मनमाड : नांदगाव-येवला मार्गावरील बेलदारवाडीजवळ दोन दुचाकी आणि टँकर यांच्या तिहेरी अपघातात दोन जण ठार झाले, तर एक महिला जखमी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथून शिर्डीकडे दुचाकीवर जात असलेले राजेंद्र अजय राजपूत (३०) आणि सचिन बारकू पाटील (३५) यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या सोपान काळे व सुमनबाई सरोदे (६५) यांच्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात चौघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून आलेला टँकर त्यांच्या अंगावरून गेला. टँकरच्या चाकाखाली सापडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट