Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सभापती निवडीचा प्रस्ताव आयुक्तांकडे

$
0
0

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेला वेग आला असून, शुक्रवारी आयुक्तांकडून विभागीय आयुक्तांकडे निवडणूक प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव रवाना झाला आहे. त्यामुळे २२ मार्चनंतर निवडणुुकीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

नगरसचिवांकडून शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे निवडणूक प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला. समितीच्या १६ सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली असून, सभापतींची निवड घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आयुक्तांकडून सोमवारी किंवा मंगळवारी निवडणूक तारीख घोषित होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी कमीत कमी सात दिवसांचा कालावधी लागत असल्याने २२ तारखेनंतरची तारीख घोषित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्थायीचा प्रस्ताव गेल्यानंतर राजकीय पक्षांनीही रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह अपक्षांनीही उडी घेतली आहे. विशेषतः स्थायीत महिला उमेदवारांची संख्या १६ पैकी १० झाल्याने महिला सभापतीसाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. इच्छुकांनी सदस्यांना चाचपणीची मोहीम सुरू केली असून, मनसे आणि राष्ट्रवादीच्या वादात आता भाजपनेही उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेचे माजी पदाधिकारी व सध्या भाजपवासी झालेल्या माजी आमदार वसंत गिते यांनी भाजपचा सभापती होण्यासाठी आपल्या सर्वपक्षीय मैत्रीचा वापर करायला सुरुवात केली अाहे. मनसेला शह देवून भाजपमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी गिते प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दूषित पाण्यावरून तोडफोड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील फुलेनगरमधील कालिका वसाहतीत ड्रेनेजचे पाणी घुसल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी थेट पंचवटी विभागीय कार्यालयात घुसून ड्रेनेज विभागात दूषित पाणी ओतले. एवढ्यावरच न थांबता महिलांनी कार्यालयातील टेबल खुर्च्या उलट्या करीत कर्मचाऱ्यांच्या अंगावरही दूषित पाणी फेकल्याने तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे मनसेचे नगरसेवक डॉ. विशाल घोलप यांच्या उपस्थितीत नागरिकांनी आंदोलन केल्याने मनसेलाही घरचा आहेर मिळाला.

फुलेनगरमधील जवळपास शंभर घरामंध्ये ड्रेनेजचे पाणी घुसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी नगरसेवक डॉ. विशाल घोलप आणि पंचवटी विभागीय कार्यालयात केली होती. मात्र, त्याकडे यंत्रणेन दुर्लक्ष केले. त्यामुळे शुक्रवारी महिला आणि पुरूष पुन्हा डॉ. घोलप यांच्याकडे तक्रार घेऊन गेले. घोलप यांनी या सर्वांना घेऊन थेट पंचवटी विभागीय कार्यालय गाठले. यावेळी सुमारे शंभर महिला आणि पुरुषांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने महिलांच्या संतापाचा बांध फुटला. त्यांनी सोबत आणलेले दूषित पाणी थेट कार्यालयात ओतायला सुरुवात केली. तसेच गोंधळ घालत ड्रेनेज विभागातील टेबल व खुर्च्यांची मोडतोड करायला सुरुवात केली. उपस्थित कर्मचाऱ्यांच्या अंगावरही पाणी फेकले. कार्यालयातील खिडक्यांची काचेही फोडायला सुरुवात केली. विशेष म्हणजे सत्ताधारी मनसेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीतच जवळपास अर्धा तास हा प्रकार कार्यालयात सुरू होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थेट पोलिसांना पाचारण केले. पोलिस आल्यानंतर आंदोलक शांत झाले. कार्यालयाचे व फाईलींचेही नुकसान झाले आहे. या घंटनेची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांच्यासोबत त्यांनी फुलेनगरमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर तत्काळ ड्रेनेज बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश केले. आयुक्तांनीही या घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मनसेला घरचा आहेर

महापालिकेत मनसेची सत्ता असतानाही मनसेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत नागरिकांनी थेट विभागीय कार्यालयात धुडगूस घालत कार्यालयाचे नुकसान केले. त्यामुळे या आंदोलनाने मनसेलाच घरचा आहेर मिळाला आहे. मनसे सत्तेत असतानाही प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागत आहेत. तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिक नगरसेवकांच्या विनंतीलाही जुमानत नसल्याचे चित्र शहरात पहावयास मिळाले आहे.

घरामंध्ये पाणी घुसल्याच्या तक्रारी करून आठ दिवस लोटले तरी अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे आज प्रशासनाविरोधात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. नागरिक पाठपुरावा करतात मात्र अधिकारी दाद देत नसल्याचा अनुभव नगरसेवकांना येत आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. - डॉ. विशाल घोलप, नगरसेवक

दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आहे. नागरिकांनी तक्रार सोडवली नसल्याचे म्हटले आहे, तर अधिकाऱ्यांनी आंदोलनावेळी घटनास्थळी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा खुलासा केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. - डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मवीर एक्स्पोला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के के वाघ इंजिनीअरींग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल विभागाच्यावतीने आयोजित कर्मवीर एक्स्पोला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेत देशभरातील तब्बल ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांचे अत्यंत नावीन्यपूर्ण प्रकल्प यात सादर झाले असून, शनिवारी या एक्स्पोचा समारोप होणार आहे.

