उद्योगमंत्री घोषणेला हरताळ
कर्करोग निदानावर आज शिबिर
‘मिशन सलोन’मध्ये करिअरची संधी
स्वच्छ भारत अभियान शक्य
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे यश
जनरेट्यापुढे झुकले प्रशासन
भाजपविरोधात काँग्रेसचा सोमवारी रास्तारोको
वधू-वर मेळावा पुढे ढकलला
ज्येष्ठांसाठी उभारणार नाना नाणी पार्क
अल्पवयीन मुलीवर गँगरेप
नाशिक मोस्ट प्रॉमिसिंग सिटी
टीईटीची उत्तरसूची जाहीर
गटबाजी : फुलपॅन्टची बर्म्युडा!
जात पंचायतीच्या विरोधात आज महाडला एल्गार
पालकांना सक्षम केल्यास शिक्षणाचा दर्जा सुधारेल
पंकजा मुंडे घेणार आज जलयुक्त शिवारचा आढावा
...अन्यथा त्र्यंबक सोडून जावू !
'नाहीतर काँग्रेसचे आमदार फोडेन'
लवकरच नवे शिक्षक धोरण
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
देशातील विद्यार्थ्यांना पवित्र ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचे कार्य महान आहे. शिक्षकांच्या मागण्यांबाबत हे सरकार सकारात्मक विचार करीत असून, लवकरच त्याबाबत नवीन धोरण आखणार असल्याचे आश्वासन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कै भा. वी. शिंपी प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिक्षक समिती भूषण पुरस्काराच्या वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. कालिदास कलामंदिर येथे रविवारी आयोजित शिक्षक चेतना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ना. मुंढे पुढे म्हणाल्या की, प्राथमिक शिक्षक हा समाजातील फार महत्वाचा घटक असून, आपल्या आयुष्याला आकार देण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. अशा शिक्षकांचे कौतुक करावे तितके थोडे असून, आयुष्य संस्कारीत करण्याचे काम शिक्षक करीत असतात. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या घसरत्या दर्जा बाबत भाष्य केले. त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षक ज्ञानदानाचे कार्य ज्या शाळेतून करतो त्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा खरोखरच योग्य आहे का, तो का खालवला हे देखील पडताळून पहाण्याची गरज आहे. दर्जा खालवण्यास कारणीभूत असलेल्या उणिवा दूर सारून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढवला पाहिजे. तसेच आज मुलांवरचा अभ्यासाचा व शिक्षकांवर कामाचा बोजा वाढला आहे. मुलांचे शिक्षण हसत खेळत होणे गरजेचे असून, त्यासाठी शिक्षकांवर असलेला ताण व कामाचा बोजा कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत एकादाच निर्णय घ्या, असे सुचवले असल्याचे सांगितले. त्यांनीही याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रलंबित शिक्षकांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विश्वनाथ मिरजकर यांनी प्रास्ताविक केले. राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बोरसे म्हणाले की, शिक्षकांच्या अनेक मागण्या असून, त्या तातडीने सोडविणे गरजेचे आहे. आज सर्व शाळांमधील ९९ टक्के शिक्षकांनी एमएससीआयटीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, एक टक्का शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१५ पर्यंत सरकारने मुदतवाढ द्यावी. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण करण्यात यावे, शिक्षकांच्या बदल्यांबाबत योग्य विचार व्हावा, पती-पत्नी एकीकरण नियमांची कठोर अंमलबजावणी व्हावी, शिक्षकांना मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य करण्याची अट शिथिल करण्यात यावी, त्याचप्रमाणे खोट्या एनजीओंकडून शालेय तपासणी अहवाल न मागवता सरकारी यंत्रणेने तपासणी करावी. मुख्याध्यापकांच्या पेंडिंग जागा पदोन्नतीने भराव्यात, शिक्षकांची वैद्यकीय बिले पेडिंग आहेत ती अदा करण्यात यावी, तसेच गुणवत्ता विकास कार्यक्रम राबवावे व शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत, अशा मागण्या त्यांनी केल्या. यावेळी राज्यातील १३ शिक्षकांना गौरविण्यात आले.
पुरस्कारार्थी
वसंत घोगरे (परभणी), राजन सावंत (सोलापूर), राजेंद्र दिघे (मालेगाव), किशोर डोंगरवार (गोंदीया), विष्णू सागवेकर (रत्नागिरी), तुळशीदास धांडे (दर्यापूर)
विशेष महिला गौरव पुरस्कार
सुशीला कदम (कोकण)
नेतृत्व गौरव पुरस्कार
काळुजी बोरसे पाटील, उदय शिंदे
कर्तृत्व पुरस्कार
केदू देशमाने, गजानन शिंदे, सुरेखा मिरजकर, प्रवीण कुलकर्णी
देवळाली स्टेशनवाडीची वाट बिकट
देवळाली परिसरातील स्टेशनवाडीमध्ये वाहन चालविणेच काय तर पायी चालणेही कठीण व्हावे असे अतिशय खडबडीत आणि डांबरीकरण नसलेले रस्ते आहेत. या रस्त्यांवरून वाहने चालवून अपघातालाच सामोरे जावे लागत असल्याची खंत स्थानिक रहिवाशी व्यक्त करीत आहेत. देवळाली रेल्वे स्टेशन लगतचा हा भाग विकासापासून वंचित आहे.
देवळाली रेल्वे स्टेशनमुळे विस्तारलेल्या या भागातील नागरिकांना अजुनही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. देवळालीच्या ५० टक्के लोकवस्तीतील मृतदेह या भागात अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. मात्र, याच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गाचे रुंदीकरण अद्याप झालेले नाही. तसेच या रस्त्याचे डांबरीकरण होऊ शकलेले नाही. प्रशासन होत असलेल्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील लोखंडी पुलाचे कामही अुजनही होऊ शकलेले नाही. या पुलाला संरक्षक कठडेही अतिशय कमी उंचीचे आहे. त्यामुळे या पुलावरून कोणतेही वाहन खाली पडण्याचा धोका आहे.
जुन्या स्टेशनवाडी भागात जाण्यासाठी रस्ताच नाही. जो रस्ता आहे. तो रेल्वे विभागाच्या जागेतून जातो. त्यामुळे या रस्त्याचे रेल्वे विभागाने त्वरित डांबरीकरण करून द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. ही मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापुढे मांडणार असल्याचे विद्यमान नगरसेवक दिनकर आढाव यांनी सांगितले आाहे. या परिसरासाठीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ३ इंच आहे. ती पाणीपुरवठा करण्यासाठी अपुरी ठरत आहे. तरी ८ इंचांची पाइपलाईन मंजूर झाली असून ती कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाने त्वरित बदलून द्यावी तसेच याच भागातील चौधरी मळ्याकडे जाणाऱ्या रस्ताचेही डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.
कर्मचाऱ्यांकडूनच अस्वच्छता
स्टेशनवाडीजवळील पुलाखाली कॅन्टोन्मेन्टचे कर्मचारीच मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकत असल्याचे स्थानिक रहिवाशांची तक्रार आहे. गेल्या ३० वर्षांपासून या पुलाकडेही कुणीही लक्ष देत नसल्याची खंत नागरिक मांडतात. यापूर्वी नव्या व जुन्या स्टेशनवाडी भागात २६ नवीन शौचालयाची बांधणी करण्यात आली. यामुळे स्थानिक रहिवाशांची गैरसोय टाळल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले. वॉर्डात स्नेहनगर, नवीन स्टेशनवाडी, रेस्ट कॅम्प रोड तसेच बनात चाळ भागात आदी भागात भूमिगत गटार योजना राबविणे गरजेचे आहे.
वॉर्डात अनेक गरजू दलितांसाठी घरे बांधणार आहे. तसेच केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून विविध योजना राबविणार आहे.
दिनकर आढाव, नगरसेवक
वॉर्डातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. तसेच वृद्ध व बालागोपाळासाठी नागरिकांसाठी उद्यानाची निर्मिती करण्याची गरज आहे.
- किलेश बोराडे, नागरिक