Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्टेट बँकेच्या व्यवहाराने त्रस्त

$
0
0

अरुण गंगेले, मटा वाचक

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कोणत्याही बँकेत मुदत ठेव असेल, तर मार्च महिन्याच्या अखेरीस '१५ एच' हा अर्ज खातेधारकाला भरणे अनिवार्य असते. जर खातेधारकाने किंवा मुदत ठेवीदाराने हा अर्ज भरला नसेल, तर बँक एकूण व्याजावरील प्राप्तीकर त्या ठेवीदाराकडून वसूल करते, असा नियम आहे. त्यामुळे या नियमानुसार मी निफाड तालुक्यातील लासलगाव येथील मुख्य स्टेट बँकेत हा अर्ज भरला आहे. माझे वय ७३ वर्षे असून, स्टेट बँकेत असणाऱ्या मुदत ठेवीवर एका वर्षाला ७० हजार रुपयांचे व्याज मला मिळते. १५ एच हा अर्ज भरुनसुद्धा २०१७ पासून माझ्या ठेवीवर १३ हजार रुपयांचा प्राप्तीकर घेण्यात आला आहे. २०१८ मध्येही ४५० रुपये बँकेने वसूल केले. यासंदर्भात मुख्य बँक व्यवस्थापक यांच्यासोबत अनेकदा पत्रव्यवहार करून झाला. तरीही याकडे कोणतेही बँक अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे स्टेट बँकेत होत असलेल्या चुकीच्या व्यवहारांनी आम्ही ज्येष्ठ नागरिक त्रस्त झालो असून, बँक प्रशासनाने योग्य मार्गदर्शन आणि समस्यांचे निवारण करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उच्चविद्या विभूषितांचा रंगला मेळावा

$
0
0

फोटो - सतीश काळे

लोगो - सोशल कनेक्ट

उच्चविद्या विभूषितांचा रंगला मेळावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डिप्लोमा ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विवाह इच्छुक वधू-वरांनी संस्कारवाणी युवक मित्र मंडळाच्या उच्चविद्या विभूषितांचा उपवधू-वर मेळाव्यास हजेरी लावली. मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्याचे यंदा १३ वे पर्व होते. कालिदास कलामंदिरात रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत या मेळावा झाला.

मेळाव्यात सुमारे दोनशेहून अधिक वधू-वरांनी हजेरी लावत, लग्नाची रेशीमगाठ पक्की करण्यासाठी जीवनसाथीचा शोध घेतला. डिप्लोमा, इंजिनिअरिंग, फार्मसी यासह सर्व विद्याशाखांतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले वधू-वर या मेळाव्यात सहभागी झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विनोद कोठावदे यांनी उमेदवारांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उमेदवारांनी व्यासपीठावरून आपला अल्प परिचय करुन देत, जोडीदारासाठी अपेक्षा सांगितल्या. अगदी पारंपरिक पद्धतीने हा वधू-वर मेळावा दिवसभर रंगला. मंडळाचे सचिव समीर मालपुरे, वधू-वर मेळावा समिती प्रमुख चेतन येवला, मयूर दशपुते यांसह इतर पदाधिकारी व सदस्यांनी मेळाव्याचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीअर बारविरोधात ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

पखाल रोडवरील बीअर बार बंद करण्याच्या मागणीसाठी सोसायटीतील महिलांनी मुलाबाळांसह पाऊण तास ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी झाले. बार मालकाला एक दिवसाची मुदत देण्यात आली असून, ते बंद न केल्यास आज सोमवारी (दि. १०) दुकानास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक-पुणे मार्गावरील खोडेनगर येथील पखालरोडवरील रुंग्ठा कॅसल अपार्टमेंटच्या आवारात बीअरच्या दुकानदाराने आता बीअर बारदेखील सुरू केल्याने सोसायटीच्या सभासदांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी सोसायटीचे पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासन, नगरसेवक, महापालिका आयुक्त आदींकडे केली आहे. मुंबईनाका पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे. कारवाई केली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

परवानगी नाही

सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, बिल्डरने या सोसायटीच्या सभासदांशी करार करताना कोणत्याही परिस्थितीत इमारतीमध्ये मद्याच्या दुकानाला परवानगी देण्यात येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. तरीही बीअर बार कसा सुरू झाला, असा प्रश्न सभासदांनी उपस्थित केला. नगरविकास खात्याकडेही सोसायटी सभासदांनी चौकशी केली असता रहिवाशी भागात दारूचे दुकान किंवा बीअर बार परवानगीशिवाय सुरू करता येत नाही असे सांगण्यात आले. या बीअर विक्रेत्याने सोसायटीला न कळवता, सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच बीअरबार सुरू केला आहे. सर्व फ्लॅटधारकांनी त्याला तीव्र हरकत घेतली आहे.

बारमालक म्हणतो, पोलिस खिशात

सभासदांनी जाब विचारला असता बीअर बार मालकाने आपण सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याचा दावा करून बीअरबार सुरूच ठेवणार असल्याचे ठणकावून सांगितले. त्याने दादागिरी करीत पोलिस माझ्या खिशात आहेत, तुम्हाला जामीनही मिळू देणार नाही, अशी भाषा वापरली. गंभीर बाब अशी की, या दुकानदाराने बीअर बार सुरू करण्यासाठी सोसायटीच्या इमारतीच्या मूलभूत सांगाड्याला धोका होईल, असे बांधकाम केले आहे. भविष्यात त्यामुळे मोठी दुर्घटना घडून रहिवाशांचे जीवही जाऊ शकतात. सोसायटीच्या आवारात बीअर बार सुरू केल्याने महिलावर्गाला मद्यपींचा त्रास होत आहे. लहान मुलांवर चुकीचे संस्कार होत आहेत. बीअर बार मालकावर तातडीने कारवाई करावी, बार बंद करावे या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त, मुंबईनाका पोलिस ठाणे, एक्साईज ऑफिस, नगरसेवक सतीश कुलकर्णी यांना देण्यात आले आहे. परंतु, अद्याप कारवाई झालेली नाही. अखेर शनिवारी महिलांनी मुलाबाळांसह पाऊण तास ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

दारूबंदी आंदोलनाचे पाठबळ

महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना एकजुटीची शपथ दिली. कदम म्हणाले की, बिल्डरने दारू, बीअर बार, बीअर शॉपी सुरू करता येणार नाही, असे करारनाम्यात लिहून दिले. त्याच्यावर विश्वास ठेऊन सभासदांनी फ्लॅट विकत घेतले. या सभासदांना त्रास होत असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. महिलांच्या सुरक्षेचा व मुलांच्या संस्काराचा प्रश्न आहे. वातावण बिघडलेले आहे. त्यामुळे बीअरबार बंद करावा, अन्यथा सोमवारी टाळे ठोकण्यात येईल. प्रशासन कारवाई करीत नसल्याने सोसायटीत बीअर बार असल्याची राज्यात सात ते आठ हजार प्रकरणे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एड्स जनाजागृती रॅली

$
0
0

एड्स जनाजागृती रॅली

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

जागतिक एड्स सप्ताहाच्या निमित्ताने एचआयव्ही एड्स या आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि जेडीसी बिटको हॉस्पिटलच्यावतीने वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात प्रभाग सभापती पंडित आवारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. याप्रसंगी नगरसेवक रमेश धोंगडे, बिटको रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा पाटील,डॉ. नितीन रावते आदी उपस्थित होते.

