मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनदेखील समस्या सुटत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. महापालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

--

जनावरांचा अडथळा (फोटो)

सातपूर : सोमवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळत असतानाच अशोकनगर रस्त्यावरील मोकाट जनावरांच्या मुक्त संचाराने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. अगदी दुभाजकांप्रमाणे एका रांगेत जाणाऱ्या जनावरांमुळे अपघातास आमंत्रण मिळत होते. परिसरात वाढलेली वाहनांची संख्या पाहता महापालिकेने येथे दुभाजक टाकावेत, तसेच गरजेच्या ठिकाणी गतिरोधकही बसवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान एकवरून

$
0
0

विशालचे इंजिनीअर होण्याचे स्वप्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विशाल आणि त्याचा लहान भाऊ विष्णू हे दोन्ही त्रिमूर्ती चौकातील पेठे शाळेचे विद्यार्थी. विष्णूही विशालसारखाच हुशार. प्रत्येक वर्षाला वर्गात आणि शाळेत पहिला येतो. दोघांनाही आई-वडिलांचे हाल पाहवत नाहीत. आपण नाही शिकलो तर आपल्या कुटुंबाचे पुढे कसे येणार? आई-वडिलांना चांगले दिवस दाखविण्यासाठी आपण शिकायला हवे, असे विशाल आणि विष्णू सांगतो. परिस्थितीशी झुंज देत विशालचे इंजिनीअर होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी त्याला आर्थिक मदत हवी आहे.

मूळचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातले हे कुटुंब गेल्या सहा-सात वर्षांपासून नाशकात राहते. मोलमजुरी करून त्यांचा चरितार्थ चालला आहे. घरातला संसार पाहिला तर तो जेमतेमच. चारही जण कसे तरी घरात राहतात. रोजचा दिवस काढणं असंच काहीसं आव्हान त्यांच्यापुढं आहे. विशालला कॉम्प्युटर इंजिनीअर होऊन आपल्या कुटुंबाला तर सावरायचे आहे पण त्याला समाजसेवाही करायची आहे. आरवायके कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेण्यास तो इच्छुक आहे. कुटुंबाकडं असलेल्या एकमेव सायकलद्वारे तो पुढील प्रवास करणार आहे. पुढचं शिक्षण महागडं आहे, हे विशालला कळून चुकलं आहे. त्यामुळेच आता दहावीपेक्षा आणखी जास्त अभ्यास करेन पण इंजिनीअर होईनच, असा त्याचा निर्धार आहे. आई-वडिलांनी माझ्याच शिक्षणावर जास्त खर्च केले, तर लहान भाऊ विष्णूचे कसे होणार, हा प्रश्न त्याला सतावतो आहे. त्यामुळेच समाजातील दानशुरांनी विशालच्या शिक्षणासाठी हातभार लावला तर विष्णूचे शिक्षण आई-वडिल करू शकतील. आजवर शिक्षकांनी भरपूर मदत केली. कधी फीसाठी तगादा लावला नाही. शिक्षकांचे ऋण फेडायचे तर चांगले शिकायला हवे. म्हणूनच मला मदत मिळायला हवी, असे सांगताना विशाललाही रडू कोसळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरू गोविंदसिंग संस्थेत कौशल्य विकसन उपक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील गुरू गोविंद सिंग इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी लेथ आणि वेल्डिंग अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना सुमारे चारशे तासांचे सत्र उपलब्ध करून देण्यात आले. संस्थेतील अद्ययावत सुविधांद्वारे उद्दिष्ट्ये व अभ्यासक्रमासोबत प्रॅक्टिकल्सचे ज्ञान देण्यात आले.

नोंदणी केलेल्या ६० विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन, प्रात्यक्षिक व तोंडी अशा तीन सत्रांमध्ये घेण्यात आली. यासाठी प्रा. पराग सोमवंशी आणि मनीष शर्मा यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. नोडल ऑफिसर प्रा. संदीप पाटील व मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. सी. डी. मोहोड यांनी हा अभ्यासक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. काठे, चौहान आणि पगार यांनी प्रशिक्षक म्हणून काम बघितले. गाडीलोहार, केले, खैरनार, सांगळे आणि लोखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार गुरुदेवसिंग बिर्दी, मुख्य कार्यकारी अधिकारी परमिंदर सिंग आणि गुरुगोविंद सिंग इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्द्ल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघात कारणमीमांसा होणार ‘अॅटोमॅटिक’

$
0
0

नाशिक : शहरात होणाऱ्या प्राणांतिक अपघातांची नोंद स्वयंचलित पद्धतीने करण्याचे काम शहर वाहतूक शाखेने सुरू केले आहे. 'थर्ड आय' या अॅप्लिकेशनच्या मदतीने होणाऱ्या कामामुळे अपघातांच्या कारणांसह ब्लॅक स्पॉटसह इतर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते.

