Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘टेटे’त सुधांशू, पुनीत, सायली अजिंक्य

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सुधांशू वाणी, पुनीत देसाई व सायली बक्षी अजिंक्य ठरल्या आहेत

स्पर्धेच्या जुनिअर मुलांच्या गटात अंतिम फेरीत सुधांशू वाणीने विराज कोटेचा १०-१२, ११-६, ९-११, ९-११, ११-८ व ९-११ असा ४-२ ने पराभव केला. युथ मुलांच्या गटात सौमित देशपांडे याने अर्चित भडकमकरचा ११-१, ११-१, ११-७, ९-११, ९-११ व ११-७ असा ४-२ ने सहजरित्या पराभव करत विजेतेपद पटकावले. सब जुनिअर मुलांच्या गटात कुशल चोपडाने लोवीत चांदूरकरचा ९-११, १२-१०, ११-९, ११-६, व ११-४असा ४-१ ने पराभव केला. तर कॅडेट मुलाच्या गटात कुशल चोपडा याने आर्यन पोळ याचा ११-५, ११-५, ११-४ असा ३-० ने असा सहजरित्या पराभव करून आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. सब जुनिअर मुलीच्या एकेरीत सायली वाणी हिने तनिषा कोटेचाचा २-४ ने पराभव करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. पुरुषांच्या एकेरीत मानांकित पुनीत देसाईने आपल्या अनुभवाच्या बळावर अर्चित भडकमकर याचा ४-१ ने सहजरित्या पराभव करत विजय संपादन केला.

कॅडेट मुलींच्या गटात सायली बक्षी हिने मिताली पुरकरचा ३-२ ने पराभव केला.

स्पर्धेतील विजयी खेळाडूंना प्रमुख पाहुणे सर्व शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे, अशोक दुधारे व गोरखनाथ बलकवडे यांच्या हस्ते रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात वृत्त

$
0
0

एचएएल कंत्राटी

कामगारांना दिलासा

नाशिक : ओझरच्या हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना ब झोनचे किमान वेतन लागू करावे, असे आदेश सेंट्रल लेबर एन्स्कोसमेंट अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सध्या सी झोनचे किमान वेतन प्रतिदिन ३७० रुपये दिले जाते. सीटूप्रणित नाशिक वर्कर्स युनियनने यासंदर्भात ब झोनच्या किमान वेतनाची मागणी केली होती. त्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये उपनगरच्या कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. अखेर त्याची दखल घेत कामगारांना ब झोनचे किमान वेतन रुपये ४६२ प्रतिदिन देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती युनियनचे उपाध्यक्ष तुकाराम सोनजे यांनी दिली आहे. कंत्राटदारांनी वेतन न दिल्यास एचएएलने ब झोनचे किमान वेतन कामगारांना द्यावे, असेही पत्रात म्हटले असल्याचे सोनवे यांनी सांगितले आहे.

कामगारांना बोनस द्या

नाशिक : ओझर मिग येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विविध ठेकेदारांकडील कामगारांना बोनस कायद्यानुसार बोनस किंवा सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी सीटू प्रणीत नाशिक वर्कर्स युनियनने केली आहे. तसे निवेदन कामगार उपायुक्तांना देण्यात आले आहे. तशी माहिती युनियनचे उपाध्यक्ष तुकाराम सोनजे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडथळा आणल्यास कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दारणा, गोदावरी आणि कादवा नदीकाठच्या नागरिकांनी नद्यांमध्ये सोडलेल्या जलप्रवाहास अडथळा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये. पाण्याचा अधिकृत व अनधिकृत वापर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

दारणा, गंगापूर, पालखेड धरण समूहातील धरणांतून २६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. सोडलेले पाणी सुरळीत प्रवाहित होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे. गोदावरी नदीवरील नांदूरमध्यमेश्वर बंधारा ते प्रवरा संगमदरम्यान असलेल्या सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांतील फळ्या काढून घ्याव्यात, प्रवाहास अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बंधाऱ्यांत फळ्या टाकू नयेत, असेही जलसंपदा विभागाने अधोरेखित केले आहे. दारणा, गोदावरी, कादवा या नद्यांमध्ये पाणी प्रवाहित असताना सर्व ठिकाणचे गेजेस नोंदविण्यात येणार आहेत. पाणी सुरळीत प्रवाहित होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, सरकारी, निमसरकारी यंत्रणा व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही सूचित केले आहे.

प्रवाहात उतरणे टाळा

दारणा, गोदावरी, कादवा या नद्यांतील विसर्ग जादा असल्याने कुणीही प्रवाहात उतरण्याचा प्रयत्न करू नये. नद्यांमध्ये सोडलेले पाणी विनाअडथळा जास्तीत जास्त प्रमाणात जायकवाडी धरणात पोहोचेल यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता रा. शा. शिंदे आणि रा. पां. भट यांनी केले आहे. दारणा, गोदावरी, कादवा नदीतून ६ हजार ते ८ हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवाहित होणार असल्याने नदीतील पाणी उपसा करण्यासाठी बसविलेल्या मोटारी व इतर सर्व प्रकारचे साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहनही जलसंपदा विभागाने केले आहे. प्रवाहामुळे साहित्याचे नुकसान झाल्यास जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकाळी गारवा; दुपारी उन्हाचा कडाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वातावरणात ऑक्टोबर हीटचा कडाका काहीसा कमी झाला असून, हिवाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याचे ऊन असे वातावरण सध्या अनुभवायला मिळते आहे. किमान तापमानात काही दिवसांपासून सातत्याने घट होत असून, गुरुवारी १४.६ इतकी किमान तापमानाची नोंद झाली.

