Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

होळी सण साजरा

$
0
0

शहरात पारंपर‌िक पद्धतीने होळी सण साजरा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कल्पकतेने रचलेल्या गोवऱ्या, मध्यभागी ऊस, एरंडाच्या डहाळीला खोबऱ्याच्या वाट्यांचे बांधलेले तोरण, होळीची पूजा व होळी पेटल्यानंतरचा जल्लोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात गुरुवारी होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

भारतीय परंपरेनुसार फाल्गुन पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमेनिमित्त देशभरात होळी सण साजरा केला जातो. सकाळपासून शहरातील चौकाचौकांमध्ये होळीची तयारी करण्यात आली. शहरातील पंचवटी, रामकुंड, सिडको, म्हसरूळ, नाशिकरोड, गंगापुर रोडी, कॉलेज रोड सातपूर, अशोक स्तंभ, जुने नाशिक अशा विविध भागांत होळीनिमित्त मोठ-मोठ्या होळ्या रचण्यात आल्या. यानिमित्त विविध ठिकाणी आकर्षक रंगानी गोवऱ्या सजवण्यात आल्या. त्यात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहपूर्ण वातावरणात होळी सण साजरा केला. काही ठिकाणी पर्यावरण प्रेमींनी प्रतिकात्मक होळीचे आयोजन करत पर्यावरण बचावचा संदेश दिला.

पंचवटी, दहीपुल, सिडको, सातपुर, नाशिक रोड अशा विविध ठिकाणी होळीसाठी लागणारे साहित्य, गोवऱ्यांच्या खरेदीसाठी बुधवारपासूनच नागरिक व विविध परिसरातील तरुणांनी गर्दी झाली होती. दहिपुल जवळील पटांगणात आदिवासी भागातून खास होळीसाठी गोवऱ्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. याठिकाणी टेम्पो, ट्रक, जीपमधून आणलेल्या गोवऱ्यांची ने आण दिवसभर चालू होती.

शहरांतील विविध भागांतील वखारींमध्ये होळीसाठी लागणारी लाकडे खरेदीसाठी गर्दी झाली होती. शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर होळ्या पेटवण्यात आल्या. यामध्ये बाळगोपालांचा उत्साह मोठ्याप्रमाणावर दिसून आला. शहारातील विविध भागांतील सोसायटीमध्ये छोट्या स्वरुपात होळी पेटवण्यात आली.

अशीही होळी.....

सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने होळी निमित्त गोल्फ क्लब येथे सकाळी ७ वाजता रोप वाटपांचा कार्यक्रम राबवला. करंज, बेल, अडुळसा, आपटा, कांचन, पुत्रंजीवा, कैलासपती, गुलमोहर, अशोका आदी रोपांचे वाटप यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेच्या सदस्यांचा अहवाल सादर

$
0
0

कारवाईकडे सर्वांच्या नजरा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देण्याचा पक्षाचा आदेश झुगारणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांसंदर्भातील अहवाल जिल्हाप्रमुखांनी गुरूवारी पक्षप्रमुखांकडे सादर केला आहे. त्यामुळे कारवाईचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत.

स्थायी समितीच्या सदस्यपदाची संधी इतर सदस्यांना मिळावी यासाठी शिवसेनेने सदस्यपदाची कालावधी दोन वर्षावरून एक वर्ष केला आहे. त्यामुळे सदस्य वंदना बिरारी आणि सचिन मराठे यांना पक्षाने सदस्यपदाचा राजीनामा देण्याचे आदेश पक्षाने दिला होता.मात्र या दोन्ही सदस्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. शिवसेनेच्या वतीने दोन्ही सदस्यांना राजीनाम्यासाठीही अल्टीमेटमही बजावण्यात आला होता. मात्र या सदस्यांनी पक्षादेश झुगारत राजीनामा देण्यास नकार दिला. त्यातच महापौरांनी आता केवळ दोनच सदस्यांच्या निवडीसाठी अधिसूचना काढली आहे. त्यामुळे शिवसेनेला आता नव्या सदस्यांना संधी देणे शक्य नाही. सदस्यांच्या या प्रकाराची गंभीर दखल पक्षाने घेतली असून स्थायीच्या घडामोडी संदर्भात तीन दिवसात झालेल्या घडामोडींचा अहवाल पक्षाने तयार केला आहे. सदस्यांनी पक्षशिस्तीचा भंग केला असून त्यांच्या वर्तना संदर्भातील हा अहवाल गुरूवारी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. या सदस्यांवर कारवाईचा निर्णय आता पक्षश्रेष्ठींच घेणार आहे. त्यामुळे वरीष्ठांच्या आदेशाकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉण्टेड आरोपी फरारी

$
0
0

पत्ते बनावट आणि जामिनदारही गायब;

१ हजार ३२० आरोपींचा शोध सुरू

अरविंद जाधव, नाशिक

ना‌शिक कोर्टाकडून जामिनावर सुटलेले तब्बल १ हजार ३२० संशयित आरोपी अनेक वर्षांपासून फरारी झाले आहेत. बहुतांश आरोपींचे पत्ते त्रोटक किंवा बनावट असल्याचे समोर आले असून जामिनदारही सापडत नसल्याने पोलिसांच्या शोध मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

साधारणतः एखादा गुन्हा घडला, की पोलिस त्याची नोंद करून संशयिताला अटक करतात. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येते. सुनावणीमध्ये आवश्यकतेनुसार संशयितास पोलिस कोठडी, न्यायालयीन कोठडी दिली जाते. किंवा संशयित आरोपींना कोर्टाकडून जामीन दिला जातो. जामीन देताना कोर्टाकडून काही अटी घालून दिल्या जातात. केस सुरू झाल्यापासून अंतिम निकाल लागेपर्यंत या अटी कायम असतात. जामिनावर सुटण्यासाठी संशयितांना जामिनदारही महत्त्वाचे ठरतात. सध्या, कोर्टाकडून जामिनावर सुटलेल्या तब्बल १ हजार ३२० संशयित आरोपींनी धूम ठोकली आहे. पोलिसांना गुंगारा देणारे हे आरोपी नाशिक शहरासोबत, जिल्ह्यातील, राज्यातील, परराज्यातील तसेच नेपाळ या परदेशातील देखील आहे. खून, हाणामाऱ्या, फसवणूक, चोरी, अपघात, हिंसाचार, वाहनचोरी अशा विविध गुन्ह्यात या आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील काही आरोपींवर १९९२ मध्ये गुन्हे दाखल झाले असून ते १९९४ पासून बेपत्ता आहेत. पोलिसांनी अशा संशयितांची यादीच तयार केली असून वॉण्टेड आरोपींना शोधून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकापूर्वी शहर पोलिसांनी अशा आरोपींची शोध मोहिम हाती घेतली होती. यात किमान १५० पेक्षा जास्त संशयितांना अटक करण्यात आली. त्याआगोदर हा आकडा १ हजार ५००च्या दरम्यान होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त संदिप दिवाण यांनी दिली.