इलेक्ट्रिकल विभाग आणि आयईटी (युके) नाशिक लोकल नेटवर्क यांच्यावतीने या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या एक्स्पोच्या उद्घाटन समारंभप्रसंगी कॅटाफार्मा केमिकल्सचे चेअरमन डॉ. श्रीकांत कारवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कल्पना तंत्रज्ञानाने बदलतील. स्वतःवर भरवसा ठेवून काम करायला हवे. एक दिवस तंत्रज्ञान बदलेल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी एमएसएस इंडियाचे एमडी मंगेश नटाल, कोसो इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष उमेश वानखेडे, इलेक्ट्रो फॅबचे एमडी युत्कर्षा सांगवी, अविनाश शिरोडे, अजय कहाने, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी एक्स्पोची माहिती दिली. केंद्र सरकारने मांडलेल्या मेक इन इंडिया या संकल्पनेला या एक्स्पोमध्ये अधिक चालना देण्यात आली आहे. देशाच्या विविध भागातील विद्यार्थी एक्स्पोत सहभागी झाले असून, त्यांनी खासकरून समाजोपयोगी व अपारंपरिक ऊर्जेवर आधारीत प्रकल्प सादर केले आहेत. स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस डेपो कागदोपत्री पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथे नवीन बसडेपोचे काम पूर्ण झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात दोन महिन्याहून अधिक काळापासून येथे पंप बसू शंकलेला नाही. आताही कामे पूर्ण झाल्याचे कागदीघोडे नाचविणारे महामंडळ लवकरच पंप बसविला जाईल, असेच सांगण्यात मश्गूल आहे. त्यामुळे कुंभमेळा तोंडावर आला असताना हे काम पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात सर्व सरकारी विभागांनी सिंहस्थाच्या कामाचे सुक्ष्म नियोजन केले असताना महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे काम मात्र संथगतिने सुरू आहे. शहरात सध्या दोन बस डेपो आहेत. त्यांच्या माध्यमातून शहर वाहतुकीचे नियोजन करण्यात येत असते. गेल्या काही वर्षात शहराचा भौगोलिक विस्तार वाढल्याने शहराला आणखी एका बस डेपोची गरज होती. ही गरज ओळखून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथे नव्याने बस डेपो मंजूर करण्यात आला. त्याच्या कामाला देखील

सुरुवात करण्यात येऊन काही काम पूर्ण करण्यात आले. हा बस डेपो सुरु करण्यासाठी येथे पेट्रोल पंपाची आवश्यकता आहे.

या पेट्रोल पंपाचे काम अजून सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे पेट्रोल पंपाविना बस डेपो सुरू झाला, तर पेट्रोल भरण्यासाठी गाड्या नाशिकला येणार का असा प्रश्न आहे. नव्याने होत असलेल्या डेपोतील रस्ते मुरूम टाकून तयार करण्यात आले आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर येथे गाड्या आणणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे या डेपोतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत आहे. तसेच येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाही.

त्यामुळे कर्मचारी येथे काम कसे करणार याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. सिंहस्थात डेपो सुरू झाल्यानंतर अडचणींचे निराकरण करण्यास अवघड जाईल. नवा एसटी डेपो टप्प्याटप्याने प्रायोगिक तत्वावर सुरू करावा नाशिकरोड व आसपासच्या गाड्या तेथून सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.

काम पूर्ण झाल्याचा दावा

नाशिकरोडच्या डेपोचे काम पूर्ण झाल्याचा दावा एसटी प्रशासनाने ३१ जानेवारी रोजी दिवाकर रावते यांनी घेतलेल्या मिटिंगमध्ये केला होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही घेतलेल्या मिटिंगमध्ये काम पूर्ण झाल्याचा दावा महामंडळाने करून आपली पाठ थोपटून घेतली होती. महामंडळाच्या दृष्टीने काम पूर्ण झाले असेल, तर डेपो का सुरू केला जात नाही, असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसी कंपन्यांमध्ये पीएचडी सेंटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय पातळीवर औषधांचे उत्पादन करणाऱ्या फार्मसी कंपनीत संशोधन आणि विकासाचे काम चालत असेल तर तेथेच पीएचडीचे सेंटर सुरू करण्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रयत्नशील असल्याची माहिती कुलगुरु डॉ. अरुण जामकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात संशोधनाला अधिक चालना मिळणार आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एज्युकेशन अॅड रिसर्च (नायपर) ही संस्था नाशिकला स्थापन करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आयोजित 'मटा राऊंड टेबल कॉन्फरन्स'मध्ये डॉ. जामकर बोलत होते. नाशिकमध्ये ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या बहुराष्ट्रीय कंपनीचे अत्याधुनिक असा संशोधन आणि विकास विभाग (आर अँड डी) आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात विविध प्रकारच्या औषधांवर संशोधन करुन नवनवीन औषधे बाजारात आणली जात आहेत. अशा प्रकारचा विभाग हा त्या फार्मसी कंपनीची खऱ्या अर्थाने संपत्ती असते. ही बाब लक्षात घेऊन आणि संशोधनाला चालना मिळावी म्हणून त्या विभागालाच पीएचडी सेंटरची मान्यता देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे डॉ. जामकर यांनी सांगितले. विभागात काम करणारे अधिकारीच या सेंटरद्वारे विद्यार्थ्यांना गाईड म्हणून उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरात किंवा गावातच पीएचडीची संधी उपलब्ध होऊ शकेल. इच्छूक कंपन्यांनी त्यांचा प्रस्ताव विद्यापीठाला सादर करावा, असे आवाहनही कुलगुरुंनी केले आहे. फार्मसी कंपन्यांना करावयाच्या संशोधनाचा विषय विद्यार्थ्यांना दिला तर विद्यार्थी याच विषयात प्रकल्प सादर करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण असा विषय मिळेल तर कंपनीला त्या विषयातील संशोधन करुन माहिती उपलब्ध होईल. शिक्षण क्षेत्र आणि उद्योग यांची सांगड घालण्यास ही बाब अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास डॉ. जामकर यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी धिंगाणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुरुवार पाठोपाठ शुक्रवारीही जिल्ह्याच्या काही भागाला अवकाळी पाऊस व गारपिटीचा सामना करावा लागला. दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसासह तुफान गारपीट झाली. तसेच, येवला, नांदगाव व जिल्ह्याच्या इतर भागांतही जोरदार पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. दिंडोरी तालुक्यात काही भागात चार इंचाचे गारांचे थर साचले होते. रात्री उशिरापर्यंत अवकाळीचे थैमान सुरूच होते. गहू, कांदा व भाजीपाल्याचेही मातेरे झाले आहे.

दिंडोरी तालुक्यात ओझरखेड, वणी-पिंपळगाव परिसर, मावडी फाटा, बहादुरी, तीसगाव येथे तुफान गारपीट झाली. शेतामध्ये सुमारे चार इंचाचा गारांचा थर साचला होता. शेतात पांढरी चादरच पसरल्याचे दृश्य दिसत होते. या भागात निर्यातक्षम द्राक्षे मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असल्याने द्राक्ष उत्पादकांवर कु-हाडच कोसळली आहे.