शहर परिसरात जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये ८२ जीवघेणे अपघात झाले तर ८३ जणांना आपला जीव गमवावा लागला. यापूर्वी जीवघेण्या अपघातांची माहिती कागदोपत्री घेतली जात होती. यामुळे अपघातांच्या कारणांची मिमांसा करणे किचकट ठरत होते. आता जीवघेणा अपघात झाला की याची नोंद 'थर्ड आय' अप्लिकेशनवर होते. हे अॅप्लिकेशन वाहनांचा प्रकार, वाहनचालकाचे वय, अपघाताचे कारण अशा वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करून त्याची नोंद करते.

याबाबत अधिक माहिती देताना वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले, की बहुतांश अपघातांत वाहनचालकाचा निष्काळजीपणा हे प्रमुख कारण असते. मात्र, या व्यतिरिक्त रस्त्यावरील अपुरा प्रकाश, रस्त्यावरील झाडे अथवा पोल, साइन बोर्ड्सचा अभाव अशी कारणे पुढे येतात. ती वेळेच समोर येण्यासाठी हे अॅप्लिकेशन महत्त्वाचे ठरले आहे. काठेगल्ली सिग्नल रात्री १० वाजेनंतर ब्लिंकर मोडवर असते. यामुळे हायवेवरून गतीने येणाऱ्या वाहनास चौफुलीचा अंदाज येत नाही. याठिकाणी रोडवर कॅटआइज आणि रस्ता दुभाजकावर रिलफेक्टर लावण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सुचित करण्यात आले. ब्लॅक स्पॉट सतत अपटेड्स होण्याबाबत काही तांत्रिक अडचणी असून, त्या लवकरच दूर सारण्यात येतील, असे देवरे यांनी स्पष्ट केले. ब्लॅक स्पॉटची अद्यावत व अचूक यादी समोर येत राहिल्यास त्या ठिकाणी ठोस उपाययोजना राबवणे शक्य होईल.

उपायासाठी तातडीने पत्र

अपघातांची कारणे पुढे आल्यानंतर महापालिका किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास उपाय राबविण्याचे पत्र लागलीच दिले जाते. जानेवारी ते मे या काळात अशा प्रकारे महापालिकेस १७ तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दोन पत्र देण्यात आली. याशिवाय महामार्ग बस स्थानकात झालेल्या अपघातानंतर त्या प्रशासनालाही बस पार्किंगबाबत नियोजन करण्यास सांगण्यात आल्याची माहिती देवरे यांनी दिली.

'थर्ड आय' अप्लिकेशन पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. दैनंदिन गुन्हे अहवालाचे तंतोतंत विश्लेषण यामुळे समोर येते. याशिवाय गस्तीवरील कर्मचारी आणि वाहनांवर लक्ष ठेवणे यामुळे सोप्पे होते. अपघाताचा डेटा क्लिकसरशी उपलब्ध झाल्याने त्यादृष्टीने नियोजन करणे सोपे होईल. यामुळे अपघातांची संख्या कमी करणे शक्य होईल. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर काम प्रभावित होणार नाही.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

महिना मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी एकूण सर्व अपघात

जानेवारी १६ ३६ ७ ५२

फेब्रुवारी १५ ४७ १७ ५७

मार्च १६ ३३ १२ ५१

एप्रिल २१ ४५ २७ ५६

मे १५ ३४ १९ ४६

एकूण ८३ १९५ ८२ २६२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन थकल्याने कोंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

लोखंडी टॉवरसाठी नावाजलेल्या ज्योती स्ट्रक्चर कंपनीचे कामगार अनेक महिन्यांपासून वेतनवापासून वंचित आहेत. कामगारांसह अनेक अधिकाऱ्यांनाही वेतन मिळत नसल्याने संतप्त कामगारांनी सोमवारी कंपनीच्या उपाध्यक्षा कुंदा देशमुख यांना कार्यालयात घेराव घालत जाब विचारला. मात्र, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिल्याचे समजते.

बँकांचे कर्ज थकल्याने कामगारांसह व्यवस्थापनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही वेतन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत कामगारांनी कामगार उपायुक्तांकडेही तक्रार केली असल्याचे संतप्त कामगारांनी सांगितले.

खासगी, तसेच शासकीय विभागातील विद्युत पारेषण विभागाचे मोठे टॉवर बनविण्याचे उत्पादन ज्योती स्ट्रक्चर कारखान्यात केले जाते. देशात विविध ठिकाणी कारखान्याचे प्लँट आहेत. त्यापैकी नाशिकमध्ये दोन, घोटी व रायपूरमध्ये प्रत्येकी एक प्लँट आहे. सर्व प्लँट मिळून कारखान्यात हजारो कर्मचारी काम करतात. यात कामगारवर्गासह कार्यालयातील शिपाई ते व्यवस्थापकांचा समावेश आहे. दिवाळखोरी कायद्यानुसार कंपनीचे प्रकरण दीड वर्षापूर्वी एनसीएलटी न्यायालयात गेले आहे. त्यामुळे कारखान्यातील कामगारांना गेल्या सात महिन्यांपासून ते कार्यालयीन कर्मचाऱ्यांना गेल्या पंधरा महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही अद्याप मोबदला मिळालेला नाही. बँकेत पैसे जमा झाले असूनही व्यवस्थापन पैसे देत नसल्याचा आरोप करीत सोमवारी कर्मचाऱ्यांनी घेराव घातल्यानंतर याप्रश्नी बोलण्यास उपाध्यक्षा देशमुख यांनी नकार दिला. यावेळी मधुर जैन, राजेंद्र मुळे, नीलेश इंगळे, ईश्वर पाटील, संतोष पवार, मिलिंद मथुरे, किरण क्षत्रिय, सचिन साळी, जॉन भालेराव आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