वॉण्टेड आरोपींमध्ये बहुतांश शहराबाहेरचे म्हणजे परजिल्ह्यातील किंवा परप्रांतातील रहिवाशी आहेत. गुन्हा झाला त्यावेळी ते शहरात वास्तव्यास होते. किंवा शहरातील एखाद्या गुन्ह्यात त्यांना परराज्यातून अटक करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमध्ये चुकीचा तसेच अर्धवट पत्त्याची नोंद झाल्याने संशयितापर्यंत पोहचताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच काही प्रकरणात तर जामिनदारही बनावट असल्याचे समोर आले आहे. यापुढे वॉण्टेड आरोपींचे जामिनदार असलेल्या व्यक्तिकडे चौकशी केली जाईल, असे दिवाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वॉण्टेड आरोपींचा अनेक वर्षे शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही तर कोर्टातर्फे त्यांना फरार म्हणून घोषीत करण्यात येते. मात्र, या प्रक्रियेसाठी मोठा कालावधी लागतो.

वॉण्टेड आरोपींना शोधण्याचे काम सातत्याने सुरू असते. मात्र, चुकीचे किंवा बनावट पत्ते अडचणीचे ठरतात. अनेकदा जामिनदार देखील सापडून येत नाहीत. सध्या पोलिसांनी वॉण्टेड आरोपींची यादी तयार केली असून त्यांच्या जामिनदारांकडे लक्ष वळवण्यात येणार आहे.

- संदीप दिवाण, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सज्ज व्हा, विमेन्स बाईक रॅलीसाठी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाइक रॅली म्हटलं की डोळ्यासमोर धूम करत फिरणारे पुरूष आपल्याला दिसतात. पण असंच चित्र महिलाही उभे करू शकतात. त्यासाठी फक्त सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. 'महिलादिना'निमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'विमेन्स बाइक रॅली'त तुम्हाला ही संधी मिळणार आहे. त्यासाठी आजच आपले नाव या रॅलीसाठी नोंदवा आणि बाइक रॅलीचा आनंद लुटा!

रविवारी (८ मार्च) बीवायके कॉलेजपासून सकाळी नऊ वाजता रॅली सुरू होणार आहे. तर मग तयार रहा आणि सहभागी व्हा बाइक रॅलीत. या माध्यमातून तुम्हाला स्वतःला शोधण्याची संधी तर मिळणारच आहे. महिला सक्षमीकरणाचा संदेश या माध्यमातून देता येणार आहे.

वेगळा अनुभव घ्याच!

गेल्या वर्षीही मी बाइक रॅलीचा अनुभव घेतला होता. महिला जर सगळ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे उचलत असतात तर त्यांनी आनंद लुटण्यात मागे राहू नये. बाइक रॅलीचा आनंद पुरूष जितक्या उत्साहाने घेतात त्याच उत्साहाने तुम्हीही या बाइक रॅलीचा आनंद घ्या. एक वेगळा अनुभव मिळणारच आहे. त्याचबरोबर पुरुषांची मक्तेदारी तोडण्याची देखली ही योग्य वेळ असणार आहे.

- अदिती नाडगौडा-पानसे, नृत्यांगणा

आजच करा नावनोंदणी...

नाव नोंदणीसाठी http://womenbikerally.mtonline.in या वेबसाइटला भेट द्या किंवा मोबाइलवर mtccNSK स्पेस तुमचं नाव टाइप करून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करा. किंवा ०२५३-६६३७९३७/३९ या क्रमांकावर तुम्ही नावनोंदणी करू शकतात. नावनोंदणी याच क्रमांकावर केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका मालमत्ता गहाण ठेवणार

$
0
0

>>विनोद पाटील,नाशिक

आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेवर सिंहस्थ कामांसाठी स्वतःच्या मालमत्ता गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने सिंहस्थ कामांसाठी महापालिकेला २६० कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी दिलेली आहे. मात्र, महाराष्ट्र बँकेने शासनाच्या हमी पत्रासोबतच कर्जासाठी संपत्ती गहाण ठेवण्याची अट महापालिकेला घातली आहे. त्यामुळे महापालिकेने आता शहरातील महत्त्वाच्या १५ मालमत्तांची यादी तयार केली असून, त्या गहाण ठेवल्या जाणार आहेत. पंधरा वर्षासाठी या मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या जातील.

सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असतांनाही सिंहस्थाच्या कामांना निधी नसल्याची ओरड होत आहे. त्यातच महापालिकेचा सिंहस्थ आराखडा ६६ कोटींनी वाढल्याने तो १०५२.६१ कोटींवरून १११९.२९ कोटींपर्यंत गेला आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या कामांसाठी निधीसाठी कर्ज घेण्याची तयारी महापालिकेने केली. त्यास राज्य सरकारने मंजुरीही दिली आहे. सिंहस्थ खर्चाच्या नव्या सूत्रानुसार तीन चतुर्थांश खर्च राज्य सरकार, तर उर्वरित रक्कम महापालिका खर्च करणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या वाट्याला ४३० कोटींचा खर्च येणार असून, उर्वरित ६८९ कोटींचा भार शासन उचलणार आहे. आतापर्यंत शासनाने सिंहस्थासाठी अवघा २९७.१७ कोटींचा निधी पालिकेला दिला आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या कामासाठी महापालिकेला निधीची तातडीने गरज असून, या कर्जासाठी महाराष्ट्र बँकेकडे महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे.

महाराष्ट्र बँकेने १०.४० टक्के व्याजदराने महापालिकेला कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, कर्जासाठी शासनाच्या हमी पत्रासोबतच महापालिकेच्या मालकीची मालमत्ता गहाण ठेवण्याची अट घातली आहे. बँकेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून, महापालिकेच्या मालकीच्या १५ प्रॉपर्टीजची यादी तयार करण्यात आली आहे. यात महापालिकेच्या मालकीच्या शहरातील महत्त्वाच्या जागा आणि क्रीडांगणांचाही समावेश आहे. कर्ज फेडण्यासाठी १५ वर्षांची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, तोपर्यंत या मालमत्ता पंधरा वर्षे बँकेकडे तारण म्हणून राहणार आहेत. या मालमत्तांसंदर्भात निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार महापालिकेला राहणार नाही असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