निफाड तालुक्यात लासलगाव, विंचूर, नैताळे, शिवरे फाटा, निफाड, कोठुरे, पिंपळस, चांदोरी आदि भागात अवकाळी पावसाच्या सारी कोसळल्या आहेत. नांदगाव व येवला तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. गेल्या मार्चची पुनरावृत्ती गेल्या वर्षी मार्च महिन्यातच तुफान गारपीट झाली होती. ४, ५, ६, ९ व १३ मार्च या काळातच अवकाळी पाऊस व गारपिटीचा मारा झाला होता. यंदा पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याची विक्रमी आवक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याची विक्रमी आवक झाली. दिवसभरात तब्बल ४५ हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली होती. कांदा विक्रीसाठी सुमारे २२०० वाहने बाजार समितीत दाखल झाल्याने बाजार आवर गर्दीने फुलून गेले होते.

एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणत आवक झाल्याने लासलगावच्या मुख्य रस्त्यांवर कांद्याच्या ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेकवेळा ट्रॅफिक जॅम झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. सध्या निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. तयार झालेला कांदा अवकाळी पावसात खराब होण्याची भीती असल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. त्यातच रविवारी साप्ताहिक सुट्टी व सोमवारी माथाडी कामगारांनी मुंबई येथे एक दिवसाचा संप करणार असल्याचे जाहीर केल्याने सोमवारीही बाजार समिती बंद राहणार आहे. सलग सुट्यांमुळे व बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन वाढीसाठी सर्व्हेक्षण गरजेचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टुरिझम वाढविण्यासाठी नामांकीत व्यावसायिक संस्थेकडून सर्व्हेक्षण व्हायला हवे. तसेच, हेरिटेज वॉकची संकल्पना अस्तित्वात आणायला हवी, असा सूर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि ट्रॅव्हल एजन्टस् असोसिएशन ऑफ नाशिक (तान) द्वारे आयोजित नाशिक टुरिझम कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन सोहळ्यात उमटला.

हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आयोजित तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रामचंद्र भोगले, राधाकिसन चांडक आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. पर्यटनवाढीसाठी टूर कंपन्यांनी नाशिकला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. परिषदेत देशरातील टूर कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

पर्यटनाच्या दृष्टीने ना‌शिकच्या वैशिष्ट्यांची माहिती त्यांना देण्यात आली. नाशि‌कमध्ये अजूनही हॉटेल्सची संख्या कमी आहे. ती वाढायला हवी, अशी अपेक्षा महापौर मुर्तडक यांनी व्यक्त केली. तर, पर्यटन वाढीसाठी पर्यटन विकास आराखडा तयार करून तो अंमलात आणता येऊ शकतो, असा विश्वास बग्गा यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये पर्यटनस्थळे आहेत. परंतु, अजूनही सोयी सुविधांची कमतरता असल्याची खंत आयुक्त डॉ. गेडाम यांनी व्यक्त केली.

हॉटेल गाईड या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. राधाकिसन चांडक, नारायण शेलार आणि महेंद्रपाल चौधरी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र चेंबर्सचे संतोष मंडलेचा, तानचे दत्ता, सिराज शेख आदींनी परिश्रम घेतले. उमेश पठारे, जयंत ठोंबरे, अनुराधा मटकरी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभापती निवडीचा प्रस्ताव आयुक्तांकडे

$
0
0

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेला वेग आला असून, शुक्रवारी आयुक्तांकडून विभागीय आयुक्तांकडे निवडणूक प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव रवाना झाला आहे. त्यामुळे २२ मार्चनंतर निवडणुुकीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

नगरसचिवांकडून शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे निवडणूक प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला. समितीच्या १६ सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली असून, सभापतींची निवड घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आयुक्तांकडून सोमवारी किंवा मंगळवारी निवडणूक तारीख घोषित होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी कमीत कमी सात दिवसांचा कालावधी लागत असल्याने २२ तारखेनंतरची तारीख घोषित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्थायीचा प्रस्ताव गेल्यानंतर राजकीय पक्षांनीही रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह अपक्षांनीही उडी घेतली आहे. विशेषतः स्थायीत महिला उमेदवारांची संख्या १६ पैकी १० झाल्याने महिला सभापतीसाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. इच्छुकांनी सदस्यांना चाचपणीची मोहीम सुरू केली असून, मनसे आणि राष्ट्रवादीच्या वादात आता भाजपनेही उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेचे माजी पदाधिकारी व सध्या भाजपवासी झालेल्या माजी आमदार वसंत गिते यांनी भाजपचा सभापती होण्यासाठी आपल्या सर्वपक्षीय मैत्रीचा वापर करायला सुरुवात केली अाहे. मनसेला शह देवून भाजपमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी गिते प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाण्यावरून तोडफोड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील फुलेनगरमधील कालिका वसाहतीत ड्रेनेजचे पाणी घुसल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी थेट पंचवटी विभागीय कार्यालयात घुसून ड्रेनेज विभागात दूषित पाणी ओतले. एवढ्यावरच न थांबता महिलांनी कार्यालयातील टेबल खुर्च्या उलट्या करीत कर्मचाऱ्यांच्या अंगावरही दूषित पाणी फेकल्याने तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे मनसेचे नगरसेवक डॉ. विशाल घोलप यांच्या उपस्थितीत नागरिकांनी आंदोलन केल्याने मनसेलाही घरचा आहेर मिळाला.

फुलेनगरमधील जवळपास शंभर घरामंध्ये ड्रेनेजचे पाणी घुसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी नगरसेवक डॉ. विशाल घोलप आणि पंचवटी विभागीय कार्यालयात केली होती. मात्र, त्याकडे यंत्रणेन दुर्लक्ष केले. त्यामुळे शुक्रवारी महिला आणि पुरूष पुन्हा डॉ. घोलप यांच्याकडे तक्रार घेऊन गेले. घोलप यांनी या सर्वांना घेऊन थेट पंचवटी विभागीय कार्यालय गाठले. यावेळी सुमारे शंभर महिला आणि पुरुषांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने महिलांच्या संतापाचा बांध फुटला. त्यांनी सोबत आणलेले दूषित पाणी थेट कार्यालयात ओतायला सुरुवात केली. तसेच गोंधळ घालत ड्रेनेज विभागातील टेबल व खुर्च्यांची मोडतोड करायला सुरुवात केली. उपस्थित कर्मचाऱ्यांच्या अंगावरही पाणी फेकले. कार्यालयातील खिडक्यांची काचेही फोडायला सुरुवात केली. विशेष म्हणजे सत्ताधारी मनसेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीतच जवळपास अर्धा तास हा प्रकार कार्यालयात सुरू होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थेट पोलिसांना पाचारण केले. पोलिस आल्यानंतर आंदोलक शांत झाले. कार्यालयाचे व फाईलींचेही नुकसान झाले आहे. या घंटनेची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांच्यासोबत त्यांनी फुलेनगरमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर तत्काळ ड्रेनेज बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश केले. आयुक्तांनीही या घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मनसेला घरचा आहेर

