Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

३७० व्या कलमाबाबत संभ्रम

$
0
0
भारतीय राज्यघटनेतील ३७० व्या कलमाबाबत करण्यात आलेल्या तरतुदी या तत्कालिक होत्या. त्या कायमस्वरूपी नव्हत्या. मात्र, या तरतूदींचा अर्थ तत्कालीन राजकीय हेतूने प्रेरीत असणाऱ्या स्वार्थी वृत्तींनी घेतला आण‌ि तेव्हापासून ३७० व्या कलमाबाबत न‌िर्माण झालेली राजकीय संभ्रमाची पेरणी अद्यापही कायमच आहे, असे मत नवी द‌िल्ली येथील जम्मू आण‌ि काश्म‌िर अभ्यास केंद्राचे संचालक अरुणकुमार यांनी व्यक्त केले.

आसाराम आश्रमाला दणका

$
0
0
गंगापूररोडवरील मते नर्सरीच्या शेजारी असलेल्या आसाराम बापू आश्रमाचे उर्वरित अतिक्रमण महापालिकेने शुक्रवारी जमीनदोस्त केले. यात आश्रमाच्या बाजूने लावलेले पत्र्यांचे शेड हटविण्यात आले. अतिक्रमण काढतेवेळी आश्रमातील काही साधकांना विरोध करण्याचा प्रयत्न केला.

देशाला भविष्यात सौर उर्जेची गरज

$
0
0
देशात दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या विजेला पर्याय म्हणून भविष्यात सौर उर्जेची गरज भासणार आहे, असे प्रसिद्ध सौर ऊर्जा तज्ञ डॉ. गुंडू साब्दे यांनी सांगितले. ‘आयमा’ संघटनेतर्फे शुक्रवारी झालेल्या चर्चासत्रात डॉ. साब्दे यांनी सौर उर्जेसंदर्भात माहिती दिली.

शाळा बंद आंदोलनास यशस्वी

$
0
0
सरकारच्या चुकीच्या शैक्षण‌िक धोरणांचा न‌िषेध म्हणून श‌िक्षक व श‌िक्षकेतर कर्मचाऱ्यांसह संस्थाचालकांनी पुकारलेल्या लाक्षण‌िक शाळा बंद आंदोलनास नाश‌िकसह ज‌िल्हाभरातून सकारात्मक प्रत‌िसाद म‌िळाला. अपवादात्मक संस्था वगळता सुमारे ९० टक्के संस्था या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.

ट्रकखाली सापडून काका-पुतणे ठार

$
0
0
मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळा नाका चौफुलीवर ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून काका-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास उड्डाणपुलाखाली साईप्रितम हॉटेल समोर हा अपघात झाला. दोघे सिडकोतील साईबाबानगरमध्ये राहणारे असून या परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे.

५० टक्के लाभधारकांची जोडणी बाकी

$
0
0
सिलिंडरवर मिळणारी सबसिडी थेट ग्राहकाच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. मात्र अजूनही जिल्ह्यात सुमारे ५० टक्के ग्राहकांनी बँक खात्याची माहितीच जिल्हा प्रशासनाला न दिल्याने एलपीजी सबसिडीच्या अकाऊंटशी ही खाती जोडण्याचे कामही धिम्या गतीने सुरू आहे.

वैयक्तिक स्वार्थासाठी कामास उशीर

$
0
0
एलईडी फिटींग्ज बसवण्यासाठी तयार असताना आणि पुरेसे साहित्य उपलब्ध असताना फक्त काही जणांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी हे काम थांबवण्यात आले असल्याचा गंभीर आरोप एमआयसी कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी चंद्रशेखर गाडगीळ यांनी केला आहे.

राज ठाकरेंचा पाहणी दौरा रद्द

$
0
0
नाशिकमध्ये नियमित येण्याचा शब्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंधरा दिवसात पाळला. त्यांचे शुक्रवारी पुन्हा शहरात आगमन झाले. मात्र, प्रवासात त्यांचा पाय सुजल्याने पहिल्या दिवशीचा पाहणी दौरा त्यांना करता आला नसला तरी, शहरातील निवडक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी विविध प्रश्नांसोबत चर्चा केली.

किती अंत पाहशी...

$
0
0
वर्षभरापासून बळीराजाच्या पाचवीलाच पुजलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्याला तडाखा दिला. वर्षभर निसर्गाच्या लहरीपणाशी लढा देऊन उरलासुरलेला बळीराजाच्या तोंडचा घास या आपत्तीने हिरावून नेला आहे.

सत्तेचा तोरा; संघटनेलाच मारा!