१५ महिन्यापासून विनावेतन

देशभत जाळे पसरलेल्या ज्योती स्ट्र्क्चर कंपनीतील बहुसंख्य कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या काही महिन्यापासून थकले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखान्यातील शिपाई, कामगारवर्ग ते व्यवस्थापक गेल्या १५ महिन्यांपासून पगाराविना काम करीत आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी सातपूर येथील कंपनीच्या गुरुकुल कार्यालयावर कंपनीच्या उपाध्यक्षा (एचआर) कुंदा देशमुख यांना घेराव घालत जाब विचारला.

उपजीविकाच धोक्यात

हतबल झालेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापक, कामगार उपायुक्त, लोकप्रतिनिधी ते थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आली. पैसे मिळतील या आशेने कामगारांसह अधिकाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी भविष्यनिर्वाह निधी (पीएफ), एलआयसी, काहींनी दागदागिने विकून, तर काहींनी व्याजाचा मार्ग अवलंबून उपजीविका सुरू ठेवली. मात्र, आता देणेकऱ्यांचा तगादा सुरू झाल्याने आत्महत्येचा विचार कर्मचाऱ्यांमध्ये येऊ लागला असल्याचे कर्मचारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

---

'महिंद्रा'तील बडतर्फ पदाधिकाऱ्यांचे उपोषण

सातपूर : महिंद्रा कंपनीच्या कामगारांनी वेतनवाढीच्या करारावरून कामगार उपायुक्त कार्यालयासमोर मे २०१४ मध्ये आंदोलन पुकारले होते. त्यावेळी असलेले युनियनचे सरचिटणीस प्रवीण शिंदे व उपाध्यक्ष अमोल सोनवणे यांना कंपनी व्यवस्थापनाने दोषी ठरवत बडतर्फ केले होते. त्यानंतर कामगार न्यायालयात दोन्ही पदाधिकाऱ्यांनी तक्रार करीत अन्याय झाल्याचे नमूद केले होते. सन २१०४ पासून बडतर्फ असलेले शिंदे व सोनवणे यांनी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर २० जूनपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. सध्याच्या महिंद्रा कंपनीतील कमिटीने आमची दिशाभूल केल्याचा आरोप उपोषणार्थींनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकांनी नोकरी नव्हे; व्यवसायाची कास धरावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

युवकांनी नोकरी मागे न धावता स्वतंत्र व्यवसाय करण्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव कुलकर्णी यांनी केले.

संस्थेच्या युवक शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या गो. ह. देशपांडे सभागृहात उत्साहात झाली. यावेळी ते बोलत होते. मंचावर संस्थेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील, खजिनदार मकरंद सुखात्मे, युवक शाखेचे कार्याध्यक्ष अजय चौधरी, महिला शाखेच्या कार्याध्यक्षा जयश्री पोळ उपस्थित होते. या सभेस विद्यार्थी, पालक, सभासद यांचीही उपस्थित होती.

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होणे, समाज संघटित होण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे, याचे महत्व ओळखून पालकांनीच पाल्याला युवक शाखेचे सभासद होण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. येत्या वर्षात अधिकाधिक रोख पारितोषिके व कॉलेजमधील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा मानस आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

युवक शाखेचे कार्याध्यक्ष अजय चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यकारी मंडळाचे सदस्य अनंत दशपुत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की बँकेकडून शैक्षणिक कर्ज दिले जाते, त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी अवश्य घ्यावा. यासाठी लागेल ती मदत संस्थेच्या वतीने केली जाईल. मुंबईच्या आपल्या मध्यवर्ती संस्थेकडूनही विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात गुणवत्तेनुसार शैक्षणिक मदत केली जाते. उच्च शिक्षणासाठी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, त्यासाठी मध्यवर्ती संस्थेची सभासद होणे आवश्यक आहे, असे सहकार्याध्यक्ष मंदार तगारे यांनी सांगितले.