सकाळी आणि सायंकाळी वातावरणात आल्हाददायक थंड वातावरणात गारवा निर्माण होत असला तरीही दुपारच्या उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही. दुपारी कडाक्याचे ऊन आणि संध्याकाळी गारवा अशी काहीशी परिस्थिती वातावरणात आहे. या वातावरणातील बदलांमुळे अनेक नागरिकांना घसादुखीचा त्रास सुरू झाला आहे. सकाळच्या आल्हाददायक वातावरणामुळे जॉगिंग ट्रॅकवरदेखील गर्दी वाढली असून, अनेकांनी व्यायामाला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे ठेवणीतले स्वेटर, कानटोप्या यांची शोधाशोध सुरू झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी शहरातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस तर किमान १४.६ इतके होते. येत्या काही दिवसांत तापमानात घट होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी पावसाने ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली.

कमाल तापमान किमान तापमान

१७ ऑक्टोबर ३३.३ १८.०

१८ ऑक्टोबर ३३.९ १८.७

१९ ऑक्टोबर ३३.८ १८.६

२० ऑक्टोबर ३४.३ १९.०

२१ ऑक्टोबर ३४.३ १९.०

२२ ऑक्टोबर ३५.२ १८.३

२३ ऑक्टोबर ३४.६ १५.१

२४ ऑक्टोबर ३४.१ १४.०

२५ ऑक्टोबर ३३.० १४.६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहापूरसाठीही नाशिकचे पाणी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात नाशिक जिल्ह्यातून पाणी देण्याचा वाद पेटलेला असतानाच आता ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यासाठीही नाशिकचे पाणी पळविण्याचा प्रकार समोर आला आहे.

शहापूर तालुक्यातील ९७ टँकरग्रस्त गावे व पाड्यांना प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी भावली धरणातून १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणाला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भावलीचे पाणीही आता पेटणार असल्याची चिन्हे आहेत. समन्यायी पाणीवाटपाचे कारण देत नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळविण्याचे उद्योग सध्या सुरू असल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे. जायकवाडी धरणासाठी नाशिक आणि नगरमधून पाणी देण्याचे आदेश सध्या प्राप्त झाले आहेत. हे पाणी सोडण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून जायकवाडीचे पाणी देण्यासाठी नियोजन सुरू आहे. त्यातच आता इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाचे पाणी शहापूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अगोदरदेखील असे पाणी आरक्षण केले असले, तरी त्यात वाढ करण्यात आल्यामुळे हे पाणी आता २०२१ पर्यंत आरक्षित होणार आहे. जिल्ह्यात अगोदरच अनेक तालुके दुष्काळग्रस्त आहे. त्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पाणी पळविले जात असून, त्यामुळे त्याला सर्व स्तरांतून विरोध होत आहे.

यापूर्वीही दिलेय आरक्षण

सरकारने या अगोदर २०१७ मध्ये भावली धरणातून ४.५५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास २०२१ पर्यंत मंजुरी दिली होती. त्यानंतर त्यात वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्यामुळे नाशिकचे पाणी दुसरीकडे पळविले जात असल्याची भावना बळावली असून, त्याला आता जिल्ह्यात विरोध होत आहे. राज्य सरकारने यासंदर्भात २३ ऑक्टोबर रोजी हे परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानंतर त्याला विरोध सुरू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहापूरसाठीही नाशिकचे पाणी....

$
0
0

शहापूरसाठीही नाशिकचे पाणी! (मुख्य अंक पान १४ लीड)

जायकवाडीनंतर आता ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यासाठीही नाशिकचे पाणी पळविण्याचा प्रकार समोर आला आहे. शहापूर तालुक्यातील ९७ टँकरग्रस्त गावे व पाड्यांना प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी भावली धरणातून १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणाला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भावलीचे पाणीही पेटण्याची चिन्हे आहेत.

--

शासनआदेश पायदळी! (मुख्य अंक पान १ अँकर)

विभागीय चौकशी सुरू असलेल्या, या चौकशीवर प्रभाव टाकण्याचा वा अडथळा आणण्याची शक्यता असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे अतिरिक्त पदभार देऊ नये, असे स्पष्ट शासन निर्देश आहेत. मात्र, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त पदभार सुपूर्द करताना राज्य सरकारने हा आदेश पायदळी तुडवला आहे.

--

बॉलिवूडकडून कौतुक (प्लस पान ६ मिर्च मसाला अँकर)

अभिनेत्री सई ताम्हणकरचं सध्या बॉलिवूड कलाकारांकडून कौतुक होतंय. काही दिवसांपूर्वीच आलेल्या 'लव्ह सोनिया' या सिनेमात तिनं साकारलेल्या 'अंजली' या भूमिकेची दखल रसिक आणि समीक्षक अशा दोहोंकडून घेतली गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सिनेमा असल्यामुळं सईचं कामही सर्वत्र पोहोचलंय. पुढील वाटचालीस तिला शुभेच्छा देऊया!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीगळती थांबणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पाणीवितरण प्रणालीतील दोष दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिकेने वितरण यंत्रणा अद्ययावत करून गळती रोखण्यासाठी ३५४ कोटींचा आराखडा तयार केला आहे. शहराची पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून ती अद्ययावत करण्यासाठी अमृत योजनेतून निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी नाशिक दौऱ्यात दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने हा ३५४ कोटींचा आराखडा तयार केला असून, शुक्रवारी (दि. २६) मुंबईत या आराखड्याचे नगरविकास विभागाकडे सादरीकरण केले जाणार आहे. अमृत योजनेतून या आराखड्याला मंजुरी मिळाल्यास शहरात २६५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकल्या जाणार असून, जलकुंभाचेही नेटवर्क सुधारणार आहे.