महापालिकेत मनसेची सत्ता असतानाही मनसेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत नागरिकांनी थेट विभागीय कार्यालयात धुडगूस घालत कार्यालयाचे नुकसान केले. त्यामुळे या आंदोलनाने मनसेलाच घरचा आहेर मिळाला आहे. मनसे सत्तेत असतानाही प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागत आहेत. तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिक नगरसेवकांच्या विनंतीलाही जुमानत नसल्याचे चित्र शहरात पहावयास मिळाले आहे.

घरामंध्ये पाणी घुसल्याच्या तक्रारी करून आठ दिवस लोटले तरी अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे आज प्रशासनाविरोधात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. नागरिक पाठपुरावा करतात मात्र अधिकारी दाद देत नसल्याचा अनुभव नगरसेवकांना येत आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. - डॉ. विशाल घोलप, नगरसेवक

दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आहे. नागरिकांनी तक्रार सोडवली नसल्याचे म्हटले आहे, तर अधिकाऱ्यांनी आंदोलनावेळी घटनास्थळी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा खुलासा केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. - डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात पिके झाली भुईसपाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तेल ही गेले आणि तूपही गेले हाती धुपाटणे आले, अशी काहीशी गत बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. गत तीन दिवसांपासूनच्या अवकाळी पावसानंतर शनिवारी झालेल्या पावसाने सारे काही हिरावून नेले आहे.

बागलाण तालुक्यात गत तीन दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतीपिके पूर्णत: नष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतीपिके पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत. पावसाळी वातावरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. द्राक्ष, डाळिंब, कांदा या सारख्या नगदी पिकांपासून भाजीपाला, गहू, हरभरा, ही सगळीच पिके हातची जाणार असल्याने तालुक्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.

शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार सरींनी शहराला झोडपून काढले. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास देखील पुन्हा एकादा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील जनजीवन काही काळ ठप्प झाले होते. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी तालुक्यातील अनेक भागात जावून शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

तालुक्यात वादळी वारे व पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला असताना देखील गारपीट न झाल्याने आंबा पिकाला होणारी हानी टळली असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात असताना गव्हाबरोबरच कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, कृषी अधिकारी डी. के. कापडणीस यांना तातडीने तालुक्यातील शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आपण विधानसभेत लक्षवेधी करणार असल्याची भूमिका देखील आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडमध्ये १,६८५ शेतकऱ्यांचे नुकसान

$
0
0

अवघ्या काही दिवसांपूर्वी अचानक आलेल्या गारपिटीमुळे चांदवड परिसरातील शेतकरी जरा कुठे सावरत असताना पुन्हा शुक्रवारी रात्रीसह शनिवारी आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने चांदवड परिसरातील १२ गावातील तब्बल १६८५ शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, कांदा आणि द्राक्ष पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान करीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. शनिवारी उशिरापर्यंत अवकाळीचे तांडव सुुरू होते.

शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या गारपिटीने चांदवड तालुक्यातील बहादुरी, बोराळे, शिवरे, जांबुटके, दह्याने, पारेगाव, दुधखेडा, नवापूर, विजयनगर, इंदिरानगर यासह विविध गावातील पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी केली आहे. एकूण १६८५ शेतकऱ्यांच्या ८६० हेक्टरवर निसर्गाने आसूड ओढला आहे. गहू २०० हेक्टर, हरभरा ९० हेक्टर, कांदा २१० हेक्टर आणि द्राक्ष ३६० हेक्टरवरील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सर्वाधिक नुकसान द्राक्ष उत्पादकांचे झाले असून, कांदे सडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही महिन्यात सलग अवकाळी पाऊस आणि गारपीट यांनी चांदवड परिसरात धुमाकूळ घातल्याने आभाळ कोसळलेय फिर्याद कुठे करायची अशी सर्वांची अवस्था असल्याचे चित्र आहे. दरम्यान या नुकसानीची शासकीय नोंद करण्यात आली आहे.

मनमाड-नांदगावला पाऊस

मनमाडला विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नांदगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. आमोदे येथे एक पारडू मृत्युमुखी पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीचे संकट हटता हटेेना...!

$
0
0



टीम मटा : सततच्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी जिल्हाभर अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले. सिन्नर, निफाड, दिंडोरी तालुक्यात गारपिटीने तांडव घातले आहे, तर उर्वरित तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवली. कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सिन्नर तालुक्यात सलग दोन दिवस गारपीट झाली. यामुळे कांदा, डाळिंब, द्राक्ष, गहू या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच निफाड तालुक्यात शुक्रवारी पाऊस तर शनिवारी गारपीट झाली. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. चांदवड व दिंडोरी तालुक्यातही गारपिटीने थैमान घालत होत्याचे नव्हते केले आहे. कळवण, मालेगाव, सटाणा, नांदगाव, येवला या तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.
निफाडला गारपिटीचा तडाखा
निफाड तालुक्यात अवकाळी पावसाचा व गारपिटीचा कहर सुरूच असून, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाचे पंचनामे पूर्ण होता न होतात तोच पुन्हा शुक्रवारी व शनिवारी तालुक्याला अवकाळी पाऊस व गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. सततची गारपीट, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाने शेती व्यवसाय संकटात सापडल्याने कष्टकरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील अनेक भागात तुफान पाऊस झाला, तर शनिवारी सायंकाळी लासलगाव, नैताळे, उगाव, शिवडी, निफाडच्या गोदाकाठातील औरंगपूर, भेंडाळी, भुसे, चापडगाव, आदी काही गावांमध्ये गारपीट झाली. गारपिटीमुळे सर्वात जास्त नुकसान द्राक्षबागांचे होणार असून, शनिवारी निफाड तालुक्यातील द्राक्षपंढरी समजल्या जाणाऱ्या उगाव - शिवडी परिसरातही गारपीट झाल्याने नुकसानीच्या आकड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निर्यातक्षम द्राक्ष, दर्जेदार कांदा, डाळिंब आदी पिकांचे उत्पादन घेण्यात व नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून आधुनिक शेती जोपासण्याकडे कल असलेल्या निफाड तालुक्यातील शेती व्यवसायाला या अस्मानी संकटामुळे जबरदस्त हादरा बसला असून, करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी अंगाचा थरकाप उडविणाऱ्या मेघगर्जनेसह आलेल्या अवकाळी पावसात तालुक्यातील लासलगाव, निफाड, विंचूर, नैताळे, शिवरे, नांदुरमध्यमेश्वर, भेंडाळी, औरंगपुर, सायखेडा, चांदोरी आदी गावांसह जवळपास २४ गावांमधील १२०० शेतकऱ्यांना फटका बसला असून नव्याने सुमारे ८०० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे, कांदा, गहू व इतर शेतमालाचे नुकसान झाले असून, शनिवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीने नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता असल्याची प्राथमिक माहिती निफाडचे तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांनी दिली.