आणखी ५० कोटींचा प्रस्ताव

महापालिकेचा सिंहस्थ आराखडा जवळपास ६६ कोटींनी वाढला आहे. सिंहस्थाच्या भूसपांदनासाठी २०० कोटींचा निधी लागणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने वाढीव भार सहन करणे पालिकेला सद्यस्थितीत शक्य होत नाही. त्यामुळे पालिकेने आणखी ५० कोटींच्या कर्जाला मंजुरी मिळावी, अशी विनंती शासनाला केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडी विरोधात सोनवणेंचे उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील ताहाराबाद नाक्याजवळ उभ्या करण्यात येत असलेल्या रिक्षा तेथून हटविण्याबरोबरच अवैध वाहतुकीला आळा घालावा, या मागणीसाठी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश सोनवणे हे तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात बेमुदत उपोषणास बसले आहेत. ताहाराबाद-नामपूर रस्ता हा वर्दळीचा असून तेथे उभ्या असलेलया रिक्षांमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. रिक्षाचालक रिक्षामध्ये दहा ते पंधर प्रवासी कोंबून अवैध प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विनापरवाना अवैध वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी पोलिस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५३ सहकारी संस्थांची लवकरच निवडणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यातील व गटातील ५३ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिली. गटातील ४७ सहकारी संस्थांखेरीज कार्यकारी पतसंस्थेच्या २, नागरी बॅँक ३ व शेतकी संघ अशा ५३ संस्थांची निवडणूक होणार आहे. येथील जनता बँकेचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात ५ एप्रिल रोजी मतदान होईल. तर, मामको बॅँकेची निवडणूक मे-जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. जनता बॅँकेसाठी ५ ते ९ मार्चपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. १0 मार्च रोजी सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी होईल. ११ ते २५ मार्चदरम्यान अर्ज मागे घेता येतील. १५ दिवसात अर्ज माघारीनंतर रिंगणात उरलेल्या उमेदवारांसाठी २६ मार्च रोजी चिन्हांचे वाटप होईल. ५ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येईल. ६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. ही माहिती उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली.

मालेगाव उपविभागात मामको, जनता बॅँक आणि येमको या बॅँकाची निवडणूक होत आहे. मामको बॅँकेची निवडणूक मे अथवा जूनमध्ये होणार आहे. जनता बॅँकेसाठी जेएटी महिला महाविद्यालय मतदान केंद्रासाठी आरक्षण करण्यात आले आहे. ६ एप्रिल रोजी भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील झाडांचे पुन्हा सर्व्हेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

सिंहस्थाच्या विकासकामासाठी बाधक ठरलेल्या शहरातील २,६०९ झाडांच्या तोडणीची परवानगी महापालिकेला उच्च न्यायालयाकडून गुरूवारीही मिळाली नाही. उलट न्यायालयाने पुन्हा फेरसर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले असून तिसऱ्यांदा सर्व्हेक्षणासाठी वनसंरक्षकाच्या समितीला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची मदत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेला आता पुन्हा फेरसर्व्हेक्षण अहवालाची वाट पहावी लागणार आहे.

सिंहस्थाच्या कामांसाठी नाशिक शहरात दोन हजार ६०९ वृक्षांची कत्तल करावी लागणार आहे. त्याविरोधात पर्यावरण वाद्यानी उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने झाडांची कत्तल थाबंवली आहे. न्या. अभय ओक आणि न्या. अनिल मेनन यांच्या पिठासमोर सुनावरणी सुरू आहे. या झांडाच्या संख्येबाबत आणि पर्यायी झाडे जगविण्याबद्दल पर्यावरणवादी आणि महापालिकेत वाद आहे. यासाठी दोनदा सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर दुसरीकडे या झाडांच्या बदल्यात पर्यायी महापालिका १६ हजार झाडे लावण्यास तयारही आहे. आयुक्तांनी त्यांसदर्भात महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात शपथपत्रही दाखल केले आहे. त्यावर गुरुवारी (दि. ५) पुन्हा सुनावणी झाली. त्यात महापालिकेन अद्याप वृक्षप्रा‌धिकरण समितीही गठीत केली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सोबतच न्यायालयाने आदेश देवूनही महापालिकेन शहरातील सर्व झाडांचे सर्व्हेक्षण केले नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

त्यामुळे वृक्षतोडीला परवानगी देण्यात येवू नये अशी मागणी पर्यावरणवाद्याकडून करण्यात आली. तर महापालिकेन सिंहस्थाची कामे असल्याने वृक्षतोडीला परवानगी द्यावी अशी मागणी केली. न्यायालयाने सरकारी व प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तूर्त तरी वृक्षतोडीला परवानगी दिली नाही. मात्र याऊलट विकासकामांआड येणाऱ्या झांडाचे पुन्हा फेरसर्व्हेक्षण करण्याचे आदेश वनसंरक्षक समितीला दिले असून त्यासाठी आरटीओंची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शहरातील वृक्षांचे पुन्हा सर्व्हेक्षण होणार असून सिंहस्थाची कामे मात्र रखडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इ ब्लास्ट २०१५’ मध्ये गर्व्हमेंट पॉलिटेक्निक प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मविप्र संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आयोजित राज्यस्तरीय 'इ ब्लास्ट २०१५' स्पर्धेत सामानगावच्या गर्व्हमेंट पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिकल विभागाने पहिला पुरस्कार मिळवला. तर, गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्निकने दुसरा आणि के. के. वाघ पॉलिटेक्निकने तिसरा क्रमांक पटकावला. 'महाराष्ट्र टाइम्स' या स्पर्धेचा मीडिया पार्टनर होता. राज्याच्या विविध भागातून आलेल्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांचे १०० प्रकल्प स्पर्धेत सादर करण्यात आले होते.

इंजिनीअरिंग डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळावी यासाठी राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाने 'इ ब्लास्ट २०१५' या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले. त्यात मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स-टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगशी संबंधित प्रकल्पांवर आधारित मॉडेल प्रोजेक्ट मांडण्यात आले. स्पर्धेचे यंदाचे पहिलेच वर्ष असले तरी राज्याच्या विविध भागातून आलेल्या ४०० विद्यार्थ्यांचे १०० प्रकल्प सादर करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन एलएमसी मेंबर प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. आर. एम. चौधरी आणि प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार उपस्थित होते. प्राचार्य बी. एन. राजोळे यांनी प्रास्ताविक केले. तसेच, एकाच छताखाली वैविध्यपूर्ण संकल्पना व प्रोजेक्टस आणण्याचा उद्देश सफल झाल्याचे मत मांडले. ही स्पर्धा केवळ डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विकसित केलेल्या संकल्पना, त्यांचे कौशल्य प्रोजेक्टद्वारे मांडून देण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून 'इ ब्लास्ट २०१५' उपयुक्त ठरल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. परीक्षक म्हणून बी. जे. पवार आणि एस. डी. निकम यांनी काम पाहिले. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर, विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके देण्यात आल्याचे विभागप्रमुख ज्ञानेश्वर पगार यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक अॅण्‍ड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख व्ही. एम. बिरारी आणि कम्प्युटर विभागाचे डी. एस. टर्ले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रा. रामप्रसाद थोरात, प्रा. प्रियंका पवार, प्रा. प्राजक्ता गांगुर्डे, प्रा. प्रमोद जाधव, के. एम. थोरात, आर. ई. अहिरे, व्ही. बी. निकम, पी. एस. भोज यांनी परिश्रम घेतले.