ब्राह्मणांना आरक्षण नाही, शैक्षणिक खर्च लाखोंच्या घरात, कॉलेज लायब्ररीत पुस्तके मिळत नाहीत, या पार्श्वभूमीवर संस्था विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात गुणवत्ता पारितोषिक देते, सर्व पुस्तके देते, ही मदत अनमोल आहे, असे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यानंतर 'तुझीच रे!' या आगामी चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केलेल्या तेजस कुलकर्णी हिचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या दिवशी १३ जणांवर कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू करताच, नाशिक महापालिकेने प्लास्टिक वापराविरोधात जोरदार मोहीम उघडली असून, सलग तिसऱ्या दिवशी मोहीम राबवत १३ जणांवर कारवाई केली आहे. महापालिकेच्या तीन विभागांतील पथकांनी १३ जणांकडून ६५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला. व्यापारी वर्गाकडून विरोध होत असल्याने व नागरिकांना दंड न करण्याचे पर्यावरण मंत्र्यांनी आवाहन केल्याने पालिकेची कारवाई काहीशी थंडावली आहे.

पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना-२०१८ मागील २३ मार्चला प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी व नियमांतर्गत कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा २००६ च्या कलम बारा अन्वये प्लास्टिकबंदी केली आहे. तसेच या विरोधात कारवाईसाठी उपायुक्त, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य अधिकारी, प्रभाग अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात मनपा आयुक्तांकडून प्राधिकृत केले गेले आहे. सहा विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विभागीय स्वच्छता निरिक्षकांची सहा पथके तयार करण्यात आली. कारवाईला आता वेग आला आहे. विभागातील बाजारपेठा, व्यापारी संकुलांमध्ये धडक मोहीम राबवण्यात येत आहे. तिसऱ्या दिवशी महापालिकेने तीन विभागात कारवाई करत १३ जणांकडून ६५ हजारांचा दंड वसूल केला. त्यात नाशिक पूर्व विभागात ४ जणांकडून २० हजाराचा दंड तर नाशिक पश्चिम विभागात ५ वापरकर्त्यांकडून २५ जणांना दंड वसूल करण्यात आला. सिडको परिसरात ४ वापरकर्त्यांविरोधात २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. सोमवारी सातपूर,नाशिकरोड आणि पंचवटी परिसरात कारवाई झाली नसल्याचे पालिकेच्या अहवालावरून समोर आले आहे.

नागरिकांनी केले ३५० किलो प्लास्टिक जमा

नाशिकरोड : प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आर्थिक दंडाच्या भीतीपोटी व्यावसायोक,व्यापारी आणि नागरिकांनी स्वतःहून पालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाकडे सोमवारी (दि. २५) तब्बल ३५० किलो प्लास्टिक जमा केल्याची माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांनी दिली. देवळाली गावात दर सोमवारी भरणारा आठवडे बाजारही प्लास्टिकमुक्त करण्यात पालिका प्रशासनाला यश मिळाले.

रद्दीचे भाव वाढले

सिडको : प्लास्टिकबंदीनंतर रद्दीच्या दरांत चांगलीच वाढ झाली असल्याचे दिसत आहे. अनेक दुकानदारांनी आता कागदी पिशव्या खरेदी करून त्यातून साहित्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे साहजिकच कागदाला चांगलीच मागणी आली आहे. मागील आठवड्यात शहरात पेपरच्या रद्दीचा भाव हा ९ ते १० रुपये किलो होता, आता तो दोन रुपयांनी वाढला आहे. येत्या काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साक्री तालुक्यात जोर‘धार’ पाऊस

$
0
0

शेतीपिके, विहिरी, कांदाचाळीचे मोठे नुकसान

म. टा. वृत्तसेवा,धुळे

जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील सालटेक, पेरेजपूर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये शेतीपिके, विहिरी, कांदाचाळीचे मोठे नुकसान झाले आहे. साक्री तालुका तहसीलदार संदीप भोसले यांनी पथकासह नुकसानीची पाहणी केली. त्यांनी तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, पंचनाम्यानंतर आकडेवारी समजू शकणार आहे.

साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात गेल्या आठवडयाभरापासून ढगाळ वातावरण होते. मात्र, रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर पेरेजपूर ग्रामपंचायत परिसरातील सालटेक गावात ढगफुटीसदृश परिस्थिती होती. या पावसामुळे नाल्यांना पूर आला. परिरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा चाळी वाहून गेल्या. तसेच नवीन लागवड केलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले. सुमारे अर्धा-पाऊण तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांसह काही ठिकाणी काम सुरू असलेल्या विहिरीदेखील बुजल्या गेल्या आहेत. सोमवारपासून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर सरकारकडे नुकसानीचा अहवाल सादर करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेच्या जागेवर पार्किंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने सातपूर भागात तब्बल चार एकरचा भूखंड महापालिका विद्यालयाकरिता आरक्षित केलेला आहे. मात्र, महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाने या जागेला जणू पार्किंगचेच स्वरूप आले आहे. येथे सट्ट्याचा अड्डादेखील चालविला जात असून, पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतरही येथील शाळेच्या कामाबाबत कार्यवाही केली जात नसल्याने परिसरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेच्या विद्यालयासाठी आरक्षित असलेल्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. विशेष म्हणजे कंटेनरचे अतिक्रमण रोजच असते, त्यात भर म्हणून चक्क मोकळ्या भूखंडावर परदेशी नावाच्या व्यक्तीने सट्ट्याचा अड्डाच सुरू केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नाशिकचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका विद्यालयासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा शिवाजीनगरच्या एका कार्यक्रमात केली होती. मात्र, त्यांची घोषणा केवळ नावापुरतीच होती की काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