उरल्यासुरल्या अपेक्षांवर पाणी

मालेगाव शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या ‌दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसला. सतत ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि अवघ्या काही वेळात होत्याचे नव्हते करणारा मुसळधार बेमोसमी पावसामुळे उरल्यासुरल्या अपेक्षांवर पाणी फिरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. सलग तिसऱ्या ‌दिवशी पावसाने झोडपल्याने नक्की नुकसान झाले किती हे पहायला देखील काही शिल्लक नाही. रब्बी हंगामतील गहू हराभरा पिके अगदी काढणीवर आलेली असताना अवकाळी पावसाने कांदा, गहू, हराभरा पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे. खरीप हंगामात काही हाती आले नाही. रब्बीतही शेती व्यवसायावर अवकळा पसरल्याने शेतकरी हालदिल झाला आहे.

दरम्यान, मालेगाव वेधशाळेच्या अंदाजनुसार शनिवारी सायंकालपर्यंत ८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. आद्रतेचे प्रमाण लक्षात घेता येत्या २४ तासात सतत ढगाळ वातावरण कायम राहणार असून, अवकाळी पावसाची भीती कायम आहे. महसूल विभागाकडून नुकसानीचा अंदाज घेतला जात असून, गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाने तालुक्यात तीन गावात चार बैल मृत झाल्याचे समजते. अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. पंचनाम्यानंतरच नुकसानीचा अंदाज येणार आहे.

गेल्या दोन दिवसात झालेला अवकाळी पाऊस म्हणजे निसर्गाचा प्रकोप म्हणावा की काय असे वाटत आहे. कधी कडकडीत ऊन पडते, तर अचानक काळेकुट्ट ढग उभ्या पिकावर तुटून पडत आहे. मात्र, खरीप तर गेला पण आता रब्बी हंगामात देखील होत्याच् नव्हतं झाल आहे.

- समाधान पवार, शेतकरी

सिन्नरला गारांचा खच

सिन्नरच्या पूर्व व पश्चिम भागातील गावांना शुक्रवारी दुपारी, तर शनिवारी सकाळी गारपीट आणि वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपले. अवकाळीच्या पावसाने द्राक्ष, डाळिंब बागा आणि गहू, कांदा, ज्वारीसह इतर रब्बीच्या पिकांचे अतोनात झाले आहे. गेल्या दोन तीन दिवसात पावसाने शेतात उभ्या असलेल्या रब्बीच्या पिकाचा बोजवारा उडवला आहे. हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. वडांगळी, देवपूर, सांगवी, सोमठाणे, तसेच डुबेरे, सोनांबे, कोनांबे व सिन्नर शिवारातील उभ्या पिके शेतात आडवी झाली. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. गेल्या आठवड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाही तोच पुन्हा गारपिटीचा तडाखा बसला. रब्बी हंगामातील पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. तसेच विघनवाडी, लक्ष्मणपूर, दहिवाडी, मिठसागरे, शहा, कारवाडी आदी भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले. अवकाळीच्या तडाख्यात डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या. भरतपूर येथील सुधाकर गोरडे यांची पाच एकर शेवग्याची बाग उद‌्ध्वस्त झाली. या परिसरात सुमारे १५ मिनिटे सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्याने शेतातील गहू, हरभरा, मका, कांदे या पिकांबरोबरच द्राक्षे आणि डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वडांगळीसह कीर्तांगळी, सांगवी, सोमठाणे, खडांगळी, हिवरगाव, देवपूर, शहा, भरतपूर, गुळवंच, बारागावपिंप्री, निमगाव तसेच नांदूरमध्यमेश्वर उजव्या कालवा भागातील बागायती पट्ट्यातील गावांना तुफानी गारांचा फटका बसला. रस्त्यात शेतात गारांचा खच पडला होता. तुफान गारपीट व पावसाने या परिसरातील शेती पूर्णतः नामशेष झाली. आधीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे झालेले नसताना पुन्हा अवकाळी पावसाने नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकुपोषण

$
0
0

>> डॉ. शाम अष्टेकर

मेळघाट आणि नंदुरबार किंवा जव्हार मोखाड्यातल्या आदिवासी बालकांचे कुपोषण आपण नेहमी वाचतो, ऐकतो. पण, आपल्या घरामध्ये मुले कुपोषित आहेत की काय याची आपल्याला शंकादेखील येत नाही आणि जागृत मध्यमवर्गालाही याबद्दल नीट माहिती नसते. कुपोषण अनेक प्रकारचे असते. पण, त्याचे दोन मुख्य प्रकार म्हणजे पोषणाची कमतरता (अल्पपोषण) आणि त्याउलट अतिपोषण किंवा स्थूलता. पूर्वी एखादे मूल लठ्ठ आहे, अशी शक्यता अगदीच कमी असायची, इतका की तो चर्चेचा विषय व्हायचा. बहुतेक वेळा अशी मुले काही ना काही संप्रेरक आजारांनी स्थूल झालेली असायची. मात्र, आता आपले मूल लठ्ठ होणे हे एक प्रकारचे कुपोषण आहे हे लक्षात यायला देखील खूप उशीर झालेला असतो. काही लोक तर याला चक्क गुटगुटीतपणा समजतात. खरे म्हणजे हा आपण ओढवून घेतलेला चक्क एक आजार आहे आणि तोही एक मोठा आजार.