नाशिक शहरात पाणीपुरवठ्यासाठी टाकलेल्या जलवाहिन्या आता जीर्ण झाल्या असून, वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी केलेल्या वॉटर ऑडिटच्या अहवालानुसार महापालिका गंगापूर धरण आणि दारणा नदीपात्रातून उचलत असलेल्या एकूण पाण्यापैकी ४४ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले होते. महापालिका पाणीपुरवठा यंत्रणेवर करीत असलेल्या एकूण खर्चापैकी २५ टक्के खर्चदेखील पाणीपट्टीतून वसूल होत नसल्यामुळे महापालिकेला पाणीपुरवठा व्यवस्थेतून दरवर्षी कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा यंत्रणेतील दोषांमुळे शहरात होणाऱ्या असमान पाणीपुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाशिक दौऱ्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत सुधार करण्यासाठी अमृतमधून निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, पाणीपुरवठा यंत्रणेतील दोष दूर करून शहरात समसमान दाबाने सुरळीत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने ३५४ कोटी रुपयांचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. शहरातील नव्याने विकसित झालेल्या भागात २६५ किमी लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार असून, काही भागातील जुन्या जलवाहिन्यादेखील बदलण्यात येणार आहेत. वॉशआऊटमुळे वाया जाणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा पुनर्वापर केला जाणार असल्याने लाखो लिटर पाण्याची बचत होणार आहे. हा आराखडा आज (दि.२६) सरकारला सादर केला जाणार आहे. या सादरणीकरणानंतर केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार संयुक्तपणे यातील आपला हिस्सा पालिकेला देणार आहेत.

थेंबा-थेंबाचा हिशेब

गंगापूर आणि दारणा धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा आता महापालिकेमार्फत हिशेब ठेवला जाणार आहे. शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात चेहेडी येथील दारणा बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून पाणी उचलून सुमारे तीनशे किमी लांबीच्या मुख्य जलवाहिन्यांद्वारे सहाही जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये आणले जाते. तेथे पाण्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया होऊन ११३ जलकुंभांद्वारे १८०० किमी लांबीच्या जलवाहिन्यांतून घरोघरी पोहोचविले जाते. परंतु, या आराखड्यात जलकुंभावरूनच पाण्याचा हिशेब केला जाणार आहे. जलकुंभात येणारे पाणी आणि घरापर्यंत पोहचणारे पाणी याचा हिशेब ठेवला जाणार आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक थेंब न् थेंब पाणी आता मोजले जाणार आहे.

असा आहे आराखडा

- २६५ किमीच्या नवीन जलवाहिन्या टाकणार

- ११३ जलकुंभांचे नेटवर्क सुधारणार

- हायड्रोलिक मॉड्युलिंगनुसार सुधारणा करणार

-प्रत्येक जलकुंभासाठी बल्कमीटर, व्हॉल्व बसविणार

- जलकुंभनिहाय पाणी वितरण क्षेत्र निश्चित करणार

- सहापैकी तीन जलशुध्दीकरण केंद्रांचे आधुनिकीकरण

-वॉश आऊटद्वारे वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर

-हिशेबबाह्य पाण्याची परिगणना होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर कलाकारांचा ‘मुसाफिर का सफरनामा’

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

एका नाशिककराच्या लेखणीतून आलेल्या हिंदी गजल, नाशिककर शास्त्रीय गायकाचे गजल गायकीत पदार्पण, त्याच गायकाच्या शिष्याचे हिंदी संगीत दिग्दर्शनात दमदार पाऊल आणि हे सुरेल काम केल्याबद्दल या शिष्याला मिळालेली गुरूंची पाठीवर शाबासकीची थाप असा भारून टाकणारा प्रवास 'मुसाफिर का सफरनामा' या गजल अल्बमच्या निमित्ताने घडून आला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण गजल अल्बम नाशिककर कलाकारांनी निर्माण केला असून गजलगायकीच्या दुनियेत हा चंचूप्रवेश मानला जात आहे.

ज्ञानेश्वर कासार हे नाशिकच्या गायकीच्या क्षेत्रातील उभरते नाव. स्वरभास्कर भीमसेन जोशी यांचे शिष्य, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. डॉ. अविराज तायडे यांचे शिष्य असलेल्या ज्ञानेश्वरने गायनातील नवी वाट चोखाळायचे ठरवून हिंदी गजलगायकीच्या दुनियेत दमदार पदार्पण केले असून, नाशिककरांसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे, त्याचे कारण म्हणजे ज्ञानेश्वरने ज्येष्ठ गायक हरिहरन, पं. सुरेश वाडकर यांच्याकडून गजल गाऊन घेतल्या असून, गेल्या सहा महिन्यांपासून तो या प्रोजेक्टवर काम करत होता. आर्या आंबेकर या आघाडीच्या गायिकेकडून पहिल्यांदा त्याने हिंदी गजल गाऊन घेतल्या, हे आणखी एक विशेष.

ज्ञानेश्वरच्या या कामावर बेहद्द खूश होऊन त्याचे दुसरे गुरू सुरेश वाडकर यांनी त्यांच्या गुरुजींच्या म्हणजेच आचार्य जियालाल वसंत यांनी लिहिलेल्या गजल त्याला दिल्या. या सर्व गजलांना संगीतबद्ध करण्याबाबत सूचना केली आहे. ज्ञानेश्वर म्हणतो, माझे गुरू पं. अविराज तायडे यांनीदेखील यातील एक गज़ल गायली आहे. त्यांचा हा पहिलाच प्रसंग होता की ते आपल्या मुख्य प्रवाहाच्या बाहेरील गज़ल हा प्रकार पहिल्यांदाच गायले. त्यांच्या गज़ल कारकिर्दीची सुरुवात या गज़लपासून झाली हे माझे भाग्य मी मानतो.