या रॅलीत के. जे. मेहता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, गोखले एजुकेशन सोसायटीचे नर्सिंग कॉलेज व साई केअर नर्सिंग कॉलेजमधील सुमारे २२० विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. आयसीटीसीतील समुपदेशक संदूप चव्हाण यांनी एचआयव्ही एड्स या आजाराबाबत प्राथमिक माहिती व आयसीटीसीच्या दैनंदिन कार्याची माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या नो युवर स्टेट्स या संकल्पनेची सविस्तर माहिती यावेळी डॉ. सुषमा पाटील यांनी दिली. सूत्रसंचालन तानाजी इंगळे यांनी केले. रॅली पालिका विभागीय कार्यालय, सत्कार पॉईंट, सुभाषरोड, बसस्थानक, शिवाजी पुतळा व बिटको चौक मार्गे पुन्हा विभागीय कार्यालय येथे आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट है जरूरी, ना समझो इसे मजबुरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने पुढे असलेल्या ट्रकला धडक दिल्याने दोघा युवकांचा करुण अंत झाला. अमृतधाम चौफुलीजवळ झालेल्या घटनेने आडगाव सुन्न झाले. शहरात दुचाकीचालकांचा रस्ते अपघातांमध्ये होणारा मृत्यू हा विषय यामुळे चर्चेत आला असून, हेल्मेटचा वापर केला असता तर अपघाताची तीव्रता कमी झाली असती, अशी चर्चा सुरू आहे. या वर्षी शहरातील किमान ११२ दुचाकीस्वारांचा हेल्मेट नसल्याने मृत्यू झाला असून, हेल्मेट वापरण्यास विरोध करणाऱ्यांनी हा आकडा लक्षात घ्यावा, अशी चर्चा आज दिवसभर सोशल मीडियावर सुरू होती.

अमृतधाम चौफुली येथे शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात चालक सागर शेजवळ (२४) आणि संदीप सुरेश गवारे (३०, रा. ग्रामीण पोलिस मुख्यालय, आडगाव) या दोघांचा मृत्यू झाला. युवकाच्या ताब्यातील नव्या कोऱ्या रेसर दुचाकीने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की एका दुचाकीस्वाराचे शीर धडावेगळे झाले. दुसऱ्यालाही डोक्यास मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अमृतधाम चौफुली येथे अपघात होणे नवीन नाही. हायवेचे रुंदीकरण झाल्यानंतर येथे सुरू झालेली अपघातांची मालिका अद्याप थांबलेली नाही. याचमुळे येथे उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू करण्यात आले. येथील वाहतूक कोंडी व अपघातासारख्या समस्या कमी व्हाव्यात, म्हणून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहनदेखील केले. मात्र, या आवाहनाला वाहनचालक वाटाण्याच्या अक्षता लावतात. शनिवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे आडगाव सुन्न असून, हेल्मेट वापरण्यास विरोध करणाऱ्यांबाबत विविध सोशल मीडियावर याबाबत चर्चा झडत आहे.

११२ दुचाकीस्वारांचा हेल्मेटअभावी मृत्यू

शहरात या वर्षी ११५ दुचाकीस्वारांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी तब्बल ११२ दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. एक छोटेसे साधन जीवन मृत्यूतील अंतर नक्कीच कमी करू शकले असते. पोलिसांच्या मते, या ११२ पैकी हेल्मेटमुळे किमान १०० व्यक्तींना जीवदान मिळू शकले असते. पण, तसे झाले नाही. चारचाकी वाहनचालकसुद्धा सीटबेल्ट वापराकडे दुर्लक्ष करतात. यंदा १२ चारचाकी वाहनचालकांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यापैकी एकानेही सीटबेल्टचा वापर केलेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा होणार सुरक्षित, पर्यावरणस्नेही

$
0
0

शुभवार्ता

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकमध्ये लवकरच सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रिक्षा-टॅक्सी सेवा मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) नाशिकचे अधिकारी नितीन मुंडावरे यांनी आपल्या व्यवस्थापकीय संचालकांना तसा प्रस्ताव पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा नाशिकमध्ये सुरू होईल. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत कार्यवाहीच्या सूचना आधीच दिलेल्या आहेत.

नाशिकरोड रेल्वेस्टेशनवरील प्री-पेड रिक्षा व टॅक्सीचालकांना ही सेवा प्रथम लागू करण्यात येईल. नंतर अन्य चालकांना लागू होईल, अशी माहिती प्रीपेड सेवा देणाऱ्या भारतरत्न मागासवर्गीय सहकारी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश मोहिते यांनी दिली. या योजनेत सहभागी झालेल्या रिक्षा व टॅक्सीचालकांचा डाटा प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या सूचनेनुसार प्रीपेड सेवेच्या केबिनमध्ये उपलब्ध झाला आहे. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक वांबळे यांनी ही कागदपत्रे तपासून वाहतुकीचे स्टीकर देण्याचे मान्य केले आहे. नाशिकमध्ये रिक्षाचालकाने प्रवाशाशी गैरवर्तणूक केल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि पर्यावरणपूरक टॅक्सी-रिक्षा सेवेला महत्त्व आले आहे.

या उपक्रमांतर्गत रिक्षा आणि टॅक्सीच्या सीटमागे डस्टबीन ठेवण्यात येईल. प्रवाशांनी बिस्कीट वेफर्स, केळी आदी खाल्ल्यानंतर कचरा रस्त्यावर न फेकता डस्टबीनमध्ये टाकण्यात येईल. त्यामुळे पर्यावरण रक्षण आणि स्वच्छता हे हेतू साध्य होतील. अपघातही टळतील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकाच्या सीटमागे चालकाच्या फोटोसह परमिट, लायसन्स, बॅच नंबर आणि रिक्षाचा नंबर लावण्यात येईल. तसेच आरटीओ, रेल्वे पोलिस, नाशिक पोलिस आणि भारतरत्न मागासवर्गीय सहकारी संस्था यांच्या हेल्पलाइन फोन नंबरचे स्टीकर लावण्यात येईल, अशी माहिती मोहिते यांनी दिली.