मूलत: भारतीय वंशाच्या जन्मजात बाळांमध्ये देखील (ते सरासरी कमी वजनाचे असले तरी ) एक अंतर्गत लठ्ठपणा असतो असे अभ्यासात दिसून आले आहे. भारतीय बाळांच्या पोटामध्ये चरबीचा साठा ज्यादा असतो आणि त्याचे कारण कदाचित दुष्काळी परिस्थितीशी निसर्गाने जुळवून घेतलेली एक जनुकीय सोय आहे. मध्यमवर्गीय व उच्चमध्यम वर्गीय बालकांना गरजेपेक्षा अधिक खाऊ घालणे, जंक फुडस् म्हणजे खूप तेलकट किंवा गोड मिठाई वगैरे वस्तू खाऊ घालणे आणि त्या मानाने खेळण्या बागडण्याच्या किंवा कामाच्या बाबतीत बंधने घालून लाडोबा करून ठेवणे हे चुकीचे आहे, हे कळायलाच मुळी वेळ जातो. बालमजुरी वाईट असली तरी बालकांनी आपल्या घरात आई-वडिलांबरोबर घरगुती किंवा कौटुंबिक उद्योगात थोडेफार श्रम करणे ही गोष्ट सामान्यपणे चांगली समजायला पाहिजे. पण, त्यांना कामे सांगणे (विशेषत: मुलांना कामे सांगणे) म्हणजे काहीतरी चुकीचे आहे, असा आपण ग्रह करून घेतला आहे. गणिताच्या उदाहरणाप्रमाणे एखाद्या हौदात मोठ्या तोटीने पाणी पडत असेल आणि छोट्या तोटीने बाहेर पडत असेल तर तो हौद लवकर भरत जाईल. शरीरात देखील उर्जा खर्च करण्यापेक्षा अधिक भरली गेली, तर ती चरबी म्हणून साठते. ही चरबी पोटावर, पोटात, पाठीवर, नितंबांवर, हातपाय आणि चेहऱ्यावर देखील साठून राहते. पुढे पुढे तर यकृतामध्ये देखील चरबीचा अतिरिक्त साठा होऊन फॅटी डिजनरेशन ऑफ लिव्हर म्हणजे यकृत पेशींचा बिघाड होऊ शकतो. वाढीव चरबीमुळे मुले आणखीनच संथ व आळशी होतात. पण, वारंवार आणि जास्त खाणे हे थांबत नाही, उलट वेळ जाण्यासाठी किंवा कंटाळा आला म्हणून मुले अधिक खायला लागतात. समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. कधीकधी आई-वडील याबद्दल टोचून बोलतात आणि इतर मुलांकडून किंवा शाळेत थोडी टवाळीही होऊ शकते. छोट्या कुटुंबात आई-बापांना मुलांकडे नीट लक्ष द्यायला वेळ देखील नसतो, त्याने त्यांचे आणि मुलांचे संबंधही ताणलेले असतात. अशी टीका टिपणी किंवा रागीट सल्ले ऐकण्याची मुलांची मन:स्थिती नसते. आपल्या शरीरात जमलेल्या चरबीचे काय करायचे हे लहान मुलांना माहीत असणे कदापि शक्य नाही. ही समस्या बालपणातून पौगंडावस्थेत वाढतच जाते. फारच कमी मुले यातून सुटू शकतात.

लहानपणापासून मुलांना आपण चालायला देखील जवळ जवळ मज्जाव करतो. शाळांसाठी बस, रिक्षा किंवा स्कूटरवर सोडणे, एखादी वस्तू आणायला देखील दुकानात न जाणे आणि शाळे व्यतिरिक्तचा वेळ शिकवण्या किंवा टीव्ही यात गुरफटून जातो. बाहेरच्या निसर्गाला आणि मैदानांना आपणच त्यांना पारखे करून ठेवलेले आहे. शारीरिक हालचाल व कष्ट यापासून दुरावलेला हा आपला समाज पुढच्या पिढीला अतिकुपोषणाच्या खाईत लोटत आहे. यातून या मुलांची तरुणपणात व पुढे देखील सुटका होण्याची संधीच निर्माण होत नाही. एखादा हितचिंतक, शिक्षक किंवा मित्र चांगला मिळाला तरच प्रयत्नपूर्वक यातून सुटकेची काही शक्यता असते.

शहरांमधली अनेक मुले लठ्ठ आणि बेढब झालेली आढळतात. अपेक्षित वजनाच्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक वजन म्हणजेच स्थूलता. लठ्ठपणा मोजण्याचे अनेक मापदंड आहेत. मुख्य म्हणजे वजन-उंची गुणोत्तर. पोटाचा घेर, त्वचेखालील चरबीची घडी हेही मापदंड उपयुक्त आहेत. सध्या सगळ्यात उपयुक्त मापदंड म्हणजे 'वजन (किग्रॅ) भागिले मीटरमध्ये उंचीचा वर्ग' हे गुणोत्तर २३ पेक्षा जास्त असेल तर वजन जास्त आहे असे समजावे आणि २८ पेक्षा जास्त असेल, तर चक्क लठ्ठपणा आहे असे सिद्धच होते. या लठ्ठपणाचे अनेक गंभीर दुष्परिणाम होतात. पुढे मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयविकार, कर्करोग, गुडघेदुखी वगैरे संभवतात. लैंगिक क्षमता व अपत्य होण्याची शक्यताही कमी होऊ शकते. व्यक्तीमत्वाबद्दलच्या पौगंडावस्थेतील प्रतिमा आणि वास्तव यातील विसंगतीमुळे मानसिकदृष्ट्या मूल विचलित होऊ शकते.