श्रमिकनगर, शिवाजीनगर व ध्रुवनगर भागात महापालिकेच्या पाचहून अधिक शाळा आहेत. त्यातील माध्यमिक शाळा चक्क महापालिकेच्या अभ्यासिकेत भरत असल्याने भाजपचे सभागृह नेते तथा स्थानिक नगरसेवक दिनकर पाटील यांनी चार एकर आरक्षित जागेवर विद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर महापालिकेने महसूल विभागाला कोट्यवधी रुपये भरून आरक्षित असलेली शाळेची जागा ताब्यात घेतली. शिवाजीनगर भागात तीन हजार विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आरक्षित जागेवर विद्यालयाची इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक पाटील यांनी सातत्याने केली आहे.

पालकमंत्री महाजन शिवाजीनगर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना शाळेच्या इमारतीसाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, तरीही महापालिका शिक्षण मंडळाकडून आरक्षित जागेवर विद्यालयाची उभारणीबाबत कार्यवाही झालेली नाही. आरक्षित भूखंडावर मात्र रोजच कंटेनर अनधिकृतपणे उभे राहत असतात. अनेकांनी कच्चे बांधकामे करत अतिक्रमणही केले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या जागेवर चक्क सट्ट्याचा अड्डाही सुरू असल्याने महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन कारवाई करणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेकडून आरक्षित असलेल्या जागेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेच्या अडचणीच्या जागेत बसावे लागत आहे. आता आयुक्तांनीच याप्रश्नी लक्ष घालून शाळेच्या आरक्षित जागेवर इमारत उभारण्यास गती द्यावी.

-दिनकर पाटील, नगरसेवक तथा सभागृह नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर येथील व्यापारी मर्चंट असोसिएशनने शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घेत दुकानांतील प्लास्टिक भगूर नगरपालिकेकडे सुपूर्द करीत प्लास्टिकबंदीचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.

परिसरातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानांतील ट्रॅक्टरभर प्लास्टिक पिशव्या आणि वस्तूंच्या गोण्या नगरपालिकेकडे सुपूर्द केल्याने परिसरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. भगूर शहर परिसर प्लास्टिकमुक्त व्हावा यासाठी नगरपालिकेच्या कार्यालयात नगराध्यक्षा, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि सर्व सदस्यांची एकत्रित बैठक झाली.त्यात परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर शिवाजी चौकात एकत्रित येत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फुलफगर, उपाध्यक्ष श्याम चांडक,सेक्रेटरी जगदीश कासार आदींसह सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांतून बंदी असलेल्या सर्व प्लास्टिक पिशव्या आणि वस्तू गोण्यांत भरून नगरपालिकेच्या ताब्यात दिल्या. या ट्रॅक्टरभर प्लास्टिकची नगरपालिकेने योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली.

यावेळी नगराध्यक्षा अनिता करंजकर, उपनगराध्यक्षा प्रतिभा घुमरे, रमेश राठोड, नगरसेवक मोहन करंजकर, संजय शिंदे, भाऊसाहेब गायकवाड, नगरसेविका मनीषा कस्तुरे, कविता यादव, संगीता पिंपळे, स्वाती झुटे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम सोनवणे, सोसायटी संचालक श्याम ढगे आदींसह पालिका कर्मचारी उपस्थित होते.

या व्यापाऱ्यांनी घेतला पुढाकार (स्वतंत्र चौकट)

मनोहर आंबेकर, द्वारकानाथ झंवर, रमेश बोराडे, प्रकाश बूब, विनोद पमनानी, मोहन नाहटा, संजय लाहोटी, रमेश हेंबाडे, राजू लोया, मयूर शेटे, प्रवीण यादव, उमेश नहार, गणेश जाधव, भूषण कांकरिया, प्रशांत लोया, रामदास गाढवे, चेतन आंबेकर, गणेश निसाळ, बाळासाहेब वाईकर आदी.

------------------------------------------

(स्वतंत्र सिंगल बातमी)

--

प्लास्टिक संकलन केंद्रांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प शहरात आधीच प्लास्टिकबंदी असताना आता राज्य सरकारच्या आदेशानुसार प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

मात्र, देवळाली परिसरात आजही अनेकांकडे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आहे. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी देवळाली परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्डाने नाशिक महापालिकेप्रमाणे प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा अध्यादेश दोन महिन्यांपूर्वी जारी केला.त्यानुसार ही बंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्लास्टिकबंदीला गेल्या शनिवारपासून जोमाने सुरुवात झाली. बंदीचे पडसाद जागोजागी पाहायला मिळत आहेत. त्यासाठी नाशिक महापालिकेने महापालिका विभागीय कार्यालयांत प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू केली आहेत.