नाशिकचे गजलकार संजय पोरवाल यांनी या गजल लिहिलेल्या असून, त्याला अनिल धुमाळ यांचे संगीत संयोजन लाभले आहे. आर्या आंबेकरला प्रथमच हिंदीत गाण्याची संधी ज्ञानेश्वरने दिली असून स्वरांजय धुमाळ याने ताल संयोजन केले आहे. नाशिकचा धुमाळ व 'द आर्क स्टुडिओ' येथे याचे ध्वनिमुद्रण झाले आहे. प्रसिध्द गजलगायक संजय वत्सल यांच्यानंतर नाशिकमधून प्रथमच एका उभरत्या तरुण गायकाने हा प्रयत्न केल्याने त्याचे कौतुक सांस्कृतिक वर्तुळात होत आहे.

या गजल अतिशय सुंदर लिहिलेल्या आहेत. त्याचे संगीत दिग्दर्शन ज्ञानेश्वरने खूप चांगल्या प्रकारे केले आहे. त्याने स्वत:ही एक गजल गायली आहे, गाताना मजा आली.

-हरिहरन, ज्येष्ठ गायक

माझा लाडका व गुणी शिष्य ज्ञानेश्वर कासार याने सफरनामाला संगीत दिले आहे. खूप छान विचार त्याने केलेला आहे.

-पं. सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायक

ज्यांची गाणी ऐकत माझे लहानपण सांगीतिकदृष्ट्या समृद्ध झाले, पुढच्या प्रवासात त्यांची गाणी, त्यांचा आवाज माझ्यासोबत कायम होता. ते दैवी आवाज माझ्यासाठी गातील हे सर्व स्वप्नवत आहे. इतक्या दिग्गज गायक मांदियाळीत थोडावेळ का होईना, पण मीही एक गायक आहे, हे विसरायला झालं होतं.

-ज्ञानेश्वर कासार, गायक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी भाजपचा आटापिटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या निर्णयावरून भाजपच्या शहरातील आमदारांची कोंडी झाली असून, कोंडीतून मार्ग काढण्यासाठी महासभेत आता प्रशासनावर खापर फोडण्याची तयारी केली आहे. शहरासाठी पाणी आरक्षणाची मागणी नोंदविताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यानी केला असून, महासभेत नाशिकसाठी गंगापूर धरणातून अधिक पाणी मिळवण्याची मागणी केली जाणार आहे. परंतु, भाजपचा हा प्रयत्न निव्वळ फार्स ठरणार आहे.

जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय राज्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने घेतला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातून या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. परंतु त्याला उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी रवाना होणार आहे. जिल्ह्यात दुष्काळ असतानाही, जायकवाडीसाठी पाणी जात असल्याची सल जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नाशिककरांमध्ये आहे. त्यामुळे याचा फटका आगामी निवडणुकीत भाजपला सोसावा लागणार आहे. त्यामुळे संभाव्य तोट्याची जाणीव झालेल्या भाजपने आता गंगापूरचे खापर प्रशासनावर फोडण्याची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी रामायण या महापौरांच्या निवासस्थानी पालिकेच्या अधिकाऱ्यांना पाचारण करत, आमदार सानप यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. नाशिकला अधिकचे पाणी आवश्यक असताना जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी नोंदवितांना लोकप्रतिनिधींना विचारात का घेतले नाही, असा सवाल अधिकाऱ्यांना करण्यात आला. त्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या महासभेत अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार असून गंगापूरसाठी अधिक पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. परंतू शुक्रवारीच गंगापूरचे पाणी जायकवाडीला रवाना होणार आहे.

पाण्याबाबत विषय मांडून नाशिककरांच्या पाठीशी असल्याचा हा फक्त देखावा भाजपकडून निर्माण केला जाणार आहे. ज्यावेळी महासभेत पाण्यावरून चर्चा सुरू असेल त्याचवेळी गंगापूर धरणातून मराठवाड्याकडे पाणी जाणार असल्याने भाजपचा निव्वळ फार्स ठरणार आहे.

उशीराचा आटापिटा

नाशिक जिल्ह्यातही दुष्काळाची परिस्थिती असताना शासनाने नाशिकचा विचार न करता मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने ही बाब नाशिककरांच्या जिव्हारी लागली आहे. या निर्णयाने सर्वत्र भाजप विरोधात सूर आवळला जात असल्याने येत्या निवडणुकीत नाशिककर हिशोब चुकता करतील या भीतीने भाजप आमदार हैराण झाले आहेत. एकीकडे आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी केली आहे, तर आमदार बाळासाहेब सानप यांनी गुरुवारी भाजपच्या महासभेत प्रशासनावर खापर फोडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भाजपचा हा उशीराचा आटपिटा निव्वळ देखावा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगी चरणी धावपटू होणार लीन

$
0
0

रविवारी गडावर 'सप्तशृंगी हिल' हाफ मॅरेथॉन स्पर्धा

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंग गडावरील देवी राज्यातील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील निसर्गरम्य परिसर आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांसाठी देखील नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. या आरोग्यदायी वातावरणाचा अनुभव सर्वांना घेता यावा या उद्देशाने शहरातील 'नाशिक रनर्स' या ग्रुपपने रविवारी २८ ऑक्टोबर रोजी 'सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन २०१८' चे आयोजन केले आहे. सप्तशृंगी हिल मॅरेथॉनचे हे दुसरे वर्ष आहे.