विजेते प्रकल्प

कम्प्युटरच्या आधारे विद्युत ट्रान्सफॉर्मरचे संरक्षण करण्याचा प्रकल्प सामानगावच्या गर्व्हमेंट पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मोटोरॉईज्ड पेन्ड्युलम पंपचे मॉडेल साकारले होते. के. के. वाघ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी वायरलेस को मॉनिटरिंगचे मॉडेल विकसित केले होते. उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेल्या ब्रह्मा व्हॅली पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी स्मार्टकार्डवर आधारीत रेशनिंग व्यवस्था तर महावीर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी वाया जाणाऱ्या प्लास्टिकपासून डिझेल ऑईल तयार करण्याचा प्रकल्प सादर केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदीच्या प्रश्नपत्रिकेवरून मंडळाचा सावळा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत गुरुवारी हिंदीच्या पेपरला एका केंद्रावर प्रश्नपत्रिका कमी पडल्याप्रकरणी मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिवांमध्ये एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे. मंडळाच्या या सावळ्या गोंधळात संयुक्त हिंदीच्या प्रश्नपत्रिकेचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दहावीच्या परीक्षेत नाशिक शहरातील एका परीक्षा केंद्रावर संपूर्ण हिंदीच्या प्रश्नपत्रिका कमी पडल्या. कारण, संपूर्ण हिंदीच्या प्रश्नपत्रिका असल्याचे स्टीकर असलेल्या पाकिटात संयुक्त हिंदीच्या प्रश्नपत्रिका आढळून आल्या. विद्यार्थ्यांना दहा मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका देण्यात येत असल्याने या दहा मिनिटातच नियमात राहून संपमर्ण हिंदीच्या प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स करून त्या विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आल्या. हे प्रकरण जणू दाबण्याचाच प्रकार मंडळाने सुरू केल्याचा संशय येत आहे. प्रश्नपत्रिका कमी पडून झेरॉक्स काढाव्या लागल्या आणि त्या वितरीत केल्याचे मंडळाच्या विभागीय अध्यक्षांनी मान्य केले आहे. मात्र, असा काही प्रकार झाला नसल्याचे सचिवांचे म्हणणे आहे. त्यामुळे मंडळाच्याच अधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर प्रश्नपत्रिका दिल्याचे सचिवांनी सांगितले असले तरी विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक प्रश्नपत्रिका त्या केंद्रावर गेल्याच कशा, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. असा प्रकार घडणे दुरापास्त असले तरी या सर्व प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

संयुक्त हिंदीच्या प्रश्नपत्रिकेचे काय?

प्रिंटींग जेथे झाली तेथेच प्रश्नपत्रिका पाकिटात सील करण्यात आल्या. संपूर्ण हिंदीच्या पाकिटात संयुक्त हिंदीच्या प्रश्नपत्रिका निघाल्याने एकप्रकारे हा पेपर फुटला आहे. मात्र, पेपर फुटला नसल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता संयुक्त हिंदीची प्रश्नपत्रिका बदलणार की फुटलेलीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एका केंद्राच्या ठिकाणी संपूर्ण हिंदीच्या ऐवजी संयुक्त हिंदीची प्रश्नपत्रिका आढळून आली. त्यामुळे संपूर्ण हिंदीच्या प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना देण्यात आली. या प्रकरणात प्रेसचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. यासंदर्भात आमच्या अध्यक्षांकडे सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

- दत्तात्रय जगताप, अध्यक्ष

एका केंद्रावर प्रश्नपत्रिका कमी पडल्या म्हणून दुसऱ्या केंद्राच्या ठिकाणी असलेल्या आणून व्यवस्था करण्यात आली. बाकी काहीच घडले नाही.

- आर. आर. मारवाडी, सचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील माध्यमिक शाळांमधील पदवीधर ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यासंदर्भात राज्य सरकारने सुप्रिम कोर्टात दाखल केलेली फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे राज्यातील ग्रंथपालांना आता पदवीधर वेतनश्रेणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील पदवीधर ग्रंथपालांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदवीधर वेतनश्रेणीच लागू करावी, यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. यापैकी सचिन दिवेकर यांच्यासह काही ग्रंथपालांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या बाजूने हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर राज्य सरकारने सुप्रिम कोर्टात दाद मागितली होती. गेल्या वर्षी २४ जानेवारीस सुप्रिम कोर्टाने ही याचिका फेटाळली. त्यानंतरही राज्य सरकारने त्याची दखल न घेता गेल्या वर्षीच ८ मार्च रोजी पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. परंतु, सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निकालापासून ३0 दिवसांच्या आत याचिका दाखल करण्यासाठी मुदत असताना राज्य सरकारने ४१ दिवसांनी दाखल केल्याने फेटाळली आहे.

सुप्रिम कोर्टानेही आमच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता तरी कोर्टाचा आदेश शिरसावंद्य मानत ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी.

- विलास सोनार, ग्रंथपाल विभागप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रायकॉममधील कामगारांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर औद्योगिक वसाहतीतील नाईस इंडस्ट्रियल भागात असलेल्या ट्रायकॉम इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीतील कामगारांनी सुविधा मिळत नसल्याने कामबंद आंदोलन पुकारले आहे. कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्‍थापन केवळ तारीख देण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे.

गेल्या आठ वर्षांपासून ३०० पेक्षा अधिक कामगार ट्रायकॉम कंपनीत काम करीत आहेत. मात्र, कामगारांना कामगार कायद्यातील सवलतीपांसून वंचित रहावे लागत आहे. याबाबत अनेकदा कामगार उपायुक्तांकडे तक्रार करून देखील कामगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. यामुळे कामगारांनी महिला कामगारांसह कामबंद आंदोलन पुकारले आहे. वेतन वेळेवर अदा करावे व वेतनवाढ करार तत्काळ लागू करावा, अशी मागणी कामगारांनी कंपनी व्यवस्‍थापनाकडे केली आहे.

कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची मागणी अमान्य केल्याने कामगारांनी शुक्रवारी सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कंपनी व्यवस्थापन मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे.

या सुविधांचाही अभाव

ट्रायकॉम कंपनीत शेकडोच्यावर महिला काम करीत असताना त्यांना पिण्याचे पाणी व शौचालयाची सुविधा देखेली कंपनी व्यवस्थापनाने दिलेली नाही. याबाबत कामगार उपायुक्त कार्यालयात तक्रार करून देखील कंपनी व्यवस्थापनावर कार्यवाही होत नसल्याची खंत महिला कामगार व्यक्त करीत आहेत.

ट्रायकॉम कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे भविष्य निर्वाह निधी व कामगार विमा रुग्णालयाचे पगारातून कपातीतील पैसै गेले कुठे असा सवाल देखील कामगार उपस्थित करीत आहेत. याबाबत कामगारांनी अनेकदा कंपनी व्यवस्थापनाकडे मागणी करून देखील कामगारांचा पीएफ व इएसआससीचे पैसे भरण्यात आले नसल्याचे तक्रार कामगारांनी केली आहे. यासाठी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला मिरवूया बाइकसंगे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नारीशक्तीला सलाम करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'मार्फत आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीच्या नावनोंदणीला नाशिककर महिलांनी तुफान प्रतिसाद दिला. ही रॅली रविवारी म्हणजे आठ मार्चला बीवायके कॉलेजच्या मैदानापासून सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.