त्याच धर्तीवर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन प्लास्टिकबंदीची कारवाई करीत असताना प्लास्टिक संकलन केंद्रे का सुरू करीत नाही, असा प्रश्न नागरिक आणिपर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात कार्यवाहीची मागणीही करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस वाहनांवर २४ तास ‘नजर’

$
0
0

पोलिस वाहनांवर २४ तास 'नजर'

सत्तरहून अधिक वाहनांवर जीपीएस

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार केल्यास कामाला गती मिळते, तसेच पारदर्शकता निर्माण होते. शहर पोलिसांनी काही कामांमध्ये आणलेली आधुनिकता पोलिसांपुरतीच मर्यादित नाही, तर नागरिकांनासुद्धा फायदेशीर ठरणार आहे. याची माहिती देण्यासाठी 'डिजिटल पोलिस' ही वृत्तमालिका आजपासून...

नाशिक : गस्तीवरील आणि पोलिसांसाठी वापरण्यात येणाऱ्या इतर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी तब्बल ७० वाहनांवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) प्रणाली कार्यान्वित केली आहे. आणखी १५ ते २० वाहनांवर जीपीएस बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असून, यामुळे रिस्पॉन्स टाइम कमी होऊन घटनास्थळ गाठणे पोलिसांना सोपे होणार आहे.

जीपीएस बसवण्यात आलेल्या वाहनांमध्ये १३ पोलिस स्टेशनमधील प्रत्येकी पाच वाहनांचा, निर्भया व्हॅन, टूरिस्ट पोलिस, पीसीआर मोबाइल आदी वाहनांचा समावेश आहे. जीपीएसद्वारे एखादे वाहन कोठे उभे आहे, कोणत्या दिशेने चालले आहे, एखाद्या ठिकाणी किती वेळापासून उभे आहे, दिवसभरात किती फिरले याची सविस्तर माहिती मिळते. यासाठी शहर नियंत्रण विभागात कंट्रोल स्टेशन सुरू करण्यात आले आहे. यासाठी एक मोबाइल अॅपही संबंधित कंपनीने विकसित केले असून, त्यांचा कंट्रोल लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की बंदोबस्त आणि स्ट्रायकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवरदेखील लवकरच जीपीएस यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. यामुळे सव्वाशेपेक्षा अधिक वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसेल. या यंत्रणेमुळे वाहनांच्या प्रवासाची तंतोत माहिती उपलब्ध होते, तसेच वायरलेसद्वारे संदेश देण्यास अडचणी आल्या तर मोबाइलवर वाहनातील पोलिसांना कॉल करता येणे शक्य होणार आहे. शहराचा विस्तार मोठा असून, पोलिसांचे वाहन नक्की कोठे आणि काय करते हे यामुळे समोर येते. एखादी घटना समजल्यानंतर पोलिसांनी कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचणे महत्त्वाचे असते. अशा वेळी नियंत्रण कक्षातील टेलिव्हिजन स्क्रीनवर घटनास्थळ पाहून नजीक दिसणाऱ्या वाहनास त्या ठिकाणी पाठवणे सोपे होणार आहे. विशेषत: चेन स्नॅचिंगसारख्या घटनांमध्ये पोलिसांना वेळीच माहिती मिळाली तर या यंत्रणेचा खूप फायदा होऊ शकतो. या यंत्रणेचा नेमका वापर कसा करायचा यासाठी वेगवेगळ्या विभागातील पोलिस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

क्रमश:

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन पोलिस स्टेशनला मिळाली हक्काची जागा

$
0
0

महसूल विभागाने पाठविलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उपनगर आणि गंगापूर या दोन पोलिस स्टेशनच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या जागा पोलिस विभागासाठी वर्ग करण्याबाबत महसूल विभागाने मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यावर नुकतेच शिक्कामोर्तब झाले असून, लवकरच या पोलिस स्टेशनच्या इमारतींच्या कामांना गती मिळणार आहे. आता पोलिसांनी आपले लक्ष पंचवटी, म्हसरूळ पोलिस स्टेशनसह परिमंडळ दोन कार्यालयाच्या जागेकडे वळविले आहे.