शहरात प्रीपेड टॅक्सी

नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्रीपेड टॅक्सीसेवेला एक महिनापूर्ण झाल्याची माहिती मोहिते यांनी दिली. सध्या ३५ टॅक्सीचालक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. याशिवाय नाशिक शहरातही प्रीपेड टॅक्सीसेवा सुरू केली जाणार आहे. तसा प्रस्ताव आरटीओला देण्यात आला आहे. आरटीओने भाडे दर निश्चित केल्यानंतर ही सेवा शहरात सुरू केली जाईल. संस्थेने २६ नोव्हेंबरपासून प्रीपेड नाशिक नावाने फेसबुक पेज सुरू झाले असून देशविदेशातून नाशिकला येणाऱ्या पर्यटक, भाविकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रीपेडचे बुकिंग संस्थेच्या या फेसबुक पेजवरूनच केले जाते. त्र्यंबकेश्वर, मांगीतुंगी, सापुतारा येथे जाण्यासाठी काही प्रवाशांनी अशा पद्धतीने नुकतेच बुकिंग केले. या सेवेसाठी संस्था प्रत्येक रिक्षा-टॅक्सीमागे फक्त पाच रुपये शुल्क आकारते. भाड्याचे पैसे चालकाला मिळतात.

प्रीपेड रिक्षा जोमात

नाशिकरोड रेल्वेस्टेशनमधून प्रीपेड रिक्षासेवा सुरू झाल्यानंतर तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रीपेड रिक्षासाठी एकूण ७० पॉइंट आहेत. त्यामध्ये मुक्त विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ, सीबीएस, आर्टिलरी सेंटर, एचएएल विमानतळ, आनंदवली, गंगापूररोड, पळसे, सिन्नर आदींचा समावेश आहे. प्रीपेड सेवेसाठी सध्या स्टेशनमध्ये पत्र्याची केबिन आहे. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी एमटीडीसीमार्फत आकर्षक केबिन करून देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या रिक्षाचालकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच त्यांची नोंदणी या प्रीपेड सेवेमार्फत भाडे उपलब्ध केले जाईल.

उधारीवर इंधन

नाशिकरोड रेल्वेस्टेशनच्या प्रीपेड टॅक्सी व रिक्षा सेवा उपक्रमात नोंदणी केलेल्या चालकांना अनेकदा रात्री-अपरात्री इंधनाची गरज भासते. जवळ पैसे नसल्याने समस्या येते. अशावेळी त्यांना उधारीवर इंधन मिळावे म्हणून आमच्या संस्थेने एस्सार ऑईल कंपनीशी करार केल्याची माहिती मोहिते यांनी दिली. एस्सारच्या पंपांवर या चालकांना उधारीवर इंधन भरता येईल. प्रीपेड रिक्षा व टॅक्सीचा वापर सुरक्षित असल्याने पर्यटक व भाविकांचा ओढा वाढत आहे. एमटीडीसी मान्यताप्राप्त हॉटेलमधील पर्यटक, भाविकांनी प्रीपेड सेवेचाच आधार घ्यावा, असा सल्ला हॉटेलचालक देत असल्याचे मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवेवर लुटमार करणारी टोळी अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सापुतरा-नाशिक हायवेवर प्रवाशांना अडवून लूट करणाऱ्या टोळीस ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) शनिवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून दुचाकी तसेच, इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

कल्पेश बाबुराव वाघमारे (वय १८, रा. पळसेत, ता. सुरगाणा), धर्मराज काशिनाथ गायकवाड (वय २२, रा. शिराटा, ता. सुरगाणा), बाबू थविल (रा. गारमाळ, ता. सुरगाणा) व केशव वारडे (रा. पळसेत, ता. सुरगाणा) अशी या प्रकरणी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातील भदर गावातील रहिवासी सुभाष चिंतामण पवार हे आपल्या दुचाकीवर सुरगाणा येथे जाण्यासाठी निघाले होते. नाशिक ते सापुतारा महामार्गावर घोटूळ गाव शिवारात अज्ञात चार संशियितांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाइल फोन व दुचाकी असा एकूण ३३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणी सुरगाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाने या गुन्हयातील फिर्यादीकडे बारकाईने चौकशी केली. गुन्ह्याच्या कार्यप्रणालीवरून गुन्हेगार हे त्याच परिसरातील असल्याचा अंदाज आल्याने सुरगाणा ते सापुतारा महामार्गावर संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. काही संशयित हतगड परिसरात गुन्ह्यातील लुटमार करून नेलेली दुचाकी नंबरप्लेट काढून वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हतगड शिवारात रात्रभर सापळा लावून संशयित वाघमारेसह गायकवाडला अटक केली. त्यांनी बाबू थविल व केशव वारडे या दोन साथिदारांची नावे सांगितली. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, रामभाऊ मुंढे, संजय पाटील, पोहवा हनुमंत महाले, प्रकाश तुपलोंढे, जे. के. सूर्यवंशी, संदीप शिरोळे, कैलास देखमुख, वसंत खांडवी, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, रमेश काकडे व चौधरी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवाचा जन्म कर्मावर आधारित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मानवाचा पुढील जन्म हा त्याच्या कर्मावर आधारित आहे. मिळालेल्या जन्मात चांगले कर्म केले तर चांगला जन्म मिळेल. कुकर्म केले तर त्याचे फळ वाईटच मिळेल. मानवाचे शरीर हे सत्व, तम, रज गुणांनी भरलेले आहे. त्याचा वापर कोण कसा करतो यावर पुढील जीवन अवलंबून असेल.' असे प्रतिपादन श्रृतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले. शंकराचार्य न्यास व शिवशक्ती ज्ञानपीठ त्र्यंबकेश्वर यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यास संकुलात ही व्याख्यानमाला आयोजित केली होती. 'मृत्यू आणि पुर्नजन्माचे रहस्य' हा व्याख्यानमालेचा विषय होता. रविवारी व्याख्यानमालेचा शेवटचे पुष्प गुंफताना स्वामीजी म्हणाले,'कोणताही जीव वर्तमान शरीर सोडत असताना जन्माच्या वेळी जसा शरीरात प्रवेश करतो. शरीराशी एकरुप होऊन हे माझं शरीर आहे असे समजून व्यवहार करतो. मृत्यूनंतर देखील त्याच भावनेने शरीर सोडतो. मृत्यूनंतर मानवाचे शरीर हे पार्थिव असल्याचे मानले जाते. ज्या शरीराराची निर्मिती पंच महाभुतांनी झाला आहे. त्या पंच महाभुतांमध्ये विलीन होते म्हणजेच या पृथ्वीला जाऊन मिळते. या भुतलावर अनेक नद्या उगम पावतात अनेक भागातून विहार करीत त्या शेवटी सागराला मिळतात. सागराला मिळाल्यानंतर त्यांचे अस्तित्व नष्ट होते. प्रत्येकाने जीवन जगताना आनंदाचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या अंतकरणात आनंद आहे. फक्त त्याची अनुभूती येणे आवश्यक आहे. काही लोकांना सिद्धी प्राप्त होते त्यांना सिद्ध पुरुष म्हटले जाते; मात्र जीवनाचे साध्य केले आहे त्याला सिद्ध पुरुष म्हणायला पाहिजे.'