सध्या व्यायामाप्रती जनसामान्यांत अधिकाधिक जागरूकता निर्माण होत असून धावण्याकडे जनतेचा कल वाढत चालला आहे. हे एक चांगले लक्षण आहे. या मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्यविषयक जागरूकता अधोरेखित करण्याचा नाशिक रनर्स ग्रुपचा प्रामाणिक प्रयत्न आहे. शिवाय ही मॅरेथॉन ग्रामीण भागात भरवली जाणार असल्याने या निमित्ताने ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंनाही आपले कौशल्य दाखविण्याची संधी देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. तसेच शहर पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल हेदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन ही एक आगळीवेगळी मॅरेथॉन असून जास्तीतजास्त संख्येने लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक रनर्सचे अध्यक्ष एन. टी. वाघ यांनी केले आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरू झाली असून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

आधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९८२३०३२५२३ किंवा ९८२२२७४८९९ या क्रमांकावर संपर्क साधावा. या मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने नांदुरी ते सप्तश्रृंगी गड ही वाहतूक सेवा सकाळी ६ ते ९:३० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील, याची नोंद भाविकांनी, पर्यटकांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

असे असेल 'सप्तशृंगी हिल'

गडाचा पायथा नांदुरीगाव येथून स्पर्धेला सुरुवात

नांदुरीगाव ते सप्तशृंगी देवी मंदिर आणि पुन्हा नांदुरीगाव असा मार्ग

स्पर्धेचे अंतर २१ किमी

हौशी धावपटूंसाठी तीन पाच आणि दहा किमी अंतराचे डिव्हाइन रन

शर्यतप्रसंगी गडावर जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद

धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी आदिवासी लोकनृत्ये आणि नाशिक ढोलचे आयोजन

स्पर्धकांची आरोग्यविषयक सुरक्षा म्हणून जागोजागी रुग्णवाहिकांसह डॉक्टरांची टीम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी आदिवासी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वसतिगृहातील प्रवेशासह पेठरोडवरील वसतिगृह पुन्हा सुरू करावे, विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढावा आदी मागण्या यावेळी केल्या असून, रात्री उशीरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी बैठक बोलविण्यात आली आहे.

महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शहर व परिसरातील शासकीय आदिवासी वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना डीबीटी योजनेचाही लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिलेल्या जळगाव आणि नाशिकमधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन सुरू केला आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन रात्री उशीरापर्यंत सुरू होते. विभागाकडून पेठ रोड परिसरात असलेले आणि बंद करण्यात आलेले मुला-मुलींचे २५० क्षमता असलेले वसतिगृह पुन्हा सुरू करण्यात यावे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा अपघाती जीवन विमा काढण्यात यावा, नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींची डीबीटी अद्यापही खात्यावर जमा न झाल्याने ती तत्काळ जमा करावा, या मागण्याही निवेदनाद्वारे आदिवासी आयुक्तांकडे केल्या आहेत. या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जाधव यांनी दिला.

या वेळी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ गवळी, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दौलत मेमाणे, जळगाव जिल्हाध्यक्ष दारासिंग पावरा, दिंडोरी युवा तालुकाध्यक्ष गोकुळ टोंगारे, युवा संघटक मोहन बेंडकोळी, दिंडोरी-पेठ विभागप्रमुख रोहित कुवर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच मागितल्याने फौजदाराविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुन्ह्यात अटक केलेल्या महिलेला कायद्याच्या मदतीने सोडून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राजेंद्र अर्जुन दुनबळे असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. अॅण्टी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या बहिणीस नाशिकरोड पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळी संशयित दुनबळे सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग चार यांच्या कार्यालयात कार्यरत होते. या महिलेला सीआरपीसी कलम १६९ प्रमाणे गुन्ह्यातून सोडून देण्यासाठी सहायक पोलिस आयुक्तांची परवानगी मिळवून देण्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून दोन हजार रुपयांची लाच मागितली. त्यावरून तक्रारदाराने १० सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार केली. सापळापूर्व पडताळणीदरम्यान दुनबळे यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. एसीबीने यानंतर अनेकदा दुनबळेला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र त्यास यश मिळाले नाही. कायद्यानुसार लाच मागणे हासुद्धा गुन्हा असल्याने एसीबीने अखेर नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दिली. दुनबळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सरकारी विभागातील अधिकारी वा कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी ०२५३-२५७५६२८, २५७८२३० किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बदलती जीवनशैली अनेक रोगांच्या मुळाशी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'बदलती जीवनशैली ही अनेक रोगांच्या मुळाशी असून, आपला आहार विहार योग्य ठेवल्यास मधुमेहाला केवळ लांबच ठेवता येत नाही तर घालवतादेखील येते,' असा विश्वास मविप्र सीचिटणीस नीलिमा पवार यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तक मित्र मंडळातर्फे डॉ. प्रमोद त्रिपाठी लिखित 'मधुमेहापासून मुक्ती' या विषयावरील पुस्तकावर मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होत्या. यावेळी 'सावाना'चे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्र. द. कुलकर्णी, मिलिंद चिंधडे, वसंत खैरनार, धर्माजी बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाल्या, आजच्या धावपळीच्या युगात कळत नकळत आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे सेवन करत असतो. आरामदायी जीवन आणि कमी होत असलेल्या शारीरिक हालचालींमुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. महिलांमध्ये याचे जास्त प्रमाण आढळते. मधुमेहाचे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने लठ्ठपणाची समस्या अधिक जाणवू लागली आहे. मधुमेहींनी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असून, लठ्ठपणा, ह्दयविकार होण्याचा धोका अधिक असतो. मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी संतुलित आहार तसेच आहारातील पथ्थे पाळणे आवश्यक आहे. वनस्पती जन्य पदार्थ्यांचे सेवन, पालेभाज्यांचे सेवन, हरित द्रव्यांचा वापर केल्यास मधुमेहापासून मुक्ती मिळू शकेल. सूत्रसंचालन प्र. द. कुलकर्णी यांनी केले. परिचय अॅड. मिलिंद चिंधडे यांनी करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिसादाअभावी ८४ फटाका स्टॉल्सचे लिलाव तहकूब