सर्वाधिक झोपडपट्ट्या आणि रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीमुळे स्ट्रिट क्राइमबाबत सतत चर्चेत येणाऱ्या उपनगर पोलिस स्टेशनला स्वमालकीची जागा नाही. अत्यंत अपुऱ्या जागेत उपनगर पोलिस स्टेशनचा कारभार सुरूवातीपासूनच सुरू आहे. पोलिसांनाच सुविधा नसल्याने तिथे येणाऱ्या नागरिकांचीही अबाळ होते. गंगापूर पोलिस स्टेशनचेही हेच दुखणे असून, हे पोलिस स्टेशन भाडेतत्वावर सुरू आहे. याबाबत मुख्यालयाच्या पोलिस उपायुक्त माधवी कांगणे यांनी सांगितले, की गंगापूर पोलिस स्टेशनसाठी सोमेश्वर येथे तर उपनगर पोलिस स्टेशनसाठी उपनगर परिसरातील शांतीपार्कच्या पुढे असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ जागा मिळाली आहे. या जागा पोलिस विभागाला मिळाव्यात यासाठी काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने मंत्रालयाला प्रस्ताव सादर केला होता. त्यास आता मंजुरी मिळाली आहे. पुढील कामांना गती देण्यात येईल, असे कांगणे यांनी स्पष्ट केले.

इतर जागांबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की या दोन ठिकाणांसह म्हसरूळ, पंचवटी आणि मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या सुसज्ज इमारती स्वतंत्र जागेवर उभ्या राहणे आवश्यक आहे. तसेच परिमंडळ दोनचे कार्यालयही भाडेतत्त्वावर घेण्यात आले असून, तेही स्वतंत्र जागेत सुरू होणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंचवटी पोलिस स्टेशनची जागा पोलिसांची असली तरी ती कमी आहे. हायकोर्टाच्या आदेशाने नुकतेच शहर पोलिस मुख्यालयाची अडीच एकर जागा जिल्हा कोर्टाला वर्ग करण्यात आली. शहरात दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. राज्यभरातील पोलिस शहरात बंदोबस्तासाठी दाखल होतात. त्यांच्या राहण्याची तसेच बंदोबस्ताच्या अनुषंगाने सुविधा पुरविण्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे. पंचवटी पोलिस स्टेशनजवळील जागा उपलब्ध झाल्यास तिथे अशा सुविधा निर्माण करणे शक्य होईल, असे सिंगल यांनी स्पष्ट केले.

ट्रॅफिक युनिट्सला जागेची प्रतीक्षा

शहर वाहतूक शाखेच्या तीन युनिट्स असून, त्यांची कार्यालयेही सुरू आहेत. मात्र, सातपूर, अंबड, इंदिरानगर या भागातील आणि पंचवटी तसेच नाशिकरोड या भागातून रहदारीला अडथळा ठरणारी वाहने हटवून नक्की कोठे ठेवावीत, असा प्रश्न उपस्थित होतो. या परिसरात वाहतूक शाखेला जागाच उपलब्ध नसल्याने टोईंग व्हॅन सुरू करता येत नाही. शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात मुबलक जागा असल्याने दोनच वाहने सुरू आहेत. इतर ठिकाणी एक तर शहराच्या मध्यवर्ती भागात एक असा वाहनचालकांना न्याय लागू पडतो.

गंगापूर पोलिस स्टेशन : सोमेश्वरजवळ, गंगापूर रोड

उपनगर पोलिस स्टेशन : म्हसोबा मंदिराजवळ, शांतीपार्कपुढे

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग अभ्यासक्रमाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा योगदिन घोषित केल्यानंतर जागतिक पातळीवर योगाभ्यासाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. मात्र, योग शिकविण्यासाठी असलेल्या शिक्षकांची कमतरता भासू लागली. ही गरज ओळखून नाशिकच्या योग विद्या धाम या संस्थेच्या वतीने कालिदास विद्यापीठाच्या मान्यतेने योगशास्त्र पदविका, योग शास्त्र पदवी, योगशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याची माहिती योग विद्या धामचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