रोग होण्यापेक्षा प्रतिबंध चांगला हे या बाबतीत तरी फारच खरे आहे. मुलांच्या रोजच्या आहारात उष्मांकाबरोबर समतोल प्रमाणात चांगली प्रथिने, भाज्या व फळे असणे महत्त्वाचे असते. साखर, मीठ, तेल कमी करण्याकडे कटाक्ष असायला हवा. मूल तिसऱ्या-चौथ्या वर्षापासूनच सकाळ-संध्याकाळ १-२ तास खेळेल याकडे नक्की लक्ष द्यायला हवे. आपल्याबरोबर छोटी मोठी कामे करणे, दुकानातून वस्तू आणणे, शाळा थोड्या अंतरावर असेल तर सायकलने किंवा चालत जाणे, टीव्हीचा मर्यादित आणि कल्पक उपयोग

आणि वजन-उंची व स्नायू वाढीकडे चौकसपणे लक्ष ठेवणे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळवून देणे हे पालकांचेच काम आहे. याला फारसा खर्च येत नाही पण, आपली संस्कृती बदलावी लागते. आपले शारीरिक काम कमी मोबदल्यात इतर वर्गांवर टाकून शेवटी आपल्या पिढीचे अकल्याण होत आहे याकडे आपण एक शहरी समाज म्हणून लक्ष देणार आहोत का?

(लेखक वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूरला मिळणार ग्रामीण रुग्णालय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानास भेट दिली. सावरकरांच्या स्मारकासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही देतानाच भगूरमध्ये ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

डॉ. सावंत यांनी शनिवारी आपल्या धावत्या नाशिक दौ-यात सावरकर यांच्या जन्मस्थानास भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, शिवसेना महानगरप्रमुख अजयजी बोरस्ते, भगूर नगरपालिका अध्यक्षा अनिता करंजकर यांनी त्यांचे स्वागत केले. सावरकरांच्या स्मारकासाठी निधी देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष करंजकर यांनी भगूरमध्ये ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली. त्यावेळी सांवत यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. नगरसेवक संजय शिंदे, विक्रम सोनवणे, शाम ढगे, दीपक बलकवडे, बापू शेटे, नगरसेविका सुनीताताई गणोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरसाठी आशा पल्लवित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या प्रस्तावित टप्यात सर्व संबंधितांची बैठक घेवून नाशिकचा समावेश करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत शुक्रवारी विधानपरिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले. आमदार जयंत जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आश्वासन दिले. आता या कॉरिडोरमध्ये नाशिकचा समावेश होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या विद्यमान टप्यातून नाशिकला वगळण्यात आल्याची खळबळजनक माहिती १६ जानेवारी २०१५ मध्ये निदर्शनास आली होती. सदर डीएमआयसी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या उद्योगांकरिता नाशिकमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याचा जलसंपदा विभागाने अहवाल दिल्यानंतर मराठवाड्यातील शेंद्रा आणि बिडकीन यांची निवड डीएमआयसी विद्यमान टप्यात केल्याचे निदर्शनास आले. हे खरे आहे काय? असल्यास जिल्ह्यात २३ लहानमोठी धरणे असल्याने त्यातून नाशिकसह अंशतः मुंबई मराठवाड्यालाही पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर डीएमआयसी विद्यमान टप्यात नाशिकचा समावेश करण्यासाठी शासनामार्फत तातडीची उपाययोजना केली आहे काय? असा प्रश्न आमदार जाधव यांनी विचारला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्हीसाठी पुनर्निविदा प्रसिध्द

$
0
0

शहरासाठी एक, तर त्र्यंबकसाठी तीन ठेकेदार उत्सुक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात तसेच त्र्यंबकेश्वर येथे बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीसाठी पोलिस प्रशासनाने पुनर्निविदा प्रसिध्द केली आहे. शहरासाठी फक्त एक, तर ​त्र्यंबकेश्वर येथे सीसीटीव्ही बसवण्यासाठी तीन ठेकेदारांनी मुदतीत अर्ज केले. इच्छुक ठेकेदारांची संख्या वाढवण्यासाठी निविदा पुनर्प्रसिध्द करण्यात आल्याचे पोलिस प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. शहरात ३४८, तर त्र्यंबकेश्वरमध्ये २०८ सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान शहरात तसेच त्र्यंबकेश्वरला लाखो भाविक, साधु-महंत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव गतवर्षी समोर आला होता. मात्र, कॅमेऱ्यांची संख्या, ठिकाणे सातत्याने बदलत गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासह इतर मंत्र्यांनी कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवण्याबाबत आग्रह धरला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. सीसीटीव्ही कायमस्वरूपी बसवल्यानंतर येणारे इंटरनेट बिल, देखभाल दुरूस्ती यावर महिन्याकाठी कोट्यवधी रुपये खर्चाची तरतूदच करण्यात आली नाही. प्रशासन आणि राज्य सरकारच्या वादातच अखेर फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने भाडेतत्वावर सीसीटीव्ही बसवण्याच्या कामासाठी निविदा प्रसिध्द केल्या. निवीदा प्रसिध्द झाल्यानंतर मुदत संपेपर्यंत शहरासाठी एक, तर त्र्यंबकेश्वर येथे सीसीटीव्ही बसवण्यासाठी तीन ठेकेदारांनी रस दाखवला. शहरासाठी अवघ्या एका ठेकेदाराचा प्रतिसाद मिळाल्याने निविदा पुर्नप्रसिध्द करून वेळ वाढवून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीसीटीव्ही बसवण्यासाठी अद्याप तीन महिन्यांचा कालावधी बाकी असून, या काळात हे काम पुर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शहरातील १५७ ठिकाणी, ३४८ तर त्र्यंबकेश्वर २०८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. यात पॅनोरॅमिक, पीटीझेड, फिक्स, तसेच एएनपीआर अशा कॅमेऱ्यांचा समावेश आहे. कॅमेरे सुरू करण्याबरोबरच त्याचा डाटा काही कालावधीसाठी स्टोअर करण्याची जबाबदारी ठेकेदारावर आहे.

शहरातील सीसीटीव्ही

पॅनोरॅमिक १०३

फिक्स १५२

पीटीझेड ७५

एएनपीआर १८

एकूण ३४८

त्र्यंबकेश्वर येथील सीसीटीव्ही

पीटीझेड ४७

फिक्स ११५

पॅनोरॅमिक २५

एएनपी​आर १८

एकूण २०५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाला कौशल्याची जोड हवी

$
0
0

जेम्स राफेल यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंत्रज्ञान, व्यवसाय आणि कौशल्य या तिघांच्या जोरावर तरुणांना संधी मिळू शकते. शैक्षणिक संस्थांमध्येच विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण मिळाले तर त्यांचा व्यक्तिमत्व विकास चांगला होतो. त्यामु‍ळे शिक्षणासोबत कौशल्याची जोड हवी, असे प्रतिपादन रिटेलर्स असोसिएशन स्किल कॉन्सिल ऑफ इंडियाचे ते चिफ ऑपरेटिंग ऑफिसर जेम्स राफेल यांनी केले.