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

परवानगीची क्लिष्ट प्रक्रिया आणि अतिरीक्त कराची वसुली यामुळे यंदा महापालिकेच्या फटाका विक्री स्टॉल्सच्या लिलावाकडे फटाके विक्रेत्यांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे. नाशिक पूर्व, पश्चिम आणि पंचवटीतील १५० स्टॉल्सपैकी गुरुवारी जेमतेम ६६ स्टॉल्सचाच लिलाव होऊ शकला. तब्बल ८४ स्टॉल्सचे लिलाव प्रतिसादा अभावी तहकूब करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे.

नाशिक पूर्वमधील २२, नाशिक पश्चिम मधील ६० तर पंचवटी विभागातील ६८ अशा एकूण १५० स्टॉल्सच्या लिलावाची प्रक्रिया महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात आयोजित करण्यात आली होती. परंतू नाशिक पूर्व विभागातील जेमतेम १०, नाशिक पश्चिम विभागातील ३०, पंचवटी विभागातील २६ स्टॉल्सकरीता लिलावात बोली लागू शकली. नाशिक पश्चिम विभागातील ईदगाह मैदानावर ५० तर संदीप हॉटेल समोरील मनपाच्या मोकळ्या जागेवर १० स्टॉल्सच्या उभारणीसाठी लिलाव बोलविण्यात आले होते. त्यापैकी ईदगाह मैदानावरील २९ तर संदीप हॉटेल समोरील अवघ्या एका स्टॉल करीत बोली बोलली गेली. गुरुवारच्या लिलाव प्रक्रियेतून पालिकेला अवघे ११ लाख रुपये मिळाले असून, सर्वाधिक बोली ३७ हजाराची लागली आहे. उद्या(दि. २६) नाशिकरोड, सातपूर व नवीन नाशिक या तीन विभागातील ३२० स्टॉल्स करीत लिलावाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखोई ३० चे आज हस्तांतरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील हवाई दलाच्या केंद्रात देखभाल आणि दुरुस्ती केलेले सुखोई ३० (एमकेआय) हे लढाऊ विमान हवाई दलाकडे सुपूर्द केले जाणार आहे. त्याचा सोहळा ओझर येथील केंद्रात शुक्रवारी (२६ ऑक्टोबर) होणार आहे. याप्रसंगी हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ओझर येथील हवाई दलाचे केंद्र हे देखभाल आणि दुरुस्तीचे आहे. सुखोई ३० (एमकेआय) या विमानाची निर्मिती ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये केली जाते. तसेच, त्याची देखभाल आणि दुरुस्तीही एचएएलकडेच होते. मात्र, ओझर येथील हवाई दलाच्या केंद्रात प्रथमच सुखोई विमानाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे काम या केंद्रात सुरू होते. अखेर या विमानाचे काम पूर्ण झाले. त्याची पहिली हवाई चाचणी गेल्या २४ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे. ती यशस्वी झाल्याचे ओझर हवाई दल केंद्राचे एअर कमोडोर समीर बोराडे (विशिष्ट सेवा मेडल) यांनी दिली आहे. शुक्रवारी हे विमान हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे. त्याचा हस्तांतर सोहळा शुक्रवारी ओझरच्या केंद्रात होणार आहे. याप्रसंगी हवाई दलाच्या मेन्टेनन्स कमांडचे प्रमुख, हवाई दलाच्या पश्चिम आणि दक्षिण विभागाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंत्री शिंदेंकडून आज पाहणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मृदा व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे आज, शुक्रवारी (दि. २६) जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते सिन्नर, इगतपुरी व नाशिक तालुक्यातील गावांना भेटी देऊन तेथील आढावा घेणार आहेत.

सिन्नर तालुक्यातील वावी येथे सकाळी भेट देऊन तेथील टंचाईसदृश परिसराची प्रत्यक्ष पाहणी ते करतील. त्यानंतर मुसळगाव येथे पाहणी करून सकाळी ९.३० वाजता सिन्नर पंचायत समिती कार्यालयालयात टंचाई आढावा बैठकी घेतील. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील शेणित व शेनवडे येथे टंचाईसदृश परिसराची प्रत्यक्ष पाहणी करतील. नंतर नाशिक तालुक्यातील पिंपळद, तिरडशेत या गावांतील टंचाईसदृश भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नाशिक पंचायत समितीत ते आढावा बैठक घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासनआदेश पायदळी!

$
0
0

गैरव्यवहारातील संशयित अधिकाऱ्याची संचालकपदी वर्णी

Vijay.mahale@timesgroup.com

Tweet : vijaymahaleMT

नाशिक : विभागीय चौकशी सुरू असलेल्या आणि या चौकशीवर प्रभाव टाकण्याचा वा चौकशीस अडथळा आणण्याची शक्यता असलेल्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे अतिरिक्त पदभार देऊ नये, असे स्पष्ट शासन निर्देश आहेत. मात्र, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त पदभार सुपूर्द करताना राज्य सरकारने आपलाच आदेश पायदळी तुडवला आहे.

शासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार सोपविताना सामान्य प्रशासनाचे कोणतेही धोरण किंवा आदेश नव्हते. त्यामुळे अनेकदा योग्य, सेवाज्येष्ठता असलेल्या अधिकाऱ्यांना डावलून अन्य व्यक्तींना मोठ्या पदाची जबाबदारी सोपविली जात होती. यामुळे प्रशासनास अपेक्षित लाभदेखील मिळत नव्हता. नेमक्या याच बाबीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने ५ सप्टेंबर २०१८ रोजी शासनआदेश जारी करीत काही मार्गदर्शक सूचना केल्या. त्यानुसार रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार त्याच संबंधित विभागातील सेवाज्येष्ठता असलेल्या अनुभवी आणि कार्यक्षम अधिकाऱ्याकडेच सोपविण्यात यावा. जर ज्येष्ठ व्यक्तीला डावलून अन्य व्यक्तीकडे अतिरिक्त कार्यभार द्यायचा असेल तर सर्वांत ज्येष्ठ व्यक्ती अतिरिक्त कार्यभारासाठी का अपात्र आहे, त्याची लेखी कारणे द्यावीत. तसेच कमी अनुभव असलेली व्यक्ती संबंधित पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडू शकेल याची प्रशासनाने खातरजमा करून घ्यावी, अशा स्पष्ट सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त पदभार सोपविताना साफ दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.

मंत्र्यांच्या 'त्या' उत्तराचे काय?

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाला संचालक नसल्याचा मुद्दा गडचिरोलीचे आमदार व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावर कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी उत्तर दिले होते. २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या काळात शासकीय आयटीआयसाठी विविध यंत्रसामग्रीसाठी करण्यात आलेल्या १०० कोटी रुपयांच्या खरेदी व्यवहारात झालेल्या भ्रष्टाचार व अनियमितता प्रकरणात सहसंचालक अनिल जाधव यांच्यावर ठपका आहे. तरी या प्रकरणी तपासासाठी गठित करण्यात आलेल्या चौकशी समितीला नि:पक्षपणे काम करता यावे म्हणून अनिल जाधव यांना संचालकपदावरून काढून टाकण्यात आल्याचे स्पष्टीकरण मंत्री निलंगेकर-पाटील यांनी दिले होते. आता संचालकपदी असलेले ई. रवींद्रन यांची बदली झाल्यानंतर गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या आणि चौकशी समितीचा अहवाल अद्याप आलेला नसताना जाधव यांच्याकडेच पुन्हा संचालकपदाचा अतिरिक्त पदभार कोणत्या निकषांच्या आधारे देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फायलींना फुटले पाय?

तब्बल १०० कोटी रुपयांच्या यंत्र साहित्य खरेदीच्या तपासासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीने मागणी केलेल्या कागदपत्रांची विभागाकडून पूर्तता झाली नसल्याचे समजते. वारंवार स्मरणपत्र पाठवूनही खरेदीसंबंधीची कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने फायलींना पाय फुटले की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई: बोट दुर्घटनेचा थरार 'त्यांच्या'च शब्दांत..

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुसाट वेगाने निघालेली बोट, एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, कुणी अथांग समुद्राचे फोटो घेण्यात मग्न, तर कुणी सेल्फी काढण्यात दंग अशातच एक मोठा आवाज होतो, काय होते ते कळत नाही, अचानक बोट एका खडकावर जाऊन आदळते. बोटीत पाणी शिरू लागते, सगळ्यांना लाईफ जॅकेट घालण्याचा इशारा देण्यात होतो. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला, समुद्र बोटीला हळुहळू आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करीत असताना प्रत्येक जण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, बाहेर जाणार तरी कुठे अशी परिस्थिती. या परिस्थितीतून बाहेर पडलेल्या उदय आहेर यांचे हे उद्गार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शिवसंग्राम युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष उदय आहेर हे या घटनेचे साक्षीदार आहेत. राज्य सरकार निर्माण करीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या पायाभरणी शुभारंभासाठी आम्ही दुपारी ३.३० वाजता निघालो. अचानक खडकावर बोट आदळली आणि बोटीत पाणी शिरले. या धोक्याची कल्पना सर्वांना आल्याने एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मदत वेळेवर पोहचली, दैव बलवत्तर होते म्हणून वाचलो, नाहीतर काही खरे नव्हते, असे आहेर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक स्मारकाच्या पायाभरणी समारंभास उपस्थित रहाण्यासाठी मी व माझे काही सहकारी मुंबईला गेलो होतो. शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि आम्ही काही कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाहून पायाभरणीच्या ठिकाणी जात होतो. बोटीची क्षमता २० माणसांची होती, तरीही त्यात २५ माणसे भरण्यात आली. सुरुवातीपासूनच बोटीचा स्पीड भयानक होता. प्रत्येक जण जीव मुठीत धरून बसला होता. मनात शंकेची पाल चुकचुकली. काही कळण्याच्या आत बोट खडकावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरात होती की, बोटीत लगेचच पाणी शिरू लागले. या सर्वांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सिद्धेश पवारने बादलीने पाणी बाहेर काढण्यास सुरुवात केली. आम्हाला तो धीर देत होता. तुम्ही काळजी करू नका, असे सतत ओरडून सांगत होता. जितक्या वेगाने पाणी आत येत होते. तितक्या वेगाने तो पाणी बाहेर फेकत होता. मात्र, एका क्षणाला पाण्याची मोठी लाट आली आणि बोट उलटली त्यात सिद्धेश पवार बेपत्ता झाला.