$
0
0
कुजबुज मोहिमेचा आधार घेत प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यात तर भाजपच्या काही मंडळींचा जगात कोणीच हात धरणार नाही. काँग्रेस संस्कृतीला दोष देता देता भाजपला हा दोष कधी चिकटला, हे त्यांच्याही लक्षात आले नाही. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे,’ असे दानशूरपणाबाबत सांगितले जाते. इथे भाजपने इतरांना बोल लावता लावता त्यांचे दोषही सरसकट घेतले.

नाशिक तीर्थ अन् कुंडांचं

$
0
0
सह्याद्री पर्वताच्या कुशीतील गोदावरी नदीच्या त‌ीरावर नाशिक वसलं आहे. पवित्र क्षेत्र असा नावलौकिक मिळालेल्या नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये असंख्य तीर्थ आणि कुंडं आहेत. या सर्वांना एक इतिहास आहे. प्रत्येकामागे एक अख्यायिका जोडली गेली आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर उरल्यासुरल्या तीर्थ अन् कुंडांना संजीवनी मिळेल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. नाशिकच्या या तीर्थ अन् कुंडांविषयी...

अवकाळीने हिरावलं जगणं!

$
0
0
वर्षभर अवकाळी पाऊस व गारपिटीचे थैमान सुरूच असून, बळीराजा काकुळतीला आला आहे. खरिपाची दैना झाली अन् रब्बी व फळप‌किांची गारपिटीने वाट लावली. दोन महिन्यांतील नुकसानीचा आकडा अडीच हजार कोटींवर गेला आहे.

युध्द हे अंतिम उत्तर नाही

$
0
0
काश्म‌रिी खोऱ्यातील भाबड्या जनतेची वेळोवेळी पाकिस्तानातील च‌थिावणीखोर नेत्यांनी वैचारीक द‌शिाभूल केली आहे. परिणामी या जनतेच्या मनातील संभ्रम अद्यापही कायम आहे. युध्दाने ज‌िंकणे शक्य असणाऱ्या भूम‌तिील मनेही भारतीयच हवी असतील तर काश्म‌ीरच्या च‌घिळलेल्या प्रश्नाचे अंतिम उत्तर केवळ युध्दच ठरू शकत नाही, असे मत न‌विृत्त लेफ्टनंट जनरल सैय्यद हुसनैन यांनी व्यक्त केले.

खेल अभियानाला अंमलबजावणीचे कोंदण

$
0
0
देशातील ग्रामीण भागात क्रीडा सुविधांची निर्मिती व्हावी क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने युवा व क्रीडा खेल अभियान ही योजना सुरु केली होती. मात्र त्यातील त्रुटींमुळे या योजनांची अंमलबजावणी होत नव्हती. केंद्राने या तुटी दूर करीत या योजनेचे नाव आता राजीव गांधी खेल अभियान केले असून महाराष्ट्रात यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार

$
0
0
सिन्नर तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची प्रदूषण व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शनिवारी पाहणी केली. नुकसानग्रस्तांना राज्य सरकारतर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

नुकसानीची झिरवाळांकडून पाहणी

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी, तळेगाव, सोनजांब, शिंदवड, खेडगाव, तिसगाव शिवारात झालेल्या गारपिटीने द्राक्ष पीक उद्धवस्त झाले आहे. आमदार नरहरी झिरवाळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी प्रांताधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, कृषी अधिकारी सोनवणे यांच्यासह सदर गावांतील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

तातडीने पंचनामे करा

$
0
0
मालेगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसनाग्रस्त भागाची राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी पाहणी केली.

संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको

$
0
0
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सातत्याने नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांनी शिरवाडे वणीजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. कर्जमाफी, वीजबिल माफी, नुकसानभरपाईची मागणी करीत द्राक्ष उत्पादकांनी महामार्गावरच ठिय्या दिला होता.

‘चोरावर मोर’ अखेर निलंबित

$
0
0
चोरीचे सोने खरेदी केल्याने कारवाईची भीती घालून शहरातील एका सराफाकडून उपनगर पोलिसांनी एक तोळा सोने व दहा हजारांची रोकड हस्तगत केली. मात्र, हस्तगत केलेले सोने व रोख रक्कमेची नोंदच केली नाही. सराफाच्या तक्रारीनंतर पोलिसांची बनवाबनवी समोर आल्याने तिघा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

वेधशाळा करतात काय?: राज ठाकरे

$
0
0
‘अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर परदेशातील वेधशाळा पुढच्या आठ दिवसांच्या हवामानाचे अंदाज वर्तवून नुकसान टाळतात. मात्र आपल्याकडील वेधशाळा अंदाजही वर्तवू शकत नसल्याने देशातील वेधशाळा करतात काय ?’ असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images