व्याख्यानमालेची सुरुवात न्यासाचे कार्यवाह प्रमोद भार्गवे यांच्या हस्ते स्वामीजींच्या सत्काराने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ मोगल यांनी केले. व्याख्यानाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहन विम्यासाठी बनावट वेबसाईट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहनांचे बनावट वाहन विमा प्रमाणपत्र तयार करून देण्याचे प्रकरण गंभीर झाले असून, पोलिसांच्या चौकशीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या आवारातच मोठा घोटाळा केल्याचे समोर येते आहे. बनावट विमा तयार करणाऱ्या एजंटने थेट तीन कंपन्यांच्या वेब तयार करून घेतल्याची गंभीर बाबही यानिमित्ताने समोर आली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून, असे अनेक कारनामे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

कैलास संताजी गायकवाड (वय ३३, श्रीधर कॉलनी, मेहरधाम) आणि आशिश मधुकर काळे (वय ३१, दुर्गानगर, आरटीओ ऑफिस, पेठरोड) असे नव्याने अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पंचवटी पोलिसांनी यापूर्वीच अन्य चौघांना अटक केली असून, कोर्टाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. यातील कैलास गायकवाड हा संशयित काही वर्षांपर्यंत आरटीओ कार्यालयात खासगी मदतनीस म्हणून कामाला होता. मात्र, नंतर त्याची सेवा खंडित करण्यात आली. आरटीओतील खडानखडा माहिती असलेल्या गायकवाडने बनावट विमा तयार करून देण्याची सुरुवात केली. यासाठी त्याने त्याच्या मेलमध्ये एक एक्सल सीट तयार करून ठेवली होती. ग्राहक आल्यानंतर फक्त नाव बदलून तो प्रिंट काढून देत होता. मात्र, कंपन्यांनी विमा पॉलिसीचे बनावटीकरण थांबविण्यासाठी त्यावर क्यूआरकोड टाकला. हा क्यूआर कोड स्कॅन केला की आरटीओ अधिकाऱ्यांना सर्व माहिती झटक्यात मिळते. त्यामुळे गायकवाडसमोर समस्या निर्माण झाली. दहावी नापास आणि अर्धवट एमएससीयाटीचा कोर्स करणाऱ्या गायकवाडने पुढे आशिश काळे या वेब होस्टिंगचे काम करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला. काळेची गंगापूर नाका परिसरात मोठी फर्म असून, त्यात किमान ४० व्यक्ती काम करतात, अशी माहिती तपासाधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे यांनी दिली. काळेने कोणतीही खातरजमा न करता आयसीआयसीआय लोबांर्ड, भारती अॅक्सा आणि बजाज अलायन्स या तीन कंपन्याच्या वेबसाईट तयार करून दिल्या. वास्तविक पुढे या वेबसाईचा काय वापर होणार याकडे काळेने लक्ष दिले नाही. गायकवाडने तयार केलेल्या बनावट विम्यावरील बनावट क्यूआर कोड आरटीओ स्कॅन केला की काळेने तयार करून दिलेल्या वेबसाईट ओपन होत होत्या. याच गायकवाडकडून तयार केलेल्या विमा प्रमाणपत्रामुळे आतापर्यंतचे चित्र स्पष्ट झालेले असल्याचे गिरमे यांनी स्पष्ट केले. या दोघांना कोर्टाने १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

...

शाळेचा बनावट दाखला देणे असो की वाहन विम्याचे प्रमाणपत्र असे अनेक प्रकार या चौकशीमुळे समोर आले आहेत. यापूर्वी अटक केलेल्या संशयितांकडून अनेक सरकारी विभागांचे रबरी स्टॅम्प जप्त करण्यात आले होते. आता बनावट वेबसाईटचा प्रकार समोर आला आहे. गुन्ह्याचा अगदी बारकाईने तपास सुरू आहे.

- मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायन क्लब ऑफ नाशिक सुप्रीम तर्फे ब्लँकेट वाटप

$
0
0

नवजात शिशुंना कपडे वाटप

नाशिक : लायन क्लब ऑफ नाशिक सुप्रीमतर्फे नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात शिशूसाठी लोकरीचे कपडे तसेच त्यांच्या आईसाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास लायन बिना झा व कैलास हांडा यांनी देणगी दिली. या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी तसेच लायन क्लबतर्फे अध्यक्ष बाजीराव पाटील, खजिनदार प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व मातांनी या थंडीत बाळाला मिळालेल्या कपड्यांचे समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवदीपावलीचा कार्यक्रम साजरा

$
0
0

देवदीपावलीचा कार्यक्रम साजरा

नाशिक : नारायणकाका ढेकणे यांच्या लोकनाथतीर्थ स्वामी महाराज आश्रमात देवदीपावलीचा कार्यक्रम उत्साहात झाला. यानिमित्ताने जळगावचे ऍक्युप्रेशरतज्ज्ञ डॉ. अविनाश सोनगीरकर यांचे शिबिर झाले. तसेच जनकल्याण रक्तपेढीतर्फे रक्तदानाचा कार्यक्रम झाला. साधकांप्रमाणे नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला प्रभुणे महाराज, राखे गुरुजी, कायदेतज्ज्ञ एस. एल. देशपांडे आणि साधक उपस्थित होते.

---

अस्थिघनता शिबिराचे आयोजन

इंडियन रेडक्रॉस सोसायटी नाशिकतर्फे मंगळवारी (११ डिसेंबर) अस्थिघनता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रेडक्रॉस बिल्डिंग येथे सकाळी १० ते १२ या वेळेत हे शिबिर होईल. शिबिरात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत भुतडा मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरतनाट्यमने फेडले डोळ्यांचे पारणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नृत्य हे संवादाचे माध्यम ठरू शकते का याचे उत्तर निश्चित हो असे येईल. केवळ संवाद नव्हे तर थेट रसिकांच्या हृदयाला भिडणारा प्रभावी संवाद नृत्य साधते याची प्रचिती नाशिककर रसिकांना रविवारी सृजनोत्सवातून आली.