काळाप्रमाणे बदलणारी महिला आणि तीची खास मैत्रिण म्हणजे तीची बाइक. मग तिच्यासह मिरविण्याची संधी कोण सोडणार? त्यामुळेच 'मटा'च्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली आहे.

महिलांसाठी बाइक रॅलीची ही सुंदर संधी मटाने उपलब्ध करुन दिली आहे. ही रॅली महिला सक्षमीकरणाचेच एक प्रतिक आहे. ये नाशिककर महिलांनी निश्चितच सहभागी व्हायला हवे.

मृणाल दुसानीस, अभिनेत्री

मुलींना सतत एका मर्यादेतच पाहण्याची सवय समाजाला लागली आहे. ही सवय मोडून काढण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम व्हायलाच हवेत. मटाने हा खूप चांगला उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मुली आणि महिलांनी नक्कीच याचा लाभ घ्यायला हवा.

संस्कृती खेर, अभिनेत्री

रॅलीदरम्यान तुमचे लायसन्स तुमच्याबरोबरच असू द्या

हेल्मेट असेल तर ते निश्चित परिधान करा

ही रॅली असणार आहे रेस नाही. त्यामुळे सांगितलेल्या स्पीड लिमिटमध्येच गाडी चालवा.

रॅलीचा मार्ग ज्या पध्दतीने दिला आहे त्यानुसारच गाडी चालवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस, गारपिटीचा सोमवारी दणका?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला सोमवारी (ता.८) व मंगळवारी (ता. ९) गारपीट व अवकाळी पावसाच्या आपत्तीला सामोरे जावे लागू शकते. हवामान खात्याने तसा इशारा दिला आहे. या नव्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.

गेल्याच आठवड्यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्र अवकाळी पाऊस व गारपिटीला सामोरे गेला आहे. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना या आपत्तीसाठी सज्ज राहावे लागणार आहे. आठ आण‌ि नऊ मार्चला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा परिसरात पाऊस किंवा गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. लक्षद्व‌िप ते मालदीवदरम्यान हवेच्या वरच्या थरात प्रतिचक्रीवादळ घोंघावत असून, त्यामुळे येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येणार आहे. फेब्रुवारी अखेरीस झालेल्या पावसाने द्राक्ष, कांदा, गहू तसेच भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू असतानाच प्रशासकीय यंत्रणेला नव्याने पंचनामे करावे लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदामाई घेणार मोकळा श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

दक्षिण गंगा म्हटल्या जाणाऱ्या गोदावरी आता मोकळा श्वास घेऊ शकणार आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गोदावरीला तिचे पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी नदीपात्रालगतच्या अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी नाशिक महापालिका तसेच त्र्यंबकेश्वर नगरपालिका दिले आहेत.

गोदावरीच्या प्रदूषणाची दखल थेट मुंबई हायकोर्ट आणि पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने घेतल्यानंतर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठीच गोदापात्रालगतची अतिक्रमणे काढण्याचे फर्मान महापालिकेला देतानाच जिल्ह्यातील नदीकाठालगत ब्लू आणि रेड लाइन आखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. याबाबत एक महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

गंगापूर धरण ते नांदूरमध्यमेश्वर यादरम्यान गोदावरी नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे. गोदामाई प्रदूषणमुक्त व्हावी आणि तीने मोकळा श्वास घ्यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित तसेच अन्य काही जणांनी हायकोर्टात जनहित तर, त्र्यंबकेश्वरच्या गोदावरी प्रदूषणप्रश्नी पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाने नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेची (नीरी) सल्लागार म्हणून नेमणूक केली. तसेच, विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमून त्याचा अहवाल दर दोन महिन्यांनी कोर्टास देण्याचे निर्देशित केले आहे.

नदीपात्रालगत होणार मोजणी

त्र्यंबकेश्वरमध्ये नदीपात्र व त्यालगतच्या सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे हटविणे आवश्यक आहे. म्हणूनच गोदावरीच्या उगमापासून जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच्या नदीपात्र व त्यालगतच्या सरकारी जमिनींची तातडीने व नि:शुल्क मोजणी करावी, असे आदेश कुशवाह यांनी भूमी अभिलेख विभागाच्या अधिक्षकांना दिले आहेत. गोदावरी नदी बारमाही प्रवाहीत होण्यास मदत व्हावी म्हणून नदीच्या खोऱ्यात अॅक्विफर मॅपिंगची कार्यवाही तातडीने हाती घ्यावी आणि अॅक्विफर रिचार्ज करण्याबाबत उपाययोजना सूचवाव्यात, असे आदेशही भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटांवर उभारणार आयसीयू वॉर्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

सिंहस्थाच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीला तातडीने उपचारांची गरज भासलीच तर त्याला गर्दीतून वाट काढत हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणे मोठे दिव्य ठरणार आहे. म्हणूनच शहरात उभारण्यात येणाऱ्या सात घाटांवर तात्पुरत्या स्वरुपातील तंबूतच अतिदक्षता विभाग उभारण्यावर जिल्हा प्रशासन भर देणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. आरोग्य सुविधांचे नियोजन करताना जिल्ह्यातील आरोग्य संस्था, रुग्णालये, सेवाभावी संस्था, वैद्यकीय महाविद्यालयांसोबत समन्वय स्थापित करणे हा या बैठकीचा उद्देश होता. बैठकीला आमदार डॉ. राहुल आहेर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, इंडियन मेडीकल असोसिएशनचे डॉ. मनोज चोप्रा आदी उपस्थित होते.

आरोग्य सुविधांबाबत सहकार्य करण्यासाठी विविध संस्था आणि रुग्णालये पुढे येत असल्याने कुंभमेळ्यात भाविकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाईल, असा विश्वास डवले यांनी व्यक्त केला.