अन् मिळाली मदत

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्रीनाथ जाधव आमच्यासोबत होते. त्यांनी 'शेकाप'चे आमदार जयंत पाटील यांनी फोन करून माहिती कळवली. तोपर्यंत आम्ही प्रत्येक जण मिळेल त्या आधाराला धरून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो. बरोबर ४ वाजून २५ मिनिटांनी आम्हाला मदत मिळाली आणि आमचे प्राण वाचले. दैव बलवत्तर होते म्हणून आज जिवंत आहोत. मात्र, आमचा सिद्धेश पवार गेला याचे दु:ख कायम रहाणार, असे सांगत उदय आहेर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखोई ३० एमकेआय विमान पुन्हा हवाई दलात दाखल

$
0
0

नाशिक:

ओझर येथील हवाई दलाच्या केंद्रात देखभाल आणि दुरुस्ती केलेले सुखोई ३० (एमकेआय) हे लढाऊ विमान शुक्रवारी (२६ ऑक्टोबर) हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले. त्याचा शानदार सोहळा ओझर येथील केंद्रात शुक्रवारी संपन्न झाला.

ओझर येथील हवाई दलाचे केंद्र हे देखभाल आणि दुरुस्तीचे आहे. सुखोई ३० (एमकेआय) या विमानाची निर्मिती ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये केली जाते. तसेच, त्याची देखभाल आणि दुरुस्तीही एचएएलकडेच होते. मात्र, ओझर येथील हवाई दलाच्या केंद्रात प्रथमच सुखोई विमानाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे काम या केंद्रात सुरू होते. अखेर या विमानाचे काम पूर्ण झाले. त्याची पहिली हवाई चाचणी गेल्या २४ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे. ती यशस्वी झाल्याचे ओझर हवाई दल केंद्राचे एअर कमोडोर समीर बोराडे (विशिष्ट सेवा मेडल) यांनी दिली. हे विमान हवाई दलाच्या दक्षिण पश्चिम कमांकडे सूपूर्द करण्यात आले.
हा हस्तांतर सोहळा ओझरच्या केंद्रात शुक्रवारी सकाळी संपन्न झाला. याप्रसंगी हवाई दलाच्या मेन्टेनन्स कमांडचे प्रमुख एयर मार्शल हेमंत शर्मा (अति विशिष्‍ट सेवा मेडल व विशिष्‍ट सेवा मेडल) यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे प्रमुख एयर मार्शल एच एस अरोरा (अति विशिष्‍ट सेवा मेडल) यांच्याकडे विमानाची कागदपत्रे सुपूर्द केली. याप्रसंगी हवाई दलाच्या बँड पथकाने सलामी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखोईची भीती वाटत नाही

$
0
0

सुखरूप बचावलेल्या पायलट आणि इंजिनीअरची प्रतिक्रिया

...

bhavesh.brahmankar@timesgroup.com

@BhaveshBMT

नाशिक : सुखोई कोसळले त्या घटनेतून आम्ही बचावलो. असा क्षण कुणाच्याही आयुष्यात येऊ नये. पण, या घटनेमुळे आम्हाला सुखोई विमानाची भीती वाटत नाही. अजूनही आम्ही पहिल्याच जोमाने काम करीत आहोत, असा ठाम विश्वास वैमानिक विंग कमांडर प्रशांत नायर आणि विमान चाचणी इंजिनीअर स्वॉड्रन लिडर एल बिस्वाल यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.

ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या कारखान्यात तयार झालेले सुखोई ३० (एमकेआय) या विमानाची अखेरची हवाई चाचणी २७ जून रोजी घेतली जात होती. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हे विमान ओझरच्या धावपट्टीवरून हवेत झेपावले. काही फेऱ्या मारल्यानंतर अचानक या विमानात मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिक विंग कमांडर प्रशांत नायर आणि विमान चाचणी इंजिनीअर स्वॉड्रन लिडर एल बिस्वाल यांच्या निदर्शनास आले. त्याचक्षणी त्यांनी आपत्कालीन बटण बादले. दोन्ही जण पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर सुखरूप आले पण, विमान मात्र शेतात जाऊन कोसळले आणि जळून खाक झाले. या घटनेत बचावलेले नायर आणि बिस्वाल हे दोन्ही शुक्रवारी झालेल्या सुखोईच्या सोहळ्यास उपस्थित होते.

'त्या घटनेविषयी आम्ही फार काही बोलणार नाही. पण प्रत्येक प्रसंग आपल्याला खूप काही शिकवत असतो. आजही मी तितक्याच ताकदीने आणि धैर्याने सुखोई विमानाचे सारथ्य करतो, असे नायर यांनी सांगितले. तब्बल १४ हजार तास सुखोई चालविण्याचा अनुभव नायर यांच्याकडे आहे. सुखोई हे अतिशय आधुनिक विमान आहे. त्याचे सारथ्य करताना दिवसेंदिवस वेगळाच अनुभव मिळतो, असे ते म्हणाले.

...

सुखाई अपघाताची घटना दुर्दैवी

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमधून मी सेवानिवृत्त झाले असलो तरी सुखोई विमानावर विशेष प्रेम आहे. आजही विविध प्रकारच्या चाचण्यांवेळी मी मदत करतो. माझ्या अनुभवाचा देशाला फायदा होतो याचा विशेष आनंद आहे. तसेच, सुखोई हे आधुनिक पिढीचे विमान आहे. त्याच्यामुळेच आपले हवाई दल बलशाली आहे. सुखोई कोसळले ते दुर्दैव होते. पण, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आजही अतिशय सुरक्षित आणि सक्षम असे लढाऊ विमान म्हणून सुखोईच आहे, असे बिस्वाल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images