कर्मवीर अ‍ॅड बाबुराव ठाकरे इंजिनिअरींग कॉलेजमध्ये 'एम्प्लॉयबिलीटी स्कील आणि एम्प्लॉयमेंट कॉनक्लेव्ह'चे शनिवारी आयोजन करण्यात आले. त्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, इन्स्टो कॉस्मेटिक्सचे उदय खरोटे उपस्थित होते. राज्यात दरवर्षी लाखोंच्या संख्येने इंजिनिअर उत्तीर्ण होऊन बाहेर पडत आहेत. मात्र अनेकांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्याचे कारण कौशल्य हे असल्याचे राफेल म्हणाले. शिक्षण संस्था आणि उद्योग या दोघांनी आता हातात हात घेणे आवश्यक आहे. तसे झाले तरच उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य संधीही लाभू शकेल. आजघडीला उद्योगांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. कारण, त्यांना हवे असलेले कुशल कामगार मिळत नाहीत. यासाठीच ठोस आणि प्रभावी असे धोरण तयार होणे गरजेचे आहे, असे मतही राफेल यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्हिजन ऑफ स्कीलिंग इंडिया' या महत्त्वाकांक्षी उपक्रमावर आधारीत ही कॉनक्लेव्ह आहे. सरकारी व निमसरकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे उद्दिष्ट सफल झाल्याचे प्राचार्य डॉ. जयंत पत्तीवार यांनी सांगितले.

ब्रिजिंग द एम्प्लॉयबिलीटी स्किल्स अँड प्लेसमेंटस गॅप बिटवीन कॉलेजेस अँड कॉर्पोरेटस या विषयावर परिसंवादही झाला. त्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचे सलिल पुळेकर, एचएएलचे डीजीएम एम ए हाफिज, डीटीईचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार, महिंद्राचे डीजीएम भारत मेवाडा, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वास पाटील यांनी सहभाग घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक सर्वार्थाने पर्यटनास अनुकूल

$
0
0

छगन भुजबळ यांचे मत;`तान`तर्फे टूरिझम कॉनक्लेव्हचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशातील झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांच्या स्पर्धेतील नाशिक शहर हे पर्यटनास अत्यंत अनुकूल आहे. नाशिकमधील नागरिकांपासून तर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी या परिसराच्या पर्यटनासंदर्भातील अनुकूल संदेश सर्वदूर पोहचवावा, असे आवाहन माजी पर्यटनमंत्री व विद्यमान आमदार छगन भुजबळ यांनी केले.

जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान) यांच्यावतीने हॉटेल एक्सप्रेस इन येथे आयोजित टूरिझम कॉनक्लेव्हच्या बी टू बी मीटमध्ये त्यांनी देशातील टूर ऑपरेटर्सशी संवाद साधला. या कॉनक्लेव्हसाठी देशातील विविध राज्य आणि शहरांमधून सुमारे साडेचारशे टूर ऑपरेटर्स उपक्रमात सहभागी झाले आहेत.

भुजबळ पुढे म्हणाले, 'झपाट्याने विकास साधणाऱ्या शहरांच्या तपशीलानुसार नाशिकचा देशात १६ वा तर राज्यात तिसरा क्रमांक आहे. या जिल्ह्यात धार्मिक आणि कृषी पर्यटनालाही चांगला वाव आहे. राज्यातील प्रमुख शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेला हा जिल्हा चार आणि सहापदरी महामार्गांच्या सोबतच, दूर अंतराचे रेल्वेमार्ग आणि नजिकच्या विमानतळांमुळे जगाशी जोडला गेला आहे. या सुविधांचा लाभ शहर आणि जिल्ह्यांच्या पर्यटन विकासासाठी शक्य आहे. या दिशेने टूरिझम कॉनक्लेव्हसारखे प्रयोग व्हायला हवेत,' अशीही अपेक्षा यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केली.

सुरूवातीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी यावेळी प्रास्तविक केले. नाशिक आणि परिसराच्या पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी चेंबरच्या माध्यमातून गत पाच वर्षांपासून सुरू असणाऱ्या प्रयत्नांचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. नाशिक महापालिकेच्या वतीने बोलताना नगरसेवक सचिन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. शहरातील पर्यटन व्यवसायाच्या वृध्दीसाठी महापालिकेकडून अपेक्षित सहकार्य केले जाईल, असाही विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

स्टॉल्सला मिळाला प्रतिसाद

देशभरातील टूर ऑपरेटर्सना शहरातील हॉटेल्स आणि पर्यटकांना पूरक अशा बाबींची माहिती उपलब्ध होण्यासाठी हॉटेल व्यावसायिक आणि बिल्डर्स, उद्योजकांनी कॉनक्लेवहच्या ठिकाणी स्टॉल्स उभारले आहेत. देशभरातून आलेल्या टूर ऑपरेटर्सनी या स्टॉल्सला भेटीगाठी देत शहरातील पर्यटन विषयक बाबींचीही माहिती करून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांचे सोमवारी कामबंद आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अलाहाबाद येथे पोलिसाकडून वकिलाची कोर्टाच्या आवारातच गोळी मारून हत्या करण्याची घटना बुधवारी घडली. या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी नाशिक बार असोसिएशनतर्फे कामबंद आंदोलन छेडण्यात येणार आहे. मागील महिन्यातही वकिलांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन छेडले होते.

अलाहाबाद येथील स्थानिक कोर्टात वैयक्तिक वादातून एका पोलिसाने गोळी झाडून वकिलाची हत्या केल्याची घटना बुधवारी घडली. यानंतर उत्तर भारतातील अनेक कोर्टांत वकिलांनी कामबंद आंदोलन छेडले. आता, ऑल इंडिया बार असोसिएशने भारतभर हे आंदोलन छेडण्याचे पत्र पाठवले आहे. त्यानुसार शनिवारी कोर्टात नाशिक बार असोसिएशनची बैठक पार पडली. कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय झाल्याची माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images