सृजन नृत्य विद्यालय व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान यांच्या वतीने परशुराम सायखेडकर नाट्यगृहात रेषा एज्युकेशन सेंटरच्या सौजन्याने सृजनोत्सव-२०१८ चे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे नववे वर्ष होते. प्रारंभी नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव, लता पाटील, हेमलता कांडेकर, स्वाती भामरे आणि पेंग्विन अॅकॅडमीच्या संचालक ज्योती कटाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सृजनोत्सवचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर भरतनाट्यमला सुरूवात झाली. सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि सृजन नृत्य विद्यालयाच्या संचालिका शिल्पा देशमुख यांच्या विद्यार्थिनींनी गणेशवंदनेने भरतनाट्यमला सुरुवात केली. अलारिपु, पुष्पांजली, माखनचोरी, सरस्वती कौतुकम, किर्तनम, पदम यांसारख्या रचनांवर नृत्य करीत विद्यार्थिनींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

त्यानंतर श्री अरविंद घोष यांच्या कवितांवर नृत्य सादर करण्यात आले. संकल्पना व नृत्य संरचना पुण्यातील अंजली बागल यांची होती. बागल यांच्या विद्यार्थिनींनी अरविंद घोष यांच्या कवितेतील एकेक ओळ नृत्याविष्काराच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविली. परंपरा व नवता यांचा सुंदर मेळ घालत नृत्य सादर करण्यात आला. रसिकांनी देखील या कलावंतांच्या कलेला हृदयापासून दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अर्चना कुलकर्णी, प्रीतम नाकील आदींनी परिश्रम घेतले.

-

सभागृहासाठी पाठपुरावा करू

शहरातील कलावंतांना सराव करता यावा याकरीता कायमस्वरुपी सभागृहाची आवश्यकता आहे. हे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडे निश्चितच पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी नगरसेविका डॉ. भालेराव यांनी दिली. तर कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावा याकरीताच सीएम चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरासह जिल्हाभरातील कलावंतांनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे आवाहन नगरसेविका भामरे यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांसाठी होणार अतिरिक्त निधी उपलब्ध

$
0
0

जिल्ह्याच्या चालू आर्थिक वर्षाचा आराखडा : ९१८ कोटी

सर्वसाधारण उपयोजनांसाठी राखीव निधी : ३३८.८० कोटी

आदिवासी उपयोजनांसाठी राखीव निधी : ४८१.५९ कोटी

अनुसूचित जाती उपयोजनांसाठी राखीव निधी : ९७.५५ कोटी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन विभागाने २०१९-२० साठी तिन्ही उपयोजनांकरिता आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. आदिवासी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थेट करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्यामुळे पुढील वर्षीच्या आदिवासी उपयोजनांच्या प्रस्तावित आराखड्यात सुमारे ७५ कोटी रुपयांच्या निधीला कात्री लावण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत. मात्र तिन्ही योजनांच्या एकूण आराखड्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याने विकासकामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होऊ शकणार आहे.

जिल्ह्याच्या चालू आर्थिक वर्षाचा आराखडा ९१८ कोटी रुपयांचा असून, सर्वसाधारण उपयोजनांसाठी यंदा ३३८.८० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. आदिवासी उपयोजनांसाठी ४८१.५९ कोटींचा, तर अनुसूचित जाती उपयोजनांसाठी ९७.५५ कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. सरकारने आदिवासी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थेट करण्याचा निर्णय घेतला असून, आराखडा तयार करतेवेळी त्यामध्ये वेतनाची रक्कम समाविष्ट करू नये, असे निर्देश जिल्हा प्रशासनांना दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या आदिवासी उपयोजनांमधील निधी सुमारे ७५ कोटी रुपयांनी घटणार आहे. परंतु, आराखड्यातील एकूण प्रस्तावित रकमेला धक्का लागणार नसल्याने जिल्ह्यातील विकासकामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिकी

$
0
0

लोगो : सांस्कृतिकी

---

सोमवार, १० डिसेंबर

नाटक

कार्यक्रम : कामगार कल्याण नाट्य स्पर्धा

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह, टिळकपथ

वेळ : सायंकाळी ६ वाजता

ठळक विशेष : १० डिसेंबर रोजी बोला, गांधी उत्तर द्या, ११ रोजी एस फॅक्टर, १२ रोजी कळसूत्री, १३ रोजी वैराण, १४ रोजी ऋतु आठवणींचे

---

व्याख्यान

कार्यक्रम : मातोश्री सीताबाई निरगुडे स्मृती व्याख्यानमाला

स्थळ : श्री मोदकेश्वर गणपती मंदिर, मोदकेश्वर कॉलनी, इंदिरानगर

वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

ठळक विशेष : श्री मोदकेश्वर सेवा ट्रस्ट यांच्या सहकार्याने निरगुडे स्मृती व्याख्यानमालेत प्रवचनकार डॉ. उल्हास रत्नपारखी यांचे व्याख्यान. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे जीवन चरित्र व कार्य हा व्याख्यानाचा विषय आहे.

---

महोत्सव

कार्यक्रम : मुक्त विद्यापीठातर्फे इंद्रधनुष्य कला महोत्सव

स्थळ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, गंगापूर गाव

वेळ : सकाळी १० वाजेपासून

ठळक विशेष : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ११ डिसेंबरपर्यंत १६ वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव 'इंद्रधनुष्य - २०१८' होणार आहे. राज्यातील २० विद्यापीठातील ८०० हून अधिक विद्यार्थी कलाकार सहभागी झालेले आहेत. यंदा या महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे.

---

शनिवार १५, रविवार १६ डिसेंबर

चित्रप्रदर्शन

कार्यक्रम : जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक साहित्याचे प्रदर्शन

स्थळ : कुसुमाग्रज स्मारक, विद्याविकास सर्कलजवळ, गंगापूररोड

वेळ : सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते रात्री ८.३०

ठळक विशेष : प्रज्ञापुरुष, तत्त्वज्ञ, विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक साहित्याचे प्रदर्शन दोन दिवस आयोजित करण्यात आले आहे. जे. कृष्णमूर्तींचे निवडक मूळ साहित्य व त्याला अनुरूप असणारी छायाचित्रे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.

---

रविवार, १६ डिसेंबर

संगीत समारोह

कार्यक्रम : पंडित भानुदास पवार स्मृती संगीत समारोह

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह, टिळकपथ

वेळ : सायंकाळी ६ वाजता

ठळक विशेष : एस डब्लू एस फायनान्शिअल प्रा.लि यांच्यावतीने पवार तबला अकादमी नाशिक आयोजित पंडित भानुदास पवार स्मृती संगीत समारोहात पंडित ग्यानसिंग नामधारी यांचे जोडी पखवाज वादन. सावनी तळवळकर यांचे तबलावादन. संवादिनीवर पुष्कराज भागवत व प्रशांत महाबळ.

---

तुम्हीही झळकू शकता सांस्कृतिकीमध्ये!

आठवडाभरात शहरात सांस्कृतिक क्षेत्रात कोणते कार्यक्रम आहेत यासाठी 'मटा'चा सांस्कृतिकी हा कॉलम आहे. हे कार्यक्रम पाहून वाचकांना आठवडाभराचे नियोजन करणे सहजसोपे व्हावे हा हेतू आहे. कलावंतांनो, तुमच्या कार्यक्रमाची माहिती सांस्कृतिकी या कॉलममध्ये देऊ शकता. त्यासाठी प्रशांत : ९५०३६७७७४० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपल्या कार्यक्रमाची माहिती पाठवावी अथवा कळवावी. आम्ही ती प्रसिद्ध करू.