‍शासकीय यंत्रणेमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. सर्व संस्था आणि रुग्णालयांशी समन्वय राखण्यासाठी डॉ. रवींद्र चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कुंभमेळा कालावधीत २४ तास वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आवश्यक यंत्रणा राबविण्यासाठी तीन नियंत्रण पथके तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिली. आरोग्य सुविधांचे नियेाजन करताना प्रत्येक मार्गावर रुग्णवाहिकांची सुविधा, संदर्भित करावयाच्या रुग्णालयांचा कृती आराखडा, तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरविण्याबाबतचे नियेाजन आदी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

मोबाईल अॅप विकसित करणार

शहरातील आणि जिल्ह्यातील आरोग्य सेवांची माहिती लोकांना सहजगत्या उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात येणार आहे. आरोग्य सुविधांच्या मोबाईल अॅप्ससाठी रुग्णालयांनी संपर्क क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती समन्वयक अधिकाऱ्यांकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्ता तपासणी; नऊ संस्थांना साकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिक महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सिंहस्थ कामांचा दर्जा आणि गुणवत्तेच्या तपासणीसाठी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील आठ नामांकीत तांत्रिक संस्थांना साकडे घातले आहे. यात आयआयटी पवईसह, सीओईपी पुणे व मेरी या संस्थांचाही समावेश आहे. या संस्थांच्या होकाराची महापालिका प्रशासनाला प्रतीक्षा आहे. दरम्यान, महापालिकेचा महसुली खर्च ३५ टक्क्यांवर गेल्याने नोकरभरती करण्यास आयुक्तांनी नकार दिला आहे. सफाई कर्मचा-यांची कामे आऊटसोर्सिंगने करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

महापालिकेच्या वतीने सिंहस्थात करण्यात येत असलेल्या १०५२ कोटींचे रस्ते, साधुग्राम, गटारी आणि इलेट्रीकल्सच्या कामांच्या दर्जा व गुणवत्तेबददल सर्वत्र ओरड होत आहे. ठेकेदारांकडून करण्यात येत असलेल्या या कामांचा दर्जा निकृष्ठ असून, पालकमंत्री आणि जिल्हाधिका-यांनी या कामांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. गेडाम यांनी या कामांचा दर्जा तपासणीचा निर्णय घेतला असून, त्यासाठी राज्यातील नऊ तांत्रिक संस्थाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यात आयआयटी पवई, वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टीट्यूट मुंबई, व्हीएनआयटी नागपूर, सीओईपी पुणे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव, गर्व्हमेन्ट पॉलिटेक्निकल्स नाशिक, के. के. वाघ इजिंनिअरींग कॉलेज आणि मेरी या संस्थांचा समावेश आहे. सिंहस्थाची कामे तपासून त्यांचा दर्जा आणि गुणवत्तेचा अहवाल देण्याची विनंती आयुक्तांनी पत्राद्वारे केली आहे. या आठ संस्थापैकी जी संस्था काम करण्याची तयारी दर्शवेल, तिला या कामांच्या चौकशीचे काम दिले जाणार आहे. यासाठीचा आर्थिक मोबदलाही पालिकेच्या वतीने देण्यात येणार असून, निष्पक्ष अहवालाची अपेक्षा त्यांच्याकडून केली जाणार आहे. या संस्थाच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे ठेकेदारांसह अधिका-यामंध्ये खळबळ उडाली आहे.

नोकरभरतीला कायमस्वरूपी ब्रेक

नाशिक महापालिकेत सफाई कर्मचा-यांसह रिक्त असलेल्या जागांवर नव्याने सरसकट भरती करण्यास आयुक्तांनी नकार दिला आहे. पालिकेचा महसुली खर्च अगोदरच ३५ टक्क्यांच्या वर गेला आहे. त्यामुळे नोकरभरतीचा अतिरिक्त बोझा आता महसुली खर्चावर टाणे शक्य नसल्याचे सांगत ज्या पदांच्या भरतीला कायदेशीर अडचण नसेल, अशी पदे भरण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. सोबतच सिंहस्थासह नियमीत साफसफाईसाठी लागणा-या ४,२०० सफाई कर्मचा-यांची कामे आऊटसोर्सिंगद्वारे केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेच्या नोकरभरतीला पूर्णतः ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

आणखी एक अतिरिक्त आयुक्त भरणार

नाशिक महापालिकेचा समावेश आता ब वर्गात झाला असून, शासकीय नियमानुसार पालिकेत दोन अतिरिक्त आयुक्त असणे आवश्यक आहे. पालिकेत सध्या एकच अतिरिक्त आयुक्त आहे. त्यामुळे शासनाकडून आणखी एक अतिरिक्त आयुक्तांची मागणी केली जाणार आहे. सोबतच विद्यमान उपायुक्तांपैकी एकाला बढती देण्यांसदर्भात शासनालाच विनंती केली जाणार असल्याची माहिती डॉ. गेडाम यांनी दिली आहे. त्यामुळे पालिकेला दोन अतिरिक्त आयुक्त मिळण्याची शक्यता आहे.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजाने उभी करावी सपोर्ट सिस्टीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'करिअर आणि घर या दोन्ही पातळ्यांवर लढताना अनेक महिला करिअरपासून कायमच्या दुरावतात. हे टाळण्यासाठी त्यांच्या जबाबदाऱ्या सुसह्य करण्याची सपोर्ट सिस्टीम समाजानेच उभी करायला हवी', असा सूर 'महाराष्ट्र टाइम्स'मार्फत महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये उमटला. मुक्ता चैतन्य, दीप्ती राऊत, अॅड. वर्षा देशमुख, मधू चौगावकर, वासंती ठाकूर आणि दीपिका तांबे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

आज बहुतांश महिलांना घरच्या जबाबदाऱ्यांसाठी काही वर्षे करिअरपासून दूर राहावं लागतं. याच कालावधीत मेन स्ट्रीमपासून अनेकजणी बाजूला फेकल्या जातात आणि त्यांचं करिअरचं संपतं. हे टाळण्यासाठी समाजानेच वर्किंग वुमन्ससाठी सपोर्ट सिस्टीम विकसित करायला हवी असे मत या महिलांनी व्यक्त केले. कामाच्या ठिकाणीच या महिलांच्या लहान मुलांसाठी पाळणा घराची सुविधा निर्माण झाल्यास महिलांचे अर्ध्याहून अधिक प्रश्न सुटतील, असा मुद्दा यावेळी समोर आला.

आज महिलांना करिअरसाठी कोणी आडवत नाही पण करिअर करतानाही त्यांना घरच्या जबाबदऱ्यांसाठी गृहीत धरलं जात असल्याचं मत दीप्ती राऊत यांनी व्यक्त केलं. मुक्ता चैतन्य यांनी महिला स्वत:च्या आयुष्याबाबत फोकसड् नसल्याचा मुद्दा उपस्थित केला तर दीपिका तांबे यांनी महिला आणि पुरुषांच्या मानसिकतेतील फरकांचा उल्लेख यावेळी केला. मधू चौगावकर यांनी काळानुसार बदललेल्या महिलांच्या समस्यांचा गोषवारा घेतला. अॅड. वर्षा देशमुख यांनी करिअरसाठी आवश्यक असणाऱ्या घरच्यांच्या पाठिंब्याबद्दल वक्तव्य केले तर वासंती ठाकूर यांनी मानसिक स्वावलंबनाचा मुद्दा उपस्थित केला.

केवळ करिअरला प्राधान्य न देता करिअरबरोबरच कुटुंब व्यवस्थेलाही सांभाळण्यासाठी आज अनेक महिला धडपडत आहेत. समाजव्यवस्था त्यांच्या मार्गात अडथळा बनत असेल तर ती बदलण्याचे काम महिलांनीच करायला हवे असे, मत सर्वच सहभागी महिलांनी या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या समारोपात व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी स्वतःला गृहीत धरणं सोडा!

