शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या द्वारका चौकातील वाहतूक बेटाचा आकार कमी केल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार असल्याचा दावा प्रशासनाने केलेला आहे. मात्र, या भागातील अवैध पार्किंग व अतिक्रमण काढल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नसल्याची वस्तुस्थिती आहे.
...तरच ‘द्वारका’ घेईल मोकळा श्वास
↧
↧
रस्ता दुरुस्तीला सुरुवात
द्वारका ते नाशिकरोड रस्ता खराब झाल्याने नागरिकांना रस्त्याने वाहन चालवणे मुष्कील झाले होते. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी अनेक दिवसांपासून नागरिकांनी मागणी केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला सुरुवात केली असून येत्या महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
↧
शिवाजीनगरला विवाहितेची आत्महत्या
शिवाजीनगर येथील अहिल्याबाई होळकर चौकात राहणाऱ्या मनिषा एकनाथ जाधव (वय २६) या विवाहितेने घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. मनिषा ही पती एकनाथ तसेच सासू-सासऱ्यांसह या घरात राहत होती.
↧
पास केंद्र झाले नापास!
उपनगर येथे बस आणि एसटीचा पास देण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे केंद्र म्हणजे छोटीशी टपरीच असून, ती महामार्गाच्या कडेला धुळीत उभी आहे. पास काढण्यासाठी येणारे विद्यार्थी आणि नागरिकांना याठिकाणी रखरखीत उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे.
↧
विभूतीला मुकले नाशिककर
‘विद्वत्ता आणि संतत्व या दोन गुणांचा समन्वय साधणारे अतुलनीय व्यक्तिमत्व बेजन देसाई सरांच्या निमित्ताने नाशिकला मिळाले होते. सामान्यांमध्ये राहणाऱ्या या असामान्य विभुतीला नाशिककर आता मुकले आहेत.
↧
↧
पैसे घ्या त्यानांच लाथा घाला
सिन्नर तालुक्यातील प्रश्न गेल्या पंधरा वर्षापासून आहे तसेच आहेत. या भागात नाशिक-पुणे महामार्गाचा रुंदीकरण होत नाही. तसेच इंडिया बुल्ससाठी रेल्वे येते. मात्र, नागरिकांसाठी रेल्वे नाही. इंडिया बुल्सला या तालुक्यात आणणारे छगन भुजबळ असून, यांचे या निवडणुकीत पैसे घ्या. मात्र, त्यांना लाथ मारा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
↧
नाशिकच्या खेळाडूंचा श्रीलंकेत डंका
बांगलादेशमध्ये झालेल्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकन संघाने टीम इंडियाला पराभूत केल्याने देशभरातील क्रिकेटशौकीन नाराज झाले. मात्र, याचदरम्यान श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या आंतराष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय खेळाडूंनी श्रीलंकेला पाणी पाजले.
↧
उड्डाणपुलाच्या उंचीवरून काम पाडले बंद
मुंबई-आग्रा महामार्गावरील तिसगाव चौफुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्यंत संथगतीने उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, या उड्डाणपुलाची उंची कमी करीत असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी ठेकेदार व इरकॉनच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत काम बंद पाडले.
↧
लांडग्यांनी पाडला काळविटाचा फडशा
येवला तालुक्यातील पूर्व भागात वनक्षेत्र सोडून नागरी वाड्या वस्त्यांकडे धाव घेणाऱ्या हरणांचा कुत्र्यांनी बळी घेण्याच्या घटना ताज्या असतानाच गुरुवारी लांडग्यांनी एका काळविटाचा फडशा पाडल्याची घटना समोर आली.
↧
↧
येवला नगरपालिकेची ८६ टक्के वसुली
गतवर्षी शंभर टक्के वसुली करून विभागात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या येवला नगरपालिकेने यंदाही ८६ टक्के वसुली करून अव्वल स्थान राखले आहे. मार्चअखेर नगरपालिकेने एकूण २ कोटी ९ लाख ८९ हजार ४४० रुपयांची वसुली केली असून करदात्यांच्या विलंबामुळे अतिरिक्त महसूलही प्राप्त झाला आहे.
↧
अमळनेरच्या २० युवकांना मालेगाव येथे अटक
मंदिर वही बनाएंगे हे आक्षेपार्ह गाणे वाजविण्यास पोलिसांनी मनाई केल्याने पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करून पुन्हा गाणे वाजविणाऱ्या अमळनेर येथील २० युवकांना पोलिसांनी अटक केली आहे.
↧
भाविकांच्या गर्दीन फुलला गड परिसर
चैत्रोत्सव यात्रेच्या तिसऱ्या दिवसापाासन भाविकांची गर्दी वाढू लागली आहे गुरुवारी सुमारे साठ हजार भाविकांनी गडावर हजेरी लावत भगवतीचे दर्शन घेतले. आज (दि. ११) शुक्रवारी गडावर लाखावर भाविक दर्शनास हजेरी लावतील, असा अंदाज आहे.
↧
पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न
किरकोळ कारणावरून पत्नीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. तालुक्यातील कुसूर येथील दिलीप आहिरे याने पत्नी सुरेखाला मनमाडला सोबत येण्यास सांगितले.
↧
↧
गोदावरीत हजारो मासे मृत्युमुखी
निफाड तालुक्यातील तामसवाडी, तारुखेडले परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात हजारो छोटे मासे मृतावस्थेत पाण्यात तरंगत असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. नदी जवळील परिसरात मृत माशांमुळे दुर्गंधी पसरल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
↧
कांदा भावात सुधारणाा
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि.१०) उन्हाळ कांदा भावात समाधानकारक वाढ झाली. येथील बाजार आवारावर उन्हाळ कांद्यास कमाल १३८१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
↧
डासांमुळे इगतपुरीकर त्रस्त
इगतपुरी शहर व परिसरातील विविध भागात नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे शहरात डास, मच्छर आणि चिलट्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून आरोग्य विभागाने फवारणी करावी, अशी मागणी शहरवासियांनी केली आहे.
↧
अजित पवारांना हायकोर्टाची नोटीस
बीड जिल्ह्यातील येथील सिंचन तलावाचे काम थांबवावे, तसेच या तलाव घोटाळ्यात हात असलेल्या संबंधितांची चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करावी, या मागणीसाठी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
↧
↧
तू पुड्याच बांध
सूत्रसंचालक म्हणजे राजा माणूस. त्याच्या मनात असेल तर तो एखाद्या वक्त्याला शिखरावर नेऊन ठेवेल अन् त्याचा मूड नसेल तर वक्ता संपलाच म्हणून समजा. थोडक्यात कार्यक्रम तारणं अन् मारणं त्याच्या हाती असतं. नुकत्याच झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात एक हौशी कार्यकर्ताच सूत्रसंचालक झाला.
↧
महात्मा फुलेंना नाशिकरोड येथे आदरांजली
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोड, जेलरोड, देवळालीगाव आदी ठिकाणी विविध संघटना व पक्षांतर्फे आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
↧
विकास आराखडा प्रश्नावर सोमवारी बैठक
नाशिक शहरासाठी नव्याने विकास आराखडा करण्याची तयारी प्रक्रीया सुरू झाली आहे. यासंदर्भात बाधित शेतकरी आणि मिळकतधारक यांचे म्हणणे सरकारदरबारी मांडण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
↧
More Pages to Explore .....