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळेकरांचा कौल आज ठरणार

$
0
0

धुळ्यात महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान; आज मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट

म. टा. वृत्तसेवा, धुळे
जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. ९) सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून शहरातील ४५० मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी तुरळक दिसत होती. मात्र, दुपारनंतर हळूहळू गर्दी वाढून मतदार घराबाहेर पडलेले दिसत होते. दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले होते. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. सरासरी ६० टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनी दिली.

धुळे महापालिकेच्या निवडणुकीत देवपूर परिसरासह शहरातील सर्व भागातील मतदार केंद्रांवर मतदारांच्या रांगा मतदानासाठी लागल्या होत्या. तर सांयकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांच्याकडून देण्यात आली. या निवडणुकीची मतमोजणी आज (दि. १०) सकाळी दहा वाजेपासून केंद्रीय विद्यालयशेजारील शासकीय धान्य गोडावूनमध्ये होणार आहे. साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व उमेदवारांचे निकान स्पष्ट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या निका लांवर दिग्गज मंत्र्यांसह अनेकांचे भवितव्य ठरणार आहे. महापालिकेत भाजपा विरुद्ध लोकसंग्राम, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी, शिवसेना व अपक्ष यापैकी कोणाच्या पारड्यात धुळेकरांनी कौल दिला आहे, हे आज स्पष्ट होईल.

गेल्या महिन्याभरांपासून धुळे महापालिका निवडणुकीची लगबग सुरू होती. सर्वच राजकीय पक्षांनी आपापली सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे आता आज (दि. १०) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या पूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले. महापालिकेची ही चौथी निवडणूक होती. यांत १९ प्रभागांसाठी ७३ जागांसाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत.

दिग्गजांचे भवितव्य ठरणार
रविवारी (दि. ९) सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी कुटुंबांसह तसेच शहराचे आमदार अनिल गोटे, माजी नगराध्यक्षा हेमा गोटे, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, माजी मंत्री शालिनीताई बोरसे, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, शिवसेनेचे हिलाल माळी, काँग्रेसचे युवराज करणकाळ अदी दिग्गजांनी सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला. शहरातील सर्व नगरसेवक, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनीही मतदानाचा हक्क बजावला. या वेळी प्रत्येक पक्षांकडून विजयाचे दावे करण्यात आले असून, धुळेकरांचा कौल घेण्यात कोण यशस्वी ठरेल यावर अनेक दिग्गजांचे भवितव्य अवलंबून आहे. शहरातील बहुतेक प्रभागांमध्ये तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. मात्र, खरी लढत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी, भाजप व शिवसेनेत आहे. यामध्ये आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामसह अपक्ष उमेदवारांचे आव्हान उभे ठाकल्याने निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झालेली होती.

आमदार गोटेंच्या वाहनांवर दगडफेक
शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या (एमएच १८, एजे ३३६६) या चारचाकीवर शनिवारी (दि. ८) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दोन अज्ञातांनी दुचाकीवरून येत दगडफेक केल्याचा प्रकार घडला. सुदैवाने यावेळी कारमध्ये कोणीही बसले नव्हते. अज्ञातांनी दगड मारल्याने कारची पुढील काच फुटली असून, घटनेनंतर गोटे आपल्या वाहनावर विरोधकांनी हल्ला केल्याचे म्हटले आहे. हा प्रकार झाल्यानंतर गोटेंना अचानक दमाचा त्रास झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पारोळ्याचे शिरोळेंची पोलिसांत तक्रार
पैसे वाटपाच्या संशयावरून पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या कारवर दगडफेक करून हल्ला केल्याप्रकरणी लोकसंग्रामच्या ६ जणांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी पारोळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार शून्य क्रमांकाने देवपूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. त्यात, दि. ६ डिसेंबर रोजी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास शहरातील देवपूर भागात जयहिंद महाविद्यालयाजवळ ते कार (एमएच १९, सीएफ १६१६) ने जात असताना महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी येऊन पैसे वाटप करीत असल्याचा संशय घेऊन माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे, भोला गोसावी, बंटी देवरे, अमोल सूर्यवंशी, आनंदा पाटील, चिलू यांनी कार अडवून दगडफेक केली. तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे कारच्या काचा फुटून नुकसान झाले, असे नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात भाजपला स्पष्ट बहुमत, गोटेंचा धुव्वा

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, धुळे

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपाने दिलेला फिप्टी प्लसचा नारा अखेर खरा ठरला असून ७४ जागांपैकी ५० जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तसेच काँगेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघडीला १४ जागा, शिवसेना २, एमआयएम २, समाजवादी पार्टी २, बसपा १ आणि अपक्ष २ जागांवर विजयी झालेत.

भाजप विरुद्ध आमदार गोटे अशी ही निवडणूक रंगली. पण या निवडणुकीत गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा एकच उमेदवार विजयी झाला. त्याही गोटेंच्या पत्नी हेमा गोटे या प्रभाग ५ मधून निवडून आल्या. तर गोटेंचे पुत्र तेजस गोटे हे थोडया मतांनी पराभूत झालेत. या निवडणुकीतली महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमआयएमने धुळ्यात आपलं खातं उघडलं आहे. एमआयएमने गोटेंच्या लोकसंग्रामला मागे टाकत २ जागा जिंकल्या आहेत.

मतदानाच्या दिवसापर्यंत निवडणूक चुरशी

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे या तिन्ही मंत्र्यांनी महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यामुळे भाजपला धुळे महापालिकेत सत्ता मिळवण्यात यश आलं आहे. पण मनपा निवडणूक प्रभारी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची वर्णी लागल्यापासून आमदार गोटे हे भाजपातील मंत्री महाजन, रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यावर निशाना साधत होते. यामुळे मतदानाच्या दिवसांपर्यंत निवडणूक चुरशीची ठरली. त्यात आता गोटेंच्या लोकसंग्राम पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे गोटे आता काय नवीन खेळी खेळतील याकडे शहरासह जिल्हावासींयाचं लक्ष लागलं आहे.