$
0
0

करिअर आणि घर या दोन्ही माझ्याच जबाबदाऱ्या असं गृहीत धरून महिला सुपरवूमन होऊ पाहत आहेत. हे गृहीत धरणंच त्यांना स्वत:च्या अस्तित्वापासून दूर घेऊन जात आहे. त्यामुळे आजही बहुतांश महिला मानसिक आणि आर्थिक संतुलन साधण्यापासूनही दूर राहिल्या आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आधी स्वत:ला गृहीत धरणं सोडा असा मौलिक सल्ला 'मटा' राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या निमित्ताने जमलेल्या विविध क्षेत्रातील महिलांनी दिला. मधू चौगावकर, मुक्ता चैतन्य, दीपिका तांबे, दीप्ती राऊत, अॅड. वर्षा देशमुख व वासंती ठाकूर या चर्चेत सहभागी झाल्या.

फोकसड् व्हा...!

महिलांची करिअर आणि घर या दोन्हींमध्ये समतोल साधताना होणारी तारेवरची कसरत म्हणजे आपण फोकसड् नसल्याचा परिणाम आहे. समाजव्यवस्था निश्चितच यासाठी जबाबदार आहे पण त्याआधी तुम्ही स्वत: जबाबदार आहात. नवऱ्याला चांगला पैसा मिळत असेल तर अनेक मुली सरळ नोकरी सोडून घरी बसतात आणि काही कालावधीनंतर त्यांचं अस्तित्वच राहत नाही. कित्येक जणी मुलाबाळांच्या जबाबदाऱ्यांदरम्यान करिअरमधून ब्रेक घेतात आणि कायमच्या घरी बसतात. मी स्वत: मुलीसाठी दोन वर्षांचा ब्रेक घेतला पण तो स्वत:च्या आनंदासाठी. या दरम्यानही मी मला काय करायचंय हे ठरवून घेतलं होतं. त्यानुसार दोन वर्षांनंतर पुन्हा कामाला सुरुवात केली. तुम्हाला घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी हव्या असतील तर त्यामध्ये बॅलन्स साधण्यासाठी तुम्ही तुमचे प्रेफरन्सेस ठरवायलाच हवेत. पण याचा अर्थ असा नाही की घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्याच आहेत. हा बॅलन्स तुमच्या मानसिकतेमध्ये हवा. आपल्याला हवं तस जगण्यासाठी आपणच पूरक परिस्थिती निर्माण करायला हवी. तुम्ही ठरवलं तरच तुम्ही तुम्हाला हवं तसं लाईफ बॅलन्स करु शकता, अन्यथा समाज व्यवस्था तुम्हाला टिकू देणार नाही. - मुक्ता चैतन्य, लेखिका

मानसिकदृष्ट्या स्वावलंबी व्हा

पूर्वीच्या काळी स्त्रीला नोकरी करणं किंवा आपल्या आवडीनुसार काम करणं यासाठी जितकी बंधनं होती ती परिस्थिती आता राहिलेली नाही. सध्याच्या परिस्थितीत स्त्रीला करिअरसाठी आणि त्यानंतर येणाऱ्या अडचणी पूर्णपणे बदलल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलायला हवा. घरामधून आपल्या करिअरला पोषक वातावरण मिळेलच याची प्रत्येकीला खात्री नसते पण तसं वातावरण निर्माण करणं आपल्या हातात आहे, हे प्रत्येकीने लक्षात घ्यायला हवे. जनरेशन गॅप, सामाजिक मानसिकता या सगळ्यांचा त्रास होणार असला तरीही स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असायलाच हवी. पूर्वीच्या महिलांची मानसिकता आता बदलली आहे, करिअरसाठी घरामधून मिळणारं स्वातंत्र्य हवं त्या प्रमाणात आहे. मात्र तरीही मानसिकता आणि जबाबदाऱ्या या दोन्ही गोष्टींचा समाजाने प्रामुख्याने विचार करायला हवा. समाज, कुटूंब या सगळ्या गोष्टी दूर लोटून मानसिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवं. खंबीरपणा सर्व अडथळे तोडण्याच्या कामी येऊ शकतो. - वासंती ठाकूर, व्यावसायिक

इच्छा तिथे मार्ग

घरच्यांचा प्रचंड विरोध असतानाही आज मी माझा स्वत:चा टी बार सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पण हे शक्य झालं ते केवळ माझ्या इच्छाशक्तीमुळे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात दिसत असल्या तरी तिथवर पोहोचण्यासाठी त्यांना लाख अडथळे पार करावे लागतात. अडथळ्यांना घाबरुन राहायचं असेल तर स्वप्न पाहण्याची गरजच नाही, कारण ती पूर्णच होणार नाहीत. स्त्री पुरुष मानसिकतेमध्ये असलेला फरक आजही आपल्याला पाहायला मिळतोच आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे परिस्थितीशी नेटानं लढा देणं. तुम्ही झगडणं बंद केलंत तर दुसऱ्यांचं काहीच बिघडणार नाही पण तुमचं मात्र निश्चितच नुकसान होईल. आजूबाजूच्या वातावरणानुसार स्वत:ला तयार करायला हवं व मार्ग काढायला हवा. मागच्या पिढीने ते केलं म्हणून आपल्याला हे दिवस पाहायला मिळत आहेत. आपण याच्या पुढचा टप्पा गाठायला हवा. जबाबदारी घेण्याची धमक आपल्यात आहेच पण म्हणून त्याचा गैरवापर होता कामा नये, मग तो कुटुंबाकडून असेल किंवा समाजाकडून. - दीपिका तांबे, व्यावसायिका

जबाबदाऱ्या शेअर करायला शिका

मुलांची जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हा बाईलाच नोकरी सोडावी लागते. तिथे पुरुष हात झटकून मोकळे होतात. हे चित्र बदलायला हवं. यासाठी तुम्हीच तयार व्हा, स्वत:ला प्रीझर्व्ह करा नाहीतर हा समाज तुम्हाला खाऊन टाकेल. यासाठी तुम्ही काही मर्यादा ठरवून घेतल्या पाहिजेत ज्या ओलांडण्याचा अधिकार कोणालाच असणार नाही. आजची समाज व्यवस्था कितीही बदलली असल्याचं वरवर दिसत असलं तरी ते सगळं झूठ आहे. करिअर करण्याचं स्वातंत्र्य तर तुम्हाला दिलं आहे पण त्यासाठी अाडकाठी ठरणाऱ्या जबाबदाऱ्यांमधून मात्र अद्याप तुम्हाला मुक्त केलेलंच नाही. यावर प्रत्येक महिलेने विचार करायला हवा आणि या जबाबदाऱ्या स्पष्टपणे शेअर करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. - मधू चौगावकर, जेंडर रिसर्चर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांनी’ रोवली मुहूर्तमेढ!