योग विद्या धाम या केंद्राला आयुष मंत्रालयाची मान्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात योगाचे महत्त्व विचारात घेऊन संस्थेने २०१३ पासून योग महाविद्यालयाची स्थापना केली आहे. हे महाविद्यालय कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर यांच्याशी संलग्न आहे. या ठिकाणी योगशास्त्र पदविका, योग शास्त्र पदवी, योग शास्त्र पदव्युत्तर पदवी हे अभ्यासक्रम सलग पाच वर्षांपासून शिकविले जातात. या महाविद्यालयाचा निकाल कायमच १०० टक्के लागला असून, येथे उच्चविद्याविभूषित प्राध्यापक वृंद, सुसज्ज ग्रंथालय, योगानुकूल वातावरण, भव्य सभागृह, प्रशस्त इमारत इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. योगशास्त्र पदविकेचा कालावधी एक वर्षाचा असून १२ वी उत्तीर्ण किंवा त्या समकक्ष उत्तीर्ण असणाऱ्यांना यात प्रवेश घेता येतो. या अभ्यासक्रमाला पाच विषय असून १०० गुणांची परीक्षा आहे. योगशास्त्र पदवी हा अभ्यासक्रम सेमिस्टर पद्धतीचा आहे. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून, १२वी उत्तीर्ण असणाऱ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. ४० गुण महाविद्यालयाकडे व ६० गुण विद्यापीठाकडे अशी याची गुण पद्धती आहे. योगशास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी दोन वर्षे (४ सत्र) कालावधी असून, बी. ए. योग शास्त्र किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कालिदास विद्यापीठाचा योगशास्त्र पदविका किंवा योग विद्या गुरुकुल संस्थेचा योगशिक्षक पदविका वर्ग असणाऱ्यांना प्रवेश दिला जातो. यातही ४० गुण महाविद्यालयाकडे तर ६० गुण विद्यापीठाकडे अशी याची गुणरचना आहे. महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली असून संस्थेच्या कार्यालयात प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम येईल त्याला प्राधान्य याप्रमाणे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमासाठी फक्त शनिवार व रविवार ११ ते ५ या कालावधीत कॉलेज असते. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांचे कॉलेज १४ जुलैपासून सुरू होणार आहे. इच्छुकांनी योग विद्याधाम, योग भवन, कॉलेजरोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन कॉलेजच्या प्राचार्या डॉ. आशा वेरुळकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाग फुलविण्यासाठी कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळा सुरू झाला की अनेकजण आपल्या बागेत रोपे लावतात. परंतु, यामधील काहीच रोपे तग धरतात. अधिकाधिक रोपे जगावीत यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने हा बगीचा तयार करणे आवश्यक आहे. याबाबत मार्गदर्शन मिळावे याकरीता हौशी नागरिकांसाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या वतीने गार्डनिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १ जुलै रोजी सकाळी १० वाजता एचपीटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. उपलब्ध जागेमध्ये बगीचा कसा तयार करावा याचा डेमो त्यामध्ये घेण्यात येणार आहे. कोणत्या ऋतूत कोणती फळझाडे, पालेभाज्या तसेच फुलांची रोपे लावावीत, रोपांची छाटणी कशा पद्धतीने करावी, कीड नियंत्रण तसेच घरच्या घरी खते कशी तयार करावीत याचे मार्गदर्शनही या कार्यशाळेत संदीप चव्हाण करणार आहेत. गच्ची किंवा गॅलरीमध्ये बाग तयार करताना येणाऱ्या अडचणींविषयीदेखील या कार्यशाळेत मार्गदर्शन मिळणार आहे. कार्यशाळेत सहभागासाठी नावनोंदणी अनिवार्य असून, महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी २०० रुपये तर इतरांसाठी ४०० रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७, ९४२२५१३५६९ या क्रमांकावर अथवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे संपर्क साधावा. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजच करा उपवास आणि वटपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वटपौर्णिमेचा उपवास आणि वटपूजन आज, बुधवारीच (दि. २७ जून) करावे, असे पंचांग अभ्यासकांनी सांगितले आहे. दिनदर्शिकेत गुरुवारी पौर्णिमा दिलेली आहे, असे असले तरी शास्त्र वचनाप्रमाणे उपवासासह वटपूजन बुधवारी सूर्योदयापासून दुपारी दीड वाजेपर्यंत करायचे आहे.

यंदा ज्येष्ठ पौर्णिमा गुरुवार (दि. २८ जून) रोजी सकाळी १०.२३ पर्यंत आहे. मात्र, वटपौर्णिमेची सुरुवात आज (दि. २७) रोजी होत आहे. बुधवारी सूर्यास्तापूर्वी ६ घटींपेक्षा अधिक व्यापिनी अशी चतुर्दशीयुक्त पौर्णिमा आहे. यामुळे सावित्रीव्रत म्हणजेच वटपौर्णिमेनिमित्त उपवास आणि वटपूजन बुधवारीच करावे, असे वचन आहे. बुधवारी ज्येष्ठ शुक्ल १४, सकाळी ८ वाजून १३ मिनिटांपर्यंत आहे. याच दिवशी पौर्णिमेची तिथी सायंकाळी ६ घटींपेक्षा आधिक आहे. म्हणून, बुधवारीच वटपौर्णिमेचा मुहूर्त आहे. बुधवारी सकाळी जरी चतुर्दशी असली तरीही सूर्योदयापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत कोणत्याही वेळेत वटपूजन करावे. याचवेळी नेहमीप्रमाणे उपवासासह वटपूजन करावे, असे शास्त्र वचनानुसार सांगण्यात आले आहे. यापूर्वी शके १९२७, १९३२, १९३८ व १९३९ मध्येही याचप्रमाणे वटपौर्णिमेचे मुहूर्त होते.

जे महिन्यातील पौर्णिमेचा नियमित उपवास करतात, त्यांनी गुरुवारी उपवास करावा. वटपूजन आणि वटपौर्णिमेचा उपवास मात्र बुधवारीच करावा.

- अमोर किरपेकर, पुरोहित

चतुर्दशीयुक्त पौर्णिमा ज्यावेळी असते, तेव्हा वटसावित्रीचे व्रत करायचे असते. त्यामुळे उपवासासह वटपूजन बुधवारीच सूर्योदयापासून दुपारी दीडपर्यंत करावे.

- नीलेश धर्माधिकारी, पुरोहित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images