जनतेनेच गोटेंना जागा दाखवलीः गिरीश महाजन

अनिल गोटेंनी अतिशय खालच्या पातळीवरून भाजप नेत्यांवर आणि मंत्र्यांवर टीका केली. निवडणुकीची सूत्र माझ्या हाती दिल्याने सभेमध्ये गोंधळ घातला. नेत्यांना शिवीगाळ केला. पण गोटेंना जनतेनेच धडा शिकवला. पक्षा पेक्षा आपण मोठे हे दाखवण्याचा गोटेंचा प्रयत्न होता. पण जनतेने त्यांना निवडणुकीत योग्य जागा दाखवली. त्यांचा एकच उमेदवार निवडून आला, असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

गुंडगिरीच्या जीवावर भाजपला यशः गोटे

धुळ्यातील २१ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपैकी ११ अधिकारी जळगावचे होते. भाजपने ईव्हीएमचा घोळ केला. पैशांचा महापूर आणि गुंडगिरीच्या जीवावर भाजपला यश मिळालं, असा आरोप आमदार अनिल गोटेंनी केला आहे. हे गुंड ज्यावेळीस भाजपवर उलटतील तेव्हा त्यांना कळेल. भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा आहे. आपल्या पापावर विजयाचं पांघरूण घालण्याचा भाजचा प्रयत्न आहे, अशी टीका गोटेंनी केली.

महापालिका निवडणुकीचे निकाल

> भाजपा - ५०
> शिवसेना - २
> राष्ट्रवादी - ९
> काँग्रेस - ५
> एमआयएम - २
> समाजवादी पार्टी - २
> बसपा - १
> लोकसंग्राम पक्ष - १
> अपक्ष - २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरित क्षेत्रास ग्रीनसिग्नल?

$
0
0

शेतकऱ्यांसोबत उद्या बैठक; स्मार्ट सिटीकडून टीपी स्कीमचे सादरीकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत मखमलाबाद आणि हनुमानवाडीच्या ७५० एकर क्षेत्रावर नगररचना परियोजना राबविण्याच्या प्रस्तावावरून स्थानिक शेतकरी व काही संचालकांच्या अहमदाबाद दौऱ्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मनधरनीला यश येण्याची शक्यता आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली आणि अहमदाबादचा अभ्यास दौरा केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये योजने संदर्भात मतपरिवर्तन करण्याचे होत असून काही शेतकऱ्यांचा योजनेबोबतचा विरोध मावळत असल्याचे चित्र आहे.

हरित क्षेत्र विकासांतर्गत पंचवटीतील मखमलाबाद व नाशिक शिवारातील हनुमानवाडी साडेसातशे एक क्षेत्रात नगररचना परियोजना राबविण्याचा नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावांतर्गत हा परिसर स्मार्ट सिटी म्हणून विकसित केला जाणार असून जागा मालकांची भागीदारीही यात असणार आहे. मात्र, या प्रस्तावाला जागा मालक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला होता. त्यामुळे कंपनीच्या वतीने २९ व ३० नोव्हेंबर रोजी शेतकरी व संचालकांचा अहमदाबाद दौरा झाला. यावेळी राज्य सरकारची टीपी स्कीम आणि गुजरातमधील टीपी स्कीम अंमलबजावणीत त्रुटी असल्याचे समोर आले होते. गुजरातमध्ये शेतकऱ्यांना मोबदला देतांना ६०:४० चा फॉर्म्यूला वापरला जातो. त्यामुळे हाच फॉर्म्लूला नाशिकमध्येही वापरावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. अहमदाबादच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना या योजने संदर्भातील फायदे-तोटे लक्षात आले असून त्यांचे टीपी स्कीम बद्दलचे मत हळू हळू बदलत आहे.तर कंपनीकडूनही ६०:४० फॉर्म्यला देण्याची तयारी दर्शवली.

शेतकऱ्यांचा मावळता विरोध

मखमलाबाद, हनुमानवाडी शिवारातील टीपी स्कीम योजना तपोवनात पळवली जात असल्याच्या चर्चाही शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या आहेत. सोमवारी या हरितक्षेत्रात बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांनी नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांचीही भेट घेतली आहे. यावेळी हरितक्षेत्रासंदर्भात त्यांचीही चर्चा झाल्याने शेतकऱ्यांचा विरोध मावळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीसोबत पुन्हा बैठक घेण्याची तयारी दर्शवली आहे.

शंकानिरसनासाठी प्रयत्न

शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्नांसदर्भात बुधवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बुधवारी दि. १२) महाकवी कालीदास कलामंदिरात बैठक होणार आहे. यात टीपी स्कीमबाबतचे सादरीकरण केले जाणार असून शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर केल्या जाणार आहेत. त्यामुळे कंपनी आणि शेतकऱ्यांमधील संवाद वाढल्याने याच भागात टीपी स्किम होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

योजनेची पळवापळवी?

सदर योजना मखमलाबाद आणि हनुमानवाडी होणार असली तरी भाजपच्याच एका गटाला ही योजना तपोवन परिसरात राबवायची आहे. त्यामुळे या गटाकडून इथे योजनेला विरोध असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या योजनेचे फायदे-तोटे लक्षात येत असून शेतकऱ्यांचाच अधिक फायदा होणार असल्याचे कंपनीकडून पटवून दिले जात आहे. त्यामुळे ही योजना पळवण्याचा डाव उधळला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी योजनाच होऊ नये यासाठी एक गट पुन्हा जोमाने कामाला लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय पक्षांच्या अनास्थेचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीत इव्हीएम मशिनसह व्हीव्हीपॅटचे काम नेमके चालते कसे, हे समजून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने राजकीय पक्षांना पायघड्या घातल्या असल्या तरी सर्वच 'जागरुक' राजकीय पक्षांनी त्यांच्या या निमंत्रणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानल्याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा आला. अंबड येथे ही मशिनरी मांडून चातकाप्रमाणे राजकीय पदाधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची अवस्था वाट पाहूनी जीव शिणला अशी झाली. त्यामुळे ही मशिन्स पुन्हा सुरक्षित ठिकाणी ठेऊन अधिकारी, कर्मचारी माघारी परतले.

निवडणुकीसाठी वापरलेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन्समध्ये छेडछाड झाल्याचे आरोप विविध राजकीय पक्षांकडून निकालानंतर होतात. या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या कामकाजावरच अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. निवडणूक आयोग किती पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया राबवितो हे राजकीय पक्षांसह सर्वांनाच समजावे आणि तोंडसुख घेण्यासाठी कुणाच्याही हाती आयते कोलीत मिळू नये यासाठी यंदा निवडणूक आयोगानेच अधिक दक्षता घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर अत्यंत पारदर्शी पद्धतीने प्रक्रिया राबविण्याचे निर्देश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. इव्हीएम मशिन्ससह पूर्ण युनिटचे काम कसे चालते याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये ७ डिसेंबरपासून ही निमंत्रणे पाठविण्यात आली. एवढ्यावरच न थांबता राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना इमेलद्वारेही हे निमंत्रण पाठविण्यात आले. विशेष म्हणजे काही राजकीय पक्षांनी त्याबाबतची पोहेचही जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेला दिली.