$
0
0

डॉ. सरल धारणकर

आधुनिक कालखंडात व्यवसायाच्या शिक्षणाचे ज्ञान स्वतंत्रपणे दिले जाण्याची सोय नव्हती. मात्र, परंपरागत शिक्षण घरच्या घरी स्त्रियांना आपोआप मिळत असे. हळूहळू शिक्षणाचा प्रसार होऊ लागला तसतसे स्त्रियांच्या कार्याचे क्षेत्र विस्तारले. अशा वातावरणात उद्योग-व्यवसायात महिलांचे कार्यक्षेत्र सुरू झाले. हळूहळू त्यात वाढ होत गेली. या आर्थिक क्षेत्रातील नाशिकमधील महिलांचा सहभाग फारसा नव्हता. परंतु, त्यांच्या कार्यामुळे पुढील काळातील उद्योगधंद्यांना चालना मिळत गेली.

सरस्वती फाळके यांचे नाव प्रथम समोर येते. एकोणिसावेशतक संपत आलेल्या काळात स्त्रियांना वैचारिक स्वातंत्र्य फारसे नव्हते. वयाच्या नवव्या वर्षी सरस्वतीबाईंचा विवाह दादासाहेब फाळके यांच्याबरोबर झाला. दादासाहेब चित्रपट बनविण्याच्या उद्योगात रममाण झालेले होते. हा जगावेगळा ध्यास सरस्वतीबाईंच्या लक्षात आला. दादासाहेबांनी इंग्लंडला जाऊन चित्रपट निर्मितीचे नवे तंत्रज्ञान घेतले होते. यासाठी त्यांना खूप खर्च झाला होता आणि हा खर्च वाढतही होता. पतीनिष्ठेमुळे सरस्वतीबाईंनी आपले दागिने पतीच्या स्वाधीन केले. या दागिन्यांच्या चांगल्या कामासाठी उपयोग होत आहे यावर त्यांचा भरवसा होता. अशा प्रकारे पतीबरोबर चित्रनिर्मिती व्यवसायात त्यांचा सहभाग सुरु झाला. ज्या काळात चित्रपट स्त्रियांनी पाहणे चांगले नव्हे, असे समजले जात होते त्याच काळात सरस्वतीबाईंचा व्यवसायात सहभाग सुरू झाला व तो यशस्वीही ठरला.

आणखी एक विशेष उदाहरण म्हणजे नाशिकमधील सायंटिफिक लॅबोरेटरीच्या संचालिका शांताबाई फाळके. पतीसमवेत शास्त्रीय उपकरणे, तक्ते, रसायने व अन्य प्रकारचे साहित्य पुरविण्याच्या व्यवसायात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांची यूएसएडब्ल्यु ही एजन्सी होती. रोज काम करताना पोटॅशियम सायनाईट सारखे रसायन, अॅसिटस्, फॉस्फरस सोडियमसारखे ज्वालाग्रही पदार्थ त्यांना हाताळावे लागत असे. या क्षेत्रातील कोणतेही ट्रेनिंग घेतलेले नसताना शांताबाईंनी या व्यवसायात सहभाग नोंदविला आणि त्यासाठी लागणारी कार्यक्षमता त्या काळात त्यांनी मिळवली.

परिस्थिती माणसाला बरेच काही शिकवून जाते व शिकायला भाग पाडते. तसेच काहीसे येसुबाई जोशी यांच्या बाबतीत झाले. त्या नाशिकच्या चितपावन संघाच्या गल्लीत मोठ्या वाड्यात राहत असत. घरातील कडक शिस्तीचे वातावरण. सत्याग्रहात पतीला अटक झाल्यानंतर आपल्या पाच मुलांना घेऊन न डगमगता त्यांनी घर सांभाळले. १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सहभागी झाल्याने त्याची झळ सर्वांनाच पोहचली होती. आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी येसूबाई जोशींनी छोटे-छोटे व्यवसाय करून घर सावरले. कलेपेक्षा अर्थसाधनेमध्ये त्यांनी लक्ष दिले.

याप्रमाणेच नाशिकच्या रागिणी वैद्य धडाडीच्या महिला होत्या. नाशिकच्या महिला वर्गाला त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिवणकाम, भरतकाम शिकवण्याचे वर्ग चालू केला. नाशिकमध्ये समाधान हॉटेलच्यावर त्यांच्या क्लासचा फलक लावलेला होता. नंतर चांदवडकर लेन येथे मुलींसाठी व स्त्रियांसाठी शिवणकाम व भरतकामाचा वर्ग चालू केला. यामध्ये कला शिकण्याबरोबर स्वावलंबी होऊन अर्थार्जनाकडे वळावे हाही हेतू त्यांचा यामागे होता. पारंपरिक कला, चालीरिती, सणवार, कुळधर्म, कुळाचार यात गुंतलेल्या महिलांना शिवणकाम, भरतकामाचा वर्ग सुरु केल्याने त्यांच्या कार्याला वेगळी दिशा मिळण्यास सुरुवात झाली. नाशिकमध्ये १९३० ते १९८० या काळात हा क्लास प्रसिद्ध होता. आजच्या काळात असे क्लास सुरू करणे म्हणजे विशेष नवीन वाटणार नाही. परंतु, त्या काळात घरातच वावरणा-या महिलांना अशाप्रकारे अर्थाजनाच्या दृष्टीने पाऊल टाकणे विशेष होते.

गृहिणी म्हणून घरची सर्व जबाबदारी सांभाळत घरच्या व्यवसायाला मदत करणे हा व्यवसायाचा भाग ठरला. नाशिकमधील प्रसिद्ध भगवंतराव हॉटेलच्या प्रारंभीच्या काळात अष्टपुत्रे कुटुंबातील महिलांनी घराच्या उंबरठ्याच्या आत राहून व्यवसायाचे मोठे व्यवस्थापन सांभाळले. उत्पादनासाठी हातभार लावला. या पार्श्वभूमीवर हॉटेलचा व्यवसाय वाढला. हे एक प्रारंभीच्या अर्थकारणातील उदाहरण ठरते. अष्टपुत्रेंच्या सरस्वतीबाईंनी आपल्याबरोबर आपल्या सुनांनाही हाताशी धरून कार्य नेटाने केले. व्यवसाय वाढीस लावला. हॉटेलसाठी लागणारे पदार्थ अनरसे, ताक, श्रीखंड इत्यादी घरी बनवले जात. नंतर ते विक्रीला जाई या पदार्थाना मागणीही मोठी होती. घरच्या महिलांनी घराच्या उंबरठ्याच्या आत राहून चालविलेले व यशस्वी केलेले असे हे हॉटेल म्हणजे या व्यवसायातील यश फलदायी ठरले असे दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात मुलींच्या शिक्षणाची सुरुवात झाली परंतु महाविद्यालयात शिक्षण घेणा-यांची संख्या फारशी नव्हती. नंतर त्यात वाढ होत गेली. तसे स्त्रिया नोकरीसाठी घराबाहेर पडल्या आणि त्यांचा अर्थकारणाकडे सहभाग सुरू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images