अशी होती सज्जता

सोमवारी, सकाळी साडेदहापासून इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्स राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना हाताळता येणार होते. इतकेच नव्हे तर मतदान कसे होते याचे प्रात्यक्षिक करून पाहतानाच त्याबाबतच्या शंकांच्या समाधानासाठीची व्यवस्थाही तेथे करण्यात आली होती. दोन तहसीलदारांसह अधिकारी, कर्मचारी तेथे सज्ज होते. राजकीय पक्षांचे पदाधिकारी येणार म्हणून सर्व यंत्रणा तयार होती. सकाळी साडेदहापूर्वीच अंबड येथील अन्नधान्य गोदामाच्या आवारात टेबल मांडण्यात आले. त्यावर इव्हीएम मशिन्स, व्हीव्हीपॅट सज्ज ठेवण्यात आले. दुपारी साडेचारपर्यंत प्रतीक्षा करूनही एकही राजकीय पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता या प्रशिक्षणाकडे फिरकला नसल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली. यापूर्वीही निवडणूक विभागाला अशाच राजकीय अनास्थेचे दर्शन घडले असून तोच कित्ता आताही गिरविला गेल्याने अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज प्रशिक्षण

१५ डिसेंबर ते १५ जानेवारी या महिनाभराच्या कालावधीत १५ पथकांद्वारे इव्हीएम व व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके प्रत्येक तालुक्यात दाखविली जाणार आहेत. तत्पूर्वी प्रातांधिकारी आणि तहसीलदारांना मंगळवारी त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी या प्रशिक्षणाला उपस्थित राहणार आहेत. बुधवारी सात तर गुरूवारी आठ तालुक्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या पथकांना १४ डिसेंबर रोजी मशिनरीचे वाटप करण्यात येणार असून १५ पासून प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोरेन्सिक लॅबचे विस्तारीकरण

$
0
0

शुभवार्ता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फोरेन्सिक लॅब) लवकरच आपले रूपडे बदलणार असून, दीड एकर जागेत सुरू असलेली ही लॅब साडेचार एकर जागेत विस्तारणार आहे. विस्तारीकरण आणि रिक्त पदे भरण्याबाबतचे प्रस्ताव सरकारदरबारी आहेत. यातच धुळे आणि नंदुरबारसाठी धुळे येथे स्वतंत्र युनिट सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या न्याय आणि वैज्ञानिक विभागाचे डायरेक्टर जनरल हेमंत नागराळे यांनी आज, सोमवारी फोरेन्सिक लॅब येथे भेट देऊन याबाबतचा आढावा घेतला. आलेल्या केसचा तत्परतेने होणारा निपटारा, तसेच लॅबच्या एकूण कामकाजाबाबत नागराळे यांनी समाधान व्यक्त केले. याबाबत बोलताना लॅबचे उपसंचालक बी. पी. मोरे यांनी सांगितले, की या भेटीदरम्यान लॅबच्या विस्तारीकरणाबाबत, तसेच रिक्त पदे भरण्याबाबत आढावा घेण्यात आला. लॅबमध्ये महिन्याकाठी सरासरी दोन हजार केसेसमध्ये पाच हजार सॅम्पल येतात. या लॅबमध्ये बायोलॉजी, टॉक्सीकोलॉजी, जनरल अॅनालिटीकल, इन्स्ट्रुमेंटेशन, टेप ऑथेंटिकेशन आणि स्पीकर ऑथेंटिकेशन आदी विभागांचा समावेश होता. यापैकी एक असलेल्या डीएनए विभागासह लॅबच्या विस्तारासाठी आणखी चार एकर जागेची मागणी करण्यात आली असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. ही लॅब महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन केंद्राच्या (मेरी) दीड एकर जागेत काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. नवीन चार एकर जागासुद्धा मेरीकडून मिळणार असून, हा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

लॅबमध्ये उपसंचालक, सहाय्यक संचालक, वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अधीक्षक, लिपीक, चालक, पहारेकरी असे एकूण १२८ पदे आहेत. यापैकी ७१ पदांवर संबंधित व्यक्ती कार्यरत असून, ५७ पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरात लवकर भरली जातील, असे नागराळे यांनी आजच्या आढाव्यानंतर स्पष्ट केले. पोलिसांकडे दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये पुराव्याच्या दृष्टीने संकलित होणाऱ्या घटकांचे परीक्षण या लॅबमध्ये होते. वैज्ञानिक कसोटीवर उतरणारे हे पुरावे पुढे कोर्टात सादर केले जातात.

धुळे, नंदुरबारसाठी स्वतंत्र लॅब

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सॅम्पल याच लॅबमध्ये पाठवण्यात येतात. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांसाठी धुळे येथे एक मिनी लॅब सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. या लॅबमध्ये बायोलॉजी आणि टॉक्सीलॉजी यांचे सॅम्पल तातडीने तपासून देणे यामुळे शक्य होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार

$
0
0

…विदित गुतराथीवरील हल्ला प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनिला (फिलिपिन्स)येथील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेला ग्रॅड मास्टर विदित गुजराथी, अभिजीत कुंटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची फिलिपिन्स सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या दोघांवर हल्ला करणाऱ्यांचा तातडीने तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.

फिलिपिन्सच्या मनिला येथील आशियाई चॅम्पियनशिप हा फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप सायकलचा एक भाग आहे. या स्पर्धेसाठी विदित गुजराथी व अभिजीत कुंटे त्या ठिकाणी गेले असताना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना ज्या हॉटेलमध्ये उतरविण्यात आले होते तेथे इंटरनेटची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. पाणी आणण्यासाठी विदित, अभिजीत कुंटे व त्यांचा एक सहकारी बाहेर गेले असताना काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी या तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र या गुंडांनी त्यांचा पाठलाग करून दमदाटी करण्यास सुरुवात केली. या झटापटीत तीघेही त्यांच्या तावडीतून सुटले आणि हॉटेलला पोहोचले. याची माहिती आयोजकांना दिल्यानंतरही त्यांनी मात्र या प्रकाराबाबत कोणतीही दखल घेतली नाही.

संबंधित हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था देखील निकृष्ठ दर्जाची होती. त्याचप्रमाणे स्वच्छता नसल्याने खेळावर लक्ष केंद्रीत करता येत नव्हते. याबाबत विदीतचे वडील डॉ. संतोश गुजराथी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या दौऱ्याला अनंत अडचणी आल्या. मुंबईहून फिलिपिन्सला जाणारे विमान ९ तास उशिराने पोहचले. त्यामुळे स्पर्धेची तयारी करता आली नाही. सोमवारी त्यांच्या मॅचोस असल्याने बोलणे झाले नाही. रात्री उशिरा बोलणे होईल मात्र हा प्रकार खेदजनक आहे.

या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली असून अनेक खेळाडूंनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

…..

आमच्यावर हल्ला झाला त्याची आयोजकांना माहिती दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे येथे राहण्याची व जेवणाची अत्यंत निकृष्ठ व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाकडे लक्ष केंद्रीत करता येत नाही.

--विदित गुजराथी, ग्रॅँड मास्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images